वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेदीय औषधोपचारांसहच मंत्रचिकित्सेचा वापर केल्यास ‘अधिकस्य अधिकं फलम्|’ हे नक्की. आज मंत्रांचा आरोग्यावरील परिणाम या विषयात संशोधने सुरु आहेत. या विषयात अभ्यास आणि प्रयोग होणे महत्वाचे आहे. त्यावरून निघणारे निष्कर्ष मोलाचे ठरतील असे वाटते.
मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. मात्र तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही पदार्थ आहेत जे कधीही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. सकाळी रिकाम्या पोटी कधीही हे ५ पदार्थ खाऊ नका
● हळद हे सर्वश्रेष्ठ नैसर्गिक जंतूघ्न औषध आहे.
● कोणत्याही त्वचारोगात हळद उपयोगी पडते. खाज - खरूज असल्यास हळद उगाळून लेप द्यावा. सोबत कडुनिंबाची पाने ठेचून हळदीच्या चूर्णासोबत पोटात घ्यावी.
● 'हरिद्रा प्रमेहहराणाम्…..' म्हणजेच मधुमेहाच्या औषधांमध्ये हळद सर्वश्रेष्ठ आहे.
● कोणत्याही वयामध्ये पोटात जंत झाले असल्यास हळद चूर्ण व कडुनिंबाच्या पानांची गोळी करून वावडिंगाच्या काढ्यातून घ्यावी.
● हळद ही उत्तम शोथहर (सूज कमी करणारी) व जंतूघ्न असल्यामुळे घसा दुखी व सूज ; सर्दी , खोकला असताना गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या कराव्या.
● याशिवाय , अंगावर कोठेही मार लागून आलेल्या सुजेवर हळद आणि तुरटी एकत्र उगाळून लेप द्यावा.
● कोणत्याही प्रकारची जखम हळदीने भरून येते. जखमेतून येणारे रक्त थांबवतेच , शिवाय हळदीने जखम धुतल्यामुळे त्यात संक्रमण (infection) न होता ती लवकर भरून येते.
● वाताच्या रोगांमध्ये हळद तुपातून घेणे फायदेशीर ठरते. हळद साखरेबरोबर पित्तशामक आहे. तर मिठासोबत घेतल्यामुळे ती कफाचे रोग बरे करते. अशा प्रकारे हळद त्रिदोष शामक आहे.
● हळद मधातून चाटल्याने श्वसनसंस्थेचे रोग , जसे सर्दी-खोकला , दमा , आवाज बसणे , क्षयरोग यांच्यामध्ये लाभ होतो.
● स्त्रियांमध्ये प्रसुतीपश्चात दुधातून हळद घेणे फायदेशीर ठरते. याने अंगावरचे दूध (breast milk) वाढते आणि रक्तशुद्धीही होते. या काळात होणारे कंबरदुखी सारखे त्रासही टळतात.
● हळद ही सर्वश्रेष्ठ वर्ण्य म्हणजेच त्वचेचा रंग उजळणारी आहे. नुसता हळदीचा वास असणार्या क्रीम्सपेक्षा खरी हळद उगाळून लावल्यास उत्तम फरक पडतो.
● कोणतेही गळू किंवा फोड पिकून फुटण्यासाठी हळद आणि सुंठ उगाळून लेप लावावा.
● मुळव्याधीत हळद तुपात उगाळून लेप द्यावा.
● निरोगी व्यक्तीनेसुद्धा एक ग्रॅम हळद गरम पाणी किंवा दुधातून रात्री झोपताना घेतल्यास माणूस वज्रदेही बनतो. म्हणजेच , त्याची रोग प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा उत्तम राहाते.
[ टीप - सर्वच आजार केवळ प्रथमोपचारांनी बरे होत नाहीत. कोणत्याही आजारासाठी कोणताही उपचार घेताना तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ]
डॉ. अमेय गोखले ,
रत्नागिरी.
9422662772.
(05-05-2017)
बर्याच लोकांना सारख्या ढेकरा येणे किंवा वारा सरणे याचा त्रास होत असतो. उतारवयात हे जास्त आढळते.
वायुविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय होय. दुसरे कारण म्हणजे काही अन्नपदार्थांवर होणारी जिवाणू प्रक्रिया.
बध्दकोष्ठता असल्यावर मोठया आतडयात मळ बराच वेळ राहून सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे वायू तयार होतो. हा वायू थोडा थोडा पण घाण वास येणारा असतो.
उपचार
बैठया जीवनपध्दतीत गॅस होणे स्वाभाविक आहे. काही ना काही व्यायाम करणे हे गॅस निवारण्यासाठी आवश्यक आहे. निदान चालण्याची सवय असावी. ज्या अन्नपदार्थांमुळे गॅस वायू होतो ते टाळावेत.
वायूने फारच त्रास होऊन पोट फुगले असल्यास एक सोपा उपाय करता येईल. गुडघे व कोपरावर ओणवे होऊन गुदद्वारात साधी लहान रबरी नळी सरकवल्यास आतील हवेला वाट मिळून ती बाहेर पडते. वर सरकणे हा हवेचा नैसर्गिक गुणधर्म आहे. म्हणूनच पाण्यातून बुडबुडे वर येतात. या गुणधर्माचा वापर करून हवा गुदद्वाराच्या तोंडाशी आणता येते. आतडयाला पीळ पडला असल्यासही कधीकधी या उपायाचा गुण येतो व ऑपरेशन टळते. मात्र नळी अर्ध्या वितीपेक्षा जास्त आत सरकवू नये. योगासनांपैकी काही आसने गॅस गुदद्वाराकडे आणतात. (उदा. पवनमुक्तासन)
आयुर्वेद
वायू, गुबा-यामागे काही कारणे असू शकतात. अति पाणी पिणे,आहारात बटाटा,रताळी, साबुदाणा असे पिठूळ पदार्थ असणे, हरबरा डाळ आणि उडीद, इत्यादी डाळी. अशा विशिष्ट पदार्थांशी संबंध टाळावेत. बैठे काम करणा-यांनाही याचा त्रास होतो.
वायू, गुबारा यांचा त्रास होणा-यांना कपभर गरम पाण्याबरोबर दीड चमचा लवणभास्कर चूर्ण किंवा एक चमचा हिंगाष्टक चूर्ण दिल्यास चांगला उपयोग होतो. ही चूर्णे जेवणाबरोबर, म्हणजे भात-पोळी याबरोबरही घेता येतात.
बैठे काम करणा-यांनी पोटाच्या साध्या क्रिया कराव्यात. एक साधी क्रिया पुढीलप्रमाणे. जेवणानंतर दीड-दोन तासांनी ताठ बसून बेंबी आत ओढून5 ते 15 सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार व नेहमी केल्यास गुबा-याचा त्रास निश्चित कमी होतो. मात्र बेंबी आत ओढून धरल्यास दुखत असेल तर आतील अवयवांना सूज आहे अशी शंका येणे साहजिक आहे अशा बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योगाभ्यासात पोटासाठी बरेच उपाय आहेत.(नौलि, उड्डियान, इ.) या उपायांचा निश्चित उपयोग होतो.
होमिओपथी निवड
आर्सेनिकम, बेलाडोना, सीना, कॉस्टिकम, चामोमिला, फेरम मेट लायकोपोडियम,नक्स व्होमिका, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर,डायस्कोरिया, चायना
-- लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
-- आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन (Posted by Sushama Mohite)
असा प्रश्न ज्यांच्या मनात येतो त्यांनी “वैद्य काय सांगतो ते खावे अथवा टाळावे; तो स्वतः काय खातो याची चिकित्सा करत बसू नये.” हे भरतवाक्य कायम ध्यानी ठेवावे.
आजकाल अनेकांना भारतीय मसाले आणि त्यांचे औषधी गुणधर्म याची महती पटू लागली आहे. चेहऱ्यावरची मुरुम त्वचेवरची बंद छिद्र यावर त्याचा चांगला उपयोग होतो. यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. याबद्दल काही खास टिप्स.
दालचिनी : दालचिनीमध्ये अत्यंत उपयोगी असे जीवाणूनाशक घटक असतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारत दालचिनीचा चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांवर चांगला उपयोग होऊं शकतो. याची पेस्ट तयार करून ती पुटकुळ्यांवर लावता येते.
हळद : हळदीमध्ये प्रतिजैविकं आणि जंतुनाशकांचे गुणधर्म आहेत. याचा उपयोग उत्तम अँटी एजिंग घटक म्हणूनही होऊ शकतो. त्वचेवर लावण्यासाठीच्या अनेक मलमांमध्ये हळदीचा आवर्जून वापर केलेला असतो. यामुळे त्वचा उजळतेही. जर फेसपॅकमध्ये हळद आणि मधाचा वापर केला तर त्वचेला एक निराळीच झळाळी मिळते.
धने : चवीला छान असणारे धने हा अतिशय थंड पदार्थ आहे. रात्रभर धने पाण्यात भिजवून ठेऊन ते पाणी तुम्ही सकाळी डोळ्यांत ड्रॉप्स म्हणून टाकू शकता. या उपायामुळे डोळे स्वच्छ होतील शिवाय डोळ्यांना थंडावाही मिळेल. यामुळे डोळ्यांना छान चमक येईल.
काळी मिरी : काळ्या मिरीची पूड करून ती पुटकुळ्यांच्या किंवा मुरुमांच्या जागी लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. थोड्याशा दह्यात काळी मिरी पूड घालून ते मिश्रण लावल्यास मुरुमांवर त्याचा चांगला वापर होऊ शकतो.
आले : कायाकल्पामध्ये आल्याचा उपयोगी मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो. आल्याची पेस्ट थोडा वेळ त्वचेवर लावल्यास त्वचेचा पोत छान होतो. तसंच त्वचेवरील डागांवरही याचा चांगला उपयोग होतो.
लाल मसूर डाळ : जरी हा मसाल्याचा पदार्थ नसला तरीही ते एक उत्तम सौंदर्यप्रसाधन होऊ शकतं. यामध्ये अँटी टॅनिग गुणधर्म असतात. त्यामुळे या डाळीचा उपयोग फेसपॅकमध्ये करता येतो. बॉडी स्क्रब म्हणूनही याचा वापर करता येऊ शकतो. या डाळीची पूड, चंदन आशि हळद याचा लेप लावल्यास त्वचा छान राहते.
या मसाल्यांचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
चेहऱ्यावर कोणतीही पेस्ट लावताना ती योग्य प्रमाणात घ्या. तसंच ती डोळ्यांत जाणार नाही, याची काळजी घ्या.
काही मसाले केसांसाठी योग्य नसतात. त्यामुळे ही सौंदर्यप्रसाधनं केसांवर जाणार नाहीत, याचीही खात्री करा.
सौंदर्य प्रसाधन बाजारातील असो वा घरगुती आधी ते कोपराच्या आतल्या बाजूस थोडंसं लावून पाहा. त्याचा त्रास झाला नाही तर ते वापरायला हरकत नाही.
स्वयंपाकघरात तर मसाले जेवणात लज्जत आणतातच. पण हेच मसाले आपलं सौंदर्यही वाढवू शकतात.....
सेकंड ओपीनियन म्हणजे एखाद्या निर्णयाबद्दल त्या क्षेत्रातल्या अन्य एका तज्ज्ञाचे मत घेणे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असतेच असे नाही; शिवाय कित्येकदा अशा सल्ल्याने काही नवीन दरवाजे आपल्यासाठी उघडू शकतात. याकरताच वैद्यकीय क्षेत्रात तरी या सेकंड ओपीनियनला अनन्यसाधारण महत्व आहे.
फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.
उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.
या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे.
उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.
हे फक्त १०% झालं.
यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे.
तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.
तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली.
तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.
तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.
तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.
२० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.
दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले.
आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.
का?
कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.
तुमचा दिवस वाईट का गेला?
• त्याला कारण कॉफी होती?
• त्याला कारण मुलगी होती?
• त्याला कारण पोलीस होते?
• त्याला कारण तुम्ही स्वतः होता?
उत्तर
तुम्ही स्वतः
कॉफी चं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं. त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.
काय करायला हवे होते?
कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे" आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.
मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.
तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.
फरक पहा
दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.
खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो. उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.
९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे?
• जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका, पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा. त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या. चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.
• रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता? तुम्हाला राग येतो? तुम्ही दात ओठ खाता? स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता? मुठी आवळता? भांडायला जाता? तुमचा श्वासोत्वास वाढतो?
तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे?
९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.
तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काची ऑर्डर तुम्हाला न मिळता दुसऱ्याला गेली आहे असे तुम्हाला कळले तर?
• मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
• तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.
बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले
• संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
• पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
• वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
• आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा
९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुया
-- आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवर आलेले पोस्ट
अर्धशिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे. डोके कुठल्याही भागात किंवा संपूर्ण डोकेही दुखू शकते. अर्धशिशीमध्ये डोके खूप जोरात ठणकते ; परंतु बऱ्याच वेळा डोकेदुखीवर पोटात मळमळते किंवा उलटी होते. अर्धशिशी कोणालाही होऊ शकते. ती पुन्हा पुन्हा होते ; परंतु त्याची वारंवारता , तीव्रता व त्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो. मळमळणे किंवा उलटी होणे अशी लक्षणे सोबत येतात. त्याचा निश्चित कालावधी सांगता येत नाही.
ज्यांना कामाचा ताण असतो , त्यांना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होते. ध्यानधारणा आणि प्राणायाम केल्याने या त्रासापासून बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळू शकते.
काही पदार्थ असे आहेत ज्यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मिळतो. त्यात आल्याचं नाव सर्वात आधी घ्यावं लागेल. म्हणजे आल्याकडे आपण ' पेन रिलिव्हर ' म्हणून बघू शकतो. आल्याचा एक तुकडा घेऊन त्यावर थोडं लिंबू पिळा. चवीसाठी त्यावर थोडं काळं मीठ घाला आणि हलके चघळा. आलं चघळल्याने साधी डोकेदुखी थांबत असेल तर चिवट अर्धशिशीवरही नियंत्रण मिळवता येतं. आलं वेदना कमी करतं..
अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा. शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते अथवा सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते. अर्धशिशी म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखणे.हे दुखणे त्रासदायक असते व सूर्योदयापासून ते सुरू होते ते सूर्यास्तानंतर कमी होते.
ज्यांचं वारंवार डोकं दुखतं अशांनी दोन ते चार टेबलस्पून आळशीच्या बियांची पूड नियमितपणे दोन-तीन महिने खावी. आळशीच्या बियांची पावडर बनवण्यासाठी आधी त्या कोरड्याच भाजाव्या. चवीसाठी त्यात मीठ मिसळा.
-- सुषमा मोहिते
आरोग्यदूत WhatsApp ग्रुप
Copyright © 2025 | Marathisrushti