वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आता कडक उन्हाळा सुरू झालाय. जिकडेतिकडे कलिंगडाचे ढीग रचलेले दिसतायत. उन्हामुळे शरीरातील कमी झालेलं पाणी भरुन काढायला कलिंगडाची मदत होते. ऊन्हाळ्यात फ्रूट-प्लेट सगळ्यांच्या आवडीची. त्यात आता कलिंगडाचं प्रमाण जास्तच असणार.
मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण नेहमीच फेकून देतो. पुढच्यावेळी कलिंगड खाताना बिया फेकून देऊ नका. कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बिया गुणकारी असून आपल्या शरीराला फायद्याच्या असतात.
कलिंगड बियाइसोबत खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमध्ये सिट्रालाइन हे अमायनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते. याचा उपयोग रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास होतो.
हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयुक्त आहेत. बियांमधील अॅन्टीऑक्सिडंट हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार कलिंगडाच्या बियांमधील फॅटस् घातक कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात.
किटाणूंच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठीही कलिंगडाच्या बियांचा उपयोग होऊ शकतो.
April 1, 2016
भारताची वाढती लोकसंख्या शाप आहे की वरदान हा वादाचा विषय होऊ शकतो. सध्या प्रचलित असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त मतप्रवाहानुसार वाढती लोकसंख्या शाप ठरत असली तरी थोड्या वेगळ्या अंगाने विचार केल्यास ही वाढती लोकसंख्या भारतासाठी वरदान ठरू शकते. लोकसंख्या वाढत आहे म्हणजे खाणारी तोंडे वाढत आहेत, असाच विचार केला जातो; परंतु त्याचवेळी काम करणारे दोन हातदेखील वाढत आहेत, याकडे दुर्लक्ष केले जाते.
July 23, 2006
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 36
नैवेद्यम् समर्पयामी - भाग दहा
नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा सेंदेलोण किंवा उपवासाचे मीठ चालते. हे मीठ खनिज प्रकारातील आणि औषधी गुणांनी भरपूर असते.
शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य वाढायचा असतो. आदर्श वाढलेले पान कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे नैवेद्याचे पान होय.
याचे वर्णन मागे एका टीपेमधे केलेले आहे.
सर्वसाधारणपणे आजच्या भाषेत ही राईसप्लेट असते. पण त्यावर वाढलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण तुलनात्मक किती असते, ते महत्त्वाचे आहे. पानाची डावी बाजू उजवी बाजू या संतुलीत असतील तर वेगळे प्रोटीन व्हिटामिन्स मोजत बसण्याची आवश्यकता नाही. लिंबामधे कितीही व्हिटामिन सी असले तरीही, नैवेद्याच्या पानावर, डाव्या बाजूला एका लिंबाच्या आठ फोडींपैकी एकच फोड घ्यायची असते. कोशिंबीरीमधे कितीही फायबर असले तरीही कोशिंबीर फक्त दोन चमचेच. दही पण चमचाभरच असते, पापड पण एकच. लोणच्याची एकच फोड. भजी दोन चिकोडी कुरडया प्रत्येकी एकेक. चटणी चमचाभर. उजवीकडे दोन मूद भात, त्यावर वरण तूप. एक मूद मसालाभात, एखादा गोड पदार्थ, आमटी, उसळ, सुकी भाजी, पुरी किंवा भाकरी,
एवढे आदर्श प्रमाण आपल्याला या नैवेद्याच्या पानातून मिळत असते. खरंतर तेवढीच गरज असते. नंतरचे असतात ते जीभेचे चोचले ! हे जास्त खाल्लेले अन्न पचविण्यासाठी जास्त हालचाली, जास्त श्रम करावे लागतात. नाहीतर हे अन्न तसेच साठून राहते आणि अंगाखांद्यावर नाचू लागते.
हा नैवेद्य सेवन करून म्हणा, आपल्या सर्व देवी देवतांची शरीरयष्टी किती आखीव रेखीव असते ना ! एकही देवता बेढब नाही. (लंबोदराचे उदर लंब आहे कारण त्याने एका दैत्याला पोटात धारण करून ठेवले आहे. मोदक खाऊन नव्हे, किंवा गणेशजी नरमांसभक्षक होते, असा विकृत विद्रोह कुणी करू नये, प्राकृत डोक्यात असं काही येणार नाही, पण आहेत काही टाळकी, त्यांच्यासाठी हा खुळासा खुलासा. )
नैवेद्य प्रोक्षण करण्यासाठी तुळशीची मंजिरी वापरतात. गायत्री मंत्र म्हणत, वाढलेल्या सर्व पानावर तुळशीच्या मंजिरीने पाणी शिंपडून घेतात. हे पान तुळशीचेच का तिथे कडूनिंब किंवा आंब्याचे पान का नाही ? यामागे देखील शास्त्र असेल, फक्त आमचा शास्त्र शोधण्याचा दृष्टीकोन प्राकृत नसल्यामुळे उलगडा होत नाही. देवाच्या षोडशोपचार पूजेमधील स्नानाचे अभिमंत्रित जल आंब्याच्या पानानी उडवले जाते. तिथे तुळस नाही वापरली जात. किंवा औषधी गुणांनी भरलेला असला तरी कडूनिंबाची पाने नाही वापरली जात. कडूनिंब गुढीच्या वेळीच गुढीला बांधावा, तिथे तुळस नाही बांधत. आंब्याची पाने तोरणासाठी, आणि विष्णुला सहस्त्र तुलसीदलेच वाहातात.
या केवळ रूढी परंपरा नाहीत, यामागे विशिष्ट ज्ञान किंवा शास्त्र आहे. आयुर्वेद हा असाच आहे. विज्ञानवादी शास्त्रोक्त !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
29.06.2017
June 29, 2017


भारतीय पुराणातील भस्मासुराची आणि युरोपियन लोकसाहित्यातील मिडास राजाची कथा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. भस्मासुराची प्रवृत्ती आणि आताच्या अतिरेक्यांची प्रवृत्ती यामधील साम्य लक्षात घेतल्यास भस्मासुराला आद्य क्रांतिकारकाच्या धर्तीवर आद्य अतिरेकी म्हणून संबोधण्यास हरकत नाही. तर अशा या भस्मासुराने भगवान शंकराला वर मागितला होता की, तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू भस्मसात होऊन जाईल. भोळा सांब म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराने परिणामांचा विचार न करता तथास्तू म्हणून टाकलं. आता आपलं कोण काय वाकडे करु शकतो, या विचाराने उन्मत झालेल्या भस्मासुराने सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. आणि शेवटी तो साक्षात भगवान शंकराच्याही मागे लागला.
दैनिक देशोन्नती मध्ये पूर्वप्रकाशित हा लेख ४ ऑगस्ट २००२ रोजी मराठीसृष्टीवर अपलोड करण्यात आला.
August 4, 2002
जगात बर्याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. बर्याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात.
August 12, 2025
आपण जागरूक आहोत आहाराबद्दल , आरोग्याबद्दल . मिळेल त्या माध्यमातून भाषेतून आपण आरोग्य विषयी जाणून घेत आहोत . त्यात हि आज आयुर्वेद शास्त्राबद्दल जनजागृती आणि आयुर्वेदातील मूल्यवान आहार आणि औषधी विषयी खूप छान माहिती रोज whats app , Facebook आणि इतर माध्यमातून उत्तम प्रकारे प्रसारित होत आहे . आरोग्याविषयीचे हे अभियान म्हणजे एक क्रांतीच म्हणावी लागेल . याचे दूरगामी फायदे पिढ्यान पिढ्या दिसतील .
आरोग्य ह्या संकल्पनेकडे बघण्याची वेगळी दृष्टी आज आयुर्वेदातील संकल्पना समजून घेताना आपल्याला गवसत असणार. आम्ही आयुर्वेदा चे शिष्य हि अनुभूती घेत च समृध्द होत आलोय .मनुष्य प्राण्याचे जीवन हे शरीर धारणास्तव केलेले अन्न भक्षण , मलमूत्र विसर्जन ,संभोग आणि कालयोगाने मृत्यू इतके अप्रगल्भ निश्चित नाही.तसेच आरोग्य ह्या शब्दाची व्याप्ती, शरीरातील काही अवयव त्यांचे बिघाड आणि त्यावरील उपाय एवढी संकुचित किंवा mechanical नाही (सुदैवाने ). कारण अजूनतरी आपण गाडी servicing ला टाकतो त्याप्रमाणे आपल्या प्रिय व्यक्तीला डॉक्टरकडे सोडून ,” ए बघ रे जरा काय part बिघडलाय , कुरकुर चाललीये दोन दिवस झाले . उद्या ऑफिसात जाताना घेऊन जातो , तोवर करून ठेव नीट” असे म्हणत नाही .
पृथ्वीच्या निर्मितीपासून निर्माण झालेल्या अमिबीय जीवापासून मनुष्य अशी अचाट , अकल्पित उत्क्रांती , प्रगती किंवा अजून काही योग्य शब्द असेल तर तोः घ्या . तर हे सगळे निसर्गातील दृश्य , अदृश्य , सिध्द , प्रत्यक्ष प्रमाण असलेले, अनुमान प्रमाण सचोटीवर उतरणारे , कलनीय अनाकलनीय बाजू असणारे हजारो प्रमेय च आहेत कि .
माणूस हा “प्राणी टप्प्यावर” च असताना केवळ प्राणीसुलभ शारीरिक विकासाचा एक limited era ओलांडून त्याही पलीकडे जाऊन माणूस नावाच्या प्राण्याचा विकास झाला . ह्या प्राण्याच्या उत्क्रांतीचे महत्वाचे टप्पे हे मानसिक विकासावर आधारलेले होते.
निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्गाचे , ऋतूंचे , निसर्गातील घडामोडींचे , आपत्तींचे ,उपलब्धींचे, सौंदर्याचे , सुहृदाचे, सृजनाचे, प्रसंगी क्रौर्याचे , विनाशाचे , संहाराचे धडे हा भविष्यकाळातील महाशक्ती असणारा परंतु त्याकाळी प्राणी ह्या परिभाषेची कात टाकायला निघालेला मनुष्य प्राणी गिरवत होता . हे धडे तोः असे गिरवत होता कि त्याची ABCD येणाऱ्या हजारो लाखो पिढ्या तो वारसा पुढे नेणार होत्या. प्रत्येक वेळी पुढे नेताना त्या तोः वारसा प्रगत, सोप्या भाषेत सांगायचे तर update करत जाणार होत्या . genetic mutation हो वेगळे काही नाही . हा आता कळले बुवा , इतका वेळ काय बोलताय कळत नव्हते न , असो .
तर एका विशिष्ट काळानंतर निसर्गाने जन्माला घातलेले हे मनुष्य बाल निसर्गावर राज्य करू लागले . स्वताचा अभ्यास करू लागले .
गरज , भूक इतपत झेप न राहता निर्मिती हि सगळ्यात महत्वाची झेप माणूस घेत होता.
या मानसिक विकासाचा मनुष्याच्या शारीरिक अवयवान इतकाच विकास आणि बदल होत होता . निसर्गाचे शरीरावर होणारे परिणाम माणूस जसा जसा जाणून घेऊ लागला तसतसा त्याच्या जीवनशैलीत बदल झाला . हे प्राथमिक सत्य आपण सगळे जाणतोच . परंतु यातून जी एक मोठी गोष्ट घडली , ती म्हणजे संस्कृती निर्माण झाली. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या जागी राहणाऱ्या , वेगवेगळी भौगोलिक परिस्थती , वेगवेगळे उपलब्धी असणाऱ्या मनुष्य गटांचे राहणे ,खाणे आणि एकंदरीत च एक जीवनशैलीचा उदय झाला .
जीवन शैलीचा असा उदय होणे हि आरोग्य या संकल्पनेची नांदी होती . कृपया मागील वाक्य नीट परत परत वाचा . सजीव सुलभ स्वतःचे शरीर धारण करणे , स्वतःचा बचाव करणे आणि स्वतःची जात ( मनुष्य जात , कृपया जात शब्द tolerantly घ्यावा ) प्रजनन करून वाढवणे ह्या मूळ हेतुंमध्ये उत्तमोत्तम बदल या जीवन शैली मुले घडून आले .
म्हणून जीवन शैली आणि संस्कृती हे दोन खूप महत्वाचे मुद्दे या लेखात अधोरेखित करावेसे वाटतात .
कारण हि जीवन शैली आणि संस्कृती त्या ठिकाण आणि काळ ह्या कसोटीवर उतरत असते . तसेच पिढ्यान पिढ्या आहार , विहार आणि जगण्याची एक विशिष्ट पद्धत ज्याला आपण आचार म्हणतो हि संस्कृती जपत असते .
तर मुद्दा असा आहे आरोग्य हि संकल्पना हे संस्कृतीच्या उगमापासून असावी . अश्या वेगवेगळ्या संस्कृती पृथ्वीतलावर वेगवेगळे अलिखित, अफाट literature निर्माण करत होत्या .
कुठे न कुठे ह्या सगळ्यांचा संबंध मनुष्या प्राण्याच्या टिकणे , जगणे आणि निरोगी राहणे इथे येउन च संपत . शरीरा बरोबरच मनाचा पसारा आणि महत्व हळू हळू उलगडत होते . माणसाच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या तीन गरंजा चा वेगवेगळ्या शाखां मध्ये विस्तार झाला .
असा विस्तार होत असताना मूळ उद्देश मात्र अबाधित होता . माणूस त्याचे जगणे , टिकणे आणि प्रजनन . या गरजांच्या आजू बाजू च वेग्व्गेल्या शाखा विस्तारित होत होत्या अभ्यासल्या जात होत्या.
थोडक्यात या विस्ताराला जीवन शैलीला , ज्या काळात विज्ञान , शास्त्र , सिद्ध असे शब्द अस्तित्वात पण नव्हते , त्या काळात स्व प्रामाण्याचा अनुभव होता .
आणि म्हणूनच ह्या विशिष्ट काळानंतर मनुष्य प्राण्याची सर्व शास्त्रातली प्रगती आणि तरीही मूळ हेतू अबाधित होता आणि आहे .
आज golbalisation च्या युगात संस्कृती ह्या concept चे सगळे खांब च गळून पडतात . जगाच्या पाठीवर वेग्व्गेल्या भौगोलिक वातावरणात राहणारे आपण पामर जीव कुठल्याही संस्कृतींची जीवन शैली आपल्या हवी तशी हव्या त्या पद्धतीने अमलात आणतोय . आपण जास्त काळ राहतोय त्या आजूबाजूचे निसर्गाचे आणि आपल्या शरीरातले अणू रेणूंचे करार आपल्याला माहित नसतात पण असतात हे १००% सत्य .करार मोडला कि दंड भरावा लागणारच . करार मोडण्याचे मध्यम काय तर , मी काय खातो , मी कसा राहतो (जीवनशैली) आणि मी कसा वागतो ( मानसिक आणि शारीरिक नियम ). म्हणजे च संस्कृती .
संस्कृती हि कुठल्याही जाती अथवा धर्माची नसते . संस्कृती आणि धर्म या खूप वेगळ्या गोष्टी आहेत असे सुजाण वाचक जाणतातच.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी शरीर आणि शरीर भाव सारखेच राहणार हो , परंतु त्या भौगोलिक वातावरचा , तापमान , उपलब्ध अन्न , ऋतू प्रकार , समुद्र सपाटी पासूनची उंची , यानुसार शरीराचा आणि निसर्गाचा करार झालेला असतो . त्यानुसार बदल होतात शरीर भावात निसर्गाला अनुसरून .
त्यानुसार खाण्या पिण्याचे आणि इतर जीवन शैलीचे नियम आपोआप च आत्मसात होतात .
अरे हो हेय सगळे लिहण्याचा प्रपंच का तर माझ्या एका patient ने मला विचारलेला निरागस प्रश्न . patient भारतीय नाही, email मधली प्रांजळ शंका , ” I wonder whether , we Europeans too have vaata pitaa and kafa dosha like you Indians as said in Ayurveda ? ”
त्याच्या शंकेचे योग्य उत्तर पोचवले अन लगेच लिहायला घेतले .
संस्कृती global असेल किंवा नसेल , परतू आयुर्वेद ग्लोबल आहे निश्चित . कारण आयुर्वेदात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांनुसार मनुष्य शरीतातील प्रकृती , दोष , धातू , आहार , विहार , आचार , व्द्याधी त्यावरील उपाय आणि व्याधी च होऊ नयेत म्हणून follow करायची संस्कृती ह्याचे विवेचन आहे .
अहो कुठल्या medicine science मध्ये उलेख्ह असेल का, कि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आरोग्याशी निगडीत रोज संबंध येणाऱ्या गोष्टी यथोचित कशा कराव्यात .बाराखडी च कच्ची असेल तर ग्रंथ काय लिहणार . असे महत्व दिनचर्ये चे आहे म्हणून प्रत्येक ग्रंथात सुरुवात दिनचार्येपासून च आहे .ऋतूनुसार आपला आहार , आचरण आणि preventive measures कसे असावे हे आयुर्वेद च सांगणार कारण …कारण संस्कृती हो बाकी काही नाही .
रोज खाण्यात असणार्या भाज्या , फळ , इतर व्यंजने यांचे गुणधर्म आणि व्याधीवर त्यांची उपयुक्तता याचे सविस्तर वर्णन इतर कुठल्या pathy मध्ये सापडेल का …आयुर्वेदातातच का ..कारण संस्कृती हो .
syllabus उघडला कि रोग आणि औषधे असे शास्त्रच नाही मुळी.
मला तर आयुर्वेद हा सर्वांग सुंदर अत्त्युत्तम कलेचा नमुना वाटतो कायम . असो विषय लांबतोय …उपलब्ध माहितीचा फायदा घ्या , अर्धी हळद पिउन गोरे व्यायचा प्रयत्न करण्या अगोदर योग्य वैद्या चा सल्ला घ्या . टिप्स च्या आहारी किती जायचे याचे सुज्ञ भान ठेवा . आयुर्वेदा बद्दल उत्तम माहिती पोचवण्याचे काम अखंड सुरु राहो .
-- वैद्या. रुपाली जोशी पानसे
आद्यं आयुर्वेद , पुणे
aadyam .ayurved@gmail .com
९६२३४४८७९८
(लेख आणि लेखातील माहिती आवडली आणि आपल्या सुहृदापर्यंत पोचवावी वाटल्यास कृपया लेखिकेच्या नावासकट share करावे . लेखावरील प्रतिक्रिया शंका आणि अनुभव यांचे स्वागत आहे कारण त्यामुळे लेखाचा उद्देश अजून सफल होतो )
June 1, 2016
धुकं पांघरून निश्चिन्त झोपलेल्या गंगामाईचा हेवा करीत आज सकाळी मी आशिया खंडातील सर्वात मोठ्या (वाहनचालकाने पुरविलेली माहिती) आणि नुकत्याच बांधलेल्या “गांधी सेतू ” या पुलावरून (चालकाच्या मते तो नऊ किलोमीटर लांबीचा आहे – मला ते पटले नाही, पण मोजण्याचे साधन पटकन हाती नसल्याने मी ते मान्य केले) प्रवास केला.
January 29, 2023
कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ?
हा काय प्रश्न झाला का ?
असं कुणालाही वाटेल .
आणि खरंच आहे ते .
पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो .
सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात लावल्यावर बर्फच हातात घेतल्याची भावना होत असताना , कांद्याची गरम भजी आणि वाफाळलेला चहा समोर आल्यावर काय होईल ?
सुटलं ना तोंडाला पाणी ?
थांबा मग जरा ...
श्रीनगरला उतरल्यानंतर शिकाऱ्यातून हाऊसबोटीत गेल्यानंतर , जणू एखाद्या पंचतारांकित राजवाड्यात गेल्यावर होणारं स्वागत अनुभवायला मिळालं तर ...?
आलिशान डायनिंग रूम , तेथील मंद दिवे , जुन्या काळातील डायनिंग टेबल , खुर्च्या , त्यावर नजाकतीने मांडून ठेवलेला भजी आणि चहाचा सरंजाम , अदबीनं सर्व्ह केलेल्या पदार्थांची कलात्मक डिश ...
क्या बात है !
असेच उद् गार तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच ,
" आप हॉल मे भी बैठ सकते है , या फिर ऐतराज ना हो तो दिवाण ए खास , याने बाहर भी बैठ सकते हो . बाहर का नजारा भी शायद आपको पसंद आ जाएगा . "
अशी अदबशीर विनवणी ऐकल्यानंतर थेट बाहेरचा नजारा पाहण्याची इच्छा नाही झाली तरच नवल .
खरं सांगतो यार ...
बाहेरचं दृश्य बघितल्यावर भान हरपून गेलं .
बाहेर छानपैकी सजवलेला कलात्मक सोफा , सहासात जणांना आरामात बसता येईल अशी बैठक व्यवस्था , समोरचं शांत गहिरं पाणी , जवळच्या रस्त्यावरच्या दिव्यांचं पडलेलं प्रतिबिंब , सजवलेल्या हाऊसबोटी वरचं लायटिंग आणि त्यामुळं अंधारलेल्या वातावरणात निर्माण झालेले सप्तरंग ...
आम्ही सगळे मूक झालो होतो .
नंदनवनात आल्याची जाणीव पुन्हा पुन्हा होत होती .
आणि आम्ही सगळ्यांनी नव्या काळाला अनुसरून फोटोसेशन करून घेतलं.
हातातला चहा थंड झाल्याची जाणीव म्हाताऱ्या मालकानं करून दिली , तेव्हा आम्ही भानावर आलो .
" मैं फिरसे आप के लिये चाय लाता हूं ."
तो पाठी वळून किचनकडे गेला .
आणि पुन्हा एकदा गरम कांदा भजी आणि चहा असं सेशन झालं .
कधी नव्हे इतका दोन मोठाले कप भरून चहा घेतला .
सौभाग्यवती डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पहात होती , कारण घरी दोन चमचे चहा , इतकंच माझं चहा घेण्याचं प्रमाण होतं , आणि आज मी चहा घेण्याचा कहर केला होता .
जाने भी दो यारो ...
अशी उन्मनी अवस्था घरी कुठे अनुभवायला मिळते ?
मग सगळी हाऊस बोट म्हाताऱ्या मालकाच्या तोंडून ऐकत पाहू लागलो .
एकेक पुराण्या वस्तू पाहताना , हाऊसबोटीची अंतर्गत रचना पाहताना , थकायला झालं .
राहण्याची इतकी उत्तम व्यवस्था , कमर्शियल असूनही घरगुती संवादाचा आणि वागण्याचा दिलेला टच ...
सारंच विलोभनीय होतं .
सगळं अनपेक्षित होतं .
आणि तरीही...
काश्मीर मधली परिस्थिती...
भूतकाळ...
वर्तमानकाळ...
तिथल्या निसर्गसौंदर्याला लागणारे गालबोट ...
विसरता येत नव्हते .
--रात्री अचानक केव्हातरी जाग आली .
थंडी आणखी वाढली होती . बंदिस्त बेडरूममध्ये खूपच जाणवत होती .
मी मोबाईल मध्ये पाहिले .
रात्रीचे तीन वाजले होते .
काय वाटलं कुणास ठाऊक .
मी रुमचं दार उघडून बाहेर आलो .
टपून बसल्यासारख्या असणाऱ्या थंडीने झडप घातली .
मी आणखी काकडलो .
हाऊसबोटीचं दार उघडून बाहेर आलो .
पाचच मिनिटात परत रूममध्ये आलो .
सुरक्षित जागी .
पण बाहेर पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर तसंच होतं .
त्या पाच मिनिटात , कडाक्याच्या थंडीत सैनिकांची एक गाडी गस्त घालण्यासाठी फिरत होती .
थंडीची तमा न बाळगता .
जिभेचे लाड न पुरवता .
गरम चहाची अपेक्षाही न ठेवता .
केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी !
काश्मीरचं अस्तित्व टिकवण्यासाठी .
- मी पुन्हा अंतर्मुख झालो .
तिन्हीसांजेला घेतलेल्या चहाची चव आता पूर्ण विसरायला झाली होती .
( क्रमशः)
- श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
----------------------------------------
लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .
May 2, 2023
पर्यटन प्रवास प्रवास कशासाठी असे विचारले तर पहिले उत्तर कायाकल्प – Rejuvination असेच असेल. रोजच्या कष्टमय कंटाळवाण्या नित्यक्रमातील हा रम्य काळ.
June 1, 2023
रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष-किरण शास्त्र करीत असे.
December 14, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti