(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • रिओ निग्रो

    फोर्थ इंजिनियर , थर्ड मेट, कॅप्टन, स्टीवर्ड, मोटरमन , एक ए बी आणि मी पकडून असे एकूण सात जण मनौस शहरात सकाळी दहा वाजता गेलो होतो आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास परत आलो होतो. सकाळी जहाजावरुन जाताना छोट्या स्पीड बोट मध्ये पायलट लॅडर ने सगळे एका मागोमाग उतरले.

  • विकल जोगिया

    "तो हाच दिवस हो, तीच तिथी, ही रात; ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत;
    वळूनी न पाहतां, कापीत अंधाराला, तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
    हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान, त्या खुल्या प्रीतीचा खुलाच हा सन्मान;
    ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षांत एकदां असा "जोगिया रंगे."
    माडगूळकरांच्या या अजरामर ओळी खरेतर, 'जोगिया" रागाची एकही छटा दर्शवत नाहीत. त्यादुष्टीने, या कलाकृतींचा एकच एक ठाम अन्वयार्थ लावणे, हे त्या कलाकृतीवर काहीसे अन्याय करणारे असते आणि बहुदा हा एक (एकमेव नव्हे) निकष, उत्तम कलाकृतीबाबत मांडता येईल. आस्वादाच्या दृष्टीने हे गुंतागुंतीचे होऊ शकते परंतु सतत वेगवेगळ्या अर्थछटा दृग्गोचर होणे, हे आव्हानात्मक देखील असू शकते. एका बाजूने मांडायचे झाल्यास, कविता काय किंवा संगीत निर्मिती काय, याची निर्मिती ही नेहमीच "अबोध" मनातून होत असते आणि त्याचे चलनवलन नेमके शब्दबद्ध करणे, निरातिशय जिकीरीचे होऊ शकते आणि परत त्यात व्यक्तिपरत्वे अनुभूती येउन, मग अन्वयार्थ अधिक अवघड होऊ शकतो. पण, हीच कलेची खरी "मजा" आहे, हे लक्षात घेतल्यास, बऱ्याच शंकांचा निचरा होऊ शकतो.
    जोगिया रागाबाबतची माझी भूमिका यावरून लक्षात येणे शक्य आहे. "गंधार" आणि "निषाद" स्वर वर्ज्य असलेल्या या रागात, "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत", या स्वरांचे प्राबल्य आहे, इतके की, जरी "षडज","मध्यम" हे स्वर या रागांचे "वादी - संवादी" असले तरी मनात तरळत राहतात, ते हेच कोमल स्वर आणि या स्वरांवर घेतलेला "ठेहराव". संस्कृत ग्रंथानुसार रागाचे वर्गीकरण "भैरव" थाटात केलेले आहे आणि बहुदा याचा परिणाम असावा, पण रागाची वेळ ही, पहाटेचा पहिला प्रहर सांगितलेला आहे. आता, याच अनुषंगाने बघायचे झाल्यास, वर दिलेल्या माडगूळकरांच्या ओळी किती अन्वर्थक ठरतात, हे सहज ध्यानात येऊ शकेल. या रागाची खरी ओळख दाखवायची झाल्यास, "प ध नि ध प" किंवा "प ध म रे सा" या स्वरसंहतीचा मागोवा घेत राहिले तर समजून घेता येईल.
    एखाद्या कलाकाराची एखाद्या रचनेशी कायमची नाळ जुळते आणि ती रचना म्हणजे त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्वाची नाममुद्रा म्हणून प्रस्थापित होते. पंडित भीमसेन जोशींची "पिया के मिलन की आस" ही रचना इतकी लोकप्रिय झाली की इतर कुणा गायकाने, ती रचना गायला दहादा विचार करावा. जोगिया रागाचा "अर्क" म्हणजे ही रचना, असे म्हणता येईल. विशेषत: तार सप्तकातील ठेहराव आणि आस, फारच अप्रतिम आहे.
    ज्या रागांत भावनिक आवाहन आहे, असेच राग बहुतांशी वेळा या गायकाने निवडल्याचे सहज ध्यानात येऊ शकते. आता, रागामध्ये भाव किंवा मूड का निर्माण होतो, हा संगीत सौंदर्यशास्त्रातील जटील प्रश्न आहे. परंतु, अनवट रागांपेक्षा प्रचलित राग, हे रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करू शकतात आणि त्यानुसार रागांची निवड करणे, हे धोरण या गायाकाच्याच बाबतीत नेमकेपणी दिसून येते. अर्थात, अशा प्रकारच्या निवडीने, गायनात साचेबद्धता येण्याचा धोका निर्माण होतो पण पंडितजींनी त्याबाबत सावधगिरी बाळगून, त्यात नाविन्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हे देखील समजून घेता येते. एकूणच संपूर्ण गायनाचा विचार केला तर, तानांची गुंतागुंत, आग्रा घराण्याच्या आघातयुक्त आणि पुनरावृत्त स्वरांच्या परिणामांवर अवलंबून असलेल्या तानांच्या अंगाने जाते, असे म्हणता येईल. शिवाय त्यात भर आहे, ती आवाजाच्या लगावातील विरोधसंबंधामुळे अवतरणाऱ्या नाट्यात्मतेची. बोल-लय, बोलतान वा तिहाई वगैरेंवर फारसा भर नाही परंतु अंतिम परिणाम रंगदार होतो की नाही, हीच कसोटी अखेरची असते आणि तिथे मात्र पंडितजी बाजी मारून जातात. ठुमरी अंगाने जाणारी रचना पण तरीही शब्दाचा आशय बघता, त्यानुसार केलेले असामान्य सादरीकरण, असेच इथे म्हणता येईल.
    भारतीय संगीतरचनाकारांना त्यांच्या शास्त्रोक्त संगीताकडील झुकावानुसार जोखणे योग्य आणि गरजेचे आहे, हा अत्यंत चुकीचा समज आहे. परंतु दुर्दैवाने, भारतीय रागसंगीताचे ज्ञान वा तत्संबंधीची सर्वसाधारण माहिती असणे, याला एक योग्यता-निकष म्हणून बरीच प्रतिष्ठा लाभली आहे. मग, संगीतरचनाकार कुठल्याही संगीतकोटीत काम करीत असू दे. या दृष्टीने विचार करता, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांचा विचार, रचनाकार म्हणून करताना, विश्लेषण करणे आवश्यक ठरते. वास्तविक त्यांची सगळी कारकीर्द बघितली तर आणि प्रसिद्धीचा अदमास घेतला तर, त्यांची गणना, तालाचे बादशहा म्हणून करण्यात येते आणि अर्थात ती फार एकांगी आहे. प्रस्तुत गाणे, "रात भर का है मेहमां अंधेरा" - चित्रपट "सोने कि चिडिया", मुद्दामून ऐकायला हवे.
    "रात भर का मेहमां अंधेरा,
    किस के रोके रुका है सवेरा".
    वास्तविक त्यांच्या संगीताचा ढंग बघता, त्यांना भारतीय रागसंगीत वा संबंधित बाबींचे फार तीव्र आकर्षण आहे,असे दिसत नाही. त्यामुळे, त्याच्या रचनांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तर, ते राग वापरतात, कारण विशिष्ट गीतप्रकार हाच मुळी एखाद्या रागात वा त्याच्या सावलीत मुरलेला असतो दुसरा भाग म्हणजे चाल अवतरते आणि नंतर त्यात रागाची बीजे सापडतात. प्रस्तुत गाणे दीपचंदी तालात बांधलेले आहे पण या गाण्याच्या बाबतीत, असे ठामपणे म्हणता येईल, गाण्याची लयच मुळी अशा प्रकारे बांधली आहे की तालवाद्य नसले तरी चालले असते!!
    गाण्याचा मुखडा, जर बारकाईने ऐकला तर ध्यानात येईल, इथे राग जोगिया आणि त्याचे स्वर केवळ आधार म्हणून घेतलेले आहेत. गाण्याची सुरवात अति तार स्वरांत सुरु झाली तरी गाण्याचा "मुखडा" घेताना, मात्र एकदम खालच्या सुरांत आणि शांतपणे सुरु होते.राग जोगिया इथे स्पष्टपणे दिसतो. पण पहिला अंतरा सुरु होण्याआधीचे, जे वाद्यमेळातून संगीत आपल्या समोर येते, ज्यात "कोरस" संगीताचा वापर केला आहे, तिथे तर स्पष्टपणे, ऑपेरा संगीताचा प्रभाव जाणवतो. याचा वेगळा अर्थ असा घेता येईल, रचनाकार, इथे गाण्याच्या अंतिम सादरीकरणाला महत्व देत आहे आणि त्यासाठी मग कुठूनही सांगीतद्रव्य उचलण्याची तयारी आहे, मग त्यात सुरवातीला ज्या रागाचा आधार घेतला आहे, त्याला सहज बिनदिक्कतपणे बाजूला सारण्याची हिम्मत आहे. याचाच दुसरा दृश्य परिणाम असा दिसतो, नैय्यर यांनी आकर्षक सांगीत विलासासाठी प्रचलित रागांत का होईना, पण नवे मुखडे समोर आणले असेही दिसत नाही. नवीन मुखडे बंधने, हे अनेकदा, सर्जनशिलतेचे उदाहरण म्हणून दाखवता येते. या संगीतकाराचे प्रयत्न याबाबतीत तरी कमी पडले, असे म्हणायला जागा आहे.
    सुप्रसिद्ध गायकनट बालगंधर्वांनी गायलेले आणि अतिशय लोकप्रिय झालेले "वद जाऊ कुणाला शरण" हे पद या रागावर आधारलेले आहे. खरतर, गाण्याचे ध्वनिमुद्रण काहीसे सदोष आहे पण तरीही खास वैशिष्ट्ये नक्कीच समजून घेता येतात. या गाण्याची चाल बघितली तर "जोगिया/कलिंगडा" या दोन्ही रागांचा आढळ या रचनेत ऐकायला मिळतो. अर्थात, रचनेचा मुखडा मात्र नि:संशय जोगिया रागावर आहे आणि याच रागाची दाट सावली आहे.
    "वद जाऊ कुणाला शरणागत, करी जो हरण संकटाते;
    मी धरीन चरण त्याचे, अग सखये".
    बालगंधर्वांनी लयसिद्धी प्राप्त होती. विशिष्ट मात्रांचे तालावर्तन सुरु झाले की त्याचे स्पंदन अंगी भिनल्यासारखे कायम राखणे, तबलजीने कसेही आड वाजवले तरी सुखाने गात राहायचे त्याना जमते, हे इथे लक्षात येते. मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, ही खास लयकारी पण शब्दांची किंवा अक्षरांची फेक जरा इकडे, तिकडे केल्याने सबंध तालावर्तन कसे उठून येते, हे देखील ऐकण्यासारखे आहे. सुरावटींचा पुनरावतार असावा, पण त्यांची पुनरावृत्ती टाळावी, हे एक कालासुत्र, त्यांच्या गाण्यात प्रत्ययाला येई.लयकारीची सूक्ष्म क्रीडा, हा विशेष इथे प्रत्ययाला येतो. आवाज फार बारीक नाही पण लगाव नाजूक आहे. विशेष म्हणजे त्यात अस्थिरता नाही. पट्टी उंच आहे पण तरीही मध्यममार्ग आहे. आवाज सहजपणे हलका होतो. आवाजात काही वेळा असे आढळते, त्याला स्वरावर स्थिर करून बघितले की तो जडावतो. तसे इथे काहीच घडत नाही. सहजपणे, दुसऱ्या स्वरावर जाणे, तिथे हलकीशी हरकत घेणे आणि त्यातून लय लांबविणे, इत्यादी अनेक सांगीत सौंदर्यवाचक क्रिया, या गाण्यात सहज ऐकायला मिळतात.आशयनिश्चिती करणारा एक काहीसा अमूर्त घटक म्हणजे त्यांच्या गायकीतील उत्कटता. तसे बघितले तर, उत्कटता ही मनोवृत्ती सर्जनशिलतेची पूर्वअट असते. बालगंधर्व जे काही गात असत, त्यात एक उत्कटता, एक भारलेपण होते आणि ते ऐकणाऱ्यापर्यंत संक्रांत होणे, ही अपरिहार्यता होती. तसे बघितले तर संगीताचा आशय, गवयी-गाण्याचा नाही. पण तरीही त्या गायनाची सावली सादरीकरणावर पडलेली आढळते.
    "गुंज उठी शहनाई" चित्रपटातील "कह दो कोई ना करे यहां प्यार" या गाण्यातून आपल्याला जोगिया रागाची ओळख करून घेता येते. संगीतकार वसंत देसायांनी या गाण्याची तर्ज बांधली आहे आणि मोहम्मद रफीनी गायले आहे. मुळात रफीचा पहाडी, दमदार आवाज, आणि गाण्याची रचना देखील त्या गळ्याला सुयोग्य अशी असल्याने, हे गाणे खूपच लोकप्रिय झाले.
    "बिखर गये बचपन के सपने, अरमानो की शाम ढले;
    कही सजे बारात किसीकी, कही किसीका प्यार जले;
    कह दो कोई ना करे यहां प्यार
    इस में खुशिया है कम, बेशुमार है गम;
    एक हंसी और आंसू हजार".
    गाणे पहिल्या सुरापासून वरच्या सप्तकात गायले गेले आहे आणि तिथे आपल्याला जोगिया रागातील, ज्याला "आस" म्हणतात अशा सुरांची भेट होते.
    असेच एक गाणे "दिल एक मंदिर" या चित्रपटात आहे - "दिल एक मंदिर है" याच ओळीने गाणे सुरु होते. इथे एक गंमत बघता येते. वरील गाण्याच्या चालीतील सूर आणि या गाण्याच्या चालीतील सूर, एकमेकांशी ताडून बघितले तर खूप फरक आढळतो पण तरीही गाण्याच्या एका वळणावर, आपल्याला या रागाचे सूर आढळतात.
    "जानेवाले कभी नहीं आते,
    जानेवालो की याद आती है;
    दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है
    प्यार की जिसमें होती है पूजा, ये प्रीतम का घर है
    संगीतकार शंकर/जयकिशन यांनी या गाण्याची चाल बांधली आहे आणि तशी चाल काही फार अवघड नाही पण गाणे आपल्या मनावर विलक्षण परिणाम करते. ही किमया संगीतकाराची. या संगीतकार जोडीबद्दल एक गोष्ट अवश्यमेव सांगायलाच हवी. चित्रपट गीत हे प्रामुख्याने चित्रपटातील कथेला पूरक असे माध्यम आहे आणि ही जाणीव यांच्या प्रत्येक रचनेत आढळून येते.
    -- अनिल गोविलकर

  • प्रेम सगळ्यांचं सेम असतं?

     

  • पंढरीची वारी @ तलावपाळी, ठाणे

    पंढरीची वारी @ तलावपाळी, ठाणे

  • ज्येष्ठ तबला वादक झाकिर हुसेन

    आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते.

  • विद्यार्थ्यांसाठी मनोगत

    मुलांसाठी मनोगत 

    (हे मनोगत जरी विद्यार्यांसाठी असले तरी पालकांनी ते मुलांना -४-५ पासूनच्या – वाचून त्याचा अर्थ नीट  समजावून सांगावा.)


    श्री.सदानंद रामचंद्र भावे

  • मार्ग

    मार्ग

  • कुशल संवादपटू विलासराव

    माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी असंख्य लोकांच्या मुलाखती घेत त्यांच्याशी संवाद साधला आहे. यापैकी काही माणसे चांगलीच स्मरणात राहिली आहेत. त्यापैकी विलासराव देशमुख हे एक व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर त्यांच्याशी संवाद साधतानाचे ते सारे क्षण मनाच्या किनार्‍याशी ताजे होत डवरले. 

    – सुधीर गाडगीळ

  • आयफोन यंदा दहा वर्षांचा झाला

    जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. मोबाईल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलचे सी.ई.ओ स्टीव जॉब्स यांनी ९ जानेवारी २००७ रोजी सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये क्रांतिकारी आयफोन सादर करून आश्चर्याचा धक्काच दिला होता. पहिल्या आयफोनच्या लॉन्चिंगवेळी अॅपलने म्हटले होते की, हा फोन एक मोबाईल, आयपॉड आणि डेस्कटॉप यांचे संयुक्तस्वरूप असेल. यामध्ये इंटरनेटची सुविधा, दोन बोटांचा वापर कारून झूम करण्याची सोय, व अनेक अॅप्लिकेशन्सचा समावेश होता! यानंतरच टचस्क्रीन फोन्सची संख्या वाढीस लागली. सध्या आयफोन हा ग्राहकांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे. पहिला आयफोन जरी दहा वर्षांपूर्वी ९ जानेवारी २००७ ला लॉन्च झाला असला तरी याची विक्री २९ जून २००७ पासून सुरू झाली. टचस्क्रीनसह ३.५ इंच डिस्प्ले असलेला हा जगातला पहिला स्मार्टफोन होता. पहिल्या वर्षी अॅपलने या फोनच्या ६१ लाख युनिटची विक्री केली होती. २००८ या वर्षी आयफोनने ३G मोबाईल नेटवर्क आणि GPS ची जगाला ओळख करून दिली. अॅप स्टोअर आणि थर्ड-पार्टी अॅप इंटिग्रेशनचंही हे पहिलं वर्ष होतं. या फोनच्या लॉन्चिंग नंतर स्मार्टफोनच्या दुनियेत अनोखी क्रांती घडून आली आणि जगातील अनेक कंपन्या या अॅपलचा भागीदार होऊ लागल्या. नोव्हेंबर २००७मध्ये युके, जर्मनी आणि फ्रान्स मध्ये आयफोनची विक्री सुरु झाली. ऑगस्ट २००८मध्ये भारतात पहिल्यांदा आयफोन लॉन्च करण्यात आला. या फोनला एअरटेल आणि वोडाफोनसोबत लॉन्चे करण्यात आले होते. त्यावेळी ८ जीबी मॉडेलची किमत ३१ हजार रूपये आणि १६ जीबी मॉडेलची किमत ३६१०० रुपये होती. आयफोन लॉन्ची केल्यानंतर २००७ पर्यंत अॅपलमध्ये अॅप स्टोर सारखी सुविधा देण्यात आली नव्हती. आयफोनच्या पहिल्या अॅपचे नाव अॅप स्टोर असे होते. २०१६ ने टाईम्स मासिकाने जगभरातील ५० प्रभावशाली गॅजेट्समध्ये अॅपलला सर्वात पुढचे स्थान दिले होते. जून २००७ नंतर अमेरिकेच्या उत्पादनात अॅपलचे महत्वपूर्ण योगदान होते. सप्टेंबर २०१६ मध्ये कंपनीने iphone 7 आणि iphone 7 plus हे दोन फोन बाजारात आणले. सध्या या फोन्सचं क्रेझ पाहायला मिळत आहे. 32 GB, 64 GB आणि 256 GB मध्ये आयफोन 7 उपलब्ध आहे. तर आयफोन 7 प्लस हा 32 GB, 128 GB आणि 256 GBमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 मध्ये 2 GB रॅम तर आयफोन 7 प्लस 4 GB रॅम देण्यात आला आहे. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहे. गेल्या दहा वर्षात या फोनने व्यक्तिच्या फोनवर बोलण्याच्या पद्धतीपासून ते जीवनशैलीपर्यंत पुन्हा परिभाषित केलं आहे. मात्र, ही तर केवळ सुरूवात आहे (The best is yet to come) सर्वोत्कृष्ट गोष्ट बाजारात येणं अजून बाकी आहे '' असं दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सध्याचे सीईओ टिम कूक म्हणाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • दिल्ली शहराची आत्मकथा

    जीवाचा थरकाप उडवून देणारी घटना काल घडली आणि माझ्या नावावर कलंकाचा एक डाग माझ्या माथ्यावर लागला इ.सन १९४७ साली भारत देश स्वातंत्र झाला देशाची राजधानी म्हणून माझी निवड झाली.