वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

September 20, 2015
भगवान गणेशाचे हे स्तोत्र जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्या वृत्तात रचले त्या नावानेच ते विख्यात झाले आहे. या स्तोत्राचे वृत्त आहे भुजंगप्रयात. भुजंग अर्थात सर्प. तो जात असताना ज्या प्रकारच्या वळणांचा उपयोग करतो तशी वळण घेत जाणारी ही शब्दावली. त्यामुळेच या वृत्ताला भुजंग प्रयात असे म्हणतात.
January 13, 2020
सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत होता. कर्नाटकी पोलिसांच्या लठ्या-काठ्या झेलत होता. छातीची ढाल करून अंगावर वार घेत होता. कर्नाटकी अत्याचारांना समर्थपणे तोंड देत होता. मराठा तुटेल, मोडेल पण वाकणार नाही याची पुन्हा, पुन्हा प्रचिती येत होती.
September 26, 2021
शहरात राहणार्यांनी सोयाबिन हे नाव ऐकल आहे का?
नाही..
बरं सोया हे तेलाचे नाव ऐकल का? आता उत्तर हो येईल.
मी एक पोलीस आहे आज घरून नीघालो एक फोन आला खामगाव Market जवळ खुप गाड्यांची गर्दी जमा झाली असुन संपुर्ण रस्ता बंद झाला आहे .मी आणी माझे सहकारी पोचलो तर 300/400 छोट्या मोठ्या गाड्या market समोर रांगा लावलेल्या दीसल्या सहज वीचारल तर प्रतेक गाडीत सोयाबीन. शेतकरी बांधावानी वीकायला आनलेले. भाव वीचारला 2200 /2500 असा.(हाच भाव पाच वर्षे आगोदर पन होता.पन त्यावेळी सोया तेलाचा भाव 40/45 रूपैय होता.पन सोयाबीनचा पाच वर्षा आगोदरचा भाव आज शेतकरी भावाला मीळतोय. पन तेलाचे भाव आज 70ते75रूपय हा विरोधाभास नाही का?
कच्चा माल आतीश्य स्वस्त आणि त्या पासुन बननारा माल पाच पट माहाग कारन कच्चा माल गरीब,असंघटीत अश्या शेतकरी वर्गाचा ) गाड्यावाल्याना वीचारले कोठुन आलात बरेच सांगत होते की मेहकर, जानेफळ, बुलडाणा,शेगाव,नांदुरा, मलकापुर आणी इतर बर्याच गावावरून. आलेला माल माती मोल कीमतीत वीकल्या जात होता तरी शेतकरी रांगा लाऊन उभा.
काय करनार वीदर्भ मराठवाडा गेल्या चार ते पाच वर्षा पासुन दुष्काळात होर पाळतोय. या वर्षी पाऊस बरा झाला सोयाबीन एक मात्र नगदी पीक.त्याच्या भरोश्यावर दीवाळी, उसनवारी, कर्ज, मुलांचे ,शिक्षण आणी बर्याच गोष्टी .गाडीत माल भरला खामगावला चांगला भाव मीळतो म्हणुन आनलेला. बाजारात भाव नाही वापस नेता येत नाही. आगोदर खर्च खुप झालेला. व्यापारी जो भाव देइल तो भाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी बांधावाच्या जीवावर मोठी झालेली संघटना मुंग गीळून चुप का? निवडनुकी च्या अगोदर ईव करेगे टीव करेगे म्हननारे आता कुठ आहेत .
आपण जगतो आहोत ते शतकर्य च्या भोरोश्यावर. शेतकरी पीकवतो तेंव्हा आपल्या ताटात असत. शेतकरी जगला पाहीजे. लाखांचा पोशींदा जगला पाहिजे. सरकारला म्हना पेट्रोल शंभर रूपय करा.दारू ,सिगार,बुट इतर चैनीच्या वस्तू चे भाव दीडपट करा नोकरदार वर्गाला एका महीन्याचा पगार कमी द्या. शेतकरी बांधवाच्या सोयाबीनला भाव द्या .......
मित्रांनो आपण चिनचे सामन न घेन्याची चळवळ ऊभी केली त्याची दखल चीनला घ्यावी लागली...तसी ताकत आपल्याला सोशल मीडीयावर शेतकरी बांधवासाठी ऊभी करावी लागे मी छोटासा प्रयत्न सूरूकेला आहे .आप नाहाक चुटकुले पाठवतो आज शेतकरी भावाची व्यथा पाठवा....
कारन हे सरकार ..... what's up, Facebook च सरकार आहे.याला या मार्फत माहीती लवकर समजते...
-- तुकाराम लांडे
November 3, 2016
गणेशोत्सवात आणि स्पर्धेतही भाग घ्यायची, दोघींची ती पहिलीच वेळ होती! आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव तो पहिलाच होता.
January 30, 2022
श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील.
January 19, 2018
एका अज्ञाात लेखकाने विराट कोहलीला लिहिलेले हे खरमरीत पत्र. मराठीत असल्यामुळे कोहलीपर्यंत पोहोचणार नाही.. पण भाषांतर करुन कुणीतरी त्याच्यापर्यंत पाठवायलाच हवे. कळून दया त्याला त्याची लायकी
July 15, 2017
मुंबईची लाइफलाईन समजल्या जाणार्या मध्य व पश्चिम रेल्वेच्या स्थापनेस शनिवारी ६० वर्षे पूर्ण झाली. परंतू प्रवाशांच्या सुरक्षेविषयी ६० वर्षात तेवढी सुधारणा झाल्याचे दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. मुंबईतील ८० टक्के जनता ट्रेनने प्रवास करते त्यात नोकरी करणार्या स्त्रिया, शाळा व कॉलेजात जाणारे विद्यार्थी/वाद्यार्थिनी, वृद्ध, अपंग, दृष्टीहीन यांचे प्रमाण खूप आहे. दळणवळ क्षेत्रात रेल्वेवेचा देशात पहिला नंबर लागत असेल परंतू प्रवाश्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे फारच उदासीन आहे असे सध्या घडत असलेल्या घटनांकडे बघितल्यास प्रकर्षाने जाणवते.
November 9, 2011
बऱ्याच शहरवासीयांना साधारण मध्यमवयीन लोकांना विशेषतः महिलांना हल्ली खोटदुखी (टाचात दुखणे) ग्रासलेले असते. सततच्या उभे राहण्यामुळे किंवा चालण्यामुळे टाचा दुखायला लागतात. सकाळी उठल्यावर टाचा टेकविताना, खूप दुखतात किंवा बऱ्याच वेळा बसल्यानंतरही उठल्यावर टाचांवर वजन पडले, की थोडा वेळ लंगडायला होते.
May 5, 2023
संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस.. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
November 21, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti