(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत काही उद्योग या जिल्ह्यात केले जातात. वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत.

  • दक्षिण अफ्रिका : प्लॅटिनमचे कोठार

    जगात दक्षिण अफ्रिका या देशात प्लॅटिनमचे सर्वाधिक साठे आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यात प्लेटिनमचे साठे मोठ्या प्रमाणात अढळून येतात. म्हणून ओडिशा राज्याला भारताचे प्लॅटिनमचे कोठार असे म्हटले जाते.

  • वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर रिसोड

    रिसोड हे वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर ते वसलेले आहे. या शहराचे पूर्वीचे नाव ऋषीवंतनगर असे होते. या शहरातील अमरदासबाबा मंदिर प्रसिद्ध आहे.

  • सिंधूदुर्गातील रेडीचा गणपती

    रेडी हे गांव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असून तेथील गणपती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सुप्रसिद्ध गणपती आहे.

  • इराक

    इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण, दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

    ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) – हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले.

  • सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

    महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठारावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे. ५० मीटर उंचीच्या मनोर्‍यावरुन तीन पात्यांच्या विंड टर्बाईनव्दारे वार्‍याच्या गतीज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते व यातून पवनऊर्जा निर्मिती केली जाते.

  • कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

    ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ही चव सोबत ठेवण्यासाठी किंवा आवडत्या पाहुण्यांचा पाहुणचार करतांना या मेव्यापासून बनविलेले पदार्थ उपयोगात आणले जातात. रत्नागिरीच्या गावागावातून असे पदार्थ तयार स्वरुपात मिळतात.

    फणसपेाळी, आंबापोळी, आंबावडी, विविध प्रकारची सरबते, कैरीचे पन्हे, चॉकलेट्स, टीन किंवा बाटलीबंद आंब्याचा रस, चिक्की आदी विविध पदार्थ पर्यटक आवडीने खरेदी करतात. या प्रक्रीया उद्योगावर अनेकांचे रोजगारही अवलंबून आहेत. या पदार्थंाच्या माध्यमातून कोकणची ओळख देशाच्या विविध भागात जाते.

  • खजाना विहीर

    महाराष्ट्रातील बीड हे अतिशय पुरातन शहर आहे. बिंदूसरा नदीच्या काठी वसलेल्या या शहरानजीक खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. निजामशहाच्या सलाबत खान या सरदाराने या विहीरीचे बांधकाम केले आहे.

  • साओ टोमे आणि प्रिन्सिप

    साओ टोमे आणि प्रिन्सिप अटलांटिक समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनार्‍यापासुन साधारण २२५ किमी अंतरावर आहेत.