विषय जरी दारु असला
तरी कविता सुंदर आहे।
न घेणाऱ्याला देखील हसवेल
____
पिऊन थोडी चढणार असेल
तरच पिण्याला अर्थ आहे
एवढी ढोसून चढणार नसेल
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे
मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात फक्त दारू पितो
नॉनव्हेज मात्र टाळतो
ज्याची जागा त्याला द्यावी
भलती चूक करू नये
पिताना फक्त पीत रहावं
चकण्यानं पोट भरू नये
वेळच्या वेळी आपण ओळखावी
आपली आपली आणिबाणी
लाज सगळी सोडुन देऊन
ग्लासात घ्यावं लिंबुपाणी
पिऊन तर्र झाल्यानंतर
काय खातोय ते कळत नाही
खाल्ल्यानंतर बिलामधली
टोटल कधी जुळत नाही
आपला ग्लास आपण सांभाळावा
दुसर्याला घेऊ देऊ नये
दुसर्याचा ग्लास उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये
अशीही वेळ असते जेंव्हा
कोणीच आपला नसतो
म्हणून आपण प्यायला जातो
तर नेमका ड्राय डे असतो
आपला पेग आपण भरावा
दुसर्यावर विश्वास ठेवू नये
आपला ग्लास, आपली बाटली
दुसर्याच्या हातात देऊ नये
असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख दारूत बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
अल्कोहोलसोबत उडून जातं!
एकदा प्यायला बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय, माझी काय
नशा कधी सरू नये
तुला जायचंच असेल तर निघून जा ,
जाण्यासाठी भांडू नकोस
प्यायची नसेल तर पिऊ नको ,पण दारू अशी सांडू नकोस
स्कॉच प्यावी कोरी, कच्ची
बर्फ नको, सोडा नको
उंच आभाळी उडण्यासाठी
पंख हवे... घोडा नको!
फॉरीन लिकर कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली थोडीशीच प्यावी
दोन दोन दिवस उतरत नाही
पिणं असतं आगळा उत्सव
त्याचा उरूस होऊ नये
प्यायला नंतर आपला कधी
वकार युनूस होऊ नये
घरी बसून दारू प्यायचे
खूप सारे फायदे असतात
हॉटेलमधे, बिल भरायचे
काटेकोर कायदे असतात
आम्ही कधीच दारूमधे
दुःख आमचं बुडवत नाही
दारू नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही
B
हवा तसा मी चालतो आहे
कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
माझ्या मित्रा, माझ्या इतकी
कुमार दिघे यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३३ रोजी कराची येथे सीकेपी कुटुंबात झाला .त्यांच्या आधीच्या चार पिढ्या कराची येथे रहात होत्या .फाळणीमुळे कुमार दिघे पुणे येथे आले व मामाच्या आश्रयाने राहू लागले .त्यांनी एस .पी .महाविद्यालयातूनएम .ए .पर्यंत शिक्षण पूर्ण केले .शिक्षण घेत असतानाच कुमार दिघे अभिनयाच्या क्षेत्राकडे आकर्षित झाले
मानवाची निर्मिती झाली आणि हळूहळू त्याची बुद्धी विकसीत होत गेली तसा सर्वप्रथम तो अभियंता बनला! पावसापासून संरक्षणासाठी गुहे शोधले, दगडी हत्यारे बनवली, घर्षणातून विस्तव निर्माण होतो हे जाणून गारगोट्या वापरून विस्तव निर्माण करू लागला, अन्न शिजवू लागला,
महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे. …..
इंग्रजांनी आणलेले इंग्रजी शिक्षण, रेल्वे गाडी, रोगप्रतिबंधक लशी,इंग्लिश दारू व या सर्वांच्याही पेक्षा कंकणभर सरस भारतात आणलेला चहा. या सर्वांनी भारतीय सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय व रोजच जगणंच व्यापून टाकलेल आहे.
टॅक्सी किंवा कार ऐवजी बाईकस्वार पॅसेंजर ची ने आणि त्यांच्या बाईकवरून करतात. प्रत्येक गोजेक बाईकस्वार हेल्मेट आणि गोजेक चा जॅकेट घालून असतो. पॅसेंजर साठी सुद्धा एक हेल्मेट प्रत्येक गोजेक वाल्याकडे असते. जकार्ता मध्ये ट्रॅफिक ही मुंबई पेक्षा भयंकर असते. कार आणि बाईक राईड मध्ये तसं पाहिले पैशांच्या दृष्टीने तर फारसा फरक नसतो. स्वस्त असण्यापेक्षा बाईक स्वार हे कार पेक्षा लवकर पिक अप करतात आणि ट्रॅफिक टाळून, शॉर्ट कट आणि लहान रस्त्यांवरून पटापट इच्छित स्थळी पोचवतात.
नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सालसा किंवा हिप-हॉप या नृत्यशैली मानवाच्या ज्ञात इतिहासात उदयाला आल्या. परंतु भारतीय शास्त्रीय नृत्यशैली मात्र त्याही आधीच्या आहेत. देवी- देवता या शास्त्रीय शैलींमध्ये नृत्य करतात, असं आपल्याकडे मानतात. शास्त्रीय या शब्दाचा अर्थ - शास्त्राला धरून किंवा शास्त्रावर आधारित असं नृत्य. शास्त्रीय नृत्याला चौकट असते, बंधन असतं, नियम असतात. कोणत्याही शास्त्रीय नृत्याला एक विशिष्ट इतिहास आहे. त्याला अभिजात संगीताची जोड आहे. प्रत्येक नृत्यशैलीला एक अभिजात शैली म्हणून ओळख आहे.
कथक, भरतनाट्यम्, कुचीपुडी, ओडिसी, कथकली, मोहिनीअट्टम्, मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्याच्या विविध शैली आहेत. शास्त्रीय नृत्य हे मुख्यतः नृत्य आणि अभिनय या दोन खांबांवर आधारलेले आहे. उत्तम शरीरसौष्ठव, सौंदर्य, आकर्षक वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा, रंगमंच सजावट, तालबद्ध संगीत काव्य रचना, उत्तम गायक-वादकांच्या संचाद्वारा सुमधुर संगीताची साथ व त्याचप्रमाणे मनाची शांतता आणि एकात्मता या सगळ्यांचा समन्वय म्हणजे शास्त्रीय नृत्य.
नृत्याचे साधन शरीर आहे, शरीराचे केंद्र मन आहे म्हणूनच मनाच्या शक्तीवर नृत्य अवलंबून असते त्यामुळे शास्त्रीय नृत्य ही एक साधना आहे.
शास्त्रीय नृत्याचे महत्व सांगणारा हा "अभिनय दर्पण" ग्रंथातील श्लोक.
यतो हस्तो ततो दृष्टीः। यतो दृष्टीस्ततो मनः।
यतो मनस्ततो भावः। यतो भावस्ततो रसः।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जिथे हात तिथे दृष्टी, जिथे दृष्टी तिथे मन, जिथे मन तिथे भाव आणि जिथे भाव तिथे रस.
याचाच अर्थ असा की जिकडे आपला हात जातो, तिकडे आपले डोळे गेले पाहिजेत. जिकडे आपले डोळे जातात, तिकडे आपलं मन गेलं पाहिजे. जिकडे आपलं मन जातं तिथे आपले भाव आले पाहिजेत आणि जिकडे भाव येतात तिकडे रसनिर्मिती होते म्हणजेच चांगले नृत्य जन्माला येते.
हल्लीच्या काळात फिटनेस म्हणूनही नृत्यप्रकार शिकले जातात. पण ते तेवढ्यापुरतेच. शास्त्रीय नृत्यप्रकाराचा अध्यात्माशी फार मोठा संबंध आहे. त्यामुळे प्रचंड मेहनत, नृत्यसाधना आणि रियाझ यांमुळेच ही नृत्यशैली आत्मसात करणे शक्य आहे.
२९ एप्रिल जागतिक नृत्यदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
-- पूजा प्रधान
(भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीची लेखमाला या सदरात क्रमश: प्रकाशित होणार आहे.)
ज्ञानपीठविजेत्या कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यातील आहे, खुद्द कुसुमाग्रजांनाही माहिती नव्हती. पण त्यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या (कै.) निळकंठ बापू गोडबोले यांनी ते शोधून काढले. एवढेच नव्हे तर कुसुमाग्रजांना येथे आणून त्यांचा सत्कारही केला. २२ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग अद्याप आपल्याला आठवतो आहे,'' असे गोडबोले यांचे चिरंजीव अरविंद गोडबोले सांगतात. ते म्हणतात, ""माझे वडील सराफी व्यवसाय करीत होते. बी.ए.पर्यंत शिकलेल्या वडिलांना लेखनाचीही आवड होती. त्यांचे लेखन तपासण्यासाठी ते कुसुमाग्रजांकडे पाठवून देत. त्यातून त्यांचा चांगलाच परिचय झाला होता. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर छापून आलेल्या बातमीत, त्यांचा जन्म पुण्यात झाल्याचा उल्लेख होता. यातून माझ्या वडिलांना उत्सुकता निर्माण झाली. याबद्दल त्यांनी कुसुमाग्रजांकडेही चौकशी केली. मात्र, त्यांनाही जन्मस्थान नेमके माहिती नव्हते. त्या ठिकाणी राहणाऱ्या जुन्या लोकांची नावे शोधून काढली. त्यांना प्रत्यक्ष भेटून अधिक माहिती घेतली. तेव्हा सदाशिव पेठेतील घर नंबर १२६४ हेच कुसुमाग्रजांचे जन्मस्थान असल्याचे सबळ पुरावे त्यांच्या हाती लागले. पूर्वी तेथे लिमये वाडा होता. नंतर बळवंत सदन झाले. सध्या शुभम नावाची इमारत तेथे उभी आहे. जन्मस्थानाचा शोध लागल्यावर भारावून गेलेल्या माझ्या वडिलांनी कुसुमाग्रजांना याची माहिती देऊन त्यांना येथे बोलावून घेतले. जुलै १९८९ मध्ये कुसुमाग्रज येथे आले. परिसरातील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ते पाहून कुसुमाग्रजही भारावून गेले होते.''
नाशिकला तात्यासाहेबचे राहते घर दुरुस्तीसाठी पाडण्यात आले तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना राहायला स्वतंत्र बंगला दिला होता. सोबत एक मोटारगाडीही होती. तात्यासाहेब संध्याकाळी गाडीतून एक फेरफटका मारून येत. मोटारीने प्रवास करणे आवडे ; कारण निसर्गाचे दर्शन घडते. असे ऐकले होते की यशवंतराव चव्हाणांनी तात्यासाहेबांना एकदा दिल्लीचे निमंत्रण दिले विमानाचे तिकीट पाठवणार असल्याचे कळवले. तात्काळ तात्यासाहेबांनी उत्तर दिले, ” विमानाचे तिकीट नको. आम्ही मोटारीने येऊ. ” तात्यासाहेबांनी भारतभर प्रवास केला तो मोटारीतूनच. प्रेक्षणीय स्थळांपेक्षा तेथली माणसे, बाजारहाट, तेथली माती, झाडे, पक्षी यांचे आकर्षण अधिक वाटे. त्यांची वस्ती असायची डाकबंगल्यात. कारण कुणाच्या घरी राहणे म्हणजे बांधिलकी आणि हॉटेलात राहाणे म्हणजे कृत्रिम आतिथ्य व येणा-या जाणा-यांची सतत वर्दळ.
एक गोष्ट कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला दिली.
ती म्हणजे अलौकिक भाषासौंदर्य. मराठी भाषेचे इतके सुंदर रूप क्वचित पाहायला मिळते. अशा पातळीला भाषा सांभाळून निसर्गातील कोणतीही सूक्ष्मातिसूक्ष्म वा भव्यातिभव्य घटना सादर करणे हे शक्य असल्याचे त्यांनीच दाखवून दिले.
कुसुमाग्रज हे त्यामुळेच मराठीभाषेच्या साहित्यप्रवासातील एक अद्वितीय हिल स्टेशन म्हणावे लागेल, जेथे पोचल्यावर अथवा जेथून पुढे जाताना आपले मन सुंदर झालेले असते.
हे एका माणसाने एका भाषेला दिलेले दान!
सेवामहर्षी बाबा आमटेंवर मा.कुसुमाग्रजानी केलेली कविता
अरे, आम्ही आहोत असे करंटे
की आमच्या पेठेत लागतात पताका
फक्त मंत्री आले तर
आणि तुझ्यासारखे संत
ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार
निघून जातात गस्त घालीत
अंधारात
उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून
आसवांच्या दलदलीतून दुःखाने उसवलेल्या दुनियेवर
अमृताचं सिंचन करीत
एकदा मा.पुलं ना वाढदिवसाच्या शुभेच्छा कुसुमाग्रजानी पाठवल्या. ते शब्द असे :
“शत शरदांचे सुभग चांदणे पसरो वाटेवर
लाभो संसारातिल सारे सुखदायी सुंदर II “
संकलन
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ - इंटरनेटवरुन
मयेकराच्या शकल्याचा गेल्यावर्षीच लगिन झाला. कमनशिबी पोर... बेवडो घो आणी रोज बिनकारणाचे गाळी.... रांडेच्या ५२मोडीचा आसस वरती जोताच्या काटयेचो मार.. चार दिवसापूर्वी मायेराक ईल्ला रडान आजयेक सांगी होता... तिना कायतरी मंत्र दिल्यान... तसा ताबडतोब बाजार करून घराक गेला.... आणी सांजेक घोवाबरोबर शेंगदाण्याची भाटी करूक गेला... वायच आधिच गेला जोताच्या. ऊगाच गाळी नको म्हणान घोवान जोत बांधल्यान... चार तासा फिरली वाप्यात.. आणि नांगराच्या तासात कायतरी दिसला तेका.... बघून आराडलोच.... गो रांडेच्या वाप्यात इस्वन गावलो.... बघ तरी... मरांदे ती नडणी... तू ह्यो घे आणि घराक चल पयला.... तिनसानाक भाजून ठेव....
शकला गप मासो ऊचलून पुडच्या निर्गतीक वाटेक लागला..... घो खुषीत... भरडार इस्वन गावलो मस्करी हा काय?...... तिनसाना ज्वात सोडल्यान आणि पयलो मायकडे जावन दोन क्वॉटर मारल्यान..... इस्वन आसा तर एक एक्स्ट्रा.......
ईलो आट वाजता डुलत घराक... आनी सुरवात केल्यान.... रांडेच्या जेवक वाड.... शकल्यान पिटी आणी पाल्याची भाजी समोर ठेवल्यान... बघुन भिरकाटलोच काडल्यान हसोळेची काटी आणि केल्यान पेटूक सुरवात...... बावन मोडीचा रांडेचा अक्को इस्वन आपन खाल्यान आणि माका पिटी?......
शकल्यान अक्को अवाट जमा केल्यान बोंबटान.... आणी सांगल्यान ह्यो खुळावलो हा भरडार हेका ईस्वन गावलो म्हणान सांगता... आणी मारता माका ... कंटाळलेल्या अवाटकारानी घोवाक पेट पेट पेटल्यानी... आनी गेले घराक...
शकल्यान मगे हळू घोवाक घरात नेल्यान ईस्वनाच्या भाजलेल्या तुकड्यानी भरलेला ताट पुड्यात ठेवल्यान. आणि घोवाच्या पाठीवरच्या वळांका हळद लावताना सांगल्यान माका ५२ मोडीचा म्हनतास ना?
मगे मीच पुरुन ठेवलय भरडार ईस्वन..... ही एक मोड दाखवलय... तर तुमची तर्हा बघा.... आणखी ५१ आसत, शाने आश्यात तर वापरूक लाव नको.....
आता शकला सुखान संसार करता... तसो तुमी करा.......
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे
Copyright © 2025 | Marathisrushti