महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला नाशिक जिल्हा पर्यटनाच्या विविध अंगांनी नटलेला आहे. नैसर्गिक आणि जैविक वैविध्य जिल्ह्याच्या समृध्दतेचे एक अविभाज्य अंग आहे. रामकुंड परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला ते काळाराम मंदिरदेखील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात महादेव काळी, भिल्ल, पारधी, कोरकू व निहाल यांसारख्या जमातीचे लोक राहतात. कोरकू व निहाल या जमातींची वस्ती ‘जळगाव-(जामोद)’ या तालुक्यात जास्त आहे. मेहकर व चिखली तालुक्यांत ‘बंजारा’ या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांची संख्या ही अधिक आहे
आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असल्यामुळे या जिल्हयाला धार्मिक पावनस्पर्श लाभला आहे. याचबरोबर जालन्याजवळील उपग्रह अनुश्रवण भूकेंद्रामुळे (सॅटेलाईट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन ) आधुनिक भारतात या जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हरियाणा राज्यातील पानीपत येथे ७०० वर्ष पुरातन मकबरा आहे. मुस्लिम सुफी संत कलंदर शहा यांचे पवित्र तीर्थस्थळ हा मकबरा आहे. इ.स. १२०९ मध्ये कलंदर शहा यांचा जन्म झाल्याची नोंद इतिहासात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. एकेकाळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती.
कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर असून यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणूनही ते ओळखले जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा कराडचेच. महाराष्टाचे कार्ल मार्क्सं म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव मोहिते हेही कराड तालुक्यातीलच.
कराडमध्ये कृष्णा व कोयना या महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या नद्यांचा संगम आहे. याला प्रीतिसंगम असे म्हणतात.
अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून येथे स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर व मठ आहे.
अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे. २० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी तवदार तळे अस्पश्यांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे श्री गोविंदप्रभु यांची समाधी आहे. महानुभव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील कृष्ण आणि रामनाथ मंदिर पुरातन आहे. चैत्र व आषाढ पौर्णिमेला येथे महानुभव पंथाची मोठी यात्रा भरते.
Copyright © 2025 | Marathisrushti