पद्मविभूषण हा भारतातील दुसर्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.
दुष्काळ…
निरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे.
मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्यांयशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते.
आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते.
सुरूवातीला मला तिचं या वागण्याचा अर्थं कळायचा नाही.
पण हळू हळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली.
स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं.माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटावळणे शराराने पार केलेली दिसतात.
लहानपणात आईबाबांच्या स्पर्शसान्निध्यातच ऊबदार सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लडिवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती.आजीच्या गोधडीतच नव्हे.,पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते.आत्या,काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता.
वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले.काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा.पण एकंदरीने तेव्हा बाबा,वडीलधारी पुरूष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं.
मुंबईसारख्या शहरात लोकलच्या, बसच्या गर्दीत काही नकोनकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा.बाबांच्या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची.
लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं.जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ,प्रणयी, सहज, अशा सा-या चवी ओळखीच्या झाल्या.हव्याहव्याशा झाल्या.
मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीमस्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करीत हाताशी झोंबणं, लडिवाळपणे कमरेला विळखा घालणं,रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी 'बाजुला व्हा रे,किती अंगचटीला येता?जरा मोकळी राहू द्या ना मला ! '' असंही मी ओरडले त्यांच्यावर.
गंमत म्हणजे हेच मुलगे काॅलेजात जायला लागल्यावर,मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता.तो घरी आला की मला भरतं यायचं.मी त्याला कुशीत ओढायची. पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा. हंहं बास बास असं काही बोलून सुटका करून घ्यायचा.
मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली.
या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते,गळामिठी घालते अशावेळा स्वत:ला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील,मोकळेपणे बोलतील,जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत.त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहीणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मी हून सुनांना जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत,मला त्यांचे लाड करू देतात पण.... जाणवतंच काहीतरी..आतल्या आत...!
माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. ब-याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली,''किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे गं! ''
तिच्या त्या व्याकुळ उद् गारात अर्थांचे डोंगर सामावले होते.मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती,पण स्पर्शाला मोताद होती.आपली कासाविशी मला कदाचित् हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्र दिशी अंजन गेलं.
मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ,वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं, मी अजून भाग्यवंत आहे,मला आई आहे याचा साक्षात्कार झाला.
आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते.तिची जराजर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते.
आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा.आता नाही. मीच मला नेते.
-- वैशाली पंडित
सौजन्य : पराग खोत
(उदय सप्रे यांच्याकडून - WhatsApp द्वारे)
एकदा गौतम बुध्दांकडे काही व्यापारी लोक जातात आणि त्यांना म्हणतात की हे तथागत आम्ही तिर्थयात्रेस जात आहे आम्हाला आशिर्वाद द्या. त्यावेळी बुध्द त्यांच्याकडे एक एक कडुनिंबाची काडी देतात आणि त्यांना सांगतात की, जिथे जिथे तुम्ही तिर्थस्नान कराल तिथे तिथे या कडुनिंबाच्या काडीलासुध्दा आंघोळ घाला आणि शेवटी माझ्याकडे घेवून या. बुध्दांनी सांगीतल्या प्रमाणे स्वता तिर्थस्नान केल्यानंतर काडीला स्नान घातले आणि शेवटी बुध्दांकडे गेले. बुध्दांनी त्यांना विचारले की कशी झाली तिर्थयात्रा त्यावर सर्वांना आपआपला अनुभव सांगीतला आणि सर्वांना खुप चांगले वाटले सर्वजण प्रसन्न वाटले . सर्वांचा अनुभव ऐकल्यांनंतर बुध्दांनी त्यांना ती काडी चावण्यास सांगीतले. सर्वांनी सांगीतल्याप्रमाणे ती काडी चावली तर सर्वांची चेहरे पाहण्या लायक होते .काडीचा कडुपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसु लागला . सर्वांच्या तिरकस नजरा बुध्दांकडे होत्या. त्यावर बुध्दांनी त्यांना सांगीतले की, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तिर्थस्नान केले त्या त्या ठिकाणी या काडीने सुध्दा तिर्थस्नान केले . जसे तुम्ही पापमुक्त झालात तसेच ही काडीसुध्दा पापमुक्त व्हायला पाहीजे होती . तिर्थस्नानचा परिणाम या काडीवर सुध्दा व्हायला पाहीजे होता. त्यामुळे ही काडी गोड व्हायला पाहिजे होती परंतू तसे झाले नाही ती काडी कडुच राहीली . त्याप्रमाणे आपणाला सुध्दा शरीरशुध्दी करायची असेल तर ती आतुन करणे योग्य . बाहेरुन जरी तुम्ही आंघोळ केली तरी आतुन विचारांनी समृध्द होणे गरजेचे. आतुन मनाची शुध्दी करणे गरजेचे आहे. मनाच्या समृध्द विचारांनी केलेली कृती कल्याणकारी असते.
बोध :- मनाची शुध्दी ही वरवर नसुन आतुन करावी लागते
कोकणातील कुणकेश्वर या अत्यंत सुंदर मंदिर परिसरात फिरण्याचा नुकताच योग्य आला. स्वच्छ समुद्र व हिरवागार निसर्ग यांच्या कोंदणामध्ये आपल्या भव्य मंदिरात वसलेला देव श्री कुणकेश्वर !
येथून अगदी जवळच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे खूप छान पर्यटक निवास आहे. कुणकेश्वर मंदिराच्या मागील किनाऱ्यावर एक वैशिष्ठ्य पाहायला मिळाले. देवळाच्या तटबंदीपर्यंत समुद्राच्या लाटा येऊन नंतर ओहोटी लागते. तेव्हा तेथील वाळूमध्ये अशी काही लघुशिल्पे, नैसर्गिकरीत्याच तयार होतात ती पाहताना खूप जुन्या, गाडलेल्या एखाद्या जुन्या संस्कृतीच्या त्या पाऊलखुणाच वाटाव्यात. नंतरच्या भरतीमध्ये पुन्हा हे नैसर्गिक शिल्पकाम वाहून जाते आणि पुढच्या ओहोटीला पुन्हा नव्याने तयार होते ! येथील समुद्रावर पोहणाऱ्यांसाठी जी कळकळीची सूचना लावली आहे ती मात्र प्रत्येकानेच लक्षात ठेवण्यासारखी आहे.
--मकरंद करंदीकर.
बडोदा येथील नीलकंठेश्वर गणपतीची मूर्ती शुभ्र पाषाणाची संगमरवरी असून पुरुषभर उंचीची बसलेली आहे. मूर्ती शुभ्र संगमरवरी पाषाणाची आहे. कानाजवळ मदस्रावाचे चिन्ह म्हणून काळ्या रेघा दिसतात.
ज्योतिषविषयक माहिती व उपाय सांगणार्या या सदरात पत्रिकेतील विविध ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थानांविषयी माहिती दिली जाईल. या भागात पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. हे साधे सोपे उपाय अवलंबून पहा....
सप्तम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रीकेत सप्तम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.
१ - पोवळे धारण करणे.
२ - खोटे बोलु नका.
३ - नोकरांना खुश ठेवा.
४ - गणपतीची उपासना करा.
अष्टम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रीकेत अष्टम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.
१ - गणपतीची उपासना करणे.
२ - मसुरडाळ मंदिरात दान करणे.
३ - विधवा स्त्री ला मदत करणे.व तिचा आशिर्वाद घेणे.
४ - चांदीची अंगठी बोटात घालणे.
नवम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत नवंम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.
१ - लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवणे.
२ - मंगळवारी मारुतीला शेंदुर लावणे.
३ - काळभैरवाची उपासना करणे.
४ - विधवा स्त्रिला मदत करणे.
दशम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत दशम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.
१ - सोने विकु नये
२ - अपंग व्यक्तीला मदत करावी.
३ - घरात दुध उतु जाऊन देवु नये.
४ - निपुत्रीकाची सेवा करा
अकराव्या स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत अकराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय
१ - पांढरा कुत्रा घरात पाळा.
२ - गणपतिची उपासना करा.
३ - वडिलोपार्जीत इस्टेट विकु नये.
४ - रुग्णांना मदत करा.
बाराव्या स्थानातील मंगळ. - ज्यांच्या पत्रिकेत बाराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.
१ - सकाळी उठल्यावर मध खाणे.
२ - पक्षांना धान्य घालणे
३ - १५ दिवस सलग सव्वाई गुळ पाण्यात प्रवाहित करणे.
सौ. निलीमा प्रधान
थोडीशी जादू
रविवारी सकाळपासून घरी मी सुरु केलेला गोंधळ आता तरी थांबेल अशी घरच्या मंडळीना आशा होती , रात्री मित्राने मला ब्राऊन शुगर पाजून तात्पुरता माझा त्रास थांबवला होता व मी शांत पणाने घरी आलो होतो तेव्हा आता सगळे सुरळीत होईल अशी घरच्या लोकांची खात्री होती , मी देखील आता एखादी नोकरी शोधायची असे ठरवले होते मनाशी , सकाळी नेहमी प्रमाणे भाऊ कामावर गेल्यावर आता आई कडून एकदाच शेवटचे पैसे घ्यायचे आणि या पुढे मग ब्राऊन शुगर सोडून द्यायची असा देखील मनाशी विचार करत होतो मी , जे काही दिवसभर घडले होते ते माझ्यासाठी देखील अनपेक्षितच होते , घरचे लोक इतके ताणून धरतील असे मला वाटले नव्हते . जरी सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा मला ब्राऊन शुगर प्यायला मिळाली होती तरी माझे समाधान काही झाले नव्हते कारण स्वतच्या पैश्यांनी शान मध्ये ब्राऊन शुगर विकत घेऊन एकट्याने संडासात बसून , रेडीओवर गाणी ऐकत पिण्यात , आपले दुखः कुरवाळण्यात जी मजा होती ती काही मला मिळाली नव्हती...( जेव्हा एकटे पिणे सुरु होते , तेव्हा एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी पूर्णपणे गेल्याचे समजण्यास हरकत नाही ) .
सकाळी मी लवकरच उठून स्नान वगैरे करून तयार झालो होतो व उगाच टाईमपास म्हणून एक अभ्यासाचे पुस्तक काढून बसलो होतो , घरची सगळी मंडळी उठून आपापल्या कामाला लागली होती , मी कानोसा घेऊन भाऊ कामावर जाण्याची वाट पाहत होतो , सकाळी साधारण पणे तो ९ च्या सुमारास घराबाहेर पडत असे , पण साडेनऊ होत आले तरी तो काही बाहेर जाण्याची चिन्हे दिसेनात , उलट त्याचे सगळे आरामात चालले होते , बहिणीच्या मुलांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती अजूनही कालच्या दहशतीतून बाहेर आलेली नव्हती , लांबूनच माझे निरीक्षण करणे सृरू होते त्यांचे ..
१० वाजून गेले तरी भाऊ काही कामावर जाईना तेव्हा माझ्या ध्यानात आले की याने मुद्दाम माझ्यासाठी सुट्टी घेतली होती , तो मला चांगला ओळखून होता , तुषार आज देखील काहीतरी गडबड करणार हे त्याने हेरले असावे आणि म्हणूनच तो सुट्टी घेऊन घरी थांबला होता , काल इतके रामायण झाल्यावर आता जास्त तमाशा करण्याची माझी इच्छा नव्हती , पण भाऊ घरात केवळ मी नाटके करू नये , पैसे मागू नयेत ,किवा मला पैसे मिळू नयेत म्हणून घरी थांबला याचा मला मनातून राग येत होता , शेवटी मी नवीन अस्त्र बाहेर काढले भावाला म्हणालो ' काल जे काही झाले ते झाले , आता आजपासून मी सगळी व्यसने बंद करणार आहे , पण या पूर्वी मी काही लोकांकडून उधार पैसे घेतले आहेत ते , मला परत करायचे आहेत , मी जर त्यांना पैसे परत केले नाहीत तर ते मला त्रास देतील , तेव्हा कसेही करून मला आज २०० रुपये दे , मी अर्ध्या तासात त्यांचे पैसे परत करून घरी येतो ' भावाला अंदाज होताच याचा तो म्हणाला ' चल मी येतो तुझ्यासोबत , कोणाचे पैसे द्यायचे आहेत ते आपण सोबत जाऊन देऊन टाकू " त्याला माहित होते मी खोटे बोलतोय आणि म्हणून मी पण सोबत येतो हे त्याचे म्हणणे होते ..
लगेच मग मी ' काल पासून तू उगाच माझ्या मागे लागला आहेस , आता मी एव्हढे कबुल करतोय की सगळी व्यसने सोडून देणार आहे , चांगला वागणार आहे , तरी तू विश्वास ठेवायला तयार नाहीस , हवी तर मी शपथ घेतो तू म्हणशील त्याची ' ( खोट्या शपथा घेणे , खोटी वचने देणे यात सारे व्यसनी अगदी हुशार असतात ) भाऊ म्हणाला ' या अशा शपथा पूर्वी अनेक वेळा घेतल्या आहेस तू , माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीय , तू मुकाट्याने घरात बस , ज्या लोकांचे पैसे द्यायचे असतील त्यांची नावे सांग मला हवी तर , मी जाऊन पैसे देतो त्यांना , तुला जर काही त्रास होत असेल तर माझ्या सोबत दवाखान्यात चल , ती गळ्याची जखम बघ अजून ओली आहे ..' काल ब्लेडने गळा कापून घेण्याचे नाटक जरी यशस्वी झाले नव्हते तरी गळ्यावर साधारण १ इंचाची चीर पडली होती त्यावर पातळ खपली धरली होती पण जखम जरा मोठीच होती एकदोन टाके लागले असते डॉक्टर कडे गेलो असतो तर ( अजूनही ती खुण माझ्या गळ्यावर आहे ) . पण मी ' तुझा माझ्यावर विश्वास नाही , मी सुधारू पाहतो आहे तर तू मला सुधारू देत नाहीस वगैरे आरोप सुरु ठेवले ,शेवटी तो वैतागून म्हणाला जाऊ दे तुझ्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही . मी आपला कामावर जातो . तुझे आयुष्य आणि तू काय करायचे ते करा असे म्हणत कामावर जाण्याची तयारी करू लागला . वा ! मला हेच हवे होते , सुमारे १२ वा . तो कामावर जातो म्हणून बाहेर पडला ...
मी आईकडे मोर्चा वळवला पैसे मागण्यासाठी तर ती म्हणाली कालच तुझ्या भावाने माझ्या कडून आणि ताई कडून देखील सगळे पैसे काढून घेतले आहेत . हे भलतेच झाले होते मला वाटले आई खोटे बोलत असावी मी तिची पर्स तपासली , तिच्या पैसे ठेवण्याच्या गुप्त जागा म्हणजे साखरेचा डबा , व इतर दोनचार डबे होते ते ही तपासले पण एकही पैसा नव्हता , मग मी तू शेजारूच्या काकूंकडून उधार पैसे मागुन आण म्हणून तिच्या मागे लागलो पण ती काही कोणाकडे उधार पैसे मागायला जायला तयार होईना म्हणाली आम्ही गरिबीत दिवस काढले पण कधी कोणाकडे हात पसरला नाही आणि तुझ्यासाठी मी कोणाकडेही हात पसरणार नाही , तुला लाज वाटायला हवी असे उधार पैसे मागून आण म्हणायला , यात लाज कसली एकमेकांची मदत करायला हवी हा तर शेजार धर्म आहे वगैरे मी तिला सांगू लागलो . मी स्वैपाक घरात आईशी वाद घालत होतो . बहिण आणि भाचे नुसतेच आमच्याकडे बघत होते घराचे पुढचे दार उघडेच होते , तितक्यात एकदम घरात भाऊ आणि चार पोलीस शिरले आणि त्यांनी मला पकडले ..
आधी पायावर दोन काठ्या लगावल्या आणि बाहेर फरफटत नेले , हे पोलीस रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या चौकीतील होते ते मला ओळखत होते तरीही त्यांनी मला दयामाया न दाखवता बाहेर आणून पायीच चौकीकडे नेणे सुरु केले , गल्लीतील लहान पोरे , बायका हा सगळा तमाशा पाहत होत्या , मी काही विशेष झाले नाही अश्या अविर्भावात उगाच निर्विकार चेहरा ठेवून चाललो होतो . चौकीत गेल्यावर त्यांनी मुख्य पोलीस स्टेशनला फोन लावून मला ताब्यात घेतल्याचे कळवले.
(मनातल्या मनात मी आता भावाला सोडायचा नाही असे ठरवत होतो , काल पासून मी जो घरात तमाशा मांडला होता त्या बद्दल मला लाज वाटण्याऐवजी मी भावाचा सूड कसा घ्यायचा या बद्दल वीचार करत होतो , व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात असे म्हणतात की व्यसनी व्यक्ती हा घरच्या लोकांच्या दृष्टीने एका आतंकवाद्या पेक्षा देखील जास्त भयंकर असतो , कारण खरे आतंकवादी हे दुसऱ्या जातीच्या.. धर्माच्या लोकांना त्रास देऊन त्याच्या मनात दहशत बसवतात पण घरातील मंडळीना सुखात ठेवतात , मात्र व्यसनी हा स्वतच्याच घरात आधी दहशत माजवतो, आणि बाहेरच्या लोकांशी गोड वागतो.)
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
Copyright © 2025 | Marathisrushti