वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एका अथांग विश्वातल्या एका आकाशगंगेतल्या एका सूर्यमालेतल्या एका ग्रहावरच्या, कोट्यावधी सजीवांमधील एक प्रजाती म्हणजे ‘माणूस’. उत्क्रांतीत लाभलेल्या मेंदूचा वापर करीत प्रगतीचा वेग वाढवत नेला या मानव समुहाने. थोड्याच काळात बौध्दिक व भौतिक पातळीच्या सीमा गाठण्याच्या वल्गना हा समूह करू लागला. Nature आणि Nurture या दोन्हींचा समतोल राखण्याचे भान तो या घोडदौडीत विसरला. ‘Nature काय? किस झाडकी पत्ती’ ही प्रवृत्ती वाढत गेली.
April 7, 2020
मध्यंतरी एका बातमीवर माझी नजर स्थिरावली ती बातमी होती आपल्या देशातील विवाहित पुरूषांच्या आतमह्त्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येचा आकडाही बर्यापैकी चक्रावणारा होता. आता प्रश्न हा होता विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येच प्रमाण का वाढत असाव ? त्याच मुळ कारण आहे आपल्या देशातील पुरूषप्रधान संस्कृती. आपल्या देशात पुरूषप्रधान संस्कृती आहे आणि त्याचा आपल्या देशातील स्त्रियांना ह्जारो वर्षापूर्वीपासून कसा त्रास होत आलाय यावर चर्चा न झालेलीच बरी... पण आज आपल्या देशातील पुरूषच पुरूषप्रधान संस्कृतीचे बळी ठरत आहेत. पण पुरूषांच्या या आत्मह्त्येना कोणी फारसा सहानुभूतीपूर्वक पाह्ताना दिसत नाही. माध्यमेही त्यात मागे नाहीत. आजही आपल्या देशात स्त्री-पुरूष समानतेच वार कितीही जोरात वाह्त असल तरी आपल्या देशात आजही पुरूषप्रधान संस्कृतीच घट्ट पाय रोवून उभी आहे. काही बाबतीत आपल्या देशातील स्त्रियांनी पुरूप्रधान संस्कृतीचा स्वतःच स्विकार केल्याचेही स्पष्टपणे जाणवते.
आपल्या देशात बलात्कार विनयभंगासारखे प्रकार फक्त पुरूषांकडूनच स्त्रियांच्या बाबतीत घडतात हा विचारही घट्ट रोवला गेलाय. एखाद्या स्त्रिचा पुरूषाला धक्का लागला तर तो ते फारस मनावर घेत नाही. पण तोच धक्का परूषाचा चुकून जरी स्त्रिला लागला तर पुरूष नालायकच ठरतो. देशातील लोकसंख्या दिवसेन दिवस वाढतेय त्याच बरोबर बेकारी आणि महागाईही दिवसेन दिवस वाढतेय ! अशात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक जबाबदारी उचलण काही पुरूषांना नाही शक्य होत. म्ह्णून ते पुरूष कुचकामी नसतात पण त्यांच्या मनावर सतत होणारा आघात आणि वाढत जाणारा मानसिक दबाव त्यांना आत्मह्त्येस प्रवृत्त करत असावा. तर काही विवाहीत परूषांच्या बाबतीत त्याच्या पत्नीकडून केल्या जाणार्या अवास्तव मागण्या ज्या दागदागिने, घर – मोटर, कपडालत्ता याच्याशी संबंधीत असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ असणारे पुरूष रोजच्या टोमण्यांचा मारा सह्न न झाल्यामुळेही आत्महत्ते सारख्या मार्गाला जवळ करत असावेत. आज आपल्या देशातील पुरूषप्रधान संस्कृतीचा पुरूषच बळी ठरत आहे. आपल्या देशातील विवाहीत पुरूषांच्याच आत्मह्त्येच प्रमाण दिवसेन- दिवस वाढत जाण्याची शक्यताच अधिक दिसतेय. समाजात अनैतिक संबंधाच प्रमाणही भरमसाठ वाढतय. आपल्या पत्नीचे कोणा परक्या पुरूषासोबत अनैतिक सबंध आहेत हे कळल्यावर आपल्या पुरूषत्वाबद्दल लाज वाटल्यानेही काही पुरूष आत्महत्येचा मार्ग स्विकारत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आता विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येची ही सखोल चौकशी व्हायला ह्वी...तरच त्या रोखण्यासाठीचा उपाय सापडण्याचा मार्ग सुखकर होईल.
-- निलेश बामणे
January 6, 2016
बुलडाणा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडली. या नगरपालिकांपैकी भाजपचे ५, काँग्रेसचे २, भारिप-बमसंचे १ आणि एका ठिकाणी विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. पालिका निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज आणि प्रस्थापितांना मतदारांनी झटके दिले आहेत.
बुलडाणा पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. येथे आता भारिप-बमसंच्या नजमुन्नीसा बेगम अध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.पालिकेतील एकूण सदस्य संख्या २८ असून यात भाजप- ५, शिवसेना- १०, कॉंग्रेस- ७ व एक पुरस्कृत, राष्ट्रवादी- ३, भारिप-बमसंचे २ सदस्य निवडून आले आहेत. बुलडाण्यात आमदार हर्षवर्धन सपकाळ हे असताना काँग्रेसला केवळ ७ जागा मिळाल्या. तर नगराध्यक्षपद भारिप-बमसंकडे गेले आहे.
जिल्ह्यातील अति प्रतिष्ठेच्या खामगाव येथील नगराध्यक्षपदी भाजपच्या अनिता वैभव डवरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भारिप- काँग्रेस आघाडीच्या शांताबाई सोनाेने यांचा पराभव केला. काँग्रेसच्या ताब्यातील ही पालिका भाजपने बळकावली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. त्यांनी भारिप-बमसंसोबत आघाडी करून निवडणूक लढवली. मात्र नगराध्यक्षपद भाजपला मिळाले. त्यामुळे येथे भाजपचे नेते कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची प्रतिष्ठा राखल्या गेली.
राजकीयदृष्टया सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मेहकर पालिकेत नगराध्यक्षपदी काँग्रेसचे कासम पिरु गवळी निवडून आले आहेत. जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, तसेच आमदार संजय रायमुलकर हे दोघेही मेहकरात असताना शिवसेनेचे भास्करराव गारोळे हे पराभूत झाले आहेत. पालिकेत २४ पैकी १४ जागा शिवसेनेने जिंकल्या असल्या तरी महत्त्वाचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्याने दोन्ही दिग्गजांचे प्रयत्न फोल ठरले.
त्याचप्रमाणे भाजपचे नेते आणि आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मलकापूर आणि नांदुरा या दोन्ही पालिकांमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. मलकापुरात काँग्रेसचे अॅड. हरीष रावळ हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, आमदार संचेती यांनीही आघाडी स्थापन करून पालिकेतील काँग्रेसची सत्ता उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर विकास आघाडीचे केवळ ८ उमेदवार निवडून आले. त्याचप्रमाणे नांदुरा नगराध्यक्षपदी आकोट विकास आघाडीच्या रजनी अनिल जवरे विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या द्राैपदाबाई तांदळे यांचा पराभव केला. येथे २३ पैकी भाजपचे केवळ ५ उमेदवार विजयी झाले.
तसेच जिल्ह्यात चिखलीची निवडणूक चांगलीच गाजली. येथे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांना यश मिळवता आले नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रिया कुणाल बोंद्रे ह्या निवडून आल्या आहेत. तर एकूण २६ सदस्य संख्या असलेल्या चिखली नगर पालिकेत कॉंग्रेसला केवळ ९ जागा मिळाल्या. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सिंदखेडराजा मतदारसंघात सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व असून देऊळगावराजा नगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. तर येथील आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे शिवसेनेचे आहेत. देऊळगावाजा नगर पालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वर्चस्वासाठी सुरू असलेल्या लढाईत भाजपच्या सुनिता रामदास शिंदे यांनी बाजी मारली आहे. पालिकेत १८ पैकी भाजपने ४ जागा मिळवत प्रथमच यश मिळवले आहे.
आमदार संजय कुटे मतदारसंघात सुरक्षित
जळगाव जामोद मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नांनी जळगाव पालिकेत भाजपच्या सीमा कैलास डाेबे विजयी झाल्या आहेत. तसेच शेगावातही नगराध्यक्षपदी भाजपच्या शकुंतला पांडुरंग बुच ह्या विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या मीनाक्षीताई रामविजय बुरुंगले यांचा पराभव करत ही पालिका काँग्रेसच्या ताब्यातून भाजपकडे आली आहे.
-- जनार्दन गव्हाळे, औरंगाबाद
gavhalej@gmail.com
December 3, 2016
आपले रक्षण करण्याची प्रार्थना करताना भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात,
August 11, 2020
२०१७ वर्षाच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदा पाच स्थानांची झेप घेतली आहे. आता रिलायन्सच्या पुढे रशियाची गॅस कंपनी गेजप्रॉम आणि जर्मनीची ई. ऑन या दोन कंपन्या आहेत.
December 23, 2021
डॉ. बाळ दत्तात्रय टिळक (१९१८ -१९९९) हे मुळातले यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा गावचे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञानातील बीएस्सी करून मग सायन्समधून ऑफ इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल त्यांनी प्रा. के. व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. नंतर ते इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले व नोबेल पुरस्कार विजेते प्रा. रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.फिल. ही पदवी दिली.
October 5, 2023
श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ..
February 7, 2017
तुझ्या नामी
पांडुरंग
आम्ही सारे
झालो दंग।।१।।
वारकऱ्या
सवे संग
भाव भक्ती
नाही भंग।।२।।
गाती सारे
हे अभंग
हा अबीर
घे सुगंध।।४।।
नाम जप
हा व्यासंग
तुझ्या दारी
मी पासंग।।५।।
या जगतात
तू अथांग
लागे कसा
तुझा थांग।।६।।
कशी करू
सेवा सांग
नाही फिटे
तुझे पांग।।७।।
हरी हरी
हाच चंग
भक्तीला नं
चढे गंज।।८।।
भजनात
चढे रंग
दर्शनास
लावू रांग।।९।।
विठू माझा
सांगोपांग
चंद्रभागी
हे अभ्यंग।।१०।।
i
November 17, 2019
आरोग्य व आरोग्यसेवेचा हक्क हा मानवाचा जन्मजात अधिकार म्हणता येईल. जगण्याचा – नागरिकत्वाच्या अधिकाराबरोबर आरोग्यदायी वातावरण व पुरेशी – नियमित आरोग्य सेवा आवश्यक असते.
May 11, 2023
गेल्या काही वर्षांमध्ये विविध डेज साजरा करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजू झाला आहे. त्यातीलच एक दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या वडिलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
June 16, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti