(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • रेस्क्यू

    सत्तावीस वर्षीय इलेक्ट्रिक ऑफिसर डेक वर असणारी लाईट दुरुस्त करत होता उंची जास्त नसल्याने सेफ्टी बेल्ट आणि हार्नेस न लावता तो छोटयाशा शिडीवर उभा राहून काम करत होता. मेन डेकवर शिप साईड जवळची लाईट असल्याने शॉक लागल्या बरोबर त्याचा तोल गेला आणि तो समुद्रात पडला.

  • नराधमांचे क्रौर्य

    हे कोठून येतात, त्यांच्यार ही वेळ कोणामुळे आली, त्यांची तस्करी कोण करते, असे सारे प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण होत असून समाज शिक्षणाअभावी केवळ स्वार्थापायी लहान मुलांची तस्करी करणार्‍या या लोकांमुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होत आहे.

  • आपण आपल्याशी

    साधनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक सुखाला भारतीय संस्कृतीने कमी महत्त्वाचं मानलं. कारण सुखाचं साधन जवळ असल्याचं सुख जेवढं मोठं, तेवढंच ते साधन नष्ट झाल्याचं, हरवल्याचं दुःखही मोठं ! टी. व्ही., रेडिओ, कॅसेट प्लेअर, व्हिडिओ अशी असंख्य करमणुकीची साधनं आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलीत आणि त्यात फारसं गैर काही नाही. उलट काही प्रमाणात ते अपरिहार्यच आहे. रोजचं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक धकाधकीचं, चिंतेचं बनतं आहे.

  • काय चुकतं नक्की माझं

    कोणी म्हणत तू खूप पुढचा आहेस… कोणी म्हणत चांगला आहे तर कुणी वाईट…  नक्की मी कसाय हे कुणालाच कस कळलं नाही अजून..? मी कुठे चुकलो ज्यामुळे माझेच मित्र माझ्याबद्दल वेगळं वेगळं बोलतेत …? खरंच काय चुकीचं वागलो.. कुठे चुकतो मी …..??? काय चुकत नक्की माझं…..?

  • विज्ञान आणि अध्यात्म ः विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता-गीतेत सामावलेले विज्ञान.

    पौराणिक ग्रंथात भरपूर विज्ञान सामावलेले आहे. पण ते अध्यात्मात बुडालेले आहे. गीतेच्या मुखपृष्टावर असलेल्या चित्रासंबंधाने या लेखात विचार मांडले आहेत.

    धार्मिक ग्रंथातील विज्ञान, शोधा म्हणजे सापडेल, पहा म्हणजे दिसेल आणि विचार करा म्हणजे कळेल.

  • कवितेस कारण की…

  • मैत्रीण

    शैक्षणिक मानसशास्त्रात “प्रबलन” ही एक सुंदर संकल्पना मांडली आहे. स्त्रीमध्ये दुसर्‍याचे स्वार्थ निरपेक्ष कौतूक करण्याची एक उपजतच शक्ती असते. तिच्यामुळे तिच्या भोवतीचे सहज प्रबलन होते. म्हणून स्त्रियांनी शिक्षक झाले पाहिजे. “बाई शाळा सोडून जातात.” या गंगाधर गाडगीळांच्या कथेचे हेच मर्म आहे. गुरुजी शाळा सोडून गेले असते तर नायकाला एवढे वाईट वाटले नसते.

  • सुप्रसिद्ध संगीतकार मा. कृष्णराव यांची स्वाक्षरी

    मा.कृष्णराव फुलंब्रीकर यांना अनेक सन्मान लाभले त्यामध्ये त्यांना ‘ संगीत कलानिधि ‘ ही पदवी , भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप , बालगंधर्व सुवर्ण पदक , विष्णुदास भावे सुवर्ण पदक तर जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. १९७२ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी रत्नसदस्यत्व देऊन त्यांचा गौरव केला.

  • नवीन व्रत

    एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली बी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण.

    तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट आणि what's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काहि दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल. चिकटून बसलेले बी.पी. शुगर वागू लागले फॉर्मल.

    ती आनंदली,what's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली.

    तिची एक सखी निर्मळ मनाची ! ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत ! उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही.

    स्त्री म्हणाली, बघ, रोज सकाळी उठताक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GNचा वेळोवेळी जप करावा.

    यथासमय देवाच्या देव्हार्‍यात डोकवावे, मन मोकळे करावे.

    एका ग्रुपने what's app ला वाहिलेले सर्व काही दुसऱ्या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे.

    रुसू नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये. सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ. शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ.

    तुम्हीही व्रत हे धरावे,कामकाज काळवेळ सांभाळूनी त्रिकाळ what's app ला पुजावे.

    जसा हा देव त्या दोघी सखींना पावला, तसा तुम्हासही पावो. व्रत सर्व बंधुभगिनींनी करावे. साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ....मन लाऊन वाचणाऱ्याला एक लाभ,फॉरवर्ड करणाऱ्याला अनेक लाभ.!!

  • कॉपीमुक्तीचे दिवास्वप्न

    दहावी-बारावीच्या परीक्षांमधील कॉपीचे वाढते प्रकार रोखणे हे मोठे आव्हान आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने काही नवे उपाय सुचवले. त्यात विद्यार्थ्यांनी कॉपीविरोधातील शपथ घेणे तसेच कॉपी करणार्‍यांवर कठोर कारवाई यांचा समावेश आहे. पण, या उपायांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यावरच कॉपीमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.