मानसिक आजारामधे सुरूवातीला झोपेच्या तक्रारी सुरु होतात. त्यामधे झोप लवकर लागत नाही, पहाटे लवकर जाग येते , मधेमधे सारखी जाग येते, निद्रानाश, नाईट मिअर (यामध्ये त्या व्यक्तीस झोप लागते, परंतु भायानक स्वप्ने पडल्यामुळ ती जागी होते )
२) व्यक्तीच्या कामातील तक्रारी वाढतात. ती व्यक्ती मन लावून काम करत नाही. त्याला कामात गोडीच वाटत नाही , मनावर कसलेतरी दडपण आसलेचे जाणवते, ती व्यक्ती कामावर जाण्याची टाळाटाळ करु लागते , ती व्यक्ती कामामधे एकाग्र होऊ शकत नाही. अशा व्यक्तीचे एकाच कामामध्ये लक्ष न लागल्यामुळ कामामध्ये सतत बदल करण्याची प्रवृत्ती आढळते.
३) व्यक्तिगत संबंधामधे बिघाड निर्माण होतो. त्या व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असलेले परस्पर संबधामधे बदल झालेला आढ़ळतो, ती व्यक्ती दुस-या व्यक्तीना टाळायला लागते, ती व्यक्ती स्वत: एकटी /एकल कोंड़यासारखी राहू लागते.
४) वर्तन - काही रुग्णाचे स्वत:कडे अजिबात लक्ष नसते , त्यांच्या अंगावरील कपडे अस्वच्छ असतात, ते रहातातही अस्वच्छ, अंघोळ करीत नाहीत , दाढ़ी करत नाहीत. त्यामुळे त्यांचे केस व दाढ़ी वाढलेली असते . याउलट काही रुग्ण अतिभडक मेकअप करतात काही रुग्ण उगाचच विचित्र हातवारे करीत राहतात.
५) भावना - काही रुग्णामध्ये भावना नियंत्रित नसतात. काही गोष्टी व्यक्ती बारीक सारीक आठवाणीनी रडतात किवा हसतात .
६) विचार - व्यक्ती चे विचार हे त्याच्या बोलण्यातून समजतात. व्यक्ती खूप बोलकी असते ,बोलत असतानाच एका कल्पने वरून दुसऱ्या कल्पने वर जात असते. त्या व्यक्ती च्या बोलण्यात सुसंगतपणा नसतो, बोलणे असंबधित असते . त्यातून काहीच अर्थ बोध होत नाही.
७) भ्रम /विचारातील बिघाड - भ्रम हा एक विचित्र खोटा आणि असंभाव्य असा विश्वास असतो . या विश्वासालाच सत्य धरून ते चालत असतात. त्यांना खूप समजावून सांगून ,खरे -खोटे याची समजूत घालून सत्याचा पुरावा त्यांचा समोर ठेवला तरी ते मानत नाहीत .
८) आकलन - यांमध्ये रुग्णाला स्थळ, काळ, व व्यक्ती या तीनही गोष्टीचे आकलन नसते. या आजारामध्ये स्मरणशक्ती कमी होते, स्मृतीवर परिणाम झालेला आढळतो.
मानसिक आजारामधे सुरूवातीला झोपेच्या तक्रारी सुरु होतात. त्यामधे झोप लवकर लागत नाही, पहाटे लवकर जाग येते , मधेमधे सारखी जाग येते, निद्रानाश, नाईट मिअर (यामध्ये त्या व्यक्तीस झोप लागते, परंतु भायानक स्वप्ने पडल्यामुळ ती जागी होते )
२) व्यक्तीच्या कामातील तक्रारी वाढतात. ती व्यक्ती मन लावून काम करत नाही. त्याला कामात गोडीच वाटत नाही , मनावर कसलेतरी दडपण आसलेचे जाणवते, ती व्यक्ती कामावर जाण्याची टाळाटाळ करु लागते , ती व्यक्ती कामामधे एकाग्र होऊ शकत नाही. अशा व्यक्तीचे एकाच कामामध्ये लक्ष न लागल्यामुळ कामामध्ये सतत बदल करण्याची प्रवृत्ती आढळते.
३) व्यक्तिगत संबंधामधे बिघाड निर्माण होतो. त्या व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असलेले परस्पर संबधामधे बदल झालेला आढ़ळतो, ती व्यक्ती दुस-या व्यक्तीना टाळायला लागते, ती व्यक्ती स्वत: एकटी /एकल कोंड़यासारखी राहू लागते.
४) वर्तन – काही रुग्णाचे स्वत:कडे अजिबात लक्ष नसते , त्यांच्या अंगावरील कपडे अस्वच्छ असतात, ते रहातातही अस्वच्छ, अंघोळ करीत नाहीत , दाढ़ी करत नाहीत. त्यामुळे त्यांचे केस व दाढ़ी वाढलेली असते . याउलट काही रुग्ण अतिभडक मेकअप करतात काही रुग्ण उगाचच विचित्र हातवारे करीत राहतात.
५) भावना – काही रुग्णामध्ये भावना नियंत्रित नसतात. काही गोष्टी व्यक्ती बारीक सारीक आठवाणीनी रडतात किवा हसतात .
६) विचार – व्यक्ती चे विचार हे त्याच्या बोलण्यातून समजतात. व्यक्ती खूप बोलकी असते ,बोलत असतानाच एका कल्पने वरून दुसऱ्या कल्पने वर जात असते. त्या व्यक्ती च्या बोलण्यात सुसंगतपणा नसतो, बोलणे असंबधित असते . त्यातून काहीच अर्थ बोध होत नाही.
७) भ्रम /विचारातील बिघाड – भ्रम हा एक विचित्र खोटा आणि असंभाव्य असा विश्वास असतो . या विश्वासालाच सत्य धरून ते चालत असतात. त्यांना खूप समजावून सांगून ,खरे -खोटे याची समजूत घालून सत्याचा पुरावा त्यांचा समोर ठेवला तरी ते मानत नाहीत .
८) आकलन – यांमध्ये रुग्णाला स्थळ, काळ, व व्यक्ती या तीनही गोष्टीचे आकलन नसते. या आजारामध्ये स्मरणशक्ती कमी होते, स्मृतीवर परिणाम झालेला आढळतो.