महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. ट्युनिस ही ट्युनिसियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला.
महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे.
चिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile RepChile.ogg उच्चार (सहाय्य·माहिती)) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे[३]. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.
व्हेनेझुएला (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Bolivariana de Venezuela) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत.
सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० फूट उंचीवर आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद अंबोली येथे होते. येथे ७५० से.मी.(२९६इंच) वार्षिक सरासरी पाऊस पडतो.
चिखलदरा हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आणि राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण याच जिल्ह्यात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत. चिखलदरा विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
१९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलुन सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ५ जून २००६ रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रो हे दोन देश वेगळे झाले.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले ओडिशा राज्य म्हणजे इतिहास, परंपरा, कला, आध्यात्म आणि निसर्गाचा अद्भुत संगम. बंगालच्या उपसागरात मिसळणारा वारा, हजारो वर्षांची वारसा जपणारी मंदिरे, आदिवासी लोक-संस्कृती आणि समुद्र किनाऱ्यांची शांतता – असे हे ओडिशा पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देणारे गंतव्य आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti