(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगातील पहिला मोबाईल कॉल मोबाईल फोनवरून केला गेला

    ३१ जुलै १९९५ रोजी भारतातील मोबाईल सेवा सुरू झाली. कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला, हा कॉल केला होता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी. मोबाइलचे जाळे देशात पहिल्यांदा कोठे अंथरले जाईल तर ते कोलकात्यामध्येच, हा त्यांचा हट्टाग्रह होता. ते सुरू झाले तेव्हा त्यांनी रायटर्स बिल्डींगमधून तेव्हाचे केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल फोन केला.

      April 3, 2022


  • माझ्याचसोबत असे का घडते

    म्हणजे, “प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती समजून घ्या, केव्हा काय करावे, कसे करावे, व का करावे हे जाणून घ्या?”

      December 26, 2021


  • डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग १०

    मलेरियाच्या संशोधनातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते

    मलेरिया विषयक संशोधनात रॉस खेरीज अनेक युरोपियन शास्त्रज्ञ आघाडीवर होते. किंबहुना काही संशोधकांनी मलेरियाच्या परोपजीवांचा सखोल अभ्यास डॉ. रॉस या क्षेत्रात पडण्यापूर्वीच सुरू केला होता. त्या सर्वांचा या संशोधन मार्गावरील इतिहास हाही तितकाच मनोरंजक आहे.

    अल्फानॉस लॅव्हेरान
    याचा जन्म फ्रान्समधील एका बुद्धिमान कुटुंबात झाला. वैद्यकीय शास्त्रामधील मेडिसीन व पॅथॉलॉजी ह्या दोन महत्त्वाच्या विषयांमध्ये तो निष्णात होता. कोणत्याही रोगाचा अभ्यास करताना या दोन्ही विभागांचा आधार घ्यावा लागतो. फ्रेंचांची वसाहत अल्जियर्स म्हणजे अफ्रिकेच्या उत्तर भागात होती. लॅव्हेरान याची या जागी युद्धातील एक प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. वॉने व कॉनस्टेंटाईन या दोन गावात १८८० ते १८८५ मध्ये फ्रेंच सेना लढत होती. त्या काळात तेथे तापाची साथ इतकी जबरदस्त होती की, युद्धभुमीवर जेवढे सैनिक लढताना मरत, त्यापेक्षा जास्त साथीच्या रोगाने मरत होते. लॅव्हेरान या तापाच्या रोगाने चक्रावून गेला होता.त्याने अनेक तापाने मेलेल्या सैनिकांचे शवविच्छेदन (Autopsy) केले, तेव्हा या सर्वांमध्ये आकाराने मोठी झालेली प्लीहा व यकृत (Enlarged Spleen & Liver) निरिक्षणात आढळले. त्यावर काळपट रंगाचे पट्टेही दिसून आले. हे पाहुन लॅव्हेरानला दाट शंका आली की हा कोणत्यातरी जंतूंचा परिणाम असून त्यामुळे रोगी दगावतात. हे लक्षात घेऊन त्याने मरणपंथाला लागलेल्या काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने काचपट्टीवर घेऊन अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या मायक्रोस्कोप खाली तपासणी सुरू केली सध्याच्या काळात काचपट्टीवरील रक्तातील सर्व तऱ्हेच्या पेशी व परोपजीवी यांच्यावर रंगीत द्रावाचा (staining procedure) प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ते अधिक ठळकपणे ओळखण्यास सोपे जातात परंतु सुरवातीला लॅव्हेरानच्या काळात ह्या द्रावांचा शोध लागला नव्हता, ही त्याच्यासाठी मोठी अडचणच होती. असे असून सुद्धा रंगहीन तांबड्या पेशींवर लॅव्हेरानला काळपट रंगाचे बारीक कण दिसत होते. त्यांना Malariform leucocytes असे नाव देऊन तो या निष्कर्षाला आला की हेच मलेरियाचे जंतू असून तेच या तापाला कारणीभूत आहेत. एका सकाळी तो रुग्णाच्या रक्ताचे काचपट्टी वरील निरीक्षण करीत असताना एका तांबड्या रक्तपेशीजवळ वळवळ करणारा बारीक तंतूमय जीवाणू त्याला दिसला त्यावेळी त्याची बालंबाल खात्री पटली की हा मलेरियाच्या जंतूचा काहीतरी भाग आहे. खरे तर अशी वळवळणारी जीवाणूची स्थिती आजमितीलासुद्धा मायक्रोस्कोपखाली दिसणे फार दुर्मिळ असते.

    त्या काळामध्ये साधारणत: मलेरियाबाबत असा प्रचलित प्रवाह होता की त्याचे जंतू बहुधा हवेतून शरीरात शिरतात परंतु लॅव्हेरान जसजसा खोलात जाऊन संशोधन करू लागला तेव्हा त्यांच्या असे लक्षात येऊ लागले की हे जंतू (Bacteria) नसून परोपजीवी म्हणजेच (Parasites) आहेत. एकदा तर त्याने अशीही शंका व्यक्त केली होती की हे परोपजीवी डासांच्या चावण्यातून माणसाच्या शरीरात शिरत असावेत. परंतु या त्याच्या विधानाला बाकीच्या वैद्यकीय शास्त्रज्ञांनी नुसते धुडकावलेच नाही तर त्याला वेड्यातही काढले. यामुळे तो हवालदील झाला पण तरीही आपण पाहिलेले रक्तातील परोपजीवी त्याने प्रसिद्ध फ्रेंच जंतू शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांना मायक्रोस्कोप खाली दाखविले व पाश्चरचीही खात्री पटली की हे जंतू नसून परोपजीवी आहेत.

    मलेरियाचे परोपजीवी शोधण्याचा पहिला मान लॅव्हेरानकडे जातो. त्याने पॅरेसायटॉलॉजी ही शाखा (परोपजीवांचे शास्त्र) मनुष्याच्या अनेक रोगांशी निगडीत आहे हे सिद्ध केले. दुर्दैवाने मलेरिया व डास यांचा निकटचा संबंध तो दाखवू शकला नाही. परंतु त्याच्या संशोधनाची व्याप्ती खरोखरच फार मोठी होती. लॅव्हेरानने आपले सर्व लक्ष Trypanosoma या अफ्रिकेतील रोगाकडे केंद्रित केले होते. हा रोग एका विशिष्ट गटाची माशी चावल्यामुळे होऊन त्यात माणूस अखंड झोप येऊन अखेर मरण पावतो (Sleeping Sickness). त्याने या रोगाचे परोपजीवी काचपट्टीवरील रक्तामध्ये दाखवले व त्याच सुमारास काचपट्टीवरील रक्ताचा नमुना रंगीत करण्याची ढोबळ पद्धत सुदैवाने अवगत झाली होती.

    Leishmaniasis (kala Azar, Dum Dum Fever) हा रोग एका विशिष्ट माशीपासून होतो हेही लॅव्हेरानने सिद्ध केले होते. या रोगाचा प्रार्दुभाव बिहार बंगाल भागात जास्त प्रमाणात आढळतो परेसायटॉलॉजीचा जनक लॅव्हेरान त्याच्या संशोधनामुळे अजरामर ठरला होता.

    पॅट्रीक मॅन्सन
    इंग्लंड देशाचा अतिशय नावाजलेला M.D. Physician, ज्याने आपले उभे आयुष्य उष्ण कटिबंधातील (Tropical Medicine) रोगांवरील संशोधनात घालावले. आजमितीसही भारत व आजुबाजूच्या देशांमध्ये या रोगांचा तिढा तसाच कायम आहे किंबहुना Tropical Medicine चा मॅन्सन हा जनक असून त्याने आपल्या प्रत्यक्ष अनुभवांवरील लिहीलेले पुस्तक हे वैद्यकीय शास्त्रावरील अतिशय सन्मान मिळालेल्या पुस्तकाच्या यादीमधील एक असे समजले जाते. त्याने अंदाजे २० वर्षे फिलीपाईन्स व चीन या देशात इंग्लंडचा वैद्यकीय अधिकारी म्हणून बहुमोलाचे काम केले होते. Filariasis (हत्ती रोग) डास चावल्याने होतो याचा शोध व रक्तात दिसणारे परोपजीवी त्यानेच प्रथम दाखविले होते. डास व मलेरिया यांचा काहीतरी संबंध आहे हा सिद्धांत त्यानेही मांडला होता. यामधूनच डॉ. रॉसला संशोधनाचा सूर मिळाला व रॉसने आपले कार्य पूर्णत्वास नेले. मॅन्सनने त्या सिद्धांताचा पुढे पाठपुरावा केला नाही. त्या काळी तो लंडनमधील एक प्रतिष्ठित, उच्च दर्जाचा फिझिशियन म्हणून मानला जात असे. या व्यवसायातून त्याने भरपूर मान, कीर्ती व पैसा मिळवला.

    केमिलो गॉल्गी
    हा एक हुषार इटालियन डॉक्टर, प्रथम फिजिशियन, नंतर सायकॅट्रीस्ट पुढे पॅथॉलॉजी विभागात मेंदू व मज्जारज्जूचा मायक्रोस्कोप द्वारा अभ्यास करणारा गाढा अभ्यासक व मलेरिया परोपजीवांचा अभ्यास करणारा अशा प्रकारे विविध वैद्यकीय क्षेत्रात नैपुण्य मिळविणारा महान संशोधक होऊन गेला. मलेरिया परोपजीवांची तांबड्या रक्तपेशींत होणारी वाढ व बरोबर त्याच वेळी रुग्णांना येणारी प्रचंड हुडहुडी (Chills) व वाढत जाणारा ताप याचा संबंध प्रथम गॉल्गीने दाखवून दिला व त्याचबरोबर क्वींनिन या औषधाने परोपजीवी मरतात, त्यावेळी ताप पूर्णपणे उतरतो हे महत्त्वाचे अनुमान त्यानेच काढले. काचपट्टीवरील रक्ताच्या तांबड्या रक्तपेशीत दिसणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवीचा फोटो प्रथमच त्याने दाखविला. पाव्हिया येथील इटालियन विद्यापीठाच्या म्युझियम मध्ये ही अनमोल रक्ताची काचपट्टी व फोटो आजही उपलब्ध आहे. याखेरीज मज्जातंतू मायक्रोस्कोपखाली पहताना रंगीत दिसावेत यासाठी त्याने विविध स्टेन (रंग द्रव्य) शोधून काढले. या मज्जातंतूंच्या पेशीमधील महत्त्वाचा भाग गॉल्गी टेंडन या नावाने प्रसिद्ध आहे.

    मलेरिया व नोबेल पारितोषिक
    नोबेल पारितोषिकांच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात वैद्यकीय विभागामध्ये मलेरिया व त्यासंबंधीत महत्त्वाचे संशोधन यासाठी आजपर्यंत तीन वेळा पारितोषिके देण्यात आली आहेत. यावरून मलेरियाचे महत्त्व किती होते हे पटण्यासारखे आहे

    १९०२ रोनॉल्ड रॉस-पूर्णपणे मलेरियावरील संशोधन
    १९०६ केमिलो गॉल्गी-मज्जातंतूचा अभ्यास व मलेरियावरील संशोधन
    १९०७ लॅव्हेरान -मलेरिया, ट्रिपॅनोसोमियासिस व काला आझार या रोगांवरील संशोधन

    इटालियन डॉक्टर निओवनी ग्रासी
    ग्रासीने प्लाझमोडियम गटाचा (मलेरियाच्या परोपजीवाचा) शोध अतिशय मेहनत घेऊन लावला होता. पुढे त्याची दिशा चुकली व तो रॉस बरोबरील भांडणाच्या गुंत्यात साफ अडकला. मॅन्सननेही डासांवरील संशोधनाचा पाठपुरावा शेवटपर्यत जाऊन केला नाही. त्यामुळे ग्रासी व मॅन्सन यांचे मलेरियावरील पारितोषिक हुकले परंतु तरीसुद्धा दोघांचे कार्य मोलाचे आहे ह्यात शंकाच नाही.

    -- डॉ. अविनाश वैद्य

      October 10, 2022


  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ६

    स्मरेत्प्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलांबरां,
    गृहीतमधुपात्रिकां मधुविघूर्णनेत्रांचलाम्‌ |
    घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां,
    त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥६||

    आचार्यश्री तथा भारतीय संस्कृतीच्या एका वेगळ्याच वैज्ञानिकतेने थक्क करणारा हा श्लोक.
    स्मरेत्प्रथमपुष्पिणीं- या त्रिभुवन स्वरूप लतेवर आलेले पहिले पुष्प असणाऱ्या जगदंबेचे स्मरण करावे. रुधिरबिन्दुनीलांबरां- रक्त बिंदू प्रमाणे निल वस्त्र धारण केलेली.
    प्रथम क्षणी आपल्याला हे वर्णन विचित्र वाटेल. पण त्यामागे फार मोठे वैज्ञानिक सत्य आहे.
    रक्ताचा निळा रंग वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येतो.
    पहिली गोष्ट म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्या तर निळसर रंगाच्या दिसतात.
    दुसरी गोष्ट जेव्हा रक्तात प्राणवायूचे प्रमाण कमी होते त्यावेळी त्याचा रंग निळसर होतो.
    याच कारणाने फुफ्फुसापासून हृदयापर्यंत प्राणवायू युक्त रक्त नेणाऱ्या नलिकेला धमणी असे म्हणतात तर हृदयापासून फुफ्फुसा पर्यंत प्राणवायूक्षीण रक्ताला नेणाऱ्या रक्तवाहिनीला नीला असेच म्हणतात.
    शरीरातील सर्व अवयवांना प्राणवायू पुरवल्यामुळे या रक्तातील प्राणवायू कमी झालेला असतो.
    अशा नीलवर्णीय रक्ताप्रमाणे रंग असणारे वस्त्र जिने धारण केलेली आहेत अशी.
    पूज्य आचार्यश्रींचे दर्शन किती सूक्ष्म आहे ? याचा विचार करावा.
    गृहीतमधुपात्रिकां- जिने आपल्या रसग्रहणासाठी हाती मधाचे पात्र धारण केले आहे अशी. मधुविघूर्णनेत्रांचलाम्‌ - मधू प्राशन केल्याने जडावलेले नेत्र असणारी.
    घनस्तनभरोन्नतां- उन्नत आणि भरगच्च स्तनमंडल असणारी. गलितचूलिकां- आपल्याच आनंदात मान हलवल्याने वेणी,गजरा गळून पडलेली
    श्यामलां- सावळ्या,
    त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये - भगवान शंकरांची सहधर्मचारिणी असणाऱ्या श्रीत्रिपुरसुंदरीचा मी आश्रय करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 7, 2020


  • शेतकरी राजा

    असा उद्योगधंदा जगाच्या पाठीवर शोधुन तरी सापडेल का ?

    ९५२ किलो म्हणजे जवळपास टनभर कांद्याची विक्री. कांद्याला दर मिळाला प्रतिकिलो १ रुपया ६० पैशे.

    ९५२ किलोचे झाले १५२३ रुपये २० पैशे.

    त्या १५२३ रुपये २० पैशातुन आडत ९१ रुपये ३५ पैशे,

    हमाली ५९ रुपये,

    भराई १८ रुपये ५५ पैशे,

    तोलाई ३३ रुपये ३० पैशे आणि

    मोटार भाडे १३३० रुपये

    असे एकुण १५२२ रुपये २० पैशे वजा करुन

    हातात मिळाला 1 रुपया.

    हमाल, काट्यावाला, आडतदार, वाहतुकदार यांना रोजगार तर ग्राहकांना माफक दरात शेतीमाल उपलब्ध करुन हातात मिळालेली दमडी घेऊन तो विनातक्रार चालता झाला. एवढी दानत एखाद्या कर्तव्यदक्ष राजाकडेच असु शकते.

    म्हणुनच त्याच्यासाठी शेतकरी राजा हे विशेषण वापरले जात असावे.

      June 1, 2016


  • सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं-एक तारतम्य..

    मी सोशल मिडीयावर लिहितो. खूप लिहितो. बऱ्याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही

      May 20, 2017


  • पौरोहित्य – एक सामाजिक जबाबदादी

     हिंदू समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. हर्शोल्हासित होऊन सण व्रत वैकल्ये आपल्या कुटुंबा सहित किंवा सांघिक शक्ती द्वारा साजरी करणे हा या समाजाचा मुख्य गाभा आहे. हि ब्रत वैकाल्ये जेव्हा आपल्या कुटुंबा बरोबर साजरी केली जातात तेव्हा हा वारसा नकळत पणे आपण आपल्या पुढच्या पिढीला देत असतो, आपसी बंध बळकट करत असतो, हा संस्काराचा आनंदाचा ठेवा कोणत्याही भौतिक सुखापेक्षाही मोठा आहे याचा आदर्श घालून देत असतो

      May 1, 2024


  • भारतातील प्रवासी गाड्यांचे क्रमांक

    प्रत्येक प्रवासीगाडीला नाव असतं. नाव नसेल, तर ती गाडी जिथून निघते त्या सुरुवातीच्या स्टेशनच्या किंवा जेथे ती अखेरीस थांबते, त्या शेवटच्या स्टेशनच्या नावानं ओळखली जाते; परंतु रेल्वे स्टेशनं, तिकीट कंट्रोल रूम येथे मात्र त्या गाड्या क्रमांकानुसार ओळखल्या जातात. १०० वर्षांपूर्वी गाडीला साधा एक अंकी किंवा दोन अंकी क्रमांक असे. मुंबईहून निघणाऱ्या गाड्यांना ‘डाऊन’ गाडी व मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना ‘अप’ असं संबोधले जाई. त्याप्रमाणे डाऊन गाडीला जो क्रमांक दिला असेल, त्याच्या पुढचा क्रमांक अप गाडीसाठी दिला जाई.

      June 6, 2022


  • प्रेमकथा : पूर्वीच्या आणि आजच्या 

    प्रेमकथेमुळे भारतीय चित्रपट सृष्टीला कधीच मरण नाही. पूर्वीच्या चित्रपटातील प्रेमकथेला दर्दभरा साज होता. असंख्यांना भुरळ घालणार्‍या प्रेमकथांनी सामाजिक जीवनावर अधिपत्य गाजवायला सुरुवात केली आहे. आजच्या चित्रपटातील प्रेमकथा पाहून खर्‍या जीवनात त्यांना प्रत्यक्षात आणणे, एवढेच सामान्य ध्येय उराशी बाळगून जगतायेत आजचे तरुण.  

      January 11, 2019


  • औषधे उपयोग – मक्याची कणसे

    १. मक्याचं कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना देखील मका खाऊ घाला.
    २. मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर ते टाकून देऊ नका. मक्याच्या कणसाचे दोन तुकडे करा आणि मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घ्या. यामुळे सर्दी कमी होते.
    ३. मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होऊ शकतो.
    ४. आयुर्वेदात मक्याचं कणीस तृप्तीदायक, वातकारक, कफ, पित्तनाशक, मधूर असल्याचं म्हटलं आहे. भाजलेले कणीस हे कॅरोटीनायड विटामिन-एचं एक उत्तम स्रोत आहे.
    ५. भाजलेल्या कणीसपासून 50 टक्के अँटी-ऑक्सीडेंट्स वाढतं. कँसरवर देखील हे लाभदायक आहे.

    संकलक : प्रमोद तांबे

    आरोग्यदुत या WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने..

      March 14, 2017