महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
न्यू झीलंड हा ओशनिया खंडामधील एक द्वीप देश आहे. प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या १,५०० किमी पूर्वेस उत्तर बेट व दक्षिण बेट ह्या दोन प्रमुख बेटांवर वसलेला न्यू झीलंड त्याच्या अति दुर्गम स्थानामुळे जगातील सर्वात उशिरा शोध लागलेल्या ठिकाणांपैकी एक होता.
सिडनीतील ओपेरा हाऊसची रचना डच आर्कोटेक्ट जॉन उत्झॉन यांनी केली. २० ऑक्टोबर १९७३ रोजी त्याचे उद्घाटन झाले.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाहीच्या काळात सातारा हे राजधानीचे ठिकाण बनले होते. महाराणी ताराबाई यांच्या काळात येथूनच राज्यकारभाराची सूत्रे हलत.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोयना अभयारण्य आहे. कोयना जलाशयाच्या कडेकडेने कोयना अभयारण्य पसरले आहे.
४२६ किलोमीटर एकूण क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्याला सन १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलात कोयना अभयारण्याचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत.
हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश पीठापैकी हे एक पीठ होय. या स्थानांजवळील तलावात वर्षाऋतूत नेहमी कमळ असतात. कमळ म्हणजे पदम आणि आलय म्हणजे घर – म्हणून याला पद्मालय असे म्हणतात.
आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असल्यामुळे या जिल्हयाला धार्मिक पावनस्पर्श लाभला आहे. याचबरोबर जालन्याजवळील उपग्रह अनुश्रवण भूकेंद्रामुळे (सॅटेलाईट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन ) आधुनिक भारतात या जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अकराव्या शतकात विजापूर हे आदिलशाहीचे राजधानीचे ठिकाण होते. येथील गोल घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे.
झारखंडची राजधानी रांची शहरापासून जवळच मैकलुस्की गंज वसवण्यात आली आहे. भारतातील अॅग्लो इंडियन लोकांसाठी हे प्रसिध्द रहिवासी स्थळ आहे.
फ्रान्समधील पॅरिस शहरात असणार्या बॅसिलिका चर्च बांधण्यास १८७५ मध्ये सुरुवात झाली, तर १९१४ ला त्याचे बांधकाम पूर्ण झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti