(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रुग्ण स्वभाव दर्शन

    अभ्यासामध्ये आपल्या परीक्षेच्या वेळी कधी अभ्यास केला नसेल परंतु डॉक्टर कडे जाताना आपल्या आजाराचा इंटरनेट वरती सखोल अभ्यास करून आलेले महा विद्वान पेशंट….

  • बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

    पुणे शहर म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येते ती “पेशवाई”. तसं पहावयास गेलो तर पुणे ही ‘विद्यानगरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा वैभवसंपन्न पुणे शहरात आणखीन ही काही वास्तू आहेत ज्या पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. अशीच एक वास्तू म्हणजे “बालगंधर्व रंगमंदिर”. पुण्यातील संभाजी पार्क विभागात ही वास्तू दिमाखाने उभी आहे.

  • आकाश सारे झाले मोकळे

    आकाश सारे झाले मोकळे

  • बस तारीख पे तारीख !

    पुरोगामी महाराष्ट्राला सुन्न करून सोडणारी एक बलात्काराची भीषण घटना नुकतीच महाराष्ट्रात घडली .अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्दी गावात एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी पाशवी अत्याचार केले गेले. शरीराला पिडा देण्यापासून तर सरळ जीव घेण्यापर्यंतच्या पिशाच्च वृत्तीचा परिचय आला.घटनेनंतर कोपर्दी व आसपासच्या लोकांनी तीव्र निदर्शने केली .संप झाला.बंद झाले.सम्पूर्ण महाराष्ट्रीय समाजाला तीव्र वेदना झाल्या .त्याचे पडसाद विधानसभा हादरवन्या पर्यंत उमटले.या घटनेचं गांभीर्य इतके घेतले गेले कि सैराट चित्रपटाला दोष देण्यापर्यंत काही लोकांच्या शब्दांनी मजल मारली .

    मूळ प्रश्न दूरच राहिला तर काही सेकुलर राजकारणी लोक जातीय टुरिझम करण्यात उतरले .एवढे क्रूर काम होऊनही राज्याचे मुख्यमंत्री केवळ आणि केवळ फाशीच मागणीच करू शकतात.राज्य्प्रमुखाला या प्रशासनिक व्यवस्थांमध्ये फक्त एवढेच अधिकार का आहेत? केवढे हे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे ?
    स्त्रीच्या जर केसालाही धक्का कोणी लावला तर त्याला टकमक टोकावरून दरीत फेकणारा ,सावित्रीला हात लावला म्हणून सैनिकाचे डोळे फोडणारा महाराष्ट्र कुठे आहे??भिवंडीच्या सुलतानी सुभेदाराची सून हाती आल्यावर तिला आईसाहेब संबोधणारे आमचे महाराज व तो काळ. मोगालादि शत्रूंच्या बायका हाती लागल्यावरही त्यांना साडीचोळी करणाऱ्या आमच्या सईबाई राणीसाहेब व त्यांची ती शिकवण .शिवाजी ओठीच का उरलाय फक्त? शिवाजी आपल्या व्यवस्था तन्त्रात का नाही?

    निर्भय कांडानंतर काय झाले? कोणता न्याय मिळाला? वयाच्या १८ वर्षे पूर्ण व्हायला फक्त २७ दिवस कमी होते म्हणून निर्भायाच्या बलात्कार्याला बालगुन्हेगार मानले गेले .३ वर्षे बालसुधारगृहात ठेवले गेले व नंतर सुटका झाली .अशा नराधमांसाठी जुवेनाईल जस्टीस act आहे देशात .अशा गुन्हेगारांना न्यायपालिका बालक किंवा लहान मुले कशी काय मानते? सर्वात जास्त अन्याय तर अरुणा शानबाग बरोबर झाला केइएम रुग्णालयातील या परीचारीकेवर सोहनलाल वाल्मिकी नामक उत्तर प्रदेशातील एका वार्ड बॉय ने इतका प्रचंड घातक अत्याचार केला कि अरुणा कोमात गेली आणि तेही थोडे थोडके नव्हे तर तब्बल ४२ वर्षे तिला लाइफ सपोर्ट सिस्टीम वर कोमात जगावे लागले .आणि या नराधमाला शिक्षा फक्त ७ वर्षे .आता तर तो सुखात जगतोय.

    जेव्हाही अशा घटना होतात समाज आंदोलन करतो.विविध संघटनांचे मोर्चे गावापासून शहरापर्यंत काढले जातात . मोठमोठी भाषणे होतात .राजकारणी लोक यात आपले हित साधतात .आश्वासने दिली जातात.निषेध व्यक्त होतो पण पुन्हा काय ??

    जैसे थे.
    आपल्याकडे स्त्री अत्याचाराची मूळ करणे व त्याचे समाधान यावर चर्चाच होत नाही वस्तुतः काय आहे न मेकॉले शिक्षण व्यवस्थेमुळे (बि)घडलेल्या भारतीयांना आपण कुठल्या व्यवस्थांच्या देशात राहतोय हेच ठाऊक नसते .हि न्यायव्यवस्था एवढी अन्याय कारक का झालीय आपल्या भारतीयांच्या समस्यांसाठी त्याचा व्यवस्थित उलगडा व्हावा म्हणूनच हा लेखणी प्रपंच .

    दामिनी चित्रपटातील सनी देओल चा डायलॉग तारीख पे तारीख बस तारीख पे तारीख हि या देशातल्या न्याय व्यवस्थेची खरी ओळख .इंग्रज भारतात १४ व्या शतकातच आले पण खरे इंग्रजी राज्य हे १८६१ नंतर म्हणजेच १८५७ चे स्वातंत्र्य समर संपल्यावरच आले.लुटायला सोपे जावे म्हणून इंग्रजांनी देशाला युनिफाइड स्वरूप दिले . आणि अर्थातच भारत लुटायचा म्हणजे एक केंद्रीकृत लुटीन्ग सिस्टीम देशभर असायलाच हवी न ?म्हणूनच मित्रांनो शिक्षण न्याय taxation पर्यंतच्या सर्व व्यवस्था ब्रिटिशांनी बनवल्या .गवर्नर जनरल लॉर्ड मेकॉलेने त्या आधीच भारतीय शिक्षण व्यवस्था उध्वस्थ केली होती .व त्याजागी गुलाम कारकून जन्माला घालणारी मेकॉले शिक्षण व्यवस्था जन्माला घालून तो न्याय प्रणालीकडे वळला .१८६१ ला इंग्रजांनी देल्ही पोलीस act बनवला ज्याच्या मसुद्यामध्ये असे लिहिले आहे कि कॉप्स आर एजेन्टस ऑफ गवरमेंट and नॉट फॉर पीपल्स केअर” म्हणजे पोलीस सरकारचे हस्तक म्हणून काम करतील जनतेसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही किरण बेदिजींनी कित्येक वेळा अनेक वृत्त वाहिन्यांवर याबद्दल तीव्र विरोध प्रकट केलाय .ब्रिटीश तंत्राने या देशावर अधिकार गाजवायला हि न्यायप्रणाली अस्तित्वात आणली गेली
    .या व्यवस्थेला घडवायला ब्रिटीशांचे गवर्नर जनरल ,उच्चपदस्थ अधिकारी विविध आयसीएस अधिकारी तसेच हाउस of कॉमनस म्हणजेच इंग्लंडच्या संसदेतील खासदार कामाला लागले या सर्व कामात लॉर्ड मेकॉले तर जातीने लक्ष देऊ लागला होता .तेव्हा देशावर ब्रिटीश इस्ट india कंपनीचे राज्य होते.त्या कंपनीला देशातील सर्व कायदे व्यवस्था हाउस of कॉमन्स मधूनच पारित करून घ्यावे लागत असे भारतीय न्याय पालिका कशी असेल व ती कोणत्या प्रकारे व नियमांद्वारे न्यायदान करेल यासाठी एक मसुदा तयार करण्यात आला. तो मसुदा आज इंडिअन पेनल कोड अथवा भारतीय दंड विधान (भादंवि) या नावाने ओळखला जातो .हा ipc चा ड्राफ्ट जेव्हा मेकॉले ने अनुमोदन मागून पारित करायला इंग्लंडच्या संसदेमध्ये ठेवला .तेव्हा तत्कालीन इंग्रज खासदार व जागतिक ख्यातीचे कायदेतज्ञ सर एडमंड विर्क यांनी पुढील तीप्पानिद्वाते याबद्दलचे आपले अभिमत व्यक्त केले होते ते खाली देत आहोत .

    ‘कोणत्याही समृद्ध आणि प्रबुद्ध परंपरा , जीवनमान पद्धती असलेल्या सुसंस्कृत समाजाला व राष्ट्राला सरकारी अत्याचारांनी दारिद्र बनवाण्याकर्ता ,चरित्र भ्रष्ट होऊन भित्रे व कर्मदरिद्र ’ ,तसेच दुष्टांचे पक्षधर बनवून त्या समाजाच्या आतल्या मानवी भावनात्मक सद्गुणांचा सत्यांश करण्यासाठी यापेक्षा अधिक प्रभावी कायदे पुस्तिका लिहलीच जाऊ शकत नाही .आता अनेक वर्षापर्यंत भारत ब्रिटीशांच्या या अन्याय्तन्त्राच्या पिंजर्यात बंद,पंख छाटलेल्या पक्ष्यासारख फडफडत राहील शाब्बास मेकॉले तुझ्या या कामासाठी .वाह वाह क्या बात है !” -एडमंड विर्क

    सोप्या शब्दात सांगायचे असल्यात भारतीय न्याय्तन्त्र हे हजारो अपराधी सुटले तरी चालेल पण एक निरपराधी दंडित होऊ नये या तत्वावर चालते आहे.किंबहुना सर्व अपराधी हे निर्दोशाच कसे आहेत हेच काय ते सिद्ध करण्याची हि व्यवस्था बनलीय .तारखांवर तार्खांमुळे उशिर होतो.यावेळेत आरोपीला पळण्याचा मार्ग सापडतो .खोटे पूर्वे सादर करून राजकीय दबावतंत्र वापरून न्यायलाच खिळ घातली जाते .
    सर्वेक्षणे व काही न्यायप्रिय कायदे तज्ञानुसार भारतीय न्यायपालिका हि ६% कान्विक्शन रेट असणारी व्यवस्था झालीय.म्हणजेच १०० खटल्यांपैकी फक्त ६ खटले निकाली निघतात.शिक्षा घोषित होते पण शिक्षेची अंमलबजावणी मात्र सरकारच्या हाती असते .आणि आजकालची सरकारे तर नागपूर भुसावळ पसेंजर गाडीपेक्षाही आळशी आहेत .आमची गाडीतरी बरोबर एक वाजता शेगावला पोचवते पण हि सरकारे सुभानाल्लाह!

    भारतीयांवर हे इंग्रजी व्यवस्थांचे जोखड इतक्या खोलवर रुजवले गेले कि इंग्रजांच्या वेळचा वकील व न्याय्मुर्तीन्साठीचा तो काळा कोट देखील बदलला गेला नाही त्यासाठीदेखील इथेच लढावे लागले तेव्हा कुठे त्याचे बंधन काढले

    गेले .

    खरे स्वातंत्र्य हे अधुरे आहे का ? आजही इंग्रजांच्या संसदेतल्या व्यवस्थांचे जोखड धरून का जगतीय हि भारतमाता ? जर संविधानाने देशाला प्रजासत्ताक दिले तर मग हे ब्रिटीशकालीन सर्वच्या सर्व जसेच्या तसे कसे सुरु आहे .? डॉ आंबेडकरांनी जर ३ वर्षे मेहनत घेऊन ह्या व्यवस्था बनवल्या तर मग १९४८ ला नाथुरामला फाशी कोणत्या न्यायपालीकेद्वारे देण्यात आली? नव्या व्यवस्था का बनवल्या गेल्या नाहीत? प्रजसत्ताक म्हणने हे व्यर्थ आहे का? सावरकर, भगत सिंग सुभाश्चन्द्रांचे हे बलिदान व्यर्थ गेले का ? नेहरू व mountbatan मध्ये १४ ऑगस्ट च्या रात्री जो करार झाला तो संपूर्ण स्वातंत्र्याचा नसून फक्त ट्रान्स्फर of पावर चा करार आहे का?

    गेल्या दोन दशकात भारतीय जनमानसाने सर्वच प्रकारच्या आधुनिक क्रांतीला समर्थन केले आहे .उदारीकरण जागतिकीकरण एलेक्ट्रोनिक क्रांती सोशल मिडिया मिसाईल्स आदींच्या क्षेत्रात परिवर्तन झाले.पत्र ते मोबाईल ,साडी ते जीन्स ,धोतर ते trauser वृत्तपत्र ते ई-न्यूज पेपर गणपती बाप्पात ते लॉर्ड गणेशा वगरे सर्व बदल स्वीकारले किंवा केले गेलेच न? बँकांमध्ये कॉम्पुटर ,निवडणुकीमध्ये एलेक्ट्रीनिक वोटिंग मशीन पर्यंत आधुनिकता बदल झालेच नां ?

    भाषा भूषा भोजन देखील इतक्या एक्स्ट्रीम लेवेल वर बदलल्या गेलेच नां? मग हि न्यायव्यवस्था का नाही? ती का पावणेदोनशे वर्षे जुनीच,गरिबाला न परवडणारी,पीडितांना छळणारी,न्यायला तारखांवर तारीख देत उशीर करत सतत न्यायला हुलकावणी देणारी हि अन्यायव्यवस्था ?आंधळया न्यायदेवतेची उपासक हि न्यायपालिका? हि का बदलली जाऊ नये ?

    शिवछ्त्र्पतींपासून काय शिकावे ? शिवाजी म्हजे न्यायाची तत्परता अन्यायाचा पूर्ण बिमोड .शिवाजी हे जगण्याचे व जगवण्याचे अर्थव्यवस्थेपासून यतर भाषाशुद्धी पर्यंतचे एक व्यवस्था तंत्रही आहे हा साधा विचार देखील आज ७ दशके होऊनही राजकारणाला समाजाला अद्यापही का स्पर्शला नाही ? देशातील शेकडो न्यायमूर्ती आणि वकिलांनी हि ज्युडीशिअरी बदलण्याची मागणी केली आहे .व्यवस्था स्वतः बदलास अनुकूल आहे पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव अडसर झालाय?

    गुंडागर्दी व बलात्कारासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुल्लायम सिंग यादव एका कर्यक्रमात म्हणाले होते कि” बलात्कारियो को फासी नही होनी चाहिये बच्चे है हमारे छोटी मोटी गलतिया हो जाती है उनसे ,,इसका मतलब ये थोडी है कि आप उनको फासी दे दो ”

    असे नालायक निर्लज्ज नतद्रष्ट राजकारणी लोकच या भ्रष्टाचाराचे मूळ कारण आहेत .

    काही विचारक व मित्रांची याबद्दलची मते –

    १.सिस्रो नावाचे एक लेखक आपल्या वेजिटेबल vendar या पुस्तकात लिहितात कि कानून एक गधा है जीसपर बुद्धिमान चतुर लोग सवारी करते है और सामान्य लोग उसकी दुलत्ती खाते है .

    २.बनारसचे विख्यात साहित्य मनीशी श्री भारातेंदू हरिश्चंद्र यांनी भारताला अंधेर नगरिका ताजीराते शौहार उद्बोधून व्यंग नाटक लिहिले होते.ते उत्तर भारतात फार गाजले होते तेव्हा त्यावर नेहरूंनी बंदी आणली होती.

    ३.ये इंग्लीश law है इसे पुरी तरहसे बदल देना चाहिये तभ हि सच्चा न्याय आयेगा.

    –advocate प्रमिला नेसरगी कर्नाटक उच्च न्यायालय .

    ४.युरोप व अमेरिका खंडात न्यायपालिका अगदी उत्तम व त्वरित शिक्षा देणाऱ्या आहेत .भारताने त्या देशांकडून ज्युडीशिअल पोलीसीस शिकाव्या हेच खरे ग्लोबलायझेशन.

    -dr.प्रज्ञा देशपांडे लेखिका, नागपूर.

    ५.महिलान्माधीला वाढत्या अत्याचाराच्या प्रवृत्तीस या ज्युडीशिअरि मधल्या loopholes मुळेच बल मिळत आहे कडक शासन ण झाल्यामुळेच गुन्हेगारी वाढतीय .दिवसागणिक हा प्रश्न गंभीर होत चाललाय - वृषाली मोहिते बदलापूर ,मुंबई

    ६.आंपण आता बुलेट ट्रेन व दुरांतोच्या faaast युगात वावरतोय न मग हि न्यायव्यवस्था पसेंजर पेक्षाही उशिराची का ? सरकारी व्यवस्था आता update करण्याची गरज निर्माण झालीय.

    - श्रद्धा मराठे ,खामगाव.

    ७.जलदगती न्यायालयेसुद्धा ५-१० वर्षे घेतायत न्यायनिवाडा करायला जनसहभागातून सर्वत्र पोचणारी खर्च नसलेली व lacuna नसलेली नवीन न्यायपालिका तयार व्हायला हवीय

    – अंकित कलकोटवार ,नागपूर

    ८.भारताच्या संसदेत मध्यम वर्गीय युवा खासदारांचा प्रवेश झाला पाहिजे .new generation नक्कीच सिस्टीम स्पीड अप आणि करेक्ट करे

    –अमर अणे , पत्रकार नागपूर

    ९.शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये हे पूर्वीचे बिरूद आता बदलायला पाहिजे .व्यवस्था परिवर्तनच भारताचा अभ्युदय करू शकते .-सत्यम मौन्देकर ,नागपूर

    १०.मराठा मोर्च्याच्या आंदोलकांनी शिवकालीन न्यायप्रणालीची मागणी करावी जेणेकरून मराठाच काय तर इतर सर्व महिलांना खरा न्याय मिळेल गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसेल .जवळपास ६०% आमदार व खासदार मराठा आहेत शिवाय पवारसाहेब मोदींचे गुरु आहेत मग बदलून टाका हि ब्रिटीश व्यवस्था .

    -- avinash bhosale

  • आश्वासक जयजयवंती

    मुळात भारतीय संगीत हे नेहमी(च) शांतीचा प्रसार करणारे, भक्तिमार्गाकडे नेणारे तसेच मनाचे उन्नयन करणारे आहे. या संगीतात, उथळ वृत्ती, भ्रमर वृत्ती याचा समावेश जवळपास नाही आणि याचा परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे नेहमीच, लोकानुनयाचा मार्ग न स्वीकारता, काहीसे खडतर पण चिरस्थायी परिणाम देणारे संगीत झाले. खरतर, पहिल्याप्रथम दर्शनी रागदारी संगीत आवडेल, असे काही या संगीतात लगेच आढळत नाही. त्यासाठी, सतत ऐकण्याची सवय ठेवावी लागते. अर्थात, एकदा का या संगीताची गोडी लागली (सुरांची "आस" लागली) की मग, खऱ्याअर्थाने भारतीय संगीताचा आनंद घेता येतो.
    आपण सगळेच दिवसभर सतत, अविश्रांतपणे कामात अडकलेले असतो. सतत धावपळ, डोक्यावर "टेंशन" आणि कसेही करून आयुष्य पुढे रेटायचे किंवा अधिक सुखकर बनवायचे, ह्याच ध्यासाने पछाडलेले असतो. अगदी जेवणासारखी प्राथमिक बाब देखील, आपण "उरकून" टाकतो!! मनाला विश्रांती म्हणून द्यायला तयार नसतो आणि अशा वेळेस, रात्रीची जेवणे आटोपून, मनाला किंचित विसावा मिळावा म्हणून घराच्या एका कोपऱ्यात निवांत बसण्याचा प्रयत्न करीत असतो. अशाच वेळी, कानावर "जयजयवंती" रागाचे सूर यावेत आणि मन हलके होऊन, पिसाप्रमाणे तरंगायला लागते. सुरांची ही जादू खरच विलक्षण म्हणायला हवी.
    दोन्ही गंधार(कोमल आणि शुद्ध) तसेच दोन्ही निषाद, यांच्या सहाय्याने सगळ्या सुरांना सामावून घेणारा हा "संपूर्ण/संपूर्ण" जातीचा राग फार विलक्षण गारुड मनावर टाकतो. या रागातील हे जे दोन "कोमल" स्वर आहेत, तेच आपल्या पाठीवर आश्वासकतेचा हात फिरवतात. हा सगळा राग अतिशय मृदू, कोमल स्वरांनीच वेढून टाकलेला आहे. तसे बघितल्यास, या रागात, रागाचे म्हणून जे सगळे "अलंकार" आहेत, त्याचा संपूर्ण आढळ होतो पण, एकूणच प्रकृती ही आश्वासकतेकडे झुकणारी, एखादा मित्राने पाठीवर हात टाकून, विश्रब्ध मैत्रीचा विश्वास दर्शविणारी!!
    मनाला विसावा देण्याच्या मन:स्थितीची ओळख आपल्याला पंडित हरिप्रसाद चौरसिया, यांच्या बासरी वादनातून अनुभवता येते.
    मृदुतेचा परिपूर्ण अनुभव देणारे हे वादन. सुरवातीपासून, नेहमीच्या धाटणीने "ठाय" लयीत सुरु झाले आहे. सुरांच्या पहिल्याच आवर्तनात, आपल्याला "कोमल" गंधाराची ओळख पटवून देते. रिषभ सुरावरून दोन्ही गंधारावर जशी लय झुकते, तिथे आपल्या जयजयवंती रागाची खूण पटते. इथे आपल्याला प्रत्येक सूर आणि त्या सुराच्या चलनाचा आनंद घेता येतो. प्रत्येक सूर कसा "अवतरतो" आणि आपले अवतरणे सिद्ध करताना, आपल्या बरोबर इतर सुरांना कसा सोबतीने घेऊन येतो, हेच ऐकण्यासारखे आहे.
    ही रचना आपल्या ऐकताना, आपल्याला सहज समजून घेता येईल. मी मुद्दामून अतिशय संथ लयीत चालणारी रचना घेतली आहे जेणेकरून, आपल्याला रागातील स्वरांचे स्थान, त्यांचे विहरणे आणि परत पुन्हा घरट्यात परतणे, आपल्याला किती समृद्ध करून जाते, हे सहज समजून घेत येईल. सगळी रचना आलापी आणि शेवटाला द्रुत लयीत गेलेली आहे परंतु जर का आलापी बारकाईने (बारकाईने ऐकणे, ही तर भारतीय संगीताची मुलभूत "अट" आहे!!) ऐकली तर पुढील द्रुत लयीतील रचना ऐकणे आणि त्याचा मन:पूत आनंद घेणे, हा विश्रब्ध आनंदाचा भाग ठरेल. आणखी एक मजा या रचनेत आहे, रचना जरी द्रुत लयीत शिरली असली तरी, केवळ द्रुत लयीत आहे म्हणून तानांचा पाउस नाही तर आलापीमध्ये स्वरांचा जो विस्तार केलेला आहे, तोच "तोंडवळा" कायम ठेऊन, फक्त त्रितालात रचना बांधलेली आहे, त्यामुळे आधीच केलेली आलापी अधिक भरीव आणि परिपूर्ण होते.
    गुलाम अली साहेबांची "दोस्त बन कर भी नही साथ निभानेवाला" ही या रागाची ओळख वेगळ्या पद्धतीने करून देणारी गझल आहे. गझल गायकीत, ठुमरी रंगाचा अत्यंत यशस्वी वापर करून तशी गायकी रुजवणारा हा गायक.
    "दोस्त बनकर भी नहीं साथ निभानेवाला,
    वोही अंदाज है जालीम का जमाने वाला;
    क्या करे कितने मरासिम थे हमारे इस से
    वो जो एक शख्स है मुंह फेर के जाने वाला".
    गायकाचा गळा जर तयार असेल तर तो रागाची ओळख किती चटकन आणि समर्थपणे करून देतो, हे इथे ऐकण्यासारखे आहे. जयजयवंती रागातील कोमल गंधार स्वराचे महत्व आपण वर बघायला मिळते, त्याचाच अत्यंत सुंदर आविष्कार इथे ऐकायला मिळतो. सुरवातीच्या "आकारा"नंतर लगेच "नि सा रे" या स्वरावलीनंतर ग(कोमल)" किती अप्रतिम लावला आहे. रिषभ स्वरावरून गंधार स्वरावर येताना, स्वरांत जी "उतरंड" घेतली आहे आहे आणि त्या स्वराचा नाजूक स्वभाव दर्शवला आहे, तेच खरे ऐकण्यासारखे आहे. खरे तर त्यांनी संपूर्ण सप्तक घेतले आहे आणि त्यातून रागाचा आवाका दाखवला आहे आणि हे देखील किती सहज, कसलेही आडंबर न घेता दाखवले आहे. तसे बघितले तर गुलाम अलीची गायकी "अवघड" म्हणावी अशी असते. कुठलीही तान, सरळ रेषेत न घेता, वक्रोक्तीने घ्यायची असा अगदी अट्टाहास वाटावा, इतका आग्रह दिसतो परंतु इथे मात्र रागाची प्रकृती ओळखून, रचना मृदू स्वभावात गायली आहे.
    मन्नाडे हा गायकाने अशीच अफलातून चीज "देख कबीरा रोया" या चित्रपटात गायली आहे. मदन मोहन यांची रचना, जयजयवंती राग आणि मन्नाडे यांचे गायन, तेंव्हा गाणे श्रवणीय झाले नसल्यास काय नवल!!
    "बैरन हो गयी रैन,
    रैना रैना बैरन
    हो गयी रैना
    बैरन हो गयी रैना".
    ध्वनीशास्त्राच्या तंत्रानुसार मन्नाडे इतका अप्रतिम आवाज, हिंदी चित्रपट संगीतात झाला नाही, असे विधान सहज करता येईल. सगळ्या सप्तकात अत्यंत मोकळेपणी फिरणारा गळा, तानेला कुठेही अटकाव नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गाण्याला योग्य तो आवाज पुरवण्याची असामान्य क्षमता, या गायकाच्या गळ्यात होती. दुदैवाने, शास्त्रीय गीते(च) गाऊ शकणारा गायक, असे "लेबल" नावावर चिकटले आणि तीच ओळख अखेरपर्यंत राहिली!!
    अर्थात प्रस्तुत गाणे, सरळ सरळ जयजयवंती रागावर आधारलेले आहे तरीही चित्रपटातील गाणे आहे, याचे भान राखून रचना बांधलेली आहे. संथ, ठाय लयीत झालेली गाण्याची सुरवात, पुढे सहजपणे द्रुत लयीत शिरते पण तरीही गाण्याची "बंदिश" होऊ न देण्याची काळजी, गायक आणि संगीतकाराने घेतलेली आहे. अगदी पहिलीच ओळ, "बैरन हो गयी रैन" गातानाच आपल्या समोर हा राग स्पष्ट उभा राहतो. पुढे गाण्यात, द्रुत लयीतील ताना आहेत, सरगम आहे पण तरीही गाणे चित्रपटातील आहे. या तानांची "जातकुळी" बघितल्यावर, या गायकाच्या श्रेष्ठत्वाची साक्ष पटू शकते.
    श्रीनिवास खळे आणि आशा भोसले यांनी तशी तुलनेने कमी गाणी गायली आहेत परंतु त्यातील प्रत्येक गाणे म्हणजे भावगीतातील वेचक दृष्टी आहे. इथे आता आपण, असेच एक सुंदर भजन या रागावर आधारित आहे. "अजि मी ब्रह्म पाहिले". हेच ते गाणे.
    "अजि मी ब्रह्म पाहिले"
    अगणित सुगरण वर्णिती ज्यासी,
    कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले."
    एकतर खळेसाहेबांच्या रचना या नेहमीच अवघड असतात - ऐकायला श्रवणीय वाटतात परंतु गायला घेतल्यावर त्यातील "अवघड" जागा दिसायला लागतात. रचना गायकी ढंग दाखवणारी आहे आणि अशी रचना गायला मिळाल्यावर, आशा भोसले यांचा गळा काय अप्रतिम खुलून येतो. इथे एक गंमत आहे. या गाण्याची सुरवात जरा बारकाईने ऐकायला घेतली आणि त्याचबरोबर , मी सांगितलेली पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची रचना ऐकायला घेतली तर लगेच, पंडितजींच्या सुरवातीच्या आलापित, या गाण्याच्या चालीचे "मूळ" सापडेल. अर्थ एकच, एकाच रागातील रचना असल्यावर त्यात अशाप्रकारे साद्धर्म्य सापडते.
    गायकी ढंगाची चाल मिळाल्यावर, ही गायिका गळ्यात किती वेगवेगळी "वळणे घेते बघा. सुरवातीची ओळ - "अजि मी ब्रह्म पाहिले" किती वेगवेगळ्या अंगाने गायली आहे आणि प्रत्येक वेळेस समेवर येताना, स्वरिक वाक्यांश किती विलोभनीय पद्धतीने आला आहे. गाण्यात पारंपारिक भजनी ठेका आहे परंतु खरी गंमत चालीच्या बांधणीत आहे. अचूक शब्दोच्चार, शब्दांना जोडून येणाऱ्या हरकती, क्वचित ताना, आणि त्यामुळे त्याच शब्दांना मिळणारा वेगळा अर्थ, या सगळ्या अलंकारांनी हे गाणे अधिक श्रवणीय झाले आहे.
    "मन मोहना बडे झुठे,
    हार के हार नहीं माने".
    चित्रपट "सीमा" - संगीतकार शंकर/जयकिशन यांच्या कारकिर्दीत अढळ स्थान मिळवणारा हा चित्रपट. गाण्याची एकुणात रचना बघितली तार "जयजयवंती" रागाचे लक्षण गीत म्हणून या गाण्याकडे बघता येईल. गाण्याची बांधणी , जणू काही "बंदिश" तयार करीत आहोत अशा धाटणीने केली आहे पण तरीही एक बाब अवश्यमेव मान्य करायलाच लागेल. चाल गायला अतिशय अवघड आहे पण चित्रपटाच्या प्रसंगाला अनुरूप आहे. लताबाईंची गायकी या गाण्यात खुलून आली आहे. गाण्यात, स्वरांच्या "उठावणी" च्या जागा अतिशय कठीण आहेत.
    "ये दिल कि लगी कम क्या होगी
    ये इश्क भला कम क्या होगा
    जब रात है ऐसी मतवाली
    फिर सुबह का आलम क्या होगा".
    "मुघल-ए-आझम" चित्रपटातील ही रचना कव्वाली सदृश आहे पण एका दृष्टीने विराणी देखील म्हणता येईल. आलिशान चित्रपटातील आलिशान रचना असे या गाण्याचे वर्णन करता येईल. रचना म्हणून तशी फार गुंतागुंतीची नाही, प्रसंगी द्रुत लयीत चालणारी रचना, या रागाशी तशी दुरूनच नाते सांगते.
    -- अनिल गोविलकर

  • भ्रष्टाचारविरोधात भाजप नापास

    देशात सध्या भ्रष्टाचारविरोधी वारे वाहत आहेत. ए. राजा, कलमाडी आणि अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाल्याने भ्रष्टाचार्‍यांना तो दडवणे अवघड बनत चालल्याचा इशारा मिळाला. पण, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणार्‍या भाजपने कर्नाटकचे भ्रष्ट मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची पाठराखण केल्याने भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई निर्णायक ठरणार नाही असा संदेश जात आहे.

  • न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!

    न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!
    आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!
    बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!
    यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!
    मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?
    तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!
    शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?
    तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?
    आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?
    हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!
    मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!
    सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!
    आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!
    आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!
    भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!
    पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!
    पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!
    माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?
    कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?
    वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?
    लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?
    आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?
    निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!
    प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!
    शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!
    आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!
    शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!

  • रेडिओचे जादुई दिवस

    आजच्या मिलेनियल जनरेशनला कदाचित हे पटणारच नाही की त्याकाळी आपले आवडते गाणे एखादयाला पुन्हा ऐकायला मिळायला कधी सहा महिने तर कधी वर्षही जायचे. कारण त्याकाळी सर्वसामान्य भारतियांसाठी रेडियो हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. बरं रेडिओमधे सर्व प्रसारण AM Band वरुन असायचे. म्हणजे त्यात खरखर, आवाज जाणे, सिग्नल न मिळणे असे प्रकार व्हायचे. आजच्या FM Band ला ती अडचण नही कारण FM चे तंत्रज्ञान वेगळे आहे..त्यात सिग्नलना अडथळा फार येत नाही. त्यामुळे प्रसारण चांगलं होतं.

  • हे सुरांनो, चंद्र व्हा….

    हे सुरांनो, चंद्र व्हा….

    पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृती जागवणारं 'ययाती देवयानी' या संगीत नाटकातील हे सुरांनो, चंद्र व्हा हे सुरेख पद..

    हे गाणं लिहीलं आहे, मा.वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांनी. तर त्याला संगीत आणि आवाज लाभला आहे, स्वतः पं. जितेंद्र अभिषेकी यांचा. अभिषेकीबुवा हे गाणं गाताना इतके तन्मय होत की ते गाणं थेट मनाला भिडत असे. गाताना त्यांचं उजवं बोट आकाशाकडे जात असे. जणू काही ते सुरांना आज्ञाच देत असत. मुळातच 'हे सुरांनो, चंद्र व्हा' ही कल्पनाच सुचणं दिव्य आहे. अशी अलौकिक कल्पना फक्त कुसुमाग्रजांसारख्या महान कवींनाच सुचू शकते.

    ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा अशा तिघांच्या प्राक्तनाची कहाणी म्हणजे हे नाटक आहे. यातील शर्मिष्ठा हे गाणं म्हणत असते.

    हे सुरांनो, चंद्र व्हा
    चांदण्याचे कोष माझ्या
    प्रियकराला पोचवा ॥
    शर्मिष्ठा खरंतर राजकन्या, पण एका दुर्दैवी घटनेमुळे ती देवयानीची दासी झालेली आहे. त्यावेळी ती ययातीसाठी हे गाणं म्हणत असते.
    वाट एकाकी तमाची
    हरवलेल्या मानसाची
    बरसुनी आकाश सारे
    अमृताने नाहवा ॥

    ती म्हणते, हे सुरांनो, तुम्ही चंद्र होऊन माझ्या प्रियकराच्या आयुष्यात शीतल प्रकाश आणा. त्याच्यापर्यंत चांदण्याचे कोष पोहोचवा. त्याची वाट एकाकी आहे, अंधारमय आहे. तो हरवला आहे, त्याचं चित्त था‍ऱ्यावर नाही. हे सुरांनो, तुम्ही अमृताची बरसात त्याच्यावर करा. त्याला शांत करा. नवा मार्ग दाखवा. अशी विनवणी शर्मिष्ठा करत आहे.

    https://www.youtube.com/watch?v=BZVAfYiqsjk&spfreload=5

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात…

    फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात....-

    ...अनेक दिवस रोजंदारीवर कामाला आलेला, गप्पिष्ट गडीमाणुस "चाललो हो शेट मी आता..." असं म्हणुन निघाला की कसंतरीच होतं.

    ....जुना ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही विकला की त्यासोबत आपण आठवणीही विकतोय असं वाटतं

    ....आपली पोरं महिनाभर त्यांच्या आजोळी निघाली की आपल्यासकट घरही कासावीस होतं..

    ....गणपती विसर्जनाचे वेळी "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणताना कसलासा आवंढा दाटुन येतो..

    .....असंच काहीसं भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी विझलेल्या पणत्या काढतानाही होतं..

    ....अनेक वर्ष आपण ज्यात आनंदाने काढली ती चाळ पाडली की त्या विटामातींचे ढिगारे बघवत नाहीत. उनवारा पावसापासुन आपलं रक्षण करणारे ते पत्रे बघितले की काहीतरी विचित्रच होतं..

    ....आठवडाभर आलेले पाहुणे निघाले की अजुनही त्यांच्या चपला लपवाव्याश्या वाटतात रे...

    .....शाळेच्या रम्य दिवसांपासुन स्मृतीत जपुन ठेवलेलं कोपऱ्यावरचं चिंचेचं झाड पावसाने पडलं की आपल्या आतमध्येही कसलीशी "पडझड" होते...

    .....पहिला पाऊस आला की अजुनही सुट्टी संपल्याचं दु:ख होतं..

    .....ट्रॅफिक सिग्नलला भर दुपारी उपाशीपोटी माय पोराला घेऊन भिक मागताना दिसली की आपल्याच पोटात खड्डा पडतो, तिच्या आणि त्या पोराच्या काळजीने..

    .....बदली झाली म्हणुन गाव सोडुन जाणारे शाळासोबती पुन्हा कधीही भेटण्याची शक्यता नसते ते दु:खंही असंच काहीसं...

    .....अनोळखी लग्नात, कोणाचीही मुलगी सासरी जाताना आपला कंठ कशाला बुवा दाटुन येतो?

    .....

    .....या आणि अशा असंख्य Involvements जपत आपण आयुष्य काढतो...

    .....कसलासा "ओलावा" कायम आपल्या सोबत असतो. बराचसा भिजवुन टाकणारा, पण कुठेतरी आपला एक कोपरा जिवंत ठेवणारा.....!