पाऊसतील कविता
एखादी घटना प्रत्यक्ष बघणे, वाचणे वा ऐकणे यातील अनुभवात बराच फरक पडू शकतो. चित्रपट आपण एकाचवेळी बघतही असतो आणि ऐकतही असतो म्हणून त्याचा प्रभाव अधिक पडतो. म्हणूनच चित्रपट प्रदर्शीत होण्या आगोदर त्याची गाणी वा संवाद जाहिरातीसाठी वापरले जातात. ते ऐकून आपली उत्सुकता ताणली जाते व आपण चित्रपटगृहाकडे वळतो. १९४२ मधील ‘चले जाव’ चळवळी पासून स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. चित्रपटसृष्टीतही अनेकजण या चळवळीकडे आकृष्ट होत होते. गुलामीची एक बोचरी सल नेहमी कलावंताच्या मनात आगोदर उमटत असते. साहित्यीकानां प्रेरीत करणाऱ्या घटना मग यातुन घडत जातात.
“बॉम्बे टॉकीज” ही त्याकाळातील एक मात्तब्बर चित्रपट निर्मिती संस्था. हिमांशू रॉय व देविका राणी हे जोडपे याचे मालक. १९४३ मध्ये या बॅनरचा “किस्मत” नावाचा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि चित्रपटसृष्टीत अनेक विक्रमांची नोंद झाली. तिकिट विंडोवर तर या चित्रपटाने कळसच गाठला. १९४३ मध्ये या चित्रपटाने एक कोटीचा नफा मिळवला म्हणजे आजचे जवळपास ६०-६५ कोटी.
कोलकत्त्याच्या एकाच चित्रपटगृहात हा सिनेमा ३ वर्षे चालला हे रेकॉर्ड नंतर ‘शोले’ या चित्रपटाने मोडले. याच चित्रपटातुन सर्वप्रथम Anty hero ही संकल्पना सादर करण्यात आली. अशोक कुमारने यात पॉकेटमार चोराची भूमिका केली होती. याच चित्रपटात सर्व प्रथम डबल रोल ही आला. अशोक कुमारने डबल रोल केला होता. मेहमूदनेही बाल कलाकाराच्या रूपात याच चित्रपटातुन आपली कारकिर्द सुरू केली.इतकेच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपर स्टार (अशोक कुमार) याच चित्रपटाने दिला. याच चित्रपटात कुमारी माता ही संकल्पना सादर केली गेली. याच चित्रपटातुन Lost & Found हा फॉर्मूला सर्वप्रथम वापरण्यात आला जो आजतागायत चालू आहे. याच चित्रपटाने संगीतातील कोरस काय असतो हे अनुभवता आले. तर असा अशा किस्मतने जशी अनेकांची किस्मत फळफळली तशीच एका संगीतकाराची प्रतिभा देखिल याच चित्रपटामुळे जगाला दिसली.
या चित्रपटात एकूण ८ गाणी होती यातील एक गाणे होते “हिमालय की चोटीसे आज तुम्हे ललकारा है, दूर हटो ये दुनियावालो हिंदूस्तान हमारा है”कवी प्रदीप यांनी हे गीत लिहले आणि याला तशीच सळसळती चाल लावली ती अनिल विश्वास या प्रतिभावान संगीतकाराने. या गाण्याने त्या काळच्या तरूणात स्वातंत्र्या बद्दलची ज्वाला मनात निर्माण केली. भारतीय चित्रपटसृष्टीत अनिलदा यानां संगीतकाराचे पितामह म्हणून आजही स्मरले जाते. संगीताचे अफाट ज्ञान आणि तितकीच समर्पित वृत्ती त्यांच्यात होती. संगीतातील अत्यंत सुक्ष्म बारकावे त्यानां अवगत तर होतेच पण चित्रपटासाठी जे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते त्यातही ते कुशाग्र होते. आवाजातील चढ उताराचे अनेक बारकावे त्यांनी लता दीदीना शिकवले नूरजहॉ या गायीकेच्या प्रभावातून त्यानां बाहेर काढले आणि स्वतंत्र प्रतिभेची लता मंगेशकर जगाला मिळाली. अनिलदा लतादीदीना लतिके असे हाक मारत असत. मूकेश देखिल के.एल. सैगलच्या प्रभावाखली होते त्यानांही अनिलदाने बाहेर काढले.तलत मेहमूदचा आवाज अत्यंत तलम व कंपन असलेला. अनिलदांनी तो हेरला आणि हाच तुझा प्लस पाँईंट हे त्याला पटवून दिले. किशोरकुमार त्याच्या अजब गजब याडलिंगसाठी प्रसिद्ध होता. पण याडलिंग शिवाय तो किती छान गाऊ शकतो हे अनिलदाने ओळखले व असे एक निखळ सुंदर गाणे १९५३ मध्ये गाऊन घेतले. किशोरदाने पूढे अनेक गाणी याडलिंग शिवाय गायली. शास्त्रीय आणि लोक संगीत या दोन्हीचा अप्रतिम व्यासंग त्यांचा होता.
त्या काळात नरेन्द्र शर्मा, कवि प्रदीप, गोपालसिंह नेपाली, इंदीवर, डी.एन. मधोक या सारखे गीतकार आणि नौशाद, रोशन, मदन मोहन, सचिन देव बर्मन, सज्जाद, ग़ुलाम हैदर, वसंत देसाई, हेमंत कुमार, शंकर-जयकिशन, खय्याम या सारख्या प्रतिभावान संगीतकारांच्या मेळ्यात अनिलदा एखाद्या कमळा सारखे दिसत. स्पर्धा अतिशय निरोगी होती त्यामुळे रसिकानां संगीताची मेजवानी मिळत असे. सर्वजण ऐकमेकांचा आदर करत आणि ऐकमेकांच्या प्रतिभेला मन:पूर्वक दादही देत. सी.रामचंद्र सारखे संगीतकार विनम्रपणे अनिलदानां गुरूस्थानी मानत असत. पूर्व बंगाल मध्ये जन्म झालेल्या अनिलदांचा संगीतमय प्रवास कोलकोत्ता ते मुंबई असा सुरू झाला. त्यांची कारिकर्द ३० वर्षांची. मला त्यांची भावलेली गाणी- ये दिल मुझे ऐसी जगह ले चल(तलत मेहमूद), सीने मे सुलगते है अरमान(लता-तलत), दिल जलता है तो जलने दे(मुकेश), आ माहब्बतों की बस्ती बसाएगें हम(किशर-लता…यातला किशोरचा आवाज एकदम वेगळा वाटेल), दूर हटो ये दुनियावाले हिंदुस्ता हमारा है(अमीरबाई कर्नाटकी),जा मै तोसे नाही बोलू (लताबाईचे सुंदर क्लासिकल गाणे),नैन मिले नैन हुए बावरे (तलत -लता),धीरे धीरे आरे बादल…मेरा बुलबुल सो रहा है(लता- आजही हे गाणे तितकेच फ्रेश वाटते), घबराए जब मन अनमोल, हृदय हो उठे डामाडोल….बुद्धम् सरणम् गच्छामी…(मन्नाडे), राही मतवाले.. (तलत-ता), नाच रे मयूरा(मन्नाडे),अब तेरे से कौन मेरा (अमीरबाई कर्नाटकी),आ मोहब्बत की बस्ती बसाँएगे (किशोर-लता)…त्यांच्या गाण्याची यादी खूप मोठी आहे. ती यादी चाळली तर एक गोष्ट लक्षात येते की असा एकही गायक वा गायीका नाही ज्यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतले नाही.
आजच्या पिढीला त्यांची गाणी वा संगीतातले योगदान कदाचित् लक्षात येणार नाही त्यासाठी त्या काळात जाऊनच अनिलदाचे महत्व समजता येईल. ते फक्त चाली लावणारे संगीतकार नाही तर संगीताच्या सर्व शक्यता पडताळून त्याचा पूढील पिढीसाठी कसा ठेवा जपता येईल याचा ते नेहमी विचार करीत आणि हेच त्यांचे मोठेपण आहे. त्यांच्या पहिल्या पत्नी मेहरून्नीसा भगत उर्फ आशालता ज्यांनी काही चित्रपटात पार्श्व गायन केले तर गायीका मीना कपूर या दुसऱ्या पत्नी. गायीका पारूल घोष ही त्यांची बहीण आणि सुप्रसिद्ध बासरी वादक पन्नालाल घोष यांच्या पत्नी. अमिताभचा “शहेनशहा” आठवत असेल त्या सिनेमाची संगीतकार जोडी अमर-उत्पल. या संगीत जोडीतला उत्पल हा त्यांचा मुलगा. अनिलदा १९६५ पर्यंत पूर्णपणे कार्यरत होते मात्र नंतर बदलत्या काळानुसार ते हळूहळू या क्षेत्रापासुन लांब होत गेले. १९७५ नंतर मात्र ते विस्मृतीच्या पडद्याआड जात राहिले ते थेट मृत्यू पर्यंत. २००३ मध्ये त्यांचे निधन झाले त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना सुमनाजंली वाहिली होती.
-दासू भगत (०७ जुलै २०१७)
2020 च्या मार्च महिन्याआधी आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून गृहीत धरुन चाललो होतो, त्यात भरलेल्या चित्रपटगृहात पॉपकॉर्न खात मजेत सिनेमा पहाणं, ही एक गोष्ट होती. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाउनमधे थिएटर्स बंद होणं आणि टेलिव्हिजन हे आपलं करमणुकीचं प्रमुख साधन बनणं हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता…..
काश्मिरातील वास्तवाबाबत काही
व्हॉटसऍप आणि इतर माध्यमातून लोकप्रिय झालेले हे पोस्ट शेअर करत आहोत. मुळ लेखकाचे नाव माहित नाही. मात्र सर्वात शेवटी Forward करणार्याने प्राची जयवंत यांचे नाव दिले आहे.
आम्ही अस्सल सिकेपी..चोखंदळ अन चवींचे
निरनिराळे खाद्यपदार्थ..खासियत आमचे..
काय वर्णावा तो रविवारचा सरंजामी थाट
नाश्त्याला ब्रेड अन आॅमलेटचा घमघमाट
दुपारच्या जेवणात..मटणाची तर्री रस्सेदार
बिर्याणी जोडीला..खमंग सुगंध मसालेदार
पापलेट किंवा सुरमई फ्राय अशी खरपूस मस्त
कोलंबीचे कालवणही मग लगेच होते फस्त..
लज्जतदार चिकन असे लबाबदार झणझणीत
वरुन लिंबू पिळून करावे..चटकदार चमचमीत..
खिम्याचे कटलेट्स ही तर सर्वांनाच पर्वणी
माध्यान्हीला "हटके" अशी तोंडीलावणी
सोडे हे तर कुठेही भाजीत वाढवित असे स्वाद
मसाले वांगे,मेथी,कालवण अथवा सोडेभात
वालाचे बिरडे करावे छान परतूनी..सवताळूनी
ओले खोबरे अन कोथिंबीर घालावी वरतूनी..
कायस्थ पुरणपोळी असे मधुर व मऊशार
मटणाला "व्हेज"पर्याय म्हणून वड्यांचे सांबार
आळूच्या वड्या,वाटली डाळ यांची औरच बात
पंचामृत अन पुलावाचाही मग जमून येतो बेत..
सर्व पदार्थांचा राजा..शाही खाज्याचा कानवला
खमंग खुसखुशीत ..क्षणांत तोंडात विरघळला..
(Forwarded. Original Credit - प्राची जयवंत )
गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे.
आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या.
प्लॅस्टिकच्या चलनी नोटा आता काही शहरात थोडयाच दिवसात व्यवहारात येणार आहेत असे वृत्तपत्रातून वाचनात आले. पॉलिप्रॉपलीन नावाच्या पॉलिमरपासून या नोटा तयार करण्यात येणार असल्याने खराब झाल्यानंतरही त्यांचा पुनर्वापर शक्य होणार आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतात हल्ले केल्यास त्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण मुळातच पाकिस्तानी नागरिकांचा देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्यात जमा आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti