हिरव्या बोंडातून फुलणारा पांढरा शुभ्र कापूस लहान मुलाच्या चेहऱ्यावरील निरागस हास्याची आठवण करून देतो; परंतु दैव विसंगती बघा, हाच कापूस शेकडो शेतकऱ्यांच्या घरात मृत्यूची काळी छाया बनून वावरतो आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य,त्यांच्या जीवनातला आनंद या पांढऱ्या कापसाच्या काळ्या छायेत पार वितळून गेला आहे. काल झाले ते आज होणार नाही,या वेड्या आशत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या.
देव-बीव सगळं झूट आहे..थोतांड आहे..'मेडिकल सायन्स' हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे 'ऑपरेशन थेटर ' च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.."-डॉकटर कामेरकरांच्या ह्या वाक्यावर, सभागृहात एकंच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका 'मेडिकल कॉन्फरन्स' मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..
कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या 'मिसेस' चा मेसेज होता कि "मी आज किटी-पार्टीला जात्ये..मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात कि जेवा"...डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं.."देव-बिव सगळं झूट आहे" -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही ह्यावर ठाम..जगात एकंच सत्य..'मेडिकल सायन्स'..बाकी सब झूट है'..
डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.
ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली "बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय"......हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, "ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स.."
"साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत ह्यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही 'देव'च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल...हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला.."
डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते ह्याच विचारात डांग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो...चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक 'सत्कृत्यात' देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही ? आपण 'देवावर विश्वास' ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ? तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल ह्यावरच तो विश्वास असतो..डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माउली भरवत होती..त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता...डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते..
-- स्वरूप पुरुषोत्तम काळे
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
बालपणी शब्द आणि धन हे समीकरण सहसा मनाला पटायचंच नाही. हे कसचं धन..? शब्दांनी का आपल्याला एखादी वस्तू मिळते..? का हौसमौज होते..? यासाठी तर खण खण वाजणारा पैसाच हवा ना. त्यावेळी शब्द, रत्न आणि धन याचा मेळ लागता लागत नसे.
पेट्रोल महाग आहे. पूर्वी पेक्षा किंमत पेट्रोलची वाढत आहे. पण का वाढत आहे या गोष्टीचा विचार करूनच अगल्याला मदत करावी. अन्यथा करू नये आणि फसव्या जाळ्यात पडू नये.
एकांगी वर्चस्व किंवा ‘मोनोपोली’ ही कोणत्याही क्षेत्रासाठी तशी घातकच असते. केवळ फायद्याच्या दृष्टीने विचार केला तर कदाचित असे एकांगी वर्चस्व घातक ठरणार नाही, उलट चारही बाजूने फायदाच होऊ शकतो. परंतु एकूण विकासाचा विचार केला तर मात्र असे एकांगी वर्चस्व नक्कीच घातक ठरू शकते.
कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.
मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला.
मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही.
दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला, “काय सापडले काय उत्तर?”
मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या.
मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली.
मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच -तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते."
खंबिरपणे उभे राहा.कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेन बघा त्याचा खंबीरपणे सामना करा...कोन्हीही तुमचे काहीही करू शकनार नाही.. यश तुमचेच....
नाहीतर....
जग तुम्हाला आडवे करेल..
विचार करा
आता आर्थिक आधारावर नवे शूद्र आम्ही निर्माण करीत आहोत. जेव्हा हा आधार जातीगत होता तेव्हाही समाजातील एेंशी टक्के लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि आताही समाजातील एेंशी टक्के लोकांना उच्चशिक्षण नाकारले जात आहे. प्राथमिक शिक्षण मात्र सगळ्यांनाच उपलब्ध आहे, कारण प्राथमिक शिक्षणाची सोय सरकारतर्फे केली जाते.
पुन्हा बारावीत तो नापास झाला. जो मुलगा बारावी पास करू शकत नाही तो आयुष्यात काय करणार? फुकटचे किती दिवस खाऊ घालायचे तुला? तू जगला नि मेला काय, आम्हाला सारखेच. वडिलांचे कटु बोल राहून-राहून त्याला टोचत होते. मनात विचारांचे काहूर उठले होते. आपण एक साधी परीक्षा हि पास करू शकत नाही. व्यर्थ आहे असे जगणे. आपण मेलो तर निदान घरात एक खाणारा कमी होईल. भावनेच्या आवेशात त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला.
गावा जवळच्या डोंगराच्या कड्यावरून कधी-काळी कैद्यांना कडेलोट केले जायचे, त्या डोंगराच्या कड्यावर पोहचल्यावर त्याने कड्यावरून खाली बघितले. इथून उडी मारली तर आपण नक्की मरणार ना, खात्री करण्यासाठी त्याने खाली वाकून बघितले. पण हे काय, कड्याच्या थोड्या खालीच दोन दगडांच्या भेगेतून एक पिंपळाचे झाड डोकावात होते. झाडाच्या मुळांनी दूर पर्यंत दगडांना जखडून ठेवले होते. पिंपळाचे ते झाड गुरुत्वाकर्षणच्या नियमाला झुगारून वार्यासवे मस्त डोलत होते. च्यायला, इथून उडी मारली तर आपण कदाचित पिंपळाच्या झाडात अटकू. सहज त्याच्या मनात विचार आला, इथे न माती न पाणी, फक्त दगडाची एक भेग, तरी हि दगडांना धरून हे झाड जिवंत आहे.
आधारासाठी मातीच्या जागी दगड मिळाले तरी पिंपळाने तक्रार केली नाही. जगण्याशी आशा हि सोडली नाही. दगडातच त्याने जगण्याच्या मार्ग शोधला, दगडातूनच जीवनसत्व घेतले. आपल्या डोक्यावर तर छत आहे, घरात खायला हि मिळते. फक्त परीक्षेत नापास झालो म्हणून आत्महत्या? मनात विचारचक्र सुरु झाले. जर दगडाच्या आधारावर पिंपळ जगू शकू शकतो तर आपण हि स्वावलंबी होऊन जगू शकतो. आपण आत्महत्या केली तर आई वडिलांना किती दु:ख होईल. शाळेत नापास झालो तरी काय झाले, आपल्याला हि पिंपळाप्रमाणे जगण्याचा काही ना काही मार्ग निश्चित सापडेल. त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि घरी परतला. नव्या जोमाने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी.
-- विवेक पटाईत
सुदृढ, निकोप आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. दुर्दैवाने आज जे विचार विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविले जात आहेत ते कमालीचे नकारात्मक आणि विषात्त* आहेत. या वैचारिक प्रदूषणासाठी सर्वाधिक जबाबदार आहे तो ‘इडियट बॉक्स’ अर्थात छोटा पडदा!
गेल्या काळात एक मोठं आंदोलन मराठा समाजाने उभं केलं होतं..मात्र यावेळीचा संघर्ष कायदेशीर आहे..त्यात संयम सुटणार नाही, याची दक्षता मराठा समाजाने घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मराठा समाजाचा संयम सुटणार नाही, याची खबरदारी सरकारने घेण्याची गरज आहे..!!!
Copyright © 2025 | Marathisrushti