(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पाऊस आणि हिरव्या मिरच्या

    त्यांच्या कुजबुतीतून एक वाक्य स्पष्ट ऐकू आलं, “बारीश के दिनो में गरमागरम समोसे के साथ हरी मिरची का मजा तो कुछ और ही रेहता हैं”।

  • संगीत, अभिनय, काव्य व इतर अवांतर ! (नशायात्रा – भाग २४)

    तसे आमच्या घरी संगीताची आवड सुरवातीपासून आहे , माझे आजोबा सयाजीराव महाराजांच्याद दरबारी नोकरी करत असत , तसेच ते कीर्तनकारही होते , माझ्या वडिलांना देखील संगीताची आवड होती त्यांचे थोडेसे संगीत शिक्षण देखील झाले होते व राजकोटच्या रेडीओ केंद्रावर त्यांनी तरुणपणी गायन देखील केले होते ,

  • वोह सुबह कभी (जल्दी) तो आयेगी!

    कोरोनामुळे जशी जगाची घडी विस्कटली, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाचीही अवस्था आहे. त्यामुळे जशी नवी आर्थिक घडी बसवावी लागेल, तशीच नवी व सुधारित राजकीय व्यवस्थाही उभी करावी लागेल. आशा इतकीच बाळगूया की, 2024 पर्यंत सकाळ नक्कीच उगवेल. येणाऱया नव्या प्रकाशाची कोवळी व आश्वासक किरणे या अस्थैर्याचा नायनाट करून नवे शाश्वत जग आपल्याला दाखवेल!

  • बिग मराठी म्युझिक ऍवॉर्डसमधून मराठी संगीतकार गीतकारांना प्रोत्साहन – अशोक चव्हाण

    महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एफएम रेडिओवर मराठी गाणी ऐकविली जात असून मराठी संगीतकार, गीतकार यांना प्रोत्साहित करणार्‍या बिग मराठी म्युझिक ऍवॉर्डस् सारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

  • विकल जोगिया

    "तो हाच दिवस हो, तीच तिथी, ही रात; ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत;
    वळूनी न पाहतां, कापीत अंधाराला, तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
    हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान, त्या खुल्या प्रीतीचा खुलाच हा सन्मान;
    ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षांत एकदां असा "जोगिया रंगे."
    माडगूळकरांच्या या अजरामर ओळी खरेतर, 'जोगिया" रागाची एकही छटा दर्शवत नाहीत. त्यादुष्टीने, या कलाकृतींचा एकच एक ठाम अन्वयार्थ लावणे, हे त्या कलाकृतीवर काहीसे अन्याय करणारे असते आणि बहुदा हा एक (एकमेव नव्हे) निकष, उत्तम कलाकृतीबाबत मांडता येईल. आस्वादाच्या दृष्टीने हे गुंतागुंतीचे होऊ शकते परंतु सतत वेगवेगळ्या अर्थछटा दृग्गोचर होणे, हे आव्हानात्मक देखील असू शकते. एका बाजूने मांडायचे झाल्यास, कविता काय किंवा संगीत निर्मिती काय, याची निर्मिती ही नेहमीच "अबोध" मनातून होत असते आणि त्याचे चलनवलन नेमके शब्दबद्ध करणे, निरातिशय जिकीरीचे होऊ शकते आणि परत त्यात व्यक्तिपरत्वे अनुभूती येउन, मग अन्वयार्थ अधिक अवघड होऊ शकतो. पण, हीच कलेची खरी "मजा" आहे, हे लक्षात घेतल्यास, बऱ्याच शंकांचा निचरा होऊ शकतो.
    जोगिया रागाबाबतची माझी भूमिका यावरून लक्षात येणे शक्य आहे. "गंधार" आणि "निषाद" स्वर वर्ज्य असलेल्या या रागात, "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत", या स्वरांचे प्राबल्य आहे, इतके की, जरी "षडज","मध्यम" हे स्वर या रागांचे "वादी - संवादी" असले तरी मनात तरळत राहतात, ते हेच कोमल स्वर आणि या स्वरांवर घेतलेला "ठेहराव". संस्कृत ग्रंथानुसार रागाचे वर्गीकरण "भैरव" थाटात केलेले आहे आणि बहुदा याचा परिणाम असावा, पण रागाची वेळ ही, पहाटेचा पहिला प्रहर सांगितलेला आहे. आता, याच अनुषंगाने बघायचे झाल्यास, वर दिलेल्या माडगूळकरांच्या ओळी किती अन्वर्थक ठरतात, हे सहज ध्यानात येऊ शकेल. या रागाची खरी ओळख दाखवायची झाल्यास, "प ध नि ध प" किंवा "प ध म रे सा" या स्वरसंहतीचा मागोवा घेत राहिले तर समजून घेता येईल.
    एखाद्या कलाकाराची एखाद्या रचनेशी कायमची नाळ जुळते आणि ती रचना म्हणजे त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्वाची नाममुद्रा म्हणून प्रस्थापित होते. पंडित भीमसेन जोशींची "पिया के मिलन की आस" ही रचना इतकी लोकप्रिय झाली की इतर कुणा गायकाने, ती रचना गायला दहादा विचार करावा. जोगिया रागाचा "अर्क" म्हणजे ही रचना, असे म्हणता येईल. विशेषत: तार सप्तकातील ठेहराव आणि आस, फारच अप्रतिम आहे.
    ज्या रागांत भावनिक आवाहन आहे, असेच राग बहुतांशी वेळा या गायकाने निवडल्याचे सहज ध्यानात येऊ शकते. आता, रागामध्ये भाव किंवा मूड का निर्माण होतो, हा संगीत सौंदर्यशास्त्रातील जटील प्रश्न आहे. परंतु, अनवट रागांपेक्षा प्रचलित राग, हे रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करू शकतात आणि त्यानुसार रागांची निवड करणे, हे धोरण या गायाकाच्याच बाबतीत नेमकेपणी दिसून येते. अर्थात, अशा प्रकारच्या निवडीने, गायनात साचेबद्धता येण्याचा धोका निर्माण होतो पण पंडितजींनी त्याबाबत सावधगिरी बाळगून, त्यात नाविन्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हे देखील समजून घेता येते. एकूणच संपूर्ण गायनाचा विचार केला तर, तानांची गुंतागुंत, आग्रा घराण्याच्या आघातयुक्त आणि पुनरावृत्त स्वरांच्या परिणामांवर अवलंबून असलेल्या तानांच्या अंगाने जाते, असे म्हणता येईल. शिवाय त्यात भर आहे, ती आवाजाच्या लगावातील विरोधसंबंधामुळे अवतरणाऱ्या नाट्यात्मतेची. बोल-लय, बोलतान वा तिहाई वगैरेंवर फारसा भर नाही परंतु अंतिम परिणाम रंगदार होतो की नाही, हीच कसोटी अखेरची असते आणि तिथे मात्र पंडितजी बाजी मारून जातात. ठुमरी अंगाने जाणारी रचना पण तरीही शब्दाचा आशय बघता, त्यानुसार केलेले असामान्य सादरीकरण, असेच इथे म्हणता येईल.
    भारतीय संगीतरचनाकारांना त्यांच्या शास्त्रोक्त संगीताकडील झुकावानुसार जोखणे योग्य आणि गरजेचे आहे, हा अत्यंत चुकीचा समज आहे. परंतु दुर्दैवाने, भारतीय रागसंगीताचे ज्ञान वा तत्संबंधीची सर्वसाधारण माहिती असणे, याला एक योग्यता-निकष म्हणून बरीच प्रतिष्ठा लाभली आहे. मग, संगीतरचनाकार कुठल्याही संगीतकोटीत काम करीत असू दे. या दृष्टीने विचार करता, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांचा विचार, रचनाकार म्हणून करताना, विश्लेषण करणे आवश्यक ठरते. वास्तविक त्यांची सगळी कारकीर्द बघितली तर आणि प्रसिद्धीचा अदमास घेतला तर, त्यांची गणना, तालाचे बादशहा म्हणून करण्यात येते आणि अर्थात ती फार एकांगी आहे. प्रस्तुत गाणे, "रात भर का है मेहमां अंधेरा" - चित्रपट "सोने कि चिडिया", मुद्दामून ऐकायला हवे.
    "रात भर का मेहमां अंधेरा,
    किस के रोके रुका है सवेरा".
    वास्तविक त्यांच्या संगीताचा ढंग बघता, त्यांना भारतीय रागसंगीत वा संबंधित बाबींचे फार तीव्र आकर्षण आहे,असे दिसत नाही. त्यामुळे, त्याच्या रचनांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तर, ते राग वापरतात, कारण विशिष्ट गीतप्रकार हाच मुळी एखाद्या रागात वा त्याच्या सावलीत मुरलेला असतो दुसरा भाग म्हणजे चाल अवतरते आणि नंतर त्यात रागाची बीजे सापडतात. प्रस्तुत गाणे दीपचंदी तालात बांधलेले आहे पण या गाण्याच्या बाबतीत, असे ठामपणे म्हणता येईल, गाण्याची लयच मुळी अशा प्रकारे बांधली आहे की तालवाद्य नसले तरी चालले असते!!
    गाण्याचा मुखडा, जर बारकाईने ऐकला तर ध्यानात येईल, इथे राग जोगिया आणि त्याचे स्वर केवळ आधार म्हणून घेतलेले आहेत. गाण्याची सुरवात अति तार स्वरांत सुरु झाली तरी गाण्याचा "मुखडा" घेताना, मात्र एकदम खालच्या सुरांत आणि शांतपणे सुरु होते.राग जोगिया इथे स्पष्टपणे दिसतो. पण पहिला अंतरा सुरु होण्याआधीचे, जे वाद्यमेळातून संगीत आपल्या समोर येते, ज्यात "कोरस" संगीताचा वापर केला आहे, तिथे तर स्पष्टपणे, ऑपेरा संगीताचा प्रभाव जाणवतो. याचा वेगळा अर्थ असा घेता येईल, रचनाकार, इथे गाण्याच्या अंतिम सादरीकरणाला महत्व देत आहे आणि त्यासाठी मग कुठूनही सांगीतद्रव्य उचलण्याची तयारी आहे, मग त्यात सुरवातीला ज्या रागाचा आधार घेतला आहे, त्याला सहज बिनदिक्कतपणे बाजूला सारण्याची हिम्मत आहे. याचाच दुसरा दृश्य परिणाम असा दिसतो, नैय्यर यांनी आकर्षक सांगीत विलासासाठी प्रचलित रागांत का होईना, पण नवे मुखडे समोर आणले असेही दिसत नाही. नवीन मुखडे बंधने, हे अनेकदा, सर्जनशिलतेचे उदाहरण म्हणून दाखवता येते. या संगीतकाराचे प्रयत्न याबाबतीत तरी कमी पडले, असे म्हणायला जागा आहे.
    सुप्रसिद्ध गायकनट बालगंधर्वांनी गायलेले आणि अतिशय लोकप्रिय झालेले "वद जाऊ कुणाला शरण" हे पद या रागावर आधारलेले आहे. खरतर, गाण्याचे ध्वनिमुद्रण काहीसे सदोष आहे पण तरीही खास वैशिष्ट्ये नक्कीच समजून घेता येतात. या गाण्याची चाल बघितली तर "जोगिया/कलिंगडा" या दोन्ही रागांचा आढळ या रचनेत ऐकायला मिळतो. अर्थात, रचनेचा मुखडा मात्र नि:संशय जोगिया रागावर आहे आणि याच रागाची दाट सावली आहे.
    "वद जाऊ कुणाला शरणागत, करी जो हरण संकटाते;
    मी धरीन चरण त्याचे, अग सखये".
    बालगंधर्वांनी लयसिद्धी प्राप्त होती. विशिष्ट मात्रांचे तालावर्तन सुरु झाले की त्याचे स्पंदन अंगी भिनल्यासारखे कायम राखणे, तबलजीने कसेही आड वाजवले तरी सुखाने गात राहायचे त्याना जमते, हे इथे लक्षात येते. मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, ही खास लयकारी पण शब्दांची किंवा अक्षरांची फेक जरा इकडे, तिकडे केल्याने सबंध तालावर्तन कसे उठून येते, हे देखील ऐकण्यासारखे आहे. सुरावटींचा पुनरावतार असावा, पण त्यांची पुनरावृत्ती टाळावी, हे एक कालासुत्र, त्यांच्या गाण्यात प्रत्ययाला येई.लयकारीची सूक्ष्म क्रीडा, हा विशेष इथे प्रत्ययाला येतो. आवाज फार बारीक नाही पण लगाव नाजूक आहे. विशेष म्हणजे त्यात अस्थिरता नाही. पट्टी उंच आहे पण तरीही मध्यममार्ग आहे. आवाज सहजपणे हलका होतो. आवाजात काही वेळा असे आढळते, त्याला स्वरावर स्थिर करून बघितले की तो जडावतो. तसे इथे काहीच घडत नाही. सहजपणे, दुसऱ्या स्वरावर जाणे, तिथे हलकीशी हरकत घेणे आणि त्यातून लय लांबविणे, इत्यादी अनेक सांगीत सौंदर्यवाचक क्रिया, या गाण्यात सहज ऐकायला मिळतात.आशयनिश्चिती करणारा एक काहीसा अमूर्त घटक म्हणजे त्यांच्या गायकीतील उत्कटता. तसे बघितले तर, उत्कटता ही मनोवृत्ती सर्जनशिलतेची पूर्वअट असते. बालगंधर्व जे काही गात असत, त्यात एक उत्कटता, एक भारलेपण होते आणि ते ऐकणाऱ्यापर्यंत संक्रांत होणे, ही अपरिहार्यता होती. तसे बघितले तर संगीताचा आशय, गवयी-गाण्याचा नाही. पण तरीही त्या गायनाची सावली सादरीकरणावर पडलेली आढळते.
    "गुंज उठी शहनाई" चित्रपटातील "कह दो कोई ना करे यहां प्यार" या गाण्यातून आपल्याला जोगिया रागाची ओळख करून घेता येते. संगीतकार वसंत देसायांनी या गाण्याची तर्ज बांधली आहे आणि मोहम्मद रफीनी गायले आहे. मुळात रफीचा पहाडी, दमदार आवाज, आणि गाण्याची रचना देखील त्या गळ्याला सुयोग्य अशी असल्याने, हे गाणे खूपच लोकप्रिय झाले.
    "बिखर गये बचपन के सपने, अरमानो की शाम ढले;
    कही सजे बारात किसीकी, कही किसीका प्यार जले;
    कह दो कोई ना करे यहां प्यार
    इस में खुशिया है कम, बेशुमार है गम;
    एक हंसी और आंसू हजार".
    गाणे पहिल्या सुरापासून वरच्या सप्तकात गायले गेले आहे आणि तिथे आपल्याला जोगिया रागातील, ज्याला "आस" म्हणतात अशा सुरांची भेट होते.
    असेच एक गाणे "दिल एक मंदिर" या चित्रपटात आहे - "दिल एक मंदिर है" याच ओळीने गाणे सुरु होते. इथे एक गंमत बघता येते. वरील गाण्याच्या चालीतील सूर आणि या गाण्याच्या चालीतील सूर, एकमेकांशी ताडून बघितले तर खूप फरक आढळतो पण तरीही गाण्याच्या एका वळणावर, आपल्याला या रागाचे सूर आढळतात.
    "जानेवाले कभी नहीं आते,
    जानेवालो की याद आती है;
    दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है
    प्यार की जिसमें होती है पूजा, ये प्रीतम का घर है
    संगीतकार शंकर/जयकिशन यांनी या गाण्याची चाल बांधली आहे आणि तशी चाल काही फार अवघड नाही पण गाणे आपल्या मनावर विलक्षण परिणाम करते. ही किमया संगीतकाराची. या संगीतकार जोडीबद्दल एक गोष्ट अवश्यमेव सांगायलाच हवी. चित्रपट गीत हे प्रामुख्याने चित्रपटातील कथेला पूरक असे माध्यम आहे आणि ही जाणीव यांच्या प्रत्येक रचनेत आढळून येते.
    -- अनिल गोविलकर

  • लाघवी गौड सारंग

    एकाच कुटुंबातील असून देखील, स्वभाव वेगळा असणे, हे सहज असते. तोंडावळा सारखा असतो पण तरीही स्वभाव मात्र भिन्न असतो. किंबहुना, वेगळेपण असताना देखील, इतर चेहऱ्यांशी साम्य दिसते. भारतीय रागदारी संगीताचा सम्यक विचार करताना, मला बऱ्याच रागांच्या बाबतीत हे म्हणावेसे वाटते. सूर तेच असतात पण तोच स्वर कसा "घ्यायचा" म्हणजेच त्या स्वराची "जागा" कशी मांडायची, त्यामुळे तेच स्वर आणि तो राग भिन्न होत जातो आणि रागांमधील व्यामिश्रता अधिक खोलवर डोकावते. "गौडसारंग" रागाच्या बाबतीत हे साम्य बघताना, इतर अनेक रागांच्या आठवणी मनात येतात.
    "कोवळ्या अंधारी दर्याच्या किनारी
    बसते तशीच, एकटी एकटी.
    एकटी कशी - तुझ्या विचारांत;
    तुझ्या विचारात रंगता रंगता
    येते मनाला अशी काहीशी ओढाळ मस्ती".
    कवियत्री इंदिरा संतांच्या या ओळी, गौड सारंग रागाच्या काही छटा दर्शवतात. तसे बघितले तर शब्द आणि सूर, हे नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येतात परंतु कधीही एकजीव होत नाहीत तरीही काहीवेळा "अंतरीचा" भाव दाखवण्यासाठी दोन्ही माध्यमांची गरज भासते खरी.
    खरतर हेच साम्य, रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल. एखादा राग सादर करणे म्हणजे केवळ सुरांची बेरीज-वजाबाकी असा गणिती कारभार नसून, त्या स्वराचा (जे स्वर सामायिक असतात ) नेमका "स्वभाव" जाणून घेऊन, त्याचे सादरीकरण गरजेचे असते. स्वराला "पैलू" असतात, ही इथे लक्षात येते.
    या रागात दोन्ही मध्यम लागतात (तीव्र आणि शुध्द) आणि बाकीचे स्वर शुध्द आहेत. अर्थात,हा राग ऐकताना, "बिहाग","छायानट" या रागांच्या आठवणी मनात तरळतात पण तरीही हा राग, आपले "वेगळेपण" सिद्ध करीत असतो. "सा" "रे" "ग" "म" या स्वरांच्या साहचर्याने स्वत:ची ओळख निर्माण करता येते.
    भारतीय संगीतात, बांसुरी वाद्याचा नेमका उगम कधी झाला, याबाबत संदेह बराच आहे. परंपरागत संकेतानुसार, कृष्णाकडे या वाद्याचा मान जातो. आधुनिक भारतीय संगीतात, या वाद्याची प्रतिष्ठापना खऱ्याअर्थी कुणी केली असेल तर, ती पंडित पन्नालाल घोष यांनी. वाद्याचा स्वभाव ओळखून, त्यात सुरांचा असामान्य मुलायमपणा पंडितजींनी ज्या प्रकारे ओळखला आणि त्याचे सादरीकरण केले, त्याला आजही तोड नाही. राग सादर करताना, त्याचे शुद्धत्व राखून, लयकारी आणि ताना इतक्या सुंदरपणे सादर केली आहे की ऐकणारा मंत्रमुग्ध व्हावा.
    अत्यंत ठाय लयीत सुरवात करायची, हळूहळू स्वरांचा "भरणा" करीत, रागाची बढत करायची, असा त्यांच्या वादनाचा सर्वसाधारण असा ढाचा ओळखता येतो. याचा दृश्य परिणाम असा होतो, रसिकाला प्रत्येक स्वराचा आनंद घेता येतो. वास्तविक, या वाद्याचा थोडा विचार केला तर हे वाद्य सतारीप्रमाणे "पूर्णत्व" मिळणारे वाद्य नाही पण तरीही पन्नालाल घोष यांनी, या वाद्यावर प्रभुत्व मिळवताना, वाद्याचा नेमका गुणधर्म ओळखून, ठाय आणि मध्य लयीत वादनाची गत राखली.
    या रागाचे वादन ऐकताना, आपल्याला याच गुणांचा आढळ येतो. अतिशय ठाय लयीत वादन करताना, प्रत्येक स्वर नेमका लावणे, स्वरांची बढत करीत असताना, कपड्यावर कशिदाकाम करावे त्याप्रमाणे स्वरांची रेखीव आकृती निर्माण करायची आणि लयकारी सादर करायची, याकडे वादनाचा कल दिसतो आणि तो कल, वाद्याचा गुणधर्म ओळखून सौंदर्यनिर्मिती करतो. वाजवताना, शक्यतो दीर्घ ताना न घेता, छोट्या स्वरावलींतून लय प्रगट करायचा आग्रह दिसतो. त्यामुळे, ऐकताना देखील रागाचे सौंदर्य सहजपणे न्याहाळता येतो. रचना द्रुत लयीत वाजवताना देखील, शक्यतो सुरांचा अवकाश हा अधिकाधिक मंद्र सप्तकात राखायचा, हा विचार स्पष्ट दिसतो.
    लताबाईंनी, त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत असंख्य भजने गायली आहेत तरीही या रचनेची अवीट गोडी काही निराळीच आहे. विशेषत: हिंदी चित्रपट संगीतात तर या रचनेचे स्थान अतुलनीय असे आहे. अत्यंत सशक्त शब्दकळा, त्यालाच जोडून निर्माण केलेली अप्रतिम संगीत रचना आणि त्याचे अतिशय परिणामकारक सादरीकरण, ही या रचनेची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. खरतर, या रचनेत, फक्त "गौड सारंग" राग नसून, काही ठिकाणी "भूप" रागाची संगती लागते तरीही गौड सारंग रागाची दाट छाया, या गाण्यावर निश्चित आहे. आणखी विशेष सांगायचा म्हणजे, गाण्याचे बांधणी "दीपचंदी" या काहीशा अनवट तालात बांधली आहे. या तालावर आधारित फारशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. एकतर हा ताल लयीला फार अवघड आहे. चौदा मात्रांचा ताल असून, "टाळी" च्या मात्रा वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने, वाजवताना,फार कौशल्य लागते.
    "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम;
    सबको सन्मति दे भगवान".
    या गाण्यात, सुरवातीपासून जरा बारकाईने ऐकले तर तालाच्या मात्रांचा हिशेब मिळतो. संगीतकार जयदेव यांची या गाण्यात बांधलेली लय तर केवळ अपूर्व आहे. गाणे फार वर-खाली चालत आहे म्हणजे मध्येच वरच्या सुरांत जाते तर क्षणात खालच्या सुरांत जाते. चाल अतिशय श्रवणीय आहे तसेच कविता म्हणून देखील, हे गाणे असामान्य आहे. साहीरचे शब्द प्रत्ययकारी आहेत आणि त्या शब्दांचा आशय, चालीतून नेमका दृग्गोचर होईल, याची काळजी घेऊन, गाणे बांधले आहे. लताबाईंनी गाताना देखील, याच वैशिष्ट्याचा विकास होईल, या भूमिकेतून गायले आहे.
    उर्दू साहित्यात, गझल साहित्याचे स्थान फार वरच्या स्तरावर आहे. बरेचवेळा, "गझल" हे कवितेचे वृत्त आहे, असे न मानता, "गझल" हा गायकीचा एक प्रकार आहे, असे मानले जाते. एका दृष्टीने हा विचार योग्य आहे पण, तरीही, गझल, ही एक कविता आहे, हे मान्यच करावे लागेल. अर्थात, गझल आणि गझल गायकी, हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. ज्या हिशेबात ठुमरी गायनाचे मोजमाप केले जाते त्याच प्रमाणे गझल गायनाचे देखील मापदंड आहेत आणि त्यात जगजीत सिंग यांचे नाव अग्रभागी आहे. अत्यंत मुलायम आवाज, शक्यतो गायन करताना, शब्दांना कुठेही "जखम" करायची नाही, हा विचार ठामपणे दिसतो!! कालांतराने त्यांची गायकी थोडीशी "एकांतिक" झाली तरी देखील, गझल गायनात त्यांनी आपले नाव प्रस्थापित केले, यात शंकाच नाही. "दैर ओ हरम मे बसने वालो" ही रचना,केरवा तालात गायली आहे.
    "दैर-ओ-हरम मे बसने वालो,
    मैखानो में फुट ना डालो".
    रचनेच्या सुरवातीलाच सरगमचा उपयोग केला आहे आणि पुढे देखील बऱ्याच ठिकाणी सरगम ऐकायला मिळते. ऐकताना रचना जरा द्रुत लयीत आहे, असे वाटते पण केवळ तालाच्या आघातामुळे, लय थोडी द्रुत वाटते. गायन ऐकताना, जगजीत सिंग यांच्या सगळ्या गायकीची वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. एखाद्या शब्दावर "खटका" घेताना देखील, त्या शब्दाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष दिलेले सहज समजून घेता येते. गौड सारंग रागाची ओळख करून घेण्यासाठी, ही रचना दर्शविता येईल.
    आता आपण, मराठीतील असेच एक "समृध्द" भावगीत ऐकुया. "काल पाहिले मी स्वप्न गडे" हेच ते गाणे. आशा भोसले यांनी आपल्या असामान्य गायकीने हे गाणे फारच अवीट गोडीचे करून ठेवले आहे. योगेश्वर अभ्यंकर, या काहीशा अप्रसिद्ध कवीने लिहिलेले हे गाणे, आपल्याला गौड सारंग रागाची आठवण करून देतात. संगीतकार श्रीनिवास खळे, यांनी ही चाल बांधली आहे. हा संगीतकार म्हणजे मराठी भावगीतातील अद्भुत रसायन होते. यांच्या बहुतेक चाली अतिशय संथ, तरीही गळ्याची परीक्षा घेणाऱ्या असतात. "गायकी" ढंगाकडे चाल बांधण्याची विशेष प्रवृत्ती दिसते. गमतीचा भाग असा असतो, गाणे ऐकताना, गाणे सुश्राव्य वाटत असते परंतु तेच गाणे गायला घेतले म्हणजे त्यातील "खाचखळगे" दिसायला लागतात आणि गाण्याची चाल भलतीच अवघड वाटायला लागते!!
    "काल पाहिले मी स्वप्न गडे,
    नयनी मोहरली ग आशा,
    बाळ चिमुकले खुदकन हसले,
    रंग सावळा तो कृष्ण गडे".
    सुरवातीच्या आलापीमध्येच आपल्याला गौड सारंग दिसतो. हा आलाप ऐकायला सहज, सोपा वाटतो पण गाताना घेतले तर आपल्याला समजेल की, आलापीत किती "अवघडले" पण आहे. तसेच प्रत्येक ओळ संपविताना, जे "खटके" घेतले आहेत त्याचबरोबर पहिला अंतरा सुरु करताना, एकदम वरच्या सुरांत रचनेला सुरवात करून, चालीतील "काठीण्य" दर्शवून द्यायचे, हा सगळाच भाग अतिशय विलोभनीय आहे.
    "छोटी छोटी बांते" या चित्रपटात "कुछ और जमाना कहेता है" हे गाणे गौड सारंग रागाची आठवण करून देतात. संगीतकार अनिल बिस्वास यांची स्वररचना असून, मीना कपूर यांनी गायले आहे. वास्तविक चाल अतिशय सहज गुणगुणता येईल अशी आहे पण तरीही स्वररचना नित ऐकली तर त्यात अनेक "कंगोरे" आढळतात.
    "कुछ और जमाना कहेता है,
    कुछ और है जिद मेरे दिल कि,
    मै बात जमाने कि मानू,
    या बात सूनू अपने दिल कि".
    गाण्याच्या चालीला बंगाली लोकसंगीताचा गंध आहे आणि त्यामुळे चाल खूपच श्रवणीय झाली आहे. अनिल बिस्वास यांची कुठलीही चाल ऐकायला घेतली म्हणजे त्यात काही ठराविक गुणांचा आढळ हमखास आढळतो. त्यात गाण्यातील "मेलडी" चा उल्लेख रास्त आहे. गाण्याची चाल कुठेही 'तुटक" वाटत नाही. एखादी सरळ, सलग रेषा ओढावी तशी स्वररचना चालत असते.
    हिंदी चित्रपटातील बहुदा पहिली "रागमाला" ही "हमदर्द" चित्रपटात, संगीतकार अनिल बिस्वास यांनी सादर केली. "रितू आये रितू जाये सखी री" या रचनेत, चार रागांचा समावेश आहे आणि त्यातील रचनेचा मुखडा हा "गौड सारंग" रागावर आधारित आहे.
    "रितू आये रितू जाये सखी री,
    मन के मित ना आये,
    जेठ महिना जिया घबराये,
    पल पल सुरज आग लगाये".
    अर्थात, रचना तयार करताना, आपण चित्रपटातील गाण्याची रचना तयार करीत आहोत, याचे नेमके भान दिसून येते. प्रत्येक रागातील नेमकी सौंदर्यस्थळे हुडकून, त्यातील भावनेचा भाग शोधून, त्या स्वरावलींचा गाण्याची चाल बांधताना, अतिशय समर्पक उपयोग केलेला आढळतो आणि जरी प्रत्येक कडवे वेगवेगळ्या रागात बांधले असले तरी समेवर येताना, कुठेही विसंगती निर्माण होणार नाही, याची वाजवी काळजी घेतली आहे. संगीतकार म्हणून अनिलदा यांचे हे नि:संशय प्रशंसनीय कार्य म्हणावेच लागेल आणि चित्रपटात रागमाला कशी सादर करायची याचा आदिनमुना सादर केला.
    - अनिल गोविलकर

  • किल्ले निवती

    काही दुर्गावशेष आणि निसर्गसंपन्न परिसराचा वारसा मिरवणारा निवतीचा किल्ला दिर्घकाळ स्मरणात रहाणारा असाच आहे….

  • एक मुलगी

    एक मुलगी

    एक मुलगी चालते आहे आपला रस्ता

    खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता

    जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव

    तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव

    होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते

    आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते

  • भाडेकरार – संस्था, सदस्य आणि भाडेकरू यांच्या जबाबदाऱ्या

    भाग-२. मागील लेखामध्ये १ ते ५ प्रश्न उत्तरे आपण वाचली आहेत. आता ६ ते ११ या अंकामध्ये प्रसिद्ध करीत आहोत.

  • ठीक आहे… बघू

    सरकार : अरे आधार कार्ड बनवा
    आम्ही: ठीक आहे बघू
    सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...
    सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...

    सरकार: अरे बँकेचे खाते उघडा
    आम्ही: ठीक आहे बघू
    सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...
    सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...

    सरकार: अरे आयकर भरा, निदान जितका चांगल्या मार्गे कमावला तितका तरी
    आम्ही: ठीक आहे बघू
    सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...
    सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...

    आणि आता ....

    सरकार: आज पासून ५००-१०००च्या नोटा बंद, ५० दिवसात बदलून घ्या.
    आम्ही: अरे काय मूर्खपणा आहे, थोडा तरी वेळ द्या, थोडी समजूत दाखवा, तुम्हाला काही दयामाया आहे कि नाही? कुठे गेली माणुसकी? नियम, कायदा काही पद्धत आहे की नाही?

    सरकार: ठीक आहे........ बघू