महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
जिल्ह्यात चिपळूण, पोफळी, खाडपाडी, खेरडी, लोटेमाळ, रत्नागिरी, जयगड, देवरुख, दापोली, राजापूर याठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. पावसजवळ फिनोलेक्स ही शेतीसाठी लागणारे पाईप्स तयार करणारी कंपनी आहे. मासेमारी आणि आंबा व आनुषंगिक उत्पादने हे जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे
छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, शरद पवार, पद्मश्री- डी.जी.केळकर, पं.भीमसेन जोशी, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार.
महाराष्ट्र राज्यातील प्राचीन यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. निरगुडा नदीकाठी वसलेले हे शहर चुन्याच्या व्यापाराचेही प्रमुख ठिकाण आहे.
अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे शहर प्राचीन काळात ‘भिल्लठाणा’ म्हणून ओळखले जाई. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे निवासस्थान वा मुक्कामाचे स्थान होय. काळाच्या ओघात या भिल्लठाणाचा अपभ्रंश होत-होत ‘बुलढाणा’ हे नाव रूढ झाले असे म्हटले जाते.
महाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती.
क्वालाट हा बहारीनमधील प्राचीन किल्ला आहे. १६ हेक्टरमध्ये पसरलेल्या या किल्ल्यावर पोर्तुगीज वास्तुशैलीची छाप आहे.
कारवारच्या रविंद्रनाथ टागोर बीचवर नोव्हेंबर २००६ मध्ये आयएनएस चपळ या युद्धनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे.
मालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे या गावाजवळ, समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डोंगरच दृष्टीपथात येतो.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच शेगावमध्ये संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ निर्माण केले असून देश- विदेशातील पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. या विस्तीर्ण परिसरात आध्यात्मिक तसेच मनोरंजन केंद्रही आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti