(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पंगत सोलापुरची

    पिकतं तिथं विकत नाही ,अशी एक म्हण आहे.
    पण सोलापुरात ती खोटी ठरते..
    इथे जे पिकतं ,तेच विकतं...
    कमी पाऊस आणि काळी माती असणार्या सोलापूर परिसरातील ज्वारी ,बाजरी,तूर,हरभरा,भुईमूग
    ही प्रमुख पिके...
    त्यामुळे "ज्वारीची भाकरी " हा सोलापुरी जेवणातील मुख्य पदार्थ..
    सोलापुरातील पंचतारांकित हॉटेला पासून ते साध्याशा धाब्यावर मिळणारा नि
    श्रीमंत आणि गरीब घरातही खाल्ला जाणारा!
    दुपारी बाराच्या सुमारास सोलापुरातल्या कोणत्याही घरात "ठक् ठक् " असा आवाज ऐकू येतोच
    तो भाकरी बडवण्याचा असतो..
    हो..इथे भाकरी थापत नाहीत ...बडवतात..
    ज्वारीच्या पिठाचा गोळा भरपूर मळून ,पोळपाटावरील भरपूर ज्वारीच्या पिठावर ठेऊन दोन्ही हातांनी एका लयीत नि बांगड्याच्या सुरात बाई भाकरी बडवू लागली की पाहणार्याचीही समाधी लागते..
    दोन मिनिटात भाकरी थापून तयार होते नि तव्यावर पडते..
    तव्यावर पाणी पिऊन ती अशी टम्म फुगते की तिच्यावरून नजर हटत नाही..
    एकही काळा डाग न पडू देता छान भाजलेली पांढरीशुभ्र भाकरी करणं हे अतिशय कौशल्याचं काम...
    ही भाकरी एवढी पातळ असते की नवीन माणूस ही पोळी आहे की भाकरी या संभ्रमात पडावा...
    अशी भाकरी बनवायला अंगीभूत कौशल्य नि सराव लागतोच..
    म्हणूनच सोलापुरात लग्नासाठी मुलगी पसंत करताना रूप,रंग ,पैसा यांपेक्षा मुलीला चांगली भाकरी करता येते की नाही, हे पाहिलं जातं..
    चुलीवर भाकरी करता येत असेल तर तिला शंभर गुण मिळतात..
    कारण चुलीवरची भाकरी म्हणजे
    अतीव कौशल्याचं नि संयमाचं काम!
    अंगच्या गोड सोलापुरी ज्वारीला चुलीचा खरपूस स्वाद मिळाला की फक्त "अहाहा "...
    या भाकरीच्या चवीत जितका करणारीचा हातगुण असतो तितकाच इथल्या ज्वारीचाही असतो.
    कदाचित कमी पावसामुळे इथल्या ज्वारीची चव,गोडी टिकत असावी..
    लग्नापूर्वी भाकरीला नाक मुरडणारी मी लग्न करून सोलापुरात आल्यापासून भाकरीशिवाय राहू शकत नाही...
    " कडक भाकरी " हे सोलापुरचं खास वैशिष्ट्य..
    अतिशय पातळ थापलेली भाकरी तव्यावर भाजून चुलीच्या धगीपाशी उभी करून ठेवली जाते..
    ती थोड्याच वेळात कडक होते..
    मीठ,तीळ ,हळद घालून केलेली बाजरीची कडक भाकरी पापडासारखी चविष्ट नि खुसखुशीत लागते..
    अनेक दिवस टिकणारी कडक भाकरी प्रवासासाठीही उत्तम..
    लग्न झाल्यानंतर चार दिवसात आम्ही एका धाब्यावर जेवायला गेलो होतो .
    तिथे कोपर्यात अनेक पोती उभी करून ठेवलेली होती..
    ती भाकर्यांनी भरलेली होती...
    हॉटेलातल्या शिळ्या भाकर्या ( भाकरीचं अनेकवचन भाकरीच होतं पण सोलापुरसाठी ते भाकर्याच असत..विषय संपला )
    अशा का पोत्यात भरून ठेवल्यात?
    उत्सुकता गप्प बसू देईना..
    शेवटी वेटरकाकांना विचारलच ...
    आणि तिथे "कडक भाकरी" शी पहिली ओळख झाली.
    "कडक चहा","कडक लक्ष्मी ","कडक शिक्षक" " कडक उपास" ...यांच्या पंगतीत आता "कडक भाकरी " ही बसली..
    प्रामुख्याने मटन किंवा चिकन रस्स्यांत चुरा करून खाल्ली जाणारी ही कडक भाकरी आमटी किंवा वांग्याच्या आणि शेंगाभाजीच्या रश्श्यात कुस्करून खायलाही छान लागते....
    धपाटा ...हा भाकरीचा खमंग चुलत भाऊ...
    ज्वारीच्या पिठात थोडी कणिक,थोडं बेसन (कणिक ,बेसन ऑप्शनल बरंका),ओवा,तीळ, जिरे,हळद,मीठ,लसणाची पेस्ट , भरपूर कोथिंबीर घातली ,पाणी घालून भाकरीच्या पिठासारखा गोळा केला ,लहान गोळा घेऊन ओल्या कापडावर अगदी पातळ थापला आणि तव्यावर टाकला,त्यावर तेल पडलं की असा काही खमंग सुवास आसमंतात दरवळतो की तुम्ही ताटली घेऊन बसायलाच पाहिजे...
    धपाटे भाजून झाले की त्याच तापलेल्या तव्यावरून "चुर्र....." असा आवाज येतो , दणदणीत खाट नाकात शिरतो नि तुम्ही खोकू लागता..
    हा ठसका असतो तव्यावर जन्माला येऊ पाहणार्या ठेच्याचा..
    भाकरीच्या किंवा धपाट्याच्याच तव्यावर तेल ,जिरं ,भरपूर लसूण नि हिरव्या मिरच्या परतल्या जातात, त्यात खडेमीठ,शेंगदाणे पडतात नि खरपूस भाजल्यावर त्याच तव्यात वाटीने या सगळ्या गोतावळ्याला खरडलं जातं...आणि ठेसा(शब्द सोलापुरी) जन्माला येतो.
    एका ताटलीत गरम-गरम धपाटा किंवा ज्वारी/बाजरीची पातळ भाकरी,ठेचा,घट्ट दही घ्यायचा नि मारायचा ताव...
    काहीतरी राहिलय वाटतय नं...
    हो, श्येंगा चटणी...हा तर सोलापुरी जेवणाचा आत्मा..
    लालभडक ,मुद्दाचटणीशिवाय नाष्टा काय,जेवण काय पूर्ण होतच नाही ...
    गावरान सोलापुरी शेंगदाणे अतिशय गोड नि चविष्ट.
    हे शेंगदाणे खरपूस भाजून,साले काढून घ्यायचे. उखळात किंवा खलात जिरं ,मीठ , हिंग,लाल तिखट घालायचं.( लसूण, चिंच पाहिजे असल्यास) कुटायचं नि मग शेंगादाणे घालून मुद्दा होईपर्यंत कुटायचं..
    ही चटणी किलोवर करावी लागते बरंका...
    सोलापुरमधे घरात एखादेवेळी फर्निचर नसलं तरी चालतं पण श्येंगाचटणी मात्रं घरात नसेल तर पाप लागतं..
    ही शेंगाचटणी भाकरी/पोळी,धपाटा,पुरी,बटाटेवडा,उत्तप्पा,डोसा अगदी पिझा,बर्गरसोबतही चालते..
    सोलापुरातलं लहान मूल बालवाडीत जातं ते भाकरी चटणीचा डबा घेऊन नि हॉस्पिटलात ऐडमिट केलेल्या आजोबांनाही शेंगाचटणी भाकरीचे चार घास खाल्ल्याशिवाय आराम पडत नाही.
    आता तुम्ही म्हणाल सोलापुरकर भाज्या खातात की नाहीत की फक्त चटणी भाकरीच?
    खातात हो खातात..
    पण कोणती खातात हे तुम्हाला ओळखूच येणार नाही .
    भरपूर शेंगाकूट आणि काळा मसाला यात लपलेली भाजी कोणती आहे ,हे कसं बरं ओळखणार?
    कळस म्हणजे इथे फक्त शेंगाची भाजी असते..म्हणजे शेंगाकूट,मसाला,तेल आणि मीठ यांचा बनवलेला रस्सा..छान लागतो बरं का ...!!
    पण इथली वांग्याची भाजी खास...!!
    नुकतीच शेतातून काढलेली ताजी -ताजी छोटी ,जांभळी,काटेरी वांगी पाहिली की कधी एकदा भाजी करून रिचवतोय ,असं होऊन जातं.
    शेंगादाणे,भरपूर कोथिंबीर,लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची.
    त्यात मीठ,काळा मसाला,लवंगाचीपूड घालायची नि हे मिश्रण छोट्या वांग्यात भरायचं..
    जरासं जास्त तेल घालून तेलावर ही भरली वांगी शिजवून घ्यायची..
    नुसती खायलाही अप्रतीम लागतात..
    रस्सा हवा असेल तर यातच पाणी घालून शिजवायचं ...
    कोवळ्या ताज्या पालेभाज्या हे सोलापुरच्या बाजाराचं वैशिष्ट्य..
    मेथी,पालक,अंबाडी,करडी,चुका,राजगिरा,तांदुळसा, कांदापात,हरबर्याची भाजी या पालेभाज्यांनी बाजार हिरवागार झालेला असतो..
    "पेंडपाला" सोलापुरकरांचा आवडता..
    कोणत्याही कोवळ्या पालेभाजीत तूर,मूग किंवा मसुराची भिजवलेली डाळ नि लसूण ,मिरची आणि शेंगाकूट घालून केलेली कोरडी भाजी म्हणजे पेंडपाला..
    अतिशय चविष्ट नि पौष्टिक!!
    पालक,चुका,मेथी शिजवून त्यात तुरीचं वरण नि लसणाची फोडणी दिली की "गरगट्टा " तयार होतो..
    याच गरगट्ट्यात जास्तीचं वांगी,घेवडा,गाजर,ओला हरबरा,
    पेरू,बोरं,हरबर्याची भाजी,सगळ्या डाळी हे सगळं घातलं की तयार होते
    ती संक्रातीच्या भोगीची " भज्जी "
    भाज्या तर भारीच असताना पण सोलापुरकरांना जास्त आवडतं ते
    " बेसन ".
    पिठल्याला सोलापुरात बेसन म्हणतात..
    ओवा,हिरवी मिरची ,जिरं,मोहरी,कढीलिंब घालून केलेलं पातळ नाही पण कोरडंही नाही ,असं पिठलं..
    सोलापुरी जेवणात भात असतो ...
    पण त्याचं स्थान दुय्यम...
    बरं तो आंबेमोहर,बासमती,इंद्रायणी पाहिजे असली नाटकं नाहीत..
    भात दमळदार नि मोकळा असणं पुरेसं असतं..
    भाताशी खायला डाळ लागते..
    तूरडाळ
    टोमॅटो,हिरवी मिरची,लसूण ,जिरं आणि मीठ एवढ्याच भांडवलावर केलेली डाळ अप्रतीम लागते..
    पण मला इथली तेलगु पद्धतीची भरपूर चिंच घातलेली आंबट आमटी जास्त आवडते..
    आणि इथे ती वाटीतून न देता पाणी पिण्याच्या फुलपात्रातून दिली जाते..
    मज्जा म्हणजे हिला तेलगुत "पप्पू " म्हणतात.
    गरम-गरम भात आणि पप्पू खाणं ही भातप्रेमींसाठी मेजवानी असते...
    असाच नोव्हेंबर,डिसेंबर,जानेवारीसारखा थंडीचा एखादा महिना असावा...
    नेहमीच्या उकाड्यापासून सोलापुरला काडीमोड मिळालेला असावा.
    गुलाबी थंडीत अख्खं गाव लपेटलेलं असावं...
    शनिवार रविवार धरून पाहुणे यावेत..
    शनिवारी रात्री एखाद्या धाब्यावर जाण्याची टूम निघावी..
    गावाच्या गर्दीपासून दूर पण फार लांब नसलेल्या एखाद्या हॉटेलात
    आकाशाखालील लॉनवरील किंवा मातीवरील खुर्च्यांत स्थानापन्न व्हावं..
    बाळगोपाळांनी हॉटेलातील घसरगुंडी,झोक्याचा आनंद लुटावा..
    मोठ्यांनी राजकारण,समाजकारण,अर्थकारणावर जोरजोराने चर्चा झोडाव्यात..
    एवढ्यात खाकरा, मसाला शेंगदाणे यावेत..त्यासोबतच एखादं शीतपेय
    आणि चाटमसाला शिंपडलेली खेकडा भजी मागवावीत..
    उगाच सूपबिप मागवून सुपाचा अपमान करू नये..
    पोरांना खेळून आणि मोठ्यांना गप्पांमुळे पोटात कावळे ओरडू लागले की जेवण आणायला सांगावं..
    तोपर्यंत आकाशदर्शनात रमून जावं..
    एकावर एक ठेवलेली ताटांची चळत
    वेटरने आणावी..
    तुमचं ताट तुमच्यासमोर यावं.
    त्यात एका वाटीत पिवळंजर्द बेसन, दुसरीत हिरवागार पेंडपाला,तिसरीत लालबुंद मसाला वांगं , चौथीत पांढरंशुभ्र दही आणि पाचव्या वाटीत
    पुन्हा पिवळीजर्द डाळ असावी.
    डावीकडे कांदा,लिंबू ,ठेचा आणि ही भाजी की चटणी असा संभ्रम पडावा असा
    मोठा शेंगाचटणीचा ढीग...
    या पदार्थांच्या सप्तरंगांनी नि सुगंधाने पोटातील जाठररसाला नि लाळग्रंथीना साद घालावी..
    आणि गरमागरम ,पातळ पांढर्याशुभ्र भाकर्या घेऊन वेटरची स्वारी यावी...
    आपल्या पानात भाकरी पडताच दही चटणी नि भाकरीचा पहिला घास पोटात जावा, मग बेसन -भाकरीचा दुसरा , तिसरा वांगं नि भाकरीचा...
    या रसोत्सवात इतकं मश्गुल व्हावं की भोवतालच्या जगाचा विसर पडावा..
    पहिली भाकरी संपल्यावर पुन्हा या जगात यावं नि कुणी बाजरीची भाकरी तर कुणी धपाटा मागवावा..
    भाकर्या नि धपाट्यांची गणती न करता खात जावं...
    आणि आपल्या खाण्याची आपल्याला लाज वाटली की मोर्चा
    भैरवीच्या भाताकडे वळवावा..
    डाळ भाताचा आस्वाद घेऊन शेवटचे दोन घास दहीभातासाठी ठेवावेत..
    " साहेब ,गोड काय आणू ?"
    वेटरने अन्नसमाधीतून जागे करावे ..
    शेंगापोळ्या ,खवापोळी नि हुग्गीची ऑर्डर निघावी..
    पाच मिनिटांत गावरान तुपात थबथबलेल्या शेंगापोळ्या ,खवापोळ्या नि हुग्गीच्या वाट्या याव्यात..
    पोटात भूक नाही असं वाटत असतानाही मऊसूत खवापोळी, खुसखुशीत शेंगापोळी खातच जावी..
    हुग्गीच्या वाट्यांवर वाट्या रिकाम्या व्हाव्यात...
    आपण केवढं जेवतोय असे वाटून खजील व्हावे ,नि जेवणाला पूर्णविराम द्यावा..
    पाहुण्यांचे समाधानी चेहरे नि जेवणाचं कौतुक ऐकून ऊर भरून यावा...
    बिल देऊन निघायला सुरुवात करावी नि उभे राहिल्यावर लक्षात यावे ..
    आपण इतके जेऊनही पोटाला जडपणा, जळजळ काहीच होत नाहीये...
    हेच तर सोलापुरी जेवणाचं वैशिष्ट्य .....!!
    --नीला महाबळ गोडबोले
    --सोलापूर
  • दारु

    विषय जरी दारु असला
    तरी कविता सुंदर आहे।
    न घेणाऱ्याला देखील हसवेल
    ____

    पिऊन थोडी चढणार असेल
    तरच पिण्याला अर्थ आहे
    एवढी ढोसून चढणार नसेल
    तर आख्खा खंबा व्यर्थ आहे

    मी तसा श्रध्दावान
    श्रावण नेहमी पाळतो
    श्रावणात फक्त दारू पितो
    नॉनव्हेज मात्र टाळतो

    ज्याची जागा त्याला द्यावी
    भलती चूक करू नये
    पिताना फक्त पीत रहावं
    चकण्यानं पोट भरू नये

    वेळच्या वेळी आपण ओळखावी
    आपली आपली आणिबाणी
    लाज सगळी सोडुन देऊन
    ग्लासात घ्यावं लिंबुपाणी

    पिऊन तर्र झाल्यानंतर
    काय खातोय ते कळत नाही
    खाल्ल्यानंतर बिलामधली
    टोटल कधी जुळत नाही

    आपला ग्लास आपण सांभाळावा
    दुसर्‍याला घेऊ देऊ नये
    दुसर्‍याचा ग्लास उचलण्याची
    वेळ आपल्यावर येऊ नये

    अशीही वेळ असते जेंव्हा
    कोणीच आपला नसतो
    म्हणून आपण प्यायला जातो
    तर नेमका ड्राय डे असतो

    आपला पेग आपण भरावा
    दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये
    आपला ग्लास, आपली बाटली
    दुसर्‍याच्या हातात देऊ नये

    असं उगीच लोकांना वाटतं
    की दुःख दारूत बुडून जातं
    दुःख असतं हलकं हलकं
    अल्कोहोलसोबत उडून जातं!

    एकदा प्यायला बसल्यानंतर
    तुझं-माझं करू नये
    तुझी काय, माझी काय
    नशा कधी सरू नये

    तुला जायचंच असेल तर निघून जा ,
    जाण्यासाठी भांडू नकोस
    प्यायची नसेल तर पिऊ नको ,पण दारू अशी सांडू नकोस

    स्कॉच प्यावी कोरी, कच्ची
    बर्फ नको, सोडा नको
    उंच आभाळी उडण्यासाठी
    पंख हवे... घोडा नको!

    फॉरीन लिकर कितीही प्यावी
    काही केल्या चढत नाही
    देशी आपली थोडीशीच प्यावी
    दोन दोन दिवस उतरत नाही

    पिणं असतं आगळा उत्सव
    त्याचा उरूस होऊ नये
    प्यायला नंतर आपला कधी
    वकार युनूस होऊ नये

    घरी बसून दारू प्यायचे
    खूप सारे फायदे असतात
    हॉटेलमधे, बिल भरायचे
    काटेकोर कायदे असतात

    आम्ही कधीच दारूमधे
    दुःख आमचं बुडवत नाही
    दारू नेहमी शुध्दच ठेवतो
    भेसळ आम्हाला आवडत नाही
    B
    हवा तसा मी चालतो आहे
    कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
    माझ्या मित्रा, माझ्या इतकी

  • अभिनेते कुमार दिघे

    कुमार दिघे यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३३ रोजी कराची येथे सीकेपी कुटुंबात झाला .त्यांच्या आधीच्या चार पिढ्या कराची येथे रहात होत्या .फाळणीमुळे कुमार दिघे पुणे येथे आले व मामाच्या आश्रयाने राहू लागले .त्यांनी एस .पी .महाविद्यालयातूनएम .ए .पर्यंत शिक्षण पूर्ण केले .शिक्षण घेत असतानाच कुमार दिघे अभिनयाच्या क्षेत्राकडे आकर्षित झाले

  • अभियंता

    मानवाची निर्मिती झाली आणि हळूहळू त्याची बुद्धी विकसीत होत गेली तसा सर्वप्रथम तो अभियंता बनला! पावसापासून संरक्षणासाठी गुहे शोधले, दगडी हत्यारे बनवली, घर्षणातून विस्तव निर्माण होतो हे जाणून गारगोट्या वापरून विस्तव निर्माण करू लागला, अन्न शिजवू लागला,

  • सरडा- काही क्षणिका काही म्हणी

    महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे. …..

  • जागतिक चहा दिन, पाऊस, चहावाला व व्हीस्की

    इंग्रजांनी आणलेले इंग्रजी शिक्षण, रेल्वे गाडी, रोगप्रतिबंधक लशी,इंग्लिश दारू व या सर्वांच्याही पेक्षा कंकणभर सरस भारतात आणलेला चहा. या सर्वांनी भारतीय सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय व रोजच जगणंच व्यापून टाकलेल आहे.

  • गोजेक

    टॅक्सी किंवा कार ऐवजी बाईकस्वार पॅसेंजर ची ने आणि त्यांच्या बाईकवरून करतात. प्रत्येक गोजेक बाईकस्वार हेल्मेट आणि गोजेक चा जॅकेट घालून असतो. पॅसेंजर साठी सुद्धा एक हेल्मेट प्रत्येक गोजेक वाल्याकडे असते. जकार्ता मध्ये ट्रॅफिक ही मुंबई पेक्षा भयंकर असते. कार आणि बाईक राईड मध्ये तसं पाहिले पैशांच्या दृष्टीने तर फारसा फरक नसतो. स्वस्त असण्यापेक्षा बाईक स्वार हे कार पेक्षा लवकर पिक अप करतात आणि ट्रॅफिक टाळून, शॉर्ट कट आणि लहान रस्त्यांवरून पटापट इच्छित स्थळी पोचवतात.

  • भारतीय शास्त्रीय नृत्यशैली

    नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सालसा किंवा हिप-हॉप या नृत्यशैली मानवाच्या ज्ञात इतिहासात उदयाला आल्या. परंतु भारतीय शास्त्रीय नृत्यशैली मात्र त्याही आधीच्या आहेत. देवी- देवता या शास्त्रीय शैलींमध्ये नृत्य करतात, असं आपल्याकडे मानतात. शास्त्रीय या शब्दाचा अर्थ - शास्त्राला धरून किंवा शास्त्रावर आधारित असं नृत्य. शास्त्रीय नृत्याला चौकट असते, बंधन असतं, नियम असतात. कोणत्याही शास्त्रीय नृत्याला एक विशिष्ट इतिहास आहे. त्याला अभिजात संगीताची जोड आहे. प्रत्येक नृत्यशैलीला एक अभिजात शैली म्हणून ओळख आहे.

    कथक, भरतनाट्यम्‌, कुचीपुडी, ओडिसी, कथकली, मोहिनीअट्टम्‌, मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्याच्या विविध शैली आहेत. शास्त्रीय नृत्य हे मुख्यतः नृत्य आणि अभिनय या दोन खांबांवर आधारलेले आहे. उत्तम शरीरसौष्ठव, सौंदर्य, आकर्षक वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा, रंगमंच सजावट, तालबद्ध संगीत काव्य रचना, उत्तम गायक-वादकांच्या संचाद्वारा सुमधुर संगीताची साथ व त्याचप्रमाणे मनाची शांतता आणि एकात्मता या सगळ्यांचा समन्वय म्हणजे शास्त्रीय नृत्य.

    नृत्याचे साधन शरीर आहे, शरीराचे केंद्र मन आहे म्हणूनच मनाच्या शक्तीवर नृत्य अवलंबून असते त्यामुळे शास्त्रीय नृत्य ही एक साधना आहे.

    शास्त्रीय नृत्याचे महत्व सांगणारा हा "अभिनय दर्पण" ग्रंथातील श्लोक.

    यतो हस्तो ततो दृष्टीः। यतो दृष्टीस्ततो मनः।
    यतो मनस्ततो भावः। यतो भावस्ततो रसः।।

    या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जिथे हात तिथे दृष्टी, जिथे दृष्टी तिथे मन, जिथे मन तिथे भाव आणि जिथे भाव तिथे रस.

    याचाच अर्थ असा की जिकडे आपला हात जातो, तिकडे आपले डोळे गेले पाहिजेत. जिकडे आपले डोळे जातात, तिकडे आपलं मन गेलं पाहिजे. जिकडे आपलं मन जातं तिथे आपले भाव आले पाहिजेत आणि जिकडे भाव येतात तिकडे रसनिर्मिती होते म्हणजेच चांगले नृत्य जन्माला येते.

    हल्लीच्या काळात फिटनेस म्हणूनही नृत्यप्रकार शिकले जातात. पण ते तेवढ्यापुरतेच. शास्त्रीय नृत्यप्रकाराचा अध्यात्माशी फार मोठा संबंध आहे. त्यामुळे प्रचंड मेहनत, नृत्यसाधना आणि रियाझ यांमुळेच ही नृत्यशैली आत्मसात करणे शक्य आहे.

    २९ एप्रिल जागतिक नृत्यदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

    -- पूजा प्रधान

    (भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीची लेखमाला या सदरात क्रमश: प्रकाशित होणार आहे.)

  • कुसुमाग्रजांच्या आठवणी

    ज्ञानपीठविजेत्या कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यातील आहे, खुद्द कुसुमाग्रजांनाही माहिती नव्हती. पण त्यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या (कै.) निळकंठ बापू गोडबोले यांनी ते शोधून काढले. एवढेच नव्हे तर कुसुमाग्रजांना येथे आणून त्यांचा सत्कारही केला. २२ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग अद्याप आपल्याला आठवतो आहे,'' असे गोडबोले यांचे चिरंजीव अरविंद गोडबोले सांगतात. ते म्हणतात, ""माझे वडील सराफी व्यवसाय करीत होते. बी.ए.पर्यंत शिकलेल्या वडिलांना लेखनाचीही आवड होती. त्यांचे लेखन तपासण्यासाठी ते कुसुमाग्रजांकडे पाठवून देत. त्यातून त्यांचा चांगलाच परिचय झाला होता. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर छापून आलेल्या बातमीत, त्यांचा जन्म पुण्यात झाल्याचा उल्लेख होता. यातून माझ्या वडिलांना उत्सुकता निर्माण झाली. याबद्दल त्यांनी कुसुमाग्रजांकडेही चौकशी केली. मात्र, त्यांनाही जन्मस्थान नेमके माहिती नव्हते. त्या ठिकाणी राहणाऱ्या जुन्या लोकांची नावे शोधून काढली. त्यांना प्रत्यक्ष भेटून अधिक माहिती घेतली. तेव्हा सदाशिव पेठेतील घर नंबर १२६४ हेच कुसुमाग्रजांचे जन्मस्थान असल्याचे सबळ पुरावे त्यांच्या हाती लागले. पूर्वी तेथे लिमये वाडा होता. नंतर बळवंत सदन झाले. सध्या शुभम नावाची इमारत तेथे उभी आहे. जन्मस्थानाचा शोध लागल्यावर भारावून गेलेल्या माझ्या वडिलांनी कुसुमाग्रजांना याची माहिती देऊन त्यांना येथे बोलावून घेतले. जुलै १९८९ मध्ये कुसुमाग्रज येथे आले. परिसरातील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ते पाहून कुसुमाग्रजही भारावून गेले होते.''

    नाशिकला तात्यासाहेबचे राहते घर दुरुस्तीसाठी पाडण्यात आले तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना राहायला स्वतंत्र बंगला दिला होता. सोबत एक मोटारगाडीही होती. तात्यासाहेब संध्याकाळी गाडीतून एक फेरफटका मारून येत. मोटारीने प्रवास करणे आवडे ; कारण निसर्गाचे दर्शन घडते. असे ऐकले होते की यशवंतराव चव्हाणांनी तात्यासाहेबांना एकदा दिल्लीचे निमंत्रण दिले विमानाचे तिकीट पाठवणार असल्याचे कळवले. तात्काळ तात्यासाहेबांनी उत्तर दिले, ” विमानाचे तिकीट नको. आम्ही मोटारीने येऊ. ” तात्यासाहेबांनी भारतभर प्रवास केला तो मोटारीतूनच. प्रेक्षणीय स्थळांपेक्षा तेथली माणसे, बाजारहाट, तेथली माती, झाडे, पक्षी यांचे आकर्षण अधिक वाटे. त्यांची वस्ती असायची डाकबंगल्यात. कारण कुणाच्या घरी राहणे म्हणजे बांधिलकी आणि हॉटेलात राहाणे म्हणजे कृत्रिम आतिथ्य व येणा-या जाणा-यांची सतत वर्दळ.

    एक गोष्ट कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला दिली.
    ती म्हणजे अलौकिक भाषासौंदर्य. मराठी भाषेचे इतके सुंदर रूप क्वचित पाहायला मिळते. अशा पातळीला भाषा सांभाळून निसर्गातील कोणतीही सूक्ष्मातिसूक्ष्म वा भव्यातिभव्य घटना सादर करणे हे शक्य असल्याचे त्यांनीच दाखवून दिले.
    कुसुमाग्रज हे त्यामुळेच मराठीभाषेच्या साहित्यप्रवासातील एक अद्वितीय हिल स्टेशन म्हणावे लागेल, जेथे पोचल्यावर अथवा जेथून पुढे जाताना आपले मन सुंदर झालेले असते.
    हे एका माणसाने एका भाषेला दिलेले दान!

    सेवामहर्षी बाबा आमटेंवर मा.कुसुमाग्रजानी केलेली कविता
    अरे, आम्ही आहोत असे करंटे
    की आमच्या पेठेत लागतात पताका
    फक्त मंत्री आले तर
    आणि तुझ्यासारखे संत
    ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार
    निघून जातात गस्त घालीत
    अंधारात
    उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून
    आसवांच्या दलदलीतून दुःखाने उसवलेल्या दुनियेवर
    अमृताचं सिंचन करीत

    एकदा मा.पुलं ना वाढदिवसाच्या शुभेच्छा कुसुमाग्रजानी पाठवल्या. ते शब्द असे :

    “शत शरदांचे सुभग चांदणे पसरो वाटेवर
    लाभो संसारातिल सारे सुखदायी सुंदर II “

    संकलन
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ - इंटरनेटवरुन

  • ५२ मोडी ५६ खोडी

    मयेकराच्या शकल्याचा गेल्यावर्षीच लगिन झाला. कमनशिबी पोर... बेवडो घो आणी रोज बिनकारणाचे गाळी.... रांडेच्या ५२मोडीचा आसस वरती जोताच्या काटयेचो मार.. चार दिवसापूर्वी मायेराक ईल्ला रडान आजयेक सांगी होता... तिना कायतरी मंत्र दिल्यान... तसा ताबडतोब बाजार करून घराक गेला.... आणी सांजेक घोवाबरोबर शेंगदाण्याची भाटी करूक गेला... वायच आधिच गेला जोताच्या. ऊगाच गाळी नको म्हणान घोवान जोत बांधल्यान... चार तासा फिरली वाप्यात.. आणि नांगराच्या तासात कायतरी दिसला तेका.... बघून आराडलोच.... गो रांडेच्या वाप्यात इस्वन गावलो.... बघ तरी... मरांदे ती नडणी... तू ह्यो घे आणि घराक चल पयला.... तिनसानाक भाजून ठेव....

    शकला गप मासो ऊचलून पुडच्या निर्गतीक वाटेक लागला..... घो खुषीत... भरडार इस्वन गावलो मस्करी हा काय?...... तिनसाना ज्वात सोडल्यान आणि पयलो मायकडे जावन दोन क्वॉटर मारल्यान..... इस्वन आसा तर एक एक्स्ट्रा.......

    ईलो आट वाजता डुलत घराक... आनी सुरवात केल्यान.... रांडेच्या जेवक वाड.... शकल्यान पिटी आणी पाल्याची भाजी समोर ठेवल्यान... बघुन भिरकाटलोच काडल्यान हसोळेची काटी आणि केल्यान पेटूक सुरवात...... बावन मोडीचा रांडेचा अक्को इस्वन आपन खाल्यान आणि माका पिटी?......

    शकल्यान अक्को अवाट जमा केल्यान बोंबटान.... आणी सांगल्यान ह्यो खुळावलो हा भरडार हेका ईस्वन गावलो म्हणान सांगता... आणी मारता माका ... कंटाळलेल्या अवाटकारानी घोवाक पेट पेट पेटल्यानी... आनी गेले घराक...

    शकल्यान मगे हळू घोवाक घरात नेल्यान ईस्वनाच्या भाजलेल्या तुकड्यानी भरलेला ताट पुड्यात ठेवल्यान. आणि घोवाच्या पाठीवरच्या वळांका हळद लावताना सांगल्यान माका ५२ मोडीचा म्हनतास ना?

    मगे मीच पुरुन ठेवलय भरडार ईस्वन..... ही एक मोड दाखवलय... तर तुमची तर्हा बघा.... आणखी ५१ आसत, शाने आश्यात तर वापरूक लाव नको.....

    आता शकला सुखान संसार करता... तसो तुमी करा.......

    बापूर्झा
    डॉ. बापू भोगटे