(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • अंदमान – बाराटांग बेट

    अंदमानला जाऊन काही थ्रील अनुभवायचं असेल तर ‘बाराटांग’  (Baratang) बेटाला भेट द्यायलाच हवी. ‘बाराटांग’ हे बेट पोर्ट ब्लेअरच्या उत्तरेला साधारण ११५ किलोमीटर वर आहे. या बेटा कडे जाणारा मार्ग ‘जारवा’ या अंदमान मधील आदिवासी जमातीसाठी राखीव असणाऱ्या घनदाट जंगलातून जातो. पूर्णपणे पोलीस बंदोबस्तात ठराविक वेळेलाच गाड्यांचे ताफे या जंगलातून जाऊ शकतात. मात्र हया बेटावर एका दिवसात जाऊन येणे थोडे हेक्टिक आहे.

  • शेअर्स मार्केट एक चांगली गुंतवणूक

    शेअर्स मार्केट एक चांगली गुंतवणूक

  • तरुण दिग्दर्शकांकडून अपेक्षा

    ‘चित्रपटसृष्टीची १०० वर्षे पूर्ण होताना, मराठी चित्रपटांनी, अनेक पाऊलखुणांनी दखल घ्यायला भाग पाडलं. यातील महत्वपूर्ण विषयांवर तसंच आगामी काळात मराठी सिनेमाच्या स्वरुप आणि बदलांबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक हेमंत देसाई यांनी ‘मराठीसृष्टी.कॉम’ ला दिलेली ही विशेष मुलाखत”..

  • संस्कारांच्या भिंती

    कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही.

  • भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

    भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठीसृष्टी.कॉम तर्फे भावपूर्ण अभिवादन !! पाहूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातील त्यांनीच स्वरबद्ध केलेले एक गीत.

  • सुवर्णयुग

    आज सहज संध्याकाळी मळ्याच्या कडेने गेलो फिरायला .. 100 150 एकर चा भर ऊन्हाळ्यात हिरवागार असलेला ऊन्हाळीभाताचा -वायंगणीचा- मळा...... मन सहज 20 25 वर्ष मागे गेलं.....

    मार्च एप्रिल महिन्यात पुर्ण मळा रिकामी व्हायचा... आणि आमची 7 8 गुराख्यांची टोऴी निघायची मळ्यात, 30 40 गुरे घेऊन... जेव्हा ईतरांच्या जनावरांना कोरडा चारा दुरास्पत असायचा... तेव्हा आमच्या जनावरांना हवा तेवढा हिरवा चारा...... मोकळी सोडलेली पुर्ण दिवस....

    काय दिवसाचा अप्रतिम दिनक्रम होता.... सकाळी 7 ला दिवस उगवायचा आमचा.... 8. ला जनावरे सोडायचं काम... मोकळा वारा प्यायचा... तिथच एक बांधावर प्रचंड रायवळ आंबा होता.. 70 80 तरी आंबे गोळा करायचे... 10 10 तरी प्रत्तेकजण खायचा....

    मग दोन तिन मेंबर फणसाच्या शोधात निघायचे. पिकलेले खायचे... तर कच्चे नदिच्या वाळुत पुरुन ठेवायचे... ऊद्याला...
    एकदिवस चवळीच्या शेंगा भाजायच्या तरी दुसर्यादिवशी भुईमुगाच्या... कुणाच्याही...

    11 वाजल्या नंतर सगळा लवाजमा नदिवर जायचा... मग 2 तास डुबणे नदित.... जनावरांची आंघोऴ... आणि ऱाखण्यांची पण... एकत्रच....
    म्हैशीच्या कानात मासा पकडणे म्हणजे स्पेशालिटी.... अगदी थोड्यांकडेच....

    मग घरी अडीजवाजता.... जेवण झालं की काजीनी खेऴायचं... मुकरीचा मांड खासच....
    गल.... ढोपो...... जुगी..... सप..... फगाम....

    हे शब्दच आता ऐकायला येत नाहीत. . किंवा हद्दपारच झालेत....
    परत ऊन ऊतरलं की म्हशींसोबत मळ्याची वाट... पण आता क्रिकेट बॉल दिसायचा बंद होईस्तोवर क्रिकेट. त्यातही "कटीनी" खेळायचं म्हणजे खासच.. .......

    मग खास बैठक चर्चा अगदि पंतप्रधानांपासुन बाजूच्या वाडीतील मंजिच्या लफड्यापर्यंत...
    काऴोख पडल्यानंतर जनावरं चरवण्याची खास मालवणी स्टाईल.....
    "म्हस कशी मेल्यासारखी एका जाग्यावर चरता"

    मग जनावरं बांधायची....आणि जेवण झालं की अंगणात माटवात ऊघड्यावरच झोपायचं AC झकमारतो असा वारा आणि गारवा.... असा दिनक्रम अगदि मीरगाचो पावस... आणि चढणेचे मासे चढा पर्यंत....

    बापुर्झा
    डॉ. बापू भोगटे

  • वाघाला पहायचंय, चला बोरला …

    वर्धा जिल्हा जसा गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो तसाच तो येथील वन वैविध्यामुळे ओळखला जातो. यात प्रमुख आहे तो बोर अभयारण्य प्रकल्प.बोरला जायचे ठरविले अन तयारीला लागलो.

  • समुद्र सपाटीपासुन १३५०० फूट उंचीवरील शिवस्मारक

    अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…

  • माझी पहिली कविता….मराठीसृष्टीत डोकविताना

    इंटरनेटच्या माध्यमातून आज मराठीतून काहितरी लिहीतांना खूप आनंद होतो आहे. आज सहजचं आपण डोळसपणे पाहिलं तर आपल्या एक लक्षात येइल की कुठेतरी आपण आपलं माणूसपण हरवतोय. समाजातून हळूहळू नितिमुल्य सुध्दा हरवतायत. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होऊ पहातोय. याचाचं सुशिक्षीत मनाला खूप त्रास होतोय. पण आपल्याच षंढपणामूळे आपण काहिच करु शकत नाही याची जाणिव मनाला खूप अस्वस्थ करतेय. आणि मग कधीतरी लिहिलेली कविता तुमच्यापर्यंत पोहचवावीशी वाटतेय….

  • शुभारंभ

    नमस्कार

    मी आयडीबीआय बॅंकेच्या सेवेतून जुन २०१७ मधे निवृत्त झालो आहे. मी मुख्यतः काव्यलेखन करतो. काही वैचारिक लेखन केले आहे.ते मी आपणाबरोबर शेअर करीन. या साईटवर लेखनाची सुरुवात आमची कुलदेवता श्री. मोहीनीराज याचे मी रचलेल्या आरतीने कैलेली आहे.

    कृपया वाचकांनी अभिप्राय व पाठींबा देऊन माझे सारख्या नवोदित साहित्यिकांना ऊर्जा द्यावी ही विनंती.

    सुरेश काळे

    सातारा