खर्या अर्थाने शेती आणि शेतकरी केंद्रीत अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर एक वेगळा आणि स्वदेशाभिमानी अर्थविचार घेऊन समोर येणार्या राजकीय ताकदीची गरज देशाला आहे. दुर्दैवाने सध्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांपैकी एकातही ती गरज पुरविण्याची क्षमता नाही. लोकांना काहीतरी वेगळा पर्याय शोधावाच लागेल.
पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल.
आपले नशीब फार चांगले म्हणूनच मोदींना 284 चे स्पष्ट बहुमत मिळाले, आणि एक पांगळे सरकार देशावर लादण्याची नामुष्की टळली. 70 वर्षात वारेमाप काळा पैसा जमावणाऱ्यांची पहिल्यांदा झोप उडाली आहे. कर बुडवून अफाट मालमत्ता गादीखाली, माळ्यावर, भिंतीत, जमिनीत ठेवणारी जमात, खडबडून जागी झाली आहे. मोदींच्या जीवाला ह्याच लोकांचा मोठा धोका आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.
या देशाचा हजारो वर्षाचा इतिहास आहे, घरचा भेदी हा देशावर लागलेला शाप आहे, या वेळेस असे भेदी मिळणारच नाहीत याची खात्री देता येणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागे राहण्याला पर्याय नाही.
मोठया प्रमाणात जंगम व स्थावर मालमत्ता करणाऱ्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काही दिवसात दणका बसू शकतो. कित्तेक लोक बेनामी संपत्ती करून बसले आहेत, त्याचा हि पर्दाफाश काही दिवसात होऊ शकेल. आजपर्यंत 97 टक्के पैसा फक्त आडव्या वर्तुळात फिरत राहिला ज्याने दुबळ्या अर्थकारणाला जन्म दिला व पैसा फक्त तीन टक्के लोकांच्या हातात राहिला. तो उभ्या वर्तुळात फिरला तरच,तळागाळात मोठया प्रमाणात पैसा पोहोचतो व सुदृढ अर्थव्यवस्था तयार होते.
भारतीय लोकांना घाईच फार, ट्रेन जरी स्टेशनवर अर्धातास थांबणार असली तरी, आरक्षित डब्यातुन उतरण्यास व चढण्यास घाई करतील, तीच परिस्थिती, उच्च वर्गीय लोक विमानातून उतरताना करतात. पायलट कुर्सी कि पेटी छोड दे असे म्हणताच, लोक तडक उभे राहतात, व वरती ठेवलेल्या ब्यागा काढण्याची घाई करतात. इतके करून बाहेर जाऊन मात्र कनवेअर बेल्टवर समान येण्याची वाट पाहत 20-25 मिनिटे घालवतात. तीच गत पैसे बद्दलणाऱ्यांची बँकेत दिसली. 30 डिसेंबर पर्यंत सवलत असतानाही, पहिले 3-4 दिवस बँकेत झुंबड करण्याची काही आवश्यकता न्हवती. पण आमभारतीयांची मानसिकता प्रत्येक ठिकाणी घाई करण्याची असते, ते इथेही सिद्ध झाले. अशीच घाई मात्र टॅक्स भरण्यासाठी मात्र करताना दिसत नाहीत. थकवलेली वीज, पाणी, यांची बिले जेव्हा कापायची नोटीस येते तेव्हाच भरली जातात हे चित्र कमी अधिक प्रमाणात देशात सगळीकडे सारखेच आहे.
इंदिराजी नंतर मोदीजी हेच सर्वार्थाने या देशाला धडाडीचे पंतप्रधान म्हणून लाभले, असे आपण म्हणू शकतो. बँकेत लांबच लांब रांगा रहाणे हे मोदींचे अपयश नसून, काही शाखेतील कर्मचाऱ्यांची नियोजनाची बेजबाबदार वृत्ती म्हणू शकतो, हे मी उदाहरणाने सांगू शकतो.
काही शाखेत 10 तारखेला 10 वाजता नोटा वाटप सुरु झाले, एकूण किती लाखाच्या नोटा त्या शाखेत सरकारने दिल्या आहेत, या वरून तेथील प्रबंधक नोटा बदलीसाठी लागलेल्या रांगेतील अंदाजे किती लोकांना नोटा मिळतील, हे सांगून इतरांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगू शकले असते, व लोकांची ससेहोलपट थांबवू शकले असते. 12.30 ला कॅश संपली व मी प्रबंधकाना 1 वाजता, कधी कॅश येणार असे विचारल्यावर, त्यांनी 4 वाजता येईल असे उत्तर दिले, हेच त्यांनी रांगेतील लोकांना सांगितले असते तर लोक घरी निघून गेले असते. मी केबिन बाहेर येऊन लोकांना असे सांगितले, तशी गर्दी ओसरू लागली. या मुळे फक्त पैसे भरणारे लोकच बँकेत थांबले, आणि गर्दी आटोक्यात राहिली. जे काम व्यवस्थापकाचे होते, ते मला करावे लागले. काही शाखेत दोन चार महिन्यात रिटायर होणारे कर्मचारी नोटा बदलण्यासाठी नियुक्त केले, त्यांना फक्त एक बोटाने किबोर्ड चालवता येत होता, त्यामुळे चार हजार बदलीसाठी प्रती व्यक्ती अंदाजे 5 मिनिटे खर्ची होत होती, जे काम 23-25 वयाच्या व्यक्तीला दिले असते तर अडीच मिनिटात झाले असते, व रांगा लवकर संपल्या असत्या.
काही मोजक्याच बँक शाखेत खूप चांगले चित्र होते, रांगेतील लोकांना पाणी, चहा वाटप करण्यात आले. कर्मचारी वर्ग अदबीने वागत होता, तसेच जेष्ठ नागरिकांना मदत दिली जात होती. नोटा बदलण्याचा वेग हि अपेक्षित असा चांगलाच होता.
असे छोटे छोटे निर्णय घेतले असते तर, टीव्ही वर बातम्यात दिसणाऱ्या लांबच लांब रांगा दिसल्या नसत्या, लोकांची छळणूक झाली नसती, व विरोधी नेत्यांची ओरड दिसली नसती. अश्या बाळबोध युक्त्या अमलात आणल्या असत्या तर, नाहक काही लोकांचा बळी गेला नसता.
-- विजय लिमये
एक मंदिर होत, प्रसिध्द मंदिर होत, त्या मंदिरात अनेक देश विदेशातील लोक यायचे, भक्तगन यायचे. त्यामुळे ते मंदिर खुपच चर्चेचे प्रसिध्दीचे होते. आणि मग काही दिवसांनी त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. आणि मग ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला आपल्या मंदिरात देश-विदेशातील लोक, भाविक भक्त येतात. त्यामध्ये इंग्रजी बोलणारे भाविक भक्त वैगेरे असतात. तेव्हा आपल्या मंदिरातल्या सगळया लोकांना, कर्मचार्यांना पण इंग्रजी आल पाहिजे. त्यांनी लगेच फरमानच काढला. मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलच पाहिजे. कंम्पलसरीच आहे म्हणे….
झाल…..
आता काय,
आता त्या देवळात एक घंटा वाजवणार होता. त्याला हि कंम्पलसरी झाल ना. ते म्हणे मला काय इंग्रजीचा उपयोग आहे? मी का इंग्रजीत घंटा वाजवतो का ? आणि इंग्रजीत वाजविली काय अन मराठीत वाजवली काय, वाजणार घंटाच आहे. म्हणुन मी शिकलो नाही म्हणुन काय होतय… ट्रस्टी म्हणाले नाही, नियम म्हणजे नियम, सगळयांना इंग्रजी आलच पाहिजे.
आता त्या घंटा वाजवणाराच पन्नास-पंच्चावन वय त्याच, तो म्हणाला आता कधी शिकव ? त्याने सरळ ती घंटा वाजवायची नौकरीच सोडली.
बर आता नौकरी सोडली पण पोटापाण्यासाठी काहीतरी केलच पाहिजे. कराव तर काय कराव, मग त्याने विचार केला मंदिर प्रसिध्द आहे देश-विदेशातले भाविक-भक्त येथे येतात आणि मंदिराच्या आसपास कुठ चहा पिवाव तर काही व्यवस्था नाही. मग त्याने काय केले तर सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाच टपर टाकल. आता मंदिरात अनेक भाविक-भक्त यायला लागले त्यामुळे गर्दी जास्त, जशी गर्दी जास्त तस चहाच टपर जोरात चालल. बघता बघता त्या चहाच्या टपराच त्याने एका छोट हाॅटेल केल. छोट हाॅटेल हि तुफान चालल. मग छोटया हाॅटेलच त्याने मोठ हाॅटेल केल. मोठ हाॅटेल सुध्दा भयानक चालल आणि बघता बघता त्याची तिन चार मोठी हाॅटेल झाली. आणि मग नंतर त्याने फाईव्हस्टार हाॅटेलच काढल. आणि अशा फाईव्ह स्टार हाॅटेलची साखळीच तयार केली. अन त्याच्या या फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये देष-विदेषातील भाविक-भक्त यायला लागले. निवासासाठी थांबायला लागले. त्या हाॅटेलच व्यवस्थापण, तिथल नियोजन हे सगळ बघायला लागले.
एका दिवशी त्या हाॅटेलला एक विदेशी शिष्टमंडळ उतरल आणि उतरलेल्या विदेषी शिष्टमंडळाला अस वाटल की या हाॅटेलच नियोजन, व्यवस्थापन इतक उत्तम आहे तेव्हा या हाॅटेलच्या मालकाला भेटाव. आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली.
मग हा आला भेटायला. आता ते सगळे इंग्रजीतुन बोलायला लागले अन हा पठठया मराठीतुन बोलायला लागला. मग एकजण म्हणाला अहो, एवढया फाईव्ह स्टार हाॅटेलचे मालक तुम्ही; अन तुम्हाला इंग्रजी येत नाही का ? तुम्ही इंग्रजी शिकला नाहीत का ? तसा हा पठठया म्हणाला इंग्रजी शिकलो असतो तर आत्तापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो……
यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात हो, एक दार बंद झाल तर त्या झोळीत दहा दार उघडलेली असतात. तुम्ही एकाच दारावर नका टकरा मारत बसु. आम्ही काय करतो एक दार बंद झाल ना, की तिथच हातपाय गाळुन शांत बसतो. काहीच नाही होणार आता, हा दरवाजा उघडच नाही…
दरवाजा स्वत:हुन नाही उघडणार; तुला उघडावा लागेल.
रस्ता तुझ्यापुढे नाही येणार; तुला स्वत:ला रस्ता निर्माण करावा लागेल नाहीतर शोधावा लागेल.
एक जिवंत नियम आहे-
सांगा म्हणजे कळेल,
मागा म्हणजे मिळेल,
शोधा म्हणजे सापडेल,
आणि ठोठवा म्हणजे उघडेल…
हे करणं ज्याला जमत त्याला यश मिळत…
शोधा म्हणजे सापडेल. दार ठोठवा म्हणजे उघडेल, कारण मागणार्याला मिळतं, शोधणार्याला सापडतं आणि दार वाजवणार्याला दार उघडतं.
अनुबंध म्हणू की पाश
इच्छाच त्या हताश
कच्च्याच वासनांचा
पिकल्याविना विनाश
जेव्हा देशाच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा आर्थिक स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. देशाची अर्थव्यवस्था मजबूत असेल तरच तो देश अनेक संकटांवर मात करू शकतो आणि अनेक संकटांना दूर ठेवू शकतो.
आपल्या देशाचे वर्णन करताना अनेक चांगली विशेषणे कवींनी, साहित्यिकांनी वापरली आहेत.
सृजन प्रकाशन तर्फे नामदेव माळी यांनी सुद्धा बरीच पुस्तके लहान मुलांची प्रकाशित केली आहेत. ज्यांना रस्ता शोधायचा असतो त्यांना पायवाट आपोआप मिळतें. असंख्य पायवाटा आपल्या अवतीभवती असतात, फक्त शोधक दृष्टी हवी व एक होती तरी पाऊल पुढे टाकण्याची इच्छाशक्ती हवी.
श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा.
कोणता पक्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाबुगिरीवर नियंत्रण ठेवण्याची हिंमत बाळगून आहे? विशेष गरज नसताना विकासकामातील पैसा वळवून सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. या आयोगाच्या शिफारशी तुर्तास, राज्याची आर्थिक घडी नीट बसेपर्यंत लागू करणार नाही, असे म्हणण्याची हिंमत दाखवू शकतो?
सुरक्षा रक्षकाने एका दमात खुलासा केला…… मन अत्यंत बेचैन झाले, दिवसभर कांहि सुचत नव्हते….. इतके वर्ष झाली पण आजोबांचा तो निर्विकार चेहेरा नाही विसरता आला…….
जग झपाट्याने बदलत आहे. या स्थित्यंतराचा वेग अतिप्रचंड आहे. आपले अस्तित्व टिकवून प्रगती साधायची असेल तर या वेगाशी आपल्याला जुळवून घेणे भाग आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti