(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • एक अविश्वसनिय कलाकृती : मोढेरा सुर्यमंदिर

    आपल्या देशात एवढया सुंदर कलाकृती आहेत/होत्या ना की त्या जगातील सात आश्चर्य आहेत ना सुद्धा मागे सोडतील ,पण तरीही आपल्याला पाहायचं काय असतं ताज महाल ,असं नाही की ताजमहाल सुंदर नाही ,पण डोळे उघडून बघा ,ताजमहाल पेक्ष्या कितीतरी सुंदर वास्तू/मंदिरे भारतात आहेत ,डोलदार पणे दिमाखात अजुनही आपले गतवैभव सांभाळत उभे आहे,विचार करा ,हे परकीय आक्रमणकर्ते ,इंग्रज जर भारतात नसते आले तर आपले किती तरी मंदिरं आता पण दिमाखात उभे असते ,असो ....
    तर भारतात खुप सुर्यमंदिरंआहेत पण त्यातल्या त्यात मुख्य दोन सुर्यमंदिर आहेत ,एक उडीसा मधलं कोणार्क चं सुर्यमंदिर आणि दुसरं गुजरात मधील मोढेरा चं सुर्यमंदिर ....
    अहमदाबाद पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या मेहसाना जिल्ह्यातील मोढेरा मधे हे सुर्यमंदिर १०२२-१०६३ च्या दरम्यान सोळंकी राजा भीमदेव पहिला ह्यांनी बांधलं ,सोळंकी घराणे हे सूर्य उपासक होते आणि म्हणुनच भीमदेव पहिला ह्याने हे मंदिर भगवान सुर्याला समर्पित केलं ,(मंदिर कुणी बांधलं ह्या मध्ये मतांतरे आहेत ,गूगल किंवा इतर माहिती स्त्रोत मध्ये आणि मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखात तफावत आहे ,वरील माहिती ही मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखावरून घेतली आहे....)
    मंदिर परिसरात शिरताच आपल्याला दिसतं ते सुंदर हिरवेगार गार्डन ,मंदिर परिसर विविध झाडांनी वेढलेला आहे ,गार्डन संपवून आपल्या नजरेत भरतं ते अतिसुंदर असं मंदिर आणी त्याच्यासमोर असलेल भव्य रामकुंड , मंदिर मुख्यतः तीन भागात व्यापलेल आहे, प्रवेश करताच दिसते ते रामकुंड हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर सभामंडप आणि शेवटी गूढमंडप अथवा गर्भगृह. सभामंडपामध्ये अतिशय सुरेख असे कोरीव खांब आहेत. गर्भगृहात प्रदक्षिणेसाठी चिंचोळा मार्ग आहे.
    असं म्हणतात की हे मंदिर अश्या प्रकारे बनवलं गेलं होतं की २१ जून ला सूर्याचे पहिले किरण नृत्यमंडपातून आत येऊन त्या काळी गर्भगृहात असलेल्या सुर्यदेवाच्या सोन्याच्या मूर्तीच्या मुकुटावर असलेल्या हिऱ्यावर पडत असे आणी ते किरण त्या हिऱ्यावरून परावर्तीत होऊन पूर्ण गर्भगृह उजळुन निघत असे,किती नयनरम्य दृश्य असेल ते ,आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो....
    सूर्य जिथे दुपारी बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून(वर्षातील सर्वात मोठा दिवस ) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो....आणी ह्याच वृत्तावर हे मंदिर उभारलेलं आहे ,तेही त्या काळी कुठलेही आधुनीक तंत्रज्ञान नसतांना....
    हे मंदिर मारू गुर्जर स्थापत्य शैली मध्ये बनवलं गेलं आहे ,मंदिराच्या समोरच्या भागात सुर्यकुंड किंवा राम कुंड आहे ,स्थापत्य कलेचा एक अदभुत अविष्कार म्हणजे हे सुर्यकुंड ,ह्या कुंडात १०८ छोटे छोटे मंदिरं आहेत आणी कुंडात जायला पायऱ्या आहेत ,हे कुंड आणी त्या त्या पायऱ्या एवढया कोणबद्ध आहेत की सुमारे बाराशे वर्षांपूर्वी अशी कोणती टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली असेल की सर्व पायऱ्या एकदम एकसारख्याच ,राम कुंड किंवा सूर्य कुंड बनवतांना पण खुप विचार केला गेला ,कुंडात १०८ मंदिरं आहेत ते सर्व १२ राशी आणी ९ नक्षत्र (१२*०९) ला ध्यानात घेतलं आहे ....
    भीमदेवांनी कुंड बनवतांना एक विचार केला की सर्व लोकांना तिर्थ यात्रा करणे शक्य नाही म्हणून कुंडातच सर्व मंदिरं बनवले ,आणी कुंड बनवतांना ह्या कुंडात ७ समुद्राचं पाणी ,विविध पवित्र नद्यांचे पाणी टाकण्यात आले ,आणी असं म्हणतात की तेंव्हा पासून त्या कुंडाचं पाणी कधीच आटत नाही.....
    सूर्य कुंडानंतर येतो नृत्य मंडप ह्या नृत्य मंडपात ५२ खांब आहेत जे वर्षातील ५२आठवड्यांना दर्शवतात ,ह्या खांबांवर अतीशय बारीक कोरीवकाम ,नक्षीकाम केलेलं आढळतं, ह्या खांबांची रचना अश्या प्रकारे केलेली आहे की वरतुन खाली बघितलं तर हे खांब गोलाकार दिसतात आणि खालुन वर बघीतल्यास हेच खांब अष्टकोणी दिसतात ....
    खांबांवर रामायण ,महाभारतातील महत्त्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहे ,आणी नृत्यमंडपाच्या छतावर देखील असेच महत्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहेत छताची रचना देखील खूप वेगळी आणी कलात्मक पध्दतीने केलेली आहे,मंदिरातील दगड ,खांब हे लॉक पद्धतीने एकमेकांत घट्ट बसवलेले आहेत ,आणी ते एवढे वर्ष होऊन सुध्दा उत्तम आहे ...
    नंतर येतो गर्भगृह ,त्या काळी गर्भगृहात सुर्यदेवांची सोन्याची मूर्ती होती जी आक्रमनकर्त्यांनी लुटून नेली ,मंदिराची नासाधुस केली आणी त्याच्यामुळे आता खंडित झालेल्या ह्या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे,गर्भगृहात आधी जेथे मूर्ती होती तिथे आता दरवाजा बसवुन ते बंद केल्या गेलं आहे ....
    मंदिराच्या गर्भगृहात सूर्य,इंद्र ,विष्णु आणि इतर देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत ,त्या काळात कुठल्याही आधुनिक साहित्या शिवाय एवढी सुंदर आणी बारीक कलाकुसर तेही दगडावर ,विश्वास करायला पण खूप कठीण जातं, बाहेरच्या बाजूलापण पूर्ण बाजुंनी सुर्यदेवांच्या बारा प्रतिमा कोरलेल्या आहेत ज्या वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहे आणी सोबतच दहा दिशांच्या बाजुला दहा दिशांचे दिगपाल देखील कोरलेले आहेत ,प्रत्येक दिगपालांसोबत त्यांचे वाहन देखील भिंतींवर कोरलेले आहे ,भिंतीवर सुर्यदेवांची रथारूढ प्रतिमा देखील कोरलेली आहे त्या रथाला ७ अश्व जोडलेले आहेत जे सात वारांचे प्रतीक आहे ,पूर्ण गर्भगृहाभोवती ३६४ हत्ती आणी एक सिंह कोरलेला आहे हे हत्ती आणी सिंह वर्षातील ३६५ दिवसांचे प्रतीक आहे ,मंदिराच्या भिंतीवर इतरही काही देव देवतांच्या महत्वपूर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत ,ह्या सर्व मूर्त्यांच्या सर्वात वरच्या बाजूला विणाधारी सरस्वती मातेची मूर्ती कोरलेली आहे ,ज्याचा अर्थ होतो की आम्ही शिक्षणाला सर्वांत वरचं स्थान देतो ....
    मंदिरावर मुख्यतः धर्म ,अर्थ ,काम ,आणी मोक्ष ह्या विषयानुसार प्रतीमा कोरलेल्या आहेत.
    मंदिरावर त्या काळचे सामाजिक जीवन देखील कोरलेलं आहे ,एका ठिकाणी नृत्य करणाऱ्या स्त्रिया कोरलेल्या आहेत ,त्या एवढया सारख्या कोरलेल्या आहेत की असं वाटतं की त्या एका लयीत नृत्य करत आहे ,आणी त्याच बाजुला पुरुष नृत्य करतांना दाखवले आहे ,ज्यात एकही मूर्ती दुसऱ्या मूर्तीसोबत मॅच होत नाही,म्हणजे पुरुष ऑर्गनाईज्ड नसतात हे सुचवलेलं आहे.....
    हे एवढं सुंदर मंदिर सर्वांत पहिले मोहम्मद गझनी ने लुटलं , नंतर मंदिर परत बनवण्यात आले ,त्या नंतर मंदिर परत धर्मांध मुर्ख खिलजी ने लुटले ,आणी ह्या वेळी त्याने फक्त लुटच नाही केली तर मंदिराची भरपूर लुट केली आणी आपल्या वैभवाला गालबोट लावलं ,त्यानंतर ब्रिटिश आणि इतरही लोकांनी हे मंदिर लुटलं ,एवढी लुटा लूट होऊन देखील मंदिर अजून दिमाखात उभं आहे ....
    #मंदिर परिसरात एक छोटंसं संग्रहालय देखील आहे ,त्यात विविध काळात सापडलेल्या मुर्त्या आहेत ...
    #जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल ,तर मोढेरा नक्कीच तुम्हाला आवडेल .
    कसे जाल :मंदिर अहमदाबाद पासून खूप जवळ आहे (अंदाजे १००किमी) मेहासाना पासून मोढेरा साठी सिटी बसेस सुरू असतात, तुम्ही मेहसाना मधुन खाजगी रिक्षा करून देखील जाऊ शकता, पण बस चा पर्याय योग्य आहे ....
    मंदिर पूर्ण हफ्ता उघडे असते आणी संध्याकाळी ६:०० पर्यंत मंदिर परिसरात प्रवेश दिला जातो.…..
    संध्याकाळी मंदिरावर लेसर शो दाखवतात ज्यात मंदिराचा इतिहास आणी इतर माहिती दाखवल्या जाते ,तो लेझर शो एवढा जबरदस्त असतो की तुम्ही आपोआपच म्हणाल की ये लेझर शो नहि देखा तो कुछ नही देखा....
    उत्तरायण काळात इथे गुजरात सरकार तर्फे सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन असते ....
    प्रो टिप:शक्यतो मंदिर बघायला सकाळी सूर्योदय जेंव्हा होतो तेंव्हा जा किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर जा,सुर्यमंदिराची खरी महती सूर्योदयाच्या वेळीच कळते .....
    #अमिताभ बच्चन उगाच नाही म्हणत खुशबू गुजरात की आणी कुछ दिन तो गुजारिये गुजरात मे ...
    -–नितीन काकड
  • पैस दाखवणारा मालकंस

    रस्त्यासमोरील प्रचंड डोंगर चढताना, अंगावर पाउस झेलत आणि डोळ्यासमोरील धुकाळ वाटेत आपली वाट चाचपडत आणि शोधत, डोंगरमाथा खुणावत असतो. हळूहळू आजूबाजूच्या झाडांचा सहवास कमी होत जातो आणि वातावरण अत्यंत निरव, प्रशांत होत जाते. अखेरच्या टप्प्यात तर साधी झुडुपे देखील आढळत नाहीत आणि तरीही अनामिक ओढीने आपण, अखेर डोंगरमाथ्यावर येउन पोहोचतो आणि खाली नजर टाकतो!! खालचा विस्तीर्ण परिसर इतका अप्रतिम आणि मन गुंगावणारा असतो की क्षणभर, आपण समाधिस्त व्हावे, अशीच जाणीव मनाला चाटून जाते. नजरेच्या आवाक्यात न सामावणारा असा तो परिसर आणि त्या परिसराने मनावर पसरवलेली विलक्षण धुंदी, हे सगळे मालकंस राग ऐकताना अनुभवता येते. खरतर हा राग इतक्या प्रचंड आवाक्याचा आहे की यात काहीवेळा "वर्जित" स्वर घेऊन देखील, "संपूर्ण मालकंस" असा आगळावेगळा राग ऐकायला मिळतो.
    "पंचम" आणि "रिषभ" स्वरांना इथे आरोही/अवरोही सप्तकात स्थान नाही. परंतु "षडज" आणि "मध्यम" स्वरांचा प्रभाव इतका आहे, की बाकीचे स्वर मवाळ वाटतात. अर्थात, वरती मी म्हटल्याप्रमाणे, काही कलाकार "वर्जित" स्वरांना किंचित स्थान देतात. इथे मला मारवा रागाची आठवण आली. मारवा रागात देखील, "षडज" स्वराचे अस्तित्व जवळपास नसल्यातच जमा असते किंवा नाममात्र असते आणि त्याचा वापर जितका कमी होईल, तितका मारवा राग अधिक खुलतो. "संपूर्ण मालकंस" माश्ये, "रिषभ" आणि "पंचम" या वर्जित स्वरांचा वावर अशाच प्रकारे होत असतो. असो,
    सा" आणि "म" या वादी/संवादी स्वरांनी हा राग भारलेला आहे. शास्त्रकारांच्या मतांनुसार, रात्रीचा दुसरा प्रहर, या रागासाठी योग्य आहे.
    मुळातला भीमसेन जोशी यांचा धीरगंभीर, खर्जातला आवाज, प्रत्येक स्वराला फुलवून मांडायची सवय आणि स्वरविस्तारला भरपूर वाव, यामुळे "पग लागन दे" ही रचना कशी अप्रतिम रंगली आहें. अगदी सुरवातीपासून, मंद्र सप्तकात, या गायकाचा आवाज भलताच विलक्षण लागलेला आहे. गमक, मिंड, बोलताना, क्वचित एखादी मूर्च्छना या आगळ्या अलंकाराने विभूषित, अशी ही समृद्ध रचना, मालकंस राग, त्याचे चलन, वजन, त्यातील स्वरांचे अलौकिक सौंदर्य, या सगळ्याचे यथोचित दर्शन घडवते. जवळपास ४३ मिनिटांची रचना असल्याने, रागविस्तार कसा करावा, रागाची बढत कशी करायची आणि हळूहळू द्रुत लयीत कसे शिरायचे, या सगळ्या बाबी इथे दृग्गोचर होतात.
    मघाशी मी, ज्या "संपूर्ण मालकंस" या रागाचा उल्लेख केला, या रागाची खास बंदिश "तुम बीन कौन संवारे" ही बंदिश म्हणजे "संपूर्ण मालकंस" रागाचे अप्रतिम उदाहरण आहे. किशोरीताईंचा स्वच्छ, नितळ आणि सगळ्या सप्तकात सहज विहार करणारा आवाज, त्यामुळे ही रचना भलतीच खुमारेदार झाली आहे. तसे ऐकायला गेलो तर, दोन्ही रागांचा तोंडावळा जवळपास सारखा आहे, म्हणजे रागाची बढत, स्वरविस्ताराच्या जागा यात फारसा फरक दिसत नाही पण, समेवर येण्याच्यावेळी फरक स्पष्ट होतो आणि त्याच जागेवरून उमटणाऱ्या ताना, बदलत जातात, बदल तसा सूक्ष्म आहे, पण आहे.रागदारी संगीत बुद्धीगामी मानले जाते, ते असे. स्वरांच्या थोड्याशा फरकाने रागाचा चेहराच बदलून जातो. वास्तविक, हे दोन्ही राग, म्हणजे जुळी भावंडे, असे म्हणता येईल परंतु तरी देखील, चेहऱ्याच्या ठेवणीत अतिशय सूक्ष्म फरक असतो आणि तोच फरक, दोन चेहऱ्याची खूण ठरते. इथे असेच घडते. समेवर उतरताना, वर्जित स्वराचा उपयोग केला जातो पण तो इतका अस्पष्ट आहे की बारकाईने ऐकला तरच ध्यानात येतो पण ध्यानात घ्यावाच लागतो कारण त्याच्याच अनुषंगाने पुढील स्वरविस्तार होत आहे.
    "निजल्या तान्ह्यावरी माउली,
    दृष्टी सारखी धरी".
    हे प्रसिद्ध भावगीत याच रागावर आधारित आहे. वसंत प्रभू, आता काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला संगीतकार पण एकेकाळी आपल्या सहज, साध्या आणि गुणगुणता येतील अशा अवीट गोडीच्या चालींचा जनक. भा. रा. तांब्यांची कविता म्हणजे काव्यात गेयता कशी असावी, याचे उत्तम उदाहरण. कविता वाचत असताना, शब्दात दडलेली अनुस्यूत अशी लय, सहज उलगडत जाते आणि त्या योगे कवितेत दडलेला आशय. तसे बघितले तर तांब्यांनी, कवितेत तसे फार काही प्रयोग केले नाहीत. विषय समयोचित, संस्कृत साहित्याच्या आधाराने वाढत गेलेली आहे. त्यामुळे त्यांची कबिता वाचताना, एक प्रकारचा "राजस" अनुभव येतो. प्रस्तुत गाण्यात हाच अनुभव येतो.
    या गाण्यात, या रागातील सूरांचा आढळ बऱ्याच प्रमाणात ऐकायला मिळतो. अगदी पहिलीच ओळ ऐकली तरी. "निजल्या तान्ह्यावरी माउली" हीच ओळ मालकंस रागाची ओळख पटवते. गाण्याची चाल तशी फारशी आडवळणी नाही परंतु लताबाईंनी घेतलेले "खटके","मुरक्या" मात्र गाण्याला विलक्षण सौंदर्य प्राप्त करून देतात.
    या रागात तशा गझला कमी ऐकायला मिळतात. "लोग कहेते है अजनबी तुम हो" ही गायक हरिहरनने गायलेली अप्रतिम रचना आहे.
    "लोग कहते है अजनबी तुम हो,
    अजनबी मेरी जिंदगी तुम हो".
    बऱ्याचशा गझल गायनात, पहिला शेर गायच्या आधी बरीच आलापी असते आणि त्यातून पुढील चालीचे सूचन असते. एकदा रचनेत शायरी अवतरली की मग, काव्याच्या अनुषंगाने गायन करायचे, असा एकूण पायंडा दिसतो. इथेही याच अंगाने गझल गायली गेली आहे. हरिहरनचे वैशिष्ट्य असे, गाण्याचे सुरवातीचे शिक्षण कर्नाटकी संगीताने झाले पण पुढे उत्तर भारतीय संगीत देखील तितक्याच अधिकाराने आत्मसात करून, त्यात प्राविण्य मिळवले. गमतीचा भाग म्हणजे इथे ही गझल गाताना. कुठेही कर्नाटकी संगीताचा लवलेश देखील आढळत नाही. कर्नाटकी गायकी शिकलेल्या बहुतेक गायकांना असा फरक करून गाणे जमत नाही. अतिशय सुरेल, मोकळा आवाज आणि गाताना शब्दांचे औचित्य शक्यतो सांभाळून गायचे, असा विचार स्पष्ट दिसतो. गायनातील हरकती देखील इतक्या सहज असतात की ऐकताना त्यातले "काठिन्य" फारसे जाणवत नाही आणि हीच या गायकाच्या गायकीची खरी खुबी आहे. इथे पहिल्याच आलापित मालकंस रागाची ओळख पटते आणि पुढील सगळी रचना, बहुतांशी याच अंगाने विस्तारित होत जाते.
    "बडा आदमी" या चित्रपटात "अन्खीयन संग अखिया" हे गाणे म्हणजे मालकंस रागाचे लक्षण गीत म्हणावे लागेल. अगदी पहिल्या सुरापासून याच रागाची आठवण करून देणारे गाणे आणि संपूर्ण गाणे याचा रागाच्या सावलीत बांधलेले आहे.
    "अखियन संग अखिया लागी आज,
    झुमे बार बार मेरे मन मे प्यार,
    नित ऐसा तोहे मौसम आये ना,
    अखियन संग अखिया लागी आज".
    तालाच्या दृष्टीने बघायला गेल्यास, गाण्यात सरळ, सरळ दोन ताल दिसतात आणि त्यात तसे फारसे प्रयोग दिसत नाहीत. नेहमीचा त्रिताल आणि केरवा ताल ऐकायला मिळतो. गाण्याच्या सुरवातीला. "मन तरपत हरी दर्शन" या प्रसिद्ध गाण्याची झाक दिसते परंतु नंतर मात्र गाणे वेगळे होते. एकाच रागातील ही दोन्ही गाणी असल्याचा हा परिणाम. गाणे जसे द्रुत लयीत जाते, तशी गाण्यात सरगमचा सुंदर उपयोग केला आहे. हे गाणे त्या दृष्टीने रागाचे लक्षण गीत म्हणून म्हणता येईल.संगीतकार चित्रगुप्त यांनी राग डोळ्यासमोर ठेऊन चाल बांधली असल्याने, तसा रचनेत फार प्रयोग करायला वाव राहिला नाही, तरी देखील मोहमद रफींच्या गायनाने गाणे खूपच श्रवणीय झाले आहे, यात शंकाच नाही.
    व्ही. शांताराम दिग्दर्शित "नवरंग" चित्रपटात "तू छुपी है कहां" हे अतिशय प्रसिद्ध झालेले गाणे मालकंस राग्ची आठवण करून देणारे आहे. संगीतकार सी. रामचंद्र यांनी मात्र गाण्याची रचना करताना खूपच प्रयोग केले आहेत. एकतर जरी रचना सुरवातीला रागाच्या छायेत फिरत असली तरी ननतर रागाची बंधने सोडून चाल संपूर्ण सुटी होते. इतकी की हे गाणे मालकंस रागात खरोखरच आहे का? असा मनाला विस्मय पडावा. यामुळेच हे गाणे मला फार आवडते.
    "तू छुपी है कहां, मैं तडपता यहां,
    तेरे बिन फिका फिका है दिल का जहां"
    गाण्याचा कविता म्हणून विचार केला तर फार काही दर्जेदार वाचायला मिळत नाही पण गाण्याच्या चालीच्या "मीटर" मध्ये शब्दकळा चपखल बसली आहे.
    या गाण्याची गंमत म्हणजे इथे केरवा ताल वापरला आहे पण, तरीही ऐकताना पारंपारिक ताल ऐकायला मिळत नाही आणि ही किमया सी. रामचंद्र यांची. चित्रपटातील गाणे कशाप्रकारे सजवता येते, यासाठी हे गाणे अभ्यासावे, इतक्या तोलामोलाचे आहे. गंमत म्हणजे जरी गाणे रागाची बंधने सोडून जात असले तरी प्रांत समेवर येताना, मालकंस ऐकायला मिळतो. सुगम संगीतात, रागाचे नियम तोडून रचना केली तरी अखेर त्या रागाशी नाते जुळवून घ्यावेच लागते. गाण्यातील वाद्यांचा अनोखा वापर, हे या गाण्याचे आणखी वैशिष्ट्य सांगता येईल. खरतर गाण्याची सुरवातीची चाल आणि पुढे विस्तारित झालेली चाल, यात बरेच अंतर आहे पण, ज्या हिशेबात चाल आणि लय बदलत जाते, ते सगळेच अनुभवण्यासारखे आहे.
    मराठी नाट्यसंगीतात "उगवला चंद्र पुनवेचा" हे गाणे विशेष लोकप्रिय आहे आणि हे गाणे मालकंस रागाची आठवण करून देते. "पाणिग्रहण" नाटकातील हे पद, आचार्य अत्र्यांनी लिहिले असून याची चाल, श्रीनिवास खळ्यांनी बांधलेली आहे. तशी चाल पारंपारिक नाट्यगीताच्या कुळशीलाशी नाते सांगणारी आहे पण बकुल पंडित या गुणवान गायिकेने या चालीचे चीज केले आहे.
    "उगवला चंद्र पुनवेचा,
    मम हृदयी दरिया, उसळला प्रीतीचा".
    तसे पाहिले तर शब्द काही असमान्य ताकदीचे नाहीत पण गाण्याला योग्य असे आहेत. थोडे बारकाईने ऐकले तर गाण्याची चाल बरीचशी भावगीताच्या अंगाने गेलेली आहे. गाण्यात "गायला" खूप मोकळ्या "जागा" आहेत पण इतपत जागा बहुतेक भावगीतात आपल्याला सापडू शकतात. आता, इथे रंगमंचावर गाणे सादर करायचे असल्याने, गायकी दाखविण्याला बराच वाव मिळतो. गाताना, ताना स्वच्छ आहेत तसेच शब्दांच्या अंगाने बोलताना घेतल्या आहेत.
    मालकंस राग हा खरे तर मैफिलाचाच राग, अफाट विस्तार क्षमता आणि कलाकाराला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य घेण्याची मुभा देणारा.
    -- अनिल गोविलकर

  • जगणं

    तू असतोस

    तेव्हाच फक्त जगणं असतं

    एरवी फक्त सावली पांघरते जगण्याची

  • निकालाचे पेढे

    बाबू आणि शशी हि काही काल्पनिक कथा नाही उद्या जर बाबुला ८०% जरी पडले असते तरी त्यांची पालक मंडळी दुखीच असतील

  • रेशमी केस

     

  • एक मद्यपी

    एक मद्यपी एका गुरूंकडे गेला. म्हणाला, मला संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे. अनेक गुरूंना मी भेटलो आहे. पण, मी पक्का दारुडा आहे. मला सकाळी तोंड धुतल्याबरोबर पहिला पेग लागतो. रात्री झोपेपर्यंत मी अनेक बाटल्या रिचवतो. सगळे गुरू म्हणतात आधी दारू सोड. मग तुला संन्यास देतो. तुमचं काय म्हणणं आहे?

    हा गुरू जरा वेगळा होता. तो म्हणाला, तुला दारू पितोस, गोमूत्र पितोस, स्वमूत्र पितोस की आणखी काही पितोस, हा तुझा विषय आहे? त्याच्याशी माझा काय संबंध? पी, बिनधास्त पी. तुला हवी तेवढी पी. मी तुला दीक्षा देणार. संन्यासी बनवणार. अट फक्त एकच आहे. एकदा संन्याशाची वस्त्रं परिधान केलीस की ती कायमस्वरूपी घालावी लागणार. दिवसातून दोन तास संन्यासी बनतो आणि बाकी वेळ शर्टपँटपायजमाबर्म्युडा घालून फिरतो, असं चालणार नाही. एकदा भगवं वस्त्र परिधान केलंस की ते अंघोळीच्या वेळेव्यतिरिक्त अंगातून काढायचं नाही.

    एवढी छोटी अट आहे, म्हटल्यावर दारुड्याने आनंदाने ती मान्य करून संन्यासदीक्षा स्वीकारली. महिन्याभरानंतर तो परत आला आणि गुरूच्या पायावर डोकं टेकून म्हणाला, तुम्ही माझा सॉलिड गेम केलात.

    गुरूंनी विचारलं, काय झालं?
    तो म्हणाला, तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी भगवी वस्त्रं स्वीकारली आणि संन्यास घेऊनही मद्यपान करता येणार, या आनंदात बारमध्ये गेलो. बारच्या दारात पोहोचलो आणि बाहेरच एकाने गाठलं, म्हणाला, मला आत जाण्यापासून अडवा. रोखा. महाराज मला उपदेश करा. मी अट्टल दारूडा बनलो आहे. मी त्याला सांगितलं, मीही अट्टल दारुडाच आहे, मीही बारमध्येच चाललोय. पण, माझी वस्त्रं पाहून त्याचा विश्वास बसेना. त्याच्या हट्टाखातर मी त्याला उपदेश केला. तोवर इतर चार लोक गोळा झाले. त्यांनी मला जवळच्या बगीच्यात नेलं आणि सत्संगच करायला लावला. मग मला बारमध्ये जाण्याची
    भीती वाटायला लागली. दारूच्या दुकानात गेलो, तर दुकानदाराने नम्रतेने नमस्कार केला आणि माझ्यासाठी दूध मागवलं. मी बाटली मागितली, तर म्हणाला, महाराज, चेष्टा करताय का? मी हे दुकान चालवतो, पण थेंबालाही स्पर्श करत नाही. तुमच्या सत्संगाला कुठे येऊ सांगा. नंतर नंतर ही वस्त्रं परिधान करून देशी दारूच्या अड्ड्यावरही उभं राहण्याची माझी हिंमत होईना. एवढ्या सगळ्या भानगडीत माझा दारूचा मजा किरकिरा झाला तो कायमचाच.

    गुरू हसले आणि म्हणाले, माझ्याकडून आजही कसलीही आडकाठी नाही. तुला दारूच्या नशेची ओढ असेल, ही वस्त्रं त्याआड येत असतील,तर ही वस्त्रं त्याग आणि खुशाल दारू पी.

    शिष्य हसून म्हणाला, आता ते कठीण आहे. तुम्ही मला त्यापेक्षा मोठं व्यसन लावलंत.

  • तोहफा ..तोहफा …लाया .लाया ..लाया …! ( नशायात्रा – भाग १५ )

    एका मोठ्या पातेल्यात आम्ही बनवलेली थंडाई ठेवली होती , मग कोणीतरी सांगितले त्यात जर तांब्याचे नाणे टाकले तर अधिक जास्त नशा येते , लगेच तांब्याचे नाणे कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला , एकाने त्याच्या आजीच्या जवळ असे तांब्याचे नाणे ठेवले होते ते आणले ( मला वाटते या नाण्यालाच खडकू असे म्हणतात ) एकदाची थंडाई तयार झाली आणि मग एकमेकाला आग्रह करून प्यायला लावणे पण सुरु झाले .

  • पंचगव्य औषधोपचार

    प्रा. विजय यंगलवार यांनी संपादित व शब्दांकित केलेले व नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले पंचगव्य औषधोपचार या माहितपूर्ण पुस्तकामध्ये पंचगव्याविषयी माहिती अक्षरश: ठासून भरलेली आहे.

    पंचगव्य औषधोपचार :

    विजय यंगलवार

    नचिकेत प्रकाशन

    पाने : 80, किंमत : 80 रू.

  • रामकृष्ण मिशन सेवा समिती, अलिबाग

    समाजकार्य करताना आपण जे काम करतो आहे, व ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्याविषयी मनात प्रेम, आत्मीयता व स्थिरता हवी. निश्चलपणे व आजुबाजुला असलेल्या अडथळयांची तमा न बाळगता इतरांसाठी झटणारे समाजसेवक त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना अजिबात घाबरत नाहीत. त्यासाठी लागणारे असामान्य धैर्य, स्वतःच्या तत्वांवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, इतरांसाठी काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी लागणारी जिद्द व अखंड सेवाभाग या सर्व गोष्टी अंगी बाणवण्यासाठी मनात शुध्दता व शरीरात बळ हवं असतं. जरी सर्व धार्मिक संघटना समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी झटतीलच असं नाही, परंतु आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनांमुळे व सत्संगामुळे आपल्याला मनाला स्थैर्य मिळत, चंचलता कमी होते, आपल्या पुढचा मार्ग अगदी धुतलेल्या काचेसारखा चकचकीत दिसायला लागतो, जीवनाच्या निराशावादी, काळोख्या कप्प्यांमध्ये सुध्दा आशेचे काजवे चमचमायला लागतात, मनाला नवी उमेद व उभारी येते, इतरांची सेवा करताना कधीतरी डोकावणारे स्वार्थी व आत्मकेंद्रीत विचारसुध्दा बंद होतात, व प्रसिध्दीच्या आर्कषणापासून मनुष्य हळुहळू लांब होत जातो.

  • प्रेम सगळ्यांचं सेम असतं?