(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विट्यातील विजयादशमी पालखी शर्यतीची परंपरा

    सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे.

    दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळस्थान रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या दोन पालख्यांची आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठ्या, देवांना वारे घालणाऱ्या चवऱ्या, आबदागिरी, चांदीच्या काठ्या, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्या निनादात या पालख्या शर्यतीसाठी सज्ज होतात. या दोन्ही पालख्यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. काळेश्वर मंदिराजवळ पालख्या येतात. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यावेळी मूळस्थानची पालखी पाहुणी असल्याने या पालखीला पाच पाऊले पुढे थांबण्याचा मान दिला जातो. त्यानंतर उजव्या बाजूला मूळस्थानचे नागरिक तर डाव्या बाजूला विटेकर नागरिक पालखी घेऊन धावण्यासाठी सज्ज होतात.

    विजयादशमी दिवशी सायंकाळी 5 वाजता या दोन देवांच्या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्वर मंदिर ते खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्यासाठी पालखीचे खांदेकरी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे या पालख्या शिलंगण मैदानाकडे धावतात. त्यावेळी रस्त्यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळस्थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यातून सुटका करुन घेत या दोन्ही पालख्या शिलंगण मैदानाकडे धाव घेतात. या मैदानात प्रथम पोहोचलेली पालखी विजयी घोषित केली जाते. त्यानंतर पाठीमागून श्री भैरवनाथ, श्री म्हसवडसिद्ध व श्री भैरोबा या देवांच्या पालख्या शिलंगण मैदानात जातात. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. आपट्यांची पाने (सोने) देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.

    विजयादशमी दिवशी देवांच्या पालख्या पळविण्याच्या शर्यतीची परंपरा विटेकरांनी गेल्या 150 वर्षांपासून जोपासली आहे. जात, पात, धर्म, गट-तट आणि राजकारणाच्या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्वीरित्या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. विजयादशमी दिवशी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात जोपासलेली देवांच्या पालखी शर्यतीची परंपरा महाराष्ट्रात आजही सुप्रसिद्ध आहे. या शर्यती पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.

    (-- `महान्यूज' मधील दिलीप मोहिते, विटा यांच्या लेखावर आधारित. )

      October 23, 2015


  • सूर्याचा अंत!

    सूर्याचा अंत!

      August 17, 2010


  • वेरूळचा लक्ष विनायक

     औरंगाबादपासून अवघ्या २२ कि.मी.वर वेरूळ हे गाव असून तेथे लक्षविनायकाचे मंदिर आहे.

      October 9, 2012


  • मध्यमवर्गीय बुध्दीजीवींना विचारसरणी बदलावी लागेल

    काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून मोदींचे सरकार निवडून दिले. त्याच्याही प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजीवी तुटून पडताहेत.

    आपण खरं म्हणजे खुश राहण्याची आपली क्षमता गमावून बसलोय. आपली सहनशक्ती जवळपास संपत आलीय. एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले - वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बर्याच नेत्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवली नाही. हा व्यक्ती किमान काही निर्णय घेवून काही जनताभिमुख सुधारणा आणण्याचा प्रयत्न तरी करतोय तर बुद्धीजिवी लोक विनाकारण भ्रष्टाचारी लोकांना अनावधानाने का असेना साथ देताना दिसताय. भ्रष्टाचारी लोकांना तर मोदी नकोच आहे.

    पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, मोदी स्वतः पैसे खात नाही कुणाला खाऊ देत नाही. त्या माणसाने १२ वर्षे गुजरातचे नेतृत्व केले. विकासात पिछडलेला गुजरात सर्वात पुढे नेवून ठेवला. आज प्रत्यक्ष जावून बघा गुजरात मध्ये रस्ते आणि इतर प्राथमिक सुविधा इतर राज्यांच्या तुलनेत किती चांगल्या आहेत.

    आता पंतप्रधान असतानाही तो व्यक्ती १४-१६ तास काम करतो, विदेश दौऱ्यात हॉटेलात न थांबता विमानात झोप घेतो, त्याने अडिच वर्षात सुटी घेतलेली नाही, त्याच्यावर कुठलाच व्यवहारात पैसे खाल्ल्याचा साधा आरोप नाही, स्वतःच्या किंवा कुणा नातलगाच्या नावे मालमत्ता घेतल्याचे आढळलेले नाही, कुठलाही नातेवाईक लाभाच्या पदावर नाही, मंत्रिमंडळात निवडून शक्य तेवढे जादा प्रामाणिक लोक नेमलेले आहेत. सगळे नातेवाईक चरितार्थासाठी १०-१५ वर्षापूर्वी करीत होते तिच नोकरी व व्यवसाय करताहेत, त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल दिसत नाही. असं यापूर्वी भारतात घडल्याचं मला तरी माहीत नाही, तरी आपण अशा व्यक्तीच्या प्रत्येक निर्णयावर तुटून पडत राहिलो तर आपण चांगला म्हणणार कुणाला?

    आपण खुश आणि समाधानी कशाने होणार ? प्रत्यक्ष राम, कृष्ण किंवा शिवाजी जरी पंतप्रधान झाले तरी आपण टीकाच करणार का ? निर्णय घेताच चांगले-वाईट परिणाम दिसण्याआधीच टीका. उलट मी तर म्हणतो जनतेसाठी काहितरी करण्याची तळमळ असलेल्या अशा माणसाचा एखादा निर्णय चुकला तरी त्याच्या पाठिशी ठाम रहायला हवे, असे केले नाही तर भविष्यात कोणताही नेता जनकल्याणाच्या गोष्टीसुध्दा करणार नाही. सत्ता मिळाली की आपल्याच सात पिढ्यांचे कल्याण करुन मोकळा होईल. आजही ९९ टक्के लोक तेच करताहेत.

    पण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद !

    लेखक - डॉ. विवेक उपासनी, जळगाव.
    [ कृपया लेख लेखकाच्या नावासह फॉरवर्ड करावा ]

      November 21, 2016


  • महालय

    भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे.

      October 9, 2012


  • वाघाला पहायचंय, चला बोरला …

    वर्धा जिल्हा जसा गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो तसाच तो येथील वन वैविध्यामुळे ओळखला जातो. यात प्रमुख आहे तो बोर अभयारण्य प्रकल्प.बोरला जायचे ठरविले अन तयारीला लागलो.

      October 22, 2010


  • महाराष्ट्र २४ तास

    महाराष्ट्र २४ तास हे एक वेबपोर्टल आणि ऍंड्रॉइड ऍप्स आहे. विश्वातील ताज्या घडामोडी आणि विश्वकल्याणकारी विचार लोकांच्या घराघरात पोहोचविण्यासाठी व जनमानसातील विचारांना सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी “महाराष्ट्र २४ तास” सज्ज झाले आहे.

      November 19, 2013


  • वातावरणाच्या शुद्धीसाठी भेषज यज्ञ, अग्निहोत्र वगैरे…….

    पूर्वी आपल्याकडे विश्वाच्या सुख-शांती आणि कल्याणासाठी विविध यज्ञ केले जात. आज या यज्ञांविषयी उपेक्षेने बोलले जात असले तरी नासासारख्या जगन्मान्य संशोधन संस्थेने यज्ञांबाबत संशोधन केले आहे. त्या संशोधनानुसार यज्ञामुळे त्या परिसरातील हवेतील विषाणू व जिवाणू नष्ट होऊन वातावरणशुद्धी होते. यज्ञामध्ये धूप, वनस्पती, औषधी इ.ची किती प्रमाणात आहुती दिली. यावर यज्ञाचे कार्यक्षेत्र किती मोठे असेल ते ठरते.

      March 20, 2010


  • विकल जोगिया

    "तो हाच दिवस हो, तीच तिथी, ही रात; ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत;
    वळूनी न पाहतां, कापीत अंधाराला, तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
    हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान, त्या खुल्या प्रीतीचा खुलाच हा सन्मान;
    ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षांत एकदां असा "जोगिया रंगे."
    माडगूळकरांच्या या अजरामर ओळी खरेतर, 'जोगिया" रागाची एकही छटा दर्शवत नाहीत. त्यादुष्टीने, या कलाकृतींचा एकच एक ठाम अन्वयार्थ लावणे, हे त्या कलाकृतीवर काहीसे अन्याय करणारे असते आणि बहुदा हा एक (एकमेव नव्हे) निकष, उत्तम कलाकृतीबाबत मांडता येईल. आस्वादाच्या दृष्टीने हे गुंतागुंतीचे होऊ शकते परंतु सतत वेगवेगळ्या अर्थछटा दृग्गोचर होणे, हे आव्हानात्मक देखील असू शकते. एका बाजूने मांडायचे झाल्यास, कविता काय किंवा संगीत निर्मिती काय, याची निर्मिती ही नेहमीच "अबोध" मनातून होत असते आणि त्याचे चलनवलन नेमके शब्दबद्ध करणे, निरातिशय जिकीरीचे होऊ शकते आणि परत त्यात व्यक्तिपरत्वे अनुभूती येउन, मग अन्वयार्थ अधिक अवघड होऊ शकतो. पण, हीच कलेची खरी "मजा" आहे, हे लक्षात घेतल्यास, बऱ्याच शंकांचा निचरा होऊ शकतो.
    जोगिया रागाबाबतची माझी भूमिका यावरून लक्षात येणे शक्य आहे. "गंधार" आणि "निषाद" स्वर वर्ज्य असलेल्या या रागात, "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत", या स्वरांचे प्राबल्य आहे, इतके की, जरी "षडज","मध्यम" हे स्वर या रागांचे "वादी - संवादी" असले तरी मनात तरळत राहतात, ते हेच कोमल स्वर आणि या स्वरांवर घेतलेला "ठेहराव". संस्कृत ग्रंथानुसार रागाचे वर्गीकरण "भैरव" थाटात केलेले आहे आणि बहुदा याचा परिणाम असावा, पण रागाची वेळ ही, पहाटेचा पहिला प्रहर सांगितलेला आहे. आता, याच अनुषंगाने बघायचे झाल्यास, वर दिलेल्या माडगूळकरांच्या ओळी किती अन्वर्थक ठरतात, हे सहज ध्यानात येऊ शकेल. या रागाची खरी ओळख दाखवायची झाल्यास, "प ध नि ध प" किंवा "प ध म रे सा" या स्वरसंहतीचा मागोवा घेत राहिले तर समजून घेता येईल.
    एखाद्या कलाकाराची एखाद्या रचनेशी कायमची नाळ जुळते आणि ती रचना म्हणजे त्या कलाकाराच्या व्यक्तिमत्वाची नाममुद्रा म्हणून प्रस्थापित होते. पंडित भीमसेन जोशींची "पिया के मिलन की आस" ही रचना इतकी लोकप्रिय झाली की इतर कुणा गायकाने, ती रचना गायला दहादा विचार करावा. जोगिया रागाचा "अर्क" म्हणजे ही रचना, असे म्हणता येईल. विशेषत: तार सप्तकातील ठेहराव आणि आस, फारच अप्रतिम आहे.
    ज्या रागांत भावनिक आवाहन आहे, असेच राग बहुतांशी वेळा या गायकाने निवडल्याचे सहज ध्यानात येऊ शकते. आता, रागामध्ये भाव किंवा मूड का निर्माण होतो, हा संगीत सौंदर्यशास्त्रातील जटील प्रश्न आहे. परंतु, अनवट रागांपेक्षा प्रचलित राग, हे रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करू शकतात आणि त्यानुसार रागांची निवड करणे, हे धोरण या गायाकाच्याच बाबतीत नेमकेपणी दिसून येते. अर्थात, अशा प्रकारच्या निवडीने, गायनात साचेबद्धता येण्याचा धोका निर्माण होतो पण पंडितजींनी त्याबाबत सावधगिरी बाळगून, त्यात नाविन्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हे देखील समजून घेता येते. एकूणच संपूर्ण गायनाचा विचार केला तर, तानांची गुंतागुंत, आग्रा घराण्याच्या आघातयुक्त आणि पुनरावृत्त स्वरांच्या परिणामांवर अवलंबून असलेल्या तानांच्या अंगाने जाते, असे म्हणता येईल. शिवाय त्यात भर आहे, ती आवाजाच्या लगावातील विरोधसंबंधामुळे अवतरणाऱ्या नाट्यात्मतेची. बोल-लय, बोलतान वा तिहाई वगैरेंवर फारसा भर नाही परंतु अंतिम परिणाम रंगदार होतो की नाही, हीच कसोटी अखेरची असते आणि तिथे मात्र पंडितजी बाजी मारून जातात. ठुमरी अंगाने जाणारी रचना पण तरीही शब्दाचा आशय बघता, त्यानुसार केलेले असामान्य सादरीकरण, असेच इथे म्हणता येईल.
    भारतीय संगीतरचनाकारांना त्यांच्या शास्त्रोक्त संगीताकडील झुकावानुसार जोखणे योग्य आणि गरजेचे आहे, हा अत्यंत चुकीचा समज आहे. परंतु दुर्दैवाने, भारतीय रागसंगीताचे ज्ञान वा तत्संबंधीची सर्वसाधारण माहिती असणे, याला एक योग्यता-निकष म्हणून बरीच प्रतिष्ठा लाभली आहे. मग, संगीतरचनाकार कुठल्याही संगीतकोटीत काम करीत असू दे. या दृष्टीने विचार करता, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांचा विचार, रचनाकार म्हणून करताना, विश्लेषण करणे आवश्यक ठरते. वास्तविक त्यांची सगळी कारकीर्द बघितली तर आणि प्रसिद्धीचा अदमास घेतला तर, त्यांची गणना, तालाचे बादशहा म्हणून करण्यात येते आणि अर्थात ती फार एकांगी आहे. प्रस्तुत गाणे, "रात भर का है मेहमां अंधेरा" - चित्रपट "सोने कि चिडिया", मुद्दामून ऐकायला हवे.
    "रात भर का मेहमां अंधेरा,
    किस के रोके रुका है सवेरा".
    वास्तविक त्यांच्या संगीताचा ढंग बघता, त्यांना भारतीय रागसंगीत वा संबंधित बाबींचे फार तीव्र आकर्षण आहे,असे दिसत नाही. त्यामुळे, त्याच्या रचनांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तर, ते राग वापरतात, कारण विशिष्ट गीतप्रकार हाच मुळी एखाद्या रागात वा त्याच्या सावलीत मुरलेला असतो दुसरा भाग म्हणजे चाल अवतरते आणि नंतर त्यात रागाची बीजे सापडतात. प्रस्तुत गाणे दीपचंदी तालात बांधलेले आहे पण या गाण्याच्या बाबतीत, असे ठामपणे म्हणता येईल, गाण्याची लयच मुळी अशा प्रकारे बांधली आहे की तालवाद्य नसले तरी चालले असते!!
    गाण्याचा मुखडा, जर बारकाईने ऐकला तर ध्यानात येईल, इथे राग जोगिया आणि त्याचे स्वर केवळ आधार म्हणून घेतलेले आहेत. गाण्याची सुरवात अति तार स्वरांत सुरु झाली तरी गाण्याचा "मुखडा" घेताना, मात्र एकदम खालच्या सुरांत आणि शांतपणे सुरु होते.राग जोगिया इथे स्पष्टपणे दिसतो. पण पहिला अंतरा सुरु होण्याआधीचे, जे वाद्यमेळातून संगीत आपल्या समोर येते, ज्यात "कोरस" संगीताचा वापर केला आहे, तिथे तर स्पष्टपणे, ऑपेरा संगीताचा प्रभाव जाणवतो. याचा वेगळा अर्थ असा घेता येईल, रचनाकार, इथे गाण्याच्या अंतिम सादरीकरणाला महत्व देत आहे आणि त्यासाठी मग कुठूनही सांगीतद्रव्य उचलण्याची तयारी आहे, मग त्यात सुरवातीला ज्या रागाचा आधार घेतला आहे, त्याला सहज बिनदिक्कतपणे बाजूला सारण्याची हिम्मत आहे. याचाच दुसरा दृश्य परिणाम असा दिसतो, नैय्यर यांनी आकर्षक सांगीत विलासासाठी प्रचलित रागांत का होईना, पण नवे मुखडे समोर आणले असेही दिसत नाही. नवीन मुखडे बंधने, हे अनेकदा, सर्जनशिलतेचे उदाहरण म्हणून दाखवता येते. या संगीतकाराचे प्रयत्न याबाबतीत तरी कमी पडले, असे म्हणायला जागा आहे.
    सुप्रसिद्ध गायकनट बालगंधर्वांनी गायलेले आणि अतिशय लोकप्रिय झालेले "वद जाऊ कुणाला शरण" हे पद या रागावर आधारलेले आहे. खरतर, गाण्याचे ध्वनिमुद्रण काहीसे सदोष आहे पण तरीही खास वैशिष्ट्ये नक्कीच समजून घेता येतात. या गाण्याची चाल बघितली तर "जोगिया/कलिंगडा" या दोन्ही रागांचा आढळ या रचनेत ऐकायला मिळतो. अर्थात, रचनेचा मुखडा मात्र नि:संशय जोगिया रागावर आहे आणि याच रागाची दाट सावली आहे.
    "वद जाऊ कुणाला शरणागत, करी जो हरण संकटाते;
    मी धरीन चरण त्याचे, अग सखये".
    बालगंधर्वांनी लयसिद्धी प्राप्त होती. विशिष्ट मात्रांचे तालावर्तन सुरु झाले की त्याचे स्पंदन अंगी भिनल्यासारखे कायम राखणे, तबलजीने कसेही आड वाजवले तरी सुखाने गात राहायचे त्याना जमते, हे इथे लक्षात येते. मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, ही खास लयकारी पण शब्दांची किंवा अक्षरांची फेक जरा इकडे, तिकडे केल्याने सबंध तालावर्तन कसे उठून येते, हे देखील ऐकण्यासारखे आहे. सुरावटींचा पुनरावतार असावा, पण त्यांची पुनरावृत्ती टाळावी, हे एक कालासुत्र, त्यांच्या गाण्यात प्रत्ययाला येई.लयकारीची सूक्ष्म क्रीडा, हा विशेष इथे प्रत्ययाला येतो. आवाज फार बारीक नाही पण लगाव नाजूक आहे. विशेष म्हणजे त्यात अस्थिरता नाही. पट्टी उंच आहे पण तरीही मध्यममार्ग आहे. आवाज सहजपणे हलका होतो. आवाजात काही वेळा असे आढळते, त्याला स्वरावर स्थिर करून बघितले की तो जडावतो. तसे इथे काहीच घडत नाही. सहजपणे, दुसऱ्या स्वरावर जाणे, तिथे हलकीशी हरकत घेणे आणि त्यातून लय लांबविणे, इत्यादी अनेक सांगीत सौंदर्यवाचक क्रिया, या गाण्यात सहज ऐकायला मिळतात.आशयनिश्चिती करणारा एक काहीसा अमूर्त घटक म्हणजे त्यांच्या गायकीतील उत्कटता. तसे बघितले तर, उत्कटता ही मनोवृत्ती सर्जनशिलतेची पूर्वअट असते. बालगंधर्व जे काही गात असत, त्यात एक उत्कटता, एक भारलेपण होते आणि ते ऐकणाऱ्यापर्यंत संक्रांत होणे, ही अपरिहार्यता होती. तसे बघितले तर संगीताचा आशय, गवयी-गाण्याचा नाही. पण तरीही त्या गायनाची सावली सादरीकरणावर पडलेली आढळते.
    "गुंज उठी शहनाई" चित्रपटातील "कह दो कोई ना करे यहां प्यार" या गाण्यातून आपल्याला जोगिया रागाची ओळख करून घेता येते. संगीतकार वसंत देसायांनी या गाण्याची तर्ज बांधली आहे आणि मोहम्मद रफीनी गायले आहे. मुळात रफीचा पहाडी, दमदार आवाज, आणि गाण्याची रचना देखील त्या गळ्याला सुयोग्य अशी असल्याने, हे गाणे खूपच लोकप्रिय झाले.
    "बिखर गये बचपन के सपने, अरमानो की शाम ढले;
    कही सजे बारात किसीकी, कही किसीका प्यार जले;
    कह दो कोई ना करे यहां प्यार
    इस में खुशिया है कम, बेशुमार है गम;
    एक हंसी और आंसू हजार".
    गाणे पहिल्या सुरापासून वरच्या सप्तकात गायले गेले आहे आणि तिथे आपल्याला जोगिया रागातील, ज्याला "आस" म्हणतात अशा सुरांची भेट होते.
    असेच एक गाणे "दिल एक मंदिर" या चित्रपटात आहे - "दिल एक मंदिर है" याच ओळीने गाणे सुरु होते. इथे एक गंमत बघता येते. वरील गाण्याच्या चालीतील सूर आणि या गाण्याच्या चालीतील सूर, एकमेकांशी ताडून बघितले तर खूप फरक आढळतो पण तरीही गाण्याच्या एका वळणावर, आपल्याला या रागाचे सूर आढळतात.
    "जानेवाले कभी नहीं आते,
    जानेवालो की याद आती है;
    दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है
    प्यार की जिसमें होती है पूजा, ये प्रीतम का घर है
    संगीतकार शंकर/जयकिशन यांनी या गाण्याची चाल बांधली आहे आणि तशी चाल काही फार अवघड नाही पण गाणे आपल्या मनावर विलक्षण परिणाम करते. ही किमया संगीतकाराची. या संगीतकार जोडीबद्दल एक गोष्ट अवश्यमेव सांगायलाच हवी. चित्रपट गीत हे प्रामुख्याने चित्रपटातील कथेला पूरक असे माध्यम आहे आणि ही जाणीव यांच्या प्रत्येक रचनेत आढळून येते.
    -- अनिल गोविलकर

      November 4, 2018


  • या मार्गावरील सगळ्या line व्यस्त आहेत, आपला कॉल वेटिंग वर आहे

    बरेच विद्यार्थी प्रेमप्रकरणामुळे ग्रासलेले दिसतात तर काही इतर कारणांमुळे...

    मित्रानो एक सांगावस वाटते प्रेम करा पण अभ्यासावर करा.पोस्ट मिळण्यावर प्रेम करा. सद्या Girlfriend आणि Boyfriend जसे आठवड्याचे वार बदलतात त्याप्रमाणे बद्दलतांना दिसतात. पैसा आहे तोपर्यंत तुमच्याकडे Gf आहे. किंवा तुमच्यापेक्षा जास्त चांगला मिळाला की तुम्ही मग गेले कचराकुंडीत, आज 1 उद्या 2 रा, परवा 3 रा.....हि सध्या fashion चालली.काय काय वचन, जिने मरणे के साथ, janu काय , उल्लू काय, पिल्लू काय आणि काय काय सोंग सुरु असतात .लग्न करेल तर तुझ्याशीच, पण वेळ आली आणि थोडं का तुमचं आणि तीच खटकलं कि महाभारताच्या युद्धाला सुरवात.मग आमच्या घरचे नाही म्हणतात मी लग्न नाही करू शकत, मला माफ करून द्या, काय काय बहाणे सुरु होतात, आजपर्यंतचे सगळे वचन, वायदे सगळे मातीमोल. रोज तीच किंवा त्याच ऐकलं तर खूप छान, रात्रभर फोन Engage , सकाळी लायब्ररी किंवा कॉलेज मध्ये परत रामायण सुरु.घरी सांगतात की मी अभ्यास करते, मी लायब्ररी जाते आणि आई बाबा पण विश्वास ठेवतात, पण तिकडे जाऊन काय करतात तर गार्डन किंवा इतर ठिकाणी मजा उडवतात .इकडे माय बाप तुमच्यासाठी स्वतःच्या पोटाला मारून तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही लोक असले धंदे करता, थोडी लाज वाटली पाहिजे स्वतःची स्वतःला . " पहले खुद कुछ काबिल बनो फिर देखो दुनिया तुम्हारे पिछे दौडगी, तुम दुनिया के पिछे मत दौडो" सगळं काही तुम्हाला आपोआप मिळेल. Gf ला फिरवणे काय, आपला अमूल्य वेळ देऊनही एक दिवस ती तुम्हाला या मार्गावरील सगळ्या line व्यस्त आहे , आपला कॉल waiting वर आहे म्हणूनच ऐकवेल जाईल , परत तुम्ही Distrub व्हाल.म्हणून वेळ असतानाची योग्य वळणावर या.हे प्रेम वैगैरे काही नसते फक्त एक आकर्षण असते. प्रेम करायचं तर आईवर करा बहिणीवर करा, किंवा लग्न करून मोकळे व्हा आणि पत्नीवर आणि मुलामुलींवर प्रेम करा.हे असल्या प्रेमप्रकरणांच्या भानगडीत पडून आपलं आणि आपल्या घरच्या लोकांचं डोकं खराब करू नका.आज जेवढे निदर्शनास आलेत आणि बातम्यांवर ऐकलं किंवा वृत्तपत्र यांच्यावर प्रसिद्ध माहिती नुसार Love Marriage करणाऱ्यांचे बरोबर पटत नाही किंवा Divorce झालेय (काही अपवाद सोडता) आपल्या करियर कडे लक्ष द्या. स्वतःला सिद्ध करा.असल्या भांगडीतून बाहेर या. नाहीतर एक दिवस तुमचं Breakup ठरलं आहेच.आयुष्याच breakup झालं की तुम्हाला कोणीच विचारणार सुद्धा नाही .म्हणून तुमचीच line तुम्ही बदला म्हणजे कॉल waiting वर राहणार नाही. थेट जागी पोहचाल.परत एकदा सांगतोय हे प्रेम वैगेरे काही नसते हे फक्त सोंग असते.आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपलं आणि आपल्या लोकांचं आणि देशाचं नाव मोठं करा.

    या लेखबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपण 8275289828 या Whatsp क्रमांकावर पाठवू शकता.

    @Prof_Hiteshkumar_Patle

    -- प्रा. हितेशकुमार पटले

      May 25, 2017