(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाळासाहेबांचं स्मारक झालेच पाहिजे !

    बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.

  • विदारक सत्य

    काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळही करून झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले. आपले शरीर आणि मन ह्या आपल्या रोजच्या जीवन-व्यवहाराशी इतके एकरूप झालेले असते कि यंत्र चालावे तसे काही लक्षात येण्यापूर्वीच चहा झाला, सकाळची कामे आटोपली आणि आश्रमात जाण्याची वेळ झाली.
    इथे मात्र मी थोडी अडखळले. इतर वेळेस पटकन विकेट गेट उघडून पलीकडच्या आश्रमामध्ये गेले असते. पण आज तिकडे जाण्यासाठी पायच उचलत नव्हते. कशीबशी ऑफीसमध्ये पोहचले. कालचा प्रसंग डोळ्यासमोरून जातच नव्हता. तशीच मनाची समजूत घालीत रोजच्या कामाला सुरुवात केली. देवाची पूजा केली आणि आश्रमात सकाळची ‘round’ मारायला निघाले.

    ह्या आश्रमात जवळ जवळ ३५ वृद्ध महिला आहेत. प्रत्येक खोलीत दोघी-दोघी रहातात. काही महिला वयाने जरी वृद्ध असल्या तरी शारीरिक रित्या व्यवस्थित आहेत. त्यांना रिकामटेकडे बसून रहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या सकाळी सकाळी गार्डन मध्ये पाणी टाक, गार्डनची सफाई देखरेख असली कामे त्या करत असतात. तिघी-चौघीजणी किचन मध्ये स्वयंपाकाला मदत करत असतात दोन वृद्ध महिला तर अश्या आहेत, त्यांना आजारी माणसांची सेवा करायला आवडते. तरुणपणी त्या दोघीजणी नर्स होत्या एकीने लग्न केलेले नाही तर दुसरीला मुलांनी टाकून दिले आहे. एकाच पेशातल्या असल्यामुळे त्या एकाच खोलीत राहतात आणि आजारी वृद्ध महिलांची काळजी घेतात. त्यांची आम्हाला खूप मदत होत असते. असा हा “वृद्धाश्रम” महिलांना सहारा देणारा असला तरी त्यातील वृद्ध महिला देखील आश्रम चालवण्यास सहकार्य देत असतात. नेहमीच खेळीमेळीचे सुंदर वातावरण हे ह्या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.

    सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रत्येक खोलीची तपासणी करणे हे माझे मुख्य काम असते. खास करून रोजच्या रोज चादरी बदलल्या जातात कि नाही आणि इतर स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टीवर जातीने नजर फिरवणे जरुरी असते. आणि हे सगळे करत असताना त्या सगळ्यांची थोडीशी विचारपूस हा माझा नित्यनियम आहे. ह्या उतारवयात आपली कोणी विचारपूस करत आहे किंवा कोणी उभे राहून आपल्याबरोबर गप्पागोष्टी करते आहे ह्या विचारानेच त्यांचे मन प्रफुल्लित होत असते. अशीच मधुबेन बरोबर गप्पा मारता मारता समोरच्या ७ नंबरच्या खोलीकडे लक्ष गेले. ही खोली आणि बाजूची ८ नंबर ही आमची मेडिकल रूम आहे. कोणी जास्त आजारी असले तर ह्या खोलात त्यांना हलवले जाते आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते. इथे हलवण्याचा हेतू असा असतो की बाकीच्या महिलांना त्रास होऊ नये आणि डॉक्टरांना सुद्धा त्यांच्या सवडीनुसार येणे शक्य होते आणि शांतपणे तपासणी करणे शक्य होते.

    ह्या ७ नंबरच्या खोलीत गेले दोन महिने ‘केसरबा’ होत्या. ‘केसारबा’ राजकोटच्या होत्या. खात्यापित्या घरच्या चांगल्या बाई होत्या खरे तर. वय जवळजवळ ऐंशीच्या आसपास होते. पण तब्येतीने धडधाकट होत्या. तीन-चार महिन्यापूर्वी खूप ताप आला होता आणि त्यानंतर हळूहळू त्यांची तब्येत ढासळतच गेली होती.

    दोन वर्षापूर्वी त्यांच्या शेजारील दोन-तीन बायका त्यांना इथे घेऊन आल्या होत्या. उंचीने थोड्याशा ठेंगण्या, जाडसर बांधा, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा गोल काचांचा जाडजूड चष्मा, नीटनेटकी नेसलेली साडी, गळ्यात लांब तुळशीची माळ, चेहऱ्यावर अतिशय चिंतेचे भाव आणि खांद्यावर अडकवलेली एक मोठी लांब झोळीवजा पिशवी अशा ह्या; त्या वेळच्या केसरबा आजही मला आठवत आहेत. पायात स्लिपर्स, त्या पण फाटक्या होत्या आणि डोळ्यावरचे संपूर्ण पांढरे केस, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाचे साक्षीदार, त्यांना शोभून दिसत होते.

    आमच्या नियमाप्रमाणे मी त्यांना तुम्हाला इथे का यावे लागले असा प्रश्न विचारला होता. साधारणपणे ह्या प्रश्नाचे उत्तर देताना बायका हळव्या होतात, रडायला लागतात. कित्येकवेळा तर महिन्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. परंतु ह्यांनी मला थोडक्यात पण स्पष्टपणे सांगितले होते, “एक दिकरो बाहर अमेरिका जतो रह्यो. बिजो एकलोच मने केम साचवे?” (एक मुलगा अमेरिकेला गेला तर दुसऱ्याने एकट्यानेच मला का सांभाळायचे?) आणि हळूच गालातल्या गालात हसल्या होत्या. त्यांच्या त्या चिंतीत चेहऱ्यावरचे हसू; त्या नाईलाजाने इथे आल्या आहेत हे सहज सांगून गेले होते. ज्या आशाळभूत नजरेने त्या माझ्याकडे बघत होत्या, त्या नजरेत इथे जागा मिळते कि नाही हा प्रश्न मी सहज वाचू शकत होते. सगळ्या formalities झाल्यावर त्यांना बारा नंबरच्या खोलीत कुसुमबेन बरोबर जागा दिली होती. ह्या नवीन वातावरणात थोड्याशा बिचकत बिचकतच त्यांनी खोलीत प्रवेश केला होता. खरे तर, बायकांना घरातल्या आठवणी विसरून इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला पण खूप वेळ लागतो. कित्येक वेळा त्यांची मानसिक स्थिती सुद्धा दोलायमान होत असते. परंतु केसरबा बघता-बघता इथल्या वतावरणात खूपच रमून गेल्या होत्या. हे पण कौतुकास्पदच होते.

    स्वयंपाकाची तर त्यांना अतिशय आवड होती. त्या स्वयंपाकखोलीत शिरल्या कि दोन्ही स्वयंपाकवाल्या मावश्या तर त्यांच्या assistant होऊन जायच्या. संध्याकाळची खिचडी तर त्यांच्याच हातची खाण्याची आम्हाला सगळ्यांना सवयच लागून गेली होती.
    ढोकळा, हांडवा ही तर त्यांची खासियत होती.

    साधारणपणे बायका इथे रुळल्या की कधीतरी गप्पा मारताना त्यांची इथे येण्याची कारणे सांगत असतात. सुनांना, मुलांना किंवा ज्यांच्यामुळे त्यांना इथे राहण्याची वेळ आली, त्यांच्याबद्दल चांगले वाईट बोलत असतात. साहजिकच आहे, “वृद्धाश्रम” कितीही चांगला, सुंदर, सर्व सुखसोयींनी उपलब्ध असला तरी तो “घर” तर नसतोच, तो पाश्चात्य देशातून आपल्याकडे आलेला एक पर्याय आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला सगळ्यांनी सोडून दिले आहे ह्याची मनात खंत तर असतेच. आयुष्यभर स्वतः च्या कष्टाने, हिमतीने उभ्या राहिलेल्या माणसाला कोणाच्या तरी मदतीवर जगायला कधीही आवडत नसते. शेवटी वृद्धाश्रमात राहून मरणाची वाट बघत उरलेले आयुष्य जगणे ही उतारवयात नाईलाजाने केलेली adjustment असते. आणि संपुर्ण आयुष्यातला मोठा पराभव असतो.

    ह्या केसरबाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या कधीही सुना-मुलांसंबंधी वाईट बोलल्या नाहीत. उलट मुलांचे तर भरभरून कौतुकच करत असत. कोणीतरी एकदा त्यांची थट्टा पण केली होती, “इतकी गुणी माणसे तुमच्याकडे असतांना तुम्हाला इथे का यावे लागले?” दोनच शब्दात त्यांनी उत्तर दिले होते, “माझे तकदीर” आणि परत गालातल्या गालात हसल्या होत्या. मार्मिक उत्तर देणे ही पण त्यांच्या वयाला शोभणारी खासियत होती. त्यांच्या अनेकविध गुणांमुळे आमच्या सगळ्यांच्याच त्या खूप लाडक्या झाल्या होत्या.
    तीन-चार महिन्यापूर्वी ताप आला होता तेंव्हा तापात मुलांची खूप आठवण काढत होत्या. आम्ही त्यांच्या मुलाला तसे कळवले होते पण मुलाने “वेळ मिळाला की येतो” असे उत्तर तिले होते. दुर्दैवाने त्याला कधीच वेळ मिळाला नाही. आणि त्यांच्या अमेरिकेच्या मुलाने तर थोडे फार पैसे पाठवले आणि “माझ्या आईला चांगल्या डॉक्टरांकरवी चांगले उपचार करा” असा सुंदर सल्ला आम्हाला दिला होता. झाले संपले. हळूहळू त्या तब्येतीने खंगत गेल्या. खंगत जाणाऱ्या तब्येतीबरोबर त्या मुलांची खूप आठवण काढत होत्या. कित्येक वेळा आम्ही त्या मुलांना कळवले. पण दोघांपैकी एकजण सुद्धा आला नाही. राजकोटच्या मुलाने तर फोनवर बोलण्यासाठी सुद्धा नकार दिला. त्याने कारण असे दिले की, “ती मला घरी घेऊन जा असा हट्ट करेल आणि मी ते करू शकणार नाही ह्याची मला भीती वाटते.” त्याच्या त्या उत्तराने आम्ही सगळ्या बायका फारच चिडलो होतो.

    शेवटच्या चार दिवस त्या कोमात होत्या. अगदी शेवटी थोड्या वेळासाठी शुद्धीवर आल्या होत्या. बाजूला उभ्या असलेल्या डॉक्टरच्या असिस्टंटलाच आपला मुलगा समजून त्याला हाक मारल्या होत्या आणि त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडून घेतला होता व पुढच्या एका क्षणात प्राण सोडला होता. आम्ही सगळे अवाक होऊन बघतच राहिलो होतो.

    आई गेल्यावर मुलाला फोन केला. राजकोट-गांधीनगर चार तासाचा रस्ता होता. पण मुलाने येण्यासाठी साफ नकार दिला. आम्ही त्याला बरेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण रडवेल्या आवाजात, “मला लाज वाटते, मी नाही येऊ शकत.” असे सांगून फोन बंद करून टाकला.

    खूप विचाराअंती अंत्यविधी उरकून टाकावा असा निर्णय घेतला. प्रत्येक बाई त्या मुलांना दोष देत होती. ‘केसरबा’ स्वर्गवासी झाल्या ह्याचे दुःख तर प्रत्येकाला होतेच पण मुलगा इतका वाईट वागू शकतो हे बघण्याचे दुःख जास्त होते. अनेक सेवाभावी संस्था अंत्यविधीसाठी पुढे आल्या होत्या. पण एका सेवाभावी संस्थेने असा निर्णय घेतला की दोन दिवस त्यांना Cold-room मध्ये ठेवायचे आणि तिच्या मुलाला पकडून घेऊन यायचे आणि त्याच्याच करवी अग्नीदाह द्यायचा. कारण शेवटपर्यंत त्या बाईंचा जीव त्या मुलात अडकलेला होता.

    दुसऱ्याच दिवशी त्या संस्थेतील मंडळींनी राजकोटच्या लोकांबरोबर co-ordinate केले व त्या मुलाला समजावून घेऊन आले. त्याच्याबरोबर त्याचा दहा वर्षाचा मुलगा पण होता. आल्यापासून तो अगदी ओक्साबोक्शी रडत होता. त्याच्या प्रत्येक कृतीत त्याला खूपच वाईट वाटले आहे ते जाणवत होते.

    आम्ही सगळेच त्याच्यावर खूप चिडलो होतो. ज्याच्या तोंडात जे येईल ते त्याला बोलत होते. त्याने एक नाही की दोन नाही गुपचूप सगळे ऐकून घेतले

    अंत्यविधीनंतर आश्रमाच्या काही formalities पूर्ण करण्यासाठी तो आश्रमात आला होता, त्या वेळेस देखील मी त्याला अनेक प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले पण तो नुसताच रडत होता. काहीच बोलत नव्हता. न राहवून कुसुमबेन बोलून गेल्याच, “आता रडायचे नाटक कशाला करतोस”, दुसरी एक बाई म्हणाली, “असली मुले देवाने दिली त्यापेक्षा निपुत्रिक राहिली असती तरी बरे झाले असते”.

    मधुबेन तर त्याच्या अंगावर जवळजवळ ओरडल्याच, “ह्या असल्या मुलांना जन्म देण्यापेक्षा बिचारीच्या पोटी एखादी मुलगी जन्माला आली असती तरी बरे झाले असते, निदान मायेने आईला भेटली तरी असती. जीव सोडताना तिच्याजवळ बसली तरी असती.” आणि रडायलाच लागल्या.

    आता मात्र इतका वेळ गुपचूप ऐकून घेणाऱ्या त्या मुलाने शांतपणे डोळे पुसले आणि म्हणाला, “मावशी आता पुरे करा, कबूल आहे मी आईला ‘वृद्धाश्रमात’ पाठवण्याचे खूप मोठे पाप केले आहे. पण हे करण्यासाठी मला प्रवृत्त करण्यात कोणाच्या तरी मुलीचाच खूप मोठा वाटा आहे. हे विसरू नका. आणि तुम्हाला इथे राहावे लागते आहे त्याच्यासाठी पण कोणाची तरी मुलगीच जबाबदार असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे”.
    केसारबाचाच मुलगा तो, त्यांच्याच सारखे थोडक्या शब्दात त्याने पूर्ण उत्तर दिले होते.

    त्याच्या उत्तराने आम्ही क्षणभर स्तब्धच झालो. पण असे जाणवले की प्रत्येक मुलीने थोडा समजूतदारपणा दाखवला तर कोणाच्याच आईला वृद्धाश्रमाचा आसरा घेण्याची वेळ येणार नाही.

    त्या रिकाम्या खोलीकडे बघताना सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा समोर उभा राहिला. रात्री पण त्या मुलाचे शब्द कानाच्या पडद्यावर आदळत होते आणि झोप आली नव्हती.

    केवढे ‘विदारक सत्य’ तो बोलून गेला होता. खरोखरीच देवाने घडवलेली ही प्रेमळ, कोमल स्त्री इतकी भयंकर निष्ठुर असते का?...........

    सौ वैजयंती गुप्ते
    (9638393779)

  • आज सचिन ४४ चा झाला…

    सचिन नावाच्या गारुड्याची  मोहिनी आम्हा भारतीयांच्या मनावर निरंतर राहणार आहे. आणखी शंभर वर्षांनी कोणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही की २१ व्या शतकात सचिन रमेश तेंडूलकर नावाचे वादळ भारतीय क्रिकेट विश्वात घोंगावले होते…………कारण शतकातून एखादाच  असा शतकवीर सचिन जन्माला येतो.

  • मराठीचे विकासक.. आणि स्वतंत्र आस्तित्त्वाची मागणी

    २७ ऑक्टोबरच्या लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील एका लेखात श्री अशोक शहाणे यांनी लिहिले आहे की “सी-डॅक वाल्यांनी मराठीची वाट लावली… सगळ्याच भारतीय भाषांची वाट लावली”. यात तथ्थ्य किती हे त्यांचे त्यांनाच माहित पण वस्तुस्थिती अशी आहे की आज संगणकाशिवाय पर्याय नाही.

  • आपल्या मराठी भाषेची माहीती

    आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी

  • श्रेय…

    का फार मोठ्या कंपनीचे उदघाटन आहे म्हणून जय्यत तयारी झाली होती. कंपनीचे नाव श्रेय. कंपनीच्या सर्व मजुरांना आणि सहकारी लोकांना आमंत्रित केले होते. कंपनी सुरू होऊन बरेच दिवस झाले होते पण मग आता उदघाटन कसे कोण करणार आहेत हे कळले नाही. पण सगळेच उत्साहाने काम करत होते.

  • एकट्याचे संमेलन

    वात्रट-टीका

  • बेळगाव आणी गोयकार

    गोव्यासाठी बेळगाव फारच जवळच महत्वाचे शहर आहे. आपल्या हारातील मुख्य घटक दुध, भाजीपाला, फळे, अंडी हे गोव्याला बेळगावकरच पुरवितात.

  • अमीट कलावती

    "जें मत्त फुलांच्या कोषातुन पाझरले,
    निळ्या लाघवी दंवांत उलगडले,
    जें मोरपिसांवर सांवरले,
    तें --त्याहुनही --आज कुठेंसे
    पुन्हा एकदां
    तशाच एका लजवंतीच्या
    डोळ्यांमध्ये -- डोळ्यांपाशी --
    झनन -झांझरे मी पाहिले…
    पाहिलें न पाहिलें."
    पु.शि. रेग्यांच्या या ओळी वाचताना, आणि पुढील सगळी कविता वाचताना,मला नेहमी "झनन -झांझरे किंवा "ठिबक-ठाकडे" असे शब्द वाचायला मिळतात. वास्तविक, हे शब्द म्हणजे नादवाचक शब्द आहेत पण कवितेच्या आशयात अगदी नेमके बसले आहेत, इतके की त्यातून फार मोठा गहिरा आशय व्यक्त होतो. भावकवितेची बंदिश बांधताना, असे शब्द फारच चपखल बसतात. कलावती रागाचा विचार करताना, या ओळी माझ्या मनात बरेचवेळा येतात.
    संस्कृत ग्रंथांच्या आधाराने लिहायचे झाल्यास, या रागाचा समय "मध्यरात्र" दिलेला आहे आणि एका दृष्टीने बोलायचे झाल्यास, सगळीकडे शांतता पसरल्यावर, काळ्या अंगवस्त्रानिशी,प्रियकराला भेटण्यासाठी, गुपचूप निघालेली अभिसारिका आणि त्यांचे मिलन संकेत स्थान, याची आठवण होते.
    "रिषभ","मध्यम" वर्ज्य असलेल्या या रागात, कोमल निषाद वगळता, सगळे सूर शुद्ध स्वरूपात लागतात. "औडव-औडव" जातीचा हा राग "खमाज" थाटात याचे वर्गीकरण केले आहे. रागातील प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "सा ग प ध","प ध नि(कोमल)ध","ग प ध सा नि(कोमल)" या संगती ऐकायला मिळतात. या बाबत आणखी सांगता येईल, या रागातील "कोमल" निषाद" स्वराचे स्थान आणि त्या स्वरावरील ठेहराव, हा नेहमीच अवलोकनाचा आनंददायी भाग आहे.
    उस्ताद अमीर खान साहेबांनी सादर केलेला कलावती राग "सब बन थन आयो" ही ठाय लयीतील तर द्रुत लयीत "अनुमनी प्रिया सो राहत है" केवळ अवर्णनीय आहे. "इंदोर" घराण्याचे अध्वर्यू म्हणून, यांच्या गायनाचे वर्णन करता येईल. अत्यंत ठाय लय, शक्यतो मंद्र सप्तकात गायचे, अशी काही वैशिष्ट्ये, गायनाबाबत सांगता येतील.बरेचवेळा गायनातील लय इतकी धीमी असायची की, साथीला तबला असायची जरुरी आहे का? असाच प्रश्न पडायचा!! "धृपद" गायकीचा थोडा प्रभाव पडलेला जाणवतो, विशेषत: "तराणा" सादर करताना, बरेचवेळा "नोम-तोंम" पद्धतीचा अवलंब केलेला आढळतो. तसे बघायला गेले तर, यांच्या गायकीचा असर, भीमसेन जोशींपासून ते हल्लीच्या रशीद खान पर्यंत, बहुतेक गायकांवर पडलेला दिसून येतो. "ख्याल" गायकी कशी सादर करायची, याचा एक असामान्य मानदंड निर्माण केला. गायनात "अति विलंबित" लय तसेच "बोल-आलाप" आणि या आलापीतून सरगमचे सादरीकरण, यातून, त्यांनी आपली गायकी सजवली आणि रागदारी संगीताला संपूर्ण वेगळे वळण दिले,
    जरी तिन्ही सप्तकात गायन करण्याचा आवाका असला तरी देखील मंद्र सप्तक आणि शुद्ध स्वरी सप्तकाकडे ओढा अधिक. राग सादर करताना, त्याची "बढत" कशी करायची, टप्प्याटप्प्याने लय वाढवीत जायची आणि त्यातून आपल्या गायकीचा "खयाल" प्रदर्शित करायचा, हे त्यांच्या "ख्याल" गायनाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येते. प्रस्तुत रचनेत, बंदिश सादर करताना, प्रत्येक स्वर आपल्याला अक्षरश: "अवलोकिता" येतो. मघाशी, मी म्हटल्याप्रमाणे, इथे लय किती "विलंबित" आहे, याचा प्रत्यय घेता येतो. विशेषत: खर्जातील स्वर ऐकताना, तर अधिकच. समेवर येण्यासाठी कुठेही आटापिटा नाही. एखाद्या केशर सांजसमयी, विक्लांत पक्ष्याने निरवपणे फांदीवर यावे त्याप्रमाणे, इथे समेवर लय "विसर्जित" होते!! रागाचा "राग" म्हणून आणि त्याच्या "मूळ" प्रकृतीनुसार रागाचे सादरीकरण करायचे, हा विचार त्यांच्या गायनात प्रामुख्याने दिसून येतो.
    या रागाच्या बाबतीत आणखी एक सुंदर सादरीकरण आठवले. पंडिता प्रभा अत्रे यांनी सादर केलेले कलावती रागाचे मोहक रूप/ प्रत्येक कलाकाराचे स्व:ताचे असी खास आवडीचे राग असतात आणि त्या रागाच्या बाबतीत, तो कलाकार अतिशय चोखंदळ तसेच सतत प्रयोगशील असतो आणि याचे मुख्य कारण, त्या रागाच्या स्वभावाची झालेली संपूर्ण ओळख. असह वेळेस, आपल्याला एक बाब नक्की कळून चुकते, रागदारी संगीत म्हणजे केवळ स्वरांची बेरीज-वजाबाकी नव्हे!! कलावती राग जणू काही पंडिता प्रभा अत्र्यांना "आंदण" मिळाला असावा, इतके या रागाशी त्यांचे नाते जुळलेले आहे.
    "तन मन धन तोपे वारुं" ही द्रुत लयीतील बंदिश म्हणजे कलावती रागाचा अविस्मरणीय अलंकार आहे. ही बंदिश ऐकताना, त्यातील तान, हरकती आणि स्वरांचे थांबे इत्यादी "ठेहराव" इतके अचूक आणि सुरेल आहेत की ही बंदिश ऐकून झाल्यावर आपण आपले डोळे मिटून शांतपणे त्या स्वरमहालात रममाण व्हावे, इतकी भूल आपल्या मनावर पडते.
    असे ऐकायला मिळाले आहे की, रोशन यांना, "दिलरुबा" वाद्य अतिशय प्रिय होते आणि त्या वाद्यावर, त्यांनी प्राविण्य मिळवले होते. त्यांच्या अनेक रचनांत, त्यांनी या वाद्याचा सढळ हस्ते उपयोग केल्याचे दिसून येते. एकूणच भारतीय वाद्यांवर त्यांचे नितांत प्रेम होते, असे निश्चित विधान करता येईल. वाद्यांच्या वापराबाबत, दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. एक तर रचनाकारांचा एकंदर कल बघता, तो बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा यासाठी त्यांनी, खालचे किंवा मध्यसप्तकातील स्वर व संबंधित स्वर-मर्यादा यांतच वावर ठेवण्यात कसलीच कसूर केली नाही. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत म्हणजे विशिष्ट वाद्ये, यांच्याकडे रोशन यांचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधाचा सर्जक उपयोग, कधीही दुर्लक्षित केला नाही. किंबहुना एका गीतांत एकाधिक ताल किंवा लयबंध वापरणे, हे त्यांच्या प्रयोगशीलतेचे उदाहरण म्हणता येईल. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनींच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होतात. रोशन यांच्या रचनांच्या बाबतीत हा विशेष, विशेषत्वाने जाणवतो.
    "काहे तरसाये जियरा,
    यौवन रुत सजन जाके न आये".
    "काहे तरसाये जियरा" हे "चित्रलेखा" चित्रपटातील, आशा भोसले आणि उषा मंगेशकर, या जोडीने गायलेले गाणे इथे ऐकुया. ज्यांना या गाण्यात, रागाची "मुळावृत्ती" पडताळायची असेल तर हे उदाहरण, तसे गोंधळाचे ठरू शकते. गाण्याची सुरवात, रागाधारित आहे पण, पुढील रचनेत,राग बाजूला सारला जातो आणि चाल "स्वतंत्र" होते. पण अशा प्रकारचे स्वातंत्र्य, बहुतेक रचनाकार, नेहमीच घेत असतात. चित्रपट गीतात बरेचवेळा वापरला जाणारा त्रिताल आणि केरवा ताल इथे वापरलेला दिसेल. द्रुत गतीत चालणारे गाणे असल्याने, गाण्यातील हरकती इतक्या विलोभनीय आहेत की आपण या गाण्यात कधी गुंगून जातो, तेच समजत नाही.
    आता आपण, रोशन यांचीच एक अजरामर कव्वाली ऐकायला घेऊ. कव्वाली, या गायनाला, चित्रपट संगीतात, खऱ्याअर्थाने, प्रतिष्ठा मिळवून दिली असेल तर ती, रोशन यांनी, असे म्हटले तर वावगे ठरू नये. इथे आणखी एक विशेष नोंदवावासा वाटतो. रोशन यांना एकूणच द्वंद्वगीते किंवा युगुलगीते, याचे अतिशय आकर्षण असल्याचे, सहज ध्यानात येऊ शकते. सांगीतदृष्ट्या बघायला गेल्यास, दोन्ही किंवा अधिक कलाकारांच्या वाट्याला त्यांच्या आवाजानुसार गायन करायला देणे, किंवा तसा नेमका वाव देणे, हे एक रचनाकार म्हणून नेहमीच आव्हानात्मक ठरते. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, रोशन यांना, ज्याला "आम" राग म्हणतात, अशाच रागांमध्ये रचना करायला आवडत होते, असे दिसते. आणखी एक बाब निर्देशनास आणावीशी वाटते. त्यांच्या रचनेत, काव्याला फार महत्व दिल्याचे जाणवते.
    "ना तो कारवां की तलाश" या दीर्घ कव्वाली रचनेत, या विचारांचे प्रतिबिंब पडल्याचे, आपल्याला समजून घेत येईल. एका बाजूला हार्मोनियम, ढोलक, तबला आणि टाळ्या, यांची कुशल उपाययोजना आणि दुसरीकडे, कवीच्या शब्दातील नेमके भाव जाणवून देण्यासाठी, केलेले गायन!!
    एक तर ही रचना कालमापनाच्या दृष्टीने अतिशय दीर्घकाळ चालणारी आहे, त्यामुळे त्यात, अनेक गायक आहेत, जसे रफी, मन्नाडे, आशा भोसले, सुधा मल्होत्रा इत्यादी. आता इतके गाते आवाज एकत्र आणायचे म्हणजे रचना विस्तारित असणार, हे ओघानेच आले. कव्वालीची सुरवात अगदी नेमक्या कलावती रागानेच होते पण नंतर हळूहळू, कलावती रागात नसलेले सूर देखील इथे आणले गेले आहेत, जसे "शुद्ध निषाद" ऐकायला मिळतो तर काही ठिकाणी चक्क "खमाज" राग देखील जाणवतो. तरी देखील, गाण्यावर दाट छाया आहे ती, कलावती रागाचीच असे म्हणता येईल. जवळपास १० मिनिटांची रचना आहे आणि इतके गायक आहेत, पण प्रत्येक आवाजाला, आपले अस्तित्व ठळकपणे दाखवता येईल, अशा प्रकारे रचना बांधली आहे. सुरवातीच्या ठाय लयीतून, हळूहळू, द्रुत लयीत जो प्रवास होतो, तो खास करून ऐकण्यासारखा आहे. नेहमीप्रमाणे, या गाण्यात देखील सतार, सारंगी या वाद्यांचा अतिशय सुरेख वापर केलेला आढळेल.
    मराठी चित्रपट "मुंबईचा जावई" मध्ये अतिशय रसाळ आणि गोड गाणे आहे - प्रथम तुज पाहताना!! गायक रामदास कामत यांनी लोकप्रिय केलेले गाणे. या गाण्यात "कलावती" रागाची सुरेख झलक बघायला मिळते. माडगूळकरांची गेयताबद्ध रचना आणि त्याला सुधीर फडक्यांनी चढवलेला साज!! गाण्याची धाटणी बरीचशी पारंपारिक नाट्यगीताच्या धर्तीवर बांधलेली आहे पण तरीही केवळ रचनेचा साचा तसा आहे म्हणून गाण्यात तानांची भेंडोळी सोडलेली नसून, चालीतील अश्रूत गोडवा ओळखून, त्याच्या सहाय्याने गाणे सजवलेले आहे.
    "प्रथम तुज पाहता जीव वेडावला,
    उचलुनी घेतले नीज रथी मी तुला".
    माडगूळकरांच्या रचनेत बऱ्याचवेळा संस्कृत साहित्याची झलक दिसते पण तसा आधार घेताना, कवींचे कौशल्य असे, मराठी मातीशी त्या शब्दांचे नाते बेमालूमपणे जोडलेले असते आणि काव्यातील आशय अधिक गहिरा होतो. त्याच शब्दांचे औचित्य ओळखून सुधीर फडक्यांनी चालीची निर्मिती केली आहे.
    "प्रिया आज माझी नसे साथ द्याया,
    नको धुंद वारे, नको चांदण्या या".
    मराठी भावगीताच्या इतिहासात एक अढळ स्थान प्राप्त करणारी ही सुंदर रचना. या गाण्याची गंमत अशी आहे, या गाण्याचे शब्द, संगीतकार यशवंत देवांनी लिहिलेले आहेत. एखादा कलाकार बहुश्रुत कसा असावा हे बघायचे झाल्यास तर आपल्याला यशवंत देवांचे नाव निश्चित घ्यावेच लागेल. संगीतकार प्रभाकर जोग यांनी या कवितेला खरोखरच अप्रतिम न्याय दिलेला आहे. गाण्याच्या सुरवातीलाच, तालवाद्य म्हणून तबला येण्याआधी गिटारचे सूर आहेत आणि तिथे आपल्याला चालीच्या सुरांसोबत कलावती ऐकायला मिळतो.
    भावगीत काय किंवा चित्रपट गीत काय, गायनातून "अर्थपूर्ण" शब्दोच्चार करणे अत्यावश्यक असते आणि गाण्यातील प्रत्येक, केवळ शब्दच नव्हे तर अक्षराला, देखील "अर्थ" असतो, अशी जाणीव ठेवणारे फार थोडे गायक असतात आणि त्या गायकांत, सुधीर फडके यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. हे गाणे ऐकताना, याची तंतोतंत प्रचीती येते.
    -- अनिल गोविलकर

  • राशी व त्यांचे स्वभाव – वृश्चिक

    राशी :- वृश्चिक
    स्वामी :- मंगळ
    देवता :- जानकी जी
    जप मंत्र :- ॐ श्री क्लीं जानकीरामाय नमः
    उपास्यदेव :- श्री गणेश
    रत्न :- पोवळे

    जन्माक्षर :- तो न ना नृ नि नी नुनू नो नौ य या यी यू या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास आहे. ही रास असणारी माणसे शारीरिक दृष्ट्या चिवट, काटक व स्पष्टवक्ती असतात. त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असते आणि ती कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.