(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

[post_sorting]
  • अमृतवेल – नाबाद १५०!

    मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर बुधवारी रात्री ८.३० वा. प्रसारित होणार्‍या ‘अमृतवेल’ या साहित्यविषयक कार्यक्रमात कथा-कविता विविध साहित्यिकांच्या मुलाखती आणि लेखनविश्वाच्या नव्या-जुन्या प्रवाहांचा वेध घेतला जातो. या या रसिकप्रिय कार्यक्रमाने १५० भागांचा टप्पा नुकताच पार केला. अमृतवेलच्या आगामी कार्यक्रमात ‘काव्यांजली’ हा कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर विशेष कार्यक्रम तीन भागांत लवकरच प्रसारित होणार आहे. २, ९ आणि १६ फेब्रुवारी रोजी या तीन भागांचं प्रसारण होणार आहे. यात ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आणि डॉ. घनश्याम बोरकर हे सहभागी होणार आहेत.

  • हे तर माफियांचे राज्य

    राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था माफियांच्या पायाखाली लोळण घेत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. अतिरिक्त ल्हाधिकारी यशवंत सोनवणेंच्या हत्येची घटना अशीच निर्घृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सत्ताधार्‍यांनी गुन्हेगारांना सल्याचा हा परिणाम आहे. राज्यकर्त्यांनी गुन्हेगारांना मोकाट सोडून भ्रष्टाचाराला चालना देणे न थांबवल्यास राज्यातील कायदेयंत्रणा सातळाला गेल्याशिवाय राहणार नाही.

  • तंत्रज्ञान बदलतेय वेगात

    गेल्या दशकभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून आज नवी वाटणारी गोष्ट उद्या लगेच जुनी होत आहे. यामुळे ग्राहकांसमोर एकाच वेळी अनेक पर्याय खुले होत असून योग्य पर्याय निवडताना ते गोंधळून जात आहेत. सध्या अॅण्ड्राईड या मोबाईल फोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल बरीच चर्चा होत असली तरी त्यापेक्षाही चांगली ऑपरेटिंग सिस्टिम कधीही बाजारात दाखल होऊ शकेल अशी परिस्थिती आहे.

  • शेतीचे दिवस पालटत आहेत….

    ज्याकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी,हे सूत्र इथे मान्यताप्राप्त होते. शेतीला सर्वोच्च दर्जा दिल्यानेच या देशात सोन्याचा धूर निघण्याइतपत समृद्धी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.नंतरच्या काळात मात्र सगळे गणितच उलटेपालटे झाले. समृद्ध शेती भिकेकंगाल झाली, शेतीचा मालक पै पैसाठी मोताद झाला, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की शेवटी शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ आली.

  • हे तर माफियांचे राज्य

    राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था माफियांच्या पायाखाली लोळण घेत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. अतिरिक्त ल्हाधिकारी यशवंत सोनवणेंच्या हत्येची घटना अशीच निर्घृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सत्ताधार्‍यांनी गुन्हेगारांना सल्याचा हा परिणाम आहे. राज्यकर्त्यांनी गुन्हेगारांना मोकाट सोडून भ्रष्टाचाराला चालना देणे न थांबवल्यास राज्यातील कायदेयंत्रणा सातळाला गेल्याशिवाय राहणार नाही.

  • तंत्रज्ञान बदलतेय वेगात

    गेल्या दशकभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून आज नवी वाटणारी गोष्ट उद्या लगेच जुनी होत आहे. यामुळे ग्राहकांसमोर एकाच वेळी अनेक पर्याय खुले होत असून योग्य पर्याय निवडताना ते गोंधळून जात आहेत. सध्या अॅण्ड्राईड या मोबाईल फोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल बरीच चर्चा होत असली तरी त्यापेक्षाही चांगली ऑपरेटिंग सिस्टिम कधीही बाजारात दाखल होऊ शकेल अशी परिस्थिती आहे.

  • दिवस सोनियाचा की `सोनिया’पुत्राचा

    समजा राहूल गांधींनी ही घराणेशाही स्वच्छता मोहिम अगदी मनावर घेतलीच तरीही आमच्या नेत्यांना काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना एक मोलाचा सल्ला जाताजाता देउया. Charity begins at home! या न्यायाने राहूलजींनाही सांगून टाका की बाबा आम्ही आमची घराणेशाही संपवतो पण तुमचे काय? तुम्हीही एकदा सांगून टाका ना की मला स्वत:लाही घराणेशाही नकोय. मला पंतप्रधान वगैरे काही व्हायचे नाही. पक्षात कितीतरी आजोबा आणि काका आहेत.. त्यांच्याही इच्छा पूर्ण होउ द्या. होउन दे त्यांना पण पंतप्रधान!

  • महागाईशी मुकाबला

    महागाई म्हणजेच Inflation आपल्या जीवनाचे आता एक अविभाज्य अंग बनले आहे. थोडक्यात महागाईचे भूत आपल्या मानगुटीवर कायमचे बसले आहे किंवा महागाई आपल्या पांचवीला पुजली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारत एक विकसनशील देश ( Developing Country) बनला. जगामध्ये विकसनशील देशांमधील महागाई वाढीचे दर विकसित देशांमधील ( Developed Countries) महागाई वाढीच्या दरांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात असे आढळून आले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. या काळात भारताने पुष्कळ प्रगती केली. आता तर भारत जागतीक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने घोड दौड करीत आहे. असे असले तरी भारतातील महागाई वाढीचे दर अजूनही विकसनशील राष्ट्रांसारखेच आहेत व अजून कित्येक वर्षे ते तसेच राहतील असा या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा अंदाज आहे. २००४ मध्ये भारतात मंदी असल्यामुळे महागाई वाढीचा दर ४ टक्के एवढा खाली आला होता. तर सन २००८ मध्ये जागतिक मंदी असल्यामुळे भारतामधील महागाई वाढीचा दर, पहिल्यांदाच, शून्य तक्याच्या खाली गेला होता. अर्थात ही परिस्थिती फार दिवस टिकली नाही. हे दोन अपवाद वगळता भारतामध्ये महागाई वाढीचा दर वर्षाला ६% ते १२% मध्ये घोटाळतो आहे. अर्थात हे सरकारी आकडे आहेत. पण प्रत्यक्षातला महागाई वाढीचा दर या पेक्षा कितीतरी जास्त असतो असा सगळ्यांचा अनुभव आहे. विशेषतः जीवनावश्यक वस्तू जसे कि अन्न धान्य, डाळी, खाद्यतेले, किराणा भाजीपाला, स्वयापाकासाठी लागणारे इंधन, पेट्रोल, डीझेल, वैद्यकीय सेवा यांचे महागाई वाढीचे दर सरकारी आकड्यान पेक्षा नेहमीच जास्त असतात असे अनेकांचे म्हणणे आहे.

    महागाई वाढली कि दोन गोष्टी घडतात. एकीकडे वस्तूंचे भाव वाढतात तर दुसरीकडे रुपयाचे अवमूल्यन होते. आज १०० रुपयांना मिळणाऱ्या वस्तूचा भाव उद्या १२० रुपये होतो. ही झाली भाव वाढ. तर उद्याच्या १०० रुपयांमध्ये आजच्या ८० रुपयांच्याच वस्तू येतील. हे झाले रुपयाचे अवमूल्यन. १९७५ साली पेट्रोलचा दर ५५ पैसे लिटर होता. त्यात १००% वाढ होऊन तो १रुपय १० पैसे लिटर झाला ( हल्लीच्या तरुण पिढीला ही गोष्ट एखाद्या परीकथे सारखी वाटेल). २०१० मध्ये पेट्रोलचा भाव लिटरला ५० रुपयांच्या वर गेला आहे. याच दराने २०२० मध्ये पेट्रोलचा भाव लिटरला ५०० रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी एक लाख रुपयाला जी किंमत होती ती आज राहिली नाही. पूर्वी लाखोपती किंवा लक्षाधीश मंडळी श्रीमंत वर्गात मोडली जायची. आज ती मंडळी मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गात मोडली जातात.
    महागाई वाढली कि खर्च वाढतात. पूर्वी महागाईची झळ गरिबांना बसायची. पण आता महागाईची झळ मध्यम वर्गीयांबरोबर श्रीमंतांना पण बसू लागली आहे. बर्याच जणांचे आजचे उत्पन्न पुरेसे असल्यामुळे ते आजच्या महागाईला यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. पण ते उद्याच्या महागाईला तोंड देऊ शकतील का याची त्यांना सुध्धा शंका वाटते. त्यामुळे महागाई शी मुकाबला कसा करायचा हा यक्ष प्रश्न सर्वांपुढेच आहे .

    उत्पन्न वाढवणे आणि खर्च कमी करणे हा महागाई शी मुकाबला करण्याचा सर्वात साधा, सरळ आणि प्रभावी उपाय आहे. पण तोच सर्वात जास्त अवघड व कठीण आहे. कारण ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात उत्पन्न वाढत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. तसेच एकदा सुरु केलेला खर्च एकदम कमी करणे शक्य नसते. विशेषतः घेतलेली कर्जे फेडण्यासाठी, मुलाबाळांचे शिक्षण, कुटुंबाचा चरितार्थ चालवणे, कुटुंबाचे स्टेटस मेंटेन करणे, वैद्यकीय सेवा यांसाठी सुरु केलेला खर्च एका रात्रीत कमी करणे शक्य नसते. एखादी जादूची छडी फिरवावी त्याप्रमाणे सरकार महागाई आटोक्यात आणेल या आशेने अनेक जण सरकारकडे बघत आहेत. पण महागाई कमी करणे ही गोष्ट आता सरकारच्या नियंत्रणामध्ये राहिलेली नाही असे वाटते. त्यामुळे महागाई शी मुकाबला करण्यासाठी संपूर्णपणे सरकारवर अवलंबून न राहता वैयक्तिक पातळीवर सुध्धा प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. आणि हा मुकाबला अल्प काळासाठी नसून दीर्घ काळासाठी आहे याची जाणीव ठेवावी. मग महागाई शी मुकाबला कसा करायचा? या साठी दुसरा उपाय कुठला?

    बचत; बचतीची चाणाक्षपणे केलेली गुंतवणूक ( Smart Investment) आणि त्यावर मिळणारा परतावा ( Returns) या त्रीसुत्रावर महागाई शी मुकाबला करणे शक्य आहे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते? तुमचे काय विचार आहेत? तुमच्या दृष्टीने महागाई शी मुकाबला करण्याचा दुसरा कुठला चांगला उपाय आहे कां?

    तुमचे विचार जरूर कळवावेत ही नम्र विनंती!

    -- उल्हास हरी जोशी

  • मराठी आडनावे कोश : सुरूवात आणि कार्यपध्दती : कोशकार गजानन वामनाचार्य

    मराठी ज्या कुटुंबांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा कोश मी संकलीत करीत आहे. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संकलीत झाली आहेत. या संबंधात, सह्याद्री वाहिनीवर रंग माझा वेगळा या मालिकेत आणि आय् बी एम् लोकमत या वाहिनीवर माझ्या मुलाखतीही प्रसारीत झाल्या आहेत.

  • घरंदाज वैविध्यपूर्ण गायकी

    श्रीमती सुलोचना चव्हाण यांनी आपल्या घरंदाज, वैविध्यपूर्ण गायकीतून मराठी रसिकांवर अनेक दशके पेमाचे अधिराज्य गाजविले आहे. सुलोचनाबाईंना अलिकडेच महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!