वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं.
छत्रपती संभाजी महाराजांवरील “झंझावात” या ४ पिढ्यांचा इतिहास सांगणार्या माझ्या आगामी कादंबरीतील एक लेख
आज मी तुम्हाला अशा एका कलाकाराबद्धल माहिती सांगणार आहे की ज्याच्या नावापासूनंच नशिबाने त्याची थट्टा मांडली , पण जो पुढे जाऊन एक असा अद्वितीय कलाकार बनला की ज्याच्या नावाशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उभा रहाण्याची कल्पनाच करवत नाहि! चला तर मग या हकीकतीकडे…..
हवा प्रदूषण हे अनेक रोगांना कारण ठरणारे आहे. जागतिक ‘आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात. प्रदूषकांची हवेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास योग्य की अयोग्य ते ठरवले जाते.
माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३४३ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे “आत्मा बोलतो” यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३९३ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !
त्याआधी आम्ही तुम्हांस ३४४ वर्षे मागे नेतो…..
आज चैत्री पौर्णिमा – रामभक्त हनुमानाची जयंती – म्हणजे तुमच्या आजकालच्या “इंग्रजा”ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला “पोरका” समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विषवल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !
१९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले.

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
(सुरेश भट)
मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
(सुरेश भट)
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
(सुरेश भट)
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
(सुरेश भट)
केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा ,
स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
(सुरेश भट)
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
(सुरेश भट)
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
(सुरेश भट)
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !


काल परवाचीच गोष्ट एकजण एका जुन्या मित्राशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना तो म्हणाला मला अमुक तमुक अँप वर फोटो टाकता येत नाही. काहीतरी शोधण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला , पण ते अँप मी ओपन करताच घाई घाई ने त्याने माझ्या हातून मोबाईल घेतला.
हे तुमच्याही बाबतीत किंवा घरात घडले असेल, अगदी नवरा बायको ह्यांच्या बाबतीत देखील.. माझ्या फोन ला हात का लावला वगैरे. मी तर माझा फोन कधीच लॉक करत नाही पासवर्ड ने.
साला आपली जिंदगी तो खुली किताब हैं.
बायको मात्र नेहमी ह्या न त्या कारणाने माझा फोन घेते, तिचा फोन मात्र लॉक असतो , मला तिने अनेक वेळेला तिचा पासवर्ड सांगितला पण तो मी विसरतो म्हणा लक्षात ठेवायची गरज भासत नाही.
१. गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणा:॥
अर्थ: गेलेल्या (काळा बद्दल) शोक करू नये. भविष्याचीही काळजी करू नये.
बुद्धिमान लोक वर्तमान काळाप्रमाणे वागतात/ वर्तमान काळात जगतात.
२. न कश्चिदपि जानाति कि कस्य श्वो भविष्यति।
अतः श्वो करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान्॥
अर्थ: उद्या काय होणार ते कोणालाही माहित नाही.
म्हणून बुद्धिवान माणसाने उद्याचे काम आजच करतात.
३. प्रथमे नार्जिता विद्या द्वितीये नार्जितं धनम्।
तृतीये नार्जितं पुण्यं चतुर्थे किं करिष्यसि?॥
अर्थ: जीवनाच्या पहिल्या भागात विद्या, दुसऱ्या भागात धन,
तिसऱ्या भागात पुण्य मिळवलं नाही तर चौथ्या भागात काय करशील?
जीवनाच्या पहिल्या तीन पर्वात (बालपण, तरुणपण, प्रौढपण) तू कांहीच केले नाहीस तर म्हातारपणी काय करशील?
४. श्रमक्लमपिपासोष्णशीतादीनां सहिष्णुता।
आरोग्यं चापि परमं व्यायामादुपजायते ॥
अर्थ: श्रम, थकवा, तहान, उष्णता, थंडी इत्यादि सहन करण्याची शक्ती
आणि उत्तम आरोग्य सुद्धा व्यायामातून (व्यायाम केल्याने) उत्पन्न होते (प्राप्त होते).
५. मित्रेण कलहं कृत्वा न कदापि सुखी जनः।
इति ज्ञात्वा प्रयासेन तदेव परिवर्जयेत् ॥
अर्थ: आपल्या मित्राबरोबर भांडण करून (कोणी) व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही.हे जाणून, प्रयत्नपूर्वक ते (भांडण) टाळावे.
मित्रांचे महत्व वर्णन केली आहे.
६. लोभात् क्रोधः प्रभवति लोभात् कामः प्रजायते।
लोभात् मोहः च नाशः च लोभः पापस्य कारणम् ॥
अर्थ: लोभातून क्रोध उत्पन्न होतो; लोभातून वासना उत्पन्न होते;
लोभातूनच होतो मोह आणि नाश. लोभामुळेच मनुष्य पाप करतो.
षड्रिपू पैकी लोभ हा किती वाईट असतो याचे वर्णन केले आहे.
७. देहे पातिनि का रक्षा यशो रक्ष्यमपातवत् |
नरः पतितकायोऽपि यशःकायेन जीवति ||
अर्थ: (केव्हातरी निश्चितपणे मृत्युमुखी) पडणाऱ्या शरीराच्या रक्षणाबद्दल अतिचिंता कशाला करायची? कीर्तिला जराही धक्का लागणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. (कारण) मरून गेल्यावरसुद्धा मनुष्य कीर्तिरूपी शरीराने जिवंत राहतो.
८. कृपाद एकम वटच्छाया तथा मृद निर्मितं गृहं।
शीतकाले भवे उष्णम उष्णकाले तू शीतलं ।।
अर्थ: वटवृक्षाच्या छायेचे वर्णन केले आहे. वटवृक्षाची व माती निर्मित घर यांची छाया हिवाळ्यात उष्ण व उन्हाळ्यात थंड असते.
नुकतीच वटपौर्णिमा होऊन गेली आहे, त्या निमित्ताने.
९. अपूर्वः कोपि कोशोयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात् ।।
अर्थ: हे देवी शारदे, तुझा विद्यांचा खजिना अपूर्व आहे, खर्च करण्याने त्यात भर पडते आणि साठवून ठेवण्याने त्यात घट होते. आपल्याकडे असलेली विद्या इतरांना देत असतांना ती अधिक पक्की होते आणि कुणालाही न देता आपल्याजवळच राखून ठेवली तर ती विस्मरणात जाऊ शकते.
१०. नास्ति कामसमो व्याधि: नास्ति मोहसमं दुखम्।
नास्ति क्रोधसमो वह्नि: नास्ति ज्ञानसमं सुखम्॥
अर्थ: मनुष्य जीवनात कामा सारखा दुसरा रोग नाही, दुसरे रोग बरे होतील परंतु कामना वाढतच जाते. मोहा सारखे कोणतेही दुःख नाही कारण संसारातील साऱ्या दुःखाचा उगम मोहच आहे. क्रोधासारखी दुसरी आग नाही जी आपल्या बरोबर जगालाही जाळते आणि फक्त वैर आणि वैरी निर्माण करते. पण ज्ञाना सारखे दुसरे सुख नाही ज्याच्यापासून मनुष्याला परम शांती, सन्मान, सुख, संपत्ती, आणी परमागती व सर्व कांही प्राप्त होते.
११. सर्वार्थसंभवो देहो जनित: पोषितो यत:।
न तयोर्याति निर्वेशं पित्रोर्मत्र्य: शतायुषा॥
अर्थ: (मनुष्यास) शंभर वर्षाचे जरी आयुष्य प्राप्त झाले तरी आईवडिलांच्या ऋणातून त्यास मुक्त होता येत नाही. खरे म्हणजे ज्यांनी जे शरीर, धर्म,,अर्थ, काम, मोक्ष प्राप्तीचे प्रमुख साधन आहे, त्या शरीराचे पालन पोषण ज्यांच्याकडून झाले आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होणे कठीणच काय पण असंभव आहे.
हा एक फारच प्रसिद्ध श्लोक आहे.
१२. वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर ।
यमस्तु हरति प्राणान् वैद्यो प्राणान् धनानि च ॥.
अर्थ: हे वैद्यराज तुम्ही यमाचे भाऊ आहात, मी तुम्हाला प्रणाम करतो. यम तर फक्त प्राण घेऊन जातो पण वैद्य प्राण आणि धन पण घेऊन जातो.
सद्धयाच्या परिस्थितीत हा श्लोक फार चपखल बसतो. दवाखान्यांची एवढी मोठी बिले भरून पण रुग्ण दगावतो व कुटुम्बियांचे धन व रुग्णाचे प्राण दोन्ही जातात.
१३. कामधेनुसमा विद्या सदैव फलदायिनी।
प्रवासे मातृवत्तस्मात् विद्या गुप्तधनं स्मृतम्।।
अर्थ: कामधेनुप्रमाणेच (किंवा कल्पवृक्षाप्रमाणे) विद्यासुद्धा फळ देणारी असते. प्रवासामध्ये ती आईप्रमाणे आपले रक्षण करते. म्हणूनच तिला गुप्त धन असेही म्हणतात.
१४. अष्टादशपुराणानां सारं व्यासेन कीर्तितम्।
परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम्॥
पाठभेदः
अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्।
परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्।
अर्थ: व्यासमहर्षींनी अठरा पुराणांचे सार (दोन वाक्यात) असे सांगितले आहे. “परोपकार (दुसऱ्यावर उपकार करणे) म्हणजे पुण्य आणि परपीडा (दुसऱ्यांना त्रास देणे) म्हणजेच पाप”
“पुण्यपर उपकार पाप हे परपीडा (भीमसेन जोशींनी म्हटलेला अभंग)”
१५. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे
भार्या गृहद्वारि जनः श्मशाने।
देहश्चितायां परलोकमार्गे
कर्मोनुगो गच्छति जीव एकः ॥
अर्थ: धन, द्रव्य भूमीवर, पशु गोठ्यात, पत्नी घरात, नातलग स्मशानात, आणि शरीर चितेवर राहते. केवळ तुम्ही केलेले कर्मच परलोकाच्या मार्गावर तुमच्या बरोबर येते.
१६. अनन्तशास्त्रं बहुलाश्च विद्या
अल्पं च कालो बहुविघ्नता च।
आसारभूतं तदुपासनीयं
हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्॥
अर्थ: शास्त्रे खूप आहेत, विद्या सुद्धा अनेक आहेत, परंतु मनुष्याचे जीवन फार छोटे (लहान) आहे. त्याच्यात सुद्धा विघ्ने खूप आहेत. म्हणून हंस जसा मिळालेल्या पाण्यातून दूध वेगळे करून पितो व पाणी सोडून देतो तसे महत्वाच्या विद्या ग्रहण करून बाकी सोडून दिल्या पाहिजेत.
१७. श्रिय: प्रसूते विपदः रुणद्धि,
यशांसि दुग्धे मलिनं प्रमादि ।
संस्कार सौधेन परं पुनीते,
शुद्धा हि बुद्धिः किलकामधेनुः॥
अर्थ: पवित्र आणि शुद्ध बुद्धी कामधेनु सारखी आहे. धनधान्य निर्माण करते, (बुद्धीमुळे) संकटापासून वाचवते; यश आणि किर्ती रुपी दुधाने मलिनता धुऊन टाकते व जवळ सान्निध्यात आलेल्या लोकांना आपल्या पवित्र संस्कारानी पुनीत करते.
१८. अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः ।
नित्यं संनिहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसङ्ग्रहः ॥
अर्थ: मनुष्याचे शरीर हे नश्वर आहे.धन आणि द्रव्य हे नेहमीच चंचल असते व शाश्वत नाही. मृत्यू तर आपल्या नेहमीच जवळ असतो म्हणून आपण आपले कर्तव्य व पुण्य कर्म करत राहावे.
१९. ॐ सह नाववतु सहनौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
अर्थ: परमेश्वर आपणा दोघांचे एकत्र रक्षण करो, आपण दोघे एकत्र भोजन करू,
आमचे पोषण होऊ दे, एकत्र पराक्रम करू, सर्व शक्तीनिशी काम करु, आपले शिक्षण प्रकाशमान होऊ दे, आपल्याला ज्ञानाचे तेज प्राप्त होऊ दे, एकमेकांचा कधीही द्वेष करणार नाही. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक शांति प्रस्थापित होऊ दे. (मनात, जगात आणि दैवी शक्तींमध्ये).
एकमेकांशी भांडणतंटा न करता आपण एकजुटीने रहावे, सगळीकडे शांति राहू दे.
असा साधारण अर्थ आहे असे समजून हा शांतिपाठ आपण असंख्य वेळा म्हंटला असेल, पण त्यामधील शब्दांचा नेमका अर्थ काय आहे? हे एका गुरूने त्याच्या शिष्याला उद्देशून म्हंटले आहे.
भर्तृहरि नीती शतकातिल पाच श्लोक खाली अर्थासह देत आहे.
२०. लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्मिकासु सलिलं पिपासार्दितः।
कदाचिदपि पर्यटन् शशविषाणमासादयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥
अर्थ: अथक प्रयत्न करून वाळूपासून तेल पण काढता येईल, तसेच मृगजळापासून पाणीही मिळवता येईल, कदाचित शिंग असलेला ससा ही आपल्याला दिसू शकतो पण हठवादी, मूर्ख हट्टी दुराग्रही, पूर्वग्रही माणसाला खऱ्या गोष्टीचा बोघ करून देणे असंभव आहे.
२१. रूपयौवनसंपन्ना विशालकुलसंभवाः।
विद्याहीना न शोभन्ते निर्गन्धाः किंशुका इव।।
अर्थ: रूप, तारुण्य, सौन्दर्य यौवन यांची प्राप्ती तसेच नामांकित कुटुंबात, परिवारात कुळात जन्म होऊनही अडाणी विद्याविहीन असेल तर ती व्यक्ती शोभून दिसत नाही. जसे की पळसाच्या वृक्षाला (किंशुक) आकर्षक रंगाची फुले असतात पण गंध, रस हीन असल्याने शोभून दिसत नाहीत व त्यांचा उपयोग हि होत नाही.
२२. शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया च विभाति नभः।
पयसा कमलं कमलेन पयः पयसा कमलेन विभाति सरः॥
अर्थ: चंद्राने निशेला (रात्रीला) शोभा येते. रात्री चंद्र उठून दिसतो. रात्र व चंद्राच्या चांदण्यामुळे आकाशाला शोभा येते पाण्याने कमळाला शोभा येते. कमळामुळे पाण्याला शोभा येते व कमल आणि पाणी यामुळे सरोवराला शोभा येते
२३. न सा सभा यत्र न सन्ति वृद्धाः
वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम्।
धर्मो न वै यत्र च नास्ति सत्यं,
सत्यं न तद् यच्छलनानुविद्धम्॥
अर्थ: ज्या सभेमद्धे वृद्ध, जाणते सज्जन, सतूशील, ज्ञानी, बुद्धिमान अनुभवी लोक उपस्थित नाहीत ती सभा नव्हे; उपस्थित असलेले जे सत्य जे, ते सत्य, धर्म, कर्तव्य जबाबदारी याबद्दल बोलत नाहीत ते वृद्ध जाणते नव्हेत; ज्यात सत्याचा अंश नाही तो धर्मच नाही; व जे दुष्ट, स्वार्थ, कपट वृत्तीने वेधले गेलेले आहेत ते पूर्ण सत्यही नाही
२४. व्यालं बालमृणालतन्तुभिरसौ रोद्धुं समुज्जृम्भते
छेत्तुं वज्रमणीञ्छिरीषकुसुमप्रान्तेन सन्नह्यते ।
माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते
नेतुं वाञ्छति यः खलान्पथि सतां सूक्तैः सुधास्यन्दिभिः ॥
अर्थ: आपल्या विद्वत्तेच्या गोड गोष्टींनी दुष्ट लोकांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयास करणे म्हणजे एका मनात हत्तीला कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांनी कह्यात आणणे किंवा एखाद्या हिऱ्यास शिरीष झाडाच्या फुलांनी कापणे किंवा एका थेंबाने समुद्राचे खरे पाणी गोड केल्या सारखे आहे. थोडक्यात मूर्ख माणसाला शहाणे बनवणे असंभव आहे.
डॉ. दिलीप कुलकर्णी
०८. ०६. २०२३
लहानपणी आपण मोठे होऊन फार नाव कमवावे, खूप प्रसिद्ध व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असते. बालपणी भविष्यात काहीतरी अचाट कर्तृत्व दाखवून अजरामर होण्याची मनोरथे रंगवली जातात, पण बहुतेकांची ही स्वप्ने केवळ स्वप्नेच राहतात. मात्र फार थोडे सौभाग्यशाली, कर्तृत्ववान नरपुंगव असे असतात जे स्वप्रयत्ने स्वत:ची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात आणि इतिहासात त्यांचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाते. आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यातील असाच एक नरवीर म्हणजे ‘कॅप्टन नितीन चव्हाण’.
Copyright © 2025 | Marathisrushti