एक मंदिर होत, प्रसिध्द मंदिर होत, त्या मंदिरात अनेक देश विदेशातील लोक यायचे, भक्तगन यायचे. त्यामुळे ते मंदिर खुपच चर्चेचे प्रसिध्दीचे होते. आणि मग काही दिवसांनी त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. आणि मग ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला आपल्या मंदिरात देश-विदेशातील लोक, भाविक भक्त येतात. त्यामध्ये इंग्रजी बोलणारे भाविक भक्त वैगेरे असतात. तेव्हा आपल्या मंदिरातल्या सगळया लोकांना, कर्मचार्यांना पण इंग्रजी आल पाहिजे. त्यांनी लगेच फरमानच काढला. मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलच पाहिजे. कंम्पलसरीच आहे म्हणे….
झाल…..
आता काय,
आता त्या देवळात एक घंटा वाजवणार होता. त्याला हि कंम्पलसरी झाल ना. ते म्हणे मला काय इंग्रजीचा उपयोग आहे? मी का इंग्रजीत घंटा वाजवतो का ? आणि इंग्रजीत वाजविली काय अन मराठीत वाजवली काय, वाजणार घंटाच आहे. म्हणुन मी शिकलो नाही म्हणुन काय होतय… ट्रस्टी म्हणाले नाही, नियम म्हणजे नियम, सगळयांना इंग्रजी आलच पाहिजे.
आता त्या घंटा वाजवणाराच पन्नास-पंच्चावन वय त्याच, तो म्हणाला आता कधी शिकव ? त्याने सरळ ती घंटा वाजवायची नौकरीच सोडली.
बर आता नौकरी सोडली पण पोटापाण्यासाठी काहीतरी केलच पाहिजे. कराव तर काय कराव, मग त्याने विचार केला मंदिर प्रसिध्द आहे देश-विदेशातले भाविक-भक्त येथे येतात आणि मंदिराच्या आसपास कुठ चहा पिवाव तर काही व्यवस्था नाही. मग त्याने काय केले तर सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाच टपर टाकल. आता मंदिरात अनेक भाविक-भक्त यायला लागले त्यामुळे गर्दी जास्त, जशी गर्दी जास्त तस चहाच टपर जोरात चालल. बघता बघता त्या चहाच्या टपराच त्याने एका छोट हाॅटेल केल. छोट हाॅटेल हि तुफान चालल. मग छोटया हाॅटेलच त्याने मोठ हाॅटेल केल. मोठ हाॅटेल सुध्दा भयानक चालल आणि बघता बघता त्याची तिन चार मोठी हाॅटेल झाली. आणि मग नंतर त्याने फाईव्हस्टार हाॅटेलच काढल. आणि अशा फाईव्ह स्टार हाॅटेलची साखळीच तयार केली. अन त्याच्या या फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये देष-विदेषातील भाविक-भक्त यायला लागले. निवासासाठी थांबायला लागले. त्या हाॅटेलच व्यवस्थापण, तिथल नियोजन हे सगळ बघायला लागले.
एका दिवशी त्या हाॅटेलला एक विदेशी शिष्टमंडळ उतरल आणि उतरलेल्या विदेषी शिष्टमंडळाला अस वाटल की या हाॅटेलच नियोजन, व्यवस्थापन इतक उत्तम आहे तेव्हा या हाॅटेलच्या मालकाला भेटाव. आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली.
मग हा आला भेटायला. आता ते सगळे इंग्रजीतुन बोलायला लागले अन हा पठठया मराठीतुन बोलायला लागला. मग एकजण म्हणाला अहो, एवढया फाईव्ह स्टार हाॅटेलचे मालक तुम्ही; अन तुम्हाला इंग्रजी येत नाही का ? तुम्ही इंग्रजी शिकला नाहीत का ? तसा हा पठठया म्हणाला इंग्रजी शिकलो असतो तर आत्तापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो……
यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात हो, एक दार बंद झाल तर त्या झोळीत दहा दार उघडलेली असतात. तुम्ही एकाच दारावर नका टकरा मारत बसु. आम्ही काय करतो एक दार बंद झाल ना, की तिथच हातपाय गाळुन शांत बसतो. काहीच नाही होणार आता, हा दरवाजा उघडच नाही…
दरवाजा स्वत:हुन नाही उघडणार; तुला उघडावा लागेल.
रस्ता तुझ्यापुढे नाही येणार; तुला स्वत:ला रस्ता निर्माण करावा लागेल नाहीतर शोधावा लागेल.
एक जिवंत नियम आहे-
सांगा म्हणजे कळेल,
मागा म्हणजे मिळेल,
शोधा म्हणजे सापडेल,
आणि ठोठवा म्हणजे उघडेल…
हे करणं ज्याला जमत त्याला यश मिळत…
शोधा म्हणजे सापडेल. दार ठोठवा म्हणजे उघडेल, कारण मागणार्याला मिळतं, शोधणार्याला सापडतं आणि दार वाजवणार्याला दार उघडतं.
April 11, 2017
जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे.
June 6, 2021
प्रकाशन दिनांक :- 16/01/2005
पश्चिम महाराष्ट्राने विकास साधला म्हणण्यापेक्षा या भागाने विकासाची गंगा खेचून नेली, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भगिरथ प्रयत्नात त्या भागातील सामान्य शेतकरी तर सामील झालाच होता, सोबतच तिकडच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा वेळप्रसंगी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून आपल्या मतदारांचे हित जोपासणे सर्वोतोपरी मानले.
विदर्भाचा अनुशेष,विदर्भ-मराठवाड्याचे मागासलेपण याबद्दल नेहमीच ओरड होत असते.
January 16, 2005
मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतः चा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतः चे परीक्षण आजवर केले ही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगा द्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!
October 20, 2021

आपण मराठी माणसं भाग्यवान आहोत. आपल्याला जन्मताच शिवाजी महाराजांचा इतिहास मिळतो आणि अनेक गड किल्ल्यांचा वारसाही. हे किल्ले केव्हाही पाहावेत असे आहेत. काही विशेष कारणाने पहिले तर आणखी सुंदर दिसतात. एखादा सण किंवा नवीन वर्ष किल्ल्यांवर साजरे केले तर त्याच्या निराळ्या आनंदाचं वर्णन करत आहेत निरेन आपटे.
March 27, 2026
अलीकडील काळात आंदोलने `मॅनेज’ होण्याचे प्रकार इतके वाढले आहेत, की लोकांचा आता आंदोलनावरील विश्वासच उडाला आहे. बियाणे कंपन्या आणि सरकार, खत कंपन्या आणि सरकार, विरोधक आणि सरकार अशा अभद्र युतीतून बळी जातोय तो सर्वसामान्य शेतकर्यांचा आणि अधिक खेदाची बाब म्हणजे आपण नागविले जात आहोत हे शेतकर्यांनाही कळेनासे झाले आहे. सगळे आपापल्या जागी शांत आहेत, सुस्त आहेत.
July 23, 2012
आजवरचा अनुभव तर हेच सांगतो, की शेतकर्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या नावाखाली जितक्या काही योजना सरकार आखत असते त्यांची अंमलबजावणी केवळ प्रशासनातील अधिकारी, योजनेतील ठेकेदार, जे बहुतेक सत्ताधारी पक्षाचे समर्थक किंवा कार्यकर्ते असतात अशांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठीच केली जाते. सध्याची शालेय पोषण आहार योजना त्याला अपवाद नाही. विद्यार्थ्यांना आहार किंवा आहाराच्या नावाखाली बेचव खिचडी आणि इतरांचे पोषण असेच या योजनेचे सध्याचे स्वरूप आहे. ते बदलले, तरच उद्याचा भारत सक्षमपणे उभा करू शकणारी सुदृढ पिढी निर्माण होईल!
June 5, 2012
योग्य आणि योग्यता या दोन्हीची समज असणे आवश्यक आहे. जसे एखादा दागिना बनवताना कोणता हिरा कुठे लावावा याची समज कारागीरला असेल तर तो छोट्या मोठ्या सर्व हीऱ्यांचा वापर आपल्या दागिन्यात करून घेतो. तसेच एका कंपनीचा मालक आपल्या कंपनीत एखाद्या पदासाठी कोणाची निवड करताना त्याची योग्यता तपासतो.
December 13, 2022
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आणि श्री रामांना एकदाचा मानवी जगात, मानवी न्यायालयात न्याय मिळाला पण श्री रामानी स्वतः च्याच जन्मभूमी मध्ये जेथे त्यांनी कधी काळी राज्य केले होते . त्यांचे मंदिर बांधान्या साठी त्यांच्या भक्तांना न्यायालयात याचिका दाखल करून खटला का लढावा लागला ?त्याचा पूर्व इतिहास काय? याचा उहापोह आज या लेखात मी करणार आहे.
November 19, 2019
वाङ्मय जगतात ‘साहित्य’ आणि ‘ललित लेखन’ या दोन संज्ञा वारंवार वापरल्या जातात. वरवर पाहता त्या सारख्याच वाटत असल्या, तरी त्यांच्या व्याप्तीत आणि लेखनाच्या उद्देशात मोठा फरक आहे. साहित्य ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे, तर ललित लेखन हा त्याचाच एक अत्यंत सुंदर आणि कलात्मक भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘साहित्य’ हे जर एक विशाल उद्यान असेल, तर ‘ललित लेखन’ हे त्या उद्यानातील सुवासिक आणि सुंदर फुलांसारखे आहे. साहित्याने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, तर ललित लेखनाने माणसाचे मन समृद्ध होते. दोन्हीचेही मानवी जीवनात आणि समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
August 12, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti