महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
धुळे शहरात इ.स. १९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली.
सेनेगाल हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.
चीन (इंग्रजी: China/ चायना; नवी चिनी चित्रलिपी: 中国; जुनी चिनी चित्रलिपी: 中國; फीनयीन: Zhōngguó; उच्चार: चाँऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (नवी चिनी चित्रलिपी: 中华人民共和国; जुनी चिनी चित्रलिपी: 中華人民共和國; फीनयीन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: चाँऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ) हा आशियातला, जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. बौद्ध धर्म हा चीनचा प्रमुख धर्म असून देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% (१२२ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे
वर्धा या नदीच्या नावावरूनच ‘पालकवाडी’ या छोट्या गावापासून विकसित झालेल्या भागाला ‘वर्धा’ हे नाव देण्यात आले. या जिल्ह्याच्या परिसरावर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकारम, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व गोंड या राजवटींची सत्ता असल्याचे उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजातंत सापडतात.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील लेह शहरपासून ५ कि.मी. अंतरावर चंगस्पा येथे प्रसिध्द शांती स्तूप आहे. लडाख शांती स्तूप समितीने पांढर्या दगडापासून सन १९८५ मध्ये भिक्षु ग्योम्यो नाकामुटा यांच्या नेतृत्वात बांधण्यात आलेल्या या स्तुपाची निर्मिती केली.
रोजगाराकरता मुंबईत अनेक लोकांचे स्थलांतर झाले आहे अणि सतत होत असते. शहरात ६८% हिंदू, १७% मुस्लिम, ४% ख्रिस्ती व ४% बौद्ध अशी लोकसंख्या आहे. बाकी लोक पारशी, जैन, ज्यू, शीख इत्यादी आहेत. मुंबईत प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जात असून हिंदी, इंग्रजी, कोकणी या भाषादेखील बोलल्या जातात.
कार्ला हे मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर आहे. हे शहर येथील वैशिष्ट्यपूर्ण कार्ला लेण्यांसाठी प्रसिद्ध असून, या लेण्या इ.स.च्या पहिल्या शतकातील आहेत.
सौदी अरेबियामधील जेदाह शहरातील किंग फाद कारंजे हे जगातील सर्वांत उंच कारंजे आहे.
यातील पाणी सुमारे १०२४ फूट उंच उडते.
१९८० ते ८३ या काळात याची उभारणी झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे यांनी या आश्रमाला भेट दिली आहे.
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची सोय उपलब्ध आहे अशा ठिकाणी कलिंगडाची लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti