पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?
भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.
पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.
भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.
पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?
भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?
पु.ल. : पुण्याला.
भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.
पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?
भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली.
मोहालीचा भारत-पाकिस्तान सामना बघायला पंतप्रधानांचे खास मेहमान पाकिस्तानातून येणार आहेत. बिघडलेले भारत पाक संबंध क्रिकेट मॅचदरम्यान बिर्याणी खाता खाता झटक्यात सुधारणार आहेत. आणि संबंध सुधारले की बिचार्या कसाबदादा आणि अफझलभाऊंची रवानगी मायदेशात केली जाणार आहे. जय हो!!!!!!!!!!!!!! . .
जीवनकलेची साधना या स्वधर्म ग्रंथाचे महात्म्य
सुप्रसिद्ध शब्दांकनकार प्रा. नीतिन आरेकर यांनी घेतलेला, वलयांकित व्यक्तींच्या सर्वसामान्यांना माहित असलेल्या व्यक्तिमत्त्वापलिकडे जाऊन घेतलेला शोध…..
महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या फ्रेशर्स पार्टीमुळे पुण्यात बराच गदारोळ झाला. या पार्टीत अटक झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई सुरू झाली आहे. परंतु, त्यांच्याकडे परवाना नसतानाही मद्य पुरवणार्या मद्य विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या व्यक्तींना शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. विद्यार्थ्यांना वाचवायचे असेल तर देशभर दारूबंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी.
बायको माहेरी गेल्यावर आज सकाळी नवर्याने काढलेली रांगोळी.

त्या माणसाचा पुन्हा दिल्लीत नवा जन्म झाला. अस्थमा, कन्सर इत्यादी रोगांनी ग्रस्त होऊन, तडफडून तडफडून त्याच्या मृत्यू होणार.
Copyright © 2025 | Marathisrushti