(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • झोप – एक नैसर्गिक प्रक्रिया

    शालेय जीवनामध्ये मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत असे शिकवले जायचे. आज त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याही पेक्षा अधिक खूप काही मिळवण्यासाठी मनुष्य घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेगवान होत आहे. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचा इतका प्रभाव आजच्या पिढीवर पडला आहे की रात्रिचा दिवस करून धनवान बनण्याची स्वप्न साकारू पाहत आहे. हे सर्व करताना निसर्गाशी ताळमेळ तुटत चालला आहे याची मात्र खंत वाटते.

  • डिजिटल थर्मोमीटर

    घरात कोणाला ताप आला की आपण चटकन थर्मोमीटर तोंडात किंवा काखेत ठेवून ताप मोजतो अतिशय उपयुक्त असे हे साधन आहे. थर्मोमीटर इतिहास तसा फार जुना आहे. १५९३ मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली  याने पहिला थर्मोमीटर  तयार केला होता, त्याला त्यावेळी धर्म थर्मोस्कोप असे नाव  होते. तो फार अचूक नव्हता.  अचूक असा थर्मोमीटर १६४१ मध्ये तयार झाला.

  • प्राण आणि श्वास

    सर्व साधनांचा विचार करता योगाभ्यासामध्ये जीवनात आनंद उपभोग घेण्यात लयबद्ध श्वासोच्छ्वासाला सर्वात जास्त महत्त्व आहे. परंतु श्वासातील विघाडाने सूक्ष्म/स्थूल पातळीवर जीवनमान कमी होण्याची जाणीव होते.

  • महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ९ – फणस

    फणस हा सदाहरित वृक्ष असून मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे समजले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus (Family Moraceae) आहे. यास इंग्लिश मध्ये जॅकफ्रुट म्हणतात

  • या मसाल्यात दडलंय काय? – भाग एक

    मसालेदार पदार्थ हे भारतीय किंबहुना आशियाई लोकांचे वैशिष्ट्य. शतकानुशतके प्रयोग करून आपली खाद्यसंस्कृती तयार झाली. मसाल्यांचे स्थान अढळ राहिले. मसाल्यांशिवाय पदार्थाला चव नाही असे समीकरण झाले आहे. नुसत्या चवीसाठी हा खटाटोप झाला असेल? 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे वाक्य आपले पूर्वज अन्नाविषयी सतत सांगत आलेत. त्याचा अर्थ? आपले शरीर हे एक यज्ञकुंड. त्यात अन्नाची आहुती दिल्याशिवाय ऊर्जा मिळणार नाही. ही ऊर्जा मिळायला व सातत्याने शरीर निरोगी राखायला नुसतीच प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ व कर्बयुक्त पदार्थ मिळून चालत नाही तर त्याचबरोबरच जीवनसत्त्वे, सूक्ष्म खनिजे व क्षारही लागतात. ही सूक्ष्म खनिजद्रव्ये कडधान्ये, भाज्यातून मिळत असली तरी मसाल्याच्या पदार्थातून विपुल प्रमाणात मिळतात. या मसाल्यात असं दडलंय तरी काय हे त्या पदार्थांचे विश्लेषणच सांगेल.

    १) काळीमिरी- सर्वात जास्त पिकणारी व निर्यात होणारी.
    मुख्यतः केरळमध्ये याची लागवड होते. कारण तेथे खूप पाऊस, जास्तच तापमान व सावली मिळते. याची हिरवी फळे उकळत पाण्यात १० मिनिटे ठेवतात. त्यामुळे रंग तपकिरी/काळा होतो. नंतर ४ दिवस उन्हात वाळवून भरडले की काळीमिरे मिळतात. यातील पिपरीन, पिपरिडीन, चाव्हिसीन व अन्य तैलद्रव्यामुळे वास व तिखट चव येते. पाचक, पोटातील वायू कमी होतो, भूक प्रज्वलित होते. यात कॅल्शियम ४६०, फॉस्फरस १९८, लोह १३, मॅग्नेशिअम १७१, तांबे २ व मँगनीज ४ मि. ग्रॅ. प्रतिशत आणि 'अ' जीवनसत्व १०८० मायक्रो, असते. भेसळीसाठी पपयाच्या बिया टाकतात व चकाकीसाठी तेल वापरतात !

    २) लवंगा- सीझिअम ॲरोमॅटिकम/ युजेनिया
    कॅरियोफायलिस या झाडाच्या मुक्या कळ्या म्हणजे लवंगा, तामीळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये मुख्य लागवड, काळीमिऱ्याप्रमाणेच लवंगाही कोकणात पिकवायला लागले. लवंग पाचक, पोटातील वायू कमी करणारी, मळमळ थांबवणारी, याचे तेल वेदनाशामक म्हणून दंतवैद्य दातदुखीवर वापरतात. युजेनॉल हे वेदनाशामक द्रव्य असते. तेल त्वचेवर चोळल्यास त्वचा गरम व लाल होते. लवंग व मधाचे चाटण घशाची खवखव कमी करते. लवंगात कॅल्शियम ७४०, फॉस्फरस १००, मॅग्नेशियम १३०, मँगनीज ५, जस्त २ प्रतिशत व 'अ' जीवनसत्त्व २५० मायक्रो असते.

  • हर्बल टूथपेस्ट आणि वनौषधी

    पूर्वी दंतमंजन म्हणून पावडर स्वरूपात वनौषधींचा वापर होत असे. आता नीम, मिसवाक, लवंग, बाभूळ, पुदिना, पिंपळी यांसारख्या वनौषधींचा समावेश असलेल्या अनेक हर्बल टूथपेस्ट बाजारात उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त कापूर, तोमर बीज या पदार्थांचा समावेशही काही टूथपेस्टमध्ये केलेला असतो. या वनौषधींमध्ये कोणती रसायने असतात, जी दातांचे संरक्षण करतात?

    दातदुखीसाठी लवंग तेलाचा वापर आजही केला जातो. लवंगेमध्ये ॲसिटाइल युजेनॉल, मिथाइल सॅलिसिलेट, गॅलेटोनिक ॲसिड ही रसायने असतात. मिथाइल सॅलिसिलेट संवेदनाहारक म्हणून कार्य करते. पुदिन्याचा उपयोग श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास होतो. पुदिन्याच्या अनेक जाती आढळतात, त्यातील पेपरमिंटच्या तेलाचा उपयोग स्वादाकरिता अधिक केला जातो. जपानी मिंटच्या तेलाचाही वापर केला जातो. या तेलात मेंथॉल, मिथाइल अॅसिटेट, मेंथोन आणि हायड्रोकार्बन असतात. तोमर बीज सूक्ष्म जीवाणूरोधक म्हणून टूथपेस्टमध्ये तोमर बीजामध्ये वापरतात. फ्युरोक्विनोलाइंस, निटिडीन, कार्बेझोल्स असे अनेक प्रकारचे अल्कलॉइड्स असतात.

    बाभूळ झाडाच्या सालीचा वापर टूथपेस्टमध्ये करतात. बाभूळ झाडाच्या सालीत टॅनिन आणि गॅलिक अॅसिड असते, त्यामुळे साल तुरट-कडवट लागते. बाभूळ दात आणि हिरड्या मजबूत करते.

    मिसवाक, मराठीत पिलू आणि ज्याला टूथब्रश ट्री असे म्हणतात, मिसवाकच्या काड्या कडुलिंबाच्या काड्यांसारख्या टूथब्रश म्हणून वापरत असत. मिसवाकमध्ये जीवाणूरोधक गुणधर्म आहे. मिसवाकमुळे दातांवरील किटण (प्लाक) कमी होते, हिरड्या आकसून येतात. मिसवाकमध्ये कार्बोहायड्रेट, ट्रायमिथाइल अमाइन, क्लोराइड्स, व्हिटॅमिन सी, ग्लाकोसाइड्स, फ्लोराइड, सिलिका आणि काही प्रमाणात टॅनिन फ्लेवॉनॉइड्स, स्टेरॉल्स ही रसायने असतात. सिलिका अपघर्षकाचे कार्य करते.
    कापूर हा किटोन या कार्बनी संयुगाच्या वर्गातील रासायनिक पदार्थ आहे. पिपळी आणि कापूर जंतुनाशक आहे तसेच श्वासाची दुर्गंधी आणि दातदुखी दूर करण्यासाठी कापराचा उपयोग होतो. पिपळीमध्ये पिपरीन हे अल्कलॉइड असते. कोरांटीमध्ये (वज्रदंती) अल्कलॉइड आणि पोटॅशियम असते. कोरांटीमुळे हिरड्यांमधून रक्त येणे थांबते. या वनौषधींव्यतिरिक्त दालचिनी, जांभूळ साल, ज्येष्ठमध, आवळा यांचाही समावेश हर्बल टूथपेस्टमध्ये केला जातो.

  • क्ष किरण – एक्स-रे

    क्ष किरण म्हणजे एक्स-रे यंत्राच्या शोधाने वैद्यकीय जगतात फार मोठी क्रांती घडून आली यात शंका नाही. जर्मनीचा वैज्ञानिक विल्हेम राँटजेन याने क्ष-किरणांचा शोध लावला. १८९५ मध्ये त्याला अपघातानेच क्ष-किरणांचा शोध लागला.

  • झोप का हवी

    झोप हा फार गहन विषय आहे. झोपेसंबंधीच्या फक्त येथे आवश्यक असलेल्या संकल्पनांचा उल्लेख केला आहे.

  • मलेरिया – तापाचे अभयत्व विज्ञान ( Immunity )

    काही व्यक्तींना निसर्गतःच मलेरिया विरुद्ध अभयत्व प्राप्त होते कारण त्यांच्या शरीरातील तांबड्या रक्तपेशींना मलेरियाचे परोपजीवी भेदू शकत नाहीत . एका दृष्टीने हे त्या व्यक्तींना मलेरिया रोगमुक्तीचे मिळालेले वरदानच आहे . परंतु अशा व्यक्तींची संख्या फारच अल्प असते . हे अभयत्व प्रामुख्याने खालील दोन गोष्टींमुळे आढळून येते .

    १ ) Duffy Antigen Negativity
    २ ) Sickle Cell Trait

    १ ) Duffy Antigen :
    मनुष्याच्या रक्तातील तांबड्या रक्तपेशींमध्ये ABO रक्तगट प्रणाली असते . तसेच Duffy Antigen ही दुसरी एक प्रणाली सुद्धा असते . नेहमी करण्यात येणाऱ्या रक्तगटाच्या तपासणीत या दुसऱ्या प्रणालीला विचारात घेतले जात नाही . कारण त्याचा दर्जा हा दुय्यम स्वरूपाचा असतो . परंतु Duffy Antigen Receptor for Chemokines ( DARC ) ही तांबड्या रक्तपेशींवरील प्रथिने रक्तपेशींच्या आत शिरण्याकरिता परोपजीवींसाठी दिशा दाखविणारी असतात . त्या प्रथिनाच्या मार्गदर्शनामुळे मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशींमध्ये सहजपणे आत शिरतात .

    साधारणपणे जगातील बहुसंख्य लोकांच्या तांबड्या रक्तपेशीत हे प्रथिन असते . त्या लोकांना Duffy Positive असे म्हणतात , आणि ह्या कारणामुळेच मलेरियाचे परोपजीवी जास्तीत जास्त लोकांमध्ये सहजतेने प्रवेश करतात .

    परंतु मानवी जनुकात जर जन्मत : काही बदल झाले तर अशा व्यक्तींमध्ये Duffy Antigen ( प्रतिजन ) तयार होत नाही . अशा अल्पसंख्य व्यक्तींना Duffy Negative असे संबोधिले जाते अनुभवावरून असे लक्षात आले आहे की याठिकाणी मार्गदर्शक प्रथिनाचा अभाव असल्यामुळे जी व्यक्ती Duffy Negative असते तिच्या रक्तपेशीत Plasmodium Vivax हे मलेरियाचे परोपजीवी शिरूच शकत नाहीत . त्यामुळे अशा लोकांना P. Vivax Resistant म्हणतात.

    काही अफ्रिकेतील जमातींमध्ये Duffy Negative लोकांचे प्रमाण जास्त आहे . त्यांच्यात P. Vivax होत नाही . या शोधामुळे P. Vivax कोणत्या पद्धतीने तांबड्या रक्तपेशींत पसरला जातो यावर प्रकाश पडला आहे . P. Vivax वरील प्रथिने व Duffy Antigen प्रथिन यांचे संगनमत कोणत्या पद्धतीने होते याच्या अभ्यासातून लस बनविण्याची दिशा मिळू शकेल .

    २ ) Sickle Cell Haemoglobin Trait : ( Hb As )
    काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मत : जनुकांच्या एका जोडीमध्ये जर दोष असेल तर Sickle Cell Anaemia हा तांबड्या रक्तपेशींमधील रचनात्मक दोष निर्माण होतो . यामध्ये तांबड्या रक्तपेशी विळ्याच्या आकारासारख्या दिसतात . त्यामध्ये Haemoglobin चे प्रमाण कमी असते परंतु जर जनुकाच्या त्या जोडीमधील फक्त एकामध्येच जन्मत : दोष असेल तर तांबड्या रक्तपेशीत रचनात्मक दोष अंशत : च येतो . अशा व्यक्तींना Sickle Cell Trait Carrier म्हणतात . जेव्हा एखाद्या जोडप्यामध्ये पुरुष व स्त्री दोघेही Carrier असतील तर तेथे मात्र त्यांच्या मुलांमध्ये Sickle Cell Anaemia हा दोष आढळतो . असे पाहण्यात आले आहे की Sickle Cell Trait ( carrier ) असलेल्या व्यक्तींमध्ये Plasmodium Falciparum चे परोपजीवी तग धरु शकत नाहीत . त्यामुळे त्या लोकांना Falciparum पासून मलेरिया होत नाही .

    परंतु ज्या लोकांमध्ये Sickle Cell Anaemia असतो त्यांना Falciparum पासून कोणतेही संरक्षण मिळत नाही . Sickle Cell Anaemia व Sickle Cell trait या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्ती अफ्रिकेमध्ये जास्त प्रमाणात आढळतात . महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली भागातील आदिवासींमध्ये Sickle Cell Anaemia व Trait चे लोक आढळून आले आहेत .

    एकदा मलेरिया झाल्यानंतर त्याच्याविरूद्ध शरीरात तयार होणारी प्रतिबंधकारक शक्ती कायम स्वरूपाची राहत नाही . ( Permanent Immunity ) त्यामुळे एकदा मलेरिया होऊन पूर्णपणे रुग्ण बरा झाला म्हणजे त्याला आता पुन्हा परत कधी मलेरिया होणारच नाही अशी खात्री नसते याउलट बऱ्याच संसर्गजन्य रोगांबाबत असे आढळते की एकदा होऊन गेलेला आजार परत उद्भवतच नाही . अर्थात याला क्वचित अपवादही असू शकतात .

    मलेरियाच्या परोपजीवांच्या अनेक अवस्था ( Stages ) असल्याने व त्या प्रत्येक स्थितीमधील प्रतिजने ( Antigen ) वेगवेगळी असल्याने अनेक प्रकारची प्रतिजने रक्तात फिरत असतात . तसेच P. Vivax आणि P. Falciparum या दोनही प्रकारच्या परोपजीवांमधील प्रतिजन क्षमता वेगवेगळी असते . याखेरीज निरनिराळ्या भौगोलिक विभागात असणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांतील प्रतिजनांत असणारा फरक अशा दुहेरी कारणांमुळे त्यांच्या विरुद्ध तयार होणारी प्रतिपिंडे ( Antibodies ) रोगप्रतिबंधाला कार्यक्षम ठरत नाहीत . वारंवार वापरल्या गेलेल्या मलेरिया विरुद्धच्या औषधामुळे परोपजीवांच्या जनुकात आता बदल होत आहेत . ( Genetic Mutation ) त्यामुळे प्रतिबंधक शक्ती निर्माण होण्यावर मर्यादा पडत आहे व त्याचबरोबर हे परोपजीवी नेहमी वापरात असलेल्या औषधांना दाद देत नाहीत . ( Drug Resistant Strains ) या परोपजीवांच्या वाढीचे प्रमाण जबरदस्त असल्याने एका रुग्णातून दुसऱ्या निरोगी व्यक्तीत ते सहजरित्या पसरतात .

    कही वेळा मात्र एखाद्या रुग्णास वारंवर एकाच तऱ्हेच्या परोपजीवांमुळे मलेरिया झाला तर काही महिन्यांनंतर त्यांच्यात प्रतिबंधकारक शक्तीची पातळी चांगली वाढते . परिणामी त्यांच्या रक्तात पुन्हा परोपजीवी आढळले तरी त्यांच्यात तापाचे प्रमाण फारच कमी असते . व या तापाबरोबर येणारी दुसरी काहीही लक्षणे दिसत नाहीत . थोडक्यात त्यांच्या शरीरात त्याच पध्दतीच्या ( Type ) परोपजीवांविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढते . उदाहरणार्थ - वारंवार P.Vivax होण्याने त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते परंतु तरीही P. Falciparum विरुद्ध ही क्षमता उपयोगास येत नाही . थोडक्यात अभयत्व एकाच गटाविरुद्ध मिळते .

    माणसात होणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांना फक्त मानवाचाच घरोबा आवडतो . ते दुसऱ्या कोणत्याही प्राण्यात तग धरूच शकत नाहीत . त्यामुळे माणसातून माणसाकडे असा त्या परोपजीवांचा प्रवास विनासायास अखंडपणे चालू राहतो व त्यातही लहान मुलांच्या शरीरात मोठ्यांपेक्षा हे परोपजीवी अधिक काळ ठाण मांडून बसत असल्याने मुलांमध्ये मलेरियाचा रोग जास्त रेंगाळतो .

    जगप्रसिद्ध शिकारी जिम कार्बेट याचे भारतात जवळजवळ ६० वर्षे वास्तव्य होते . उत्तर भारतातील बऱ्याच जंगलात पायी फिरत त्याने जंगलांचा सखोल अभ्यास व अनेक प्राणी पक्षांच्या शिकारीही केल्या होत्या . या काळात निरनिराळ्या प्रकारच्या मलेरियाच्या संसर्गामुळे त्याच्या हाताची स्थिरता कमी झाली होती . त्यामुळे शिकार करताना बंदूक नीटपणे सावजावर रोखण्यात त्याला अडचण येत असे . परंतु हळूहळू त्यावर जिम कार्बेटने मात केली होती . डासांचा प्रताप अशा या जगन्मान्य मोठ्या नावाजलेल्या शिकाऱ्यासही भोगावा लागला होता . तो लिहितो , " बऱ्याच जंगलातल्या निरनिराळ्या प्रकारच्या मलेरियाच्या संसर्गामुळे माझ्या हाताची स्थिरता गेली होती . त्यामुळे शिकार करताना बंदूक नीट रोखण्यात काही वेळा अडचण येत असे पण हळूहळू मी त्यावर मात केली होती " . - जिम कार्बेट - जंगल लोअर काळ १९४०

    केस नंबर ५

    श्री . श्रीपाद कुळकर्णी वय वर्षे ८२ , उत्तम तब्येत , मोठा असा कोणताही आजार गेल्या चाळीस वर्षांत त्यांना झालेला नव्हता . गेले काही दिवस म्हणजे जवळजवळ १५ दिवस अजिबात भूक लागत नव्हती . थकवा बराच आला होता , परंतु अंगात ताप नव्हता . थोडीसुद्धा कणकण जाणवत नव्हती . सहज म्हणून केल्या गेलेल्या रक्ताच्या तपासणीत हिमोग्लोबिन फक्त 4.5gm % व P.Vivax चे परोपजीवी सापडले . कोणतीही मलेरियाची लक्षणे नव्हती . असे असूनही मलेरिया विरुद्धच्या औषधांचा पूर्ण कोर्स व त्यासोबत ताकद येण्यासाठी दिली जाणारी इन्जेक्शने दिल्यावर १५ दिवसात तब्येत पूर्ववत झाली . श्रीपादरावांच्या शरीराचे अभयत्व चांगले असावे ज्यामुळे मलेरियाची लक्षणे दिसली नाहीत , परंतु त्यांच्या बाबतीत अॅनेमिया मुळे रोगाचे निदान झाले.

    --डॉ. अविनाश वैद्य

  • मसाले: एक विश्लेषण

    मसाल्यांच्या पदार्थांच्या घटकांचे विश्लेषण बघितले तर पुढील गोष्टी लक्षात येतात. मसाल्याच्या सर्व पदार्थात कॅल्शिअम व फॉस्फरस भरपूर आहेत. हाडांच्या व दातांच्या बळकटीसाठी, स्नायू आकुंचन पावण्यासाठी व मज्जातंतूंच्या कार्यासाठी व रक्त साकळण्यासाठी कॅल्शियम उपयोगी. कॅल्शियम मोठ्या
    आतड्याच्या कर्करोगाला प्रतिबंधक. लोह सर्व मसाल्यात विशेषतः हळद, आमचूर, हिंग, जायपत्री व जिरे यात जास्त असते. तांबड्या पेशीतील हिमोग्लोबिनसाठी आवश्यक. पंडुरोग होत नाही. तोंडाच्या, अन्ननलिकेच्या व जठराच्या कर्करोगाला प्रतिबंधक, त्वचेच्या, आतड्याच्या काही पेशींच्या कर्करोगास प्रतिबंधक. मसाल्यात 'अ' जीवनसत्त्व भरपूर असते. शरीराच्या प्रतिकारशक्तीला आवश्यक, अॅण्टिऑक्सिडंट.

    कोलीन- हे एकच अमायनो आम्ल मेंदूच्या पेशींमध्ये शिरू शकते. याचा संबंध स्मरणशक्तीशी असतो. अल्झहायमर्स (विस्मृती) या रोगावर प्रतिबंधक म्हणून कोलीनवर प्रयोग चालू आहेत. वेलची, धणे, कोथिंबीर, जिरे, मेथीच्या बिया व मोहरी या पदार्थात कोलीनचे जास्त प्रमाण, जस्त हे अन्ननलिकेच्या कर्करोगाला प्रतिबंधक तर तांबे स्तनाच्या, फुफ्फुसाच्या व थायरॉईडच्या कर्करोगाला प्रतिबंधक, मँगनीज व मॅग्नेशियम ही खनिजे विकरांच्या (एन्झाईम) निर्मितीसाठी व पचनासाठी आवश्यक आहेत व ती मसाल्यात भरपूर आहेत. अन्नाचे पचन नीट झाले की त्यातील अनावश्यक चोथा आतड्यातून पुढे ढकलला जातो व बद्धकोष्ठता टळते. हा चोथा मोठ्या आतड्यात जास्त वेळ न राहिल्यामुळे कर्करोगाचे भय कमी होते. भाज्या, कडधान्ये इत्यादींपेक्षा मसाल्याचे पदार्थ रोजच्या स्वयंपाकात कमी प्रमाणात असले तरी त्यातील खनिजे व सूक्ष्म क्षार यांचे प्रमाण भाज्या वगैरेपेक्षा खूपच जास्त असते; त्यामुळे या खनिजांची रोजची गरज मसाल्यातून भागू शकते. ही द्रव्ये नैसर्गिक असल्यामुळे योग्य प्रमाणात शरीरात शोषली जातात.

    या सर्व माहितीवरून अशा या 'बहुरुपी बहुगुणी मसाल्यात दडलंय काय' या प्रश्नाचे उत्तर मिळते. मसाले योग्य प्रमाणात नियमित खाणे प्रकृतीला हितकारक व आवश्यक असते.

    आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक व सखोल प्रयोगांती मसाल्याचे निरनिराळे घटक रोजच्या आहारात अंतर्भूत केले आहेत. हा ज्ञानाचा अनमोल ठेवा आपणही पुढच्या पिढ्यांनी जतन केला पाहिजे. मसाले टिकवण्यासाठी किरणोत्सारी प्रक्रिया करतात. ६ ते १४ डॅ८ ची मात्रा देतात. त्यामुळे पोरकिडे व बुरशीपासून संरक्षण मिळते.