(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)

    मोदी सरकारचा जनाधारावर येत्या निवडणुकीत ‘नोटा’ परिणाम करेल, असं मला वाटतं, त्याचं मला वाटणारं सर्वात पहिलं कारण म्हणजे, स्थानिक पातळीवरचा भ्रष्टाचार आणि त्यात लोकप्रतिनिधींचा असलेला अप्रत्यक्ष सहभाग.

      February 11, 2019


  • गायीच्या दूधाचे महत्व

    आयुर्वेदानुसार गायीचे दूध आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप अमृताचे भांडार आहे. केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात 'सूर्यकेतू' नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाचा एक पदार्थ स्रवते, ज्याला 'स्वर्णक्षार' म्हणतात. याच कारणास्तव देशी गायीचे दूध, लोणी आणि तूप सुवर्णकांतीचे असते.
    जे आयुष्यभर देशी गायीच्या दुधाचे सेवन करतात, ते निश्चितच निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि दीर्घायू होतात तसेच त्यांच्या विचारांमध्येही सात्विकता राहते. फक्त देशी गायीचेच दुध हितकार आहे; जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींचे नव्हे. डेअरीच्या प्रक्रियेमुळे (उदा. पाश्चुरायझेशन) दुधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात.

    डोळे दुखणे - उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते.
    आम्लपित्त - आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा गार दुध एकेक घोट पीत त्यासोबत थोडेथोडे पाणी प्यायला पाहिजे. दुध गार केलेले असावे, फ्रिजचे नव्हे !
    रक्तपित्त - ( शरीरात निष्कारण कुठूनही रक्तस्राव होऊ लागणे ) : कच्च्या दुधात २ ग्रॅम गोखरू चूर्ण अथवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून प्यायल्याने लाभ होतो.
    बद्धकोष्ठ ( मलावरोध ) : गरम दुधाबरोबर इसबगोलची पूड किंवा गुलकंद घेतल्याने मलावरोध तसेच मूळव्याधीत लाभ होतो.

    आतड्यांचे रोग - जेवणापूर्वी एक चमचा कोमट दुध घेऊन हळूहळू पोट आणि नाभीवर मालिश करावी. एक तास विश्रांती घेऊन मग जेवण करावे. जेवणानंतर लगेच लघुशंका केल्याने आतड्यांना येणारी सूज आणि इतर आजारही दूर होतात तसेच आतडे मजबूत बनतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 26, 2016


  • फिटनेसचे आयुर्वेदीय कॅलेंडर

    भारतात सहा ऋतू दिसून येतात. त्या प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्याला साधक व बाधक असे वातावरण असते. त्याचा परिणाम वा दुष्परिणाम एक, दोन किंवा अनेक अवयवांवर होत असतो; परंतु ऋतूप्रमाणे आहार-विहार केल्यास व त्या त्या ऋतूतील त्रासदायक गोष्टी टाळल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. काही ऋतूंच्या आगमनाचे बदल हे महिन्यांप्रमाणे राहिलेले नाहीत; पण ऋतूंची विशिष्ट अशी लक्षणे आहेत. ती लक्षणे समजावून घेता येऊ शकतात. त्याप्रमाणे आपल्या आहारात-विहारात बदल केल्यास, ते अधिक लाभदायक ठरेल

    पुष्पमंडितवर्षा ऋतू
    मराठी महिने श्रावण - भाद्रपद
    जुलै - ऑगस्ट
    आहार मधुर, आम्ल-लवण रसाचे स्निग्ध पदार्थ, पचायला हलके उष्ण पदार्थ घ्यावेत. भूक कमी असल्याने एक वेळा जेवावे. या ऋतूत अपचनामुळे विविध व्याधी संभवतात.
    पालेभाज्या व फळभाज्या पडवळ, भेंडी वांगी, दुधी भोपळा, लाल भोपळा, गिलके, दोडके, कारले, सुरण यांचा उपयोग करावा.

    धान्य, उसळी मूग, गहू, ज्वारी, कडवे वाल, जुने वाल, तांदूळ, राजगिरा वापरावे. लसूण, कांदा, आले, दूध, तूप, कोथिंबीर, पुदिना, हिंग यांचा वापर जास्त करावा. कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे, बीट हे वापरावे.

    बलवर्धक आहार या ऋतूत अग्नी वाढवून नंतरच दूध, तूप यांनी युक्त विविध प्रकारच्या खिरी खाव्यात. बेसनलाडू, टोमॅटोचे सूप, विविध भाज्यांचे सूप, उकडीचे मोदक, आवळ्याचा-कैरीचा मोरंबा यांचा उपयोग करावा.

    वर्ज्य पालक, कोबी सर्व पालेभाज्या, चणे, मटार, बटाटे, काकडी, आंबा, खव्याचे पदार्थ, सरबते, मका अधिक तळलेले पदार्थ, सुके मासे, थंड पाणी टाळावे. उपवासासाठी शेंगदाणे, भगर अत्यंत कमी प्रमाणात वापरावे. अळूची भाजी व सातूचे पीठ खाऊ नये.

    पाणी पाणी दूषित असल्याकारणाने उकळूनच प्यावे. 1 चमचा मध व त्यानंतर पाणी असे या ऋतूत सर्वांनी घ्यावे. शरीरातील पाणी आजारामुळे कमी झाल्यास लिंबू सरबत गरम पाण्यातून वारंवार घ्यावे.

    पाचक पेय या ऋतूत शरीरातील शक्ती तरतरी व भूक उत्तम ठेवण्यासाठी पाचक पेयाचा प्रयोग करावा.

    व्यायाम स्थूल व मेदरोग असलेल्यांनी घरी नियमित 20 / 30 मिनिटे बैठका इ. सारखा व्यायाम करावा, व्यायामानंतर मध व पावसाचे पाणी (साठविलेले असल्यास) घ्यावे.

    रात्रीचर्या ऋतूमध्ये बल कमी असते व शुक्रक्षय झाल्यास अधिक अशक्तपणा येतो; परंतु ब्रह्मचर्य आजच्या युगात पाळणे कठीण असल्याने व समागमाने मन प्रसन्न होत असल्याने, या सुखोत्पादक प्रवृत्तीसाठी आपल्या शक्तीनुसार वाताचा प्रकोप होणार नाही, असे बघून समागम करावा.

    स्वास्थ्यकारक औषधे ऋतूतील अपचनाचा त्रास टाळण्यासाठी वर्णन केलेले पाचक पेय घ्यावे. तापाच्या प्रतिबंधासाठी पारिजातकाची पाने काढ्यात टाकावीत. आमपाचकवटी भास्करलवण चूर्ण, लघुसूतशेखर यांचा प्रयोग पोटाच्या विकारांसाठी करावा. लघुमालिनी वसंत गर्भिणीने घ्यावी.

    पंचकर्म ज्यांचे जीवन धकाधकीचे, सतत फिरतीचे, अवेळी खाण्याचे असे आहे, त्यांनी तूप, तेल, दूध यांपैकी कोणतीही बस्ती अवश्या घ्यावी. बस्तीपूर्वी सर्वांगाला औषधी तेलाचे स्नेहन व औषधीयुक्त काढ्याची वाफ घ्यावी. बस्ती घेतल्यास वर्षभर वातविकार टाळता येतात. तसेच वजन वाढविणे, वजन कमी करणे, मणक्यां ना व सांध्यांना निरोगी करणे, शरीरातील वातनाड्या उत्तम ठेवणे ही कार्ये होतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- वैद्य विक्रांत जाधव /सा.सकाळ

      December 23, 2016


  • माझा एक अनुभव विठ्ठलाच्या वारीतला

    बघा जरा विचार करुन…का जातात लाखों च्या संख्येने लोकं दिंडी मध्ये त्या विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीला? का घराची पर्वा असूनही सोडतात ते आपले घर? त्यांना ऊन पावसाची चिंता का नाही? असे अनेक प्रश्न मनात विचारांचे डोंगर उभे रहातात…!

      July 13, 2019


  • गुजरातच्या सक्षम सागरी सुरक्षेकरता

    नऊ सप्टेंबरला समुद्राकडून गुजरातच्या कच्छच्या रणात दहशतवादी हल्ला करण्याकरता ५० दहशतवादी तयार आहेत असा इशारा बॉर्डर सिक्यूरिटी फोर्सने दिला. भारतीय सैन्याच्या सदर्न कमांडचे मुख्य जनरल सैनी यांनी पण कच्छच्या रणात मध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला आहे.आठवत असेल की दोन आठवड्या पूर्वी नौदल प्रमुख यांनी समुद्रातून पाण्याखालून दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला होता.

      September 13, 2019


  • द ग्रेट मराठा सचिन तेंडुलकर

    विद्याधर ठाणेकर 
    सन्मित्र २४ एप्रिल २००२

    २४ एप्रिल २००२ हा सचिन तेंडुलकरचा २९ वा वाढदिवस. सर्वात प्रथम सचिनला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुक्षेच्छा! आणि योगायोगही असा की, सचिनने स्वतःच्याच २९ व्या वाढदिवसानिमित्त साऱ्या क्रिकेट शौकीनांना २९ व्या कसोठी शतकाची क्षेट दिली. त्यासाठी सचिनचे मनःपूर्वक अभिनंदन!

      May 4, 2002


  • मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवणारा एक रस्ता

    मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे.. मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे..

      November 12, 2016


  • अनंत अमुची ध्येयासक्ती

    आयुष्य हे खर तर मला एखाद्या खवळलेल्या समुद्रा प्रमाणे वाटते.एका पाठोपाठ लाटा या येतच राहतात. अनेकदा या लाटांच्या माऱ्यापुढे मन खिन्न होऊन जाते.अगदी थकल्या सारखे होते. पण अशाच वेळी आठवण होते ती कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेची.

    अगदी भीषण वादळात सापडला असतानाही किती खंबीर,धीरगंभीर वाटतो तो आणि त्याचे ते वागणे पाहून वाटते आपण उगाचच छोट्या छोट्या गोष्टींचा खूप बाऊ करतो ... हा पठ्या तर सरळ समुद्रालाच सांगतो,
    "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

    मुश्किलोंकी लहरोंको चिरकर मंजील हम पा लेंगे.. ऐ जिंदगी तु बस देखती जा....!

    Anyone can swim with the waves ...but a real person is someone who can tear apart the waves and move ahead.

      January 6, 2017


  • श्रीनृसिंहसरस्वती महाराज, कारंजे

    श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म वऱ्हाड प्रांतातील सुप्रसिद्ध ‘कारंजा’ या गावी झाला. त्यांच्या जन्मतिथीविषयी एकवाक्यता असली तरी जन्मशतकाविषयी विद्वानात मतभेद आहेत. काहींनी त्यांचा जन्म शके १३०० च्या सुमारास झाला असे म्हटले आहे, तर कुणी १३१४ हाच शक जन्मशक म्हणून मानतात.

      July 4, 2025


  • स्वप्नांचा पाठलाग..

    आज प्रत्येकजण स्वप्नांच्या मागेे धावतोय. स्वप्नं, इच्छा, अपेक्षा इ. ची न संपणारी यादी..! आपण इतकं धावतो, इतकं धावतो की आजूबाजूला पहातचं नाही. स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसागणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत (कडू असो की गोड). एक स्वप्न पूर्ण झालं की, दुसर्‍या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य..?

      August 18, 2019