(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक प्रभावी ऐतिहासिक चित्रपट – छावा

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या स्वराज्याला आधार देऊन मुघल सल्तनतीला आव्हान देत औरंगजेबाला तब्बल पावणे नऊ वर्ष झुलवत ठेवणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावर आधारित छावा हा चित्रपट लोकप्रियतेबरोबरच वादाच्या घेऱ्यातसुद्धा वेढलेला आहे मात्र असे असले तरी छत्रपती संभाजी राजांचे कार्य आणि त्यांचे स्वराज्याप्रति समर्पण लोकांसमोर ठेवण्यात निर्माते आणि दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत असं ठामपणे म्हणता येईल.

      May 18, 2025


  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 17

    अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ?

    उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं.

    सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा तेवढा आतून वहाणारे द्रव पदार्थ जास्ती प्रमाणात जाणार. आणि जेवढा पाईप लहान तेवढा द्रव पदार्थ देखील पुढे ढकलायला जास्ती कष्ट पडणार. हे व्यावहारिक सत्य आपण बघतोच. बरं ही स्रोतसे आतून गुळगुळीत असतील तर आतील पदार्थ पटकन पुढे ढकलला असता. पण स्रोतसे आतुन वरखाली असतात. नुसत्या डोंगर आणि दऱ्या. याकरीता या स्रोतसांमधे लाळेसारखा एक बुळबुळीत पदार्थ सतत स्रवत असतो. यामुळेच तर अन्नाचा गोळा हळुहळू पुढे ढकलला जातो. पण स्रोतसांना चिकटणारे पदार्थ आत गेले तर या स्रोतसांच्या हालचाली थोड्या मंदावतात. आतमधे या आम सदृश पदार्थाचे लेपन झाल्यामुळे यांचा आकारदेखील थोडा लहान होतो. त्यामुळे आतील द्रव ज्या वेगाने पुढे सरकला पाहिजे, त्या वेगाने पुढे सरकत नाही.
    दिवसाची मिळालेली सूर्याची उष्णता, या स्रोतसांमधील आतून चिकटलेला कफसदृश द्रवपदार्थ विलयीत करते आणि स्रोतसांचा आकारही वाढवला जातो, आणि अन्न पदार्थ सहजपणे पुढे ढकलायला मदत होते.

    हे सर्व काम दिवसा उजेडी झाले तर बरे ना. म्हणून दिवसा जेवावे.

    आणि रात्री सूर्य नसल्यामुळे स्रोतसांचे आकुंचन सुरू होते. स्रोतसे संकुचित होतात. आतून वाहाणारा द्रवाहार सावकाश जातो. काही वेळा तर अडकूनच रहातो. त्याला मागाहून येणारा रस चिकटत जातो. थरावर थर लागत जातात आणि स्रोतसांचा आकार आणखीनच कमी होतो. स्रोतसांमधे आतून साठण्याची वृत्ती वाढली की गोळा बनत जातो.

    लहान रस्त्यावर ट्रॅफिक स्लो होते, रस्ता मोठा असला तर ट्रॅफिकजामची भीती नसते. म्हणून दिवसाचे अन्न लवकर पुढे सरकते, आणि पचते आणि रात्रीचे उशीरा !

    ही संकोचनाची क्रिया होऊ नये या करीता, गती आणि उष्णता दोन्ही गोष्टी हव्यात. हे चक्क भौतिकशास्त्र सांगितलेले आहे.

    ग्रंथकार एक सूचना अवश्य करीत आहेत. जर सायंकाळी घेतलेले अन्न चांगले पचले नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागेपर्यंत जेऊ नये. पण दिवसाचे अन्न पचले नसेल तर परत सायंकाळी जेवले तरी ते दिवसभराच्या उष्णतेमुळे पचून जाते.
    याचा दुसरा अर्थ सायंकाळी जेवताना नीट विचार केल्याशिवाय जेऊ नये. एवढे लक्ष सायंकाळच्या जेवणाच्या वेळेवर ठेवावे.
    कारण,
    जंतुंची वाढ देखील रात्रीच्याच वेळी होते.
    कारण त्यांचाही रात्रीस खेळ चाले....
    हे आयुर्वेदातील जीवशास्त्र..

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.03.2017

      March 12, 2017


  • विविध प्रकारच्या मुद्रण यंत्रांचे काम कसे चालते?

    फाऊंड्रीमध्ये धातुंचे ओतकाम करताना ज्याप्रमाणे प्रथम पॅटर्न तयार करुन नंतर साचा करतात व त्यातून हजारो नग बनवतात. त्याप्रमाणे जे छापायचे त्याच्या प्रतिमेसाठी माध्यम तयार करुन त्याला छपाई यंत्रावर लावून हजारो प्रती छापता येतात.इतिहासजमा झालेल्या रिलीफ छपाई पद्धतीतील लेटर प्रेसवर चित्रे आणि छायाचित्रांसाठी ब्लॉक्स आणि मजकूरासाठी खिळे वापरत.

      May 23, 2023


  • अमेरिकन शाळेत पोलिस, फायर फायटिंगवाले

    अमेरिकेत पोलिस यंत्रणेकडे सामान्य नागरिकाचा सहृदय मित्र म्हणूनच पाहिले जाते. घरात काही गडबड झाली आणि विशिष्ट नंबर फिरविला तर पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहोचतात. लहान मुलांच्या बाबतीत तर ते अधिक तत्पर, संवेदनशील आणि संरक्षक असतात.

      June 12, 2023


  • जांभई येणे

    दररोजच्या जीवनात आपण 'जांभई' देतांना इतरांना पाहतो. तसेच 'जांभई'चा अनुभव आपण स्वत:ही घेतलेला आहेच म्हणा. 'जांभई' येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही 'जांभई' भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई' ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय. 'जांभई' का येते? याचे मागील कारण शोधून काढण्यासाठी अभ्यासकांनी पोपटांवर परीक्षण केले होते. त्यांनी परिक्षणासाठी अतिशय उष्ण, कमी उष्ण व सामान्य वातावरण, अशा स्थळांची निवड करून प्रत्येक वातावरणात पोपटांना काही तास ठेवले. कमी व सामान्य वातावरणातील पोपटांना जांभई आली नाही. मा‍त्र उष्ण वातावरणातील पोपटांना वारंवार जांभई येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा सामान्य तापमानात असतो तेव्हा आपल्या मेंदू शांत राहतो. त्यामुळे आपल्याला जांभई येत नाही. त्याचप्रमाणे थंड वातावरणातही आपल्याला जांभई येत नाही.मात्र उष्ण वातावरणमध्ये आपला मेंदू तापत असल्याने आपल्याला जांभई येते. झोप येण्याआधी व झोपेतून उठल्या- उठल्या मेंदूला योग्य तापमानात आणण्यासाठी आपल्या जांभई येत असते.

    जांभईच्या शास्त्रीय अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक ज्येष्ठांचे निरीक्षण केले. कुटुंबातील सदस्यांमध्ये जांभई ही तुलनेने मित्र किंवा इतर घटकांपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे यातून दिसून आले. नातेवाइकांत हे प्रमाण दहामध्ये आठ, तर अनोळखींमध्ये ते दहात केवळ एक असल्याचे आढळून आले. दुसरीकडे जांभई देण्यास उशीर झाला तर ती अधिक लांबण्याची शक्यता असते. हे परिचित व अपरिचित दोन्ही व्यक्तींबाबत घडू शकते. या प्रकल्पात जगातील विविध देशांतील लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जांभईवर परिणाम करणारी काही तथ्ये गोळा करण्यात आली. यात राष्ट्रीयत्व, त्वचेचा रंग, भिन्न सांस्कृतिक सवई, सहभागी व्यक्तीचे वय, लिंग. याशिवाय दोन व्यक्तींमधील नातेसंबंध हे ते घटक असल्याचे संशोधन प्रकल्पाच्या प्रोफेसर एलिझाबेटा पालागी यांनी म्हटले आहे. मुलांमध्ये जांभईची ही संसर्गजन्य प्रक्रिया पहिल्या पाच वर्षांपर्यंत विकसित होत नाही. त्यामागे भावना हे कारण सांगण्यात आले आहे. इतरांच्या भावना नीटपणे समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली नसते. त्यामुळे मुले या नियमाला अपवाद ठरली असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. परिचित व्यक्तीच्या सहवासात जांभई येते. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीला जांभई देतानादेखील जांभई येण्याची वृत्ती होते किंवा त्याला टाळण्यात येते. या शास्त्रज्ञ सामाजिक सहानुभूतीची संकल्पना देतात. ही बाबदेखील संशोधनातून आढळून आली आहे. 480 जांभई स्पर्धेतून अभ्यास करण्यात आला. हा संशोधन प्रकल्प एक वर्ष चालला. त्यात 109 ज्येष्ठांना सहभागी करून घेण्यात आले होते. 04 वर्षांपर्यंत मुलांमध्ये मोठ्या माणसांसारखा हा संसर्ग आढळून येत नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    संदर्भ :- marathi.webdunia.com

      January 19, 2017


  • शारदाभुजङ्गप्रयाताष्टकम् – मराठी अर्थासह

    शारदा ही शृंगेरी नगरीची देवता असून ती सरस्वतीचा अवतार मानली जाते. भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र विलक्षण गेय असले तरी अभ्यासकांच्या मते ते समजण्यास अवघड असून त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात. अनुप्रास अलंकाराचे उत्कृष्ट योजन या स्तोत्राच्या सर्व कडव्यांमधून दिसते.   

      December 13, 2022


  • शहरी माओवाद – सद्य परिस्थिती आणि उपाययोजना

    शहरी माओवादी समाजामध्ये आपला प्रभाव वाढविण्या करता वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करतात. यावर लक्ष ठेवून योग्य प्रत्युत्तर देण्याकरता उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपल्याला माओवाद्यांच्या एक पाऊल पुढे राहण्याची गरज आहे, तरच आपण त्यांची वाढणारा प्रभाव थांबवू शकतो.

      May 25, 2019


  • मनाचे श्लोक – ८१ ते ९०

    मना मत्सरे नाम सांडू नको हो | अती आदरे हा निजध्यास राहो |
    समस्तांमधे नाम हे सार आहे | दुजी तूळणा तूळिताही न साहे ||81||

    बहू नाम या रामनामी तुळेना | अभाग्या नरा पामरा हे कळेना |
    विषा औषध घेतले पार्वतीशे | जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||82||

    जेणे जाळिला काम तो राम ध्यातो | उमेसी अती आदरे गूण गातो |
    बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे | परी अंतरी नामविश्वास तेथे ||83||

    विठोने शिरी वाहिला देवराणा | तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा |
    निवाला स्वये तापसी चंदमौळी | जिवा सोडवी राम हा अंतकाळी ||84||

    भजा राम विश्राम योगेश्वराचा | जपू नेमिला नेम गौरीहराचा |
    स्वये नीववी तापसी चंदमौळी | तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ||85||

    मुखी राम विश्राम तेथेचि आहे | सदानंद आनंद सेवूनि राहे |
    तयावीण तो सीण संदेहकारी | निजधाम हे नाम शोकापहारी ||86||

    मुखी राम त्या काम बाधू शकेना | गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना |
    हरीभक्त तो शक्त कामास मारी | जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ||87||

    बहू चांगले नाम या राघवाचे | अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे |
    करी मूळ निर्मूळ घेता भवाचे | जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ||88||

    जनी भोजनी नाम वाचे वदावे | अती आदरे गद्य घोषे म्हणावे |
    हरीचिंतने अन्न सेवीत जावे | तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||89||

    न ये राम वाणी तया थोर हानी | जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी |
    हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी | बहू आगळे बोलिली व्यासवाणी ||90||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 6, 2016


  • कालसुसंगत (Relevant)

    दिवसागणिक अशा प्रयॊग करणाऱ्यांची आणि काळाशी सुसंगत राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांची माझी यादी वाढत आहे. हा relevance खाद्य संस्कृती,करमणूक क्षेत्र, वाहन व्यवसाय आणि अशा सगळ्या दिशांनी पसरत चाललाय.

      November 3, 2022


  • न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

    न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

    न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ काढण्यासाठी मदत झाली ती ‘मेंसेंजर’ या नासानं बुधाकडे पाठवलेल्या अंतराळयानाची. मेसेंजर यानानं २०११ ते २०१५ या काळात बुधाभोवती प्रदक्षिणा घातल्या. बुधाकडे जाताना या यानानं शुक्राजवळूनही प्रवास केला. आपल्याकडील उपकरणाद्वारे, या दोन्ही ग्रहांच्या पृष्ठभागापासून विविध अंतरावरून जाताना या यानानं, या ग्रहांपासून येणाऱ्या न्यूट्रॉन कणांची संख्या मोजली व त्यावरून संशोधकांना न्यूट्रॉनच्या सरासरी आयुष्याचं गणित मांडणं शक्य झालं. या गणितानुसार न्यूट्रॉनचं सरासरी आयुष्य हे फक्त तेरा मिनिटांचं असल्याचं आढळून आलं आहे.

      June 30, 2022