(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हिरा आणि काच!

    चकाकणाऱ्या वस्तूला सोने समजण्याचा मोह सगळ्यांनाच कधी ना कधी होत असतो. त्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी या फसवणुकीला तोंड द्यावेच लागते. आपल्या वैयत्ति*क आयुष्याचे आणि समाजाचेही सर्वाधिक नुकसान अशा नकली काचेच्या तुकड्यांमुळेच होत असते.

  • श्रमाची प्रतिष्ठा!………………

    ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, किती साध्या, सरळ, सोप्या भाषेत किती मोठे तत्त्वज्ञान आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे; परंतु आपल्याला साधी भाषा कळतच नसावी. एकतर आपल्या संतांचे साहित्य इंठाजीत नाही. ते ‘वेल पॉलिश्ड’ नाही.

  • सैनिकांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या सुमेधाताई

    आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यासाठी झगडावं लागलं नाही. मात्र, मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून आपण कायम प्रयत्न करतो. खासकरून सीमारेषेवर तैनात असलेले सैनिक भारताचं रक्षण करतात, स्वातंत्र्य जपतात. मग ह्या सैनिकांसाठी काय करता येईल हा विचार सुमेधाताई चिथडेंच्या मनात आला आणि त्यांनी सियाचीन ह्या जगातील सर्वात उंच रणभूमीवर सैनिकांसाठी ऑक्सीजन प्लँट उभा केला. कारण शत्रूपासून कायम धोका असलेल्या सियाचीनमध्ये ऑक्सीजन नाही. त्याची उंची इतकी जास्त आहे की तिथे सज्ज असलेल्या सैनिकांना प्राणवायू मिळत नाही. म्हणून सुमेधाताईंनी तिथे ऑक्सीजन प्लँट उभा करून दिला.

  • आबा लोका सांगे ब्रह्यज्ञान….!

  • विकासाला कौल!

    एकजात सगळ्याच तज्ज्ञांना मोडीत काढणाऱ्या निवडणूक निकालाचे विश्लेषण करायचे झाल्यास ते केवळ एका वाक्यात करता येईल आणि ते म्हणजे मतदारांनी विकासाला कौल दिला.विकासासाठी एक स्थिर आणि सक्षम सरकार गरजेचे असते, ही भावना कुठेतरी मतदारांच्या मनात बळावली आणि त्यांनी दोनपैकी एक पर्याय निवडताना काँठोसला उजवा कौल दिला.

    पंधराव्या लोकसभेचे निवडणूक निकाल काँठोससहित सगळ्याच राजकीय पक्षांना आणि तथाकथित राजकीय तज्ज्ञांना धक्का देणारे ठरले.

  • शिक्षा कशाची?

    प्रकाशन दिनांक :- 09/05/2004

    हिंदू संस्कृतीत पुनर्जन्माच्या सिद्धांताला मान्यता आहे. या जन्मातील बऱ्यावाईट कर्मानुसार मनुष्याला पुढील जन्म प्राप्त होत असतो. मागील जन्मात केलेली पापं फेडायची आणि शक्य झाल्यास काही पुण्य संचय करून पुढील जन्मातील जीवन अधिक सुखदायक व्हावे याची तरतूद करायची, असा ढोबळ हिशोब या सिद्धांतामागे आहे.

  • मुलं नावाचे मित्र

    विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी उतू जात होता. शाळेतील रोजच्या रसायन, भौतिक, गणित, इंग्रजी, मराठीऐवजी अगदी वेगळ्या, पण त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांवरील चर्चेत प्रत्येकाला आपली मते हिरिरीने मांडण्याची इच्छा होती. आई, वडील, शिक्षक, मित्र, मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक या सर्वांबद्दल प्रत्येकाचं स्वत:चं असं खास मत होतं. मी त्यांच्या वयाचा असताना स्वत:चं मत कशाला म्हणतात याची मला कल्पनाही नव्हती. पण आज थोडीही भीड न बाळगता प्रत्येक विषयावर स्वत:ची ठाम मतं व्यक्त करणाऱ्या या पिढीचं कौतुक करण्यासाठी मला शब्द सापडत नव्हते. मात्र या रंगलेल्या चर्चेत कुणालचं गप्प बसणं मला खटकलं. त्याला चर्चेत ओढण्याचा प्रयत्न मी करू लागलो, पण तो मौन सोडण्यास तयार नव्हता. अगदी अबोल असलेल्या मुलामुलींनी सुद्धा उत्साहाने बोलावं, अशा वातावरणात त्याच्या अबोल्यामुळे माझी उत्सुकता चाळवली गेली व त्याच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करू लागलो. थोड्या वेळाने त्याने भीतभीत तोंड उघडले. पाणावलेल्या डोळ्यांनी मला विचारले, ‘मला जे काही वाटतं ते बोलून दाखवलं तर तुम्ही मला रागावणार तर नाही ना?’ त्याच्या तणावग्रस्त चेहऱ्याने त्याच्या पालकांना चर्चेसाठी आमंत्रण देण्यास मला बाध्य केलं.

    आठवडा-पंधरा दिवसांत आटोपणाऱ्या एखाद्या उन्हाळी शिबिरात मुलांना पाठवलं, की त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची जबाबदारी संपली असं समजणाऱ्या कुणालच्या पालकांची नाखुशी ते चर्चेसाठी आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे झळकत होती. कुणालच्या अबोल्याचा त्याच्या पालकांच्या वागणुकीशी काही संबंध आहे का, हे चर्चेच्या ओघात पडताळून बघण्याचा मी प्रयत्न करत होतो. थोडा वेळ काही हलक्याफुलक्या विषयांवर गप्पा झाल्यानंतर त्याचे पिताश्री जरा मोकळेपणाने बोलू लागले. मुलांना जर आपल्या वडिलांचा धाक नसेल तर ती बिघडतात असे त्यांचे अगदी ठाम मत होते. मुलं सतत आपल्या धाकाखाली राहिली पाहिजेत यासाठी त्यांना सतत रागावणं, मारणं, ती कधीही मोकळेपणाने त्यांच्यासमोर वावरणार नाहीत याची काळजी घेणं हे वडिलांचे आद्यकर्तव्य आहे असा त्यांचा समज होता. मुलांशी सुसंवाद साधणे म्हणजे नक्की काय हे त्यांच्या गावीही नव्हतं. वडिलांशी केव्हाही बोलायची वेळ आली, की कुणाल प्रचंड तणावाखाली वावरत असल्यामुळे काहीही बोलण्याऐवजी गप्प राहणेच पसंत करू लागला. ‘वडील’ नावाच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या त्या प्रतिनिधीने केवळ स्वत:च्या मुलांनाच नव्हे तर पत्नीलाही प्रचंड धाकात ठेवले होते व त्याबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटत असे. कुणालच्या अबोल्याचा उगम सापडल्यामुळे आता त्यावर इलाज करण्याचं काम माझ्यासाठी सोपं झालं.

    असे आम्ही कसे? आपल्यामुळे या जगात अस्तित्वात आलेल्या आपल्या मुलांशी सुसंवाद साधून त्यांचे आपण सर्वात जवळचे मित्र का होऊ शकत नाही? मुलांना त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेताना सख्ख्या जन्मदात्यांपेक्षा मित्र जवळचे का वाटतात? ज्या दिवशी आईवडिलांची आपल्या मुलांशी मैत्री होईल तो दिवस खऱ्या अर्थाने ‘फ्रेंडशिप डे’ असेल !

    -- श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • रातकिडे !

    या पृथ्वीतलावर हजारों प्रकारचे कीडे विचरण करतात, पैकी काही दिवसा तर काही रात्री म्हणजेच अंधारात! मनुष्य जातीमध्ये देखील अशा प्रकारचे कीडे असतात,जे कायम अंधारात राहून कट कारस्थाने करत असतात.कुणाच्याही नजरेस न पडता गुप्तपणे आपले डाव टाकत असतात.

  • संगनमताच्या राजकारणाने नासविली व्यवस्था!

    सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करून आपल्या धारदार वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला घाम फोडणारे आमदार हवेतच कुणाला? इथे गरज राडा करणार्‍यांची आहे. बी.टी. देशमुख, वि.स.पागे  यांचा जमाना आता संपला आहे. मधू लिमये, मधू दंडवते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यांच्या सारख्यांची उपयुक्तता देखील संपुष्टात आली आहे.

  • अध्यात्माचा तास हवा आहे

    लहानपणी अध्यात्म वगैरे इतकं काही माहित नव्हतं. पण एक मात्र खरं आहे की, संध्याकाळी देवापुढे दिवे लागणं झाली की, शुभंकरोतीचे स्वर घरात निनादु लागायचे. आजीच्या मागोमाग एकएक श्र्लोक म्हणत म्हणत केव्हा दासबोधातील चरणं संपली हे कळायचंही नाही.