(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं-एक तारतम्य..

    मी सोशल मिडीयावर लिहितो. खूप लिहितो. बऱ्याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही

      May 20, 2017


  • “ब्रह्मचारिणी”मा दुर्गेचे दुसरे रूप!

    “ब्रह्मचारिणी”मा दुर्गेचे दुसरे रूप!

    “दधाना करपदमाभ्यामक्षमाला कमण्डलु |
    देवी प्रसिदततू मयि ब्रम्हचारिण्यनुत्तमा || ”

    “ब्रह्मचारिणी”मा दुर्गेचे दुसरे रूप!अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. मा दुर्गाच्या नवशक्तीच्या स्वरुपांपैकी दुसरे स्वरूप म्हणजे ‘ब्रह्मचारिणी’ होय. ब्रम्हचर्य म्हणजे तपस्या, आणि आचरण म्हणजे पालन करणे होय. म्हणजेच ब्रह्मचर्याचे आचरण करणारी देवता. “वेदस्तत्वं तपो ब्रम्ह” म्हणजे वेद, तत्व आणि ताप हे ब्रम्ह शब्दाचे अर्थ आहेत.

    ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मयी व अत्यंत भव्य असून, देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि हातामध्ये कमंडलू आहे. मुखंमंडल तेजोमय असून, हस्तबंध आणि बाजुबंध कमळपुष्पांनी सुशोभीत आहेत. आपल्या पूर्व जन्मामध्ये ज्यावेळी ही देवी हिमालयाचे घरी पुत्री रूपामध्ये जन्मास आली त्यावेळी महर्षी नारदाच्या उपदेशान्वये तिने भगवान भोलेनाथांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली. हजारो वर्षाचे तपोबल पाहून ब्रम्हदेवाने, “चंद्रमौळी कैलाशराणा शीव पती म्हणून प्राप्त होईल असे वरदान दिले.”

    याच कठोर आणि दुष्कर तपामुळे तिला “ब्रह्मचारिणी” नाव पाडले. या देवीला अर्पणा, उमा, तपसारिणी किवा ब्रह्मचारिणी या नावांनी ओळखले जाते.

    या दिवशी आराधना करतांना योगी “स्वाधिष्ठान चक्रावर” ध्यान केंद्रित करून उपासना करतात.

    ब्रह्मचारिणी स्तोत्रपाठ

    “ तपश्चारिणी त्वंहि तापत्रय निवारणीम्।
    ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्॥
    शंकरप्रिया त्वंहि भुक्ति-मुक्ति दायिनी।
    शान्तिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम् ||”
    -- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

      October 17, 2012


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 6

    आवाहनानंतर आसन हा उपचार येतो. पाहुणे घरात आले की त्यांना जसे बसायला खुर्ची अथवा आसन देतो, तसे देवताना बसायला आसन कल्पिलेले आहे. घरात आलेला पाहुणा हा देवाप्रमाणे आहे, त्याची उठाबस देवाप्रमाणे व्हायला हवी.

    आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून, दारात उभ्या असलेल्या पांडुरंगाला, उभे राहाण्यासाठी वीट हे आसन म्हणून देणाऱ्या भक्त पुंडलिकाचे आम्ही वंशज आहोत. आणि आमचा पांडुरंग देखील हेच आसन घेऊन भक्तासाठी अठ्ठावीस युगे, त्या निस्सीम भक्ताची आठवण म्हणून, अजूनही तस्साच वीटेवरी उभा आहे.!

    प्रवासाने दमल्यावर, रसक्षय झाल्यावर, घटकाभर का होईना तेवढीच विश्रांती घ्यावी, म्हणजे पुनः ताजेतवाने होऊन काम करता येते, हे सांगणारे हे आसन !
    हे "आसन" विसरून कसे चालेल ?

    आतिथ्य स्विकारल्यानंतर त्या पाहुण्यांना
    खुशाली विचारावी, आरोग्य कसे आहे, काही पथ्यपाणी आहे का याची विचारपूस करावी. त्याच्या आरोग्याची काळजी देखील आपणच वहायला हवी.
    यालाच अतिथी देवो भव संस्कृती म्हणतात.

    नंतर हात पाय धुवायला पाणी द्यावे आणि सांगावे, "हात पाय धुवून घ्या !" सांगितल्याशिवाय समजणारच नाही. म्हणून हा उपचार. हल्ली सांगून देखील कोणी ऐकत नाही, हा भाग वेगळा !

    बाहेरून जेव्हा घरात येतो, तेव्हा अनेक प्रकारचे जीवजंतु आपण आपल्या सोबत, आपल्याच अंगाखांद्यावरून, आपल्याच घरात, आणत असतो. हे जीवजंतु घराबाहेरच रहावेत, यासाठी खरंतर आंघोळ करूनच घरात यायला हवे, गुडघेस्नान तरी व्हावे. म्हणजे निदान हात पाय तरी धुवावेत, गेल्या वीस एक वर्षापूर्वी पर्यंत ही प्रथा, अनेक कर्मठ घरात सुरू होती. यासाठी घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला न्हाणीघर असायचे. पण बदलत्या काळाचा महिमा म्हणत, ऑर्थ्रोडाॅक्सचे लेबल लावीत, ही अत्यंत चांगली आरोग्यदायी प्रथा नष्ट होत चालली आहे. भारतीय संस्कृतीतील, या प्रथेमागील विज्ञान शोधून काढून ते पुढील पिढीला सांगणे योग्य नव्हे काय ? ( विज्ञान हा शब्द देखील संस्कृती रक्षकांनी वापरायचा नाही म्हणे, तो फक्त बुद्धिवादी लोकांनीच वापरायचा, असे काही नाही. )

    चांगले शिकले सवरलेले बुद्धीवादी लोकच जर घरात बाहेरून येऊन, तसेच बूट घालून अगदी थेट स्वयंपाकघरापर्यंत वावरू लागले तर, आरोग्य तरी कसे घरात राहील ?

    आंग्ल भाषेत एक म्हण आहे. "प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर." म्हणजे सावध तो सुखी. रोग झाल्यावर उपचार शोधत बसण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे केव्हाही चांगलेच. पाय धुवून घरात यावे, म्हणजे अनेक रोगजंतुपासून आपला बचाव होतो, असे सांगितले तर कदाचित पटेल. यासाठीच अनेक देवालयामधे, गुरुद्वारांमधे प्रवेश करताना, पाय पाण्यात बुडवून जावे लागते.

    "स्वस्थवृत्त" म्हणजे रोग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी आणि "रोगनुत" म्हणजे रोग झाल्यावर करायचे उपचार, असे दोन मोठे भाग, आयुर्वेद शिकत असताना पुरेपुर अनुभवता आले, अभ्यासता आले.

    हेल्थ मॅनेजमेंट इज फ्री अॅण्ड एन्जाॅएबल, बट डिसीज मॅनेजमेंट इज व्हेरी काॅस्टली अॅण्ड पेनफुल !
    सैराट झाल्यापासून आंग्ल भाषेमधे सांगितले तर लवकर कळते.

    खरं आहे ना ?

    मग बाहेर नाचून घरात आल्यावर, फक्त एका तांब्याभर पाण्याने हातपाय धुणे हा देवपूजेतील उपचार स्वतःतल्या ईश्वराच्या आतिथ्यासाठी योग्य होणार नाही काय ?
    चला, पुनः सुरवात तर करू !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.06.2017

      June 1, 2017


  • साडेतीन मिनिटे

    डॉक्टरांनी सांगितलेले -
    ज्यांना अगदी सकाळी अथवा रात्री झोपेत असताना लघवीला जावे लागते अशांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना -

    प्रत्येकाने अशावेळी साडेतीन मिनिटे जपायला हवे. हे इतके महत्वाचे का आहे ? ही साडेतीन मिनिटे अकस्मात मृत्यूची संख्या कमी करु शकतात. ज्या ज्या वेळी असे जेव्हा घडले त्या त्या वेळी शारीरीक दृष्टीने तंदुरुस्त असलेल्या व्यक्ती रात्रीच मृत्यू पावल्या. अशा व्यक्तींच्या बाबतीत आपणास नेहमी ऐकिवात येते की कालच तर मी त्याच्याशी बोललो, हा असा अचानक कसा वारला ? याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री बाथरूमला जायला उठता तेव्हा तुम्ही ताबडतोब जाता. आपण जेव्हा एकदम उभे राहतो तेव्हा मेंदुला रक्त पुरवठा होत नाही. ही साडेतीन मिनिटे अतिशय महत्त्वाची का असतात ? मध्यरात्री जेव्हा तुम्ही त्वरित लघवी करण्यासाठी जागे होता तेंव्हा तुमचा ई.सी.जी. चा पॅटर्न बदलू शकतो. कारण एकदम उभे राहिल्याने मेंदूत रक्त पोचत नाही व त्यामुळे ह्रदयक्रिया बंद पडते. साडेतीन मिनिटाचा सराव हा यावर उत्तम उपाय आहे आणि तो म्हणजे

    1) झोपेतून उठतेवेळी पहिला अर्धा मिनिट गादीवर पडून राहा

    2) पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा

    3) त्यानंतर पुढील अडीच मिनिटे गादीच्या काठावर बसून दोन्ही पाय खाली सोडा.

    साडेतीन मिनिटानंतर तुमचा मेंदू रक्तावीना राहणार नाही व ह्रुदय क्रिया बंद पडणार नाही. त्यामुळे अकस्मात मृत्यूची संख्या देखील कमी होईल.

    आपल्या परिचयातील स्नेहीजनांना या उपायाने लाभ व्हावा म्हणुन हा संदेश अधिकाधिक प्रसारित करा.

      December 13, 2016


  • मराठी आडनाव – अणे

    लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.

      August 23, 2025


  • आदर्श शिक्षा पद्धतीचे आवश्यक घटक

    समाजाच्या रक्षणाकरता शिक्षा देणे तर आवश्यकच आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला निश्चितपणे त्याची आदर्श शिक्षापद्धती पाहिजे. आता भारताचा नवीन दृष्टिकोन ‘गुन्हेगारास कडक शिक्षा न देता सुधारणे’ हे धोरण आहे.

      October 29, 2018


  • मानसिक आजार आणि शारीरिक दुष्परिणाम

    शरीराशी संबंधित गोष्ट ही केवळ शरीराशी संबंधित असते असं नसून तीचा मनाशीदेखील संबंध असतो. ताप आला की आपण किती अस्वस्थ आणि चिडचिडे होतो ते आठवा माझा मुद्दा लगेच पटेल!! याच पद्धतीने मानसिक आजारदेखील शारीरिक दुष्परिणाम करत असतात असा या दोघांचा निकटवर्ती संबंध आहे.

      August 6, 2016


  • शिक्षणाच्या आयचा घो..!!

    दि. ३० मेला १२वी एचएससी बोर्डाचा निकाल लागला. त्या अगोदर काही दिवस आयसीएसई बोर्डाचा निर्णय आला व त्याही अगोदर काही दिवस सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागला. एकाच १२वीचे तिन तिन वेगळे रिझल्ट तिन वेगवेगळ्या दिवशी लागले.

      June 1, 2017


  • दादर, मुंबई येथील ‘धी गिरगांव पंचे डेपो प्रायव्हेट लिमिटेड’

    मुंबईतील मराठी माणसांच्या उद्योग-व्यवसायात ९० वर्षांची परंपरा असलेले “दि गिरगाव पंचे डेपो प्रा. लि.” हे दुकान अग्रभागी आहे. मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दुकानात मराठी माणूस खरेदीसाठी दूरदूरच्या ठिकाणांहून येतो.

    देवीच्या साड्या हे “गिरगाव पंचे डेपो”चे खास वैशिष्ट्य. याचबरोबर इतरही सूती कपडे, खासकरुन मराठी ग्राहक आणि कुटुंबांमध्ये वापरले जाणारे कपडे यांच्या व्यवसायात “गिरगाव पंचे डेपो” अग्रस्थानी आहे.

    Founder of the girgaon panche depot९० वर्षांपूर्वी, १९२६ मध्ये स्वर्गिय महादेव यशवंत कुलकर्णी यांनी या उद्योगाची सुरुवात केली. खरंतर त्यापूर्वीपासूनच त्यांनी कोकणातून पंचे वगैरे वस्तू आणून घरोघरी विकण्याचा व्यवसाय सुरु केला होताच. त्याचीच पुढची पायरी म्हणजे सुरुवातील गिरगावात आणि नंतर एका वर्षात, १९२७ मध्ये दादर येथे त्यांनी दुकान थाटले.

    त्यानंतर त्यांचे चिरंजीव अरविंद महादेव कुलकर्णी यांनी दुकानाची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष होते. सध्या श्री रमाकांत अरविंद कुलकर्णी हे या दुकानाची धुरा सांभाळत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना यांची साथ आहे.

    आता कुलकर्णी कुटुंबाच्या सदिच्छा व स्वराज या चौथ्या पिढीने या व्यवसायात पदार्पण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या या पिढीने आता या उद्योगाला ऑनलाईन जगात आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. लवकरंच “गिरगाव पंचे डेपो”मधील विविध वस्तू ऑनलाईन शॉपींगच्या माध्यमातून घरबसल्या मागवण्याची सोय सुरु होणार आहे.

    “देवीच्या साड्यां”नी कुलकर्णींच्या व्यवसायाला भरभराट आणली. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायाची सुरुवात देवीच्याच साड्या नवरात्रीनिमित्त ग्राहकांपर्यंत पोहोचवून करण्याचा त्यांचा निर्णय अगदी योग्यच आहे.

    मराठी ग्राहकाने ज्याप्रमाणे कुलकर्णींच्या तीन पिढ्यांवर प्रेम केले आणि त्यांना साथ दिली तशीच साथ या नव्या पिढीलाही मिळेल याबद्दल रमाकांत आणि अर्चना कुलकर्णींच्या मनात अजिबात संदेह नाही.

    <!--घटस्थापनेच्या शूभमुहुर्तावर देवीच्या साड्यांची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. सर्व साड्यांसाठी घरपोच डिलिव्हरी सेवा मुंबई आणि ठाणे विभागात उपलब्ध. डिलिव्हरी चार्जेस - रु.७०/- प्रति साडी. डिलिव्हरी ३ दिवसात मिळेल रंगाच्या निवडीसाठी फोनवरुन संपर्क साधावा व त्यानंतर ऑनलाईन लिंकवर जाऊन पैेसे भरावेत. आपला पत्ता आणि फोन नंबर आमच्याकडे इ-मेलने पाठवावा. पैसे भरण्यासाठी येथे क्लिक करा [supsystic-tables id='1'] [supsystic-tables id='2'] -->
    पत्ता - ३५४, एन सी केळकर मार्ग, दादर, मुंबई ४०००२८
    फोन - 9869007736
    इ-मेल - ramakantarchana@gmail.com

      September 29, 2016


  • हिवाळ्यात दररोजच्या आहारात काय समावेश करावा?

    विशेषत: लहान मुलांना हे स्निग्ध पदार्थ खाऊ घालण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. अशा वेळी या स्निग्ध पदार्थात सुकामेवा, साखर, मध, हळद, मीठ, जिरे, कोथिंबीर, मिरची पूड आदी पदार्थ टाकत त्याची चव बदलत ते मुलांना दिल्यास मुलेही आवडीने खातील. हे स्निग्ध पदार्थ नुसते खाण्याऐवजी चपाती, भाकरी, भात, खिचडीसोबत खावेत.

    दूध आबालवृद्धांच्या आहारात दुधाचा हमखास समावेश असतो. अनेक जण सकाळ-संध्याकाळ दूध आवडीने पितात. पण दुधाला पाहून नाक मुरडणारेही अनेक जण आहेत. अशा वेळी दुधाची चव बदलत ते पिल्यास केव्हाही चांगले. हिवाळ्यात ज्यांना नुसते गरम दूध आवडते त्यांनी ते दररोज एक ग्लास प्यावे.
    दुधात साखर घालण्याऐवजी मध टाकून प्यावं. मध हा साखरेला उत्तम पर्याय आहेच, शिवाय मधात स्वत:चे उष्ण गुणधर्म आहे. त्यामुळे ग्लासभर दुधात एक चमचा मध टाकल्यास चविष्ट दूध लागेल. हे दूध मुले आवडीने सेवन करतील. साखर आणि मधऐवजी दूध मसाला हाही एक उत्तम पर्याय आहे. केशर, बदाम, काजू, वेलचीपूड, जायफळ यांचा समावेश असलेला दुधाचा मसाला दुधात टाकावा. दुधासोबत मसाल्यात समाविष्ट सुकामेव्याचे गुणधर्मही शरीराला मिळतील.

    ताक हिवाळ्यातील थंडीत भूक अधिक लागते. थंड वातावरणामुळे पचनही लवकर होते. अशा वेळी ताकाचे सेवन केल्यास उत्तम. पण दररोज त्याचे सेवन करू नये. जेवणानंतर ग्लासभर ताक पिणं चांगलं. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. नुसतं ताक पिण्याऐवजी त्यात आवडीनुसार साखर घालूनही पिऊ शकतो. तर इतर वेळी कोथिंबीर, मीठ, हिंग, जिरे यांचा समावेश असलेला ताकाचा मसाला वापरतही ताकाची चव वाढवता येऊ शकते.
    लोणी ताजे लोणी हे नेहमी रुचकर लागते. ताजे लोणी चवीला गोड असते आणि त्यात ताकाचा अंश असल्याने चविला किंचित तुरट, आंबटही लागते. लोणी पचायला हलके असल्याने हिवाळयात दिवसातून दोन-तीन चमचे नुसते खावे. ज्यांना नुसते लोणी खाणे आवडत नसेल त्यांनी लोण्याचा दररोजच्या आहारात समावेश करावा.

    बाजरी, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत ताजे लोणी चविष्ट लागेल. लोण्यात किंचित मिरचीपूड टाकल्यास लोण्याचीही चव वाढवता येऊ शकते. लोणीमध्ये चमचाभर साखर घालत हे मिश्रण गरम चपाती किंवा भाजलेल्या ब्रेडवर लावून दिल्यास मुले आवडीने खातील.

    तूप साजूक तूप जेवढे चविष्ट, रुचकर आहे तेवढेच ते औषधीही आहे. दररोजच्या आहारात तुपाचा सर्रास वापर होतो. हिवाळ्यात गरम चपाती, भाकरीसोबत तूप खावे. तांदळाच्या भातासोबत तसेच मुगाची किंवा मिक्स डाळींची खिचडी करत त्यासोबत तूप खाल्ल्यास चांगले. मटकी, तूर, उडीद, वाल या आणि इतर कडधान्यांचा वापर करत दर दोन-तीन दिवसांनी त्याची भाजी करावी.

    जिरे, लसूण, मोहरी, सूंठ, हळद, आले, हिंग, मिरची, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्यांमध्ये स्वत:चा वेगळा गुणधर्म असतो. या मसाल्यांचा खाद्यपदार्थ बनवताना योग्य वापर केल्यास शरीराला या मसाल्यातील औषधी गुणधर्म मिळू शकतात.

    थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा वाढीस लागण्यासाठी सुकामेवा उपायकारक ठरतो. त्यामुळे हिवाळयात सुकामेवा तर खावाच खावा. खारीक, अंजीर, बदाम, जर्दाळू, चारोळी, काजू, मनुके, पिस्ता, खजूर, अक्रोड नुसते खावेत. डिंकाचा लाडून उत्तम. सोबत तिळाची चिक्की, अंजीर बर्फी, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्कीही खावी.

    सर्दी-खोकल्याच्या वेळीस थंड पाणी न पिता सकाळ संध्याकाळ कोमट पाणी प्यावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      December 13, 2016