भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला
काहि नाहि
नृत्य ही दैवी देणगी असून तिच्यात केवळ मनुष्यप्राण्यालाच नाही तर सजीव सृष्टीलाही आनंदित करण्याची ताकद आहे
वाराणसी आपल्या हिटलिस्टवर असल्याचे अतिरेक्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. ताजा बॉम्बस्फोट हा या शहरातील स्फोटाचा हा चौथा प्रयत्न ठरला. तरिही येथे येणार्या लाखो भाविकांच्या किवा शहरवासियांच्या सुरक्षेचे प्रयत्न होत नाहीत. घाटालगतच्या अरुंद गल्ल्या पाहिल्यावर अशा दुर्घटनेनंतर चेंगराचेंगरीत गंभीर जखमी होणार्यांची संख्या का वाढते हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर आता तरी सुरक्षा यंत्रणा सक्रिय होणार का ?
फ्लाईट ने ऑनटाइम टेक ऑफ केले. टेक ऑफ नंतर जकार्ता शहराचे दोन अडीच मिनिटे हवाई दर्शन झाले आणि जकार्ता जवळील समुद्रातील लहान मोठी बेटे दिसू लागली
हिंदूंच्या देववैविध्यात भगवान श्रीकृष्ण हा मोठा लोकप्रिय देव ! हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता ! अत्यंत सात्विकतेने वागतानाच वेळ पडल्यास " नरो वा कुंजरो वा " म्हणणारा, स्थानिकांना कमी पडते म्हणून दही-दूध-लोणी बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा, १६ सहस्र नाडयांवर ( नारींवर नव्हे) हुकूमत असलेला योगीराज, नृत्य,सूर आणि स्वरराज्य यावर ज्याचे अधिपत्य होते असा सकलकला शिरोमणी आणि म्हणूनच आजही आपल्याला आपल्या घरातला वाटणारा हा भगवान श्रीकृष्ण !
चित्रकार,गीतकार,साहित्यिक,तत्वचिंतक,योगीपुरुष अशा अनेकांना हजारो वर्षे या श्रीकृष्णाने नवनिर्मितीसाठी उद्युक्त केले आहे.
सोबतच्या कृष्णचिन्हामध्ये दोन हातात धरलेली मुरली आणि त्याखाली ७ वेगवेगळ्या लांबीच्या साखळ्यांना ७ वेगवेगळ्या आकाराचे घुंगुर आहेत. अधिक लांबीच्या साखळीचा जाड घुंगुर खर्ज किंवा खालच्या "सा" साठी तर एकेक स्वर चढत थेट कृष्णापर्यंत पोचता येते. पण त्याआधी मुरलीच्या ६ छिद्रांतून षडरिपु बाहेर जायला हवेत.
माझ्या कल्पनेतून साकारलेले हे :कृष्णचिन्ह" पूर्णपणे पितळी आहे. येत्या कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने सर्वांना सादर ....
--मकरंद करंदीकर
पाऊस
पाऊस
मला हवा असतो प्रत्येक वर्षी
कारण त्या शिवाय माझ्या एका
नवीन कवितेचा जन्म होणारच नसतो…
पाऊस
कोसळण्याची वाट मी चातकासारखी पाहतो
कारण त्या शिवाय मी तिला
पावसात भिजताना पाहू शकणार नसतो…
पाऊसात
मी भिजवून सतत ओलाचिंब होतो
कारण त्या शिवाय माझ्या कल्पनेला
पुन्हा नवीन अंकूर फुटतच नसतो…
पाऊस
मुसळ्धार कोसळ्ण्याची वाट पाहत असतो
कारण त्या शिवाय मी पाण्यातून
रस्ता काढत चालू शकणार नसतो…
पाऊसात
भिजणारा शेतकरी पाहायला मला आवडतो
कारण त्या शिवाय मला सर्वात
आनंदी चेहरा पाहायला मिळ्णार नसतो…
कवी – निलेश बामणे ( एन. डी. )
केरळ ला निसर्गाने जे दिले आहे ते महाराष्ट्राला सुद्धा भरभरून दिले आहे. परंतु मराठी जनतेची आणि राज्यकर्त्यांची मानसिकता बदलत नाही. प्रादेशिक अस्मिता लोप पावल्यामुळे महाराष्ट्राची धर्मशाळा झाली आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत आणि पुणे नाशिक, नागपूर सारख्या शहरात दैन्यावस्था आलेली आहे.
आपण महाराष्ट्रात रहातो म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणारच. पण सगळी माहिती खरोखर आहे का? तपासून बघा खाली दिलेली सगळी माहिती आपल्याला आहे का?
रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या उंच माझा झोका या मालिकेचे शीर्षक गीत
Copyright © 2025 | Marathisrushti