महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.
लेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसर्या स्वतंत्र देशाच्या पुर्णपणे अंतर्गत असलेला लेसोथो जगातील केवळ ३ देशांपैकी एक आहे (सान मारिनो व व्हॅटिकन सिटी हे इतर दोन्ही देश इटलीमध्ये आहेत.) मासेरु ही लेसोथोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील नगरपालिका ही राज्यातील जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरमध्ये अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत.
आंबोली घाटात आंबोलीपासून तीन कि.मी. वर असलेला मुख्य धबधबा हे पावसाळी हंगामातील सर्वात मोठे आकर्षण आहे. लक्षावधी पर्यटन या धबधब्याला भेट देऊन स्नानाचा आनंद लुटतात.
दक्षिण कोरिया हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद्र आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख चौरस किमी तर लोकसंख्या ५ कोटी असून सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.
द ग्रेट ब्लू होल हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठे समुद्री विवर आहे.
शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे.
जळगाव हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून कापूस, खाद्यतेले, केळी या कृषी मालाची मोठी बाजारपेठ येथे आहे.
येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प देशभर प्रसिध्द आहेत. या शहरात मराठीसोबतच अहिराणी बोलीही बोलली जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti