(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आचमन का करायचे?

    समाजात गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत २५ ते ३० वेळा आचमन सांगितले आहे. स्नानाअगोदर लघुशंका आचमन सांगितले आहे. (कामतांच्या गुरुचरित्रात) माझ्या दृष्टीने गुरुचरित्र लिहिणारे सामान्य लेखक किंवा कवी नव्हते. त्यामुळे शेकडो वर्षे गुरुचरित्र टिकून आहे. हल्ली ५० वर्षापूर्वीचे लेखकांचे साहित्य मिळत नाही. गुरुचरित्र मात्र टिकून आहे. म्हणून मी त्या अध्यायातील आचमनांची लिस्ट केली. त्याप्रमाणे आठ दिवस आचमन त्या त्या प्रमाणे करून बघितले. मी संध्या करीत नाही. पण संध्या करायच्या ज्या वेळा आहेत त्यावेळी नुसते आचमन केले . शरीर हलके वाटू लागले. असिडिटी कमी झाली. नंतर आचमनाच्या वेळी जी नावे घेतात ती न घेता फक्त आचमन म्हणजे प्रत्येक वेळी तीन पळ्या पाणी पिऊन पाहिले. तरी तोच फायदा झाला. हे मी माझ्या एक डॉक्टर मित्राला सांगितले. तो म्हणाला, " बरोबर आहे." आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा अंतराने घेतलेले थोडे पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे ? तसेच आहे.

    आहे ना? आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाखाली सामान्य लोकांना शरीर नीट ठेवण्यासाठी शास्त्रच वापरले. फक्त आम्हाला ते माहीत नाही म्हणून टाकाऊ म्हणून आम्ही ते सोडून दिले.

    अरविंद जोशी
    ९४२१९४८८९४

  • कांजिण्यांवरील उपचार

    कांजिण्यांचा सामना करताना फोडांच्या जागेवर येणा-या खाजेवर व तापावर नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाचे आव्हानच असते. कोमट पाण्याने आंघॊळ करताना अंगाला लावण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा डाळीचे पिठ वापरावे. हे उपायकारक व फायदेशिर असते. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड वातावरणाने खाज वाढण्याची शक्यता अधिक असते.

    खाजखुजलीवर उपाय म्हणून डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) किंवा हायड्रोक्सिझेन (ऍटारॅक्स) सारख्या गुणकारी औषधांचा वापर केला जाऊ शकतो. त्या त्या परिस्थितीशी अनुकुल असणारी गुणकारी लोशनही आपण वापरु शकतो. पण लहान मुलांनकडून तोंडावाटे डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) व लोशनचा अतिसेवन किंवा अतिवापर होणार नाही याची दक्षता घेणे फार महत्वाचे आहे. स्टेरॉईडचा समावेश असलेल्या औषधांचा वापर करु नये.

    लहान व तरुण मुलांसाठी ऍसप्रिन य औषधाचा वापर टाळावा कारण त्यामुळे Reye's syndrome सारखा जीवनाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता काही प्रमाणात असते. तापावर नियंत्रण आणण्यासाठी ऍसेटामाय्नोफेन औषधाचा वापर करावा. घातक आजार टाळण्यासाठी आय्ब्रुफेनचा वापर टाळावा. कांजिण्या या आजारात त्वचेला वारंवार खाज येत असते अशावेळेस हाताच्या बोटांची नखे कापावी किंवा हातमोजे वापरावे जेणेकरुन त्वचेला ईजा होणार नाही. तोंडातील जखमासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. शरिरास थंड असणा-या द्रव पदार्थाचे सेवन करावे व गरम, तिखट आणि आंबट पदार्थ (संत्र्याचा रस) टाळावेत.

    हात वारंवार धुवावे व शरिरास स्वच्छ ठेवावे जेणेकरुन संसर्ग होणार नाही. जर शरिराला हानीकारक असलेल्या किटाणुंचा संसर्ग झाला असेल आणि तो वाढून ताप पुन्हा येत असेल तर डॉक्टरांना त्वरीत दाखवावे. लहान मुलांना कांजिण्या झाल्या असतील त कुटुंबातील इतर सदस्यांना दक्षता घेण्याबद्दल सांगायला विसरु नका.

    त्वचेला चरे पडणे किंवा संसर्ग होणे आयुष्यभराचे दुखणे ठरु शकते. डॉक्टरांना जाऊ दाखवणे गरजेचे नाही हा दृष्टिकोन पुढे आपल्याला पेचात अडकवू शकतो.

    ऍसिक्लोविर (झोविरॅक्स), हे संसर्ग रोखणारे औषध आहे. त्वचेला चरे पडण्याच्या पहिल्या दिवसापासून वापरल्याने उपयोगी ठरु शकते. लहान मुलांना या औषधाच्या वपराची आवशक्ता नसते. हे औषध बराच वाढलेल्या आजारासाठी दिले जाते. कारण कांजिण्या हा संसर्गजन्य रोग आहे. अशा संसर्गजन्य वातावरणाचा प्रभाव कमी होईपर्यंत लहान मुलांना शाळापेक्षा घरातच शक्यतो ठेवावे.

    कांजिण्यांपासून बचाव.
    वॅक्सिनपद्धतीने कांजिण्यापासून बचाव केला जाऊ शकतो (हे राष्टीय आरोग्य व जनता आरोग्य समुहांनी प्रमाणित केले आहे).

    लहान व तरुण मुलांसाठी: १२ ते १८ महिन्याच्या मुलांपासून १२ वर्षाच्या सुदृढ बालकांवर (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर) वॅक्सिनपद्धतीने उपचार केले जाऊ शकतात. १३ वर्षे व त्याहुन अधिक वयाच्या बालकांना (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर)चार ते पाच आठवडे वॅक्सिनच्या औषधाच्या दोन मात्रा दिल्या जातात. वॅक्सिनेशन नंतर रोग प्रतिकार शक्तीची पुर्ण कल्पना येत नाही. पुन्हा दिलेल्या वॅक्सिनेशनमुळे पौढत्वाकडे वाटचाल करणा-या मुलांमधे रोग प्रतिकार शक्ती वाढते असे मानले जाते.
    पौढत्वासाठी: वरिसेल्लिया वॅक्सिन औषधाच्या दोन मात्रा चार ते आठ आठवड्यांसाठी सुदृढ पौढांना प्रमाणित केल्या जातात. सामाजिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, दिवसा काळजी घेणारे कर्मचारी विद्यालयाचे कर्मचारी, एकत्रित निवास करणा-यांना व संसर्ग होईल अशा जागेत काम करणा-यांना वॅक्सिनेशनसाठी प्रवृत्त करण्यात आले आहे.
    ज्या पौढांना आपल्या रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती नाही अशांसाठी रक्ताचे परिक्षण व निदान करणा-या पद्धती उपलब्ध आहेत. रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती असणे फार गरजेचे असते.

    वॅक्सिन ह्या पद्धतीची घातक आजारापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनाने निर्मिती करण्यात आलेली आहे आणि हीपद्धत खुपच प्रभावी आहे. वॅक्सिनपद्धतीचा वापर केल्यानंतर क्वचितच कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते. कधी कधी वॅक्सिनपद्धतीनेसुद्धा कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते.

    वॅक्सिनचा प्रॉफेलॅक्सिस झाल्यानंतरही बचावासाठी वापर केला जाऊ शकतो. त्याची लक्षणे दिसायला लागल्यानंतर तिन दिवसात द्यायला हवे. तसेच लक्षणे दिसल्यानंतर चार दिवसात VZIG दिले जाऊ शकते जे अधिक संसर्गापासून बचाव करते.

    हे स्थायी संरक्षण देणारे औषध आहे. म्हणूनच काही काळाने पण वेळीच त्याव्यक्तीची आजारातून सुटका होणे गरजेचे आहे
    .कांजण्यासाठी
    कडुनिंबाची २०० Gm पान +
    मिरे 5 gm एकत्र करुन वाटुन चण्या एवढ्या गोळ्या करा
    1 गोळी 1 कप दुध
    ( ७ दिवस)

    @ १ चमचा कडुनिंबाचा रस +
    ४ चमचे खडीसाखर

    @ घरातल्या दारात कडुनिंबाची पाने बांधुन ठेवा

    @ कुडुनिंबाच्या पानाचा बिस्तरा बनवा वर सफेद चादर किंवा कापड टाकून त्याच्या वर आजारी व्यक्ती ला झोपवा
    प्रसारणःराजयोग ग्रुपचे

    -- आरोग्यदूत WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने

  • डाळींब

    ।। बटवे नम: दाडीमपत्रं समर्पयामि।।

    डाळींब हे फळ जितके पौष्टीक तितकेच दिसायला आकर्षक असून त्याची आंबट गोड चव आपल्या सर्वांनाच आवडते.जसे हे फळ रूचकर लागते तसेच ते औषधी गुणांनी परिपूर्ण अाहे म्हणूनच ह्याची पाने पत्रीमध्ये समाविष्ट केली आहेत.

    ह्याचे ३-५ मीटर उंचीचे वृक्ष असते.काण्ड त्वचा धुरकट तांबडी असते व गुळगुळीत असते.पाने ५-७ सेंमी लांब व तीन सेंमी रूंद असून दोन्ही टोकास निमुळती असतात.फुले लाल एकल अथवा क्वचित २-४ च्या गुच्छात असतात.फळ गोल,५ सेंमी व्यासाचे व भरपूर कोष युक्त असते.फलत्वचा चिवट असते.

    ह्याचे उपयुक्त अंग आहेत फलत्वचा,मुलत्वचा,व फल.ह्याची चव गोड,तुरट,आंबट असून हे अनुष्ण गुणाचे असते तसेच हल्के व स्निग्ध असते.हे शरीरातील तिन्ही दोष शमन करते.

    चला आता ह्याचे उपयोग पाहूयात:

    १)सालीचा काढा जखम धुवायला तसेच घशाच्या रोगात उपयुक्त आहे.

    २)उल्टी मळमळ ह्यात फळाचा रस उपयुक्त आहे.

    ३)कृमींवर डाळींबाच्या मुळाचा काढा उपयुक्त आहे.

    ४)जुलाब होत असल्यास सुकवलेली डाळींबाची साल उपयुक्त आहे.

    ६)डाळिंबाचे फळ हृदयास हितकर असून रक्त वाढवायला मदत करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • तीर्थ निर्माल्य औषध

    मी गेले वीस वर्षे पुण्यात व पुण्याजवळ मिळणार्‍या 190 फुलांच्या औषधी उपयोगावर माझ्या पध्दतीने संशोधन केले व करत आहे. ह्या संशोधनातून मला असे लक्षात आले की खास देवाना वाहण्याची जी फुले आहेत ती सर्व सामान्य व पिरीआॅडिकली येणार्या आजारांवर उपयोगी आहेत. त्याची माहिती पुढे देत आहे.

    झेंडू--कफयुक्त खोकल्यावर उत्तम. सर्दी पडसे, डोळ्याचा नंबर वाढणे,मोती बिंदू, काच बिंदू वर उपयोगी.

    गुलछडी--बध्दकोष्टता, कोलायटीस, कोरडा खोकला, अंगाला सूज, पायाला सूज, किडनी फेल, क्रिएटेनिन वाढणे, ब्लड यूरिया वाढणे इत्यादी वर उपयोगी.

    शेवंती-- अॅसिडीटी, पोटातील जळजळ, संडासला खडा होणे, लघवीला आग होणे, कोरडा खोकला, लिव्हरला सूज इत्यादीवर उपयोगी.

    बिजली--पाळीला पोटात दुखणे, प्रोस्टेट वाढणे, पित्त वाढणे इत्यादीवर उपयोगी.

    जास्वंद--कंपवात, मॅनेंन्जायटीस,लिव्हरला सूज, बध्दकोष्टता,कोलायटीस इत्यादीवर उपयोगी.

    पारिजातक--तोंड येणे, सर्दीपडसे, डोळ्याचा नंबर वाढणे, डोळे लाल होणे, पाळीला पोटात दुखणे, मोनोपाॅजचा त्रास, अंगावर काळे डाग, इसब,चट्टे गाठी उठणे, संडासला साफ न होणे, इत्यादीवर उपयोगी.

    गलांडी-- घशासाठी उत्तम.

    सोनचाफा--पाळी लांबणे, पाळीला गठ्ठे पडणे, गुडघे दुखी, आमवात, हाडाचा क्षय, स्वरयंत्र, थायराॅईड, लघवीली आग होणे इत्यादीवर उपयोगी.

    दुर्वा-- गर्भाशय, ओव्हरीज, प्रोस्टेट याच्या उष्णतेवर काम करतात, टाच दूखीवर उपयोगी.

    बेल-- बेलामुळे शरीरातील हीट कमी होते हा मूळव्याध, बी पी, मधुमेहा साठी उपयोगी आहे.

    फुलाचा औषधी उपयोग करण्यासाठी फुल पाण्यात काही तास भिजवून ते पाणी प्यावे लागते.

    देवावर फुले वाहतो ती दूसरे दिवशी तशीच असतात. तो पर्यंत त्यातील औषधी अंश काही प्रमाणात देवाचे मुर्तीला चिकटतो व पूजा करताना तो अंश पाण्यात उतरतो आणि ते पाणी तीर्थ म्हणून वापरले जाते. त्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे पूर्वजानी त्याला पवित्र ठरवून हे तीर्थ पिण्याची प्रथा पाडली व समाजाचे आरोग्य सहज राखण्याचा प्रयत्न केला.

    आम्ही आधुनिक शिक्षणामुळे तीर्थ पीत नाही टाकाऊ, अस्वच्छ ठरवतो. आणि स्वत:चाच तोटा करून घेतो.

    -- अरविंद जोशी, पुणे
    BSc

  • पावसाळी आजारांसाठी

    पावसाळा सुरु होत आहे या दिवसांत पचनशक्ती मंदावते पावसाळी हवेमुळे खोकला, कफ व घशाचे त्रास होतात. आणि स्वाईन फ्यु डेंग्यू, चिकन गुनिया असे आजार होतात. त्यासाठी पुढील उपचार करावे.

    एका स्टीलच्या पातेल्यात दोन ग्लास पाणी घेऊन त्यात दोन झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या, ६-८ निशिगंधा ची/ गुलछडी चीफुले, ६-७ तुळशी ची पाने, व दोन गलांडीची फुले रात्री भिजत ठेवावी व सकाळी पाणी गाळून घ्यावे व घरातील प्रत्येकाने अर्धी अर्धी वाटी एकावेळी (लहान मुलांना पाव वाटी एकावेळी) सकाळ संध्याकाळ घ्यावे.यामुळे पावसाळ्यात होणारा व्हायरल इन्फेक्शनचा ताप येण्याची शक्यता कमी असते.असा माझा अनुभव आहे.

    अरविंद जोशी.B.Sc, पुणे

    टीप-वरील सर्व फुले फुलवाल्याकडे मिळतात.

  • मन निरोगी तर शरीर निरोगी..

    आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.

  • मायग्रेन साठी औषध

    जून, जुलै महिन्यात ब्रह्मकमळला फुले येतात, ती रात्री उमलतात उजाडल्यावर कोमेजून जातात. ही फुले बारीक तुकडे करून साखरेत घालून बरणीत ठेवावीत, अधून मधून ते कोरड्या चमच्याने ढवळावा. दोन महिन्यात त्याचा गुलकंद तयार होतो. हा ब्रह्मकमळाचा गुलकंद डोकेदुखीवर उत्तम औषध आहे. पाव चमचा गुलकंद वाटीभर पाण्यात विरघळवून ते पाणी प्यावे. जरुरीप्रमाणे १-२ डोस घ्यावे. मायग्रेन चा त्रास कमी होतो. हा गुलकंद वर्षभर टिकतो व वापरता येतो.

    मी ह्या फुलाचा उपयोग करून बरेच जणांचे मायग्ेनचे त्रास कमी केले आहेत. ज्यांचेकडे हे फुल येते त्यानी जरूर गुलकंद करून ठेवावा.

    अरविंद जोशी
    ९४२१९४८८९४

  • वटपौर्णिमेला वडाचीच पूजा का करायची?

    आपल्याकडे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची प्रथा आहे.

    ज्येष्ठ महिन्यात वडाच्या पारंब्याना कोंब फुटायला सुरवात होते. पावसाळ्यात हे कोंब चांगले मोठे होतात. पावसाळ्यात हवेतील बदलामुळे पचन शक्ती मंदावते,अशक्तपणा असतो. त्यामुळे ह्या दिवसात काही वेळा जुलाब होतात. वडाच्या पारंब्या ह्या जुलाबाचे उत्तम औषध आहे. वडाच्या पारंब्या हाताशी असल्याने मुले,मोठेसुध्दा लोंबकाळून झोका घेतात. त्यावेळी हे कोंब नष्ट होण्याची शक्यता असते. पूजा करताना झाडाला दोरा बांधण्याची प्रथा आहे. खरे पाहता दोरा पारंब्याना बांधायला पाहीजे. म्हणजे पारंब्याच्या कोंबाचे रक्षण होईल.आणि पावसाळ्यात होणारे जुलाब थांबवायला वैद्य लोकांना मिळतील. हे त्या पूजेच्या मागचे शास्त्र आहे.

    हल्लीतर शहरात वटपौर्णिमेला वडाच्या छोट्या फांद्यांचे तुकडे विकले जातात.आणि बायका घरीच वडाची पूजा करतात. ही सोय झाली.

    माझी सर्व भगिनीना विनंती आहे की, तुम्ही वडाच्या फांदीची जरूर पूजा करा. पण दुसरे दिवशी ती फांदी टाकून देऊ नका. फांदीचे स्वच्छ धुऊन पाना सकट शक्य होईल तितके बारीक तुकडे करा व ते वाळवून त्याची मिक्सरमधे जमेल तशी पावडर करून ठेवा पावसाळ्यात घरातील कोणाला जुलाब झाल्यास त्या पावडरचा काढा करून द्या. ह्यामूळे जुलाब लागले की हाॅस्पिलटमधे अॅडमीट होणे, वेगवेगळ्या टेस्ट करणे, सलाईन, इंजक्शने वगैरे न लागण्याची व पैसेही वाचण्याची शक्यता आहे.

    अरविंद जोशी
    B.Sc.
    पुणे

  • अशोक

    हा आंब्याच्या सारखा दिसणारा ८-१० मीटर उंच सदा हिरवा राहणारा वृक्ष आहे.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पाना सारखी दिसतात.फुले दाट व गुच्छात येतात.हि सुगंधी व आकर्षक पिवळट तांबड्य् रंगाची असतात.फळ ८-२५ सेंमी लांब व ४ सेंमी रूंद असते शेंगा चपट्या असतात व त्यात ४-८ बिया असतात.

    ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,बीज व फुले आहेत.हा चवीला तुरट,कडू असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कफ पित्तनाशक आहे.

    चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:

    १)वेदना प्रधान विकारात अशोक सालीचा लेप करतात.

    २)तुरट असल्याने रक्तस्तंभक व कडू रूक्ष गुणाने रक्त शुद्धी करते म्हणून रक्त दुष्टी जन्य विकारात अशोक उपयुक्त आहे.

    ३)तुरट चव व शीत वीर्य ह्या मुळे अशोक क्लेद नाशक अाहे त्यामुळे गर्भाशय शैथिल्य नष्ट करून वेदना व स्त्राव अशोक कमी करतो.तसेच गर्भाशयाच्या कार्याला चालना देतो.त्यातील रक्तवाहिन्या व स्नायूंचा संकोच करून त्यांची क्रिया सुधारते व रक्तस्त्राव थांबवितो.Endometrium व Ovary वर उत्तेजक कार्य करते.

    ४)अंगावर लाल अथवा पांढरा स्त्राव जात असल्यास अशोक साल चुर्ण तांदुळाच्या धुवणातून देतात.

    ५)गर्भिणी स्त्रीला सगर्भावस्थेत अशोक घृत सेवन करायला दिल्यास गर्भपाताचा धोका टळतो.

    ६)अशोक तुरट चवीचा व थंड गुणाचा असल्याने स्तंभक व दुष्ट कफनाशक म्हणून चांगले काम करतो त्यामुळे अतिसार,प्रवाहिका व कृमी मध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • कथिलाचं पाणी….सावधान!!

    सध्या ‘कथिलाचं पाणी’ या नावाने व्हॉटस्अप वर एक संदेश फिरतोय. काहींनी याबाबत मार्गदर्शन करा असे आवर्जून विचारल्याने लिहित आहे. या संदेशाकडे आपल्याला आयुर्वेद व आधुनिक विज्ञान अशा दोन्ही बाजुंनी पहावं लागेल.