(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • अमिताभ ह्यांनी विचारलं

    लोणचं वाला च बोलना हैं क्या ?”
    अमिताभ बच्चन ह्यांची एखादी जाहिरात टीव्ही सुरु होते आणि ते शुद्ध मराठीमध्ये बोलत असतात. आपोआप मनात प्रश्न येतो त्यांना मराठी येत असेल काय ?
    मराठीच नव्हे तर गुजराती, तामिळ, तेलगू आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये ते बोलताना दिसतात. इतक्या भाषा ते बोलू शकतात का ?

  • टिप्पणी : इच्छामरण – विभाग -१

    हल्ली इच्छामरण-दयामरण या विषयावर बरीच चर्चा चालूं आहे. यावर भारत सरकार एक कायदा करणार आहे, आणि सरकारच्या ‘फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट’नें दीड वर्षांपूर्वी या विषयाबद्दल जनतेकडून मतें मागवली होती. वेळी मीही त्या डिपार्टमेंटला, माझ्या इंग्रजी लेखाद्वारें , माझें मत कळवलें होतें.

  • अत्र तत्र सर्वत्र

    मायणातील एक गोष्ट सर्वविदित आहे. वाटमारी करून लोकांना त्रस्त करणाऱ्या वाल्याला तुझ्या या कामाला तुझ्या कुटुंबीयांचे समर्थन आहे का, तुझ्या पापात ते वाटेकरी आहेत का, असे नारदाने विचारले. वाल्याने आपल्या कुटुंबीयना यासंदर्भात विचारले असता त्याच्या पापात आपण सहभागी नसल्याचे त्यांनी सांगितले.

  • क्रूर अपेक्षा

    निमहकीम लोकांच्या भरवशावर उपचार सुरू आहेत. रोगी मरणार नाही तर काय? कुणी सांगते पॅकेज द्या, कुणी सांगते सबसिडी द्या, कुणी स्प्रिंकलरसाठी अनुदान देण्याचा उपाय सुचवतो, तर कुणी बियाणे मोफत पुरवायला सांगतो आणि सरकारदेखील फारशी शहानिशा न करता हे सगळे उपाय करून पाहते, त्यासाठी कोट्यवधींची उधळण करते.

  • बंदची घुसमट आता पुरे !

    अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

    एकीकडे सगळं काही खुलं केल्या जात असताना, अगदी सार्वजनिक कार्यक्रमांनाही मान्यता दिली जात असताना मंदिरांची कुलपे न उघडण्यामागे कोणतं तर्कशास्त्र असेल? हे लक्षात येत नाही. देवळे उघडण्यामागे लोकांची श्रद्धा हे कारण आहेच, परंतु यामागे भक्कम असे अर्थकारण देखील आहे. देवस्थानांच्या आधारे अक्षरश: लाखो कुटुंबे जगत असतात. हा निव्वळ श्रद्धेचा विषय नसून रोजीरोटीचा सवाल आहे. हे सरकारच्या लक्षात येत नसेल का?

  • फांद्या कुठवर छाटणार?

    आपल्याला लोकपाल, लोकायुक्त का हवे आहेत, कारण राजकारणी भ्रष्ट आहेत आणि राजकारणी का भ्रष्ट आहेत, कारण लोकांचा त्यांच्यावर अंकुश नाही. हा अंकुश मतपेटीच्या माध्यमातून ठेवता येत असेल तर आधी त्याचाच विचार व्हायला हवा.

  • शेतकर्‍यांनी नक्षलवादी व्हावे काय?

    सरकारने आधी शेतकऱ्यांना रासायनिक शेतीचा पाठ पढवित त्यांच्या पायातील बळ हिरावून घेतले, त्यांना कुबड्या दिल्या आणि आता खते, बियाण्यांची टंचाई निर्माण करून या कुबड्याही हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. विवश शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे? त्यांनाही तुम्ही गोळ्या घालणार?

  • घर एक बोधकथा

    आस्था वाहिनी वर एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा विस्तार

  • जनता मंत्र्यांकडे, दुकानदार अधिकार्‍यांकडे!

    प्रकाशन दिनांक :- 20/02/2005

    र्ीकाम करून घेणे’ ही संकल्पना अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. एवढेच नव्हे तर काम करून घेण्याची कला आत्मसात करणे हीच यशाची एकमेव गुरुकिल्ली ठरू पाहात आहे. अर्थात केवळ वाच्यार्थाच्या दृष्टीने विचार केल्यास त्यात वावगे असे काहीच दिसत नाही, परंतु ‘काम करून घेणे’ या संकल्पनेमागील लक्षार्थ मात्र बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करून जातो.

  • आपण आणि आपले जगणे

    या सृष्टीच्या व्युत्पत्तीपासून विश्वाच्या निर्मितीचे गूढ उलगडताना मानवाचे स्वत:च्या लौकिक..परमार्थिक प्रगतीसोबत या अवकाशगंगेतील तमाम घटकांचे अस्तित्व उजळून टाकण्यासाठी सातत्याने संशोधन चालू आहे. आदिम काळापासून माणसाचे स्वत:च्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मार्ग शोधणे चालू होते. आणि जसजसे ते मार्ग सापडत गेले तसतसे माणसाच्या जगण्याला नवनवीन कंगोरे प्राप्त होत गेले.