(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नवीन वर्ष गड-किल्ल्यांवर

    आपण मराठी माणसं भाग्यवान आहोत. आपल्याला जन्मताच शिवाजी महाराजांचा इतिहास मिळतो आणि अनेक गड किल्ल्यांचा वारसाही. हे किल्ले केव्हाही पाहावेत असे आहेत. काही विशेष कारणाने पहिले तर आणखी सुंदर दिसतात. एखादा सण किंवा नवीन वर्ष किल्ल्यांवर साजरे केले तर त्याच्या निराळ्या आनंदाचं वर्णन करत आहेत निरेन आपटे.

      March 27, 2026


  • देशबुडव्याला “भारतरत्न”?

    सचिनचे कौतुक आणि क्रिकेटची नशा लोकांसाठी वेदनाशामक औषधीचे काम करते. क्रिकेटची ही धुंदी, क्रिकेटचे हे गारूड जोपर्यंत लोकांच्या डोक्यातून उतरत नाही आणि त्याला “भारतरत्न” देण्यात येऊ नये याकरिता आंदोलन करीत नाहीत, रस्त्यावर उतरत नाहीत, फेसबुक किंवा इंटरनेटद्वारे या विरोधात जनजागृती करीत नाहीत तोपर्यंत हा देश सुधरू शकणार नाही.

      July 31, 2011


  • याला जीवन ऐसे नाव

    काही काही वेदनांना सांत्वनाच्या शब्दांचा भारही पेलत नाही…. वपुंच्या या वाक्यात व्याकुळ करणाऱ्या संवेदनांची अनुभूती शब्दांकित झालेली दिसते.

      August 16, 2019


  • बालपणीचा काळ सुखाचा

    ‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते.

      May 31, 2020


  • आयुष्यावर बोलू काही……

    सध्या लोक हसायला विसरले आहेत.सतत सगळे काळजीमध्ये दिसतात.चिंता करायची काहीच गरज नहिये,कारण दुःख सगळ्यांनाच असतात,काही लोक दाखवतात काही लोक उत्तमप्रकारे लपवतात.दुःख कोणाला चुकलेल नाहीये ते कोणामधे भेदभाव नाही करत.श्रीमंत लोकांना पण असत आणि गरिबांना पण.दुःख दुःख करुन एवढ सुंदर आयुष्य जगायच सोडून द्यायच का??

      June 23, 2019


  • ती’

    ती सर्वप्रथम माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला काही म्हणता काहीही कळत नव्हतं. खरं तर ती कसली माझ्या आयुष्यात येतेय, तिच्याच कृपेने मला या पृथ्वीवर जन्म घेता आला! तिच्याजवळ मला विलक्षण सुरक्षित वाटायचं. आज असंख्य महासंहारक अण्वस्त्रं जवळ बाळगूनही या पृथ्वीवरील अनेक देशांना असुरक्षिततेची भावना रात्रंदिवस ग्रासून टाकते. पण ती कोणत्याही अस्त्राच्या मदतीविना केवळ एका पदराचा उपयोग करून या जगातली सर्वात प्रभावी सुरक्षा मला कशी काय प्रदान करायची याचं मला आजही प्रचंड आश्चर्य वाटतं. मी जसा वयाने मोठा होऊ लागलो तसं माझ्या लक्षात येऊ लागलं की ती एकाच वेळी असंख्य कामं न थकता आणि अगदी वेळेत पार पाडते आणि तरीही ‘कंटाळा’ या शब्दाचं स्पेलिंगही तिला माहीत नाही! लहान असताना स्वत:ची आंघोळ स्वत:च्या हाताने धड करू न शकणारा मी, घरातली व घराबाहेरची सर्व कामं तिला विद्युत्वेगाने आणि सतत हसतमुख राहून करताना बघून आश्चर्यचकित व्हायचो आणि स्वत:लाच विचारायचो, हिला हे सगळं न थकता करायला कुठून ऊर्जा व प्रोत्साहन मिळत असेल? आपल्या बाबांवर ही सगळी कामं करायची जर कधी वेळ आली तर इतक्या इफिशिएंटली ते करू शकतील?

    अनेक वर्षांनंतर विविध कंपन्यांमधे मॅनेजर असताना व इतर मॅनेजर्सच्या कामाचं बारकाईने निरीक्षण करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की एका ठरावीक वेळात अनेक कामं सारख्याच तत्परतेने व कार्यक्षमतेने करणं माझ्यासकट एकालाही जमत नव्हतं. एकदा आमच्या कंपनीत ‘टाइम मॅनेजमेंट’ या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम करायचं ठरत होतं, तेव्हा त्यासाठी तिलाच आमंत्रण द्यावं असं मला तीव्रतेने वाटून गेलं! काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका मोठ्या संस्थेने एका परिसंवादाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मला आमंत्रित केले. परिसंवादाचा विषय होता ‘स्त्री-पुरुष समता’. तरुण-तरुणी एकमेकांवर शब्दास्त्र सोडण्यासाठी अगदी तयारीत होते. बहुसंख्य तरुणांचं म्हणणं होतं की समता हे एक फॅड आहे व त्याची काहीही गरज नाही. निसर्गानेच स्त्री व पुरुषाला असं तयार केलं आहे की ते एका पातळीवर कधीच येऊ शकणार नाहीत. तरुणींनी अर्थातच त्यांच्या या म्हणण्याला कडाडून विरोध केला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांची बरोबरी करण्यासाठी त्या अत्यंत आग्रही होत्या व त्यांचं म्हणणं अगदी तावातावाने मांडत होत्या.

    तारस्वरात चाललेल्या त्या वादविवादातील मतमतांतरे ऐकताना अंतर्मुख झालो असतानाच माझ्या डोळ्यांसमोर ‘ती’ तरळली आणि असं वाटलं, आज या परिसंवादात ती सहभागी झाली असती तर काय म्हणाली असती? ती म्हणाली असती - ‘श्रोतेहो, स्त्री-पुरुष समता हा आजच्या परिसंवादाचा विषय अत्यंत चुकीचा आहे असं तुम्हा सर्वांना नाही वाटत? ज्या स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची सार्थ जाणीव असेल तिला पुरुषांशी बरोबरी करण्याची गरजच काय? खरं तर समतेच्या गप्पा मारणं म्हणजे स्वत:च्या स्त्रीत्वाचा घोर अपमान आहे. प्रत्येक क्षेत्र स्त्रियांनी स्वकर्तृत्वाने व्यापून टाकलं असलं तरी आजही पुरुषप्रधान संस्कृतीचे ढोल पिटण्याचा अडाणीपणा करणारे असंख्य पुरुष अस्तित्वात असताना त्यांची बरोबरी करण्यासाठी का धडपड करायची? यानंतर या जगातल्या प्रत्येक स्त्रीने ‘स्त्री-पुरुष समता’ हा विचार डोक्यातून कायमचा हद्दपार केला पाहिजे.’

    पुरुषांशी बरोबरी करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रियांना खडे बोल सुनावणारी ‘ती’ प्रत्येक घरात वावरत असते, जिला सगळं जग ‘आई’ या नावाने ओळखतं!

    -- श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

      June 10, 2016


  • दौरे बंद करा अन् पाककडे बघा…

    या देशातून त्या देशात… त्या देशातून पुन्हा आणखी कोणत्या देशात… पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दौरासत्र काही संपायला तयार नाही. एकीकडे देशापुढे महागाई आणि पाकच्या …..

      September 4, 2014


  • देश आणि सरकार रामभरोसे !

    इथला शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहचला आहे, इथला उद्योजक समाधानी नाही आणि इथली सामान्य जनतादेखील सुरक्षित नाही. खुशहाल आहेत ते केवळ सरकार आणि प्रशासनातील लोक, कारण ते या बहुराष्ट्रीय कंपन्यांची दलाली करीत आहेत. त्याचा भरपूर मोबदला त्यांना मिळत आहे. या अशा देशामध्ये राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे रोज बॉम्बस्फोट घडले तरी आश्चर्य वाटायला नको, कारण हा देश म्हणजे केवळ माणसांची गर्दी झालेला आहे. या देशाच्या सरकारमध्येच राष्ट्रीयत्वाची भावना नसेल तर इतरांकडून काय अपेक्षा करणार?

      July 17, 2011


  • एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – ३

    माणूस आयुष्यभर कमाईसाठी मरत असतो.यासाठी आयुष्यभर शरीराचे हाल करून पैसा कमवितो…नि म्हातारपणी तो मिळविलेला पैसा शरीराच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करतो…शेवटी गोळाबेरीज करताना हाती उरतं एक मोठ्ठ शून्य…

      March 31, 2018


  • जे. कृष्णमुर्ती

    काही माणसे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची पायवाट अदृश्य स्वरूपात असतेच. १२ मे १८९५ रोजी जे. कृष्णमुर्ती यांचा जन्म झाला. जे. कृष्णमूर्ती या थोर भारतीय तत्वज्ञाचा आपणास आता विसर पडलेला आहे. कृष्णमूर्तींचे विचार त्यांचे तत्वज्ञान हे नेहमीच समकालीन राहणार आहे. जे. कृष्णामूर्तींचे विचार मानव जातीला तारक ठरू शकतील असेच आहेत.भौतिक सुखाचा अतिरेकी हव्यास, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, भोगलोलुप्ता, जीवनशैली या गोष्टी मानव जातीला विनाशाकडे घेऊन जात आहेत. कृष्णमूर्तींनी आपले स्वतंत्र आणि स्वयंभू तत्वज्ञान जगाला दिले आणि एक सत्यदर्शी तत्वज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली.

      June 11, 2026