(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • फळांची सालही आहे शरीरासाठी उपयुक्त

    अनेकजण फळांची साल काहीच कामाची नाही म्हणत ती फेकून देतात. मात्र, त्यामध्येही भरपूर अँटिऑक्सिडंट आणि पोषक द्रव्ये असतात. तसेच ही साल आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर असते.

    जाणून घेऊया फळांच्या सालीचे फायदे..

    संत्रा - संत्र्यामध्ये असलेले फ्लेव्हनॉइड्स कोलेस्टेरॉल कमी करतात. एका अमेरिकन संशोधनानुसार संत्र्याच्या सालीमध्ये ज्यूसच्या तुलनेत २० पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. केकमध्ये या सालीचा वापर केल्यास चव येते.

    पपई - पपईचा गर टाचेवर चोळल्यास भेगा लवकर बर्‍या होतात. पपईमध्ये भरपूर ‘अङ्क जीवनसत्त्व आणि पापेन नावाचा घटक असतो. यामुळे मृत पेशींपासून मुक्तता मिळते.

    डाळिंब - पोटाशी संबंधित विकार झाल्यास डाळिंबाची साल पाण्यात उकळून घ्या. तसेच त्यात दालचिनीचे काही तुकडेही टाका. थंड झाल्यावर हे
    पाणी प्राशन करा. हे पाणी दररोज तीनवेळा पिल्यास पीडितास फायदा मिळतो.

    सफरचंद - सफरचंदाच्या सालीमध्ये अरसोलिक अँसिड नावाचे रसायन असते. त्यामुळे ही साल एवढी चमकदार असते. सालीसह सफरचंदाचे सेवन केल्यास स्नायूंचा विकास होतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.

    केळी - शोच्या झाडांची पाने चमकदार बनवण्यासाठी केळीच्या सालींचा वापर केला जातो. केळीची साल नैसर्गिक कीटकनाशकाचे आणि खताचे कामही करते. जखम झाल्यावर केळीच्या सालीचा मऊ भाग लावल्यास आराम मिळतो.

    नाशपाती - या फळाच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेल्या क्लोरोझेनिक अँसिड अँटिऑक्सिडंट आणि फ्लोरेटिन नावाच्या फ्लेव्होनॉइडमुळे कँसरग्रस्त पेशी पसरत नाहीत. त्यामुळे या फळाचे भरपूर सेवन केले पाहिजे.

    पीच - या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आणि ‘अङ्क जीवनसत्त्व असते. या फळामुळे त्वचा कोरडी राहते. याच्या सालीत साखरेचे काही दाणे ठेवून चेहर्यावर
    चोळल्याने त्वचेच्या मृत पेशी हटतात आणि चेहरा उजळतो.

    किवी - या फळाच्या सालीमध्ये गराच्या तुलनेत तिप्पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच या फळाच्या सालीमुळे अँलर्जी होत नाही आणि प्रतिकारशक्तीही वाढते. हे फळ विषबाधेस जबाबदार असलेल्या स्टेफिलोकोकससारख्या जिवाणूंपासूनही संरक्षण करते.

    (आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन)

  • मधुमेहापासुन मुक्ती

    मधुमेहापासुन कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत.

    अतिरिक्त साखर पेशंटच्या रक्तात व लघवीत असेल तर त्याला वरचेवर लघवीला जावे लागते. तहानही खूप लागते तसेच भुकही वाढते. वजन वाढते किंवा कमी होते.

    मधुमेहात रक्तातील साखर वाढते, ती १४० च्या वर राहिली तर काही वर्षानंतर हृदय, डोळे, किडणी या महत्वाच्या अवयावांवर परिणाम होतो.

    सगळ्या मधुमेहीनी हे जाणणे गरजेचे आहे की, त्याच्या शरीरात साखरेच्या व्यवस्थापणामध्ये अडथळे येण्याआधी काही अन्य मुळ कारणे असतात. ज्यामुळे मधुमेह होतो. त्यात महत्वाचे म्हणजे -शरीरात चरबी वाढणे, आम्लता वाढणे व पोषकद्रव्यांचा अभाव निर्माण होणे. बहुतांश टाईप २ मधील मधुमेहीमध्ये या तिन्ही बाबींचा कमी जास्त प्रमाणात समावेश असतो. टाईप २ मधुमेह साधारणपणे ९५% भारतीयांमध्ये आहे. तो वयाच्या पंचविशीनंतर सहसा होतो व गोळ्याची सुरवात होते.
    टाईप १ मधुमेह साधारणत: ५ % भारतीयांमध्ये आहे. हा लहानपणी होतो आणि यात बाहेरुन इन्सुलिन घ्यावेच लागते.

    या सर्व मुद्यावर मात करण्यासाठी "फ्रिडम फ्राँम डायबेटीस" या संस्थेने एक सहज, साधी सोपी योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती व सकारात्मकता वाढविणारी कार्यप्रणाली विकसित केली आहे.

    "रोज हिरवी स्मूदी घ्या व उत्तम आरोग्य मिळवा." हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. आजवर लाखो मधुमेही महाराष्ट्र व देशभर रोज स्मूदीचे सेवन करून स्वत:चे कल्याण करून घेत आहेत.

    स्मूदीची पाककृती अशी आहे-

    १. पालक, चुका, चाकवत, राजगिरा इत्यादी पालेभाज्यां पैकी एका भाजीची सात-आठ पाने व्यवस्थित धुवून मिक्सर मध्ये टाकावीत.
    २. पुदीना वीस-पंचवीस पाने व विड्याचे एक पान त्यातच घालावे.
    ३. कधीतरी तुळस, कढीपत्ता, कोथिबीर आलटुन पालटुन चवीनुसार वापर करू शकता.
    ४. एक फळ शरीरातील साखरेचा अंदाज घेऊन वापरावे.
    ५. "रक्त तपासणीत जेवणापुर्वीची साखर १०० पेक्षा जास्त व जेवणानंतरची साखर (दोन तासानंतर) १४० पेक्षा जास्त असल्यास सफरचंद किंवा पेर वापरावा." कमी असल्यास केळे किंवा चिक्कु वापरता येतो.
    ६. या बरोबर दालचिनी पावडर व काळी मिरी पावडर चिमुट भर, सौंधव मीठ अर्धा चमचा, अर्धा लिंबाचा रस वापरावा.
    ७. पाणी एक ग्लास घालुन ३ मिनीट फिरवावे.

    हे मिश्रण न गाळता ही हिरवी स्मूदी सकाळी उठल्यानंतर शक्यतो एका तासाचे आत प्यावी.

    स्मूदीचे प्रमाण वाढविले की, प्रकृतीही लवकर सुधारते. घरातील लहान मुलांना व निरोगी सदस्यांनाही ही स्मूदी द्यावी. त्यांना खजुर किंवा गोड फळ घालुन दिल्यास खुप आवडते. हिरवी स्मूदी सर्वच परिवारासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.

    या व्यतिरीक्त नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये, डाळींचे धिरडे, डोसे, अप्पे, थालपीठ यावर भर द्यावा. "पोहे, उपमा सकाळी नाष्ट्याकरीता टाळावा" जेवणात धान्य, डाळ, भाजी व सलाड समप्रमाणात खावे. जेवणानंतर दोन तासाने एखाद्या ८- १० पाय-यांचा जीना क्षमतेनुसार वर खाली करावा. याने जेवणानतरची साखर लवकर आटोक्यात येते.

    'फ्रीडम फ्राँस डायबेटीस' च्या या शुध्द व नैसर्गिक प्रणालीवरील स्मूदीमुळे ५००० हून अधिक मधुमेही औषध व एक हजारहून अधिक इन्सुलिन पासुन पूर्णपणे मुक्त झाले आहेत.

    या लोकांनी चक्क "ग्लुकोज टोलरन्स टेस्ट" ही पास केली आहे. ही टेस्ट करण्यासाठी, एखाद्या तपासणी केद्रांवर जाऊन उपाशी पोटी एका वेळेस १५ चमचे साखर (म्हणजे ७५ ग्रँम्स शुध्द ग्लुकोस) ३०० मिली पाण्याबरोबर घ्यावी लागते. जुन्या मधुमेहींना ही टेस्टपास करणे अतिशय अवघड असले तरी अनेकांनी ही टेस्ट पास केली आहे.

    या स्मूदीचा मधुमेहाबरोबर शैकडोंना अतिरीक्त वजन कमी करण्यास, कोलेस्टोल, रक्तदाब, थायराँईड, आम्लपित्त, सांधेदुखी इ. आजारामध्येही भरपुर फायदा झाला आहे.

    संकलन,
    विकास दांगट,
    पुणे. 9423094303

  • आरोग्यासाठी गोमातेची उपयोगिता

    गाय हा अत्यंत उपयोगी प्राणी आहे. त्याची उपयोगिता समजावणारा हा लेख.. 

  • केमिकल फ्री’ अन्नासाठी…

    १. नैसर्गिक पद्धतीनं शेती केलेलं अन्न खाणं चांगलं. म्हणजेच ऑरगॅनिक फूड. त्यात रसायनं असण्याची शक्यता नसते. त्यामुळे ज्या-ज्या वेळी शक्य असेल त्यावेळी ऑरगॅनिक फूड घ्या.

    २. साखर कमीत कमी वापरावी किंवा बंदच करावी. थोडी तरी साखर शरीराला हवी, हा गैरसमज आहे; कारण नैसर्गिक साखर आपल्याला गहू, भात, फळं यातही मिळत असतेच. साखरेऐवजी गोडीसाठी शुद्ध मध किंवा 'केमिकल फ्री' गूळ वापरावा.

    ३. तेल-रासायनिक प्रक्रिया करून शुद्ध केलेलं तेल वापरण्यापेक्षा मशिनच्या माध्यमातून शुद्ध केलेलं तेल वापरावं. गाळलेलं किंवा घाण्यावरचं तेल वापरलं तर उत्तम.

    ४. कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ वापरा. उदाहरणार्थ, सफरचंद नुसतं खाणं उत्तम, त्याचा रसही ठीक; पण त्याचा जाम मात्र भरपूर प्रक्रिया केलेला, निःसत्त्व आणि साखरेमुळे खूप जास्त कॅलरीजचा असतो. म्हणूनच पदार्थ जास्तीतजास्त त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात खावं. बाहेर स्ट्रॉबेरी, मँगो असे ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम मिळतात; परंतु त्यात केवळ कृत्रिम स्वाद वापरलेला असतो

    ५. भाज्या ताज्या आणि त्या त्या मोसमात खालेल्या जास्त चांगल्या; कारण त्यावेळी त्यांच्यात जीवनसत्त्वं आणि क्षार जास्तीत जास्त असतात. साठवलेल्या, पावडर केलेल्या, फ्रोझेन भाज्यांमध्ये नैसर्गिक सत्त्वं कमी आणि रसायनं अधिक असू शकतात. भाज्यांच्या सूप पावडरचं पाकीट वाचल्यावर त्यात किती अनैसर्गिक गोष्टी आहेत, ते आपल्याला कळेल.

    ६. घरचं अन्न घेणं कधीही चांगलं. हॉटेलमधील भाज्या छान दिसण्यासाठी त्यात रंग वापरले जातात.

    ७. मिठाई वरचा वर्ख आणि त्यातील कृत्रिम रंगही शरीराला हानिकारक ठरतात. असेच रंग केक, पेस्ट्रीज, बर्फाचा गोळा, गोळ्या यातही वापरले जातात म्हणून यांचा वापर कमीत कमी करण्यावर भर द्यावा. घरी केलेला नाचणी केक वगैरे उत्तम.

    ८. मासे किंवा फिश यात ओमेगा फॅट्स असतात. आकारानं मोठ्या माशांमध्ये मर्क्युरीचं प्रमाण जास्त असतं. यासाठी आकारानं लहान मासे घ्यावेत.

    गजानन वैद
    whats app -7775871809

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

  • जेवणात काय ”हवेच” ?

    'अरे आमच्या घरी काय कमी आहे . . सांगच तू मला . . काजू बदामाचे डबे भरलेले आहेत . . रोज सलाड , ज्यूस आमच्यात असतातच , फूड च्या बाबतीत कुठंच 'कॉम्प्रमाइज ' करत नाही आम्ही . . . तरी आमच्या अंगी का लागत नाही ?? ''

    वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना वरील संवाद नवा नाही . अंगी लागत नाही ही समस्या सर्वत्र आहे . . अनेक रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण खाल्लेले अंगी मात्र लागत नाही . आता हे अंगी लागणे म्हणजे काय ?? तुम्ही बॅंकेत 1000 रुपये भरले की काही वेळाने तुम्हाला ते 1000 रुपये खात्यात दिसतात . . आपण काय म्हणतो ? पैसे खात्यात जमा झाले . . हाच नियम शरीराला लावा . . तुम्ही खाल्लेले अन्न त्याचे व्यवस्थित पचन झाल्यानंतर तुमच्या शरीरावर दिसते . . लोक सुदृढ दिसतात . . 'खात्या पित्या घरातला/घरातली दिसत आहे '' हे याच प्रकारातले . . पण खाल्लेले अंगावर दिसतच नसेल तर ?? भरपूर ड्राय फ्रुट्स , ज्यूस , सलाड , कॉर्न फ्लेक्स ह्याव त्याव खाऊन पण गाडी पाप्याचं पितर असेल तर काय करावे ??

    ब्लड टेस्ट्स ? सप्लिमेंट्स ?? चीज ? अरे हो . . . थांब जरा !!

    शंकराचार्य म्हणतात '' जितं जगत्केन ? मनोहि येन । '' ज्याने आपले मन जिंकले त्याने जग जिंकले . . आपली परिस्थिती उलटी आहे . . आपण जग जिंकतो पण मनाचे काय ?? ते सैराट असते . . . त्यात ना शांतता , ना समाधान , ना स्थैर्य . . . जगभरातील तत्ववेत्त्यांचे विचार डोक्यात असतात पण आचरणात शून्य . . अशा मनस्थितीत जेवण केले तर अंगी कसे लागेल भाऊ ?? आमचे आचार्य चरक म्हणतात -

    ''प्रसन्न चेतसा भुञ्जीत । '' म्हणजे प्रसन्न मनाने जेवावे . . .

    असं होतं का ?? नाही होत . . . . जगाच्या चिंता डोक्यात घेऊन , प्रगती करणाऱ्याला चार शिव्या हासडत , घरातील कलहात डोकं आपटत केलेले जेवण कधीच अंगी लागत नाही . त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आहारात काय ठेवू ?? हा प्रश्न मला विचारला तर मी सांगेन '' आधी प्रसन्न मन ठेव . . . मग बाकीचे बघू ''

    वैयक्तिक अनुभवावरून सांगतो , जेवण करत असताना टीव्ही बंद करून , शास्त्रीय -नाट्य संगीत ते शक्य नसेल तर नामस्मरण इत्यादी केल्याने जेवण केल्याची तृप्ती येते . . ज्या दिवशी हे नाही जमत त्या दिवशी जेवण सुद्धा ' जॉब डन ' या वर्गात टिक मार्क केल्या सारखे होते . . . तुमचा काय अनुभव ??

    वैद्य अंकुर रविकांत देशपांडे
    9175338585

    आयुर्वेद कोश (https://web.facebook.com/aarogyakosh/ )

    (लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

  • दातासंबंधीचे समज-गैरसमज

    दातासंबंधीचे जे समज-गैरसमज दातांच्या डॉक्टरांकडे जाण्यापासून बऱ्याचदा आपण या समज-गैरसमजामुळे परावृत्त होतात. दातांच्या बाबतीतला सर्वात लोकप्रिय गैरसमज जर कुठला असेल तर दात काढल्यानंतर नजर कमी होणे किंवा डोळ्यांची बघण्याची क्षमता कमी होणे हा होय. आणि या बाबतीत लहानथोरांपासून सर्व जनमाणसांत एकवाक्यता आहे. खरं म्हणजे दात काढल्यानंतर डोळ्यांवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. याला शास्त्रीय आधार आहे.

    दाताला आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी तसेच संवेदनांचे ज्ञान असणारी चेतातंतू किंवा नसा या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दात काढल्यानंतर डोळ्यांवर परिणाम होणे शक्य नाही. हा गैरसमज पसरण्याला काही कारणे आहेत. बऱ्याचदा दातांची समस्या आपण प्रौढ वा चाळिशीत असताना होते. (खरं म्हणजे चाळिशीत सर्वच अवयवांची थोडय़ाफार प्रमाणात कुरकुर चालू होते.) त्यातच दात काढल्यानंतर आपल्या मनात असलेल्या गैरसमजामुळे आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे डोळे तपासायला जातो. या चाळिशीत इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांचीही क्षमता थोडीफार कमी झालेली असतेच (कदाचित यामुळेच चष्म्याला ‘चाळिशी’ असंही काही ठिकाणी म्हणतात.) त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टरांनी चष्मा लावायला सांगताच आपण दातांचा काढण्याचा व डोळ्यांचा खराब होण्याचा संबंध लावतो. परंतु शास्त्रीयदृष्टय़ा हे खरे नाही. अगदी लाखात एखादा पेशंट जो वरच्या दातांवर प्रचंड सूज येऊन ती डोळ्यापर्यंत पोहचेपर्यंत जर डॉक्टरांकडे गेला नाही किंवा त्याचे इन्फेक्शन अनियंत्रित होऊन डोळ्यापर्यंत गेले तरच डोळ्यांना इजा होऊ शकते. परंतु हे प्रमाण लाखात एखादा वा त्याहूनही कमी असते. कारण हल्ली सर्वजण आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात.

    दातांबद्दलचा अजून एक लोकप्रिय गैरसमज म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन क्लिनिंग केल्यानंतर दात हलतात. हा गैरसमज पसरण्यामागची पाश्र्वभूमी आपण समजून घेऊ या. जेव्हा आपण आपल्या डेंटिस्टकडे दात साफ करण्यासाठी जातो किंवा डेंटिस्ट आपल्याला दात साफ करण्याचा सल्ला देतात तेव्हा दातांमध्ये किंवा हिरडय़ांमध्ये अन्नकण अडकून त्याचा ‘प्लाक’ (एक प्रकारचा छोटासा चिवट दगडासारखा घट्ट पदार्थ) तयार झालेला असतो व तो दातांच्या फटीमध्ये व हिरडी व दात यांमध्ये घट्ट चिकटलेला असतो. त्यामुळे हिरडय़ांना इन्फेक्शन होऊन हिरडय़ांतून/दातांतून रक्त वाहते वा मुखदरुगधीचा त्रास संभवतो. ज्यावेळी डेंटिस्ट आपले दात साफ करतो त्यावेळी हा ‘प्लाक’ काढणे गरजेचे असते. हा प्लाक काढल्यानंतर दात व हिरडी येथे एक प्रकारची जागा तयार होते. त्यामुळे काही काळ आपल्याला दात थोडेसे हलल्यासारखे वाटू शकतात. परंतु ही तात्पुरती जाणीव असते. काही तासांत ती जागा भरून येऊन हिरडी व दात एकमेकांना घट्ट चिकटतात. त्यामुळे रुग्णांनी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. उलट दातांच्या व हिरडय़ांच्या आरोग्यासाठी वर्षांतून एकदा तरी आपल्या डेंटिस्टकडे जाऊन दात साफ केल्याने त्यांचे आयुष्य वाढतेच.

    प्लाक काढल्यानंतर दातांच्या व हिरडय़ांमध्ये पोकळी भरून येणाऱ्या काळात अति थंड किंवा अति गरम पदार्थ टाळावेत. कारण या काळात दातांच्या व हिरडय़ांच्या मधला भाग संवेदनशील असतो वा जेथे चेतातंतू जास्त उद्दीपित होतात तेथे थंड व गरम पदार्थाने काही काळ दाताला ठणके बसू शकतात. परंतु हाही तात्पुरता बदल असून काही काळाने त्रास जाणवत नाही. शिवाय यात एक फायदा असाही आहे की डेंटिस्टला दात साफ करताना आपला एखादा दात जर किडण्यास सुरुवात झाली असेल तर तो प्राथमिक अवस्थेत ध्यानात येऊन कमी खर्चात व कमी वेळेत तो वाचण्याची शक्यताही असते.

    दात साफ करताना एक भीती मनात घर करून असते ती म्हणजे आपले दात झिजतील का किंवा साफ केल्याने पातळ होतील का? हा गैरसमज होण्याचे एक कारण म्हणजे डेंटिस्ट दात अल्ट्रासोनिक स्केलरसारख्या मशीनने साफ करतात.

    शिवाय दात साफ केल्यानंतर काही वेळा थंड पाणी व गरम चहा पिताना दात सळसळतात. यातील पहिले कारण प्रथम शोधू. अल्ट्रासोनिक स्केलर हे जरी मशीन असले तरी ते फक्त व्हायब्रेशन या तत्त्वावर काय करते. त्यात दात घासण्याच्या किंवा दात कटिंग करण्याच्या उपकरणाचा समावेश नसतो. फक्त व्हायब्रेशन होऊन दातांमधला फ्लक किंवा डाग काढले जातात. हे अतिशय नाजूक व चांगले मशीन असून यामुळे दातांची व हिरडय़ांची कुठलीही झीज होत नाही. मात्र दुसरे कारण काही प्रमाणात खरे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मानसिक आजाराची सुरुवात कशी होते ?

    मानसिक आजारामधे सुरूवातीला झोपेच्या तक्रारी सुरु होतात. त्यामधे झोप लवकर लागत नाही, पहाटे लवकर जाग येते , मधेमधे सारखी जाग येते, निद्रानाश, नाईट मिअर (यामध्ये त्या व्यक्तीस झोप लागते, परंतु भायानक स्वप्ने पडल्यामुळ ती जागी होते )

    २) व्यक्तीच्या कामातील तक्रारी वाढतात. ती व्यक्ती मन लावून काम करत नाही. त्याला कामात गोडीच वाटत नाही , मनावर कसलेतरी दडपण आसलेचे जाणवते, ती व्यक्ती कामावर जाण्याची टाळाटाळ करु लागते , ती व्यक्ती कामामधे एकाग्र होऊ शकत नाही. अशा व्यक्तीचे एकाच कामामध्ये लक्ष न लागल्यामुळ कामामध्ये सतत बदल करण्याची प्रवृत्ती आढळते.

    ३) व्यक्तिगत संबंधामधे बिघाड निर्माण होतो. त्या व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असलेले परस्पर संबधामधे बदल झालेला आढ़ळतो, ती व्यक्ती दुस-या व्यक्तीना टाळायला लागते, ती व्यक्ती स्वत: एकटी /एकल कोंड़यासारखी राहू लागते.

    ४) वर्तन - काही रुग्णाचे स्वत:कडे अजिबात लक्ष नसते , त्यांच्या अंगावरील कपडे अस्वच्छ असतात, ते रहातातही अस्वच्छ, अंघोळ करीत नाहीत , दाढ़ी करत नाहीत. त्यामुळे त्यांचे केस व दाढ़ी वाढलेली असते . याउलट काही रुग्ण अतिभडक मेकअप करतात काही रुग्ण उगाचच विचित्र हातवारे करीत राहतात.

    ५) भावना - काही रुग्णामध्ये भावना नियंत्रित नसतात. काही गोष्टी व्यक्ती बारीक सारीक आठवाणीनी रडतात किवा हसतात .

    ६) विचार - व्यक्ती चे विचार हे त्याच्या बोलण्यातून समजतात. व्यक्ती खूप बोलकी असते ,बोलत असतानाच एका कल्पने वरून दुसऱ्या कल्पने वर जात असते. त्या व्यक्ती च्या बोलण्यात सुसंगतपणा नसतो, बोलणे असंबधित असते . त्यातून काहीच अर्थ बोध होत नाही.

    ७) भ्रम /विचारातील बिघाड - भ्रम हा एक विचित्र खोटा आणि असंभाव्य असा विश्वास असतो . या विश्वासालाच सत्य धरून ते चालत असतात. त्यांना खूप समजावून सांगून ,खरे -खोटे याची समजूत घालून सत्याचा पुरावा त्यांचा समोर ठेवला तरी ते मानत नाहीत .

    ८) आकलन - यांमध्ये रुग्णाला स्थळ, काळ, व व्यक्ती या तीनही गोष्टीचे आकलन नसते. या आजारामध्ये स्मरणशक्ती कमी होते, स्मृतीवर परिणाम झालेला आढळतो.

    Fb -गजानन वैद
    whats app-7775871809

    चिकित्सक सल्ला घ्यावा....

  • ताम्र शेंगी

    हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.

    2005मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी बघितले. 85--150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.

    माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140--240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90--140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.

    आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे ) याचे बीपी 100--200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85--140 होते

    वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.

    ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे---एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8--10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4ते 6 डोस घ्यावेत

    ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे--पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत.नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.

    अरविंद जोशी B.Sc.
    गौरव अपार्टमेंट,विश्वमेडीसिन मागे,
    सनसिटी रस्ता, आनंदनगर,
    सिंहगड रोड, पुणे

    फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा

    https://drive.google.com/file/d/0B_d0-zthRBc1ZEJQVXhMeXhtZVU/view?usp=drivesdk

  • बाळाला द्या कॅल्शिअम

    बाळ उन्हात खेळतंय. खेळू दे की! बाळ खूप दूध पितंय. पिऊ दे की! बाळाच्या हाडांच्या बळकटीसाठी ते आवश्यकच आहे. आपलं बाळ जर सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळत नसेल, दूथ प्यायचा कंटाळा करीत असेल तर तीच चिंतेची बाब समजा. बाळाला कॅल्शिअमची गरज आहे, हे वेळीच ओळखा.

    बाळाला दूध प्यायला आवडत नाही, खूप लवकर दूध पिणं सोडलं आहे बाळानं असं जेव्हा एखादी आई लाडानं सांगते, तेव्हा माझा चेहरा चिंताक्रांत होतो. बाळाच्या भविष्याच्या दृष्टीनं सर्वात वाईट गोष्टच ती आता लाडानं सांगत असते. बाळाची त्वचा गोरीपान राहावी म्हणून त्याला अजिबात उन्हात जाऊ देत नाही, असं जेव्हा एखादी आई प्रेमानं सांगते, तेव्हाही मी असाच हताशपणे तिच्याकडे पाहात राहतो. आपण बाळाची काळजी घेत नाही आहोत, तर त्याच्यासाठी काळजी करावी अशी परिस्थिती निर्माण करीत आहोत, हेच त्या आईला माहित नसतं.

    लहान मुलांमध्ये मुडदूस वाढतो आहे. गुडघ्याखालील पायाचा बाक व फ्रॅक्चरचे प्रमाणही वाढत चाललं आहे. याला मुख्यत्वेकरून आपल्या बदललेल्या खाण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती व गतीमान जीवन कारणीभूत आहे. आपण अकारण व अयोग्य रीतीनं बाळ वाढवत आहोत, हेही त्यामागचं एक कारण आहे. बाळाला त्याच्या वाढत्या वयात कॅल्शिअम पुरेशी मिळत नाहीत, हे यामागचं कारण असतं.

    बाळ पोटात असताना व जन्मानंतरही सहा ते नऊ महिन्यांपर्यंत बालकाला आवश्यक असलेलं कॅल्शिअम आईकडून दुधातून मिळतं. त्यानंतर मात्र ही गरज पोषक आहारातून भागवली जाणं गरजेचं असतं. त्यासाठी दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, सोया, मासे हे परिपूर्ण असतात. त्यामुळे बाळाला हा वरचा आहार सुरू करणं आवश्यक असतं. बालकाचं वय एक ते तीन वर्षे असताना त्याला दरदिवशी 500 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे कॅल्शिअम दोन कप दुधातून मिळू शकतं. मुलाचं वय चार ते आठ वर्षे असताना त्याला दर दिवशी 800 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे तीन कप दुधातून मिळू शकतं. वय 9 ते 18 वर्षे असताना त्याला दरदिवशी 1300 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे चार कप दुधातून मिळू शकतं. एवढं दूध एकाच वेळी घेण्याची गरज नाही. तर दिवसभरात तेवढं दूध घेणं आवश्यक आहे. प्रत्येक जण एवढं दूध दिवसभरात घेईलच असं नाही. जेवढं दूध घेणं शक्य आहे, तेवढं त्यानं घ्यावं. उर्वरित कॅल्शिअम मिळवण्यासाठी त्यानं आपल्या आहारात वर उल्लेखलेल्या इतर गोष्टींचा समावेश करावा. त्यामुळेही योग्य तेवढे कॅल्शिअम मिळू शकतील. कॅल्शिअमच्या गोळ्या घेण्याऐवजी अन्नातून ते मिळवण्याकडे कल असला पाहिजे.

    प्रामुख्यानं मुडदूस होण्यामागे "ड‘ जीवनसत्त्वाचा अभाव असतो. "ड‘ जीवनसत्त्वाच्या गोळ्या मिळतात. परंतु नैसर्गिक प्रकारात हे जीवनसत्त्व सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून त्वचेखाली तयार होतं. त्यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणं जरुरी आहे. मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनाही उन्हाचा स्पर्श व्हायला हवा. आपण कार्यालयातून वातानुकूलित वातावरणात दहा-बारा तास काम करतो. व्यायामाचा अभाव आहे. उन्हाची झळा लागू नये यासाठी आपण सकाळीच कडेकोट बंदोबस्तात बाहेर पडतो. असे करू नये. दुपारच्या उन्हाचा तडाखा डोक्याला लागू नये हे ठीक आहे, पण सकाळी कोवळे ऊन अंगावर घ्यायला हवे. सूर्यस्नानाची कल्पना यासाठीच आहे. पूर्वजांनी घातलेल्या रीती आपण किती सहजासहजी विसरून गेलो आहोत! "ड‘ जीवनसत्त्व हेच कॅल्शिअम शोषून घेण्यास व हाडांमध्ये स्थिर करण्यास मुख्यत्वेकरून कारणीभूत असते. त्यामुळे "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता होऊ देऊ नये.
    जसं वय वाढतं, तशी हाडांची घनता वाढत जाते. सर्वांत जास्त ती 15 ते 18 या वयात होते व नंतर ती हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जर लहानपणीच चांगला आहार ठेवून हाडं बळकट बनवली तर मोठ्या वयात फ्रॅक्चर व हाडांच्या ठिसूळपणाचं प्रमाण कमी होऊ शकतं.

    मुडदूस हे आहारात कॅल्शिअम व "ड‘ जीवनसत्त्व कमी झाल्यास किंवा मूत्रपिंडाच्या विकारानं होऊ शकते. मुडदूसमध्ये गुडघ्याखालील पायाच्या हाडाला बाक येणं, टाळू उशिरा भरणं, मनगटावर सूज येणं असं होऊ शकतं. असं आढळल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशावेळी रक्ततपासणी व एक्सरेद्वारे याचं निदान होऊ शकतं व औषधांनी हे पूर्णपणे बरं होऊ शकतं.

    जवळजवळ सर्वच मुलांमध्ये एक वर्षापर्यंत व्ही लेग्ज (पायांमध्ये थोडी कमान) असते, जी दीड वर्षापर्यंत नाहीशी होते. दोन ते चार वर्षे वयोगटात नॉक नीज (गुडघे जवळ येऊन पावलांतील अंतर वाढणे) दिसून येतात. चार ते आठ वर्षांपर्यंत नैसर्गिकरीत्या सरळ होऊन जातात. या वयात, कुठल्याही टप्प्यावर जर कॅल्शिअम अथवा "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाली तर तो बाक तसाच राहतो. हे टाळायचं असेल तर दुधाला पर्याय नाही. म्हणून मुलांना लहान वयातच दूध पिण्याची चांगली सवय लावा. काही वेळा मुलांना दूध आवडत नाही, अशावेळी मिल्कशेक किंवा लस्सी मुलांना आवडत असेल तर द्या. पण आवश्यक तेवढे कॅल्शिअम त्यांना मिळू द्या.

  • वार्धक्यातील दिनचर्या कशी असावी

    वार्धक्यातील आजार टाळण्यासाठी दिनचर्या आहार-विहार, नियमितपणा फार महत्वाचा आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुष:

    ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे उठावे, बाहेर फिरायला जावे. यावेळी वातावरणात प्रदूषण कमी असते व शरीरातील मलमूत्र इ. अधारणीयवेग निर्माण होण्यास त्याचप्रमाणे मन व शरीर उल्हासित, आनंदी रहायला उपयुक्त आहे. कोमट पाणी तोंडावाटे प्यावे. जमल्यास वातप्रकृती व्यक्तीने तुप व कोष्ण जल प्यावे. तसेच कफ प्रकृतीच्या व्यक्तीने फक्त गरम पाणी प्यावे. मध हा गरम पाणी किंवा गरम पदार्थाबरोबर कधी घेऊ नये.

    अभ्यंग- संपूर्ण शरीराला स्निग्ध अशा तेलाने मर्दन करणे, म्हणजे मालिश करणे. आयुर्वेदात प्रत्येकाने रोज न चुकता अभ्यंग केलेच पाहिजे, असे आवर्जून सांगितले आहे. क्षणोक्षणी झिजणाऱ्या शरीरयंत्राला तेल दिल्याने त्या शरीरयंत्राच्या सर्व अवयवरूपी लहान मोठ्या भागाची झीज कमी होते. आयुष्यमान वाढते. शरीराला रोज अभ्यंग करणे शक्य नसल्यास डोके, पाय व कान यांनातरी तेल मर्दन करावे. अभ्यंग साधारणपणे संपूर्ण पाच मिनिटे करावे. अभ्यंगासाठी तिळतेल हे सर्व श्रेष्ठ आहे. ते नसल्यास साधे गोडतेल, खोबरेल तेल वापरावे. त्यानंतर उटण्याने स्नान करावे. साबण शक्यतो टाळावा. त्यामुळे होणाऱ्या त्वचारोगाला आळा बसतो. उटणे नसल्यास डाळीचे पीठ व त्रिफळाचूर्ण वापरावे.