महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
औरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत.
पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. जिल्ह्यात सुमारे ३.९५ लाख हेक्टर कृषीयोग्य जमीन आहे. भुईमुग हे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हा जिल्हा राज्यातील भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे.
दिल्ली येथील चाणक्यपुरीत भारतीय रेल संग्रहालयात रेल्वेचा तब्बल १४० वर्षांचा इतिहास आहे. विविध इंजिन आणि रेल्वेच्या डब्यासह देशातील पहिल्या रेल्वेचे मॉडेल आहे
ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.
विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.
विल्यम द कॉन्करर याने १०६६ मध्ये टॉवर ऑफ लंडनची उभारणी केली. सामरिक आणि वास्तुकला या दोन्हीच्या दृष्टीने या टॉवरचे महत्त्व मोठे आहे.
खानदेश म्हणून ओळखल्या जाणार्या आत्ताच्या जळगाव जिल्ह्याने सातवाहनांपासून, मराठे व त्यांनतर इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी पाहिल्या.
१९४५ मध्ये हो-चि-मिन्ह यांनी डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ व्हिएतनामची स्थापना केली. हनोई हे शहर राजधानीचे असले तरी हो-चि-मिन्ह सिटी हे सर्वात मोठे शहर आहे.
सोशालिस्ट रिपब्लिकन ऑफ व्हिएतनामचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात १३वा क्रमांक लागतो.
इ.स. १८०२ मध्ये जिआ लाँग यांनी हा प्रदेश प्रथम दत्तक घेतला.
१९७५ मध्ये झालेल्या अंतर्गत युध्दात उत्तर व्हिएतनाम विजयी झाले. त्यानंतर व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली आला.
हासन हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून त्याची स्थापना ११व्या शतकात चत्रकृष्णप्पा नाईक यांनी केली.
समुद्रसपाटीपासून या शहराची उंची ९३४ मीटर आहे. येथील हसनम्बा या देवीच्या नावावरुन या शहराचे नामकरण झालेले आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे याच शहरातील रहिवासी होते.
आसाममधील कार्बी अँनलाँग जिल्ह्यातील एक शहर बोकजन. आसाम आणि नागालँडच्या सीमेवर असलेले हे शहर दिमापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून १३८ मीटर उंचीवर वसलेले हे शहर अॅटोनोमस जिल्हा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १९९३६ इतकी या शहराची लोकसंख्या आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti