(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • विज्ञानयुगात धर्माची आवश्यकता

    ‘जो धारणा करतो तो धर्म’ अशी धर्माची व्याख्या केली जाते. त्यातून समाजसुधारणेसाठी, तो सुव्यवस्थित चालावा यासाठी धर्म आहे हे सूचित होते, पण कित्येक वेळा धर्मातील अनिष्ट रूढींमुळे किंवा धर्मामधील भांडणामुळे समाजाची घडी विस्कटते. त्याची प्रगती खुंटते. तेव्हा आजच्या या विज्ञानयुगात धर्म आवश्यक आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

  • बेवड्याची डायरी – भाग २ – पहिला दिवस व्यसनमुक्ती केंद्रातला

    मला कोणीतरी ऑफिस मधून उठवून पलंगावर आणून झोपवले इतके लक्षात आहे फक्त नंतर मला एकदम जाग आली तेव्हा .आजूबाजूला खूप जण इकडे तिकडे फिरताना दिसत होते .मी डोळे चोळले ..आणि जरा डोक्याला ताण दिला तेव्हा लक्षात आले की आपण घरी नसून ‘ मैत्री ‘ व्यसनमुक्ती केंद्रात आहोत ते

  • भारतमातेच्या वीरांगना – 5 : झलकारी बाई

    आपल्या सरदारांच्या सल्ल्यावरून राणीने किल्ला सोडून जाणे योग्य राहील असे ठरले. ह्या कठीण प्रसंगी झलकारी बाईंने समजदारीचा, स्वामीभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला, राणीच्या वेषात किल्ल्यात लढत राहिल्या, आपल्या सैनिकांचे मनोबल खच्ची नाही होऊ दिले. इंग्रजांना कळलेच नाही की राणी नाहीये. राणी ला मार्गक्रमणासाठी वेळ मिळाला. झलकरीने बाईंनी फक्त राणीचे वस्त्रच परिधान नव्हते केले तर त्यांचा आत्माही राणीचाच होता असा भास होत होता.

  • मुंबईकर शाॅक्स, पुणेकर राॅक्स

    टि सी ला आलेला पाहून पुणेकर जोशी काका उभे राहिले आणि आपलं तिकीट शोधू लागले .
    पहिले शर्ट ची खिसे तपासली, मग पँट ची खिसे तपासली, मग बनियन चा पण खिसा तपासला ...
    मग एका मुंबईकर ने विचारले,"काय शोधताय?"
    जोशी काका,"तिकीट ...!"
    मुंबईकर हसून,"मग तुमच्या तोंडात काय आहे ?"
    जोशी काका,"अरेच्चा, हो की ...!"
    ते अर्धवट भिजलेलं तिकीट कसंबसं तपासून टि सी गेला ...!
    मग काय मुंबईकरांनी पुणेकर जोशी काकाच्या विसरभोळे पणाची टिंगल उडवली ...!
    शेवटी जोशी काका त्यांना मुर्खात काढत म्हणाले,"ते तिकीट कालचं होतं . मी मुद्दामून तोंडात धरुन त्यावरची तारीख उडवली .
    तुम्हा मुंबईकरांना नाही कळायचं ...!"

    मुंबईकर शाॅक्स ...!
    पुणेकर राॅक्स ...!

  • थांब विज्ञाना, नको लावूस शोध

    बागेतील तारका- थांबव, विज्ञाना तुझे शोध

  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

    शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच!

  • आमचं नव्हे, त्यांचं !

    नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका मित्राला फोन केला. शुभेच्छा दिल्यानंतर सगळे म्हणतात तसं तो मला ‘सेम टू यू’ म्हणेल या आशेने मी काही क्षण थांबलो. पण कसलं काय, तो अत्यंत त्रासिक आवाजात चिरकला ‘अरे, कोणतं नविन वर्ष? कोणाचं नविन वर्ष? हे त्या इंग्रजांच्या बाळांचं नववर्ष आहे, आपलं नाही. आपलं नववर्ष सुरु झालं की शुभेच्छा दे.’ असं म्हणून त्याने रिसीव्हर आदळला. मी त्याचा कडवट झालेला चेहरा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. माणसं काही कारण नसताना अशी सतत वैफल्यग्रस्त असल्यासारखी का वागतात? त्यांना आनंदाची अॅलर्जी असते का? थोडंही नाउमेद न होता 'मित्र' नावाच्या आणखी एका प्राण्याला फोन लावला. शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद देण्याचं सौजन्य त्याने दाखवलं खरं, पण त्याचबरोबर ‘आम्ही एक जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्याला नववर्षाचा आनंद मनवणार आहोत’ हे सांगायला तो विसरला नाही. मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, पण ‘हे नववर्ष आमचं नव्हे’ हे ऐकून माझा उत्साह हळूहळू मावळू लागला.

    आम्ही असे का वागतो? आयुष्याच्या क्षणभंगूरतेची यथार्थ जाणीव असल्यामुळे स्वतःच्या विवंचना विसरण्यासाठी एकत्र येऊन चार घटका आनंद मनविण्यासाठी मुद्दाम घडवून आणल्या जाण्याऱ्या विविध आनंदोत्सवांना धर्म आणि जातींमध्ये बुडवून काढण्याची आम्हाला का इच्छा होते? एका धर्माचे लोक आनंद मनवत असताना दुसऱ्या धर्माच्या लोकांनी त्यावेळी आनंद मनवू नये असं कोणत्या धर्मग्रंथात लिहिलं आहे? एखाद्या महोत्सवाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटण्यासाठी तो महोत्सव आधी ‘आपला’ असायला पाहिजे ह्यालाच सर्वधर्मसमभाव म्हणायचं का? आनंद वाटण्याऐवजी आम्ही आनंदोत्सवांना वेगवेगळ्या प्रकारची लेबलं लावून त्यांच्या वाटण्या करतो आणि त्यानंतर आनंदी राहायचं की दिवसभर आंबट चेहरा करून बसायचं हे ठरवतो. ज्यांना भूतकाळात खितपत पडायची सवय नसते त्यांच्यासाठी आयुष्यातला प्रत्येकच दिवस हा नववर्षाचा पहिला दिवस असतो !

    केवळ ‘आमच्या’ नव्हे आणि ‘त्यांच्याही’ नव्हे तर ‘आम्हा सर्वांच्या’ नववर्षानिमित्त सर्व मित्र-मैत्रिणींना मन:पूर्वक शुभेच्छा !

    -- श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • काळी गाय आणि भोरी म्हस

    पकल्या सावताची बायल, म्हणजे भागिरथी काकूची सून , लगिन झाल्यार आट वर्षानी गावाक ईली.. कारण तसा नाजूकच..... पोरग्या काय नाय पदरात... आता जिनच्या पँटीक पदर खयलो तो ईचारू नको.... तशि कर्तबगार सुन... 22 व्या माऴ्यारल्या मुंबयच्या हापिसातली सायबिन... 50 हजार म्हयन्याचो पगार... मुंबयतल्या सगळ्या डाक्टरांची भर करुन झाल्यार नाईलाज म्हणान म्हयनोभर सासयेच्या सांगण्यान घोवाक घेवन ईली.......

    ईल्याबरोबर काकून तंबी दिल्यान.... पाच दिवस सकाळीच गोठ्यात जावन गायची पूजा कर, पाय धू तिचे... आणि थयच दोन चमचे गोमुत्र घे आणी मग घरात ये.. सुनेन आयकल्यान सासयेचा..... नाईलाज बाकी काय ... रोज सांगल्याप्रमाणे केल्यान... वर सोनपापडेचो नेवेद्य दाखवल्यान.... आणि लवकर रिझट मिळाक व्हयो म्हणान रोज थयच धऱुन पेलोभर गोमुत्र पिल्यान.. असा पाच दिवस केल्यान....

    शेवटच्या दिवशी काकूक संशय ईलो.... काय तरी भानगड हा....... म्हणान ईचारल्यान... गे सुने गाय आपली वायच भुजकट हा...

    तुझ्याकडसून पुजा करून घेतल्यान कशी? सुनेन सांगल्यान... अहो ती काऴी गाय जवळ येऊच देत नव्हती.. पण पांढरी गाय खुप शांत आहे.. सेवा करून घेते.. मी पाच दिवस तिचे पेलाभर गोमुत्र पिते..... पण खरचं मला मुल होईल ना हो?

    काकून कपाळावर हात मारल्यान आणि थयच खऴ्यात बसली........ म्हणता कशी.... नक्की माका नातू जातलो..... कारण वाड्यात काळी गाय आणि भोरी म्हस आसा गे माझ्या आवशी.......

    बापूर्झा
    डॉ. बापू भोगटे....

  • तुझसा’ नहीं देखा..

    शम्मी कपूर व अमिताचा ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट एकदा पाहून कधीच समाधान होत नाही.. त्यातील ‘आए है दूर से..’, ‘छुपने वाले सामने आ..’, ‘सिरपर टोपी लाल..’, ‘देखो कसम से..’ व टायटल साॅंग गाण्यांसाठी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.. नासिर हुसेन यांचं दिग्दर्शनही अप्रतिम होतं. या चित्रपटाच्या अफाट यशामुळे शम्मी कपूर व अमिताचंही सिनेसृष्टीत चौफेर नाव झालं..

  • भेटवावेसे वाटले म्हणून (उत्तरार्ध)

    शायर हसन नईम म्हणतो ,
    एक शायर था कि जागा रात भर
    सारे अहमक़ सो गये आराम से।
    मी गेल्यावर्षी वर्ल्डकपचा "भारत-पाकिस्तान" सामना पहायला मँचेस्टरला गेलो असतानाची गोष्ट. सामन्याच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता ( अर्थात इंग्लंडच्या ) माझा मोबाईल खणाणला.
    "सामंतसाहेब , गुडमॉर्निंग"...

    .......वर्गावर आल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे अशा प्रसन्न आवाजात प्रोफेसर अभिषेक निकम बोलत होते.
    "बाहेर हवा कशी आहे ? मॅच होणार ना ?".........त्याने "यंदा पाऊस पडेल काय ?" असे नंदीबैलाला निरागसपणे विचारणाऱ्या प्रश्नकर्त्याच्या उत्साहात (मला) विचारले. मला खात्री आहे की स्पर्धेच्या आयोजकांनीदेखील इतक्या धुंद गुलाबी पहाटे त्या दिवशीचा वेदर रिपोर्ट घेतलेला नसावा. त्यादिवशीचा ( खिडकीचा पडदा बाजूला करुन ) हवामान अंदाज देणारा निःसंशय मी पहिला वार्ताहर होतो. त्यानंतर दिवसभर तो मला "मनसब" रेस्टोबारमधे ५५ मित्रांबरोबर चाललेल्या सेलिब्रेशनचे व सामन्याचे 'लाइव्ह' अपडेट्स देत होता. जणूकाही तोच स्टेडियमवर होता आणि मी 'होम क्वारंटाईन' होतो. मात्र पाकिस्तानी कर्णधार सर्फराज खानची विकेट गेल्यावर त्याने पाठविलेला "झिंगाट विजयोत्सव व्हिडिओ" इतका स्फोटक होता की तो फुल व्हॉल्यूममधे लावल्यावर माझ्या आजूबाजूचे स्थानिक गुजराथी प्रेक्षक त्या तालावरच नाचायला लागले आणि सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारा के.एल.राहुल आवाज कोठून येतो आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षागारात अचंब्याने पाहू लागला,आणि हे मी मँचेस्टरच्या जिल्हा न्यायालयातदेखिल चंद्रकांत पाटीलांची शपथ घेऊन सांगेन.

    त्याच्या मोदीप्रेमाविषयीदेखिल असेच काहीसे म्हणता येईल. ते प्रेम आंधळे असेल , एकांगी असेल , काहीसे टोकाचे आणि अनाकलनीयही असेल पण ते स्वार्थी , बेगडी आणि दिखाऊ आहे असे त्याच्या विचारधारेचे कट्टर विरोधक असलेले त्याचे जवळचे मित्रदेखील म्हणणार नाहीत. जी गोष्ट करायची ती आत्यंतिक मनापासून , आसुसून आणि स्वतःला पूर्ण झोकून देऊन , हा त्याचा स्थायीभावच आहे. त्याला आता इलाज नाही.२०१९च्या लोकसभेच्या मतमोजणीच्या दिवशी आम्ही जवळजवळ दिवसभर एकत्र होतो. भाजपाने ३०० जागांचा आकडा पार केल्यानंतरचे त्याच्या चेहेऱ्यावरचे बालसुलभ आनंदी भाव आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत.

    इंग्लंडचा शैलीदार डावखुरा फलंदाज "गोल्डनबॉय" डेव्हिड गोवरच्या फलंदाजीचे वर्णन करताना कोणीतरी लिहिले आहे ...."His class is never in doubt , but his ability to stay on the ground is always in dark".
    शायर हमीद अल्मास म्हणतो ,
    वो भी इन्सान है ऐ दिल उसे इल्जा़म न दे
    जाने उसको भी किन आफ़ात ने घेरा होगा।

    मध्यंतरी त्याची काही व्यावसायिक गणितं चुकली असं म्हणतात. मला सांगा, कोणाची चुकत नाहीत ? कागदावर १००% फुलप्रूफ वाटणारे व्यावसायिक हिशेब प्रत्यक्षात व्यवहारात तसेच्या तसे उतरविणारा एकतरी व्यावसायिक सांगा मला. मी खात्रीने सांगतो , एकही नाही. प्रत्येक व्यावसायिकाच्या आयुष्यात ही फेज कधी ना कधी येतेच.एकतर आधी किंवा नंतर. पण सुदैवाने त्यातून तो लवकरच सावरला आणि आम्हाला आमचा जुना प्रोफेसर मित्र परत दिसायला लागला. मध्यंतरी त्याचे त्याच्या विद्यार्थ्यांसोबतचे , येऊरच्या वृद्धाश्रमात तिथल्या वृद्धांबरोबर गातानाचे , हास्यविनोद करतानाचे व्हिडीओज् माझ्या पाहण्यात आले आणि मी निश्चिन्त झालो.

    अभिषेक बदलला नव्हता. बदलणारही नव्हता. त्याला बदलवण्यासाठी नियतीला अजून किमान सात जन्म घ्यावे लागतील.
    आम्हाला तो 'ठाणेवैभव' दैनिकाच्या जाहिरातीच्या पोस्टरवर दिसणारा , मॅरेथॉन धावणारा , विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच देशभक्तीचे व देशसेवेचे बाळकडू पाजणारा , स्वतः लिंबूसरबत पिऊन मित्रांसाठी थीम पार्ट्यांचे आयोजन करणारा , जिममधे सकाळी ७.४५ वाजता केक आणून मित्रांचे वाढदिवस साजरे करणारा व त्यांच्यासाठी पावणेदोन मिनिटांचे व्हिडीओज् बनविणारा ,देओल खानदानावर जिवापाड प्रेम करणारा , हिरीरीने मोदी प्रशासनाची खिंड लढविणारा आणि क्रिकेट व तंदुरुस्ती यांना आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग मानणारा प्रोफेसर अभिषेक निकम खूप खूप प्यारा आहे.
    जीवनधर्माला असोशीने भिडणाऱ्या आमच्या या जिंदादिल मित्राने २५ एप्रिलला वयाची चाळीशी पार केली. त्याला तुम्हाला 'भेटवावेसे' वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.

    वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, अंगठीतला खडा लाभावा तसा अभिषेकसारखा मित्र लाभण्याचे भाग्य आयुष्यात किती जणांच्या वाट्याला येते ?
    शायर दुष्यंत कुमार म्हणतो ,
    सिर्फ शायर देखता है क़हक़हों की अस्लियत
    हर किसी के पास तो ऐसी नज़र होगी नही ।

    संदीप सामंत.
    ९८२०५२४५१०
    २८/०४/२०२०.