तू असतोस
तेव्हाच फक्त जगणं असतं
एरवी फक्त सावली पांघरते जगण्याची
बाबू आणि शशी हि काही काल्पनिक कथा नाही उद्या जर बाबुला ८०% जरी पडले असते तरी त्यांची पालक मंडळी दुखीच असतील
एक मद्यपी एका गुरूंकडे गेला. म्हणाला, मला संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे. अनेक गुरूंना मी भेटलो आहे. पण, मी पक्का दारुडा आहे. मला सकाळी तोंड धुतल्याबरोबर पहिला पेग लागतो. रात्री झोपेपर्यंत मी अनेक बाटल्या रिचवतो. सगळे गुरू म्हणतात आधी दारू सोड. मग तुला संन्यास देतो. तुमचं काय म्हणणं आहे?
हा गुरू जरा वेगळा होता. तो म्हणाला, तुला दारू पितोस, गोमूत्र पितोस, स्वमूत्र पितोस की आणखी काही पितोस, हा तुझा विषय आहे? त्याच्याशी माझा काय संबंध? पी, बिनधास्त पी. तुला हवी तेवढी पी. मी तुला दीक्षा देणार. संन्यासी बनवणार. अट फक्त एकच आहे. एकदा संन्याशाची वस्त्रं परिधान केलीस की ती कायमस्वरूपी घालावी लागणार. दिवसातून दोन तास संन्यासी बनतो आणि बाकी वेळ शर्टपँटपायजमाबर्म्युडा घालून फिरतो, असं चालणार नाही. एकदा भगवं वस्त्र परिधान केलंस की ते अंघोळीच्या वेळेव्यतिरिक्त अंगातून काढायचं नाही.
एवढी छोटी अट आहे, म्हटल्यावर दारुड्याने आनंदाने ती मान्य करून संन्यासदीक्षा स्वीकारली. महिन्याभरानंतर तो परत आला आणि गुरूच्या पायावर डोकं टेकून म्हणाला, तुम्ही माझा सॉलिड गेम केलात.
गुरूंनी विचारलं, काय झालं?
तो म्हणाला, तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी भगवी वस्त्रं स्वीकारली आणि संन्यास घेऊनही मद्यपान करता येणार, या आनंदात बारमध्ये गेलो. बारच्या दारात पोहोचलो आणि बाहेरच एकाने गाठलं, म्हणाला, मला आत जाण्यापासून अडवा. रोखा. महाराज मला उपदेश करा. मी अट्टल दारूडा बनलो आहे. मी त्याला सांगितलं, मीही अट्टल दारुडाच आहे, मीही बारमध्येच चाललोय. पण, माझी वस्त्रं पाहून त्याचा विश्वास बसेना. त्याच्या हट्टाखातर मी त्याला उपदेश केला. तोवर इतर चार लोक गोळा झाले. त्यांनी मला जवळच्या बगीच्यात नेलं आणि सत्संगच करायला लावला. मग मला बारमध्ये जाण्याची
भीती वाटायला लागली. दारूच्या दुकानात गेलो, तर दुकानदाराने नम्रतेने नमस्कार केला आणि माझ्यासाठी दूध मागवलं. मी बाटली मागितली, तर म्हणाला, महाराज, चेष्टा करताय का? मी हे दुकान चालवतो, पण थेंबालाही स्पर्श करत नाही. तुमच्या सत्संगाला कुठे येऊ सांगा. नंतर नंतर ही वस्त्रं परिधान करून देशी दारूच्या अड्ड्यावरही उभं राहण्याची माझी हिंमत होईना. एवढ्या सगळ्या भानगडीत माझा दारूचा मजा किरकिरा झाला तो कायमचाच.
गुरू हसले आणि म्हणाले, माझ्याकडून आजही कसलीही आडकाठी नाही. तुला दारूच्या नशेची ओढ असेल, ही वस्त्रं त्याआड येत असतील,तर ही वस्त्रं त्याग आणि खुशाल दारू पी.
शिष्य हसून म्हणाला, आता ते कठीण आहे. तुम्ही मला त्यापेक्षा मोठं व्यसन लावलंत.
एका मोठ्या पातेल्यात आम्ही बनवलेली थंडाई ठेवली होती , मग कोणीतरी सांगितले त्यात जर तांब्याचे नाणे टाकले तर अधिक जास्त नशा येते , लगेच तांब्याचे नाणे कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला , एकाने त्याच्या आजीच्या जवळ असे तांब्याचे नाणे ठेवले होते ते आणले ( मला वाटते या नाण्यालाच खडकू असे म्हणतात ) एकदाची थंडाई तयार झाली आणि मग एकमेकाला आग्रह करून प्यायला लावणे पण सुरु झाले .
प्रा. विजय यंगलवार यांनी संपादित व शब्दांकित केलेले व नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले पंचगव्य औषधोपचार या माहितपूर्ण पुस्तकामध्ये पंचगव्याविषयी माहिती अक्षरश: ठासून भरलेली आहे.
पंचगव्य औषधोपचार :
विजय यंगलवार
नचिकेत प्रकाशन
पाने : 80, किंमत : 80 रू.
समाजकार्य करताना आपण जे काम करतो आहे, व ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्याविषयी मनात प्रेम, आत्मीयता व स्थिरता हवी. निश्चलपणे व आजुबाजुला असलेल्या अडथळयांची तमा न बाळगता इतरांसाठी झटणारे समाजसेवक त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तींना अजिबात घाबरत नाहीत. त्यासाठी लागणारे असामान्य धैर्य, स्वतःच्या तत्वांवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, इतरांसाठी काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी लागणारी जिद्द व अखंड सेवाभाग या सर्व गोष्टी अंगी बाणवण्यासाठी मनात शुध्दता व शरीरात बळ हवं असतं. जरी सर्व धार्मिक संघटना समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी झटतीलच असं नाही, परंतु आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनांमुळे व सत्संगामुळे आपल्याला मनाला स्थैर्य मिळत, चंचलता कमी होते, आपल्या पुढचा मार्ग अगदी धुतलेल्या काचेसारखा चकचकीत दिसायला लागतो, जीवनाच्या निराशावादी, काळोख्या कप्प्यांमध्ये सुध्दा आशेचे काजवे चमचमायला लागतात, मनाला नवी उमेद व उभारी येते, इतरांची सेवा करताना कधीतरी डोकावणारे स्वार्थी व आत्मकेंद्रीत विचारसुध्दा बंद होतात, व प्रसिध्दीच्या आर्कषणापासून मनुष्य हळुहळू लांब होत जातो.
Copyright © 2025 | Marathisrushti