तसेही आता या पिढीला माया प्रेम कमीच आहे. व्यवहारी जगात कसे जगायचे हे जाणतात भावनेत गुंतून पडत नाहीत. याची मनाची तयारी हवी. पूर्वीचा काळ गेला आहे. त्यामुळे थोडी कणखरता ठेवून जगता आले पाहिजे. कदाचित तुम्हाला पटणार नाही पण हे कटू सत्य आहे हे मात्र खरं आहे.
December 30, 2021
जगातील आश्चर्यांची माध्यमांत नेहमीच चर्चा होत असते. मागे एकदा एका संस्थेने जगातील सात आश्चर्यांची निवड करण्यासाठी विश्वव्यापी जनमत नोंदणी अभियानदेखील राबविले होते. आपला ताजमहालदेखील त्या स्पर्धेत होता, अर्थात नंतर तो एकूण प्रकारच अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले; परंतु लोकांची उत्सुकता चाळविण्यात ती मोहीम नक्कीच यशस्वी झाली होती.
January 31, 2010
आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकात 96 कुळी असतो, आमदारकीला मराठा असतो, आणि दंगलीत कट्टर हिंदू असतो...
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण घरात बौद्ध असतो, गल्लीत महार असतो, गावात मागास असतो, शिक्षणात 'कॅटेगरी'वाला असतो.. आणि राजकारणात पँथर असतो..
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण घरात सारस्वत असतो, गावात ब्राह्मण असतो, शहरात हिंदू असतो, आणि धर्मांध दंगलींचा मास्टरमाईंड असतो..
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण गावात साळी माळी धनगर वंजारी असतो, निवडणुकीत फक्त एक मतदार असतो, आणि दंगलीत दगड उचलणारा माथेफिरू असतो..
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण भारतीय कधी असतो.?
आपण भारतीय कधी असतो.?
आपण फक्त सैनिक मेल्यावरच् आपण "भारतीय" होतो...
... फक्त दोन मिनिटांसाठी !!
*फ़क्त वाचु नका...!
विचारही करा....!!*
September 28, 2016
“अहम् ब्रम्ह असी”, “अहम् ब्रम्ह असी”, असं प्रत्येकजण म्हणताना आपण ऐकतोय. नव्या गतीने नव्या ईर्शेने जो तो धावताना आपण पाहतोय. कॉस्मोपॉलिटीन शहर असो किंवा आणखी कोणतंही क्षेत्र प्रत्येकजण मीच ब्रम्ह आहे असं म्हणवतोय.
February 4, 2011
काही काही वेदनांना सांत्वनाच्या शब्दांचा भारही पेलत नाही…. वपुंच्या या वाक्यात व्याकुळ करणाऱ्या संवेदनांची अनुभूती शब्दांकित झालेली दिसते.
August 16, 2019
रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला बांधल्या गेली आहे. महागडी बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीचा उत्पादन खर्च अतोनात वाढवीत आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नातून हा उत्पादनखर्च भागविण्यासाठी उचललेल्या कर्जाचे व्याजही फिटत नाही.
December 4, 2005
‘नाती’ एक छोटासा शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामावला जातो. आयुष्यात आल्यावर माणसाला प्रत्येक गोष्ट कळते अगदी माया, ममता, समता आणि बंधुता सुद्धा कळते. कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो, पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो.
August 21, 2019
माणसाची खरी परीक्षा संकटाच्या काळात होत असते. त्याचा खरा कस तेव्हाच लागत असतो. खरे तर माणसाची खरी परीक्षा म्हणण्यापेक्षा त्याची खरी ओळख म्हणणे अधिक संयुत्ति*क ठरेल.
May 6, 2007
वाङ्मय जगतात ‘साहित्य’ आणि ‘ललित लेखन’ या दोन संज्ञा वारंवार वापरल्या जातात. वरवर पाहता त्या सारख्याच वाटत असल्या, तरी त्यांच्या व्याप्तीत आणि लेखनाच्या उद्देशात मोठा फरक आहे. साहित्य ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे, तर ललित लेखन हा त्याचाच एक अत्यंत सुंदर आणि कलात्मक भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘साहित्य’ हे जर एक विशाल उद्यान असेल, तर ‘ललित लेखन’ हे त्या उद्यानातील सुवासिक आणि सुंदर फुलांसारखे आहे. साहित्याने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, तर ललित लेखनाने माणसाचे मन समृद्ध होते. दोन्हीचेही मानवी जीवनात आणि समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
August 12, 2026
प्रत्येकाला कोणी ना कोणी दिवसभरात काही न काही आवश्यक त्या गोष्टी पुरवत असतो. आपल्याला विविध प्रकारच्या पॅराशूट ची आवश्यकता पडत असते – आपल्याला शारीरिक पॅराशूट, मानसिक पॅराशूट, भावनात्मक पॅराशूट आणि अध्यात्मिक पॅराशूटची गरज पडत असते.
January 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti