त्यांनी शे.. खाल्ले म्हणुन आम्ही खाल्ले
स्पर्श तुझा
आत्महत्या करणे म्ह्णजे कित्येकांना हल्ली सर्व त्रासातून मोकळ होण्याचा सोप्पा आणि सरळ मार्ग वाटू लागला आहे. खंर म्हणजे माणसाला आत्मह्त्या करण्यास कारणीभूत ठरावी अशी समस्या या जगात अस्तित्वातच नाही. माणसाची चूकीची विचारसरणीच त्याला आत्मह्त्या करण्यास प्रवृत्त करते. ह्ल्ली प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हलकासा का होईना आत्मह्त्येचा विचार येऊन गेलेला असतोच.
“नाच रे मोरा” ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात ‘चंदाराणी’,’शेपटीवाल्या प्राण्यांची’,’एक कोल्हा बहु भुकेला’,’चांदोबा चांदोबा भागलास का?’ यांसारखी बालगीते किंवा ‘जिंकू किंवा मरू’,’वंद्य वंदे मातरम्’ सारखी स्फूर्तीगीते, तसेच ‘नीज माझ्या पाडसा’ ‘बाळा जो जो रे’ यासारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये ऊगवून सुद्दा मेघापर्यंत पोचलेलं”
शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम.
८ मार्च हा महिला दिवस भारतात मुंबई येथे १९४३ रोजी पहिल्यांदा साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात …..
आपल्या दारासमोर एक गाडी असावी, असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं. त्यासाठी त्याची पैशाची जुळवाजुळव सुरू असते.
गर्भश्रीमंतांसाठी लाख-दोन लाख म्हणजे फुटकळ खर्च. अगदी चणे-फुटाण्यासारखा. त्यामुळे या श्रीमंत वर्गाकडून पैसे कमावण्याचा एक धंदा वाहतूक विभागानेही सुरु केला. त्याला यश येऊन वाहतूक विभागाने मोठी कमाईसुद्धा केली आहे.
त्यामुळेच जेवढ्या पैशांत किमान 20 मध्यमवर्गीयांचे गाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, तेवढे पैसे खर्च करून अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या नव्या ‘रोल्स रॉईस’ गाडीसाठी खास क्रमांक मिळवला. उद्योगजगतातील आपला अव्वल क्रमांक गाडीवरही असावा म्हणून मुकेश अंबानींनी १२ लाख रुपये भरून ‘००१’ असा क्रमांक आपल्या नव्या गाडीला मिळवला. मात्र, त्यांच्या ‘ज्योतिषा’ने हा क्रमांक अशुभ असल्याचे सांगितले. त्यामुळे या क्रमांकापुढे आणखी एक ‘शून्य’ जोडण्यासाठी त्यांनी आणखी १२ लाख मोजले!
जगातील गर्भश्रीमंताच्या यादीतील हमखास भारतीय असलेल्या मुकेश अंबानी यांच्या साडेचार कोटी रुपयांच्या ‘रोल्स रॉईस’साठी हा ‘अंक’प्रपंच झाल्याची माहिती ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली. ‘रोल्स रॉईस’ खरेदी करण्याचे अंबानींचे स्वप्न अलीकडेच पूर्ण झाले. त्या गाडीची नोंदणी 16 एप्रिल रोजी ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली. त्या वेळी 12 लाख रुपये खर्च करून या गाडीसाठी 001 हा क्रमांक घेण्यात आला होता. मात्र, ज्योतिषांनी हा क्रमांक फायदेशीर ठरणार नसल्याचे सांगितल्यावर अंबानी यांनी दुसर्या क्रमांकासाठी प्रयत्न केले. त्यानुसार त्यांना 0001 हा क्रमांक मिळालादेखील, पण त्यासाठी त्यांना आणखी 12 लाख रुपये खर्च करावे लागले. अशा प्रकारे अंबानींना गाडीच्या क्रमांकासाठी 24 लाख रुपये भरावे लागले. ‘0001’ हा क्रमांक अंबानींसाठी कितपत फायदेशीर हे अद्याप उघड व्हायचे आहे. मात्र, अंकज्योतिषाच्या सल्ल्याचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मात्र फायदा झाला आहे. परिवहन कार्यालयांच्या नियमानुसार आवडीचा क्रमांक घेण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली आहे. उपलब्ध व्हीआयपी क्रमांकांची किंमतही ठरवण्यात आली असून त्यासाठी सात हजार रुपयांपासून पुढे 12 लाख रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागते.
गेल्या वर्षभरात एकट्या ताडदेव विभागाने 34978 वाहनांद्वारे या व्हीआयपी क्रमांकांच्या नोंदणीपोटी 25.28 लाख रुपये उत्पन्न मिळवल्याची माहिती ताडदेव कार्यालयातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे यंदा मुकेश अंबानींच्या एकाच गाडीसाठी दोन वेळा रक्कम भरावी लागल्याने यंदा विशेष क्रमांकातून गोळा होणार्या महसुलाची सुरुवात चांगली झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
सायंकाळी आम्ही दुर्गा गार्डन मध्ये नशा करत बसलो असताना बाहेर च्या रस्त्यावर जरा गोंधळ वाटला अनेक तरुण घोळक्याने रस्त्यावर जमले होते , आमच्या लक्षात आले की दुपारीच त्यावेळच्या विद्यमान पंतप्रधान ‘ इंदिरा गांधी ‘ यांच्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच गोळ्या घातल्याची बातमी रेडिओवर प्रसारित झाली होती ,

पूर्वी अंगण मोठे असायचे. त्यात मुलांना खेळण्यासाठी जागा असायची. विशेष म्हणजे अंगणभर पुरेल अशी सावली देणारं मोठं झाडही असायचं. आजीच्या संगतीनं नातवंड झाडाखाली बसुन अनेक गोष्टी ऐकत बसायचे. ते बालपण खरच मोठे गमतीशीर आणि नशीबवान होतं.. असो…
अंगणातून रस्त्यावर आलेल्या आणि नंतर बोन्साय बनुन घराच्या गॅलरीत आलेल्या झाडाची स्वत:ची एक कहाणी असेल का? असू शकते ना? तर अंगणातलं हे झाड बोलू लागलं, म्हणालं, मलापण जरा बोलू द्या, खुप दिवस झाले कुऱ्हाडीचे घाव मुकपणाने सोसुन. आता बोललं पाहिजे….
जमिनीत रुजलेलं माझं बालपण अंकुरलं…. बहरलं… आणि वाढलं… उन, वारा, पाऊस अंगावर झेलतं वाढत होतं, फांद्यांचं फुटणं आणि पानांच बहरणं अनुभवलं होतं मी. जमिनीपासुन जरी उंच होत असलो तरी मुठीत माती घट्ट धरलेली होती. कधी सोडली नाही मातीची साथ. फांद्या फोफावू लागल्या, पानं बहरू लागली… मस्ती होती वाढण्याची.. जगण्याची. अशातच एक दिवस एक चिमणी उडत अलगद येऊन बसली माझ्या खांद्यावर… तिचा चिवचिवाट लोभस वाटू लागला, ऐकत रहावासा वाटू लागला. थोड्यावेळाने तिचा जोडीदारही आला. तसे क्षणभरात दोघेही उडाले.. थोड्या वेळाने दोघे परत आले. दोघांच्या चोचीत काड्या होत्या, घरटे बांधण्यासाठी. माझ्याच एका फांदीवर त्यांनी घरटं बांधलं. त्यांच चिवचिवणं मला रोज ऐकायला मिळेल हे पाहुन मनोमन समाधान वाटलं. चिमणा-चिमणीचा संसार बहरला… फुलला..
माझ्या फांद्यां पसरत होत्या, तशी माझी सावलीही वाढत होती. या सावलीत अनेक प्रकारची माणसे येऊन बसत होती. त्यांच्या गप्पांचे विषयही वेगवेगळे असायचे. काही खलबतेही करत रात्री बसुन माझ्या आडोशाला. काही रचत डाव, माणसांचे पाय ओढण्याचे. मी मात्र सारे जाणुनही गप्प असायचो. सगळं साठवून ठेवलंय आतल्या आत…
पुढे दिवस पालटत गेले, वातावरणात बदल होत गेले. तसे माझ्यातही बदल होऊ लागले. पानगळीचा मोसम सुरू झाला. माझ्याच अंगाचा भाग असलेली पानं मला सोडून जाऊ लागली. ज्यांच्या असण्यानं माझ्या सौदर्यांत भर पडत होती ते मला सोडून जाऊ लागले होते, त्यांचं हिरवेपण जाऊन शुष्कता आली होती. वाऱ्याच्या झुळूकीबरोबर ती माझ्यापासुन दूर जाऊन पडत होती. त्यांच्या दुरावण्याचं दु:ख होतं. पण जुनं गेल्यावरच नव्याला जागा मिळते हे मी जाणत होतो… त्यामुळे हे दु:ख क्षणभराचं होतं. ऋतू बदलला तशी नवी, हवीहवीशी कोवळी पानं पुन्हा माझ्या फांद्यांमधुन उमलू लागली. सृजनाच्या या सोहळ्याचं वर्णन तरी कसे करणार…
हे सारं चांगलं चाललेलं असताना, कुणाची नजर लागली कुणास ठाऊक? खांद्यावर कुऱ्हाडी घेऊन आलेल्या दोघांनी कशाचीही तमा न बाळगता थेट घाव घातला माझ्या हृदयावर… असंख्य वेदनांची त्सुनामी शरीरभर पसरली… वेदनेचा हुंकार पसरला… पण तो कुणाला ऐकू जाणार होता…!
कोण ऐकणार होत…!
दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)
Copyright © 2025 | Marathisrushti