महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज – भगवान श्री. गुरुदेव दत्तात्रयांचा दुसरा अवतार मनाला जाणार्या श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म कारंजा येथे झाला. त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र पदभ्रमण केले.
पैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.
कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे.
कांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे.
मुंबईतली आरे कॉलनी ही एकेकाळी मुंबईचं वैभव मानली जात असे. आशिया खंडातील सर्वात सुंदर बंगला आणि विश्राम गृहाचा मान आरे पार्ककडे होता. पूर्वी शाळांच्या सहलींसाठी हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण होते.
आयर्लडमधील हा कॉजवे (सांडवा) वैशिष्ट पूर्ण खडकांसाठी प्रसिध्द आहे.
मुर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्वाचे जंक्शन या शहरात असून देशांच्या विविध भागांत जाणार्या गाड्या या ठिकाणी थांबतात.
चामराजनगर हे शहर कर्नाटक राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले एक मोठे शहर आहे. म्हैसूरचे नववे राजे चामराज यांच्या नावावरुन या शहराचे नाव पडलेले असून, कर्नाटकातील तुलनेने हे एक अल्पविकसित असे शहर आहे.
तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांच्या सीमा चामराजनगरपासून खूपच जवळ आहेत. म्हैसूरपासून राष्ट्रीय महामार्घ क्र. १७ वरुन चामराजनगरला जाता येते.
चामराजनगर आणि परिसरात अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. चामराजराजेश्वर मंदिर, बन्नारी अमन मंदिर, गोपालस्वामी मंदिर, बांदिपुरा राष्ट्रीय अभयारण्य, शिवनासमुद्र धबधबा आदींचा त्यात समावेश आहे.
प्रसिध्द भवानीसागर धरण येथून ७५ कि.मी. वर आहे.
लातूरला मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखले जाते. लातूर जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी जोडला असून या विद्यापीठा-अंतर्गत सर्वांत जास्त ६६ महाविद्यालये आहेत. नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे एक उपकेंद्र लातूर येथे स्थापन होत आहे. लातूर शहरात अनेक शैक्षणिक संस्था असून शिक्षणाच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा एक उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे.
रायचूर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. हे शहर कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्दांच्या मध्ये वसलेले आहे. बंगलोरपासून ४०९ किलोमीटरवर ते वसलेले असून पूर्वी ते निझामाच्या अधिपत्याखाली होते.
Copyright © 2025 | Marathisrushti