वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे थंड हवेच्या ठिकाणी उत्पन्न होणारे फळ.ह्याला मराठी मध्ये नाश्पती असे म्हणतात.हे फळ बऱ्याच जणांना आवडते.
हे हिरवट पिवळ्या रंगाचे पेरूच्या आकाराचे फळ असते.ह्याची चव आंबट गोड असते व त्याला मंद मादक सुवास येतो.
हे फळ थंड गुणाचे असून वात पित्त नाशक असून थोडे कफकर आहे.
चला आता ह्याचे घरगुती उपचार पाहुया:
१)संडासला पिवळसर काळे,भसर,भरपूर वारंवार होत असेल तर अर्ध कच्चा पेअर खावे व इतर आहार घेऊ नये.
२)पोटात जळजळ,भुक मंदावणे,आव पडणे,पोट दुःखी ह्या तक्रारी असल्यास जेवणासह पेअरचे तुकडे खावे.
३)जीभेवर पांढरा थर,दात व हिरड्या शिवशिवणे,हिरड्या मधून रक्त वाहणे ह्यात कडक पेअर चावून खावे.
४)थकवा येणे,तोंड सुकणे,घशाला कोरड पडणे,शरीरातील उष्णता वाढणे ह्यात पेअरचा रस थोडे सैंधव मीठ घालून प्यावा.
अती पेअर खाल्ल्याने सर्दी,खोकला होतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
जपानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंवर पृथ्वीच्या प्रदक्षिणाकाळात घट होऊन दिवसाचा कालावधी कमी झाला आहे….. का?
May 3, 2011
स्वतंत्र भारताच्या इतिहासात आध्यात्मिक क्षेत्रात बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेले आणि प्रभाव गाजविलेले व्यक्तिमत्व सत्यसाईबाबा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण राजू होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, १९४० मध्ये त्यांनी आपण शिर्डीच्या साईबाबांचे अवतार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते भारतातील बहुधा सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु बनले. प्रथम त्यांच्याभोवती हवेतून विभूती अथवा शंकराची पिंड काढून देणारे बाबा म्हणून काहीसे संशयाचे अथवा विस्मयाचे वातावरण होते. परंतु त्यानंतर त्यांनी स्थापन केलेली सेवाकार्ये, शिक्षण, आरोग्य, ग्रामसुधार आदी क्षेत्रांमधील कामांमुळे तसेच मोठमोठय़ा दानांमुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले. आपण शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे अवतार आहोत, असे जाहीर केलेल्या सत्यसाईबाबांचे अनुयायी अक्षरश: जगभर पसरले होते.
भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत होते. सत्यसाईबाबांची बहुतांश सेवाकार्ये आंध्र प्रदेशात आहेत. आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे. त्यांची संपत्ती ४० हजार कोटी ते तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सत्य साईबाबा यांचे निधन २४ एप्रिल २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
November 23, 2018
ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे. तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.
July 20, 2017
आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात,
February 23, 2020
हिमोग्लोबिन कसे वाढवायचे हे येथे सांगितले आहे.
मुख्य आहार हा सर्व ६ चवीनी युक्त हा आनंदीमनाने, अगदी मनापासून प्रार्थना म्हणून जेवणाला सुरवात करा.
आहळीवाची खिरेचा वापर करणे.खजूरातील बि काढून त्यामध्ये घट्ट तुप भरून तो खाणे.बिट,गाजर खाण्यात ठेवणे.लाल रंगाची फळे जसे की कलिंगण,करंवद वगैरेसारखी फळे खाणे.लाल रंगाचे कपडे वापरल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदतच होते.
स्त्रियांच्या बाबतीत शतावरी कल्प/शतावरीधृताचा वापर वैद्दयांच्या सल्ल्यांने करणे.पान (विडा)खाणे.राजगिरा खाणे (लाडू,चिक्की.लाहया) रव्याची लापशी गुळ घालून खाणे. आपली गावातील उकडया तांदळाची पेज मस्तपैकी साजूक तूप घालून खाणे.
हिमोग्लोबिन वाढविणारे बहुतेक पदार्थांमुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून साजुक तूपाचा हात सोडून वापर करणे.
तुम्ही जर ताजा नुकताच काढलेला पालक वापरू शकत असाल तर पालकाचे मीरी,लिंबू वगैरे घालून मस्तपैकी सुप बनवून पिऊ शकता.पण पालक अगदी फ्रेश हवा.तडक्याचा पण वापर करून वरून फोडणी देणे.
पाणी पिताना लोखंडी तडका मस्त गरम करून प्यावयाच्या भांडयात बुडविणे व असे पाणी पिणे.चपात्या/भाक-या नॉनस्टिक तव्यावर न भाजता लोखंडी तव्यावर भाजणे.
आंबट भाज्या सोडून इतर सर्व भाज्या लोखंडी कढईतच करण्याचा अट्टाहास धरणे.
गाजर+बिट ज्युस,काळया मनुका आदल्यारात्री पाण्यात भिजवुन दुस-या दिवशी खाणे आणि हे सर्व आपल्या पचनसंस्थेचा सारासार विचार करुन आणि कसलेच tension करायचे नाही.कारण आवडीने व मनापासून खाल्लेत तरच तुम्हांला चांगला result मिळणार. नाचणी सत्व /नाचणीची आंबिल खाऊ शकता. डाळिंबपण चांगले असते आणि जेवण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यत (7 च्या आत घरात) करा. झोपण्याच्या वेळा पाळा,कपालभांतिसारखे प्राणायाम,योग करा, आणि नेहमी tension free रहा.व तंदूरूस्त रहा.
November 22, 2016
इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे दिसते की व्यसनापाई बरेच राजे आणि त्यांची राज्ये पार धुळीला मिळाली. व्यसनापाई कित्येक कुटुंबे बरबाद झाली.
June 19, 2015
को जागरति?---- a scientific approach about कोजागिरी पौर्णिमा
आपल्याकडे साजरा होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या स्वास्थ्याशी निगडीत असतात. गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने खाणे असो किंवा दिवाळीचे अभ्यंग स्नान असो,प्रत्येकात स्वास्थ्य जपणे उद्देश सापडतोच!
शरद ऋतूत येणारी “शारदीय पौर्णिमा” अथवा “कोजागिरी पौर्णिमा” साजरा करण्यामागे देखील स्वास्थ्याशी निगडीत हेतू सापडतो. कोजागिरी म्हंटले कि डोळ्यसमोर येते ते “मसाला दुध”! चंद्राच्या चांदण्यात वेलची पूड,बदाम वगैरे टाकून थोडेसे आटवलेले दुध गार करायचे आणि रात्री सेवन करायचे!!!
दुध गार करून पिणे एव्हढाच हेतू अपेक्षित नाहीये तर चंद्राच्या प्रकाशात ते गार करणे अपेक्षित आहे.
शरद ऋतू हा पित्ताच्या प्रकोपाचा काळ असतो. पित्ताची उष्णता वाढल्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. स्वस्थ राहण्यासाठी ऋतू प्रमाणे आचरण करणे गरजेचे असते. रात्र आणि दुध दोन्ही गोष्टी स्वभावत: शीत म्हणजेच थंड गुणधर्माचे असतात. पौर्णिमेचा चंद्र आणि त्याचे चांदणे तर शीतलता देण्यास अधिक उपयुक्त असतात. स्वभावत: शीत गुणाचे दुध जर अशा शीतल चंद्रप्रकाशात ठेवले तर या “संस्कारांमुळे” त्याची गुणवृद्धीच होते आणि असे दुध शरीरास शीतलता देऊन पित्ताची उष्णता कमी करण्यास मदत करते.
या रात्रीस पूर्ण चंद्राचे चांदणे अनुभवण्यासाठी जागणे अनिवार्य असते.असे म्हणतात कि देवी रात्री संचार करत विचारत असते “ को जागरति? कोण जागे आहे??” जो जागा असेल त्याला समृद्धी देणार! या अख्यायीकेमागे देखील लोकांनी जागे राहून चंद्र चांदण्यांनी सिद्ध दुध घ्यावे असाच प्रांजळ हेतू सापडतो. देवादिकांच्या आशीर्वादाचे आमिष अथवा कोपाचे भय हे चातुर्मासाप्रमाणे इथेही लागू पडते!
आता हा हेतू च माहिती नसल्यामुळे त्याचे
“ we must meet and celebrate!!!!” होते आणि त्यात भेळ, पावभाजी अथवा इतर yummy पदार्थांसोबत “मसाला दुध” अशी theme असते. याने होते एकच की “वैद्याकडे रुग्ण वाढतात”!
जिथे चंद्राचा थंडावा अपेक्षित आहे तिथे रक्त बिघडवणारे भेळ ,पावभाजी इत्यादी पदार्थ मनसोक्त खायचे आणि मग रिवाज म्हणून त्यावर मसाला दुध प्यायचे हे सगळेच विपरीत आहे!
म्हणूनच खऱ्या अर्थाने “शारदीय कोजागिरी पौर्णिमा” साजरी करायची असेल तर काय केले पाहिजे हे वेगळे सांगायला नको, नाही का???
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
परिवर्तन आयुर्वेद
October 16, 2016
सिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय
October 6, 2019
आचार्यश्री आई जगदंबे ला प्रार्थना करीत आहेत की, कृपापांगालोकं वितर तरसा साधुचरिते- हे साधुचरिते अर्थात अत्यंत सुयोग्य वर्तन करणाऱ्या आई जगदंबे ! तू तुझ्या कृपारूपी दृष्टिपाताला माझ्यावर तरसा अर्थात अत्यंत शीघ्रपणे वितर अर्थात प्रदान कर.
February 14, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti