(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एल टी ए स्कूल ऑफ ब्युटी

    LTA-School-of-beauty

  • गोमाता

  • बोथट बहिष्कारास्त्र ?

    आज आपल्या देशात असे एकही क्षेत्र नाही, जेथे चीनने घुसखोरी केलेली नाही. साध्या सुईपासून ते महागातल्या महाग इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंत आपण चिनी उत्पादनावर अवलंबुन आहोत. आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा अभ्यास करून टाकाऊ पण आकर्षक आणि कमी किमतीच्या वस्तू विक्रीस आणून चिनी ड्रॅगनने भारतीय बाजारपेठेला विळखा मारला आहे. चीनची भारतातील गुंतवणूक डोळे पांढरे करणारी आहे. त्यामुळे हा विळखा तोडायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला सक्षम व्हावे लागेल.

  • खवय्येगिरी करणारे.. आपण सारे खवय्ये

    पूर्वी स्वंयपाकघर फक्त स्त्रीयंपुरतेच मर्यादित असायचे.. आता मात्र हे चित्र बदललं आहे. त्याची प्रचिती आपल्यला येतेचं… जेव्हा आपण संजीव कपूरल पाहतो… दिवसेंदिवस बद्लत चाललेली आपली खाद्य संस्कृती किंवा आपल्या खाद्य संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी टि.व्ही शोजचा मोठा हातभार आहे. संजीव कपूरचे झी वरचा खाना खजाना ते अलिकडे स्टार टि.व्हीवर गाजत असलेला मास्तर शेफ़ ही उदाहरणे आहेच ..

  • पुण्यनगरी काशी – भाग ३ 

    धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान – सारनाथ

    गौतम बुध्दाच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचे स्थान म्हणजे सारनाथ.वाराणसीहून ९ किमी.अंतरावर आहे. हिंदु आणि बुध्द असे दोन महान धर्म 2500 वर्षापासून एकत्रीतपणे या परिसरात रूजले गेले आणि गुण्यागोविंदात त्यांची वाटचाल पुढे चालत राहिली. नेपाळच्या सीमेवरील लुंबीवन हे जन्मस्थान. बिहार मधील पाटलीपुत्र जवळील जागा ही त्याला झालेल्या साक्षात्काराची. मुख्य धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान सारनाथ कुसीनारा हे गोरखपूर जवळील स्थान जेथे जीवनयात्रा संपली.

    बुध्दानी आपल्या पाच शिष्याना एकत्र पहिले प्रवचन दिले ती जागा सारनाथ. सारनाथ अथवा सारंगनाथ हरणांच्या वास्तव्याची जागा त्या काळात या भागात जंगलात हरणांचे कळप असत व बुध्दाला हरणांबद्यल फार प्रेम होते. बुध्दाच्या स्मर्णार्थ श्रीलंकेच्या धर्ममालीनी या शिष्यानी मुलगंध कृती विहार बांधला. पुढे याच देशाचे बुध्द धर्म प्रसारक डॉ.संपूर्णानंद यानी अथक परिश्रम करून या विहाराचे नंदनवनच केले त्यामुळे याला जगनमान्यता मिळाली. विहाराचे देवळासारखे कळस चारी बाजूनी सुरेख उद्यान गाभाऱ्यात सोन्याचा फुलांच्या माळानी श्रृंगारीत धीर गंभीर उदात्त चेहऱ्याचा बुध्दाचा पुतळा मंत्र जप पठण नाही की उदबत्ती धूपाचा धूर नाही शांत धीरगंभीर वातावरण उल्लेखनिय आहे.

    मुख्य विहाराच्या बाजूनी अनेक देशानी बांधलेले विहार त्यातले चीन जपान व ब्रम्हदेशचे प्रेक्षणिय आहेत. बुध्दगया येथिल प्रसिध्द बोधीवृक्षाची फांदी या उद्यानात आणून लावली त्याचा झालेला प्रचंड मोठा डेरेदार वृक्ष व त्याच्या असंख्य फांद्याा लक्ष वेधून घेतात. राजा अशोकाने धर्मप्रसाराकरता चार भव्य स्तुप बांधले त्यातील एकच शिल्लक आहे. स्तुपाची उंचीच 150 ते 200 फूट व त्याचा परिघ डोळयात न मावणारा त्यावरील नक्षीकाम बनारसी साडीवर जसे असते तसे व कोपऱ्या कोपऱ्यांवर डोके टेकवणारे चीनी जपानी प्रवासी .

    अशोकस्तंभ ज्या जागी उत्खननात मिळाला त्याचे अवशेष त्याच जागी जाळीच्या पिंजऱ्यात सुरक्षित ठेवले आहेत. त्याच्यासमोर जैन मंदिर असून तेथे अशोकस्तंभाची 11 मीटर उंचीच्या मार्बलच्या दगडाची प्रतिकृती आहे गुळगुळीतपणा इतका की आपले प्रतिबिंब पडते. सारनाथ वस्तूसंग्रहालय हे वर्ल्ड हेरीटेज बोर्ड मान्यता दिलेले स्तुपापासून 1 किमी. अंतरावर असून परिसर इतका सुंदर व स्वच्छ व भव्यता याने आपण भारावूनच जातो. मुख्य प्रवेश दालनात अशोकस्तंभ विराजमान झालेला त्यावरील चक्रांचे नक्षीकाम हत्ती घोडा व वृषभ अगदी खरेच उभे आहेत असा भास होतो. आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता अतिशय योग्य शिल्पास मिळालेली आहे याची बालंबाल खात्री पटते. पुढे अनेक दालने बुध्दाच्या विविध मुर्ती देवदेवता नक्षीकाम व कोरीव काम केलेल्या कमानी दरवाजे अशा हजारो वस्तुंचे व्यवस्थित वर्गीकरण केलेले हया सर्व गोष्टींचा अभ्यास करणारे अनेक परदेशी पर्यटक दालनात ठाण मांडून बसलेले पाहिल्यावर वाराणसीच्या प्रेमात भारत व जगातील लोक का पडतात हे उमजते. रामनगर हे छोटे गाव वाराणसी पासून 35 किमी.अंतरावर गंगेच्या पलीकडील तीरावर वाराणसीचे राजा नरेष यांचे वास्तव्य रामनगर किल्ल्यात असे.गंगेवर मोटार व रेल्वेचे दोन भव्य पुल पाहिल्यावर गंगेच्या पात्राच्या भव्यतेची कल्पना येते. गावात सायकल व रिक्षा जाणारा पिंपानी केलेला पुल व त्यावरचा रस्ता एक अनोखा अनुभव आहे. तो केंव्हां व कसा बांधला त्याची निगराणी कशी करतात याबद्यल कुतहुलता होती पण बरोबर माहिती मिळण्याचे भाग्य नव्हते. किल्ला तीराला लागून चांगला 1 किमी लांब बुरूज 200 ते 300 फूट उंच आत अनेक दालने व वस्तुसंग्रहालय 17 व्या शतकातील तलवारी बंदुका राजघराण्यातील वापरले जाणारे उंची बनारसी सिल्कचे भरजरी कपडे भांडी कुंडी व्यवस्थित ठेवलेली त्याला साजेसा झुंबरांचा महाल आजकाल फिल्म शूटींगसाठी दिला जातो. एका भुयारी रस्त्याने तळघरात उतरलो तेथून 20 ते 30 उंच पायऱ्या चढून एका देवळापाशी आलो.लागूनच एक गच्ची होती समरा संथ वाहाणारे गंगचे पात्र मध्यात डुलणारा पिंप पूल पात्रातून डुलत चाललेल्या छोटया होडया खडया शिपायांसारखे ताठ उभे असलेले बुरूज वातावरणातील नीरव शांतता मनमुराद आनंदात बुडून गेलो. दसऱ्याला फुलांची सजावट व दिव्यांच्या रोषणाईत किल्ला उजळून निघतो. रामनगर ते वाराणसी प्रवास टॅक्सीने करत होतो इतका बेजबाबदार व अक्कलशुन्य ड्रायव्हर ज्या सुसाट वेगाने गाडी चालवत होता ते पाहून तो आम्हाला थेट मनकर्णिका घाटाचा र्स्वगाचा रस्ता दाखविणार असे वाटू लागले होते.

    अशा बहुढंगी शहरात विविध उद्योग चालतात. पक्षांची निर्यात व पैदास करण्याचे मोठे केंद्र विविध लोणची विविध खाण्याच्या पानांची उत्पादन केंद्रे माती व धातूची नक्षिकामाची भांडी याबरोबर कथ्थक नृत्यकेंद्रे शास्त्रिय संगिताची घराणी हे सगळे अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक शहराला भेट देत असतात ताजमहाल खालोखाल सर्वात ज्यास्त परदेशी पर्यटक वाराणसीत येतात. काही जण महिनेचे महिने अनेक कला शिकतात पुस्तके लिहीतात.

    रांड सांड सिरी सन्यासी इनसे बचे तो सैवे कासी अशा बहुढंगी शहरात बिस्मीलॅांखाँचे वास्तव्य होते तानसेन ते तुलसीदास कबिर या सर्वांचे हे माहेरघर नवरात्रीची रामलीला नौटंकी रात्र रात्र जागविणाऱ्या नाचगाण्याच्या मैफीली वेश्याव्यवसायातील दर्जा जोपासणाऱ्या कलावंतिणी अशा बहुढंगी कलांचा साज गंगेला लाभलेला आहे. सकाळच्या कोवळया सुर्यकिरणात चमचमणारे घाट मोहून टाकतात व हजारो या्रत्री गंगास्नानानी पापमुक्त होतात आणि जिवंतपणी स्वर्गमुक्तीचा मार्ग दिसल्याची प्रचिती येते. अशी आहे पुण्यनगरी काशी.

    डॉ अविनाश वैद्य

  • विदारक सत्य

    काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळही करून झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले. आपले शरीर आणि मन ह्या आपल्या रोजच्या जीवन-व्यवहाराशी इतके एकरूप झालेले असते कि यंत्र चालावे तसे काही लक्षात येण्यापूर्वीच चहा झाला, सकाळची कामे आटोपली आणि आश्रमात जाण्याची वेळ झाली.
    इथे मात्र मी थोडी अडखळले. इतर वेळेस पटकन विकेट गेट उघडून पलीकडच्या आश्रमामध्ये गेले असते. पण आज तिकडे जाण्यासाठी पायच उचलत नव्हते. कशीबशी ऑफीसमध्ये पोहचले. कालचा प्रसंग डोळ्यासमोरून जातच नव्हता. तशीच मनाची समजूत घालीत रोजच्या कामाला सुरुवात केली. देवाची पूजा केली आणि आश्रमात सकाळची ‘round’ मारायला निघाले.

    ह्या आश्रमात जवळ जवळ ३५ वृद्ध महिला आहेत. प्रत्येक खोलीत दोघी-दोघी रहातात. काही महिला वयाने जरी वृद्ध असल्या तरी शारीरिक रित्या व्यवस्थित आहेत. त्यांना रिकामटेकडे बसून रहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या सकाळी सकाळी गार्डन मध्ये पाणी टाक, गार्डनची सफाई देखरेख असली कामे त्या करत असतात. तिघी-चौघीजणी किचन मध्ये स्वयंपाकाला मदत करत असतात दोन वृद्ध महिला तर अश्या आहेत, त्यांना आजारी माणसांची सेवा करायला आवडते. तरुणपणी त्या दोघीजणी नर्स होत्या एकीने लग्न केलेले नाही तर दुसरीला मुलांनी टाकून दिले आहे. एकाच पेशातल्या असल्यामुळे त्या एकाच खोलीत राहतात आणि आजारी वृद्ध महिलांची काळजी घेतात. त्यांची आम्हाला खूप मदत होत असते. असा हा “वृद्धाश्रम” महिलांना सहारा देणारा असला तरी त्यातील वृद्ध महिला देखील आश्रम चालवण्यास सहकार्य देत असतात. नेहमीच खेळीमेळीचे सुंदर वातावरण हे ह्या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.

    सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रत्येक खोलीची तपासणी करणे हे माझे मुख्य काम असते. खास करून रोजच्या रोज चादरी बदलल्या जातात कि नाही आणि इतर स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टीवर जातीने नजर फिरवणे जरुरी असते. आणि हे सगळे करत असताना त्या सगळ्यांची थोडीशी विचारपूस हा माझा नित्यनियम आहे. ह्या उतारवयात आपली कोणी विचारपूस करत आहे किंवा कोणी उभे राहून आपल्याबरोबर गप्पागोष्टी करते आहे ह्या विचारानेच त्यांचे मन प्रफुल्लित होत असते. अशीच मधुबेन बरोबर गप्पा मारता मारता समोरच्या ७ नंबरच्या खोलीकडे लक्ष गेले. ही खोली आणि बाजूची ८ नंबर ही आमची मेडिकल रूम आहे. कोणी जास्त आजारी असले तर ह्या खोलात त्यांना हलवले जाते आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते. इथे हलवण्याचा हेतू असा असतो की बाकीच्या महिलांना त्रास होऊ नये आणि डॉक्टरांना सुद्धा त्यांच्या सवडीनुसार येणे शक्य होते आणि शांतपणे तपासणी करणे शक्य होते.

    ह्या ७ नंबरच्या खोलीत गेले दोन महिने ‘केसरबा’ होत्या. ‘केसारबा’ राजकोटच्या होत्या. खात्यापित्या घरच्या चांगल्या बाई होत्या खरे तर. वय जवळजवळ ऐंशीच्या आसपास होते. पण तब्येतीने धडधाकट होत्या. तीन-चार महिन्यापूर्वी खूप ताप आला होता आणि त्यानंतर हळूहळू त्यांची तब्येत ढासळतच गेली होती.

    दोन वर्षापूर्वी त्यांच्या शेजारील दोन-तीन बायका त्यांना इथे घेऊन आल्या होत्या. उंचीने थोड्याशा ठेंगण्या, जाडसर बांधा, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा गोल काचांचा जाडजूड चष्मा, नीटनेटकी नेसलेली साडी, गळ्यात लांब तुळशीची माळ, चेहऱ्यावर अतिशय चिंतेचे भाव आणि खांद्यावर अडकवलेली एक मोठी लांब झोळीवजा पिशवी अशा ह्या; त्या वेळच्या केसरबा आजही मला आठवत आहेत. पायात स्लिपर्स, त्या पण फाटक्या होत्या आणि डोळ्यावरचे संपूर्ण पांढरे केस, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाचे साक्षीदार, त्यांना शोभून दिसत होते.

    आमच्या नियमाप्रमाणे मी त्यांना तुम्हाला इथे का यावे लागले असा प्रश्न विचारला होता. साधारणपणे ह्या प्रश्नाचे उत्तर देताना बायका हळव्या होतात, रडायला लागतात. कित्येकवेळा तर महिन्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. परंतु ह्यांनी मला थोडक्यात पण स्पष्टपणे सांगितले होते, “एक दिकरो बाहर अमेरिका जतो रह्यो. बिजो एकलोच मने केम साचवे?” (एक मुलगा अमेरिकेला गेला तर दुसऱ्याने एकट्यानेच मला का सांभाळायचे?) आणि हळूच गालातल्या गालात हसल्या होत्या. त्यांच्या त्या चिंतीत चेहऱ्यावरचे हसू; त्या नाईलाजाने इथे आल्या आहेत हे सहज सांगून गेले होते. ज्या आशाळभूत नजरेने त्या माझ्याकडे बघत होत्या, त्या नजरेत इथे जागा मिळते कि नाही हा प्रश्न मी सहज वाचू शकत होते. सगळ्या formalities झाल्यावर त्यांना बारा नंबरच्या खोलीत कुसुमबेन बरोबर जागा दिली होती. ह्या नवीन वातावरणात थोड्याशा बिचकत बिचकतच त्यांनी खोलीत प्रवेश केला होता. खरे तर, बायकांना घरातल्या आठवणी विसरून इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला पण खूप वेळ लागतो. कित्येक वेळा त्यांची मानसिक स्थिती सुद्धा दोलायमान होत असते. परंतु केसरबा बघता-बघता इथल्या वतावरणात खूपच रमून गेल्या होत्या. हे पण कौतुकास्पदच होते.

    स्वयंपाकाची तर त्यांना अतिशय आवड होती. त्या स्वयंपाकखोलीत शिरल्या कि दोन्ही स्वयंपाकवाल्या मावश्या तर त्यांच्या assistant होऊन जायच्या. संध्याकाळची खिचडी तर त्यांच्याच हातची खाण्याची आम्हाला सगळ्यांना सवयच लागून गेली होती.
    ढोकळा, हांडवा ही तर त्यांची खासियत होती.

    साधारणपणे बायका इथे रुळल्या की कधीतरी गप्पा मारताना त्यांची इथे येण्याची कारणे सांगत असतात. सुनांना, मुलांना किंवा ज्यांच्यामुळे त्यांना इथे राहण्याची वेळ आली, त्यांच्याबद्दल चांगले वाईट बोलत असतात. साहजिकच आहे, “वृद्धाश्रम” कितीही चांगला, सुंदर, सर्व सुखसोयींनी उपलब्ध असला तरी तो “घर” तर नसतोच, तो पाश्चात्य देशातून आपल्याकडे आलेला एक पर्याय आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला सगळ्यांनी सोडून दिले आहे ह्याची मनात खंत तर असतेच. आयुष्यभर स्वतः च्या कष्टाने, हिमतीने उभ्या राहिलेल्या माणसाला कोणाच्या तरी मदतीवर जगायला कधीही आवडत नसते. शेवटी वृद्धाश्रमात राहून मरणाची वाट बघत उरलेले आयुष्य जगणे ही उतारवयात नाईलाजाने केलेली adjustment असते. आणि संपुर्ण आयुष्यातला मोठा पराभव असतो.

    ह्या केसरबाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या कधीही सुना-मुलांसंबंधी वाईट बोलल्या नाहीत. उलट मुलांचे तर भरभरून कौतुकच करत असत. कोणीतरी एकदा त्यांची थट्टा पण केली होती, “इतकी गुणी माणसे तुमच्याकडे असतांना तुम्हाला इथे का यावे लागले?” दोनच शब्दात त्यांनी उत्तर दिले होते, “माझे तकदीर” आणि परत गालातल्या गालात हसल्या होत्या. मार्मिक उत्तर देणे ही पण त्यांच्या वयाला शोभणारी खासियत होती. त्यांच्या अनेकविध गुणांमुळे आमच्या सगळ्यांच्याच त्या खूप लाडक्या झाल्या होत्या.
    तीन-चार महिन्यापूर्वी ताप आला होता तेंव्हा तापात मुलांची खूप आठवण काढत होत्या. आम्ही त्यांच्या मुलाला तसे कळवले होते पण मुलाने “वेळ मिळाला की येतो” असे उत्तर तिले होते. दुर्दैवाने त्याला कधीच वेळ मिळाला नाही. आणि त्यांच्या अमेरिकेच्या मुलाने तर थोडे फार पैसे पाठवले आणि “माझ्या आईला चांगल्या डॉक्टरांकरवी चांगले उपचार करा” असा सुंदर सल्ला आम्हाला दिला होता. झाले संपले. हळूहळू त्या तब्येतीने खंगत गेल्या. खंगत जाणाऱ्या तब्येतीबरोबर त्या मुलांची खूप आठवण काढत होत्या. कित्येक वेळा आम्ही त्या मुलांना कळवले. पण दोघांपैकी एकजण सुद्धा आला नाही. राजकोटच्या मुलाने तर फोनवर बोलण्यासाठी सुद्धा नकार दिला. त्याने कारण असे दिले की, “ती मला घरी घेऊन जा असा हट्ट करेल आणि मी ते करू शकणार नाही ह्याची मला भीती वाटते.” त्याच्या त्या उत्तराने आम्ही सगळ्या बायका फारच चिडलो होतो.

    शेवटच्या चार दिवस त्या कोमात होत्या. अगदी शेवटी थोड्या वेळासाठी शुद्धीवर आल्या होत्या. बाजूला उभ्या असलेल्या डॉक्टरच्या असिस्टंटलाच आपला मुलगा समजून त्याला हाक मारल्या होत्या आणि त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडून घेतला होता व पुढच्या एका क्षणात प्राण सोडला होता. आम्ही सगळे अवाक होऊन बघतच राहिलो होतो.

    आई गेल्यावर मुलाला फोन केला. राजकोट-गांधीनगर चार तासाचा रस्ता होता. पण मुलाने येण्यासाठी साफ नकार दिला. आम्ही त्याला बरेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण रडवेल्या आवाजात, “मला लाज वाटते, मी नाही येऊ शकत.” असे सांगून फोन बंद करून टाकला.

    खूप विचाराअंती अंत्यविधी उरकून टाकावा असा निर्णय घेतला. प्रत्येक बाई त्या मुलांना दोष देत होती. ‘केसरबा’ स्वर्गवासी झाल्या ह्याचे दुःख तर प्रत्येकाला होतेच पण मुलगा इतका वाईट वागू शकतो हे बघण्याचे दुःख जास्त होते. अनेक सेवाभावी संस्था अंत्यविधीसाठी पुढे आल्या होत्या. पण एका सेवाभावी संस्थेने असा निर्णय घेतला की दोन दिवस त्यांना Cold-room मध्ये ठेवायचे आणि तिच्या मुलाला पकडून घेऊन यायचे आणि त्याच्याच करवी अग्नीदाह द्यायचा. कारण शेवटपर्यंत त्या बाईंचा जीव त्या मुलात अडकलेला होता.

    दुसऱ्याच दिवशी त्या संस्थेतील मंडळींनी राजकोटच्या लोकांबरोबर co-ordinate केले व त्या मुलाला समजावून घेऊन आले. त्याच्याबरोबर त्याचा दहा वर्षाचा मुलगा पण होता. आल्यापासून तो अगदी ओक्साबोक्शी रडत होता. त्याच्या प्रत्येक कृतीत त्याला खूपच वाईट वाटले आहे ते जाणवत होते.

    आम्ही सगळेच त्याच्यावर खूप चिडलो होतो. ज्याच्या तोंडात जे येईल ते त्याला बोलत होते. त्याने एक नाही की दोन नाही गुपचूप सगळे ऐकून घेतले

    अंत्यविधीनंतर आश्रमाच्या काही formalities पूर्ण करण्यासाठी तो आश्रमात आला होता, त्या वेळेस देखील मी त्याला अनेक प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले पण तो नुसताच रडत होता. काहीच बोलत नव्हता. न राहवून कुसुमबेन बोलून गेल्याच, “आता रडायचे नाटक कशाला करतोस”, दुसरी एक बाई म्हणाली, “असली मुले देवाने दिली त्यापेक्षा निपुत्रिक राहिली असती तरी बरे झाले असते”.

    मधुबेन तर त्याच्या अंगावर जवळजवळ ओरडल्याच, “ह्या असल्या मुलांना जन्म देण्यापेक्षा बिचारीच्या पोटी एखादी मुलगी जन्माला आली असती तरी बरे झाले असते, निदान मायेने आईला भेटली तरी असती. जीव सोडताना तिच्याजवळ बसली तरी असती.” आणि रडायलाच लागल्या.

    आता मात्र इतका वेळ गुपचूप ऐकून घेणाऱ्या त्या मुलाने शांतपणे डोळे पुसले आणि म्हणाला, “मावशी आता पुरे करा, कबूल आहे मी आईला ‘वृद्धाश्रमात’ पाठवण्याचे खूप मोठे पाप केले आहे. पण हे करण्यासाठी मला प्रवृत्त करण्यात कोणाच्या तरी मुलीचाच खूप मोठा वाटा आहे. हे विसरू नका. आणि तुम्हाला इथे राहावे लागते आहे त्याच्यासाठी पण कोणाची तरी मुलगीच जबाबदार असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे”.
    केसारबाचाच मुलगा तो, त्यांच्याच सारखे थोडक्या शब्दात त्याने पूर्ण उत्तर दिले होते.

    त्याच्या उत्तराने आम्ही क्षणभर स्तब्धच झालो. पण असे जाणवले की प्रत्येक मुलीने थोडा समजूतदारपणा दाखवला तर कोणाच्याच आईला वृद्धाश्रमाचा आसरा घेण्याची वेळ येणार नाही.

    त्या रिकाम्या खोलीकडे बघताना सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा समोर उभा राहिला. रात्री पण त्या मुलाचे शब्द कानाच्या पडद्यावर आदळत होते आणि झोप आली नव्हती.

    केवढे ‘विदारक सत्य’ तो बोलून गेला होता. खरोखरीच देवाने घडवलेली ही प्रेमळ, कोमल स्त्री इतकी भयंकर निष्ठुर असते का?...........

    सौ वैजयंती गुप्ते
    (9638393779)

  • खेळाशीच `खेळ’

    राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा तोंडावर आल्या असताना एकीकडे स्पर्धेची तयारी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. तर दुसरीकडे रोजरी भ्रष्टाचाराची नवी प्रकरणे बाहेर येत आहेत. अशा परिस्थितीत खेळ, खेळाडू आणि देशाची प्रतिष्ठा याचा विचार कोणीही करत नाही. प्रत्येकाला या स्पर्धेनिमित्त वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे असून स्पर्धा झाल्या नाहीत तरी त्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

  • आतल्या आत

    खळखळ वाहणारी नदी, तिच्या काठावर असलेला वटवृक्ष. त्याच्या विस्तीर्णपणे पसरलेल्या पारंब्या. पारंब्यातून पुन्हा नव्या वृक्षाची पालवी फुटतेय, असे स्वप्नवत चित्र. फार पुर्वी बघायला मिळत होते. आता तसे राहिले नाही. असेल कुठे एखाद्या गावकुसात. आपल्याला ते माहित नाही इतकेच. आपल्याला खरे तर बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आपल्याला हे ही माहिती नसतं आपल्याच आत दडलेला वटवृक्ष अन त्याच्या विस्तारणाऱ्या पारंब्या अन पुन्हा त्या पारंब्यांना फुटणारी नवी पालवी… काही म्हणता काहीच माहिती नसतं. अस होण्याचं कारण काय असलं पाहिजे. खरे तर दोन कारणं असू शकतात का? एक म्हणजे आपण बाहेर वागतो वेगळे, आत असतो वेगळे. हे आत आणि बाहेरचं जे जगणं आहे तेच धोका देत राहतं सदैव आपल्याला आणि आपल्या मुळांना, आपल्या पारंब्यांना. वटवृक्ष जितका विस्तीर्णपणे पसरलेला असतो, तितकाच तो जमिनीत खुप आत गेलेला असतो ना. आठवतोय ना गावांत राहत असतांना घराच्या भींती छेदून आत आलेली वटवृक्षांची मुळं. आठवत असतील ना शाळेच्या व्हरांड्याला तडा पाडणारी वटवृक्षाची मुळं. अशा अनेक आठवणींची जत्रा भरत असते नेहमीच आपल्या आत. आतल्या आत… कधी तिचा आपण सरळ सामना करतो, कधी जत्रेत फेरफटका मारून येतो. कधी जत्रेत हरवून देखील जातो. पण वास्तवाची धग लागली की तत्काळ भानावर येतो. जत्रेतून बाहेर पडतो. कधी-कधी जत्रेत जाव असही वाटत नाही, आताची भरणारी जत्रा आधुनिक होत चाललीय म्हणून…

    आपण जसे बाहेरच्या जगासमोर असतो ना, तसे आपल्या आतल्या जगात नसतो. बाहेरच्या जगात मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर मी व्यक्त होत नाही, मात्र आतल्या आत व्यक्त होत राहतो… अगदी स्पष्टपणे… एखाद्या घटनेचा निषेध मी थेट करू शकत नाही, मात्र आतमध्ये तो निषेध मी केव्हाच केलेला असतो. मग मी असा का वागतो वेगवेगळा. आत वेगळा, बाहेर वेगळा. का ही भूमिका मी निभावतो आत-बाहेर वेगवेगळी. एखाद्या माणसाला, तेही सर्वसामान्य माणसाला थेट व्यक्त होण्यासाठी लागणारे वातावरण निर्माण झाले नाही का या समाजात. की त्या सर्व सामान्याला सतत दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय प्रभावीपणे. आरशात आपली प्रतिमा वेगळी दिसते. चांगली दिसते, सुंदर दिसते, खरीच तशी ती असते का? की केवळ असते ते आपले प्रतिबिंब. खरे, खोटे की आभासी. या आभासीत्वाचा आपल्याला नाद जडलाय. त्याच्या मागे धावताना वास्तवाला सोडून देतो ना आपण… आणि म्हणून मग पारंब्या वेगळ्या आणि मुळं वेगळं अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच एखाद्या घटनेत मी बाहेर वेगळा असतो आतमध्ये मी वेगळा असतो. बाहेर कितीही वणवा पेटला तरी मी व्यक्त होत नाही, शांत असतो नदीत पाय सोडून बसलेल्या वटवृक्षा सारखा…!

    दिनेश दीक्षित, जळगाव. (9404955245)

  • आजारपण आणि टेस्ट

    मुठभर डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टर बदनाम होतात. जर रिक्षाचे दर निश्चित होऊ शकतात तर आवश्यक तपासणीचे का नाही ? ज्या काही महत्वाच्या / खर्चिक टेस्ट आहेत त्या माफक दरात मिळणे आवश्यक आहे.

  • खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची !!

    दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथे फक्त भाषाच नाही तर खाण्यापिण्याच्या रितीभातीही बदलतात. महाराष्ट्राला जसा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे, तसेच या राज्याला स्थिर, संपन्नता देणारे भौगोलिक स्थानही लाभले आहे.