(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • मारेकर्‍यांसाठी पायघड्या !

    आमच्या देशातून नेलेल्या लुटीवर तुमची श्रीमंती, तुमचा माज पोसला जात आहे आणि तुम्ही आम्हालाच कोहिनूर आमचा आहे, भवानी तलवार आमची आहे, असे सुनावणार आणि आम्ही ते षंढपणे ऐकून घेणार! कुठल्याच नेत्याने, कुठल्याच वर्तमानपत्राने किंवा अन्य मीडियाने कॅमरून यांच्या या मुजोरपणाचा निषेध केलेला नाही. खरे तर जालियनवाला बागप्रकरणी माफी मागण्यास कॅमरून यांनी नकार देताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळायला हवी होती; परंतु आमचे दुर्दैव असे, की कुठे संतापून उठावे आणि कुठे संयम दाखवावा, हेच आम्हाला कळत नाही.

  • आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)

    मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती. तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती. नट आणि नट्यांना दाऊदच्या चरणी सर्वस्व अर्पित केल्याशिवाय सिनेसृष्टीत काम मिळत नाही, अश्या आशयाच्या गाॅसिप सिने पत्रिकांमध्ये वाचायला मिळायचे

    १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शेकडोंच्या संख्येत मुंबईत लोक मारल्या गेले. दाऊद फरार झाला. आता वाटले होते, सिनेसृष्टीत दाऊदचा प्रभाव कमी होईल. पण तसे घडले नाही. दाऊदची पकड सिनेसृष्टीवर अधिक मजबूत झाली. देशप्रेम, स्वाभिमान इत्यादी विसरलेले, केवळ पैश्यांसाठी नट आणि नट्या परदेशात असलेल्या दाऊदच्या चरणी नाक घासण्यात आणि दरबारात ठुमके धन्यता मानू लागले.

    आता प्रश्न येतो आपली जनता आणि सरकार काय करत होती. दुसरा कुठलाही देश असता, तर अश्या कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर कायम बंदी टाकली असती किंवा आतंकवादीशी संबंध ठेवण्यासाठी त्यांना जेलमध्ये धाडले असते. (आपली सरकारने अश्या कलाकारांवर का कार्रवाई केली नाही, हेच समजत नाही). जनतेने हि अश्या कलाकारांचा बहिष्कार केला पाहिजे होता. पण असे घडले नाही. मुंबईचे वाघ म्हणविणार्या नेत्यांनी अश्या कलाकारांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या वैगरे दिल्या होत्या असे ऐकिवात आहे. बहुतेक त्यांच्या धमक्यांना दाऊद समर्थित सिनेसृष्टीने 'कुत्र्यांचे भुंकणे' याहून जास्त भाव दिला नसावा. ज्या मुंबईत शेकडों लोक मृत्युमुखी पडले, त्याच मुंबईत अनेक नेता किंवा दरबारात ठुमके लावणारे दाउदच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकले अश्याही वाच्यता आहेत. (उत्तर प्रदेशातील गवर्नर श्री राम नाईक यांनी तर उघडपणे आरोप लावले आहेत).

    यानंतर हि मुंबईत अनेक आतंकवादी घटना घडल्या. २००८च्या हल्ल्यात जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारी हि मारल्या गेले. तरीही कराचीत बसलेल्या दाऊदचे नियंत्रण आपल्या सिनेसृष्टीवर कमी झाले नाही. आता तर पाकिस्तानी कलाकार हि सिनेसृष्टीत दिसू लागले. पण भारतात काम करीत असताना, इथे घडणाऱ्या आतंकवादी घटनांचा विरोध त्यांनी कधीच केला नाही. विषयांतर होईल, पण मला आठवते, अलिबाबा चालीस चोर मधले चोर हि ज्या घरात दरोडा टाकायचा असेल त्या घरातले मीठ खात नसे. इथले मीठ खाऊन हि, इथल्या आतंकवादी घटनांचा जर पाकी कलाकार विरोध करीत नाही, तर त्यांना इथे काम देण्यात काय अर्थ. खरे म्हणाल तर सिनेसृष्टीने जी मुंबईमध्ये आहे निदान त्यांनीतरी पाकी कलाकारांवर १९९३ नंतरच बहिष्कार टाकायला पाहिजे होता. आपल्या दुर्दैवाचे कारण असलेल्या दाऊदच्या कठपुतली कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणारी मुंबईकर/ देशातील सिनेप्रेमी जनतेला काय म्हणावे.

    आज काश्मिरात आपले सैन्याचे जवान शहीद झाले. आपल्या देशाचे मीठ खाणार्या पाकी कलाकारांनी या घटनेची निंदा केली नाही. उलटपक्षी पाकिस्तानांत परतून, आपल्या देशाची निंदाच केली, असे ऐकिवात आहे. अश्या पाकी कलाकारांचा बहिष्कार करण्याएवजी, सिनेमा सृष्टीतील सर्व मोठे कलाकार, पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करीत आहे. कारण स्पष्ट आहे, हे सर्व कलाकार आतंकवादी मालकाच्या इशार्यावर नाचणाऱ्या बाहुल्या आहेत. पाकी कलाकारांसोबत अश्या बाहुल्यांचा हि बहिष्कार आपल्या सिनेसृष्टीने/ आपण केला पाहिजे, हीच आपल्या शहीद सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल.

    -- विवेक पटाईत

  • आधुनिक आक्रमण!

    प्रकाशन दिनांक :- 28/03/2004

    नित्य नवीन बदलांना स्वीकारीत काळ झपाट्याने पुढे सरकत आहे. प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य कोणता तरी नवा बदल घेऊन येत आहे. काही बदल अगदी सहज जाणवण्याइतपत ठळक आहे तर काही बदलांची प्रक्रिया अतिशय सुक्ष्म आहे.

  • मत

    सध्या मराठा आंदोलन हिंडोळ्यासारखे हलत आहे, यात मुख्यमंत्री विरुद्ध मराठा राजकीय नेते (अजितराव सोडून), असे एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. विषय वेगवेगळ्या तर्हेने रंगवून कलगी तुऱ्याचा फड रंग धरू लागला आहे.

    ज्या राज्यातील 75 टक्के खासदार, आमदार, नगरसेवक, आणि सरपंच हे मराठा जातीचे आहेत असे चित्र आजचे नसून स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे आहे. अश्या प्रगत राज्यात हा समाज उपेक्षित, अशिक्षित, नोकरी व उद्योग धंद्यात पिछाडीवर राहिला असे मानले तर एक तर या शब्दांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, किंबहुना हे शब्द विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत असेच म्हणावे लागेल.

    आज महाराष्ट्रात जितक्या शैक्षणिक संस्था आहेत, त्यातील जवळपास 65 टक्के संस्था या मराठा नेत्यांच्या आहेत, यात चांद्या पासून बांद्या पर्यंत विचार केला तर, प्रमुख नावे अशी आहेत, डी वाय पाटील, पतंगराव कदम, वसंतदादा पाटील, जयंतराव पाटील, विखे पाटील, दत्ता मेघे, विलासराव देशमुख, शरद पवार, विश्वनाथ कराड, या शिवाय छोटे नेते आहेतच. या सर्व संस्थांच्याकडे मेडिकल व इंजिनियरिंग कॉलेजेस ची भरमार आहे, आणि यातून हे शिक्षण महर्षी अब्जाधीश झाले.

    या सर्व कॉलेजेसना भरमसाठ डोनेशन्स देऊन लाखो इंजिनीअर, व डॉक्टर तयार झाले. हि अफाट संपत्ती या लोकांच्याकडे आहे, त्यातील थोडी जरी उर्वरित वर सांगितलेल्या उपेक्षित समाजासाठी यांनी खर्च केली असती तर, आजची परिस्थिती उद्भवलीच नसती. याचा अर्थ यांनी समाजहित न पाहता, फक्त मतांचे राजकारण करून, स्वतःच्या तुंबड्या भरल्या. का नाही हे शिक्षण महर्षी, ज्यांची ऐपत नाही अश्या सर्व मराठा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात घेऊन जात. इतकी वर्ष ओरबाडलेच ना? पुढची चार वर्षे नाही कमावले तर रस्त्यावर येऊन भीक मागायची वेळ नक्कीच नाही येणार या नेत्यांवर. मित्रानो मूक मोर्चा काय काढता, जाब विचारा.

    आता वेळ आली आहे, याना अद्दल घडवायची, व खड्यासारखे दूर करून, यांच्या संपत्तीवर धावा बोलायाची. हा बेनामी पैसा हे लोक तुमची मते विकत घेण्यासाठी वापरतात. निवडणूका आल्या कि जवळपास एक महिना, तुम्हाला रेलचेल दारू पाजून, मटणाच्या पार्ट्या दिल्या जातात, यातच तुम्ही खुश होता. तुम्ही यांच्या मागे साहेब, दादा, भाऊ, म्हणत पळत रहाता, मग पुढची पाच वर्षे तुम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात, व हे लोक मलई खात रहातात. बदला राव तुम्ही आता, आत्मसन्मान जागा करा, घाला यांच्या घरावर हातोडे, विचारा त्यांना जाब.

    आरक्षण हे ढोपरला लावण्याचे मधाचे बोट आहे. आजपर्यंत आरक्षणाने किती जातींचा उद्धार झाला, आकडेवारी काढा. जरी तुम्हाला आरक्षण मिळाले तरी, संपूर्ण राज्यात पंचवीस हजार पेक्ष्या जास्त नोकऱ्या मिळणार नाहीत, अहो जिथे लाखो बेरोजगार आहेत, तिथे हा आकडा म्हणजे दात कोरून पोट भरण्यासारखे आहे.

    उद्योग धंदे सुरु करा, नवीन काही करण्याची मनीषा बाळगा, मेहनत करा, गुजराथी, मारवाडी, सिंधी, शीख लोकांच्या सारखे बना. आज आपल्या राज्यात सर्वात जास्त जमिनी, मोक्याच्या जागा या बाहेरून आलेल्या लोकांनी प्रचंड मेहनत करून मिळवल्या, त्यांचा आदर्श घ्या. या जमिनी एकेकाळी तुमच्या होत्या, त्या तुम्ही मातीमोल भावाने या नेत्यांच्या मागे लागून विकल्यात. तुमचा खूप वेळ भाऊबंदकीत जातो, उरलेला बामणांना शिव्या घालण्यात, तसेच स्थानिक राजकारण करून शेजाऱ्याच्या प्रगतीत खोडा कसा घालता येईल यात जातो, मग स्वतःची प्रगती करण्यास तुमच्याकडे वेळ कधी उरतो?

    मोर्चे काढून कधीच कुणाचे भले झालेले ऐकण्यात व पहण्यात आलेले नाही, हे आळवावरच्या थेंबासारखे असते. काम धंदे सोडून या दलदलीत जाऊ नका. विनायक मेटे, सारख्या विचारवंतांच्या मागे जाल तर विनाश अटळ आहे. जाता जाता सांगतो, गांधी हत्येनंतर ब्राम्हणांची घरे जाळली, संपत्ती लुटली, कुळ कायदा लाऊन जमिनी गेल्या, म्हणून त्यांनी न आरक्षण मागितले, न मोर्चे काढले, लोकसंख्या दोन टक्के, त्यामुळे राजकारणापासून दूर राहिले, पण स्वतःची प्रगती नाही थांबवली.

    मराठयांच्या सर्वात वरच्या दोन नेत्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे, त्याच्या अर्धी सुद्धा संपत्ती समस्त ब्राह्मण वर्गाकडे मिळून नाही, पण जी आहे ती समांतर विखुरलेली आहे, त्यामुळेच हे लोक माज येण्याइतके फार श्रीमंत नाहीत तसेच दारिद्र्यात पण बुडालेले नाहीत, आणि तशी वेळ आलीच तर देश सोडायची तयारी पण करतात.

    ।। मराठा तितुका मेळवावा ।। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

    -- विजय लिमये
    (9326040204)

  • बंदिस्त नेत्यांचा बंद!

    विदर्भाचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न दाखविणे सोपे आहे; परंतु लोकांना तुमची कुवत माहित असल्याने विदर्भाचा रेगिस्तान होण्यापेक्षा सध्या आहे तेच बरे, असे वाटत असेल, तर त्यात आक्षेपार्ह काही नाही. कारण स्पष्ट आहे. उद्या विदर्भ राज्य झालेच, तर आमदार-खासदार कोण होतील?

  • विधिमंडळ की आखाडा?

    लोकांनी आधी आपली अभिरूची बदलणे गरजेचे आहे. आपण कुणाला आणि कशासाठी निवडून देत आहोत याचे भान लोकांमध्ये यायला हवे. लोकच बेभान असतील, तर त्यांचे प्रतिनिधी तरी जबाबदार कसे असू शकतात? अधिवेशनाचा आखाडा होण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे.

  • मेक इन इंडिया, स्थलांतर आणि भारतातील सरकारी कंपन्या !!!!

    ऐअर इंडिया डब घाईला आलेली आहेच पण त्याच बरोबर भारतातील सर्वात मोठी कंपनी भेल सुद्धा गेली ५ वर्षे सातत्यानी कमी नफ्यात चालत आहे .२०१२ साली या कंपनीचा निव्वळ नफा ७०३९ कोटी रुपये होता .तो दरवर्षी घसरत मार्च २०१५ मध्ये १४१९ कोटी रुपये इतका घसरला.सरकारी कंपन्यांची हि अवस्था का होत आहे याचे उत्तर खरे तर नव्या सरकारनी शोधायलाच हवे.एकेकाळी या दोन्ही कंपन्या ''उत्तम'' या सदरात मोडत होत्या.पण या कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण लक्षणीय घसरण्याचे कारण काय ? सरकारी अनास्था आणि खासगी कंपन्यांचे भले करण्याची मागील सरकारची परंपरा पुढे चालत राहणार असेल तर संपूर्ण देशाचेच खासगीकरण होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असेच म्हणावे लागेल.एकेकाळी या देशात ऐअर इंडिया हि कंपनी अत्यंत अभिमानाची कंपनी होती.सरकारनी हि कंपनी चालवायला घेतली आणि या कंपनीचा पद्धतशीर ऱ्हास सुरु झाला.ऐअर इंडिया कधीही बंद पडेल अशी परिस्थिती कोणी आणली ? सरकारी कंपन्यां वर संचालकांची नेमणूक कशी होते हे नव्याने सांगायला नको.

    ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका आणलेल्या रशिया मध्ये याच openness आणि restructuring चा परिणाम चांगला झाला हे सर्वांना माहित आहेच पण कुठलीही गोष्ट देशात लागू करताना लोकांच्या फायद्या पेक्षा संधी साधू लोकांचा फायदा आधीक होतो यासाठी राजकीय आत्मबल फार महत्वाचे आहे.मोदी सरकारने हे आत्मबल जनतेला दाखवून देणे गरजेचे आहे.नाहीतर भा ज पा चे नुकसान होईलच पण देशात न भूतो न भविष्यति इतका गोंधळ उडेल.

    विरोधी पक्षांचा वकूब चांगला नसेल तर त्यांना चागल्या कामात खीळ घालायला आवडते पण चागले काम करून दाखवता येत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.मेक इन इंडिया करताना ग्रामीण भागापासून सुरवात करावी हि मागणी लावून धरली पाहिजे.

    ग्रामीण रोजगार , शेती, ग्रामीण भागातील infrastructure हे कमालीचे मागासलेले असताना मेक इन इंडिया मध्ये ग्रामीण भागाकडे खूप मोठा निधी वळवला पाहिजे स्थलांतर थाबले तर प्रश्न कमी होतात हे जागतिक सत्य आहे.ग्रामीण भागातून स्थलांतर थाबले नाही तर उद्या आकाशात जरी शहरे बांधली तरी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत .

    मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी ची सुरवात ग्रामीण विकासा पासून करा अख्खा देश "स्मार्ट" बनेल .

    -- चिंतामणी कारखानीस

  • विजेचा खेळखंडोबा

    प्रगत महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांना यावर्षीच्या उन्हाळ्याने मागास राज्यातील सामान्य नागरिकांच्या व्यथांची जाणीव करून दिली आहे. महाराष्ट्रातील उन्हाळा तसा दरवर्षीच तापतो, परंतु यावर्षी उन्हाच्या चटक्यांना भारनियमनाच्या झळांची साथ मिळाल्याने मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र चांगलाच भाजल्या जात आहे. या अतिरेकी भारनियमनाने त्रस्त होऊन ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरत आहेत.

  • “इंडिया दॅट इज भारत”

    आम्हा भारतीयांना दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची जणू सवयच लागली आहे. कुणीतरी दुसऱ्याने कान टोचल्याशिवाय आम्हांला शहाणपण येत नाही. विविधता ही खरे तर आपल्या देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणता येईल.

  • एक चांगली सुरुवात

    जगणे हा अपघात आहे, ती एक कला आहे की नुसतेच एक रहाटगाडगे आहे, यावर मतमतांतरे असू शकतात. जन्माला आलोच आहोत तर मरण येईपर्यंत जगणे भाग आहे, या मताचे बरेच लोक असतात आणि त्यांच्या जीवनात अर्थातच सौंदर्यदृष्टीला फारसे महत्त्व नसते; परंतु जगण्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. परिस्थिती कशीही असो, जीवनात आनंद निर्माण करण्याची, जीवनात आनंद शोधण्याची त्यांची ऊर्मी कायम असते.