(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • पूजेसाठी आरोग्यदायी पत्री

    श्रावण म्हणजे चैतन्य...आनंद...उत्साह. तो आता उंबरठ्याशी आला आहे. सणांचा-व्रतवैकल्यांचा हा महिना

    पूजेच्या निमित्ताने या विविध वनस्पतींशी जो संपर्क येतो तो आरोग्यदायक असतो. निसर्गाशी संबंध जोडलेला राहावा, आसपासच्या वृक्षसंपदेची माहिती असावी, घराच्या आसपास कोणकोणती झाडे-वेली असाव्यात हे ज्ञात व्हावे, असे कितीतरी उद्देश पत्री गोळा करण्यामागे असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पत्रीत अंतर्भूत असलेली प्रत्येक वनस्पती आरोग्य-रक्षणामध्ये अग्रेसर असलेली दिसते. पत्री फक्‍त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्‍त असते.

    श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, तसेच पूजा-व्रत-वैकल्यांचा कालावधी. हरितालिका, नागपंचमी, मंगळागौरी अशा अनेक पूजा श्रावणात येतात. भाद्रपदातील गणेशोत्सवाचे वेधही श्रावणात लागल्यावाचून राहात नाहीत. या सर्व पूजांसाठी "पत्री' म्हणजे निरनिराळ्या वनस्पतींची पाने, फुले वापरली जातात. पूजेच्या निमित्ताने या विविध वनस्पतींशी जो संपर्क येतो तो आरोग्यदायक असतो. निसर्गाशी संबंध जोडलेला राहावा, आसपासच्या वृक्षसंपदेची माहिती असावी, घराच्या आसपास कोणकोणती झाडे-वेली असाव्यात हे ज्ञात व्हावे, असे कितीतरी उद्देश पत्री गोळा करण्यामागे असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पत्रीत अंतर्भूत असलेली प्रत्येक वनस्पती आरोग्य-रक्षणामध्ये अग्रेसर असलेली दिसते. आज आपण श्रावणात वापरल्या जाणाऱ्या पत्रींची माहिती करून घेऊ या.

    श्रावणातील पत्री

    अशोकाची पाने
    शोभेचा उंच वाढत जाणारा अशोक हा खरा अशोक नव्हे. सीतेचा अशोक हा खरा अशोक. पत्री म्हणून तसेच औषधात सीतेचा अशोक वापरला जातो. अशोक स्त्रीत्वाचे रक्षण करणारा, स्त्रीसंतुलन करणारा असतो. गर्भाशय, बीजाशयासंबंधित अनेक विकारांवर आयुर्वेदात सीतेच्या अशोकाचा उपयोग केला जातो.

    आवळ्याची पाने ही वाहण्याने आरोग्यरक्षण होते, असे सांगितले आहे. आवळ्याला "धात्री' असे पर्यायी नाव आहे. एखादी दाई जशी बाळाची काळजी घेते, तसा आवळा आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. आवळ्याची फळे रसायन गुणांनी परिपूर्ण असतातच, पानेसुद्धा अतिप्रमाणात होत असलेली लघवी कमी करणारी असतात.

    दूर्वा पत्री म्हणून दूर्वा अर्पण करणे हे परमात्मप्राप्तीचे साधन असते, असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. दूर्वा म्हणजे जमिनीवर पसरणारे एक प्रकारचे गवत असते. आयुर्वेदातही दूर्वा हे एक महत्त्वाचे औषध आहे. गर्भधारणा व्हावी व गर्भधारणेनंतर गर्भरक्षण व्हावे म्हणून स्त्रीच्या व गर्भवतीच्या आसपास ज्या वनस्पती असाव्यात त्यात दूर्वांचा उल्लेख आहे. दूर्वा थंड असतात, रक्‍तदोष दूर करतात, भूतबाधा म्हणजे अदृश्‍य जीवजंतूंना दूर ठेवतात. उष्णतेमुळे नाकातून रक्‍त येते, त्यासाठी दूर्वांचा रस नाकात घालण्याचा उपयोग होतो. दूर्वा स्वच्छ धुवून त्यांचा रस खडीसाखरेसह घेतल्यास पित्त कमी होते, रक्‍त शुद्ध होते, अनेक त्वचाविकार, नागीण वगैरे त्रास दूर होऊ शकतात. संगणकासमोर बसण्याने डोळ्यांची आग होत असल्यास दूर्वांचा रस घेण्याचा उपयोग होतो. दूर्वांच्या हिरवळीवर अनवाणी पायाने चालण्यानेही डोळ्यांची ताकद वाढते, डोळ्यांवरचा ताण कमी होतो.

    कण्हेर कण्हेरीची पाने वाहण्याने तापत्रयांचा नाश होतो. तापत्रय म्हणजे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक ताप तसेच वातज, पित्तज, कफज हे ताप. पांढऱ्या कण्हेरीचे मूळ कानावर बांधले असता सर्व प्रकारचे ताप बरे होतात, असा आयुर्वेदात उल्लेख सापडतो. पांढरी, गुलाबी, लाल असे कण्हेरीचे फुलांच्या रंगांवरून निरनिराळे प्रकार असतात. यातील पांढरी कण्हेर औषधात वापरली जाते. विंचू, सर्पदंशावर पांढऱ्या कण्हेरीचे मूळ उगाळून लेप केला जातो.

    कदंब कृष्णाला प्रिय असणाऱ्या कदंब वृक्षाची पाने वाहण्याने डोक्‍याचे व मेरुदंडाचे रक्षण होते. आयुर्वेदात कदंब विषनाशक, शुक्रवर्धक (धातू वाढविणारा), वर्ण सुधारणारा सांगितला आहे. तोंड आले असता कदंबाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या करण्याचा उपयोग होतो.

    ब्राह्मी ब्राह्मी अर्पण करणे मेंदूसाठी हितावह असते, असे शास्त्र सांगते. आयुर्वेदातही मेंदूच्या आरोग्यासाठी, मेंदूतील दोष दूर होण्यासाठी ब्राह्मीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शांत झोप लागण्यासाठी, मनावरचा ताण कमी करण्यासाठीसुद्धा ब्राह्मी उत्तम असते.

    धोत्रा धोत्रा वाहण्याने श्‍वसनक्रिया उत्तम राहते. आयुर्वेदातही धोत्र्याच्या पानांचा लेप संधिवातावर उपयोगी असतो. धोत्र्याच्या पानांची धुरी घेतल्यास छातीतील कफ कमी होतो, दम्याची घुसमट कमी होते.

    धोत्र्याची फुले
    धोत्रा अर्पण करणे धनदायी असते. धोत्र्याचे पंचांग (मूल, फळ, साल, मूळ व पाने) एकत्र करून धुरी घेण्याने खोकला बरा होतो. धोत्र्याच्या फुलांना मादक गंध असतो.

    आघाडा हा अर्पण करणे विषनाशक असते. आघाडा फक्‍त पावसाळ्यात उगवतो. पावसाळ्यात छातीत कफ होण्याची, दम्याचा त्रास होण्याची प्रवृत्ती असते, यावर आघाड्याचा क्षार उत्तम असतो. आघाड्याच्या क्षारामुळे मूत्रप्रवर्तन व्यवस्थित होण्यास उपयोग होतो. अपामार्ग क्षाराने सिद्ध केलेले तेल कानात टाकल्यास कान दुखणे कमी होते. काटा टोचला व मोडून आतच राहिला तर त्यावर आघाड्याची पाने बारीक करून बांधण्याची पद्धत आहे, त्यामुळे वेदना थांबतात व काटा वर निघून येतो.

    बेल बेल वाहण्याने त्रिदोषांचा नाश होतो, पापांचा नाश होतो. बेलाचे फळ, मूळ, पाने औषधी असतात. अर्धवट पिकलेले बेलफळ मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, तर पूर्ण पिकलेल्या फळाने शौचाला साफ होते. बेलाचा मुरंबा आव होणे, फार वेळा शौचाला होणे वगैरे त्रासांवर उपयोगी असतो. बेलफळ यकृताची कार्यक्षमता सुधारण्यासाठीही वापरले जाते. बेलाच्या पानांचा रस जंत नष्ट करण्यासाठी वापरला जातो. बेलाची पाने अंगाला लावली असता शरीराचा दुर्गंध दूर होतो. बेलाच्या पानांचा रस खडीसाखर घालून घेण्याने शक्‍ती वाढते, अतिरिक्‍त उष्णता कमी होते.

    गंध फुलांचा...

    चाफ्याची फुले चाफा वाहण्याने चतुर्वर्ग साध्य होतात, म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांची सिद्धी होते. चाफ्याच्या फुलांचा काढा घेण्याने सर्दी बरी होते, उत्तम भूक लागते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. थंडी वाजून येणाऱ्या तापावर चाफ्याच्या कळ्या विड्याच्या पानातून घेण्याचा उपयोग होतो.

    केवडा
    केवड्याचे फूल अर्पण करण्याने बुद्धी वाढते, असे सांगितले आहे. अपस्मारावर केवड्याची फुले व केवड्याच्या कणसावरील बारीक कण एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाचे नस्य घ्यायला सांगितले आहे. केवड्याच्या पारंब्या बलकर, देहाला दृढ करणाऱ्या व रसायनगुणांनी युक्‍त असतात.

    कण्हेर फुले
    कण्हेरीची फुले वाहण्याने स्त्रीत्वाचे रक्षण होते. कण्हेरीचे मूळ विषारी असते. दंशावर पांढऱ्या कण्हेरीचे मूळ उगाळून लावले असता विष उतरते. पांढऱ्या कण्हेरीची फुले वाळवून त्यांचे नस्य करण्यानेही सापाचे विष उतरते. नागीण उठते त्यावर लाल कण्हेरीची फुले व तांदूळ पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी वाटून लेप करता येतो.

    बकुळ फुले
    सुगंधी, छोटी-छोटी बकुळ फुले वाहण्याने स्त्रीच्या तारुण्याचे, स्त्रीत्वाचे रक्षण होते. आयुर्वेदातही बकुळीची ताजी फुले, बदाम व खडीसाखर यांचे मिश्रण तीन दिवस घेण्याने पाळीच्या वेळचा अतिरक्‍तस्राव किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे वगैरे त्रास दूर होतात असे सांगितले आहे. बकुळीच्या फुलांचा वास घेण्याने हृदयाची ताकद वाढते.

    कमळ
    कमळ वाहण्याने शत्रूचा नाश होतो. कमळाचे फूल सुगंधी, वर्णकर, शीतल व रक्‍तदोष बरा करणारे असते. पांढऱ्या कमळाच्या पाकळ्या, ज्येष्ठमध व खडीसाखर यांचा थंड काढा पिण्याने पित्तामुळे आलेला ताप बरा होतो.

    गुलाब
    सुगंधी गुलाब वाहण्याने शांती प्रस्थापित होते. गुलाब सौम्य, थंड व रक्‍तशुद्धी करणारा असतो. गुलाबाच्या वाळलेल्या कळ्या साखरेसह खाऊन वर पाणी पिण्याने पोट साफ होते. गुलकंद हे प्रसिद्ध औषध गुलाबाच्या फुलांपासून बनवितात व ते पित्तशमनासाठी तसेच मलशुद्धीसाठी उत्तम असते.

    जास्वंद
    जास्वंदाची फुले वाहण्याने लोकसंग्रह वाढतो. जास्वंदीची फुले केसांसाठी उत्तम असतात. जास्वंदीची फुले वाटून किंवा रस काढून केसांना लावली असता केसांची वाढ होते व केस काळे होतात. चाई लागली असता त्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा फायदा होतो.

    मोगऱ्याची फुले
    मोगऱ्याची सुगंधी फुले सर्वांच्या परिचयाची असतात. ही वाहण्याने परमात्मप्राप्ती होते असे शास्त्र सांगते. मोगऱ्याचे फूल गुणाने थंड, सुखप्रद व पित्तशामक असते. मोगऱ्याची पाने गर्भिणीच्या अंगावरून पांढरे पाणी जाते त्यावर उपयोगी असतात.

    अशोकाची फुले
    स्त्रीत्वरक्षक, गर्भाशयशुद्धीकर आहेत. स्त्रियांचा शोक नाहीसा करण्याचा विशेष गुणधर्म अशोकाच्या फुलांमध्ये असतो. या प्रकारे पत्री फक्‍त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्‍त असते. देवदेवतांना वाहण्याच्या निमित्ताने पत्रींची ओळख झाली, संपर्क कायम राहिला तर आवश्‍यकतेनुसार त्यांचा आरोग्यरक्षणासाठी फायदा करून घेता येईल.

    डॉ. देवेंद्र साठे.

  • सुर्य नमस्कार का घालायचे?

    आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.

    आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस

    फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.

    सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.

    1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले

    ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.

    नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.

    फक्त केले पाहिजे रे !!?

    -- अरविंद जोशी
    B.Sc.

    ९४२१९४८८९४

  • आयुर्वेदिक डाळिंब

    डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.

    डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.

    १. रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.
    २. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटिऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.
    ३. फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.
    ४. पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.
    ५. डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
    ६. वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.
    ७. खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.
    ८. डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
    ९. मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.
    १०. डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.
    ११. कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.
    १२. वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.
    १३. कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.
    १४. डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.

  • तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?

    तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?.....हा घ्या उपाय!!

    तोतरेपणा, बोबडं बोलणं, जीभ जड असणे अशा विविध समस्या कित्येक लहान मुलांना भेडसावत असतात. कित्येकांना तर 'स्पीच थेरपी'चा उपयोग करूनही काही फायदा होत नाही. सारे उपाय थकल्यावर अशा मुलांचे पालक 'अखेरची आशा' म्हणून आयुर्वेदाकडे वळतात. आयुर्वेदात 'वाक्शुद्धिकर' म्हणजे वाणी शुद्ध करणारी काही औषधे सांगितली आहेत. त्यांचा वापर केल्यास अशा रुग्णांना उत्तम लाभ होतो हा आजवरचा प्रत्यक्षानुभव आहे.

    मात्र या औषधी उपचारासहच मी आग्रही असतो ते मंत्र-उपचारासाठी. दचकू नका; मंत्रोपचार हा शब्द उच्चारताच लगेच काही कोणी बाबा-बुवा ठरत नाही. औषधी आणि मंत्र असे दुहेरी उपचार अनेक व्याधींत लाभदायक ठरतात. अर्थात; केवळ 'मंत्रानेच' व्याधी बरा होतो असे मत मांडणे योग्यही नाही आणि शास्त्रसंमतदेखील नाही. पण; मंत्रांचा उपयोग चिकित्सेला जोड-उपचार म्हणून केल्यास 'अधिकस्य अधिकं फलम्|' ठरते.

    वाणीशुद्धि करणारा हा मंत्र म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आद्य शंकराचार्य रचित 'नर्मदाष्टक स्तोत्र' आहे. वाचकांसाठी हे स्तोत्र मुद्दाम देत आहे. त्यातील शब्दरचना नीट पहा. जिभेची काय बिशाद आहे न वळण्याची?!

    सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं
    द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।
    कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
    त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥१॥

    त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं
    कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् ।
    सुमच्छकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे
    त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥२॥

    महागभीरनीरपूरपापधूतभूतलं
    ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् ।
    जगल्लये महाभये मृकण्डसूनुहर्म्यदे
    त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥३॥

    गतं तदैव मे भवं त्वदम्बुवीक्षितं यदा
    मृकण्डसूनुशौनकासुरारिसेवि सर्वदा ।
    पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे
    त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥४॥

    अलक्षलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं
    सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम् ।
    वसिष्ठसिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे
    त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥५॥

    सनत्कुमारनाचिकेतकश्यपादिषट्पदैः_
    धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः ।
    रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे
    त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥६॥

    अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं
    ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकम् ।
    विरञ्चिविष्णुशङ्करस्वकीयधामवर्मदे
    त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥७॥

    अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
    किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे ।
    दुरन्तपापतापहारिसर्वजन्तुशर्मदे
    त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥८॥

    इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
    पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ।
    सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवं
    पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ॥९॥

    जेव्हा कुठल्याही 'स्पीच थेरपी'चा उगम झाला नव्हता तेव्हा आयुर्वेदीय औषधींसह याच 'स्पीच थेरपी'चा वापर कित्येक वैद्य यशस्वीपणे करत होते. आजही करतात. अर्थात; हे सारे श्रेय श्रीमद् भगवत्पाद आद्य शंकराचार्य यांचेच. आम्ही वैद्यगण केवळ निमित्तकारण. आजच आचार्यांची जयंती. आपल्याला वाचा दोष असो वा नसो; या स्तोत्राचे दैनंदिन पठण अवश्य करा.

    © वैद्य परीक्षित स. शेवडे
    (आयुर्वेदज्ञ- लेखक- व्याख्याते)
    || श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद || डोंबिवली
    ०२५१-२८६३८३५

  • शेवगा (ड्रमस्टिक) – आहारातील पौष्टिक कॅप्सुल

    दक्षिण भारतात शेवग्याची झाडे अधिक प्रमाणात पहायला मिळतात. साऊथ इंडियन "सांबार'मधे शेवग्याची शेंग हमखास घातलेली असते. नजीकच्या काळात आहारशास्त्रीय जगात शेवग्याला फार महत्त्व लाभले आहे. शेवग्याच्या शेंगेला "वंडर स्टीक' तर झाडाला "ट्री फॉर लाईफ' असे संबोधले जाते. कारण आहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व या झाडाची पाने हे पौष्टीकतेत अतिशय समृद्ध पातळीवर आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या पाल्यामधे संत्र्याच्या सातपटीने अधिक "क' जीवनसत्त्व आहे, दुधाच्या चौपट कॅल्शियम आहे व केळ्याच्या तिप्पट पोटॅशियम आहे. दुधापेक्षा अधिक प्रथिने व गाजराहून कितीतरी पटीने अधिक बेटाकेरोटीन यात आहे. शेवग्यास "पॉवर हाउस ऑफ मिनरल्स' यासाठीच म्हटले जाते.

    शेवग्याच्या शेंगेतही "क' जीवनसत्त्व, केरोटीन, कॅल्शियम व फॉस्फरस ही पोषणतत्त्वे आहेत. शेवग्याची शेंग ही गर्भवती व वाढीच्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे. ती रक्‍त शुद्ध करणारी आहे तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत व प्लीहा ह्यांचे आजार असणाऱ्यांना शेवग्याचे सूप द्यावे. 100 ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत निव्वळ 0.1% चरबी असून चोथ्याचे प्रमाण मात्र चांगले आहे. यामुळे अनेक लाईफस्टाईल डिसिजेस मधे (हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्‍तदाब, गाऊट इ.) शेवगा पथ्यकारक ठरतो. 1 वाटी (50 ग्रॅम) शेवग्याच्या आमटीत 59 कॅलरीज, 0.8 ग्रॅम प्रोटिन्स व 2.2 ग्रॅम्स फॅट्‌स असतात. 1 वाटी सांबार मधे 87 कॅलरीज, 3.7 ग्रॅम प्रोटिन्स व 2.8 ग्रॅम फॅट्‌स असतात.

    एकूणच भारतीय आहारात शेवग्याच्या शेंगेचं आपलं म्हणून एक स्थान आहे. शेवगा आहारात अगदी रोज वापरला तरी हरकत नाही, असं सांगितलं जातं. याचं मुख्य कारण आहे त्याचे औषधी गुणधर्म. शेवगा गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त वरक्त प्रकोपक असून, शेवग्याची भाजी वातविकार दूर करणारी आहे. शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या कढय़ात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात.

    शेवग्याच्या फुलात ‘प्टेरोगोस्परमीन, पाल्मिकएसिड, स्टेईक अ‍‍ॅसिड, बेटेनिक अ‍‍ॅसिड,ओलेईक अ‍‍ॅसिड हे घटक असतात. तसंच टेरिगोस्पर्मीन नावाचे प्रतिजैविक असतं. पानातील रसामध्ये जीवाणूनाशक तत्त्व असतं. खोडातून एक भु-या रंगाचा डिंक मिळतो. तसंच बियांमधून रंगरहिन तेल मिळतं. शेवग्यात मोठया प्रमाणात खनिजं आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्व ‘अ’, ‘क’ आणि ‘ई’ तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो.

    ही यादी खूप मोठी आहे. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणं कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोकं चोळलं असता डोक्यातील कोंडा निघून जातो. मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगलं असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा.

    शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा करून त्यात मिरे, संधव व पिंपळीचं चूर्ण घालून प्यायल्याने प्लिहोदर बरा होतो.

    वायूचा प्रकोप होऊन शरीरात कुठंही दुखत असल्यास शेवग्याच्या काढय़ात सुंठ व हिंग घालून प्यायल्याने वेदना थांबते. शेवग्याच्या पानांच्या रसात मध घालून डोळ्यांत घातल्याने डोळे दुखणं थांबतं. मस्तकात वेदना होत असल्यास शेवग्याचा डिंक दुधात वाटावा आणि त्याचा लेप मस्तकावर लावावा. त्यामुळे वेदना कमी होतात. मिरपूड व शेवगा बारीक कुटून एकत्र करून हुंगल्यास शिंका येऊन डोकेदुखी दूर होते. गर्भवतीने आहारात शेवग्याच्या भाजीचा वापर केल्यास गर्भाची वाढ चांगली होते. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने भूक लागते, तोंडाला चव येते. शेवग्याच्या शेंगांचा जेवणात वापर होत असल्याने त्यांना बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. शेवग्याने अनेक औषधी गुण पाहता त्यांना पौष्टिक कॅप्सुलच म्हणायला हवी.

    आरोग्यम् धनसंपदा

  • कुठलंही काम, तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही

    तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही.
    कृपा करून जमेल व झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा.
    प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका.
    खर्च आटोपशीर ठेवा.
    तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा.
    कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देते.
    स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.
    कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.
    तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा.
    ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा.

    हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही....
    त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा.
    संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ. चा उपयोग करा.
    सुट्टीचा आनंद आपल्या प्रियजनांसोबत लुटा...

    सर्वेपि सुखिनः सन्तु।
    सर्वे सन्तु निरामयः।
    सर्वे भद्राणि पश्यन्तु।
    मा कश्चिद दुःख माप्नुयात॥

    आज ७ एप्रिल,
    जागतिक आरोग्य दिन…
    आपण आणि आपल्या प्रियजनांना निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा…!

  • मरावे परी अवयव रुपी उरावे……..

    कालचा रविवार हा सोलापूर वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक ठरला कारण होते एका जेमतेम शिकलेल्या पित्याने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णययाचे, ज्यामुळे चार व्यक्तींना जीवनदान मिळाले!

    गणेश उर्फ शिवपार्थ शिवशंकर कोळी हा अवघा 14 वर्षंचा मुलगा फुटबॉल खेळत असताना उष्माघाताने कोसळला,उपचारासाठी दाखल करताच डॉक्टररांनी,मेंदुला जब्बर धक्का बसल्याने त्याचे वाचणे अशक्य आहे हे त्याच्या नातेवाईकांना सांगितले,शेवटचे प्रयत्न करण्यात आले पण शेवटी रुग्णाचा मेंदु मृत झाल्यामुळे अखेर त्याला "ब्रेनडेड" घोषित करण्यात आले.ह्यानंतर जेमतेम दहावी शिकलेले मुलाचे वडील शिवशंकर कोळी यांनी मला माझ्या मुलाच्या आठवणी जपायचा आहेत त्यामुळे अवयव दानाची इच्छा बोलून दाखवली.सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले.

    शिवपार्थ चे चार अवयव.....हृदय,यकृत,दोन मूत्रपिंड हे काढण्यात आले,हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठवण्यात आले (पुण्याच्या इतिहासातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट) व एक मूत्रपिंड अन यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर व नोबेल हॉस्पिटलला पाठवण्यात आले.एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका engineering शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आले जो 2 वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंड निकामी असल्यामुळे डायलसीस वर होता.

    आता इथे एक जीव गेल्याची खंत तर निश्चितच आहे पण त्याहून समाधान चार जीव वाचल्याचे आहे.......सलाम त्या पित्याला व मातेला ज्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला.सोलापुरातील डॉक्टरांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांना सलाम!!अवयव घेऊन जाताना ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी पोलीस अन सोलापुरातील नागरिकांनी जे सहकार्य केले त्यासाठी सर्वांना सलाम!

    शेवटी एवढचं म्हणेन हि घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपली विचारसरणी बदलण्यासाठी...........नक्की विचार करा!!!

  • वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी

    वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी अनेक असतात. मुत्राशयाच्या समस्या, दृष्टीमध्ये येणा-या अडचणी, अलझायमर, डिमेंशिया, ह्रदयविकार अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरवातीला आपण मुत्राशयातील समस्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

    वयोमानामुळे घडत जाणारे बदल
    मुत्राशयावर संयम न रहाणे ही फक्त वृद्ध स्त्रीयांमधील व्याधी नसून पुरुषांमधेही दिसून येते. खरे तर ही अडचण कोणत्याही वयात येऊ शकते. परंतु वृद्धत्त्वामधे सर्वात जास्त दिसते. मूळव्याध, बद्धकोष्ठ, काही ठराविक औषधे घ्यावी लागणे, मुत्राशयावर एखादा रोग-संचार (इन्फेक्शन) होणे अशी कारणे सुद्धा मुत्राशयावर संयम न रहाण्यासाठी पुरतात. मुत्रपिंडाचा एखादा स्नायू दुबळा झाला, मुतखडा (किडनी स्टोन) झाला, पार्किन्सन्स किंवा अर्थ्रायटीस सारखा मुत्रपिंडावरचा संयम जाऊ शकणारा आजार झाला तर काही वेळा त्यामुळे आलेली मुत्रपिंडावरची अस्वस्थता ही जास्त कालावधीसाठी टिकून रहाते. वृद्धत्वामधे लघवी करत असताना मुत्राशयातले स्नायू कधी कधी आकुंचित पावतात. त्यमुळे योनीमार्गात जळजळ होऊ शकते. आणि त्याच वेळी मुत्राशयाच्या आजुबाजूचे अवयव शिथील होतात आणि संयम नसताना लघवी होऊ शकते

  • वसन्त ऋतूचे Do’s and Don’ts

    पांघरुणात गुरफटून ठेवणारी ,झोपेच्या मोहात गुंतविणारी थंडी हळुहळु आपला निरोप घेऊ लागली आहे. ऊबदार वाटणाऱ्या ऊन्हाचा प्रवास आता तापणाऱ्या उन्हाच्या दिशेनं सुरु झाला आहे.

    साहित्यात हा वसन्त ऋतू कितीही आल्हाददायक सांगितला असला तरीही व्यवहारात मात्र केवळ डॉक्टरांसाठीच आल्हाददायक दिसून येतो.याच वसंत ऋतूच्या काळात सर्दी ,खोकला,दमा tonsillitis,bronchitis,flue, अनेक साथीचे आजार,त्वचाविकार अश्या अनेक तकारींना जन्म देतो.भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते,थोडक्यात वेगवेगळ्या आजारांची सुगी जोमात असते.थंडीत साठलेला कफ दोष ऊन्हाने पातळ होऊन हे सगळं रामायण घडवत असतो.

    आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या या सगळ्या रामायणाचा त्रास आपल्या चिमुरड्यांना होत असतो.त्यातच परीक्षांचा काळ दत्त म्हणून ऊभा राहिलेला असतो एकूणच परिस्थिती आणीबाणीची असते.या सगळ्या घडामोडींपासून आपल्या कुटुंबाला 'सुरक्षा कवच'आयुर्वेदाच्या माध्यमातुन देण्याचा प्रयत्न म्हणजेच या लेखाचा खटाटोप .

    आयुर्वेदाचं नाव ऐकून "अरे बापरे ,आता काय कडू काढे ?असा प्रश्न मोठे मोठे डोळे करून विचारणाऱ्या माझ्या समस्त मित्रमैत्रिणींसाठी वसंत ऋतूसाठी खास आयुर्वेदाचा हटके अंदाज!

    जाता खायचा खाऊ म्हणून फुटण्याचा समावेश करून कफाला bye bye म्हणता येईल.

    दुधात थोडीशी सुंठ घालून या वसंत ऋतुसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवता येईल.

    नाष्ट्यामध्ये भाजणीची थालीपीठ,खाकरा,ज्वारीची ऊकडपेंडी,बाजरीचा शिरा,हुलग्याच्या शेंगोळ्या,लाह्यांच्या पिठाचा उपमा यासारखे पदार्थ खाण्यात आले तर या ऋतूतील आजारपणं खूप खूप लांब राहतील.

    दुपारच्या snacks साठी वेगवेगळ्या लाह्या,popcorn,राजगिरा वडी, गोपाळकाला,लाह्यांचा चिवडा अशी variety तर सोन्याहून पिवळे.

    कढण, कोबीचे सूप,दुधीभोळ्याचे सूप,शेवग्याचे सूप यांचा वापर केला तर साठलेला कफ पडून जाईल.

    ज्वारी, बाजरी यांची भाकरी हा आपल्या main course चा भाग या दिवसांसाठी ठरवून करूयात.

    शेवग्याची भाजी,शेवग्याचे सांबार,दुधीभोपळा,मेथी,गवार, कुळीथाची ऊसळ म्हणजे औषधांना पर्याय ठरेल.

    सीताफळ,द्राक्षे, आईस्क्रीम पासून सध्या चार हातांचे अंतरच बरे.

    नाक वहात असल्यास झोपताना हळदीचा धूर आणि नाक बंद झाल्यास ओव्यांचा धूर घेऊन Vicks,nasal drops यांना bye म्हणूयात.

    समप्रमाणात एकत्र केलेली पूड छातीला व पाठीला talcum powder प्रमाणे लावून prevention is better than cure याची प्रचिती घेता येईल.

    थोडक्यात वसन्त ऋतूचे हे Do's and Don'ts लक्षात ठेऊयात आणि 'हृदयी वसन्त फुलताना' चा आनन्द घेऊयात

  • १७ एप्रिल – जागतिक हेमोफिलिया दिवस

    आज १७ एप्रिल. जागतिक हेमोफिलिया दिवस.

    हिमोफेलिया हा रक्ताचा आजार समजला जातो. शरीरात रक्त गोठण्यासाठी तेरा घटक असतात. ‘हिमोफेलिया’च्या पेशंटमध्ये आठ क्रमांकाचा घटक कमी असेल तर ‘हिमोफेलिया ए’ नावाचा आजार होतो. नऊ क्रमांकाच्या घटकाची कमतरता असल्यास ‘हिमोफेलिया बी’ आणि अकरा क्रमाकांचा घटक नसल्यास ‘हिमोफेलिया सी’ असे आजार होतात. हिमोफिलिया हा दुर्मीळ आजार असून, तो ०.०१ टक्के लोकांमध्ये आढळून येतो. या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्त्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्त्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत ज्यावर उपचार सापडलेला नाही त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो. जगभरात हीमोफीलिया आजार या आजाराने त्रस्त लोकांची संख्या जवळपास ५०,००० आहे.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट