महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
महाराष्ट्रात ३०७१४ सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत. यापैकी १८६१४ संस्था सुरु असून ८१८८ संस्था बंद पडल्या आहेत. ३८४७ संस्था काही कारणांमुळे बंद आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४७७८ तर सर्वाधिक कमी ७८० संस्था नवी मुंबई विभागात आहेत.
महाराष्ट्रात २२ महानगरपालिका, २२२ नगरपरिषद, ३३ जिल्हा परिषद व ३५१ पंचायत समित्या तर २८८१३ ग्रामपंचायतीद्वारे कामकाज चालते.
चित्तूर हे केरळ राज्यातल्या पलक्कड जिल्ह्यातील एक शहर आहे. या शहरात असलेले दुर्गा मंदिर चित्तूर भगवती नावाने प्रसिद्ध आहे. सोकनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरातील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे.
महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.
कारवारच्या रविंद्रनाथ टागोर बीचवर नोव्हेंबर २००६ मध्ये आयएनएस चपळ या युद्धनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे.
इटलीतील व्हिकेंझा हे शहर दुसर्या सतकात वसविण्यात आले आहे.
कोसोव्हो हा बाल्कन भौगोलिक प्रदेशामधील एक अंशत: मान्य भूपरिवेष्ठित देश आहे.
देहू हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. येथेच आपल्या विठ्ठलभक्तीतून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले.
मुबलक प्रमाणात जलसंपदा असल्याने गोंदिया जिल्हा कृषिप्रधान तर आहेच, शिवाय येथे कृषिप्रधान लघु उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. या जिल्ह्याचे बरेचसे क्षेत्र हे जंगलांनी व्यापले असल्याने येथे वन उत्पादनांशी निगडीत उद्योग मोठया प्रमाणावर चालतात.
चीनमधील यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस हे धरण जगातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti