(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अत्यंत असुरक्षित पासवर्डची यादी

    आपल्या रोजच्या व्यवहारात पासवर्डचं महत्त्व असाधारण आहे. तुम्हाला असं वाटतं का, की तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे? पहा खाली दिलेली यादी !!!

  • कचरा : मोबाईल आणि संगणकाचा !

    संगणकाचा जमाना जुना होऊन आता मोबाईलचा जमाना आलाय. सहाजिकच आहे. हातात आणि खिशात मावणार्‍या मोबाईलवरुन संगणकाची सगळी कामं होऊ लागली तर संगणक हवाय कशाला?

    बरं पुन्हा आपली क्रयशक्ती म्हणजेच खर्च करण्याची कुवत वाढल्यामुळे भारतीयांमध्येही आता “वापरा आणि फेकून द्या” ही वृत्ती रुजायला लागलेय.
    दर महिन्याला मोबाईलच्या नवनव्या मॉडेलच्या जाहिरातींनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. “ए” पासुन “झेड” पर्यंत सगळी अक्षरं आणि अक्षरांचे समूह वापरु या मॉडेल्सची बारशी केलेली असतात. या मॉडेल्सच्या जाहिरातीही इतक्या आकर्षक असतात की कॉलेज तरुण, गृहिणी वगैरेच काय.. तर अगदी व्यावसायिकही त्यांना भूलतात. दर चार-सहा महिन्यांनी मोबाईल बदलण्याची स्पर्धाच लागते. ऑनलाईन विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर वेगवेगळ्या ऑफर्सही असतात.
    नवा मोबाईल म्हटलं की नवा 'लुक', नव्या सुविधा.. सगळं काही नवं कोरं! तो आला की जुना मोबाईल कुठेतरी कोपर्‍यात पडतो. पूर्वी निदान “बाय-बॅक”ची सोय तरी होती. आता तर “बाय-बॅक” मध्ये जास्त पैसे मिळत नाहीत म्हणून जुना मोबाईल तसाच ठेवला जातो. कधीतरी लहान भाऊ-बहिणीला, तर कधी म्हातार्‍या आजोबांना दिला जातो. मात्र बर्‍याचदा तसाच कोण्यातरी कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये पडून रहातो. कधीतरी घरातला कचरा साफ करताना तो डोळ्यासमोर येतो आणि त्याची रवानगी होते थेट कचर्‍याच्या डब्यात.
    एवढासा तर तो मोबाईल, त्याचा असा किती कचरा होणार? पण विचार करा, ज्या गतीने दुकानांमध्ये मोबाईल विकत घेतले जातात त्या गतीने एकट्या मुंबईत दिवसाला एक हजार मोबाईल कचर्‍यात जात असतील तर... वर्षाला किती झाले?
    खरोखर आता वापरात नसलेल्या मोबाईलची संख्या म्हणजेच पर्यायाने मोबाईलचा कचरा इतका वाढलाय की ती एक मोठी समस्या बनली आहे. नुसता मोबाईलच नाही, तर जुने कॉम्युटर, जुने टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, लॅपटॉप.अशा अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात फेकून दिल्या जाताहेत आणि त्यांचा कचरा वाढत चाललाय.
    या कचर्‍याच्या ढिगांचं करायचं काय हा प्रश्न महापालिकांना पडायला लागलाय. बरं आपल्याकडे इ-वेस्टला हाताळणारी सक्षम यंत्रणा उभी राहिली नसल्याने या सगळ्या वस्तू कचराकुंडीत टाकल्या जातात आणि तिथूनच त्यांचा प्रवास डंपिंग ग्राऊंडच्या दिशेने होतो आणि मग देवनारच्या डंपिंग ग्राऊंडला आग लागण्यासारख्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं.
    या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीचा वेग प्रचंड आहे आणि तेवढाच त्यांना कचर्‍यात टाकण्याचाही वेग आहे. या वस्तूंची विल्हेवाट लावणं हे एक अतिशय कठीण काम आहें. साहजिकच विल्हेवाट न लागल्याने कचरा बनून त्या तशाच पडून राहत आहेत.
    एका कम्प्युटरचे उदाहरण घेतले तर त्याच्या प्रत्येक भागात काही ना काही विषारी तसेच घातक पदार्थ असतात. मॉनिटर, की-बोर्ड, मदरबोर्ड, सीपीयु, टोनर, सीडी, केबल या सर्वच भागांमध्ये बेरिलियम, कॅमियम, क्रोमियम, शिसे यासारखा कोणता ना कोणता घातक धातू असतोच. याशिवाय अनेक भाग प्लॅस्टिकचे असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने वाईटच आहेत. त्यामुळें तें जाळता येत नाहीत आणि कुठं साठवताही येत नाहीत. त्यांचे विघटन करणें हें खर्चिक काम आहें.
    जगात दररोज हजारो टन असा 'ई-कचरा' निर्माण होतो व तसाच पडून राहतो. त्यामुळेच त्याचे करायचे तरी अशी मोठी समस्या जगभर ऊभी राहिली आहे. भारतात एका अंदाजानुसार दरवर्षी
    सुमारें दहा लाख टन कचरा निर्माण होतो त्यात महाराष्ट्राचा आणि मुंबईचा जवळपास दहा टक्के वाटा आहे. आयटी क्षेत्राचा सतत होत जाणारा विकास, नवनवी उपकरणे, चिनी बनावटीचे स्वस्त मोबाईल या सगळ्यामुळे भविष्यातही हा इ-कचरा आणखी वाढणार आहे.
    हे असेच सुरू राहिले तर लवकरच संपूर्ण पृथ्वीभर या इ-कचर्‍याचे राज्य असेल. हे टाळायला तर हवंच.
    यासाठी इ-कचर्‍याचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रभावी यंत्रणा तयार होणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
    -- निनाद अरविंद प्रधान
  • वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – ४ – झाडांच्या पेशीतील आनुवंशिक तत्व

    आनुवंशिक तत्वं, सजीवांची शरीरं घडवितात हे आता निर्विवादपणे सिध्द झालं आहे. अध्यात्मवाद्यांनी आता या विज्ञानीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे..आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीव आणि वनस्पती यांच्यातील आनुवंशिक तत्व म्हणजेच त्यांचा आत्मा हेही मानलं पाहिजे.

  • अदृश्य जग आणि विज्ञान

    हे  विश्व आपण पाहतो ते खरच real आहे का ? जसे स्वप्नात आपल्याला जागे झाल्याशिवाय स्वप्न की अस्तित्व कळत नाही अगदी तसेच या अस्तित्वाला समजायला तुम्हाला जागाव  लागेल (You have to awake). असे म्हणू शकतो कारण आपल्या संसारी जीवनात आपण तितके व्यस्तच आहोत. त्यापासून थोडे लक्ष वेधण्यासाठी सद्या  काही चर्चेत असलेल्या science बद्दल काही रहस्यमय facts आणि theory आपण पाहणार आहोत .

  • आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे डॉ. एडमंड टेड एगर

    वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याचे वैद्यकीय तंत्र अ‍ॅलोपॅथीत एकोणिसाव्या शतकापासून विकसित झाले. या तंत्रात मोठी सुधारणा घडवून आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे नुकतेच निधन झाले. दर वर्षी विशिष्ट औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया आजघडीला ३० कोटी लोकांवर केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

  • तुमची वेबसाईट गुगलमध्ये येतेय?

    गेल्या काही दिवसांत अनेकजणांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने येथे एक साधी-सोपी टिप देतोय. आपल्या वेबसाईटवरच्या पानांची नावं कशी असावीत त्याबाबत.

  • वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – झाडाचा जन्म – १

    झाडांच्या बिया आपण नेहमीच पाहतो. पण त्यांतील दिव्यत्व आपल्याला जाणवत नाही. त्यांत बंदिस्त असलेल्या सांकेतिक आनुवंशिक आज्ञावल्या निसर्गाला वाचता येतात.

  • महाराष्ट्र दिनानिमित्त संकल्प करुया मराठीतूनच इ-मेल पाठवण्याचा मराठीत लिहिण्याचा

    आपल्यापैकी कितीजणांच्या संगणकावर मराठीत काम करण्याची सोय आहे? किती जण मराठीत इ-मेल आणि कागदावरील पत्रव्यवहार करतात? कितीजण फेसबुकवर मराठीत लिहितात? मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला इ-मेल फक्त मराठीतच पाठवावे असा संकल्प या महाराष्ट्रदिनी करायला काय हरकत आहे? फेसबुकवर लिहिताना शक्यतो मराठीतच लिहायचे असाही संकल्प करायला काय हरकत आहे?

  • वनस्पती आणि आनुवंशिक संकेत २ – झाडाच्या बिया

    झाडांच्या बियांचं दिव्यत्व या लेखात स्पष्ट केलं आहे.

  • सतत बदला, नाही तर नष्ट व्हा !

    आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचा आयटी, बीटी आणि एनटी या विषयावरील हा लेख शेअर करत आहे…