(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हे टाळता येऊ शकते !

    देशात दररोज कुठेना कुठेतरी आग लागल्याचे वृत्तपत्रातून वाचण्यास मिळते. आगीमुळे बर्याचदा वित्तहानी होते पण काही जवान आणि नागरिक आगीत भाजल्यामुळे दगावतात. आग लहान असो की मोठी ती विझविण्याची जबाबदारी अग्निशमन दलातील जवान सुरळीत रित्या पार पाडतात.

      July 29, 2014


  • कोषातून बाहेर पडा!

    भारताचा इतिहास चाळतो म्हटले तर इतिहासात ठिकठिकाणी, पानापानावर मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला दिसतो. लढाईचे मैदान असो अथवा साहित्याची मुलूखगिरी, मराठी माणसाचा आदराने उल्लेख केल्याशिवाय इतिहास पुढे सरकूच शकत नाही. अगदी अलीकडील काळापर्यंत ‘मराठी पाऊल’ सगळ्याच क्षेत्रात पुढेच होते.

      October 30, 2005


  • तोंडाच्या दुर्गंधीवर सोपे उपचार

    कधी - कधी असं होतं की आपल्या समोर उभी असलेली व्यक्ती आपल्याशी बोलण्यासाठी तोंड उघडते तर तिचे तोंड उघडताक्षणी तिच्या तोंडातून दुर्गंधीचा एक तीव्र दर्प आपल्या श्वासांना भिडतो आणि आपण हैराण होता. अशा वेळी आपण मोठ्या संकटात सापडता कारण त्या समोरच्या व्यक्तीला तिच्या तोंडातून येणाया दुर्गंधी बद्दल सांगूही शकत नाही आणि तिच्या तोंडातून येणाया घाण दर्पाला सहनही करू शकत नाही. लोकांना याबद्दल असे वाटते की उन्हाळ्याचे दिवस असल्याने श्वासातून घाण दर्प निघण्याची समस्या होते, परंतु हे खरे कारण नाही. कोणताही ऋतु असेल तरी ही समस्या उद्भवू शकते.

    श्वासांच्या दुर्गंधी ची अनेक कारणे असू शकतात. जसे - पचन क्रियेत बिघाड झाल्याने, दात कुजल्याने, पोटात काही गडबड झाल्याने, तोंडात किंवा हिरड्यात कोणत्याही प्रकारचे संसर्ग झाल्याने.

    जर संतुलित आहार असलेले जेवण केले, कॅल्शियम, प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थ आणि मिनरल्स आदींचे योग्य सेवन केले तर आपल्यासमोर ही दातांची समस्या उद्भवू शकत नाही. योग्य आहाराच्या सेवनाने आपण सहजरीत्या दातांच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतो.

    पाणी खूप प्यावे

    जर आपण योग्य प्रमाणात पाणी पितो तर कधीही रोग ग्रस्त होणार नाही. पाणी पिण्याने आपल्याला बरेच फायदे होतात. त्यात एक फायदा हा आहे की पाणी आपल्या तोंडाची स्वच्छता करण्यात मदत करतो. पाणी तोंडाच्या आत क्लींजरचे काम करतो. त्यामुळे तोंडाचा घाण वास दूर होतो. संपूर्ण दिवस आपण काही तरी खात असतो, त्यामुळे आपल्या तोंडात पूर्वीपासूनच जे बॅक्टीरिया असतात, ते बॅक्टीरिया आपल्या हिरड्या आणि दातांवर प्रहार करीत असतात. आपण कमी पाणी पिण्याने आपल्या तोंडात निर्माण होणाया लाळेमध्ये अशा बॅक्टीरियाचे प्रमाण खूप वाढते, जे आपल्या दातांचे शत्रू असतात. त्यामुळे आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी वारंवार पाणी पिण्याने तोंडाच्या दुर्गंधीतून बर्‍याच प्रमाणात मुक्ती मिळविता येते. त्याचबरोबर जेव्हा आपणास वाटेल की तोंडातून घाण वास येत आहे तर पाण्याने चूळ भरून घ्यावी. असे केल्याने तोंडातून बॅक्टीरियायुक्त लाळ बाहेर निघून जाते.

    दह्याचे सेवन करावे

    अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले आहे की दही खाण्यानेही आपल्या तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळू शकते. दह्यात बॅक्टीरिया उत्पन्न होतात, परंतु हे असे बॅक्टीरिया असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेकारक आहेत. दह्याचे सेवन केल्याने श्वासांच्या घाण दर्पापासून सुटका होऊ शकते. दह्यामुळे असे कसे होते, याबाबत वैज्ञानिक जास्त माहिती मिळवू शकलेले नाहीत. खरंतर तेल व मैद्याने बनलेले चिप्स, बिस्कीट आदी स्नेक्सच्या सेवनापेक्षा ताज्या दह्याच्या सेवनाने जास्त फायदा मिळू शकतो.

    संत्री खावी

    संत्री व्हिटॅमिन 'सी'चे मुख्य स्रोत असते. याच्या सेवनाने आपली त्वचा सुंदर आणि कांतीवानच होत नाही तर याच्या सेवनाने श्वासांच्या घाण दर्पापासूनही सुटका होऊ शकतो. संत्री खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते आपल्या तोंडात उपस्थित बॅक्टीरियाला लढा देण्यासाठी मुख्य भूमिका निभावते. संत्र्याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी' युक्त इतर फळांच्या सेवनानेही आपण श्वासांच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकतो. टॉमेटो, लिंबू, द्राक्षाच्या सेवनाने आपण श्वासातील घाण दर्प घालवू शकता.

    बडी शोप खावी

    जेवण झाल्यावर जर थोडीशी बडी शोप खाल्ली तर चांगले होईल. त्याने एक तर जेवणाचे पचन होते, त्याचबरोबर श्वासांची दुर्गंध घालविण्यात मदत करते. बडी शोप दोन भाग करून एक भाग थोडा भाजून घ्यावा. आता दोन्ही भाग एकत्र करावे. ही शोप दररोज जेवण झाल्यावर खावी. असे केल्याने आपण श्वासाच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकता.

    लहान वेलची खावी

    हिरव्या वेलचीत अँटीसेप्टिक गुण असतात. त्याच्या सुवासिक चवीमुळे आपल्याला दुसर्‍यांसमोर लाजिरवाणे होणार नाही. या वेलचीला तोंडात ठेवून हळूहळू चावून त्याचा रस चोखत राहावे.

    लवंग सेवन करावे.

    लवंगाचे जे ऍरोमेटिक फ्लेवर असते, ते तोंडाची दुर्गंध दूर करते. त्यामुळे जेवणात त्याचे वापर अवश्य करा.

    दालचीनीचे सेवन करा

    दालचीनीची गोड चव भाज्यांना चवीष्ट तर करतेच, त्याचबरोबर यात जे अँटीसेप्टिक गुण असतात त्यामुळे आपल्या तोंडात उत्पन्न होणारे बॅक्टीरिया नष्ट होतात त्यामुळे आपल्याला श्वासांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      January 11, 2017


  • वाहिन्यांचे लोकशाहीकरण आवश्यक

    प्रसारमाध्यमे हा भारतीय व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसारमाध्यमांनी प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळात प्रसारमाध्यमांच्या प्रत्येक शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

      May 15, 2024


  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बँकिंग

    ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही गोष्ट अलीकडच्या वर्षांत आपल्या तंत्रज्ञानाधिष्ठित जगण्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान मानले जाते आणि बँकांनी सर्वात आधी हे तंत्रज्ञान त्यांच्या सेवांमध्ये समाविष्ट करण्यास सुरवात केली आहे. अलिकडची आकडेवारी दर्शविते की बँकिंग क्षेत्र सेवा, कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी ‘AI’ चा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे.

      August 8, 2025


  • जागतिक कागदी पिशवी दिवस

    हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत करण्यासाठी प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती करणे. दीडशे हून अधिक वर्षे पाश्चात्य जग कागदी पिशव्या वापरत आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही. याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण होऊन सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे.

      July 12, 2021


  • आत्मनिर्भर व्हायचं आहे ? तर मग त्या करता . . .

    आधी कोविडची साथ; त्या नंतर सीमे वर चीनची आगळिक; संतापलेल्या भारतीयांनी चीनी वस्तूं वर बहिष्कार टाकण्या करता दिलेली हांक; आणि शेवटी झालेली जाणीव की आपली अर्थ व्यवस्था चीन मधून आयात केलेल्या वस्तूंवर येवढी अवलंबून आहे की आपण फार काही वस्तूं वर बहिष्कार टाकूच शकत नाही. या सर्व घडामोडींच्या निमित्ताने काही मुद्दे अधोरेखित झाले आहेत, व त्याची नोंद आत्ताच घेणे गरजेचे आहे. कारण एकदा का सीमे वर परत शांतता झाली, कोविड संक्रमण आटोक्यात आले, की हे मुद्दे आपल्या करता महत्वाचे राहणार नाहीत.

      July 24, 2020


  • हिशोब….शुद्ध खाद्यतेलाचा

    मला अजूनही उमगले नाही,..

    शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात...

    1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात...हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240...

    3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला.

    मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो....

    एकूणच उत्पादन खर्च 240 अधिक 30 ...बरोबर ...रूपये 270

    एकूण उत्पन्न एक किलो शेंगदाणे तेल साधारणपणे 120 रूपये , शेंगदाणे पेंड 40 रूपये दोन किलोची....टोटल उत्पन्न रूपये 160 रूपये ...

    आता मला सांगा , 270 रूपये धंद्यात लावून 160 रूपये उत्पन्न कोणता महाभाग काढेल....

    तात्पर्य भारतातील सर्वच खाद्यतेल कंपन्या भेसळ करतात पामतेलाची , वापरलेल्या तेलाची , डालडाची , वनस्पती तूपाची अगदी 50 ते 90 % पर्यत .,,.

    कसं राहील आरोग्य चांगलं नागरीकांचे....याचेच transfat बनतात हेच ते विषारी घटक ....

    महात्मा गांधी सांगत ",खेडयाकडे चला , त्याचा गरभीत अर्थ हाच."

    आला ना हिशोब ध्यानात ......शुद्ध ....शुद्ध खाद्यतेलाचा....

    आंधळी अन् बहिरी जनता , बेबस सरकारे अन् बेबस प्रशासन ...

    -- मकरंद

      November 6, 2016


  • राजकारणात उतरू इच्छिणार्‍यांना निवडणुक लढविण्यासाठी राजकीय योग्यता परीक्षा अनिवार्य करावी ….????

    फक्त भारतात एक विशेष अपवाद आहे ते म्हणजे कोणत्याही राजकीय व्यक्तीला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही राजकारणात उतरण्यासाठी. तरी ही राजकीय मंडळी जर निवडून आली तर ते जनतेसाठी नियम व कायदे संसदेत बनविणार

      July 5, 2012


  • अमेरिकेतील छोटी गावे – भाग ५

    अगदी छोट्या गावातील रेस्टॉरंट्स देखील घरगुती वळणाची. त्यांच्या ना झगमगत्या पाट्या, ना ड्राइव्ह थ्रू, ना चटपटीत वेशातली वेटर मंडळी. आतमधे बाकडी देखील साधी. भिंतीवर बहुदा गावाकडचं दृश्य दाखवणारं एखादं चित्र फ्रेम करून लावलेलं. कुठे घरगुती कलाकुसरीचे काही नमुने लावून ठेवलेले किंवा त्या गावचेच जुने ५०-१०० वर्षांपूर्वीचे काळे-पांढरे फोटो फ्रेम करून लावलेले. कुठे हरणांची शिंग भिंतीवर लावलेली तर कुठे जुन्या शेतकी अवजारांचा शोभेच्या वस्तूंसारखा उपयोग केलेला. अतिथी म्हणजे रोजचेच, आसपासचे रहिवासी. सगळे एकमेकांच्या वर्षानुवर्षे ओळखीचे. मग कुठे चार-सहा आजी आजोबा, रोजचा अड्डा जमवल्या सारखं एखादं टेबल अडवून तासन्‌ तास गप्पा मारत बसतात, तर कुठे कामाच्या रगाड्यातून वेळ काढून, बकाबका बर्गर आणि सॅंडविचेस खाऊन परत फार्मकडे वळणारे तरूण घाईघाईत एकमेकांची विचारपूस करत असतात. कुणाला दुधाच्या पडत्या भावाची काळजी असते तर कुणी दिवसेंदिवस महाग होत जाणार्‍या जनावरांच्या खाद्यामुळे बेजार झालेला असतो. कुणाला कापणीचा हंगाम तोंडावर आल्यामुळे आपला combine harvestor वेळेवर दुरुस्त होईल का याची चिंता असते तर कुणाला फार्मवर गायी लवकर गाभ धरत नाहीत म्हणून काय उपाय योजावेत याची विवंचना असते. वेट्रेस म्हणजे देखील गावातलीच एखादी मध्यमवयीन बाई, घरखर्चाचा गाडा ओढत, चार मुलं आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणारी असते. त्यातून कधी एखादी मुलगी वेट्रेस म्हणून नव्यानेच दिसली तर बसलेल्या आजी आजोबांच्या घोळक्यातून “अग्गो खालच्या आळीतल्या दामू फणशाची ना तू ? रत्नांग्रीला ना गो जाणार होतीस कालेजला?” अशा आशयाची आपुलकीची विचारपूस होते.

    छोट्या गावांमधे बर्‍याचदा आपलं स्वत:चं वर्तमानपत्र असतं, ते देखील आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारं. जेमतेम ४-६ पानांच्या या पेपरात स्थानिक घडामोडींना मोठं महत्व दिलेलं असतं. अर्थात देशाचं राजकारण किंवा तत्कालीन जागतिक घडामोडींवर विद्वत्तापूर्ण भाष्य करण्याचा ही वर्तमानपत्र कधी फारसा आव देखील आणीत नाहीत. अशा या छोट्या वर्तमानपत्रांमधे, मध्यपूर्वेमधल्या स्फोटक परिस्थितीपेक्षा गावातल्या स्कूल बोर्डाच्या मीटींगला अधिक महत्व असतं. चीनमधल्या भयंकर भूकंपापेक्षा गावाबाहेरच्या ओढ्याला आलेल्या पूराची चिंता अधिक असते. वॉशिंग्टन डी.सी.मधे चाललेल्या अनेक देशांच्या शिखर परिषदेपेक्षा गावातल्या टाउन हॉलमधे चाललेल्या चर्चे बद्दल अधिक जिज्ञासा असते. आणि न्यूयॉर्क यॅंकीज आणि बॉस्टन रेड सॉक्स मधल्या बेसबॉल मॅचपेक्षा गावातल्या शाळेतल्या मुलींच्या मॅचला अधिक प्रसिद्धी मिळते. आठवड्यातून एकदाच येणार्‍या या पेपरची लोक मोठ्या आतूरतेने वाट पहातात. गावातली आसपासची दुकानं त्यात आपल्या मालाच्या जाहिराती छापतात. कुठे कुणाच्या जुन्या शेतकी अवजाराची जाहिरात केलेली असते, कुणाच्या फार्मवरची डुकरांची पिल्लं विकायला झाली असतात, कुठे गावातला मुलगा राखीव सैन्यदलात दाखल झाल्याबद्दल त्याचं कौतुक असतं, तर कुठे कुणा आजीबाईच्या पाककृतीला शेजारच्या गावाच्या जत्रेत बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन असतं. ह्या छोट्या गावांची क्षितीजं फारशी मोठी नसतात. त्यांच्या छोट्या विश्वापलीकडे त्यांना फारसं बघायचं नसतं. त्यांची सुख दु:ख, त्यांची स्वप्नं आणि आकांक्षा पंचक्रोशीच्या बहुदा आतच असतात. या त्यांच्या चिमुकल्या जगाची दखल घेण्याचं काम, ही स्थानिक वर्तमानपत्रं इमानेइतबारे करत असतात.

    छोट्या गावांमधल्या फायर ब्रिगेड खात्यामधे पगारी कर्मचारी नसतात; सारेच स्वयंसेवक. कुणी शेतकरी, कुणी लाकडाच्या वखारीत काम करणारा, कुणी दगडाच्या खाणीतला कामगार, तर कुणी दुधाचा ट्रक चालवणारा. या सगळ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलेले असते. थोड्याश्या मोठ्या गावामधे एखाद्या जुन्या गॅरेजमधे एक दोन फायर ब्रिगेडचे बंब ठेवलेले असतात. अगदी छोट्या गावात ते देखील नसतात. या कर्मचार्‍यांचे पोशाख देखील जुनेच असतात. पैशाची तशी वानवाच. स्थानिक ग्रामपंचायती कडून थोडी फार मदत मिळते. मग उन्हाळ्यामधे ही छोट्या गावातली फायर ब्रिगेडची कर्मचारी मंडळी बार्बेक्यू करतात. गावाजवळच्या एखाद्या मैदानावर तात्पुरते तंबू उभारले जातात. शेकोट्यांवर बीफ, पोर्क, चिकन भाजलं जातं. गावातले आजूबाजूचे रहिवासी, मित्रमंडळी आवर्जून येऊन खाण्यावर ताव मारतात. खेळ, खाणं पिणं, मुलांसाठी करमणूक या सार्‍यांबरोबरच, फायर ब्रिगेडला आवश्यक असे पैसे देखील गोळा केले जातात.

    -- डॉ. संजीव चौबळ

      February 11, 2016