(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रविवार सकाळ!!‏

    प्रिटोरिया मधील जूनमधील रविवार सकाळ!! आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम!! इथे रविवारी ११ नंतर साउथ आफ्रिकेला “जाग” येते. शनिवार संध्याकाळ/रात्र बहुदा पार्टीत घालवायची, हा जणू नियम असल्यागत सगळे जगत असतात, किमानपक्षी सिनेमा तरी नक्कीच!! वर्षातील, ५२ शनिवार म्हणजे ५२ पार्ट्या, हेच इथल्या आयुष्याचे महत्वाचे सार आहे. शुक्रवार दुपार झाली की मुलगा, मुलीला घेऊन( बव्हंशी उलटे देखील!! म्हणजे मुलगी,मुलाला घेऊन!!) कुठे रात्र काढायची, याचे Plans ठरवायला लागतो.इथे, रात्रीचे जेवण साधारणपणे ७ पर्यंत घेतले जाते. नंतर मग सगळी रात्र ताब्यात घेण्यासाठी!! यातून कुठलाच समाज सुटलेला नाही. गोरे, काळे, भारतीय, सगळेच हा अलिखित नियम पाळत असतात.आठवड्याची सगळी धडपड ही शनिवार रात्रीसाठी असते!!
    सुरवातीला मला हे जमवून घेणे अवघड गेले. संध्याकाळी सात वाजता, जेवण!! मुंबईकराला त्याचे अप्रूप वाटणारच.मला तर अजूनही वाटते. अर्थात, जिथे दुपारचा “लंच” म्हणजे एखादे Sandwich, तिथे मग रात्रीचे(!!) जेवण इतक्या लवकर क्रमप्राप्तच!!
    इथल्या पार्ट्या देखील “परिटघडीच्या” असतात. मोजके बोलणे(हा ब्रिटीश खाक्या!!), त्यातून ओठातल्या ओठात पुटपुटल्यासारखे शब्दोच्चार, (गरजूंनी परदेशी जाताना, अशा बोलण्याचा सराव किंवा निदानपक्षी ऐकण्याचा सराव जरुरीचा आहे!! अनाहूत सल्ला!!) अशी सुरवात असते. जरावेळाने, संगीत (अर्थात बहुतकरून पाश्चात्य अर्थात पार्टीत गोरे किंवा काळे असेल तर!! भारतीय असतील तर “चटणी” नामक भयाण संगीताविष्कार सहन करावा लागतो!!) लागले की, हळूहळू लोकांना “कंठ” फुटायला लागतो. म्हणजे कुणी “गात” नाही पण लयीच्या अंगाने बोलणे सुरु होते. सगळा कारभार बहुतांशी उभ्यानेच!! कारण, इथे पार्टी म्हणजे, बव्हंशी Barbecue असतो. एका मोठ्या लोखंडी भांड्यात ( पातेलीपेक्षा घेर आणि आकार मोठे आणि मुख्यत: चौकोनी!!) त्यात, कोळसे घालायचे आणि पेटवायचे.
    धगधगीत निखारे व्हायला लागले की त्यावर जाळी (लोखंडाची) ठेवायची आणि त्यावर मग, चिकन,मटण,सोया, पोर्क किंवा बीफ देखील, यांचे तुकडे (थोडा मसाला लावून ठेवलेले), याला sausages, chops असे म्हणतात. भाजून करपले की काढून हातातील प्लेटमध्ये वाढून घ्यायचे. बहुतेक पार्ट्यांमध्ये हाच “मेनू” असतो. फरक, मसाल्यामध्ये!! अर्थात, हातात, ग्लास हवाच!! त्यात, कधी बियर, कधी व्हिस्की असे पेय असते. एका हातात ग्लास आणि दुसऱ्या हातात प्लेट, अशी कसरत करावीच लागते!! त्याबरोबर मग गप्पा मारायच्या, असाच बहुतेक पार्ट्यांच्या बाबतीत “सोहळा” असतो. इथे तसा औपचारिकपणा भरपूर. शक्यतो चेहऱ्याची घडी न मोडता, आपला वावर ठेवायचा आणि तत्सम पार्टी “जोक्स” एन्जॉय करायचे!!
    हे जोक्स इतके भयानक असतात की, का हसायचे? हा मला नेहमीच प्रश्न पडतो!! समजा गोऱ्या लोकांच्यात पार्टी असेल तर, तिथे त्यामानाने मोकळेपणा (क्वचित नको तेव्हढा देखील!!) आढळतो. संगीतावर, जसे जोडपे असेल त्याप्रमाणे जोड्या तयार होतात आणि लगेच पाय थिरकायला लागतात. इथे, लग्नाची/बिनलग्नाची असला “बुरसटलेला” प्रश्नच उद्भवत नाही!! नृत्य करणे, हे महत्वाचे!! आपल्याला बघताना असे वाटते की पाश्चात्य नृत्य एकसाची आणि सोपे आते पण प्रत्यक्षात असा प्रकार नसतो. Ball Dance, Salsa, Rap या सगळ्या संपूर्ण वेगळ्या नृत्यशैली आहेत. प्रत्येकाची पायाची, आणि तदनुशंगाने शरीराची हालचाल भिन्न आहे. खरे तर संगीतात देखील भिन्नता आहे. आपण बारकाईने ऐकत/बघत नाही. अनिलने देखील बरेचवेळा सहभाग घेतला आहे.
    पहिल्यांदा अपरिचित/संकोची वाटते परंतु इथे तशी औपचारिकतेची बंधने नंतर गळून पडतात. परंतु गोऱ्या, काळ्या किंवा भारतीय समाजातील पार्टीची पद्धत ही बव्हंशी अशीच. प्रत्येक शनिवार याच धर्तीवर घालवली जाते. अनिल काही प्रत्येक शनिवारी असा जात नव्हता. त्याने देखील, नंतर स्वत:चे “ग्रुप्स” तयार केले. टिपिकल महाराष्ट्रीयन लोकांच्या पार्ट्या होतात. तिथे बरेचवेळा मानसिक कुतरओढ दिसते. बहुतेक सगळे, मध्यमवर्गीय संस्कृतीमधील परंतु काहीजण,इथले युरोपियन वातावरण बघून, थोडे बावचळलेले!! त्यामुळे, या संस्कृतीत वावरताना, मनाची कुतरओढ होताना दिसते. एकदम, आपली संस्कृती टाकून देता येत नाही आणि इथल्या संस्कृतीत लगेच सामावून घेणे अवघड जाते. खरेतर संस्कृती टाकायची गरज काय, हा माझा प्रश्न!!
    शुक्रवार आणि शनिवार संध्याकाळ, इथे “सोहळा” म्हणून साजरा करायची पद्धत आहे. गोऱ्या संस्कृतीने दिलेली, या देशाला देणगी!! जवळपास शतकाहून अधिक वर्षे गुलामीचे दास्य लादलेले, त्यामुळे, गोरे सोडले तर सगळ्यांचीच मानसिक स्थिती दोलायमान!! अजूनही त्या खुणा दिसतात. गोरा दिसला की दबकून बोलायचे/वागायचे, अशीच इथली मानसिक ठेवण आहे. अर्थात, असे जर असेल तर गोरे लोक, गुर्मीत राहणारच!! त्याचा प्रत्यय, आज २० वर्षे झली तरी येतो. त्यामुळे, इथल्या गोऱ्यांच्या पार्ट्या, घरे, गाड्या, राहणीमान सगळेच इतरांपेक्षा “उच्च”!!
    अजूनही, पूर्वीच्या गोऱ्या लोकांच्या वस्त्या बघितल्या तरी कल्पना येते. नुसत्या वस्त्याच नव्हे तर त्या वस्तीतील हॉटेल्स, क्लब्स, मॉल्स सगळे वेगळ्या ठेवणीचे!! इथे, सहज मनात आले म्हणून भेटायला जाणे, हि अजिबात पद्धत नाही. अगदी, आपल्या आई/वडिलांना भेटायचे झाले तरी, फोनवरून भेटायची वेळ ठरवायची, शक्यतो, शनिवार दुपार किंवा रविवार दुपार!! संध्याकाळ, सोहळ्यासाठी रिकामी ठेवायची असते!! तुम्ही, कुणाच्याही घरी, “सहज या बाजूला आलो, तेंव्हा भेटूया” असे जाता येत नाही.
    केवळ नजरेने “नापसंती” व्यक्त होते किंवा समजा गोरा असेल तर तोंडावर “नापसंती” ऐकण्याची तयारी ठेवावी!! एकांतवास या गोष्टीला, इथे अपरिमित महत्व दिले जाते, तरुणाईला!! इथे प्रत्येक वयोगटाचे समूह असतात. वयाची २१ वर्षे झाली की तो वेगळ्या गटात!! लग्न झाले की वेगळा गट!! तिशी, चाळीशीचे वेगळे गट!! इथली समाजव्यवस्थाच किडलेली आहे!! लग्न म्हणजे निरुपाय, असेच बहुतेकांचे मत आहे!! हे सगळे भारतीय संस्कृतीत राहिलेल्याला पचविणे अवघड असते.
    शनिवारच्या पार्ट्यांत ह्या सगळ्या दृष्टिकोनाचा अनुभव येतो. ह्याशिवाय इथे वेगळे आनंदनिधान नाही!! फार तर, मॉल्समध्ये जाऊन खरेदी करणे( हे मात्र प्रचंड!!), तिथेच सिनेमाला जाणे किंवा तिथेच असलेल्या अप्रतिम पब संस्कृतीचा अथवा तरुण असलात तर वेगवेगळ्या क्लब्जचा आस्वाद घेणे!! आपल्याला ह्यामागील उद्देश नेमकेपणाने कळत नाही. पण इथला समाज ह्याच संस्कृतीत सुखनैव बुडालेला आहे. आता, हि संस्कृती बरोबर की चूक, हा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांना नाही!! इथे एकत्र जमलो की निदान जे संगीत चालू आहे, त्याचा मनापासून “आस्वाद” घ्यायचा असे नसून, त्यात “दिखाऊ” वृत्ती अधिक!! साहित्यावर बोलायचे ठरले (असे फार क्वचित घडते, मला असा अनुभव फक्त २ वेळा आला आहे!!) ठरले तर आवड इतकी वेगळी असते की त्यावर काय बोलायचे, हाच मला प्रश्न!! संगीत हे संगीत म्हणून ऐकण्यापेक्षा त्यातील ठेक्यालाच अधिक महत्व!!
    याचा कळस, भारतीय वंशातील लोकांना भेटल्यावर होतो. अशाच प्रकारे, अनिलची वर्षे गेली, जात राहिली. असे शेकडो शनिवार आले आणि रेनकोटवरून पाणी ओघळावे त्यप्रमाणे ओघळून गेले!! रविवार सकाळ, यातूनच उगवते. आदल्या रात्री अशाच पार्टीला गेल्याने, अंगात प्रचंड आळस भरलेला, त्यामुळे तसाच बेडवर पसरलेला!! बेडवरून खाली उतरावे, असेच वाटत नाही सकाळचे एव्हाना ९(च) वाजलेले असतात.आदल्या रात्रे थोडा पाऊस शिंपडल्याने बाहेर “गारठा” म्हणावा अशी थंडी पसरलेली!! त्यामुळे, अनिल आपले हात पसरतो आणि बाजूलाच असलेल्या सीडी प्लेयरचे बटण दाबतो!! सिस्टीममधून रागदारीचे सूर ऐकायला येतात आणि त्या सुरांच्या गुंगीत परत झोपेच्या अधीन होतो!!
    - अनिल गोविलकर

  • विक्षिप्तांचे प्रकार

    सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्यप्राणी समजावून घेणे अतिशय अवघड आहे. जे केवळ वर्तमानाच जगतात अशा चतुष्पाद प्राण्याचे व पक्ष्यांचे जीवन मर्यादित क्षेत्रात, विशिष्ट पद्धतीने नेमून दिल्यासारखे असते. त्यांची चाकोरी ठरलेली असते; परंतु तिन्ही काळात जगणाऱया माणसाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. पंचज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने, स्वयंप्रेरणेने, प्रतिभेने तो प्रगती साधत असतो. त्याला मर्यादा नाही. त्यामुळे माणसांच्या तऱहा अनेक, एकासारखा दुसरा नाही.

  • कधी कोणाची नक्कल करू नये.

  • उगाच काहीतरी – २७

    आज सकाळची अतिशय ट्राफिकची वेळ. सिग्नल वर एक कार थांबलेली. श्रीमान ड्रायव्हिंग सिटवर आणि शेजारच्या सिटवर श्रीमती लिपस्टिक लावायला सुरवात करतात. तितक्यात सिग्नल हिरवा होतो आणि कार हळुवारपणे पुढे निघते आणि तेवढ्यात..
    डाव्या बाजूचा रिक्षावाला अचानकपणे कारच्या समोरून उजव्या बाजूला वळतो. कारला करकचून ब्रेक लागतो आणि कार झटका देऊन तिथेच थांबते.
    श्रीमान विंडो खाली करून रिक्षावाल्याच्या दिशेने ' अरे मा... '
    तोवर रिक्षा सुसाट वेगाने पसार.
    या भूतलावरील झालेल्या कुठल्याही घटनेची जाणिव नसणाऱ्या आणि आपल्याच धुंदीत असलेल्या श्रीमतीजी अतिशय खूंखारपणे श्रीमानजींकडे पाहताहेत. त्यांची लिपस्टिक ओठांच्या अर्ध्यातुन गालामार्गे पार कानापर्यंत पोहोचलेली...... आणि हे सांगायलाच नको की श्रीमानजींचा Monday panic त्याक्षणीच सुरू झाला...
    -- अमोल पाटील
  • “रोमहर्षक ढाक बहिरी ट्रेक”

    तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी; माझे मीपण हरवून तुझ्यात हरवलेला मी…. जेव्हापासुन तु(सह्याद्री) आयुष्यात आलिस तेव्हापासुन असंच वाटु लागलंय.. कूठुन आलोय, कुठे जायचयं, दिशाहीन भरकटलेल्या नावेसारखा या माणसांच्या समुद्रात मी वाहत चाललो होतो…तुझ्या येण्याने निदान प्रवाह तरी मिळाला.. …

  • चिमण्यांची भाषा.

     

  • मदार त्या पाण्यावर !!!

    रक्ताचे पाणी झाले,
    आणि बरसले छाताडावर,
    पाणी पिऊन लोक …. ….. करतात,
    खुल्या मोकळ्या भिंताडावर………

  • फिडेल कॅस्ट्रो

    मुळचे स्पॅनिश असलेले परंतु क्युबातच कित्येक पिढ्या गेल्यामुळे वेगळी अस्मिता जोपासणार्या क्युबन जनतेने १८९८ मध्ये क्युबात क्रांति केलि. अमेरिकेने या क्रांतीत मदत करून आपले एक बाहुले सत्तेवर बसविले,या बाहुल्याचे नाव होते जनरल बातिस्टा . या बदल्यात अमेरिकेने क्युबातील टेलिफोन,वीज,साखर आदी महत्वाच्या व्यापारावर आपले नियंत्रण मिळविले. यात क्युबाची जनता भरडली जाऊ लागली. या असंतोषाला वाचा फोडली एका तरुण वकिलाने त्याचे नाव होते फिडेल कास्त्रो . लष्करी राजवट उलथविण्यासाठी फिडेलने देखील शस्त्र उचललि. अनेक घडामोडी घडून सत्तेची सूत्रे कॅस्त्रोच्या हातात आलि. कॅस्त्रोने सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपन्यांची हकालपट्टी सुरु केली,हे पाहून सोवियत रशियाचा क्युबामधील रस जागा झाला.

    तत्कालीन सोवियत अध्यक्ष निकिता कृश्चेव यांनी "साम्यवाद स्वीकारल्यास रशिया क्युबाला सर्वतोपरी मदत करेल असा निरोप कॅस्त्रोंना पाठविला ज्याला त्यांनी मान्यता दिली.अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून ९० किमी अंतरावर रशियन कळपातला साम्यवादी क्युबा अमेरिकेच्या डोळ्यात सलू लागला.क्युबन अध्यक्ष फिडेल यांना मारण्यासाठी साठि सी आय ए ने १०/१५ वेळा जीवघेणे हल्ले केले परंतु त्यातून कॅस्त्रो सहीसलामत वाचले.

    इकडे रशियाने गुपचूप कारवाइद्वारे क्युबात अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र तळ उभारायचे ठरविले ,त्याकाळात अमेरिका क्युबन समुद्रात जहाजांवरिल विमानांद्वारे गस्त घालत असल्यामुळे इतकी मोठी मोहीम सुरवातीला त्यांच्या नजरेतून निसटली.परंतु ६२ च्या सप्टेंबर मध्ये अमेरिकी विमांनाना सहा रशियन जहाजे मोठ्या कंटेनरसह क्युबाच्या दिशेने जाताना दिसल्याचा रिपोर्ट वर पाठविला गेला.

    त्याआधी चार वर्षे रशियाने इल्युजन २८ हि बॉम्बर विमाने मित्र देशांना वाटल्याचे अमेरिकेला माहित होते त्यामुळे १४०० किमी प्रहार मर्यादा असलेली किमान २१ विमाने क्युबाला पाठविण्यात आली असल्याचा निष्कर्ष अमेरिकेने काढला जो खळबळ माजविण्यास पुरेसा होता. आता अंदाजपंचे काम करण्यापेक्षा बंदी घातलेल्या यु-२ या हेरगिरी विमानांना अमेरिकेने मोकळे सोडले. ज्यात उच्च दर्जाचे कॅमेरे बसविलेले होते. या विमानांनी भरारी मारून त्यातल्या फिल्म्स सी आय ए च्या ताब्यात दिल्या. मोठ्या प्रोजेक्टरवर त्याचे निरीक्षण करून तपासणी करण्यात आली, दोन दिवस हे काम चालू होते. एका तज्ञाच्या लक्षात एक क्रेन सारखी लौन्चर्स आली,जी १९०० किमीच्या अण्वस्त्र वाहू क्षेपणास्त्रा साठी वापरली जात. त्याच फिल्ममध्ये ५०० सैनिक मावतील एवढे तंबू,क्षेपणास्त्र वाहक वाहनं,आठ क्षेपणास्त्र ,इंधनाचे tankars आदी दिसत होते. तिथे सुरु असलेले काम ४००० किमी मारक क्षमता असलेल्या तळाचे सुरु आहे हे लक्षात येताच सर्वांचे धाबे दणाणले .

    तज्ञांनी आपले निष्कर्ष सुरक्षा सल्लागारांसमोर मांडले,त्यांनी लगेच अध्यक्ष जोन केनेडी यांची भेट घेऊन स्थिती स्पष्ट केलि. अध्यक्षांनी चेहर्यावर चिंता न दाखविता त्या दिवसाचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे पार पाडले. दुसर्या दिवशी महत्वाची बैठक पार पाडली ज्यात सर्व निर्णय केनेडिंवर सोपविण्यात आला. रशियाच्या या हालचालिंकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना प्रतिकार करणे एवढेच पर्याय त्यांच्यासमोर होते. लोटांगण घालायची सवय लागल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरले असते,तर युद्धाला तोंड फोडल्यास अणु युद्धाला प्रारंभ होणार होता. जगाचे भवितव्य धोक्यात आले होते. केनेडिंनि कठोर वृत्तीचे प्रदर्शन करून अमेरिकी सैन्याला डिफ़कोन-३ चा आदेश दिला. हा आदेश म्हणजे युद्ध हालचालिंना सुरवात करायची होति. या आदेशाच्या पाच पायऱ्या असतात.डिफ़कोन -५ म्हणजे शांतता काळ,डिफ़कोन -२ म्हणजे युद्धासाठी तयार राहाणे आणि डिफ़कोन -१ म्हणजे प्रत्यक्ष युद्धाला सुरवात.

    आंतरखंडिय अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे तयार ठेवण्यात आली,पाणबुड्या जगभरातील आपापल्या नेमलेल्या जागेवर निघाल्या,तीन विमानवाहू जहाजे,पाच विनाशिका,एक गायडेड मिसाईल क्रुजर,आणि ६ युद्ध नौकाना क्युबन समुद्राची नाकेबंदी करायची होती त्यांना डिफ़कोन -२ चा आदेश होता व गरज भासल्यास डिफ़कोन-१ चा आदेश आल्यावर प्रत्यक्ष हल्ला करायचा होता.

    २२ ऑक्टोबरला केनेडिंनि अमेरिकन जनतेला उद्देशून भाषण केले त्यात जनतेला परिस्थितीची कल्पना देण्यात आलि. त्यात रशियाला इशारा देण्यात आला. हे भाषण म्हणजे युद्धाला प्रत्यक्ष तोंड फोडण्याची तयारी होति. या भाषणा नंतर अचानकपणे रशियन अध्यक्ष कृश्चेव यांनी एक पाऊल मागे घेऊन,क्युबाची नाकेबंदी दूर केल्यास आणखी क्षेपणास्त्रे क्युबात न पाठविण्याची तयारी दाखविलि.

    परंतु यात आधीच पाठविलेल्या अण्वस्त्रांबद्दल उल्लेख न्हवता,अमेरिकेला हा प्रस्ताव मान्यच न्हवता. २४ ऑक्टोबरला क्युबाला निघालेल्या २५ रशियन जहांजापैकि १२ रशियन नौका अमेरिकन युद्ध नौकांच्या समोरासमोर आल्या. त्यात त्यांना सुरक्षा देणारया पाण बुड्याहि होत्या. त्यांना अडविण्यात आले. सुदैवाने रशियन जहाजे पुन्हा माघारी गेली,कुणि चुकून जरी एक बटन दाबले असते तर जगाने न भूतो न भविष्यति असा संहार पाहिला असता. ज्यात संपुर्ण मानवजात नष्ट झाली असति.

    परंतु माघार घ्यावी लागलेल्या क्रुश्चेवनि अमेरिकेची हेरगिरी करणारी दोन यु-२ विमाने पाडून आपला राग व्यक्त केला. यावर केनेडिंनि संयम दाखविला कृश्चेवनि केनेडिंपुढे एक प्रस्ताव ठेवला त्यात तुर्कस्तानात असलेली क्षेपणास्त्रे अमेरीकेनी काढुन घ्यायची व त्याबदल्यात रशिया क्युबातील क्षेपणास्त्रे काढुन घेईल असे सांगितले. केनेडिंनि याला नकार देऊन बिनशर्त माघार घेण्याचा इशारा रशियाला दिला. क्रुश्चेवनि याला काहीच उत्तर दिले नाही,नाईलाजाने केनेडिंनि डिफ़कोन-२ चे आदेश सैन्याला दिले. पण डिफ़कोन-१ चा आदेश देण्याची वेळच आली नाहि. २८ ऑक्टोबरला निकिता क्रुश्चेव यांनि क्युबातील अस्त्रे काढुन घेत आहोत असे जाहीर केले.

    परंतु यात रशियाच्या बाजूने माघार घेतली गेली असली तरी ३० ऑक्टोबर १९६२ हा दिवस प्रत्यक्ष युद्धाचा दिवस म्हणून अमेरिकन अध्यक्षांनी निश्चित केला होता हे नंतर उघड झालेल्या कागदपत्रांत कळाले. त्या काळात ४/५ हजार अणुबॉम्ब असलेल्या या देशांनी संपूर्ण मानवजातीचे भवितव्य आपल्या साम्राज्यवादाच्या हव्यासापोटी पणाला लावलेले होते.

    जय हिंद
    तुषार दामगुडे

  • एक गंमत उंदराची

    काल रात्री झोपेमध्ये व्यत्यय माझ्या आला
    मज उठ्वूनी गेला
    कुठुनसा एक उंदीर घरामध्ये शिरला
    मज छ्ळून गेला
    खुड्बुड खुडबुड करूनी त्याने
    उच्छाद मांडला
    मज चिड्वुनी गेला
    कपातात शिरूनी त्याने
    कुरतडला भरजरी शेला
    मज रड्वुनी गेला
    शेवटी त्याला मारण्याचा
    निश्चय माझा झाला
    औषध खाऊनी उंदीर अखेर
    निघुनिया गेला
    मज हसवूनी गेला

    -- प्रभा मुळ्ये

  • मराठी माणसाला काय येतं?

    मराठी माणसाला काय येतं?