वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे.
August 27, 2023
ओल्या कचऱ्याचा संपूर्ण पुनर्वापर आपल्याला करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरातल्या कचऱ्याचे सुरीने कापून त्याचे बारीक तुकडे केले अथवा पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक चटणी केली आणि ती घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यात टाकली तर कुंड्यांतील रोपे भराभर वाढतात.
June 2, 2023
गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल.
August 27, 2023
शिवाजी महाराज हे नाव समोर आले कि नकळत आपल्या मुखातून जय भवानी जय शिवाजी हे उद्गार बाहेर पडतात कारण त्यांनी हिंदुस्तानात स्वराज्य स्थापन केले होते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य.ते एक थोर युगपुरुष होते.
शिवजन्मापूर्वी म्हणजेच सुमारे चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विजापूरचा आदिलशहा व अहमदनगरचा निजामशहा या दोन सुल्तानांचा कारभार होता.परंतु ते दोघेही एकमेकांचे हाडवैरी होते.त्यांच्यात नेहमीच लढाया होत त्यामुळे जनतेचे फार हाल होत. रयत सुखी नव्हती.माता जिजाऊंनी हे सर्व पहिले होते.त्यांना फार वाईट वाटे.रयतेला सुखी करण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना सारखे वाटे.महाराष्ट्राच्या जनतेला सुखी करण्यासाठी मला एक शौर्यवान पुत्र दे असे त्यांनी आई तुळजाभवानीला साकडे घातले आणि म्हणूनच कि काय देवीने त्यांचे मागणे मान्य केले आणि १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर महाराष्ट्राचे दैवत शिवराय जन्माला आले.जन्म शिवनेरीवर झाला म्हणून सनई चौघड्याच्या सुरात बाळाचे नाव ठेवले "शिवाजी".
आई जिजाऊंनी बालपणी शिवरायांवर छान संस्कार केले.राम-कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या.महाराष्ट्राच्या जनतेला सुखी करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे हे पटवून दिले.शिवरायांनीजनतेवर होणारा पहिला होता अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी मावळे जमविण्यास सुरवात केली.अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वाराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि तोरणा गड जिंकून आपल्या कार्यास सुरवात केली.
त्यानंतर त्यांनी अनेक लढाया ,किल्ले जिंकले.पोर्तुगीज ,मुघल,औरंगजेब,आदिलशहा,निजामशहा या सत्तांचा पाडाव करून स्वराज्य स्थापन केले.त्यात त्यासाठी तानाजी मालसुरे,बाजीप्रभू देशपांडे अश्या अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.सतत २० वर्षाच्या अविश्रांत श्रमातून शिवरायांनी स्वतंत्र आणि सार्वभौम्य असे स्वराज्य स्थापन केले होते.
शिवराय फक्त महाराष्ट्राचेच नव्हते तर ते संपूर्ण राष्ट्राचे होते .त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले होते. म्हणूनच त्यांचे चरित्र पुन्हा पुन्हा सांगावेसे आणि ऐकावेसे वाटते.
आदर्श पुत्र,सावध नेते,सज्जनांचे कैवारी आणि एका नव्या युगाचे निर्माते असे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत.हे सर्व पहिले कि पुन्हा पुन्हा वाटते ,
शिवरायांचे आठवावे ते रूप
शिवरायांचा आठवावा तो प्रताप
शिवरायांचा आठवावा तो प्रताप
धन्यवाद.
December 8, 2017
स्वस्त्यात पुस्तक ही काय मला सुवर्णसंधी वाटत नाही आणि उगाच माफक किॅमतीत पुस्तक मिळतंय म्हणून पुस्तकं घेणं आणि शोपीस म्हणून घरात ठेवणं हे ही मला पटत नाही. तरीही मी अशा पुस्तक प्रदर्शनात जात असतो. न जाणो एखादं उत्तम जुनं पुस्तक सापडूनही जाईल म्हणून.
December 3, 2018
जगदंबेचे स्वरूप आहे तेज. त्या तेजानेच ज्ञान होते. दिवसा सूर्य, रात्री चंद्र, अंधारात दीप इत्यादी तेजाचे सर्व प्रकार आई जगदंबेच्या कला आहेत. या सगळ्यांच्या द्वारे ती ज्ञान प्रदान करते. यापैकी कोणते ना कोणते साधन सदैव उपस्थित असल्याने तिला विनिद्रा असे म्हटले.
January 29, 2020
संस्कारात वाढलेली पिढी आज निर्वात पोकळीत वाढत आहे.आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे. अशी गाणी आता इतिहासजमा झाली की काय?
फ्लॅट संस्कृतीत कोणी येतच नाही. टपाल किंवा खाद्यपदार्थ घेऊन येणारी माणसे, तीही ठरवून येतात. बोलावल्याशिवाय माणसाने येऊच नये अशी तजवीज माणसानी करून ठेवली आहे.नाच रे मोरा आंब्याच्या वनात ही गाणी मुलांनी कुठे अनुभवायची. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.पण दादाला आता सांगायची गरजच पडत नाही. दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ म्हणण्यासाठी दादी कुठे आहे?
June 16, 2026
२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.
January 11, 2010
कोन बनेगा करोडपती मध्ये प्रत्येकाला मान देणारा, न्याय देणारा, समजून घेणारा,खोटं खोटं न हसणारा, गंभीर होणारा अभिताभ. एकेक नायक एक एक पिढीवर राज्य करत असतो, अनेकांच्या मनावर राज्य करत असतो.
March 25, 2025
हा विजय इतिहासात सोनेरी अक्षरात लिहण्यासारखा आहे. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले चौथे युद्ध मे ते जुलै असे तीन महिने चालले होते.
July 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti