(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • राशी व त्यांचे स्वभाव – सिंह

    राशी :- सिंह
    स्वामी :- सूर्य
    देवता :- भगवान मुकुंद
    जप मंत्र :- ॐ बालमुकुंदाय नमः
    उपास्यदेव :- सूर्य देवता
    रत्न :- माणिक
    जन्माक्षर :- म मृ मा मि मी मू मेमो ट टा ट्र टि टी ट्री टे ट्रे टै टौ ट्रा अग्नीतत्व राशी आहे. या ग्रहावर रवि (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही ओळखली जाते. कुंडली मध्ये ५ आकड्याने ही दर्शवली जाते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. ही अग्नितत्व, पुरुष राशीराशी आहे.
    राशीचा स्वामी सूर्य (ज्योतिष) आहे. यांना अधिकार गाजवणे आवडते. भरपूर स्फूर्ती तत्वनिष्ठता आकर्षता, आशावाद असलेली ही राशी आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिम्मत ठेवतात. मिरवण्याची हौस असते, मान सन्मान आवडतात. ताकद आणि चपळाई भरपूर असते.

  • बुद्धांची गया बोधगया !

    शांतीचा केला खात्मा…….

  • मुलाखत : राधा ही बावरी फेम सौरभ गोखले

    प्रश्न : तुझ्या शाळेतील एखादी आठवण सांग.

    सौरभ : शाळेतील आठवणी तर खुप आहेत. त्यापैकी एक सांगतो… आमच्या शाळेतही नाटकं बसवायचो तेव्हा मी छोटा शिवाजी करत होतो आणि तो सीन सुरु होता.. दादाजी कोंडदेव शिवाजीला हत्यारे चालवायला शिकवत होते. तेव्हा आम्ही स्टेजवर तोफ सुद्धा लावायचो आणि एकदा असं झालं की मी तोफ लावल्यावर त्याची ठिणगी दादाजी कोंडदेव बनलेल्या मुलाच्या धोतरावर उडाली आणि त्याचं धोतर जळालं. तेव्हा मी लगेच त्याला वींगेत ढकलले. आणि बिच्चारा सावरासावर करुन परत आला.. हा एक गमतीदार प्रसंग आठवतो.

  • कुरकुर

    रमा सकाळची कामे भरभरा उरकून. मशीन वर शिवायला बसली होती. लग्न सराई. संक्रात आणि इतर अनेक कारणाने शिलाईचे काम भरपूर आहे म्हणून ती लवकरच आवरुन मशीन वर शिवायला बसली होती पण आज मशीनचा मूड वेगळाच. खट खट असा आवाज आला आणि मशीन चालू होत नाही.

  • हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.

    सर्व हिंदू हे एकत्वाचे दर्शन आहे. हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ ऋग्वेद आहे आणि याच्या अध्यायनाने असे निष्कर्ष काढले जाते कि यांत इंद्र, मित्र, वरूण इत्यादि देवतांची स्तुती केली गेली आहे. अश्या बहुदेव वादाची कल्पना स्वयं ऋग्वेदच करतो.

  • जागतिक चहा दिन, पाऊस, चहावाला व व्हीस्की

    इंग्रजांनी आणलेले इंग्रजी शिक्षण, रेल्वे गाडी, रोगप्रतिबंधक लशी,इंग्लिश दारू व या सर्वांच्याही पेक्षा कंकणभर सरस भारतात आणलेला चहा. या सर्वांनी भारतीय सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय व रोजच जगणंच व्यापून टाकलेल आहे.

  • किल्ल्यातील मुंबई ते किल्ल्याबाहेरील आधुनिक मुंबई

    मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखमालेत मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुंबईतली दळणवळण साधने, रस्तावाहतूक, ट्राम, रेल्वे, टॅक्सी-रिक्शा यापासून थेट आत्ताच्या मेट्रोच्या होऊ घातलेल्या जाळ्याकडे एक नजर टाकलेय. मुंबईतली घरबांधणी आणि त्यातील स्थित्यंतरे, म्हाडा, मुंबईतली “चाळ”संस्कृती, सहकारी गृहनिर्माण संस्था, एसआरए, क्लस्टर कॉक्रिट टॉवर्स आणि इतर बरंच काही..... याबद्दल वाचा या लेखमालेत...


    मुंबईच्या इतिहासातील रंजक गोष्टींची माहिती घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात मुंबईचा इतिहास बघायलाच हवा.

    शिलाहार राजवटीतील बिंब नावाच्या राजाने महिकावती (माहीम) शहर वसवले आणि तेथे किल्ला बांधून आपली राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता 'प्रभादेवी' ही होती असे म्हणतात. या राजाच्या राजवटीत लोक सुखी होते. जमीन, महसूल, न्याय वगैरेच्या बाबतीत बिंब राजा न्यायी व आदर्श होता.

    नंतर अनेक राजसत्तांनी मुंबईवर राज्य केले. १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजेशाही कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला. तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अतिमहत्त्वाकांक्षेने आणि अतिउत्साहाने इथल्या लोकांचा अनेक प्रकारे छळ केला. त्यांनी हिंदूंची अनेक देवळेही भ्रष्ट केली. वान्द्रयापासून वसई पर्यंत अनेक ठिकाणांचे ख्रिस्तीकरण झाले होते.

    पोर्तुगीजांकडून साष्टी बेटे इंग्रजांकडे गेल्यामुळे मुंबईचे गोवा झाले नाही हे आपले नशीब. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा राजकारण करण्याकडे विशेष मुत्सद्दी दृष्टीकोन होता. त्यांना केवळ व्यापार करायचा नव्हता तर येथे राज्य करायचे होते. त्यामुळे त्यांनी त्याचदृष्टीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती.

    माझगाव, परळ, वरळी हा भाग म्हणजे त्यावेळची मुख्य मुंबई. येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. परळ व शिव येथे कुणबी राहत. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू आणि साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती. १६७० मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनियावर्ग येथे आला. तेंव्हापासून गुजराती वस्ती वाढू लागली.

    इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळची मुंबईची लोकसंख्या जेमतेम दहा हजारांच्या आसपास होती. १८७५ मध्ये ती ६० हजारांवर गेली. यामध्ये ब्राह्मण, पाठारे प्रभू, पाचकळशी, माळी, ठाकूर, भोई, आगरी इत्यादि जमातीची मंडळी होती.

    मुंबईत कापडाच्या गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आणि मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. १९२० ते १९३० च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या १० लाखांच्या वर गेली.

    किल्ल्याबाहेरच्या आधुनिक मुंबईचा जन्म :

    १८२० ते १८३० च्या दरम्यान टुमदार मुंबई शहर ४५०० चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते. निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या मुंबईची लोकसंख्या केवळ अडीच लाखाच्या आसपास होती. किल्ल्याच्या तटबंदीबाहेर १००० यार्डापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कुणाला परवानगी नव्हती.

    १८२९ साली गव्हर्नरने आपले राहण्याचे ठिकाण किल्ल्याबाहेर हलवण्याचे ठरवले. त्याआधी जवळजवळ ७० वर्षे मुंबईचा गव्हर्नर अपोलो स्ट्रीटवर वास्तव्याला असे आणि तेथूनच मुंबईचा कारभार बघत असे. गव्हर्नर किल्ल्याबाहेर रहायला गेला म्हटल्यावर अनेक श्रीमंत लोकांनीही परळ, माझगाव, भायखळा, मलबार हिल वगैरे भागात वस्ती करायला सुरुवात केली.

    एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आज आकंठपणे बिअरबार संस्कृतीमध्ये बुडालेल्या मुंबईत पहिल्यांदा प्यायचा सोडा मिळू लागला तो १८३५ मध्ये. बर्फ मिळायला मुंबईकरांना आणखी २ वर्ष वाट बघायला लागली.

    १८३८ साली मुंबई आणि लंडन यामधील नियमित टपाल सेवा सुरु झाली. ही आणि अशीच रंजक माहितीही बघूया कालांतराने येणार्‍या काही लेखांमध्ये.....

    -- निनाद अरविंद प्रधान
    व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
    www.marathisrushti.com

    मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग १
    (क्रमशः)

  • वैभवशाली भूप

    मराठीत एकूणच बहुतेक सगळ्या भूपाळ्या या भूप रागाच्या सावलीत तरी आहेत किंवा रागावर आधारित आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे सकाळच्या वेळेचा शुचिर्भूत भाव आणि प्रसन्न मनोवस्था, यांचा भूपालीच्या रचनेत अंतर्भाव होत असल्याने, चालीसाठी भूप राग जवळचा वाटणे साहजिक आहे.

  • यह खौफ नक्सलियों का नहीं था। बल्कि उस मीडिया का था। जिनका कैमरा उनके आंसू कैद कर मार्मिक स्टोरी पेश कर उन्हें अपना हथियार बना रहा था।

    आम्ही वेगळे झाल्यावर उपाशी राहू अथवा मरुत याच्याशी तुम्हाला काय देणे घेणे . नाही तरी तुमच्या राज्यात राहून आम्हाला आत्महत्या कराव्याच लागतात ना? मग वेगळे होवून परिस्थिती शी टक्कर देत आम्ही जगण्यास शिकुत, तुम्ही फेकलेल्या अनुदानाच्या तुकड्यान ची वाट पहावी लागणार नाही. एक मात्र खरे या परिस्थितीत आम्ही आत्महत्या मात्र करणार नाही.

    105 बलिदाने आपणास 50 वर्षा नंतर ही भावनिक black making करता आठवतात पण 10000 शेतकऱ्यांच्या तुमच्या राजकारण्यांनी केलेल्या हत्त्या दिसत नाही

  • एक स्पर्श

    संध्याकाळी शिंप्याकडे जायला निघाले होते. रस्ता ओलांडताना मोबाईल वाजला म्हणून बाजूला उभी राहून बोलत होते. बोलता बोलता सहज समोरच्या रस्त्याकडे लक्ष गेले. एक वयोवृद्ध आजी आजोबा एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. दोन पावले पुढे यायचे कि समोरून भरधाव गाड्या यायच्या आणि ते परत उभे राहायचे. असा प्रकार माझे फोनवर बोलून संपले तरी चालूच होता.

    नकळत त्यांच्याकडे बघून मला माझ्या आईवडिलांची आठवण आली. तेही असेच दोघे एकटेच राहतात. आणि एक विचार मनाला चाटून गेला की ते दोघेपण असेच करत असतील का? आणि काही समजण्यापूर्वीच मी त्या आजी आजोबांच्या जवळ पोहचले होते. दोघांच्या मध्ये उभे राहून दोघांचेही हात धरले.
    दोघांनीही माझे हात इतके घट्ट धरून ठेवले होते कि लहानपणी एखादे मूल आपल्या आईचा हात रस्त्यातून चालताना आपण चुकू नये म्हणून जितका घट्ट धरत असेल ना तितके घट्ट माझे हात त्यांनी धरले होते. आम्ही रस्ता क्रॉस केला. त्यांच्या नजरेतून मला अगदी धन्यवाद देण्याची त्यांची इच्छा दिसून येत होती. त्यांना मी टाटा केला आणि परत दोघेही एकमेकाला आधार देत निघून गेले.

    पण त्यांच्या त्या हाताच्या स्पर्शाने मला किती तरी छोट्या मोठ्या स्पर्शाची आठवण करून दिली. असे वाटले की आपण या जगात जेंव्हा जन्माला आलो असू तेंव्हा आपल्या आईने केलेला ‘तो’ स्पर्श कसा असेल? या अथांग मोठ्या जगात येताना तिच्या त्या स्पर्शाने तू इथे एकटी नाही याची जाणीव करून दिली असेल. त्या स्पर्शात किती माया, प्रेम आणि आत्मविश्वास वाढवणारी ताकद असेल नाही? तिला पण आपल्याला केलेल्या पहिल्या स्पर्शाने तिच्या पूर्णत्वाची कदाचित जाणीव झाली असेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता माझ्याकडे नाहीत. पण असाच काहीसा अनुभव आपल्या मुलाला जन्म दिल्यावर मला झाला असावा असे वाटते.

    मुलाला त्याने पडू नये म्हणून आईवडील त्याचा हात धरून चालवतात. एवढेच काय कितीतरी गोष्टी अगदी लिहायला, वाचयला सगळेच त्यांनी हात धरून शिकवलेले असते. त्या त्यांच्या स्पर्शातला ओलावा, प्रेम त्या मुलाला त्या वेळी कळतही नसेल. मला सुद्धा तो तेंव्हा कळला नव्हता किंवा आजपर्यंत त्याची कधी आठवणही आली नव्हती. पण त्या आजी आजोबांनी इतक्या विश्वासाने माझा हात धरला की, या सगळ्याची आठवण करून दिली. हाताच्या स्पर्शात किती ताकद आहे, किती भावना आहेत, किती विलक्षण अद्भुत शक्ती आहे याची जाणीव करून दिली.

    एक साधी गोष्ट आहे की मूल आजारी पडल्यावर त्याच्याजवळ बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत त्याला दुखण्याची जाणीव कमी होईल असा प्रयत्न आईवडील करत असतात. दिवस आहे का रात्र आहे याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नसतो. त्यांच्या त्या हाताच्या स्पर्शात त्या मुलाबद्दल वाटणारी काळजी, प्रेम, माया ओथंबून वाहत असते. पण त्या मुलाने कधीतरी काहीतरी एखादी चूक केली आणि शब्दाने समजावूनही जर तो सुधारला नाही तर तोच प्रेमळ मायाळू हात एखादा फटका मारायला चुकत नाही. पण त्या कठोर स्पर्शातही त्या मुलाबद्दल वाटणारी काळजी आणि प्रेमच असते. पण तेही आपल्याला त्या वेळेस समजत नाही.

    जीवनाच्या या वाटचालीतून खूप स्पर्श असे वेगळे वेगळे सुखद, दु:खद अनुभव, आठवणी देऊन जात असतात. मुलगी लग्न होऊन सासरी जाताना आईवडिलांच्या मिठीत होणारा तो स्पर्श किंवा अनुभव जो मी स्वत: अनुभवला आहे, त्यात अपार प्रेम, अपार काळजी आणि अपार आनंद या तिन्ही गोष्टींचा संगम असतो. तर सासरी गेल्याबरोबर हात धरून घरात नेणाऱ्या नवऱ्याच्या हाताच्या स्पर्शात या पेक्षा अगदी वेगळ्या भावना असतात ’घाबरू नकोस मी तुझ्याबरोबर आहे’ असे मनोबळ वाढणारी अनुभूती असते.

    अशा कित्येक सुंदर गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात पण आयुष्याच्या आणि कर्तव्याच्या रहाटगाडग्यात आपण इतके अडकलेले असतो की या गोष्टींचा विचार करायला आणि त्यातील सौंदर्य टिपायला आपल्याला वेळच नसतो. पण आज या आजी आजोबांच्या हाताच्या स्पर्शाने सगळ्या आठवणी जाग्या करून दिल्या आणि ज्या आईवडिलांनी आपल्याला हात धरून मोठे करून या जगातल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली त्यांना त्यांच्या उतारवयातल्या वाटचालीत आपल्या हाताच्या स्पर्शाची खूप जरुरी आहे याचीही आठवण करून दिली.

    सौ. वैजयंती गुप्ते.
    9638393779.