(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • ताम्र शेंगी

    हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.

    2005मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी बघितले. 85--150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.

    माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140--240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90--140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.

    आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे ) याचे बीपी 100--200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85--140 होते

    वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.

    ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे---एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8--10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4ते 6 डोस घ्यावेत

    ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे--पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत.नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.

    अरविंद जोशी B.Sc.
    गौरव अपार्टमेंट,विश्वमेडीसिन मागे, सनसिटी रस्ता, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे

    फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा
    https://drive.google.com/file/d/0B_d0-zthRBc1ZEJQVXhMeXhtZVU/view?usp=drivesdk

  • पुनर्नवा

    पुनर्नवाचे रोप पावसाळयात सर्वत्र रान कसे उगवते.घरगुती उपचारात पुर्वीच्या काळी ह्याचा बराच वापर केला जायचा.हि वनस्पती आजी बाईच्या बटव्यातील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

    ह्याचे बहुवर्षायू प्रसरणशील क्षुप असते किंवा वेल असते.पाने २.५-४ सेंमी लांब व गोल किंवा अंडाकार असतात ती मांसल व मृदू व रोम युक्त असतात.मागच्या बाजूस हे पान पांढरे असते.फुले लहान पांढरी किंवा गुलाबी असतात.मुळ मोठे बळकट,पांढरे व वाळल्यावर त्याला पीळ पडतो.

    ह्याचे उपयुक्तांग बी,पाने व पंचांग अाहे.
    आता आपण हिचे गुणधर्म पाहूयात:
    पांढरी पुनर्नवा चवीला तिखट,गोड,कडू,तुरट असते.हि उष्ण असून हल्की व रूक्ष असते.
    तांबडी पुनर्नवा चवीला कडू व थंड गुणाची व हल्की असते.

    पांढरी पुनर्नवा त्रिदोषशामक असून लाल पुनर्नवा वात वाढविणारी व पित्तशामक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)जखमेवर पुनर्नवाचा लेप लावतात.

    २)सुज आली असता पुनर्नवाच्या पानाने शेकतात.

    ३)हि लघ्वी साफ व्हायला मदत करते त्यामुळे शरीरातील क्लेद बाहेर टाकला जातो.

    ४)पुनर्नवा शरीरातील सर्व धातूंचे पोषण करून रसायन कार्य करते.

    ५)शरीरात रक्त कमी असल्यास पुनर्नवा यकृताचे कार्य सुधारून रक्त वाढिला सहाय्य करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • मलेरियाचा इतिहास – भाग २

    इ. स. पूर्व चौथ्या शतकापर्यंत रोमन साम्राज्यातही मलेरियाने घट्ट पाय रोवले होते. साथीच्या या तापाचा त्याकाळी रोमन फीवर या नावाने उल्लेख होत असे. राणी क्किओपात्राच्या महालात मच्छरदाण्यांचा वापर नेहमी केला जात असे असा उल्लेख आहे. काही इतिहास संशोधकांच्या मते रोमन साम्राज्याचा ऱ्हासाला मलेरिया रोग देखील कारणीभूत होता.

    इटली हा दलदलीचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असल्याने तेथे मलेरियाचे माहेरघर होते. इटलीमध्ये मलेरियावरील संशोधन जगात प्रथम सुरू झाले. त्यावेळी घडलेल्या वितंडवादाचा परामर्श पुढील प्रकरणात घेतला आहे.

    चीनमध्ये ५००० वर्षांपूर्वी मलेरिया संबंधात इतके ज्ञान होते की त्या देशातील धाडसी प्रवासी जगातील विविध देशांच्या सफरीवर निघत त्यावेळी आपल्या बायकांचा निरोप घेताना ते त्यांना पुनर्विवाहाची मानसिक तयारी करण्यास सांगून ठेवीत, कारण प्रवासात बरेच वेळा हा रोग मृत्यूला कारणीभूत ठरत असे.

    सुमेरिया व इजिप्त मध्ये ३५०० वर्षांपूर्वी ताप व सोबत वाढलेली प्लीहा (Enlarged Spleen)अशा प्रकारचे अनेक रोगी असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आलेले आहेत. इजिप्शियन ममींच्या उत्खदनात त्यांच्या शरीरात वाढलेल्या प्लीहा आढळलेल्या आहेत. युरोपियन व आफ्रिकन लोकांची रोगप्रतिबंधकारक शक्ती बहुतांशी एक सारखी होती परंतु Falciparum मलेरिया विरुद्ध युरोपियनांत मुळीच प्रतिक्षमता नव्हती. १७९० मध्ये हायटी बेटावरील गुलामांचे बंड मोडून काढण्यासाठी फ्रान्सने सैन्य पाठविले, त्यात मलेरियामुळे या सैन्याची वाताहात झाली होती. वेस्टइंडीज वरील ऍडमिरल व्हर्नानच्यानेतृत्वाखालील ब्रिटिश आरमारी मोहिमेचा मलेरियाने फज्जा उडवला. एकोणतीस हजार नौसैनिकातील अर्ध्याहून अधिक सैन्याला मलेरियाच्या डासांनी यमसदनास पाठविले.

    - डॉ. अविनाश वैद्य

  • वासा/अडुळसा

    १-३ मीटर उंचीचे अडुळशाचे झुपकेदार क्षुप असते.ह्याची पाने ८-१० सेंमी लांब व काळपट हिरवी,गुळगुळीत व भालाकार असतात.फुले २-५-८ सेंमी लांब मंजिरी स्वरूपात असतात.पाकळ्यांची रचना हि सिंहाच्या जबड्या प्रमाणे असते.फळ २ सेंमी लांब लवयुक्त व शेंगेच्या स्वरूपात असते.

    अडुळशाचे उपयुक्तांग आहे मुळ,पाने,फुले.अडुळसा चवीला कडू,तुरट असून थंड गुंणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कफपित्तनाशक व वातकर आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात.:

    १)त्वचारोगमध्ये अडुळसाच्या पानांचा कल्क हळद मिसळून लेप करतात.

    २)कफज खोकल्यात सैंधव व मधा सह अडुळशाचा रस देतात.

    ३)ताकामध्ये घसा सुकून तहान लागत असल्यास अडुळशाचा काढा मध साखरे सह देतात.

    ४)रक्तपित्तामध्ये अडुळसा रस मध साखरे सह देतात.

    ५)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांना अडुळशाची मुळी उगाळून तांदुळ धुवणातून देतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • उन्हाळी’ सर्दी

    उन्हाळी असो वा हिवाळी; सर्दी ही सर्दी असते. असा विचार स्वाभाविकपणे आपल्यापैकी काहींच्या मनात येईल. आयुर्वेदानुसार मात्र तसे नसते. विविध ऋतूंत होणारी सर्दीदेखील विविध कारणांमुळे होत असते आणि या कारणांनुसारच तिचे उपचारदेखील बदलत असतात.

  • दिल खोल के छिंको यारो

    आयुर्वेदाने शिंक हा ‘अधारणीय वेग’ म्हणजे अडवून ठेवू नये अशी शारीर प्रक्रिया आहे असे सांगितले आहे. त्यामुळे शिंक आल्यावर आल्यावर ती दाबून ठेवू नये. मोकळेेपणाने शिंकावे. त्याचप्रमाणे मुद्दाम शिंका काढूदेखील नयेत. याकरताच वरील उपाय सांगितले आहेत. मुद्दाम शिंका काढल्याने वात वाढतो. तपकीर ओढण्याची सवय असणाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे!

  • निंब

    कडूनिंबाचा उपयोग आपण बऱ्याच प्रसंगी करतो.आपले हिंदू नव वर्ष अर्थात गुढी पाडवा ह्या दिवसाची सुरूवात नाही का आपण कडूनिंबाचा रस पिऊन करत.आपल्या शास्त्रात किती महत्त्व आहे पाहीलेत ना कडूनिंबाला.

    ह्याचे १४-१६ मीटर उंच वृक्ष असतो.खोड टणक,सरळ वाढणारे असते पाने विषमपक्ष असून २०-३५ सेंमू लांब असतात पत्रकाच्या कडा दंतूर असतात.फुले मंजीरी स्वरूपात असतात पांढरी.फळ लांबट गोल १.२५-२ सेंमी लांब,पिकल्यावर पिवळे व कच्चे असताना हिरवे कडवट व उग्रगंधी असते.ह्यात १ बी असते.

    ह्याचे उपयुक्तांग आहे फुले,पाने,त्वचा,बीज व तैल.हा चवीला कडू,तिखट,तुरट असून थंड गुणाचा असतो तसेच हा हल्का व रूंक्ष आहे.कडूनिंब कफपित्तनाशक व वातकर आहे.

    चला आता आपण ह्याचे काही उपयोग जाणून घेऊयात:

    १)जखम धुवायला निंब सालीचा काढा उपयोगी आहे.

    २)कडूनिंबचा पाला घरात जाळल्यास घरातील किटक जंतू ह्याचा नाश होतो.

    ३)पोटात कृमी झाल्या असल्यास निंबसालीचा रस मधासोबत देतात.

    ४)ताप येऊन त्यामुळे हातापायांची जळजळ होत असल्यास निंबाचा कल्क त्या जागी लेप करतात.

    ५)खरजेवर निंबाच्या बिया तीळ तेलात वाटून तिथे लेप लावतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • पथ्य

    आपले वैद्य जे पथ्य सांगतात त्यांमागे काही कारणं असतात हे नेहमी लक्षात ठेवा. पथ्य पाळणाऱ्या मनुष्याला औषधांची गरजदेखील पडत नाही असं सांगणारं एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद.

  • मलेरियाचा इतिहास – भाग ३

    शेती करण्याकरिता छोट्या झोपड्या भोवती पाणी साठविण्यासाठी पाणथळी, एकत्रित राहणाऱ्या मानवाच्या वसाहती अशा पद्धतीने जगण्याची संकल्पना सुरू झाली व ५००० ते ६००० वर्षांपूर्वी पर्यंत ती चांगलीच रुजली. परंतु त्याचबरोबर आपले पाय रोवण्यास डासांना उत्तम संधी मिळाली . माणसाचे रक्त हेच डासांचे खाद्य असल्याने सहजपणे उपलब्ध झालेल्या या रक्तपुरवठ्यामुळे हळूहळू धष्टपुष्ट डासांची पैदास वाढू लागली.

  • अशोक

    हा आंब्याच्या वृक्षा सारखा दिसणारा वृक्ष आहे.हा ८-१० मी उंच असून अशोक वृक्ष कायम हिरवागार असतो.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पानासारखीच दिसतात.ह्याची फुले दाट व गुच्छात येतात ती सुगंधी,आकर्षक व पिवळट तांबड्या रंगाची असतात.ह्याचे फळ ८-२६ सेंमी रूंद व ते चपट्या शेंगाच्या स्वरूपात असतात व ह्यात ४-८ चपट्या बिया असतात.

    अशोकाचे उपयुक्तांग आहे त्वचा,बी,व फुल.अशोक चवीला तुरट,कडू असून तो थंड गुणाचा आहे.हा हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्त शामक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)अशोक उत्तम वेदनाशामक असल्याने वेदना असणाऱ्या भागांवर ह्याचा लेप करतात.

    २)मुळव्याधी मध्ये रक्तस्त्राव होत असल्यास अशोक सालीचे चुर्ण उपयोगी आहे.

    ३)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांनी अशोक सालीचे चुर्ण तांदुळाच्या धुवणात देतात.

    ४)गरोदर स्त्रिने अशोक घृत सगर्भावस्थे मध्ये नियमीत घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका टळतो.

    ५)अशोकाचे बी मुत्रल असल्याने मुत्रविकारात उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४