(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाई बाई मनमोराचा

    बाई बाई मनमोराचा

    १९६० साली प्रदर्शित झालेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गीतकार होते जगदीश खेबुडकर. संगीत दिले आनंदघन यांनी. तर स्वर होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..

  • लोकल प्रवाशांसाठी हेलिकॉप्टरचे महाकाय पंखे !

    नवे केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर काही मंत्र्यांचे थेट कामाला लागणे लक्ष वेधून घेते. वृत्तपत्रे आणि चॅनेलीय मुलाखती, सत्काराच्या प्रचंड सभा, कार्यकर्त्यांच्या बैठकी, मोठमोठे दौरे असल्या गोष्टी टाळून काही मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यात श्री. सुरेश प्रभू यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी रेल्वे खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी अत्यंत तळमळीने अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. सरकते जिने,उद्वाहने,आरक्षण,तिकिटांचे प्रकार, प्रवासात लहान मुलांसाठी दुधाची सोय, वायफायची सुविधा, प्रवासात विविध गोष्टींची उपलब्धता , स्वच्छ पाणी, फलाट सुशोभित करणे,इत्यादी अगणित नवीन गोष्टी प्रभू यांनी केल्या आहेत. ते अनेक नवीन नवीन प्रयोग करीतही आहेत. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याचा ९२ वर्षांचा प्रघात मोडून ते देशाचे आणि रेल्वेचे काही कोटी रुपये वाचविणार आहेत. अर्थसंकल्पाच्यावेळी त्यांना अफाट प्रसिद्धी मिळत होती ती बंद झाली तरी देशाचा फायदा त्यांना महत्वाचा वाटतो हे महत्वाचे आहे.

    असाच एक छोटासा पण महत्वाचा प्रयोग त्यांनी रेल्वे फलाटावर केला आहे.आश्चर्य म्हणजे त्याची कुणीही अगदी वृत्तपत्रांनीही दखलच घेतलेली नाही.सतत नकारात्मक गोष्टींचा आक्रस्ताळी आणि बटबटीत मारा करणाऱ्या बहुतेक वृत्तवाहिन्यांना यात अजिबात रस नसावा.

    हा वेगळा प्रयोग असा- रेल्वे फलाटावरचे सध्याचे पंखे हा एक अत्यंत विनोदी प्रकार आहे. अगदी पंख्याखाली तुम्ही उभे राहिलात तर २ /३ माणसांना थोडासा वारा मिळतो. कित्येक पंखे तर हवा काढून घेण्यासाठी बसविले असल्यासारखेच वाटतात. काही नुसतेच गरगरा फिरत असतात. लाखो पंखे पुरविणाऱ्या कंपन्यांची चांदी करणारा पण प्रवाशांसाठी निरुपयोगी असा हा मामला ! बरे अनेक पंखे बसविल्यामुळे विजेचा वापरही अमर्याद होतो.

    प्रभूजींनी यासाठी स्थानकांवर हेलिकॉप्टरच्या पंख्यांच्या आकाराचे प्रचंड पंखे बसवायला सुरुवात केलेली दिसते. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ३ पात्यांचा तर अंधेरी स्थानकात ६ पात्यांचे ३ असे एकूण ५ प्रचंड पंखे बसविण्यात आले आहेत. या महाकाय पंख्यांमुळे हजारो चौरस फुटांच्या क्षेत्रात कुठेही एकसारखा आणि पुरेसा वारा लागतो.पंख्याखाली जाऊन उभे राहावे लागत नाही. एवढ्या भागातील सुमारे २५ / ३० पंखे यामुळे काढून टाकता आले आहेत त्यामुळे विजेचीही बचतच होणार आहे,यामुळेच प्रभूजींकडून अशा वेगळ्या कामाच्या अपेक्षा वाढतात. स्वातंत्र्यापासून अनेक रेल्वेमंत्री हे उत्तरप्रदेश आणि बिहारचे होते. त्यांनी कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता आपापल्या राज्यातील लोकांना रेल्वेमध्ये भरभरून नोकऱ्या दिल्या. प्रभूजींनीही महाराष्ट्र ( विशेषतः कोकण-- मालवण) आणि गोव्यातील तरुणांना रेल्वेमध्ये अशाच नोकऱ्या द्याव्यात आणि आशीर्वाद घ्यावेत.

    अनेक रेल्वे मंत्र्यांनी गाड्यांना " आपला ठसा " उमटविणारी नावे दिली. श्रीम. ममता बॅनर्जीं यांनी दिलेले "दुरांतो " हे नाव काय आहे असा प्रश्न कुणी विचारला नाही. प्रभूजींना अशी विनंती आहे की त्यांनीही मराठी, मालवणी, कोंकणी भाषा व संस्कृती दर्शविणारी नावे रेल्वे गाड्या--सेवांना द्यावीत !

    प्रभूजींकडून इतकी अपेक्षा म्हणजे फार नाही !

    -- मकरंद शां. करंदीकर

  • श्री केदारनाथ

    हिमालयाच्या शिखरावर हे ज्योतिर्लिंग वसलेलं आहे. इथे जाण्याचा रस्ता फारच कठीण आहे. या ठिकाणी कायम हिमवर्षाव होत असतो. आणि म्हणूनच या लिंगाचं दर्शन एका विशिष्ट वेळेलाच होतं. 

  • आझाद सेना … गर्द चा प्रवेश .! ( नशायात्रा – भाग १७ )

    आझाद सेनेची पहिली मिशन कशी असली पाहिजे या वर आमच्या रोज चर्चा होत असत , शहरातील काही लबाड राजकारणी , दोन नंबरचे काम करणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांना धमकीची पत्रे पाठवावीत असा एक मुद्दा समोर आला , म्हणजे अश्या लोकांना तुमचे सगळे धंदे आम्हाला माहित आहेत आणि आपण हे सगळे सोडून जर नीट वागले नाहीत तर होणारे परिणाम भोगायला तयार राहा असे पत्र या लोकांच्या पत्यावर पोस्ट करायचे .

  • सजीवांतील संदेशवहन

    या पृथ्वीतलावर, सजीवांना सुखाने जगता यावे, त्यांचे अस्तित्व टिकून रहावे, इतकेच नव्हे तर त्यांच्या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन सबल प्रजाती निर्माण होऊन त्यांच्या सजीवांची संख्या वाढावी यासाठी निसर्गाने, काळजीपूर्वक भक्कम तजवीज करून ठेवली आहे.

    सजीवांनी, आपले विचार एकमेकास कळविणे आणि ते विचार त्यांना कळणे, या साठी निसर्गाने, कोणती आणि कशी यंत्रणा सिध्द केली आहे, ते या लेखात वाचा.

  • राडा ..दांगोडा.. ! (नशायात्रा – भाग २७)

    आता परिस्थिती गंभीर झालेली होती मग आमच्या लक्षात आले की आम्ही धिंगाणा करणारे सुमारे ३० मुले होतो तर होस्टेल मध्ये राहणारी मुले जास्त होती संख्येने .. हळू हळू वरच्या होस्टेल मधली मुले खाली येऊन चारही बाजूने आम्हाला घेरत होती एव्हाना ही बातमी आमचे व्यवस्थापक फडके सर् यांच्या पर्यंत पोचली होती ते धावत येऊन आम्हाला समजावू लागले

  • ईशान

    HIV Rehabilitation centre ला जायचा माझा तो पहिलाच दिवस होता. एड्‍स हा स्पर्षानी होत नाही, डास चावण्यानी होत नाही हे सर्व माहिती असून मनाची तयारी व्हायला बरेच दिवस लागले. एका मित्राकडून माहिती मिळाली होती की इथे फ़क्त लहान मुलंच ठेवतात.

  • जिवनसाथी

    खरं तर नावातंच खुप काही आहे. अखंड़ जिवनभर जो आपल्याला साथ देईल किंवा देवु शकतो अशी व्यक्ती म्हणजे जिवनसाथी.

  • लाय लाय लाय लाय लायेकरणी’ कोळीगीताच्या निमित्ताने

    “लाय लाय लायेकरणी” हे असेच एक कोळीगीत. त्यात त्याकाळच्या वेगळ्या प्रदेशात राहाणाऱ्या कोळी बायकांच्या विशिष्ट वेषभूषेवरून, चाली रीती वरून, बोली भाषेवरून ती कोणत्या गावातील  आहे हे ओळखता यायचे. ह्या गाण्यात त्याचेच वर्णन केले आहे. नीट ऐकाल तर त्यावेळच्या मुंबईत असणाऱ्या गावांची नावे (वेसाव, भांडुप, वरळी, दांडा, मालवणी, कुलाबा, शिवडी, शिव, वसई, कर्जत माहीम वगैरे) आपल्या कानावरून जातील.

  • फुलांची रांगोळी

    रांगोळी कसली काढलेय यापेक्षा ती काढण्यामागची दृष्टी महत्त्वाची. ही सुरेख रांगोळी काढलेय फुले आणि पानांपासून..

    रांगोळीसाठी तुम्ही किती खर्च करता हे दुय्यम आहे. निसर्ग सर्वांपेक्षा श्रीमंत आहे.

    p-28728-flower-rangoli