(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • न्याय मिळवावा लागतो!

    प्रकाशन दिनांक :- 22/08/2004

    ‘आपल्या कुटुंबीयांना उघड्यावर टाकणारा आत्महत्येसारखा मार्ग निवडणे म्हणजे पळपुटेपणा होय. त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. शेतकऱ्यांनी तो मार्ग न निवडता, जिद्दीने संकटावर मात करावी.

  • आता उरलो गोंधळापुरता !

    मैं तेरा साल से अंदर हूं। इस दौरान मेरे मां – बाप चल बसे। मैं अंदर आया तब मेरा बच्चा केवल दो महिने का था। बहूत भुगत चुका, अब सीधी साधी जिंदगी बिताना चाहता हूं जजसाब, अल्लाह के बाद सिर्फ आप पर ही भरोसा है। आशा करता हूं आप नाउम्मीद नही करेंगे!’ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील एका आरोपीने गुन्हा सिद्ध झाल्यावर आपली कैफियत न्यायाधीशांसमोर मांडली. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जन्मठेप किंवा फाशी होणार हे निश्चित झालेल्या आरोपीचे ते वत्त*व्य होते.

  • अजूनही जीवंत आहे माणुसकी…!!!

    भ्रष्टाचार आणि बेईमानीचा देशात सुकाळ आला असताना, एखाधा प्रामाणिकपणाचा प्रसंग अनुभवास आल्यास आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. छोट्या मोठ्या कामाच्या प्रसंगांची वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या माणसांचीही आज कमतरता नाही. परंतु प्रामाणिकपणाने जगतांना या हाताचे दुसऱ्या हाताला कळणार नाही याची काळजी घेणारे माणसे बघून, ‘जीवंत माणुसकीचा प्रत्यय येतो’.
    पाच आणि दहा रुपयांसाठी माणसाचे मुडदे पडणाऱ्या या जगात, हजारो रुपयांना स्पर्श न करणाऱ्या माणसांमुळेच आज माणुसकी आणि विश्वास जीवंत आहे.

  • सुदृढ आजारपण!

    प्रकाशन दिनांक :- 07/11/2004

    एका शहरात अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या माणसाने आपल्या एकुलत्या एका मुलाला डॉक्टर बनविले. खाजगी मेडिकल कॉलेजचे डोनेशन, फी वगैरे सर्व 40-50 लाख खर्च झाला. बापाच्या इच्छेनुसार मुलगा डॉक्टर झाला.

  • खतांच्या भाववाढीवर सगळीकडे सामसूम !

    अलीकडील काळात आंदोलने `मॅनेज’ होण्याचे प्रकार इतके वाढले आहेत, की लोकांचा आता आंदोलनावरील विश्वासच उडाला आहे. बियाणे कंपन्या आणि सरकार, खत कंपन्या आणि सरकार, विरोधक आणि सरकार अशा अभद्र युतीतून बळी जातोय तो सर्वसामान्य शेतकर्‍यांचा आणि अधिक खेदाची बाब म्हणजे आपण नागविले जात आहोत हे शेतकर्‍यांनाही कळेनासे झाले आहे. सगळे आपापल्या जागी शांत आहेत, सुस्त आहेत.

  • हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

    हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणार्‍या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे.

  • सार्वजनिक ग्रंथालय – वाचक – वाचन – संस्कृती

    आजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे.

  • मातीचे प्रेम मातीशीच – समलिंगी संबंध

    "ऋतू पावसाळी, ऋतू माती आणि बियाण्याच्या प्रेमाची" गुणगुणत एक बियाणे मातीपाशी पोहचले. "चल, दूरहट, पावसाळी किडा." काय झाले तुला, ओळखले नाही, मी तुझा अनादी काळापासूनचा प्रेमी. "कधी होता, आता नाही, आता मी शेजारच्या शेतातील मातीशी प्रेम करते". हे चुकीचे आहे, मातीने बियाण्यावर प्रेम केले पाहिजे, अन्यथा सृष्टीचक्र भंगेल. वसंत येणार नाही. फुलांविना फुलपाखरू मरेल. गवत विना चरणारे जीव मरतील. जंगलाचा राजा शेरखानचा जीव हि जाईल. दाण्या-दाण्यासाठी भांडत मनुष्य हि कालवश होईल. "मी ठेका घेतला आहे, का या सर्वांचा, एवढेच प्रेम उतू जात असेल तर दुसर्या बियाण्यावर प्रेम कर". बियाणे मातीत रुजले नाही आणि धरती ओसाड पडली. असे आपण पाहिले आहे का? मातीने-मातीशी प्रेम करण्याचा अधिकार आपण मान्य करतो का? नाही. कारण हे सृष्टीचक्राच्या विरुद्ध आहे.
    मातीत बियाणे रुजत नसेल तर मातीचा डॉक्टर मातीला तपासतो. रोग निदान करतो. मातीची उर्वरा शक्ती वाढविण्याचे औषध देतो. युरिया, नत्र, जिंक, रासायनिक खत, शेण व सेंद्रिय खते इत्यादींचा वापर करून मातीची पोत सुधारल्या जाते. सारांश मातीत बियाणे रुजले पाहिजे याची आपण काळजी घेतो.
    मनष्य तर सर्वात बुद्धिमान आणि जीवित प्राणी आहे. पुरुषाने-पुरुषाची शारीरिक संबंध स्थापित करणे असो वा एका स्त्रीने दुसर्या स्त्रीशी विवाह करणे, हे सर्व सृष्टी नियमांच्या विरुद्ध आहे. यामुळे सृष्टीचक्र भंगते. समलिंगी आकर्षण, एक मानसिक आजार आहे, विकृती आहे. विकृती नेहमीच समाजात वेगाने पसरते. याचेच उदाहरण, उपचार करण्याची गोष्टच सोडा, अनेक तथाकथित बुद्धिमान लोक या रोगाला, रोग मानायला तैयार नाही. उलट अश्या संबंधाना प्रोत्साहन देतात. समलिंगी लोकांना वार्यावर सोडून देतात. पण काही वर्षांनी विकृत प्रेमाचे भूत उतरल्यावर त्यांच्या हाती फक्त निराशा येते. त्यांचे जगणे दूभर होते.
    या संबंधांना, मानसिक आजार मानून, योग-ध्यान, उचित औषध-उपचार, इत्यादी करून हा आजार वेळीच दूर केला पाहिजे. हेच समाजाच्या हिताचे आहे.
    -- विवेक पटाईत

  • दलाल नावाचे बोन्साय………

    “बोन्साय” हा शब्द अशासाठी वापरलाय की, दलालांची ही लॉबी छुप्या पद्धतीने कामं करते. जरी या दलालांची संख्या मर्यादित असली तरी त्यांच्यातील कामचं नियोजन इतक्या सूक्ष्म स्वरुपात चालतं, की पुढे यांच्या बोन्साय नावाच्या झाडाला खतपाणी घालत गुलामगिरी पत्करण्याची वेळ आपल्यावर येते आणि अशा व्यवस्थेच्या कंगोर्‍यात एकदा आपण सापडलो की, सतत काही ना काही देण्याची जी सवय आपल्याला लागते त्यातुन लवकर सुटणं किंबहुना बाहेर पडणं आपल्या सारख्या सामान्य माणसाला सहज शक्य होत नाही.

  • सख्खा भाऊ पक्का वैरी…

    सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तिच्या भावाची जी विकृत मानसिकता आहे तिचा जन्म कोठे झाला जिने त्याला त्याच्या सख्या बहिणीचा खून करण्यास प्रवृत्त केलं ! त्या मानसिकतेचे उगम स्थान शोधून ते वेळीच नष्ट करायला हवं नाही का ?