वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला कारण आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला. भारतासहित जवळपास १०० देशात 'वन्नाक्राय ' या 'रॅन्समवेअर' व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला . सायबर सिक्युरिटी फर्म अव्हास्ट ने सांगितले कि जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले . या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लड ला बसला . इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली . अनेक हॉस्पिटल्स मध्ये तर रुग्णांचे ऑपेरेशन आणि अपाईनमेंट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नससल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.
'रॅन्समवेअर' म्हणजे नेमकं काय ?
एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिन वर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शन ला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्स ने घेतलेला असतो. ह्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची ऑपरेटींग सिस्टम चालूच होत नाही. ह्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. ह्या मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत .जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
काय काळजी घ्यावी ?
१. सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अॅण्टीव्हायरस असणे तसेच अॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.
२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .
३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . जसे कि 'रॅन्समवेअर' साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
४. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटा च्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .
स्मार्टफोन ला ही धोका
संगणकांप्रमाणे स्मार्टफोन ला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात .त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा . कुठलीही ए पी के फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टाल करू नका .
Free Jio Data च्या नावाने व्हाट्सअप मेसेज मध्ये येणाऱ्या लिंक्स देखील अशाच फसव्या आणि घातक असतात.. फ्री डेटा तर मिळणार नाहीच, पण तुमच्या मोबाईल मध्ये फ्री व्हायरस नक्की येऊ शकतो... तेव्हा असे फुकट मेसेज मधील लिंक ओपन देखील करू नका आणि फॉरवर्ड देखील करू नका...
या विश्वामधे अनेक ठिकाणी अनेक Universes असू शकतात आणि त्यातील काही असे असू शकतात की तिथे तुमच्या हुबेहूब जीवनाचे प्रति रूप असू शकते अर्थात समांतर ब्रम्हांड. अशी ही Theory सांगते.
स्पॅम फोन कॉल अर्थात अनावश्यकपणे येणार्या फोन कॉलची संख्या भारतात एवढी मोठी आहे की भारताचा जगात चक्क दुसरा नंबर लागतो. ही माहिती दिली आहे आपल्याला येणाऱ्या फोनचा नंबर तात्काळ मोबाइल स्क्रीन वर दाखवणाऱ्या ट्रुकॉलर (Truecaller) या ॲपच्या निर्मात्यांनी.
अल्बर्ट आइनस्टाइन..... एका महान भौतिक शास्त्रज्ञ , ज्याच्या सापेक्षवादाच्या सिद्धांता मुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये अतिशय अमुलाग्र आणि क्रांतिकारक बदल झाला.
अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म शुक्रवार १४ मार्च १८७९ या दिवशी दक्षिण जर्मनीतील उल्म या संपन्न गावात झाला.हर्मान आणि त्यांची पत्नी पौलिन यांचा हा पहिला मुलगा .त्याच्या डोक्याचा आकार जर वेगळा होता. इतर मुलांच्या मानाने बोलायला उशीरा लागल्याने त्याच्या आईला तो मतीमंद असावा अशी भीती वाटत असे.इतर मुलांबरोबर खेळ खेळल्यावर मी दमतो अशी तो तक्रार त्याच्या आई जवळ करीत असे.तो खूप शांत आणि एकांत प्रिय होता.मस्ती करण्यापेक्षा वाचन आणि संगीत ऐकणे हा त्याचा छंद होता.अल्बर्ट नेहमी धीरगंभीर पण निश्चयी स्वभावाचा होता.अतिशय एकाग्रतेने तो पत्याचा बंगला बनवीत असे. पण लहानपणी तो शांत असला तरी सहनशील नव्हता .५ वर्षाचा असताना त्याने रागाच्या भरात त्याच्या शिक्षिकेला खुर्ची फेकून मारली होती .या घटनेचा त्याच्या मनावर खोल परीणाम झाला आणि निश्चय पूर्वक तो विवेकी बनला.
अल्बर्ट याचे त्याची बहिण माजा आणि त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते .आई वडिलांना आणि बहिणीला त्याने कधीही अंतर दिले नाही.अल्बर्ट ची आई बुद्धिमान होती.वडील अभियंते होते.अल्बर्ट चा भाऊ जेकब आणि त्याच्या वडिलांचा एक कारखाना होता.
अल्बर्ट च्या वडिलांनी लहानपणी त्याला एक होकायंत्र दिले होते. होका यंत्राची सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशाच दाखवते हे लक्षात आल्यावर त्याला खूप कुतूहल वाटले .तो या घटनेने इतका उत्तेजित झाला कि त्याच्या अंगाला कंप सुटला . त्यावेळी तो जेमतेम ६ वर्षाचा होता.त्याला ते सर्व गूढ वाटले आणि गूढ शक्तीची उकल करण्याचा ध्यास त्याने घेतला.
काही वर्षांनी गणितातील संख्यांच्या बाबतीत सुद्धा काही तरी गूढ आहे असे त्याला वाटू लागले.गणित आणि विज्ञान याचे आकर्षण वाढले आणि अंधार कसा पडतो ? सूर्याचे किरण कशाचे बनलेले आहेत ? या सारख्या प्रश्नांची उत्तरे तो शोधण्याचा प्रयत्न करू लागला.या संबंधी प्रश्न विचारून तो त्याच्या वडील आणि काकांना भंडावून सोडत असे.अल्बर्ट शाळेतल्या इतर मुलांबरोबर रमत नसे पण अभ्यासात तो खूप हुशार होता.त्याचा वर्गात नेहमी १ ला नंबर येत असे.
वयाच्या १० व्या वर्षात अल्बर्ट स्वतःच गणित शिकू लागला.शाळेचा ठरलेला गृहपाठ झाला कि अल्बर्ट गणितातील कोडी सोडवत बसत असे.
जर्मन कायद्या प्रमाणे अल्बर्ट ला घरच्या घरी धर्म शास्त्राचे शिक्षण मिळाले.आइनस्टाइन कुटुंब ज्यू धर्माचे होते.घरी धार्मिक आचार विचार काटेकोरपणे पाळले जात .परंतु ज्या परमेश्वरावर विश्वास ठेव असे त्याचे शिक्षक नेहमी सांगत त्या परमेश्वरावरील त्याचा विश्वास वयाच्या १२ व्या वर्षीच पूर्ण पणे उडाला .पण निसर्गातील आश्चर्यकारक घटनांकडे तो मोठ्या कुतूहलानी पाहत असे.
या दरम्यान अल्बर्ट च्या आई वडिलांनी कारखान्यात खोट आल्याने म्युनिच मधील आपला व्यवसाय गुंडाळला आणि ते इटलीला गेले.अल्बर्ट शिक्षण पूर्ण करण्यासाठी जर्मनीतच राहिला.परंतु वयाच्या १७ व्या वर्षी लष्करात भरती व्हावे लागेल म्हणून त्याने जर्मनी सोडली आणि तो आपल्या आई वडिलांकडे इटलीला गेला.अल्बर्टला युद्ध , रक्तपात ,हिंसा हे अत्यंत पाप आहे असे वाटे. त्याच्या मनात दुस-याला मारणा-या लोकांबद्दल घृणा उत्पन्न झाली.
अल्बर्ट पदवीधर झाल्यावर नोकरी शोधत होता.जवळ जवळ वर्षभर त्याला नोकरी मिळाली नाही.शेवटी एका शाळेत त्यास शिक्षकाची हंगामी नोकरी मिळाली.त्याला ती नोकरी प्रथम आवडली नव्हती पण नंतर त्याला शिक्षकी पेशा आवडू लागला.अध्यापन करताना त्याने आपले संशोधनाचे कार्य सुरु ठेवले.अल्बर्ट च्या विज्ञान विषयाच्या कल्पना भन्नाट असायच्या . तो नियतकालीकांतून लेख लिहायचा.१९०१ मध्ये त्याने झुरिच विद्यापिठात पी एच डी साठी पाठवलेला प्रबंध झुरिच विद्यापीठाने नाकारला.अल्बर्ट निराश झाला पण ऐन वेळी त्याच्या मदतीला त्याचा जिवलग मित्र मार्सेल ग्रोसमान धावून आला.त्याचे वडील स्वित्झेर्लंड मधील बडे प्रस्थ होते.त्यांनी बर्न शहरातील आपल्या मित्राकडे अल्बर्ट ची शिफारस केली.ते संशोधनाच्या पेटंट देणा-या कार्यालयाचे प्रमुख होते.१९०२ मध्ये अल्बर्ट ला त्या संस्थेत नोकरी मिळाली.स्विस संशोधकांनी पेटंट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची नोंदणी आणि छाननी हि संस्था करीत असे.या संस्थेत अल्बर्ट तंत्र विषयक तज्ज्ञ तिसरा वर्ग ( कनिष्ठ )म्हणून नोकरीला लागला.या कार्यालयात अल्बर्ट आइनस्टाइन यांस तंत्रविषयक सल्लागार (दुसरा वर्ग ) अशी पदोन्नती मिळाली.ते काम करताना त्याला स्वतःचे संशोधन करण्यासाठी खूप वेळ मिळू लागला.
याच अल्बर्ट आइनस्टाइन याने नंतरच्या काळात जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताने संपूर्ण जगाचे लक्ष त्याने वेधून घेतले .
E = mc²
उर्जा =वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग हे अल्बर्ट आइनस्टाइन यांचे जग प्रसिद्ध सूत्र .यात कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगा पेक्षा ज्यास्त वेगाने जात नाही.... हे या सूत्राने स्पष्ट पणे दाखवून दिले .अल्बर्ट आइनस्टाइन यांनी न्युटनचा निरपेक्ष काळाचा सिद्धांत मोडीत काढलाच पण प्रत्तेक व्यक्तीगणित काळ व्यय वेगळा असतो आणि ती व्यक्ती किती जलद अथवा मंद गतीने हालचाल करीत आहे यावर काळव्यय किती होणार ते अवलंबून असते.उदाहरणार्थ --जवळ जवळ प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणा-या यानात बसून काही अंतराळवीर अवकाशात गेले तर त्या अंतराळवीरांच्या दृष्टीने ,त्यांचा काळव्यय पृथ्वीवर मागे राहिलेल्या माणसांपेक्षा कमी गतीने होईल .अर्थात नेहमीच्या गतीने जाणा-या माणसांसाठी न्युटनचा नियमही लागू पडतो.काही वस्तू प्रकाशाच्या वेगा इतपत वेगाने जावू लागल्या तर त्या आहेत त्या पेक्षा मोठ्या भासतील आणि त्यांच्या वस्तुमाना मध्ये प्रचंड वाढ होईल असे आइनस्टाइन यांनी प्रतिपादन करून गणिताच्या आधारे ते सिद्ध केले.
संत ज्ञानेश्वर यांना जसे धर्ममार्तंड लोकांचा विरोध सहन करावा लागला तसाच अल्बर्ट आइनस्टाइन यांना तो सहन करावा लागला.त्यांचा हा नवा सिद्धांत मान्य करणे तत्कालीन शास्त्रज्ञ समूहाला खूप अवघड होते आणि त्यांचे सिद्धांत चटकन समजतही नसत.
अणु बॉम्ब चा स्फोट ......!
अणु भंजन करून खूप मोठी संघटक शक्ति मुक्त होईल याची जाणीव आइनस्टाइन यांनी जगाला करून दिली.आधुनिक याने, अंतराळातील होणारे प्रयोग याचे खरे जनक आइनस्टाइन हे आहेत हे संपूर्ण जगाने मान्य केले.Run away reaction हि रसायन शास्त्रातील स्फोट घडवणा-या प्रक्रियेला आइनस्टाइन यांच्या मुळे चालना मिळाली.प्रचंड वेगाने याने पृथ्वीचा तळ सोडण्यासाठी आणि पृथ्वीचे आवरण फोडून अवकाशात झेप घेण्यासाठी लागणा-या उर्जेचे , वेळेचे आणि गतीचे गणित आइनस्टाइन यांच्या सिद्धांताने सुटले . आज त्याचीच गोड फळे आपण चाखत आहोत.
हिटलर आणि आइनस्टाइन --
जर्मनी हि श्रेष्ठ आर्य वंशाच्या लोकांची भूमी असून ज्यू , जिप्सी ,किवा अन्य कोणत्याही धर्माच्या लोकांना जर्मनीत राहता येणार नाही असा फतवा हिटलर ने काढला .अनेक ज्यू लोकांनी तेथून पळ काढला तर अनेक भूमिगत झाले.या नाझी वादाशी मुकाबला करण्यासाठी अल्बर्ट आइनस्टाइन याने आपले सारे वैज्ञानिक ज्ञान वापरले.१९३९ साली त्यांनी अमेरिकेच्या रूझवेल्ट या अध्यक्षांना पत्र लिहिले .अणुशक्तीवर आधारित शस्त्रे तयार करणे शक्य आहे हे त्यांनी रूझवेल्ट यांना सांगितले.१९४१ साली रूझवेल्ट यांनी त्यांच्या सरकारी शास्त्रज्ञ समूहाला अणू बॉम्ब तयार करण्यास सांगितले.१९४३ साली आइनस्टाइन यांची अतिशय उच्च दर्जाच्या स्फोटक विषयक सल्लागार समितीचा प्रमुख म्हणून अमेरिकेने नेमणूक केली . जर्मनांना अणु बॉम्ब तयार करता येणार नाही याची पुसटशी जरी कल्पना मला असती तरी अणु बॉम्ब तयार करा असे मी अमेरिकेला सुचवले नसते असे निराश उद्गार आइनस्टाइन यांनी नंतर काढले होते.
खरे तर आइनस्टाइन हे शांततेचे भोक्ते होते.त्यांना रक्तपात आवडत नसे म्हणूनच २ -या महायुद्धा नंतर आइनस्टाइन यांनी ज्या देशांनी अणू अस्त्र बनवली होती त्या त्या देशांनी ती नष्ट करावीत या साठी आइनस्टाइन यांनी जोरदार मोहीम उभारली.आपण एक अतिशय विनाश करणारी शक्ती मोकळी केली याचे शल्य जन्मभर आइनस्टाइन यांना होते . अणुशक्तीचा उपयोग विध्वंस करण्यासाठी न करता शांतते साठी आणि लोकांच्या दैनंदिन व्यवहारात जगाच्या भल्या साठी करावा असे त्यांचे मत होते. त्यांच्यातला ' विवेक ' आपण लोकांच्या हातात हे काय ज्ञान देवून बसलो याची खंत करीत असे.अणू शक्तीच्या दुष्परिणामाची जाणीव त्यांना झाली होती. जगाची हानी टाळण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान अतिशय कडक नियंत्रणा खाली ठेवले पाहिजे असा इशारा त्यांनी सर्व जगाला त्याच वेळी दिला होता.१८ एप्रिल १९५५ रोजी आइनस्टाइन यांची प्राण ज्योत मालवली. आइनस्टाइन यांचा मेंदू त्याच्या मृत्यू नंतर प्रिन्स्टन हॉस्पिटल च्या पथौलॉजी च्या पयोग शाळेत परीक्षण करण्यासाठी जतन केला गेला.त्याच्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचे नमुने तपासले गेले त्यात अनेक आश्चर्य कारक गोष्ठी उघड झाल्या. आइनस्टाइन यांच्या मेंदू बाबत स्वतंत्र लेख लिहिता येईल .आजवर त्यांच्या मेंदूवर १००००० हून अधिक शास्त्रीय लेख वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहेत .अजूनही त्यावर संशोधन सुरु आहे.
संत ज्ञानेश्वर आणि अन्य देशातील थोर शास्त्रज्ञ यांच्या काही समान दुवे आहेत परंतु त्यांच्यात काही मुलभूत फरक सुद्धा आहे. या लेखमालेच्या शेवटी मी तो लिहिणार आहे.
-- चिंतामणी कारखानीस -
आरशांचा उल्लेख रामायण-महाभारतातही आढळतो. ग्रीक, रोमन, आपली सिंधु संस्कृती यांच्या भरभराटीच्या कालखंडातही आरशांचा उपयोग होत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. संथ जलाशयाच्या पाण्यात डोकावून पाहताना आपणच आपल्याकडे पाहत असल्याचं दिसल्यापासून ही जादू आपल्या घरच्या घरीच हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
सर्व forces जसे Electromagnetic , nuclear force आणि इतर काही हे सारे describe होऊ शकतात. म्हणजे microscopic level ला त्यांच्या particles मधले आदान-प्रदान दिसते पण Gravitation एक मात्र असा force आहे की त्याबद्दल असे घडत नाही . म्हणून तो microscopic level ला describe होत नाही. त्यामुळे Quantum Gravity साठी अशी theory हवी जी सर्व forces describe करू शकेल व त्याचे स्वरूप हे massless हवे .आणि हे ‘string theory’ ने शक्य होते.
प्रास्ताविक :
आजचें युग हें विज्ञानयुग आहे. आतां विज्ञानाच्या भिंगातून जुन्या संकल्पनांचें विश्लेषण होतें आहे. आपणही आतां विज्ञानाच्या कसोटीवर गणपतीचा विचार करणार आहोत.
गजाननाच्या सर्वमान्य रूपातील मुख्य घटक कोणते, तें सर्वप्रथम पाहू या. ते आहेत –
• हत्तीचें मस्तक ; म्हणजेच हत्तीसारखी सोंड व हत्तीप्रमाणे सुपासारखे कान
• हत्तीसारखा मोठा, पण एकच दात (सुळा, tusk) ; (एकदंत)
• स्थूल शरीर, विशाल उदर
• मूषक हें वाहन.
या घटकांचा विचार आपण पुढे करणारच आहोत.
‘गणांचा अधिपति’ याच अर्थाने गणेशाचा ऋग्वेदामधे उल्लेख आहे. ‘गणानां त्वा गणपतिम् हवामहे’ ही ती सुप्रसिद्ध ऋचा. ऋग्वेदकाळापासूनच, गजानन हा गणनायक आहे, गणाधिपती आहे, असें म्हटलें गेलेलें आहे. कृष्णयजुर्वेदात गणपतीला ‘दंती’ (म्हणजे, सुळा, tusk असलेला), ‘हस्तीमुख’ व ‘वक्रतुंड’ (वाकडी सोंड असलेला) असा उल्लेख केलेला आहे. महाभारताचा लेखनिक गणेश आहे, अशी आख्यायिका आहे. गणेश पुराण तर गणपतीशीच संबंधित आहे. ‘श्रीगणपतिअथर्वशीर्ष’ या स्तोत्रात गजाननाच्या, ‘गणपति, एकदंत, वक्रतुंड, शूर्पकर्ण, लंबोदर’, वगैरे नावांचा उल्लेख आहे, व ‘गँ गणपतये नम:’ असा मंत्रही आहे. अथर्वशीर्ष हें अथर्ववेदाचा एक भाग आहे, असे मानले जातें. अथर्वशीर्ष स्वत:ला एक उपनिषद म्हणवते. गजानन हा गणाधिपति आहे, म्हणूनच आपण गणपतीचे पूजन प्रत्येक विधीच्या आरंभी करतो. थोडक्यात काय, तर ऋग्वेदकालापासून आपल्याला गणपती आढळतो.
ऋग्वेदाचा काळ हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. परंतु, पुढे जाण्यापूर्वी आपण, आपल्या विषयाच्या अनुषंगानें ऋग्वेदकालाचा थोडासा आढावा घेऊ या, म्हणजे गणपतीची संकल्पना किती जुनी आहे, याचा अंदाज येईल. ऋग्वेदाचा काळ इ.स.पू. १५०० असा, १९व्या शतकातल्या पाश्चिमात्य विद्वानांनी मानलेला आहे, व आजही काही भारतीय विद्वानांची त्याला मान्यता आहे. ‘दि आर्यन डिबेट’ या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पुस्तकात विविध जुन्यानव्या विद्वानांच्या लेखांचे संकलन आहे, व त्यांत तो काल, इ.स.पू. १५००, इ.स.पू. २०००, इ.स.पू. २२०० असा वेगवेगळा मांडलेला आहे. काही अन्य भारतीय विद्वान ऋग्वेद त्याहून खूप प्राचीन आहे, असे मानतात, व भारतीय परंपराही तसेंच मानते. नक्षत्रतारकापुंजांच्या स्थितीबद्दलची कालक्रमणाच्या संदर्भातील गणिती समीकरणें मांडून, लोकमान्य टिळकांनी तो काळ इ.स.पू. ४५०० असा सप्रमाण दाखवून दिलेला आहे. ‘ऋग्वेदाचा मराठी शास्त्रीय अनुवाद’ या ग्रंथाचे लेखक डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रस्तावनेत उल्लेख केलेला आहे की, वेगवेगळ्या विद्वानांनी तो काळ इ.स.पू. २००० पेक्षा जुना मानला आहे; तर काहीं विद्वानांनी तो त्याहून बराच प्राचीन, अगदी इ.स.पू. २५००० पर्यंत नेलेला आहे. आपण जरी ऋग्वेदाचा काळ इ.स.पू. ४५०० किंवा अगदी इ.स.पू. २००० मानला, तरीही हा काल, अति-प्राचीन, इतिहासपूर्वकालच आहे.
ऋग्वेदीय कालापासून तत्कालीन ‘वैदिक-संस्कृत’ भाषकांचे ( ही भाषा, आर्ष-संस्कृत, छांदस्, देववाणी, देवी-वाक् इत्यादी नांवांनीही ओळखली जाते) व ‘द्रविडियन’ (पुरातकालीन तमिळ?) भाषाभाषकांचे संबंध होते, व कदाचित एकात्म्यही होते, असा अभ्यासकांनी निष्कर्ष काढलेला आहे. (द्रविडीय भाषा आज आपल्याला दक्षिण भारत, व उत्तर भारताचा काही विशिष्ट भाग येथे आढळतात. बलुचिस्तानमधील काही जमातीसुद्धा ब्राहुई नांवाची द्रविडीय भाषा बोलतात!). म्हणून आपण दाक्षिणात्य भाषांमधेही डोकावून पाहू या. तमिळमधे गणेशाला ‘पिल्ले’ व ‘पिल्लइयार’ अशीही नामें आहेत. द्रविडीय (दाक्षिणात्य) भाषांमधे ‘पल्लू’, ‘पेल्ला’, ‘पेल्ल’ म्हणजे, दात किंवा हत्तीचा सुळा . म्हणजे, द्रविडीय भाषांमधेसुद्धा गणेशाचा संबध हत्तीशी जोडलेला आहे.
या सर्व विश्लेषणावरून, असे समजायला हरकत नाहीं की संस्कृत, आर्ष-संस्कृत तसेंच द्रविडीय, या सर्व भाषा-भाषक जनांमधे शतकानुशतकें वर उल्लेखलेले गणेशाचे रूप प्रचलित आहे. याचाच अर्थ असा की, गेली किमान ३५००-४५०० वर्षें तरी, किंवा त्याहूनही बर्याच आधीपासून, म्हणजेच इतिहासपूर्व अतिपुरातनकालापासून, गणपतीचें हें रूप भारतात सर्वमान्य आहे. (हें रूप लिखित स्वरूपात किंवा शिल्पांच्या स्वरूपात, वेदोपनिषदांनंतरच्या काळात दिसलेले असले तरी, ती मौखिक परंपरा त्याहून खूपच प्राचीन असली पाहिजे, याबद्दल कसलाही संदेह असू नये. अशी सर्वमान्य मौखिक परंपरा असल्याशिवाय, तें रूप लिखित स्वरूपात व शिल्पांमधे येणेच शक्य नाहीं). तेव्हां, गजाननाचें असें रूप सर्व जनांनी इतकी शतकें-सहस्त्रकें मानण्यामागे काहींतरी ‘लॉजिकल’ कारण नक्कीच असलेंच पाहिजे. मिथकें बाजूला सारून, तर्काधारानें यामागील विज्ञानाधारित स्पष्टीकरण शोधतां येतें कां, व तें काय असू शकेल, याचा विचार आपण करणार आहोत.
भारतीय देवच नव्हे, तर ग्रीको-रोमन संस्कृतीमधील देवही माणसाप्रमाणे वागतात; त्याचें कारण काय असावें ? एरिक फॉन डेनिकेन, चार्लस् बर्लिटझ् वगैरें लेखकांनी या विषयावर बराच अभ्यास व लिखाण केलेलें आहे. (पहा : डिनिकेन यांचे, ‘चॅरिएटस् ऑफ दि गॉडस्?’ हें पुस्तक, व बर्लिटझ् याचें ‘मिस्टरीज् फ्रॉम फॉरगॉटन् वर्ल्डस्’ हें पुस्तक ). डेनिकेन यांच्या लिखाणातील मूळ सिद्धांत असा आहे की, पृथ्वीवर अवतरलेले ‘देव’ म्हणजे परग्रहावरून आलेले अवकाशप्रवासी (अंतराळयात्री) होत. या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी, जगभरातल्या विभिन्न देशांमधील व विविध संस्कृतींमधील, भिन्नभिन्न कालखंडांतील, अनेक उदाहरणें प्रस्तुत केलेली आहेत. परंतु, त्यांच्या यादीत, रामायणातील पुष्पक विमान व महाभारतातील ब्रह्मास्त्र यांखेरीज अन्य भारतीय संदर्भ सहसा नसतात. अर्थातच, याचें एकमात्र कारण हेंच आहे की, त्यांनी भारतीय संस्कृतीचा पुरेसा अभ्यास केलेला नाहीं. परंतु, आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून त्या अंगानें विचार केला तर, आपल्याला त्याप्रकारची भारतीय परंपरेतील अनेक उदाहरणें सापडतात. अन्य उदाहरणांविषयी पुन्हां केव्हांतरी चर्चा करू. तूर्तास, आपण गजाननाचा त्या दृष्टीकोनातून विचार करू या.
[ कृपया नोंद घ्यावी की, यानंतरच्या सर्व विवरणात ठिकठिकाणी, हल्ली प्रचलित असलेल्या व सर्वज्ञात असलेल्या इंग्रजी संज्ञांचा वापर केलेला आहे. या सर्व संकल्पनाच आधुनिक आहेत. त्यामुळे अशा शब्दांना भारतीय भाषांमधे प्रतिशब्द असतातच असे नाहीं; किंवा निर्माण केलेले असल्यास, ते रुळलेले नसतात, आपल्या रोजच्या बोलण्यात ते येत नाहींत.]
-- सुभाष स. नाईक.
मुंबई.
M - 9869002126.
जपानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंवर पृथ्वीच्या प्रदक्षिणाकाळात घट होऊन दिवसाचा कालावधी कमी झाला आहे….. का?
विमानप्रवास आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. विमानात बसण्याची पूर्वतयारी म्हणजे तारीख ठरवून तिकीट काढणे अशी बहुतेकांची समजूत असते. ‘मला विमान चालवायचे नाही. त्याच्या संबंधातील तांत्रिक गोष्टींचा मला काय उपयोग?’ असा प्रश्न रास्त आहे. पण यामागील विज्ञानासंदर्भात एक प्रश्न विचारून फक्त सुरुवात तर करून बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल वगैरे बाबतीतील कुतुहल वाढत जाईल. जसजशी उत्तरे मिळतील तसतसे प्रश्न वाढतील. करूया सुरुवात? ‘विमानप्रवास सुरक्षित आहे का?’ हा काहींचा पहिला प्रश्न असू शकतो.
भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ किंवा काल, आज आणि उद्या किंवा घडलेले, घडत असलेले आणि घडणार असलेले, अशा काळाच्या तीन अवस्थांची जाणीव आपल्याला असते. तसेच पाच मिनिटांपूर्वी, सहा तासांपूर्वी किंवा दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांच्या काळातील फरकाची जाणीवही आपल्या मेंदूला असते. हे कसे घडते या विषयी थोडेसे….
Copyright © 2025 | Marathisrushti