(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • हिरवी हिरवी पाने हिरवी हिरवी राने

    पाऊसतील कविता

  • संगीतावर प्रचंड विश्वास असलेले : अनिल विश्वास

    एखादी घटना प्रत्यक्ष बघणे, वाचणे वा ऐकणे यातील अनुभवात बराच फरक पडू शकतो. चित्रपट आपण एकाचवेळी बघतही असतो आणि ऐकतही असतो म्हणून त्याचा प्रभाव अधिक पडतो. म्हणूनच चित्रपट प्रदर्शीत होण्या आगोदर त्याची गाणी वा संवाद जाहिरातीसाठी वापरले जातात. ते ऐकून आपली उत्सुकता ताणली जाते व आपण चित्रपटगृहाकडे वळतो. १९४२ मधील ‘चले जाव’ चळवळी पासून स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. चित्रपटसृष्टीतही अनेकजण या चळवळीकडे आकृष्ट होत होते. गुलामीची एक बोचरी सल नेहमी कलावंताच्या मनात आगोदर उमटत असते. साहित्यीकानां प्रेरीत करणाऱ्या घटना मग यातुन घडत जातात.

    “बॉम्बे टॉकीज” ही त्याकाळातील एक मात्तब्बर चित्रपट निर्मिती संस्था. हिमांशू रॉय व देविका राणी हे जोडपे याचे मालक. १९४३ मध्ये या बॅनरचा “किस्मत” नावाचा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि चित्रपटसृष्टीत अनेक विक्रमांची नोंद झाली. तिकिट विंडोवर तर या चित्रपटाने कळसच गाठला. १९४३ मध्ये या चित्रपटाने एक कोटीचा नफा मिळवला म्हणजे आजचे जवळपास ६०-६५ कोटी.

    कोलकत्त्याच्या एकाच चित्रपटगृहात हा सिनेमा ३ वर्षे चालला हे रेकॉर्ड नंतर ‘शोले’ या चित्रपटाने मोडले. याच चित्रपटातुन सर्वप्रथम Anty hero ही संकल्पना सादर करण्यात आली. अशोक कुमारने यात पॉकेटमार चोराची भूमिका केली होती. याच चित्रपटात सर्व प्रथम डबल रोल ही आला. अशोक कुमारने डबल रोल केला होता. मेहमूदनेही बाल कलाकाराच्या रूपात याच चित्रपटातुन आपली कारकिर्द सुरू केली.इतकेच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपर स्टार (अशोक कुमार) याच चित्रपटाने दिला. याच चित्रपटात कुमारी माता ही संकल्पना सादर केली गेली. याच चित्रपटातुन Lost & Found हा फॉर्मूला सर्वप्रथम वापरण्यात आला जो आजतागायत चालू आहे. याच चित्रपटाने संगीतातील कोरस काय असतो हे अनुभवता आले. तर असा अशा किस्मतने जशी अनेकांची किस्मत फळफळली तशीच एका संगीतकाराची प्रतिभा देखिल याच चित्रपटामुळे जगाला दिसली.

    या चित्रपटात एकूण ८ गाणी होती यातील एक गाणे होते “हिमालय की चोटीसे आज तुम्हे ललकारा है, दूर हटो ये दुनियावालो हिंदूस्तान हमारा है”कवी प्रदीप यांनी हे गीत लिहले आणि याला तशीच सळसळती चाल लावली ती अनिल विश्वास या प्रतिभावान संगीतकाराने. या गाण्याने त्या काळच्या तरूणात स्वातंत्र्या बद्दलची ज्वाला मनात निर्माण केली. भारतीय चित्रपटसृष्टीत अनिलदा यानां संगीतकाराचे पितामह म्हणून आजही स्मरले जाते. संगीताचे अफाट ज्ञान आणि तितकीच समर्पित वृत्ती त्यांच्यात होती. संगीतातील अत्यंत सुक्ष्म बारकावे त्यानां अवगत तर होतेच पण चित्रपटासाठी जे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते त्यातही ते कुशाग्र होते. आवाजातील चढ उताराचे अनेक बारकावे त्यांनी लता दीदीना शिकवले नूरजहॉ या गायीकेच्या प्रभावातून त्यानां बाहेर काढले आणि स्वतंत्र प्रतिभेची लता मंगेशकर जगाला मिळाली. अनिलदा लतादीदीना लतिके असे हाक मारत असत. मूकेश देखिल के.एल. सैगलच्या प्रभावाखली होते त्यानांही अनिलदाने बाहेर काढले.तलत मेहमूदचा आवाज अत्यंत तलम व कंपन असलेला. अनिलदांनी तो हेरला आणि हाच तुझा प्लस पाँईंट हे त्याला पटवून दिले. किशोरकुमार त्याच्या अजब गजब याडलिंगसाठी प्रसिद्ध होता. पण याडलिंग शिवाय तो किती छान गाऊ शकतो हे अनिलदाने ओळखले व असे एक निखळ सुंदर गाणे १९५३ मध्ये गाऊन घेतले. किशोरदाने पूढे अनेक गाणी याडलिंग शिवाय गायली. शास्त्रीय आणि लोक संगीत या दोन्हीचा अप्रतिम व्यासंग त्यांचा होता.

    त्या काळात नरेन्द्र शर्मा, कवि प्रदीप, गोपालसिंह नेपाली, इंदीवर, डी.एन. मधोक या सारखे गीतकार आणि नौशाद, रोशन, मदन मोहन, सचिन देव बर्मन, सज्जाद, ग़ुलाम हैदर, वसंत देसाई, हेमंत कुमार, शंकर-जयकिशन, खय्याम या सारख्या प्रतिभावान संगीतकारांच्या मेळ्यात अनिलदा एखाद्या कमळा सारखे दिसत. स्पर्धा अतिशय निरोगी होती त्यामुळे रसिकानां संगीताची मेजवानी मिळत असे. सर्वजण ऐकमेकांचा आदर करत आणि ऐकमेकांच्या प्रतिभेला मन:पूर्वक दादही देत. सी.रामचंद्र सारखे संगीतकार विनम्रपणे अनिलदानां गुरूस्थानी मानत असत. पूर्व बंगाल मध्ये जन्म झालेल्या अनिलदांचा संगीतमय प्रवास कोलकोत्ता ते मुंबई असा सुरू झाला. त्यांची कारिकर्द ३० वर्षांची. मला त्यांची भावलेली गाणी- ये दिल मुझे ऐसी जगह ले चल(तलत मेहमूद), सीने मे सुलगते है अरमान(लता-तलत), दिल जलता है तो जलने दे(मुकेश), आ माहब्बतों की बस्ती बसाएगें हम(किशर-लता…यातला किशोरचा आवाज एकदम वेगळा वाटेल), दूर हटो ये दुनियावाले हिंदुस्ता हमारा है(अमीरबाई कर्नाटकी),जा मै तोसे नाही बोलू (लताबाईचे सुंदर क्लासिकल गाणे),नैन मिले नैन हुए बावरे (तलत -लता),धीरे धीरे आरे बादल…मेरा बुलबुल सो रहा है(लता- आजही हे गाणे तितकेच फ्रेश वाटते), घबराए जब मन अनमोल, हृदय हो उठे डामाडोल….बुद्धम् सरणम् गच्छामी…(मन्नाडे), राही मतवाले.. (तलत-ता), नाच रे मयूरा(मन्नाडे),अब तेरे से कौन मेरा (अमीरबाई कर्नाटकी),आ मोहब्बत की बस्ती बसाँएगे (किशोर-लता)…त्यांच्या गाण्याची यादी खूप मोठी आहे. ती यादी चाळली तर एक गोष्ट लक्षात येते की असा एकही गायक वा गायीका नाही ज्यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतले नाही.

    आजच्या पिढीला त्यांची गाणी वा संगीतातले योगदान कदाचित् लक्षात येणार नाही त्यासाठी त्या काळात जाऊनच अनिलदाचे महत्व समजता येईल. ते फक्त चाली लावणारे संगीतकार नाही तर संगीताच्या सर्व शक्यता पडताळून त्याचा पूढील पिढीसाठी कसा ठेवा जपता येईल याचा ते नेहमी विचार करीत आणि हेच त्यांचे मोठेपण आहे. त्यांच्या पहिल्या पत्नी मेहरून्नीसा भगत उर्फ आशालता ज्यांनी काही चित्रपटात पार्श्व गायन केले तर गायीका मीना कपूर या दुसऱ्या पत्नी. गायीका पारूल घोष ही त्यांची बहीण आणि सुप्रसिद्ध बासरी वादक पन्नालाल घोष यांच्या पत्नी. अमिताभचा “शहेनशहा” आठवत असेल त्या सिनेमाची संगीतकार जोडी अमर-उत्पल. या संगीत जोडीतला उत्पल हा त्यांचा मुलगा. अनिलदा १९६५ पर्यंत पूर्णपणे कार्यरत होते मात्र नंतर बदलत्या काळानुसार ते हळूहळू या क्षेत्रापासुन लांब होत गेले. १९७५ नंतर मात्र ते विस्मृतीच्या पडद्याआड जात राहिले ते थेट मृत्यू पर्यंत. २००३ मध्ये त्यांचे निधन झाले त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना सुमनाजंली वाहिली होती.

    -दासू भगत (०७ जुलै २०१७)

  • दयार्द्र पिलू

    "भरुनी राहिलीस तूच माझिया नेत्रांमधुनी
    निद्रेमधुनि, स्वप्नामधुनी, जागृतीतुनी
    कळले आता असून डोळे नव्हती दृष्टी नव्हते दर्शन
    इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन"
    कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एका अप्रतिम प्रणयी कवितेतील काही ओळी. अर्धोन्मिलित अवस्थेत असताना, निद्रीस्तावस्थेत जाणवणाऱ्या मुग्ध प्रणयाची सुंदर छटा आपल्याला या ओळींतून प्रतीत होते.
    आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी पण झोप दूर असावी, आसमंत निरव शांत असावा, आकाश निरभ्र असावे आणि कानावर "पिलू" रागाचे स्वर यावेत!! आपोआप डोळे मिटण्याची क्रिया सुरु होते. पिलू रागच असा आहे,, स्वर ऐकताना मनावर गुंगीचे साम्राज्य पसरते. "रिषभ" वर्जित स्वर (आरोही सप्तकात) परंतु "गंधार","मध्यम" आणि "निषाद" दोन्ही प्रकारे लागतात. "धैवत" स्वराचा किंचित वापर. शास्त्रात हा राग "औडव-संपूर्ण" असा दर्शविला आहे आणि तो केवळ, या "धैवत" स्वराच्या स्पर्शाने!! "गंधार" आणि "निषाद" हे वादी-संवादी स्वर. अर्थात हा झाला रागाचा तांत्रिक भाग. रागाचे स्वर आणि लिपी कितीही अर्थवाही असली तरी त्याला एक ठराविक मर्यादा असते. म्हणजे ज्यांना स्वरज्ञान आहे, त्यांनाच ही भाषा समजून घेता येते अन्यथा इतरांना ही भाषा अगम्य असते. खरतर पिलू रागाचे "टेक्श्चर" बघायला गेले तर इथे प्रणय, करुणा, भक्ती समर्पण इत्यादी सगळ्या भावनांचा कल्लोळ ऐकायला मिळतो.
    गमतीचा भाग असा आहे, हा राग फारसा मैफिलीत गायला जात नाही म्हणजे जसे यमन, भूप हे राग सलग तासभर आळवले जातात, तशा प्रकारचे सादरीकरण या रागाचे होत नाही, बहुतांशी, ठुमरी, दादरा, होरी अशा उपशास्त्रीय संगीत प्रकारातून हा राग मांडला जातो. अर्थात, चित्रपट गीत आणि भावगीत, यांत मात्र अपरिमित पसरलेला आहे.
    बेगम परवीन सुलताना यांची एक रचना आहे. "तुम राधे बन श्याम" ही रचना राग पिलू रागात बांधलेली आहे. बेगम साहिबांचा आवाज म्हणजे तानेला कुठेही अटकाव म्हणून नाही. तरीही तार सप्तकात अधिक आनंद घेणारी गायकी. ज्या सहजतेने, ताना आणि त्याच्या जोडीने हरकती येतात, ते खास ऐकण्यासारखे आहे. एकतर तार स्वरात सहज जाणे, हीच गळ्याची एक कसोटी मानली जाते पण इथे तर, तार स्वरात जाताना आणि तिथे ठेहराव घेताना, त्यालाच जोडून एखादी हरकत घेण्याची असामान्य करामत करण्याची क्षमता थक्क करते. या रागात आणखी एक मजा आढळून येते. मैफिलीत हा राग, फारसा गायला जात नाही, वादक मात्र वाजवताना आढळतात. अर्थात केवळ तार सप्तकात गायन करणे, इतकीच या गायिकेची खासियत नसून, मंद्र सप्तकात तसेच शुद्ध स्वरी सप्तकात, स्वरांचे तितकेच विलोभनीय दर्शन आपल्याला घडते. स्वरांवर घट्ट पकड पण तरीही गायनात मृदुपणा आणायचा, गाताना लयीच्या अंगाने ताना किंवा बोलताना घ्यायच्या अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील.
    इथे आपण उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांची या रागातील एक रचना ऐकुया. उस्तादांचा लडिवाळ स्वर तसेच सगळ्या सप्तकात सहज फिरणारा गळा, त्यामुळे ही रचना केवळ संस्मरणीय झाली आहे. क्षणात मंद्र सप्तकात तर पुढल्या क्षणी तार सप्तकात जाउन, परत समेवर ठेहराव घेण्याची पद्धत तर लाजवाब!! "सैय्या बोलो" ही रचना म्हणजे पिलू रागाची ओळख, इतकी प्रसिद्ध रचना झाली आहे, ती काही उगीच नव्हे. उस्तादांच्या गायकीची सगळी वैशिष्ट्ये या सादरीकरणात ऐकायला मिळतात. या रचनेतील, हरकती तर इतक्या विलोभनीय आहेत की प्रत्येक वेळेस, फार बारकाईने ऐकाव्या लागतात. तेंव्हाच स्वरांचा "डौल" समजून घेता येतो. "पतियाळा" घराण्याची सगळी सगळी "खासियत" या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते.
    आत्ता मी ज्या गाण्याबद्दल लिहिणार आहे,ते एकूणच "पिलू" रागाच्या स्वभावात बसणारे नाही. "ऐ मेरी जोहराजबी" हे "वक्त" या चित्रपटातील गाणे. खरतर हीच खासियत, सुगम संगीताची आहे. रागातील एखादी हरकत, एखादा स्वर, संगीतकाराला नेमका भावून जातो आणि गाण्याची "तर्ज" निर्माण होते. त्यामुळेच गाण्याची चाल आणि त्याचे "मूळ" शोधणे, बरेचवेळा आवाक्याबाहेरचा शोध होतो. मुळात, मन्ना डे यांचा अत्यंत सुरेल स्वर आणि त्याला मिळालेली कव्वालीबाजाची चाल. त्यामुळे हे गाणे फारच सुरेख जमून गेलेले आहे. गाण्याच्या पहिल्या आलापीतील हुंकारापासून हे गाणे सुंदरपणे "चढत" जाते. प्रत्येक स्वर खणखणीत, सुरेल आणि योग्य त्या शब्दावर अचूक वजन, त्यामुळे कव्वाली असली तरी अतिशय खेळकर रचना होऊन जाते. वास्तविक "कव्वाली" सारखी रचना बहुतांशी द्रुत लयीत चालत असते. अशा प्रकारच्या रचनेत रागाची लक्षणे शोधणे तसे फार दुरापास्त असते आणि एका दृष्टीने विचार केल्यास, तशी लक्षणे शोधणे व्यर्थ असते.
    लगान चित्रपटातील गाणे आहे. गाण्याचा बाज, लोकसंगीतावर आधारित आहे. तसे थोडे बारकाईने बघितले तर, पिलू रागात, चैती, ठुमरी, होरी किंवा पुरबी सारख्या असंख्य रचना ऐकायला मिळतात. एका दृष्टीने बघितल्यास, चैती, पुरबी किंवा होरी, ह्या सगळ्या उत्तर भारतातील लोकसंगीतातून पुढे शास्त्रीय स्वरूपात, स्थानापन्न झालेल्या आहेत. त्यामुळे, पिलू रागात, या रचनांचा "मूलस्त्रोत" सापडणे साहजिक आहे. अर्थात, गाण्याची चाल रेहमानची आहे आणी अर्थात, त्याच्या प्रकृतीनुसार गाण्याची बांधणी केली आहे. सुरवातच लोकसंगीताच्या आधारावर झाली आहे. गाण्यात, रेहमान, अलका याज्ञिक, उदित नारायण, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन असे दिग्गज आवाज आहेत. गाण्याच्या पहिल्या अंतऱ्यानंतर पिलू रागाची सावली ऐकायला मिळते.
    गाणे केरवा तालात आहे पण तालाचे वादन अगदी अनोखे आहे. वास्तविक आपण, भारतीय ताल म्हणजे पारंपारिक तबला नजरेसमोर ठेऊन अदमास घेत असतो परंतु संगीतकार , जर व्यासंगी, अभ्यासू असेल तर, गाण्यात वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि या गाण्यात रेहमानचे हेच वैशिष्ट्य ऐकायला मिळते. साधारणपणे समूह गीत म्हटले की वैय्यक्तिक गायकीला अवसर कमीच मिळतो पण इथे संगीतकाराने त्याची योग्य ती काळजी घेतली असल्याने गाणे श्रवणीय होते.
    पिलू रागातील हे आणखी असेच आनंददायी गाणे. चित्रपटातील प्रसंग ध्यानात घेऊन, त्यानुरूप गाण्याची रचना करण्यात, जे फार थोडे संगीतकार आहेत, त्या यादीत एस. डी. बर्मन यांचा क्रमांक लावावा लागेल. विशेषत: हाती असलेली चाल, फुलवायची कशी याचे असामान्य भान या संगीतकाराकडे होते त्या दृष्टीने, हा संगीतकार,हाडाचा चित्रपट गीतांचा संगीतकार होता, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. आता "अब के बरस" हे "बंदिनी" चित्रपटातील गाणे बघा. सुरवातीला किती लडिवाळ आलाप आहे आणि हा हा जो आलाप आहे, तों शब्दांना जोडून घेतलेला आहे. आशा भोसले यांच्या गायनाची साक्ष देणारे गाणे. त्यातूनच पिलू रागाचे सूचन होते. पुढे चाल वेगळी सरते आणि स्वतंत्र जन्म घेते, हा भाग वेगळा. गाण्यातील सतारीची गत देखील फार वेधक आहे. गाणे तसे ठाय लयीत सुरु होते पण, पुढे चाल विस्तारित होताना, लय देखील त्याच ठाय लयीत बदल घेते आणि पार्श्वभागी असणारा वाद्यमेळ देखील. अर्थात असे कितीही वेगवेगळे बदल झाले तरी समेवर येताना, जो सूर पकडून गाणे परतते, तो भाग विलक्षण सुंदर आहे. वास्तविक गाण्यावर बंगाली लोकसंगीताचा ठसा आहे, गाणे अतिशय विरही, व्याकूळ करणारे आहे परंतु चाल कुठेही रेंगाळत नाही.
    गाण्याची जी प्रकृती आहे, ती प्रकृती उत्तरोत्तर अधिक दाट होत जाते आणि ही किमया आशा भोसल्यांच्या गायनाची. अर्थात, संथ लयीच्या गाण्यांना असा एक फायदा नेहमी मिळतो. चाल लगेच मनात उतरत नाही पण जेंव्हा चालीचे मर्म ध्यानात येते त्यावेळी, ती चाल मनात खोलवर रुतून बसते. अशी गाणी कधीच मन:पटलावरून नाहीशी होत नाहीत. हा लोकसंगीताच्या गोडव्याचा भाग देखील म्हणता येईल.
    आता पर्यंत आपण या रागाची काही रूपे बघितली, काही रागाच्या स्वरावलीशी थोडे फटकून तरीही श्रवणीय रचना ऐकल्या. या लेखाच्या सुरवातीला, मी म्हटले होते, या रागाचे स्थूल स्वरूप हे शांत, रमणीय असे आहे. प्रणयी भावना या रागात फार खुलून येते. अशीच अतिशय शांत आणि केवळ अजोड रचना म्हणावी, असे एक गाणे ऐकणार आहोत. ही गाणे म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील अंगाईगीतातील "मानदंड" आहे आणि आज इतकी वर्षे झाली तरीही या गाण्याची खुमारी रतिभर देखील ओसरत नाही. गाण्यातील, लय, गोडवा इतका अश्रूत आहे की, आपणही या गाण्यात कधी गुंगून जातो, याचा पत्ताच लागत नाही.
    "धीरे से आजा री अखियन मी निंदिया" हेच ते अजरामर गाणे. या गाण्याचा ठेका - दादरा आहे पण, तालाचे बोल आणि वापर किती वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा. अंगाईगीत आहे तेंव्हा गाण्याचा ताल देखील डोक्यावर हळुवार थोपटल्यासारखा आहे, जेणे करून झोपी जाणारी व्यक्ती विनासायास झोपेच्या आधीन होईल. गाण्याचे शब्द देखील सहज, सुंदर, कुणालाही कळण्यासारखे आहेत. "निंदिया" आणि "निन्दियन" या शब्दातील श्लेष बघण्यासारखा आहे. पिलू राग किती अप्रतिम आहे, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरेल. तसे पाहिले तर, पिलू रागाचे स्वर, चलन हे, या गाण्यापासून फारकत घेणारे आहे पण तरीही नाते जोडणारे आहे. चाल, गायन, वाद्यमेळ या सगळ्याच दृष्टीने हे गाणे अभ्यासनीय आहे.हिंदी चित्रपट गीतांतील हे गाणे खऱ्या अर्थाने अजरामर गाणे.
    पिलू रागाची आणखी एक वेगळी ओळख आपल्याला "मैने शायद तुम्हे पहले भी कभी" या गाण्यातून घेत येईल. "बरसात की रात" या चीत्रापातैल हे गाणे संगीर्कार रोशन यांनी स्वरबद्ध केले आहे. या गाण्यात मात्र पिलू रागाची बऱ्याच अंशी ओळख मिळते परंतु तरीही रागापासून दूर जाउन देखील, रागाशी नाते राखण्याची प्रशंसनीय क्षमता, रोशन यांच्या रचनेतून नेहमी आढळते. मोजकीच वाद्ये पण तरीही वाद्यातून निरनिराळे स्वनरंग पैदा करण्याचे कौशल्य. या गाण्यात आणखी एक मज आहे. गाण्याची सम किंचित वेगळ्या स्तरावर केली आहे, म्हणजे जर का लयीच्या अंगाने गाणे ऐकायला घेतले तर जिथे "सम" येईल असे वाटत असते, तिथे न घेता, पुढील शब्दावर घेऊन, गाण्यात वेगळाच रंग निर्माण केला आहे. रोशन यांची प्रकृती मुळातच अति शांत, संथ रचना करण्याकडे असल्याने, इथे देखील जरी प्रणयी ढंगाचे गाणे असले तरी प्रेमाची वाच्यता, भर मैफिलीत करीत असल्याने, तिथे संयत भावना आवश्यक असते आणि तोच भाग या गाण्यातून दिसतो आणि हा संयत, मुग्ध प्रेमाचा भाव दर्शविण्यासाठी पिलू रागाने अनंत छटा आपल्याला बहाल केलेल्या आहेत.
    -- अनिल गोविलकर

  • मराठी चित्रपट दिशा आणि मार्ग

    2020 च्या मार्च महिन्याआधी आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून गृहीत धरुन चाललो होतो, त्यात भरलेल्या चित्रपटगृहात पॉपकॉर्न खात मजेत सिनेमा पहाणं, ही एक गोष्ट होती. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाउनमधे थिएटर्स बंद होणं आणि टेलिव्हिजन हे आपलं करमणुकीचं प्रमुख साधन बनणं हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता…..

  • काश्मिर…

    काश्मिरातील वास्तवाबाबत काही

  • सि.के.पी. चोखंदळ

    व्हॉटसऍप आणि इतर माध्यमातून लोकप्रिय झालेले हे पोस्ट शेअर करत आहोत. मुळ लेखकाचे नाव माहित नाही. मात्र सर्वात शेवटी Forward करणार्‍याने प्राची जयवंत यांचे नाव दिले आहे.


    आम्ही अस्सल सिकेपी..चोखंदळ अन चवींचे
    निरनिराळे खाद्यपदार्थ..खासियत आमचे..

    काय वर्णावा तो रविवारचा सरंजामी थाट
    नाश्त्याला ब्रेड अन आॅमलेटचा घमघमाट

    दुपारच्या जेवणात..मटणाची तर्री रस्सेदार
    बिर्याणी जोडीला..खमंग सुगंध मसालेदार

    पापलेट किंवा सुरमई फ्राय अशी खरपूस मस्त
    कोलंबीचे कालवणही मग लगेच होते फस्त..

    लज्जतदार चिकन असे लबाबदार झणझणीत
    वरुन लिंबू पिळून करावे..चटकदार चमचमीत..

    खिम्याचे कटलेट्स ही तर सर्वांनाच पर्वणी
    माध्यान्हीला "हटके" अशी तोंडीलावणी

    सोडे हे तर कुठेही भाजीत वाढवित असे स्वाद
    मसाले वांगे,मेथी,कालवण अथवा सोडेभात

    वालाचे बिरडे करावे छान परतूनी..सवताळूनी
    ओले खोबरे अन कोथिंबीर घालावी वरतूनी..

    कायस्थ पुरणपोळी असे मधुर व मऊशार
    मटणाला "व्हेज"पर्याय म्हणून वड्यांचे सांबार

    आळूच्या वड्या,वाटली डाळ यांची औरच बात
    पंचामृत अन पुलावाचाही मग जमून येतो बेत..

    सर्व पदार्थांचा राजा..शाही खाज्याचा कानवला
    खमंग खुसखुशीत ..क्षणांत तोंडात विरघळला..

    (Forwarded. Original Credit - प्राची जयवंत )

  • गोवा मराठी चित्रपट महोत्सव

    गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे.

  • लग्न आणि विघ्न गूढ

    आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या.

  • प्लॅस्टिक चलनाने समस्या सुटतील का?

    प्लॅस्टिकच्या चलनी नोटा आता काही शहरात थोडयाच दिवसात व्यवहारात येणार आहेत असे वृत्तपत्रातून वाचनात आले. पॉलिप्रॉपलीन नावाच्या पॉलिमरपासून या नोटा तयार करण्यात येणार असल्याने खराब झाल्यानंतरही त्यांचा पुनर्वापर शक्य होणार आहे.

  • सामान्य पाकिस्तानी नागरिकाला हवी भारतीयांसोबत मैत्री

    पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतात हल्ले केल्यास त्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण मुळातच पाकिस्तानी नागरिकांचा देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्यात जमा आहे.