पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाची बातमी येताच संगीतसूर्य अस्ताला गेल्याची भावना निर्माण झाली. आजच्या युगात पंडितजीं सारखा गायक होणे अवघडच. त्यांची तपश्चर्या, गुरूपूजा, शास्त्रीय संगीतासाठी घेतलेली कडवी मेहनत हे सारं शब्दातीत ठरावं. इतर अनेक अव्वल पुरस्कारांबरोबरच त्यांना ‘भारतरत्नानेही गौरवण्यात आलं. त्यांच्या निधनाची बातमी येताच सहवासातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान/राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं आणि त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला.
“अभिनय हा गुण, त्याच्यात अगदी जन्मत:च भिनलाय, त्याच्या बोलण्यातून इतकी सहजता जाणवते,जी रुपेरी पडद्यावरील कोणत्याही भूमिकेला साजेशी ठरेल; तर असा अभिनयसंपन्न बालकलाकार ओमकार तोडकर सांगतोय त्याच्या आगामी छावणी चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी, आणि आजवरच्या त्याच्या चित्रपट,नाटकं व इतर “प्रोजेक्ट्स” विषयी फक्त आणि फक्त मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या या खास मुलाखतीतून…”
राशी :- मीन
स्वामी :- गुरु
देवता :- चक्रपाणि
जप मंत्र :- ॐ ह्रीं क्रीं चक्रायनमः
उपास्यदेव :- हनुमान
रत्न :- पुष्कराज / लसणी
जन्माक्षर :- दी ची दि दु दू थ थाथ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं ही द्विस्वभावी राशी आहे.कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली जाते. माशाला पाठीचा कणा नसतो. त्यामुळे मीन मानसिक व शारीरिक बाबतीत खूप लवचिक असतात. मीन राशीचे लोक सदैव मदतीस तत्पर, संवेदनशील, कल्पक, कधीही नाही न म्हणणारे असे असतात. मीन राशीला व्यवहार जमत नाही. तसेच जास्त वेळी लक्ष देणाऱ्या व्यायाम प्रकारांना ते कंटाळतात. मीन राशीचा खाण्यावर ताबा अजिबात नसतो. पोहता न येणारी मीन राशीची व्यक्ती क्वचित आढळते.
विजय कुलकर्णी स्वामी समर्थ सेवा केंद्र काठापुर बु जिल्हा पुणे(आपल्या सर्वांच्या माहितीसाठी)
गणेशोत्सव जल्लोषात सुरू असताना त्यातून उभे राहणारे मोठे अर्थकारण स्पष्टपणे जाणवत आहे. लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेला हा उत्सव राजकारणात जाणार्यांसाठी महामार्ग ठरतो आहे. त्यात अर्थकारण आल्याबद्दल आक्षेप नाही. परंतु, गणेशोत्सवाचे ‘मार्केटिंग’ होत असताना ‘सेल्स’लाच प्राधान्य दिले जात आहे. गणेशोत्सवावर जाणवत असलेला अर्थकारणाचा हा प्रभाव नेमके काय सांगतो ?
दैनिक लोकसत्ताच्या रविवार २९ ऑगस्ट २०१० च्या अंकात श्री अरुण जाखडे यांनी गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे असे मत मांडले आहे.
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर वारसदार म्हणून अनेक नावे पुढे आली. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे ही दोन नावे आघाडीवर राहिली पण निवड पृथ्वीराजजींचीच झाली. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हे महत्त्वाचे घटक होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता पृथ्वीराजींची निवड सार्थ ठरते.
र्पियकाराला र्पेयसी मेटलयावर काय वाटत ते वरणन केले आहे.
शांतीचा केला खात्मा…….
इसवीसनाच्या पूर्वी तीन हजार मध्ये लिहिलेल्या ऋग्वेदामध्ये सारी या वस्त्राचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. याचा अर्थ सारी ही त्याही पूर्वी अनेक वर्षे वापरली जात असावी.
Copyright © 2025 | Marathisrushti