वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सध्या टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या मालिका दाखविल्या जातात त्या पाहून खरोखरंच प्रेक्षकांनी त्यातून काही बोध घ्यावां अशा असतात का ? हा प्रश्नांच उत्तर काय द्याव ?
हा प्रश्न या मालिका पाहणार्याअ सर्वांनाच व्यतीत करतो कारण आज बहूसंख्य प्रेक्षक फक्त टाईमपास म्ह्णून या मालिका पाहत असतात. पूर्वीचे प्रेक्षक जेवढ्या आवडीने उत्सूकतेने रामायण महाभारत पाहत होते तितक्या उत्सूकतेने आजचे प्रेक्षक पाहतात का ? पूर्वीच्या त्या मालिकांतील कोणत पात्र कोणी साकारलयं हे शेंबडया पोरांना ही माहित असायचं पण ! आज मालिकात काम करणार्यार काही मोजक्याच कलाकारांची नावे लोकांना माहित असतात. आज लोक कोणत्याही मालिकेत फार गुंतत नाहीत. मी तर एकाच वेळी तीन-तीन मालिकांचा एक-एक तुकडा पाहतो आणि तरीही मला त्या तीनही मालिका पाहिल्याचं मानसिक समाधान मिळतं. एखादी मालिका एक महिना जरी पाहिली नाही तरी आपण फार काही गमावलं असं हल्ली कोणा प्रेक्षकाला बहूदा वाटत नसावं. कोणत्या मालिकेत कोणत कथानक किती खेचावं याला काही मर्यादाच राहिलेली नाही.
एखादा सरडा ही जितके रंग बदलत नाहीत इतके रंग या मालिकेतील पात्र बदलत असतात. मालिका म्हटली की ती श्रीमंतच असायला हवी असा या मालिकांची निर्मिती करणार्यांबनी जणू ठरवूनच टाकलेलं दिसतयं. या मालिकात श्रीमंत लोकांच्या गरीब समस्या दाखविल्या जातात आणि मध्यामवर्गीय माणूस चणे खात त्या पाहात राहतो. या मालिकांतील पात्र क्षणात गरीब आणि क्षणात श्रीमंत होताना दिसतात. प्रत्येक मालिकेत खास करून हिंदीत मालिकेच्या सुरूवातीला सर्व श्रीमंत दाखवायचे सारं इतक भव्यदिव्य दाखवायची की ते पाहून गरीबांचे डोळेच दिपतील, त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले की मग त्या श्रीमंताना गरीब करायचं मग गरीबांच्या भावनानां हात घालून त्यांच्या मनाचं समाधान झालं की त्यांना जादूची कांडी फिरवून पुन्हा श्रीमंत करायचं आणि गरीबाला ही श्रीमंत होता येत असं स्वप्न गरीबांना दाखवायचं. गरीब ते स्वप्न पाहात असतानाच अचानक ती मालिका बंद करायची आणि गरीबांच्या स्वप्नावर पोतेरं फिरवायचं.
टेलिव्हिजनवर आता एक नवीनचं प्रकार सुरू झालेला आहे पुरूष कलाकारांनी बायकांच्या वेशात वावरण्याचा एक विनोदाचा भाग म्ह्णून हे होत होत तो पर्यत ठिक होतं पण आता ते फारचं किळ्सवाण वाटू लागलेलं आहे. एखाद्या भुमिकेची गरज म्ह्णून पुरूषांनी स्त्री वेशात वावरणं ठिक आहे पण हल्ली बायकांना पुरूषांना स्त्री वेशात पाहायला आवडू लागलंय की काय अशी भिती हळूच मनात डोकावू लागते की काहीतरी नवीन करायचं म्ह्णून पुरूष कलाकारांनी स्त्री वेशात वावरायचं अशी काही नवीन प्रथा सुरू झाली असेल तर ते फारचं विचित्र म्ह्णावं लागेल. कॉलेजात जाणारे तरूण फॅशन म्ह्णून साडी नेसून कॉलेजात नाही गेले म्ह्णजे मिळविली असं म्ह्णण्याची वेळ आलेली आहे.
मी मालिकेशी संबंधीत माझ्या एका मित्राला म्ह्णालो ही तुमच्या मालिकेच्या प्रत्येक भागातील अर्धा-अधिक वेळ स्वयंपाक घरात आणि रॅम्पवॉक करण्यातच जातो त्यावर तो म्ह्णाला मलाही याचा कंटाळा आलायं पण काय करणार ? आता बोला !
समाजात जे घटस्फोटाचे आणि विवाह बाहय प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढत आहे त्याला हया मालिका तर जबाबदार नाहीत ना ? असा प्रश्न ही मला कधी - कधी सतावू लागतो. माझ्या मित्रांना मी मालिका पाहतो हे ऐकल्यावर फारचं आश्चर्य वाटतं ते वाटण्याचं कारण शोधलं असतात आपल्या देशातील फार कमी पुरूष या मालिका पाहतात. पण मला वाटत पुरूषांनी या मालिका नाक्कीच पाहायला हव्यात म्ह्णजे त्यांना हया मालिका आपल्या घरातील बायकांच्या मेंदूत नक्की काय घुसडतं आहेत हे अगदी सहज लक्षात येईल.
मालिकांतीला पात्रे जे पोषाख परिधान करतात तेच पोषाख परिधान करण्याची हुक्की मध्यमवर्गीय स्त्रियांच्या मनात निर्माण होऊ लागते. मालिकेत सती सावित्री दाखविलेल्या नायिकेला जेंव्हा एखादा पुरूष एका बारमध्ये दारू पिताना पाहतो तेंव्हा तो ती मालिका डोळे फाडून पाह्णे थांबवतो. मालिकांतील पात्रांमध्ये आपल्या कडील प्रेक्षक गुंतून पडतात. मालिकांतील कथानकासोबत ते स्वतः ही वाहत जात राहतात.
एखादया माणसाच्या आयुष्यात किती संकट यावी आणि त्यातून त्याने सहीसलामत बाहेर निघावं किती वेळा यालाही काही मर्यादा राहिलेली नाही. या मालिकातील कोणत्या पात्राची बुध्दी कधी भ्रष्ट होईल अथवा त्याची स्मृती नाहिशी होईल हे तर साक्षात परमेश्वरालाही सांगता येणार नाही मला तर वाटत ती मालिका लिहणार्याहलाही ते नक्की माहित नसावं. माझ्या आतापर्यतच्या आयुष्यात असा स्मृती नाहिशी झालेला मी एक ही माणूस पाहिलेला नाही म्ह्णून मी माझ्या एका डॉक्टर मित्राला उत्सूकतेतून विचारलं हे जे मालिकेतील पात्रांची स्मृती जाताना दाखवितात त्यंना काही गोष्टी कशा काय आठवत असतात ? तेंव्हा तो मला म्ह्णाला आपल्या मेंदूत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्मृती साठविलेल्या असतात त्यामुळे मेंदुचा ज्या भागाला इजा पोहचलली असते फक्त त्या भागातील जमा स्मृतीच नाहीशी होते. मालिकेतील कथानक पुढे जाव म्ह्णून एखाद्या मालिकेतील एखाद्या पात्राची स्मृती जाणे मान्य केले जाऊ शकते पण त्यानंतर आणखी चार-पाच मालाकांतील पात्रांची स्मृती जात असेल तर हा कहरच म्ह्णायला नको का ? माझं तर असं ही निरीक्षण आहे की स्मृती जाण्या सारखे प्रकार मालिकात एखाद्या पात्राच्या मृत्यूच्या बाबतीत ही घडताना दिसतात.
सासू सुनेच नातं हा तर या मालिकांचा जणू प्राणच आहे असा समज करून घ्यायला या मालिकांचे निर्माते ही नाही म्ह्णणार नाहीत. सध्याच्या सासू – सूना यामधील नातं बदलत चाललयं अर्थात सूनेला आता सासूचा धाकच उरलेला नाही याला या मालिकाच जबाबदार आहेत. काही पालक स्वतःहून आपल्या मुलाला लग्न झाल्यावर स्वतत्र राहण्याचा सल्ला देतात. एका मालिकेतील लेखक एक पुस्तक प्रकाशित होताच सिलेब्रेटी होतो आणि दुसरीकडे कविता लिहणार्याा नायिकेला एक कविता लिहल्याबद्द्ल फक्त शंभर रूपयाचे मानधन मिळते आणि त्याचा आनंद तिला करोडो रूपये मिळाल्यासारखा व्यक्त करताना दाखविला आहे.
रोजच्या जीवनात घडणार्या घटना हल्ली मालिकांत डोकावताना दिसतात पण हल्ली वडपोर्णिमेलाही मालिकांत मानाचे स्थान मिळू लागले आहे त्यात कहर म्ह्णजे हे असे सण पुरूषांनी ही साजरे करावेत हा अट्टहास खरोखरंच विचार करायला भाग पाडणारा आहे. आता समाजात कायं घडावं, कोणते सण कसे साजरे व्हावेत, कोणत्या परंपरा बुरसटलेल्या आहेत आणि कोणत्या समाज हिताच्या हे सारे आता हया मालिका ठरविणार का ? सध्याच्या माणसाचा खाजगी आयुष्यात मर्यादेपेक्षा अधिक डोकावताना दिसतात. काही पात्रांच्या प्रत्यक्ष आयुष्या घडणार्या् घडामोडींचा संबंधही या मालिकातील कथानकाशी जोडला जातो.
सध्याच्या मालिकात होणारे अंगप्रदर्शन मालिकेची गरज म्ह्णून कमी आणि टी.आर.पी वाढविण्यासाठी अधिक केले जाते हे सत्य आता कोणीही नाकारणार नाही, आपल्या देशातील बहूसंख्य पुरूष ते पाहण्यासाठीच या मालिका पाहत असतात असं बरेच पुरूष खाजगित मान्य करतात. घटस्फोटानंतर आपल्या आयुष्यात लगेच दुसरी व्यक्ती येऊ शकते आणि आपले जीवन पुन्हा आनंदाने बहरू शकते हा फाजील आत्मविश्वास या मालिका आजच्या पिढीच्या मनात निर्माण करतात आणि काही मालिकात घटस्फोटा घेण्यासाठी दाखविली जाणारी कारणे फारंच शुल्लक असतात. इतकी शुल्लक की ती वास्तवापासून प्रचंड दूरची असतात.
देवांवर असणारी मालिका पाहताना त्या मालिकेतून लोकांच्या मनात त्या देवाबद्द्ल श्रध्दा निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर नसतोच उलट त्या पाहणार्यााची डोळ्याची भुक वाढविण्याचे कार्य या मालिका अधिक करताना दिसतात. काही मालिका आहेत ज्या खरोखरच मनोरंजन करतात पण त्यातून बोध घ्यावा असं त्याच्यांत काहीही नसतं.
लोक सध्या मालिकेंच्या प्रेमात पडून आंधळे झालेले आहेत त्यामुळे त्या डोळसपणे पाहण्याची त्यांची तयारीच नसते.
लेखक – निलेश बामणे
गोरेगांव (पूर्व) मुंबई-65
मो. 8652065375 / 9029338268
September 5, 2015
जगातील सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाजांपैकी एक आणि ऑस्ट्रेलियाचा सार्वकालिक सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाज (ठसन असलीच तर डेनिस लिलीचीच) अशी मॅग्राची सार्थ ख्याती आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जे जबरदस्त वर्चस्व राखले त्यात ह्या कबुतराच्या गोलंदाजीचा सलामीचा आणि सिंहाचा वाटा होता.
February 9, 2016
दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.
या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात.. निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आíथक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
October 7, 2017
“नथ” हा एक पारंपारिक दागिना होय. महाराष्ट्रात हा अलंकार जास्त वापरला जातो.
March 3, 2024
गेली ७० वर्षे या ‘कलम ३७०’ मुळे भारतातील इतर कुठलेही कारखाने, उद्योगपती, उद्योजक काश्मीरमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार, उद्योग-व्यवसाय करू शकत नव्हते. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जो प्रचंड निधी केंद्र सरकारकडून दिला जात असे, त्याचा दुरूपयोग केला जायचा. एखादा प्रकल्प महाराष्ट्रात १० लाखांमध्ये बांधला जात असेल, तर तो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पटीने जास्त पैसे खर्च करून तयार केला जायचा. ९० टक्के पैसे हे काश्मीरमधील २५० कुटुंबाच्या खिशात जात होता. त्यामध्ये राजकीय पक्ष, तेथील काही उद्योजक आणि हुर्रियत कॉन्फरन्ससारखे समर्थक होते.
August 18, 2019
मलेरियाचा प्रसार हा प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो . १ ) एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या किती दाट आहे . २ ) डासांच्या प्रजोत्पादनासाठी आवश्यक असलेल्या घटकांची तेथील उपलब्धता . ३ ) मलेरिया ग्रस्त रुग्णांचे त्या भागातील प्रमाण .
डासांवर नियंत्रण आणणे ही एक प्राथमिक गरज आहे . जगातील विविध देशांतील याबाबतची सद्यस्थिती ही खालीलप्रमाणे आहे .
अमेरिका कॅनडा युरोप
अमेरिका व कॅनडा या देशांमध्ये १ ९ ४० ते १ ९ ४५ या काळात मलेरियाचा उद्रेक झाला होता त्याचवेळी दुसऱ्या महायुद्धातील परतलेल्या मलेरिया ग्रस्त सैनिकांमुळे देशात मलेरियाच्या रुग्णांची भरच पडत होती . अशा परिस्थितीत १ ९ ४६ साली अमेरिकेमध्ये Communicable Disease Control ( CDC ) या संशोधन संस्थेची स्थापना झाली . या संस्थेने अमेरिका मलेरिया निर्मूलन हा एक कार्यक्रम धडाडीने राबविला होता . या मोहिमेखाली शहरे व खेड्यातील प्रत्येक घराघरात जाऊन डास - निर्मूलनाचे कार्य अमलात आणले गेले . शहरे माणसांनी गजबजली होती . तरीही घाण , सांडपाणी साचलेली पाण्याची डबकी यावरील नियंत्रण १०० टक्के यशस्वी केले गेले .
या निर्मूलनाच्या कार्यासाठी लागणारा पैसा हा फार मोठ्या प्रमाणात गोळा करावा लागतो . या सर्व उभारलेल्या भांडवलाचा योग्य रीतीने नियोजनबद्ध विनियोग करावा लागतो . व त्यानंतर काही वर्षांनी रोगावर नियंत्रण आणले जाते , पर्यायाने पुढे रुग्णावर होणारा खर्च कमी होत जातो .
अमेरिका व कॅनडा या देशांनी १ ९ ५२ पर्यंत मलेरियावर पूर्णपणे नियंत्रण आणले . अशीच पद्धत अवलंबून युरोपियन देशात नियंत्रणाची योजना आखली गेली व ती कमालीची यशस्वी झाली .
अफ्रिका व अशिया
प्रगत देशात मलेरिया निर्मूलन ९ ५ ते ९ ८ टक्के यशस्वी होत असताना अफ्रिका व अशिया खंडाकरिता जागतिक आरोग्य संघटनेने भरघोस पैशाची मदत देऊन १ ९ ५२ ते १ ९ ७० या काळात मलेरिया निर्मूलन कार्यक्रम राबविण्यास सुरवात केली . १ ९ ७० ते १ ९ ७५ या काळात अशिया खंडातील भारत व व्हिओटनाम हे दोन्ही देश इतर देशांच्या तुलनेने प्रतिबंध यशस्वी करण्यात बरेच आघाडीवर होते .
अतिपूर्वेकडील कंबोडिया , लाओस , इंडोनेशिया या देशात एकंदर शहरांची संख्या अल्प आहे त्या भागात शहरापेक्षा खेड्यातून मलेरियाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते . गेल्या २० वर्षांत इंडोनेशिया मधील बाली बेट त्यापासून संपूर्ण मुक्त असून बाकी बेटांवरील प्रमाण तुलनेने कमी होत आहे . टिमोर बेटावर मात्र हे प्रमाण बरेच आहे . तर चीनसारख्या विस्तारित देशात काही जंगल विभाग वगळता शहरातून मलेरिया आढळत नाही . श्रीलंकेत १ ९ ६१ सालापर्यंत जवळजवळ साथ सदृश्य परिस्थिती होती परंतु २०० ९ सालापासून कोलंबो व इतर शहरे मलेरिया मुक्त असून फक्त जंगल भागात त्याचे अस्तित्व आहे . सिंगापूर , मलेशिया हे दोन देश गेल्या तीस वर्षांपासून तर मोरक्को , मालदिव ही २०१० सालापासून मलेरिया मुक्त असल्याचे घोषित करण्यात आले आहेत . अफ्रिका या खंडाची स्थिती गंभीर असून तेथे मलेरिया अजूनही आटोक्यात आलेला नाही . भारत , म्यानमार ( ब्रह्मदेश ) , पाकिस्तान व बांगला देश येथे मलेरियाचे रोगी वर्षभर आढळून येतात .
युनायटेड नेशन्स ने " दंश करणारा रोग मलेरिया " या प्रसिद्ध केलेल्या अहवालात जगाचे दोन नकाशे तुलनेसाठी एका खालोखाल एक अशा रितीने प्रसिद्ध केलेले आहेत . त्यापैकी वरच्या नकाशात ज्या ज्या देशांत मलेरियाचा प्रादुर्भाव आहे ते देश लाल रंगात दर्शविले आहेत , तसेच खालील नकाशात देशा - देशांमधील गरिबीच्या निकषांवर आधारित निळ्या रंगात विविध देश दाखविले आहेत . दोन्ही नकाशांकडे तुलनात्मक पाहता , मलेरिया ग्रस्त देश व जास्त गरिबी असलेले देश यामध्ये साध्य आढळते . यावरुन गरिबी , अविकसनशील देश आणि मलेरिया यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे हे नुसत्या नकाशावरील समानतेवरूनच लक्षात येते . त्यासाठी आकड्यांच्या तक्त्यांची गरज नाही . गरीब व्यक्तीला मलेरिया झाल्यानंतर त्याची काम करण्याची कमी झालेली क्षमता व अर्थातच त्यामुळे कमी देता येणारा त्याचा महत्त्वाचा कृतिशील वेळ या दोनही गोष्टींचा रुग्णावर अपरोक्षपणे परिणाम होतो व परिणामी गरिबी अधिकच वाढत जाते . वारंवार होणाऱ्या मलेरियाचा मानवी जीवनावरचा आघात इतका जबरदस्त आहे की अफ्रिकेतील काही भागात दर ४५ सेकंदाला एका लहान मुलाला मलेरियाची लागण होत असते .
Roll Back Malaria निर्मूलन कार्यक्रम United Nation या संस्थेने २००५
ते २०१५ सालापर्यंत आखला आहे . यात तीन मुख्य गोष्टींवर भर दिलेला आहे .
१ ) कीटक नाशकाने प्रक्रिया केलेल्या मच्छरदाण्यांचा मुबलक पुरवठा
२ ) Artesamine या बरोबरच एकत्रितपणे इतर औषधांची अति स्वस्त दरात उपलब्धता
३ ) कीटकनाशके व मुख्यत : D.D.T. चा मुबलक वापर
अफ्रिका खंडात लहान मुलांमध्ये मलेरियामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण आटोक्यात आणणे ही एक मूलभूत व गंभीर समस्या आहे . याठिकाणी मच्छरदाण्यांचा मुबलक पुरवठा असूनही दर सात बालकांपैकी केवळ एक बालक मच्छरदाणीत झोपते व हीच परिस्थिती गरोदर स्त्रियांमध्येही आढळते यावरून प्रबोधनाची गरज किती आवश्यक आहे हे पटते .
अबुजा येथे झालेल्या जागतिक मलेरिया परिषदेत ' मलेरिया निर्मूलन ' कार्यक्रमाला अग्रक्रम देण्याच्या ठरावाला जागतिक बँकेने ५०० दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचे आश्वासन देऊन दुजोराच दिला आहे . भरघोस देणगी देणाऱ्यांची संख्या वाढल्यास लस - निर्मितीस मोलाची मदत होईल असे आव्हान ही करण्यात आले आहे . जागतिक Rolling Back Malaria Global Strategy and Booster Programme असा १८० पानांचा अहवाल सादर केला आहे . या अहवालातील धोक्याचा संदेश असा आहे .
“ भारत , म्यानमार , बांगला देश हे देश दक्षिण अशिया व दक्षिण पूर्व अशिया खंडातील देशांपेक्षा या कार्यक्रमात मागे पडत आहेत . अंदाजे ८० टक्के भारतीयांना मलेरिया होण्याची शक्यता आहे , तेव्हा नुसतीच लस उपलब्ध करून मलेरियावर पूर्ण नियंत्रण आणणे कठीण आहे . याचे कारण तेथील निर्मूलन पद्धतीतच दोष असून त्या परिपूर्ण ठरत नाहीत तेव्हा भारतातील सद्यस्थिती काय आहे हे पाहण्याची आवश्यकता आहे .
भारत
आज भारताचा २००० मीटर उंचीवरील प्रदेश वगळता सर्व देश मलेरियाच्या गंभीर समस्येने ग्रासलेला आहे . दक्षिण पूर्व अशियातील एकूण मलेरियाच्या रोग्यांपैकी ७० टक्के हे भारतीय रुग्ण आहेत ही खरोखरच खेदजनक व चिंताकारक वस्तुस्थिती आहे . २१ व्या शतकात पुढारलेल्या राष्ट्राच्या पंक्तीमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या भारत देशास ही गोष्ट निश्चितच भूषणावह नाही .
भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवाशाला संभाव्य रोगांची जी यादी दिली जाते त्यात डासांपासून होणारे रोग अग्रस्थानी असतात . मलेरिया रोग प्रतिबंधक औषधे प्रवासाला निघण्यापूर्वीपासून ते परत मायदेशी गेल्यावरही काही दिवस त्यांना घ्यावी लागतात . कित्येक परदेशी पर्यटक गोवा , केरळ या ठिकाणी समुद्रकिनारी येतात व त्यांना डासांपासून होणाऱ्या रोगांचा प्रसाद मिळत असतो .
१ ९ ७० ते १ ९ ७५ सालापर्यंत भारतात मलेरिया फक्त खेड्यात व जंगलात आढळत असे . शहरामध्ये त्याचे प्रमाण अतिशय अल्प होते . १ ९ ८० सालानंतर मलेरियाने पुन्हा आपले डोके हळूहळू वर काढण्यास सुरवात केली व २००५ सालापर्यंत शहरामध्ये स्थिरावत गेला . २०० ९ सालापासून साथ सदृश स्थिती अनेक शहरातून दिसत आहे . ' इंडियन एक्सप्रेस ' या वृत्तपत्रातील २ ९ .७.२०११ रोजी प्रसिद्ध झालेली बातमी वाचा. महाराष्ट्रातील एकूण मलेरिया रुग्णांपैकी ५५ टक्के रुग्ण मुंबई शहरात आढळतात . गेल्या सहा महिन्यात भारतात ३.३६ लाख मलेरियाचे रोगी नोंदविले गेले . त्यातील ४५१४१ महाराष्ट्रात व मुंबईमधून २४ ९ ७३ रुग्ण होते . ही आकडेवारी पाहता भारतातील एकूण रुग्णांच्या तुलनेने मुंबईकरांचा वाटा १३.४ टक्के इतका आहे . अशा आकडेवारीत फक्त नोंद झालेल्या रुग्णांचाच समावेश असतो . खाजगी दवाखान्यातून औषधे घेणाऱ्या व मलेरियाचे दुखणे अंगावर काढणाऱ्या रुग्णांचा यात समावेश नाही .
१ ९ ०० ते १ ९ २० या दरम्यानच्या काळात मुंबई हा सात बेटांचा एक समूह होता . जेथे प्रचंड दलदल होती . तेव्हाही मलेरियाने मुंबईला बेजार केले होते . नागरीकरण हा विकासाचा अविभाज्य घटक असतो परंतु हेच नागरीकरण अनिर्बंध झाले तर काय होते हे नुसते मुंबई पुरतेच नव्हे तर देशातील इतर मोठ्या शहरांचा जो विचका झाला आहे त्यावरून स्पष्ट दिसत आहे . गेल्या तीस वर्षांत मुंबई , ठाणे , डोंबिवली , कल्याण ते पश्चिमेला विरारपर्यंत स्थायिक होण्याकरिता संपूर्ण भारतातून येणारे माणसांचे लोंढेच्या लोंढे , त्याच्या अनुशंगाने तयार होणाऱ्या झोपडपट्या व कोणतेही नियोजन नसलेली सांडपाणी निचऱ्याची यंत्रणा या सर्व गोष्टींमुळे हा सर्व पट्टा घाणीचे व दलदलीचे आगर बनलेला आहे . नागरी नियोजनाचा अभाव व अकार्यक्षम नेतृत्व यामुळे शहरांना कोणीही वाली नाही .
नागरी नियोजनातील शहर या संकल्पनेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अनन्य साधारण महत्त्व आहे . पण जेथे हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आधुनिक तंत्रज्ञान नाही वा पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची गटारांची क्षमताच नाही , तसेच ज्या शहरातील एक छोटी मीठी नदी शेकडो टन कचऱ्याने भरभरून वाहत असते . ह्या सर्व गोष्टी तेथील आरोग्य व्यवस्था कोलमडून टाकतात .
बांधकाम क्षेत्र , मग ज्यामध्ये त्या टोलेजंग इमारती असोत वा फ्लायओव्हर नाहीतर वॉक वे किंवा मेट्रो रेल्वे असोत , या कामांमुळे निर्माण होणारे प्रचंड माती व दगड धोंड्याचे ढिगारे , खोल तयार झालेली पाण्याची डबकी ह्या सर्व गोष्टी डासांच्या वाढीसाठी उत्तम व पूरक आहेत . मुंबईचे शांघाय , सिंगापूर बनविण्याच्या नुसत्या वल्गना उपयोगी ठरत नाहीत . त्यासाठी अगदी तळापर्यंत नियोजन आवश्यक असते . मुंबई महानगरपालिकेच्या अंदाजानुसार डास निर्मूलनाकरिता लागणारा नोकरवर्ग व इतर सर्व यंत्रणा केवळ ८० लाख लोकवस्तीसाठी पुरेशी आहे . परंतु आज शहराची लोकसंख्या १ कोटी ४० लाखापर्यंत गेली आहे . यावर तोडगा कोण काढणार ? सर्वच यंत्रणा पोखरलेली व बेजबाबदार आहे.
पावसाळा आला की नित्यनेमाने रस्त्यावरील खड्डे , मलेरिया , डेंग्यु यांच्या साथी मुंबईकरांना कायमच्या पुजलेल्या आहेत . या काळात खाजगी दवाखाने व हॉस्पिटल्स् रुग्णांनी इतकी भरून गेलेली असतात की प्रसंगी रोग्याला उभे रहायला सुद्धा जागा नसते . अशा वेळी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असतो . मध्यमवर्गीय व झोपडपट्टीत राहणाऱ्या ६० टक्के नागरिकांना कोणी वाली नाही . साथीच्या रोगावर जर खरोखरीच कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर वैद्यकीय संशोधन , औषधोपचार यांच्या जोडीला योग्य नागरी नियोजनाची नितांत गरज आहे .
( या वर्षी पावसाळ्यात काही फ्लायओव्हर ब्रिजेसच्या खाली राहणाऱ्या कामगारांची डासापासून होणाऱ्या रोगांसाठी डॉक्टर व रक्त तपासनीस तपासणी करीत होते व त्याप्रमाणे औषधोपचार दिले जात होते - हा नि : संशय कौतुकास्पद उपक्रम आहे . )
तरीसुद्धा राजकारणी व बांधकाम व्यावसायिक यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ही लवकरच गतप्राण होण्यास वेळ लागणार नाही असे खेदाने म्हणावे लागते .
मुंबई व नवी मुंबई येथील मलेरियासंबंधीत समस्येवर सन २००४ मध्ये Emory University Atlanta Georgia U.S.A. येथील विनय र . कामत यांच्या अभ्यास पूर्ण अहवालाचे एक पुस्तक आहे . त्याचे शीर्षक आहे- " Private Practitioners and their role in resurgence of Malaria in Mumbai and Navi Mumbai Serving the affected or aiding an epidemic . "
ह्या अहवालात काही प्रमाणात डॉक्टर मंडळींमधील उणीवा दाखविल्या आहेत . W.H.O. ने नेमून दिलेल्या पद्धतीनुसार मलेरियाच्या रुग्णांना औषधे दिली जात नाहीत . अर्धवट औषधोपचार झाल्याने हे परोपजीवी दाद न देणारे बनत आहेत . अर्थात् रुग्णही यास कारणीभूत आहेत . कारण ते संपूर्ण इलाज करून घेण्यास नाखूष असतात . त्यामागे त्यांची आर्थिक परिस्थितीही तितकीच जबाबदार ठरते . अनेक रुग्णांना रक्ताची तपासणी पैशाने परवडत नाही व त्या औषधांच्या खर्चाच्या बोज्याखाली ते रुग्ण चिरडलेच जातात . डासांचे निर्मूलन आणि परोपजीवांचा नायनाट या दोनही गोष्टी एकमेकांना इतक्या पूरक आहेत की या समस्येचा गुंता युद्ध पातळीवर सोडविण्याची गरज आहे व येथेच सरकारी यंत्रणा तुटपुंजी पडत आहे .
शेवटी या सर्वांतून मतितार्थ एवढाच की प्रत्येक नागरिकाने आपले स्वत : चे डासांपासून संरक्षण करण्याची सर्वतोपरी जबाबदारी आपली आपणच घेणे हे इष्ट आहे.
आज जगाने देवीवर पूर्णपणे मात केली असून पोलिओ सुद्धा अस्त पावत आहे. भारताच्या भूमीवर संशोधन करताना , येथील रुग्णांवर प्रयोग करून डॉ . रोनॉल्ड रॉस यांनी मलेरियावरील कामाबद्दल जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक मिळविले व त्याच देशातून आजही या रोगाचे उच्चाटन तर दूरच राहिले परंतु त्याचे भयानक स्वरूप पहावयास मिळते आहे . याबद्दल शासनकर्ते , डॉक्टर्स व सामान्य जनता यांनी अंतर्मुख होऊन धडाडीने ठोस पावले उचलण्याची आजच्या घडीला नितान्त गरज आहे .
अशक्यप्राय ते शक्य करणे शेवटी आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच सिद्ध होणार आहे .
-डॉ. अविनाश वैद्य
November 7, 2022
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 34
नैवेद्यम् समर्पयामी-भाग आठ
नैवेद्य दाखवताना देवाला घास भरवायचे. त्याचा मंत्र आहे, "नैवेद्यम् समर्पयामी." असे म्हणून घास भरवायचे. थोडं थांबून देवाला पाणी प्यायला द्यायचे. त्याचा एक मंत्र असा आहे. "नैवेद्यम् मध्येपानीयं समर्पयामी ! " असे म्हणून देवाला थोडे भरवून झाल्यावर मधेच, ताम्हनामधे एक पळी पाणी सोडावे. आणि पुनः देवाला सहा घास भरवायचे.
हे झाले कर्मकांड.
यात देहासाठी काय आहे ?
हे सर्व जेवायचे कसे पाणी कसे प्यावे याचे शुद्ध आयुर्वेदीय नियम आहेत. जे जे देवासाठी ते ते देहासाठी.
आयुर्वेद मतानुसार पाणी जेवताना मधेमधेच प्यावे म्हणजे प्रकृती सम रहाते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने बारीक व्हायला होते,
आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाड व्हायला होते. अर्थात आपण कसे पाणी प्यावे, हे आपल्या प्रकृतीवर अवलंबून आहे. म्हणजेच वैद्य सल्ला महत्त्वाचा ! उगाच आपले आपल्यावर प्रयोग करू नयेत.
पण सर्वसाधारणपणे पाणी जेवताना मधे मधेच प्यावे, हा नियम आहे हे लक्षात ठेवावे. यासाठी हा नियम देवपूजेमध्ये देखील समाविष्ट केला गेलाय. "मध्ये पानीयं समर्पयामी....."
पाणी कोणी किती कसे आणि का प्यावे, याविषयी सविस्तर टीपा मागील वर्षीच येऊन गेल्या आहेत. पुनरूक्ती दोष टाळतो. फक्त एक उदाहरण सांगतो, नारळाचे दूध किंवा नारळाचा रस काढायचा असेल तर, नारळ वाटतानाच त्यामध्ये पाणी घालावे लागते. अन्यथा रस चांगला निघत नाही.
स्लॅब घालताना वाळू, सिमेंट, खडी, मिक्सरमध्ये एकत्र फिरवतानाच त्यात पुरेसे पाणी मिसळले जाते. अन्यथा लोखंडाच्या फ्रेममध्ये हे मिश्रण योग्य रितीने पसरलेच जाणार नाही. तसेच पाणी जेवता जेवता मधे मधे, स्वतःला आवश्यक असेल तेवढे, जरूर प्यावे. म्हणजे पुढे अन्नरस चांगला तयार होतो. कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून, डायेटीशियन बोलली म्हणून, टीव्ही वर दाखवले म्हणून, अथवा कोणीतरी पाश्चात्य बुद्धीचा डाॅक्टर सांगतो म्हणून आपण आपल्या भारतीय भोजन परंपरा अजिबात बदलू नयेत. पारंपारिक आहार तसाच घ्यावा. आहाराचे जे अगदी साधे सोपे नियम आहेत, ते उगाच क्लीष्ट करून, शरीरामधे ताण वाढवणारे, चुकीचे नियम, चुकीच्या समर्थनासह करून, सोपे साधे जीवन कठीण करून, रोग वाढवून घेणे आहे.
त्यामुळे पाणी फक्त जेवतानाच प्यावे. तहान नसताना, अन्य वेळी अजिबात नको. अन्य वेळी जे पाणी प्यायचे ते फक्त तळहाताच्या मधे राहील एवढे पळीभरच प्यायचे असते, हा नियम देखील देवपूजेतील आचमनातून आपण शिकलो आहोत.
"मग बाकी सर्वजण पाणी जास्ती प्या" असं का सांगतात? ते त्यांनाच माहिती !!! आपल्याला तहान लागली की, स्वतःला तहान असेल तेवढे पाणी, आपणच ठरवून प्यायचे असते. एवढे लक्षात ठेवावे. बाकी विषय संपला.
तर देवपूजा करणे हे सर्व जीवनावश्यक नियम समजावून सांगणे आहे. हे दररोज सांगावे लागतात. नाहीतर आपली चंचल बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हे सर्व उपचार दररोजच्या पूजेमधेच समाविष्ट करून टाकले.
सततम् क्रिया अभ्यासः । एखादी क्रिया सतत केली गेली की ती अंगवळणी पडते.
आजीआजोबा, आईबाबा यांनी जे नियम ठरवले ते तसेच पाळायचे असतात. स्वतःच्या पाश्चात्य बुद्धीने त्यात बदल केला की, पुढील पिढीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जसे भरपूर पाणी प्या, म्हणून एका वडील पिढीने सांगितल्यामुळे आताच्या पुढील पिढीमधे पाण्यामुळे होणारे प्रमेह, रक्तदाब, संधीवात, इ.इ. रोग वाढलेले दिसतात. हे "जनुकीय" बदल नाहीत तर जीवनशैलीतील बदल आहेत, जे आपण बदलवू शकतो. ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका जर सहवास आणि साहचर्याने जर पुढील पिढी करीत राहिली तर जनुकीय बदल न होता, चुकीची जीवनशैलीजन्य रोगांची संख्या मात्र वाढतेय, हे आपण आपल्या डोळ्यासमोर पहातोय.
आपणाला हे सर्व बदलायचे आहे. रोग कमी करायचे आहेत. डायबेटीस रक्तदाब पीसीओडी थायराॅईड यावरील गोळ्या एकदा सुरू झाल्या की, त्या कायम स्वरूपात घ्याव्याच लागतात, हे धादांत खोटे गृहीतक, रोगाबद्दलच्या काही चुकीच्या कल्पना डोक्यातून काढून टाकायच्या आहेत, जीवनशैलीतील दोष काढून टाकून, निरोगी, निरामय, निर्रौषध, जीवनशैली परत स्थापन करायची आहे. यासाठीच ही माझी देवपूजा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.06.2017
June 27, 2017
दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ठळक बातमी वाचून त्याबद्दल स्पष्टीकरण मांडावे असे वाटले, म्हणून हा प्रपंच.
बातमीचे शीर्षक व उपशीर्षक असे आहे : ‘गांधींचा वध नव्हे, तर खूनच ! : कुलगुरूंचे भाषण मधेच थांबवत शरद पवार यांची सूचना …’ .
गेली अनेक वर्षें या विषयावर चर्विचर्वण झालेले आहे, पण कोणीही अजून त्याचा सुयोग्य उलगडा केलेला माझ्यातरी पाहण्यात आलेला नाहीं. श्री. शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करूनही, असे खेदाने म्हणावे लागते की, या विषयावर मतप्रदर्शन करणार्या लहानथोर व्यक्तींनी भाषा, शब्दार्थ, सांस्कृतिक ग्रंथ, इतिहास, इत्यादी बाबी विचारात घेतलेल्या नाहींत; आणि म्हणून ते लोक विशिष्ट शब्दप्रयोगाबद्दल भावनिक मत नोंदवतात; पण ते कितपत योग्य व विचारणीय आहे, हे पाहिले जात नाही. याचे मुख्य कारण असे आहे की, ‘वध’ हा (केवळ) दुष्टांचा होतो, गुन्हा करणार्यांचा होतो, व ‘खून’ हा (फक्त) सज्जनांचा, सत्शीलांचा, महात्म्यांचा होतो ; असा एक मोठा अपसमज लोकांमध्ये पसरलेला दिसतो.
गैरसमज टाळण्यासाठी, पुढे जाण्यापूर्वी मला हे स्पष्ट करणे आवश्यक वाटते की, आर्, एस्. एस्., हिंदुमहासभा, विहिंप, सनातन संस्था, या व अशा प्रकारच्या कुठल्याही संस्थेशी, त्याचप्रमाणे कुठल्याही उजव्या-डाव्या-मध्यममार्गी राजकीय पक्षाशी, माझा सुतराम् संबंध नाहीं. तसेंच, गांधीजी यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे, व नथुराम गोडसेकृत गांधीजींच्या हत्येचे मी समर्थनही करत नाहीं.
थोडक्यात काय , तर, कुठलाही bias ठेवून मी माझे विचार मांडत नाहीये. माझे हे विवेचन कुठलाही ‘राजकीय’ हेतू मनात ठेवून केलेले नाही. ते केवळ, माहिती, विचार व लॉजिक, यांवरच आधारलेले आहे ; आणि ते निष्पक्ष असावे याचा मी, या प्रश्नाचा ऊहापोह करतांचा, शक्यतो प्रयत्न केलेला आहे.
पैलू पहिला : भाषा व शब्दार्थ :
सर्वप्रथम , आपल्याला ‘वध’ तसेच ‘खून’ या शब्दांमध्ये शिरायला पाहिजे, कारण तेच तर या झगड्याचे मूळ आहेत. म्हणून, आधी आपण विविध शब्दकोशांचा आधार घेऊन हें कोडे उकलण्याचा प्रयत्न करू या.
१) वध : हा मूळ संस्कृत शब्द आहे, हे सांगायला नकोच.
१.१) सर्वप्रथम आपण, व्ही. एस्. आपटे यांची ‘Sanskrit-English Dictionary’ काय सांगते, ते पाहू या.
* वध् – (क्रियापद) – To slay, to kill
* वध: - (नाम ) – Killing, Murder, slaughter, destruction
* अशाच काही संबंधित शब्दांचे अर्थही याच शब्दकोशावरून पाहू या :
#मनुष्यवध : Homicide ; #वधदंड : Corporal punishment ; #वधस्तंभ : gallows ;
#वधस्थान, वधभूमि, वधस्थली : a place of execution, slaughter-house;
#वधअंगक : a poison ; #वधउद्यत : murderous, an assassin ;
वधअर्ह : deserving capital punishment ; वधजीविन् : a hunter ;
#वधक : an executioner, a hangman, a murderer, an assassin ;
#वधउपाय : a means of killing .
यावरून हे स्पष्ट होते की, ‘वध’ हा शब्द केवळ, ‘मारणे’ ता कृतीशी संबंधित आहे.
१.२) # अमरकोश हा १००० ते १५०० वर्षे जुना संस्कृत ‘थिसॉरस’ आहे. तो काय म्हणतो, ते पाहू या. आधार आहे, अनंतशास्त्री तळेकर यांचा ‘अमरकोशाचा शब्दकोश’.
* वध : घात, मारणे
* हत : नष्ट, मारलेला
(टीप : ‘हत’ हा शब्द ‘हन्’ या धातुवरून – म्हणजे, क्रियापदावरून – आलेला आहे.
हन् म्हणजे, ”मारणे’. )
# हत्या : ( पुन्हा संदर्भ, व्ही. एस्. आपटे यांचा शब्दकोश) : Killing, slaying, murder, particularly criminal slaying.
( टीप : गोपाळ गोडसे यांनी त्यांच्या पुस्तकात ‘गांधीहत्या’ असा शब्द वापरला आहे).
१.३) आतां, ज़रा मराठी कोश पाहू.
* अब्दुस्-सलाम चाऊस यांची ‘मराठी-इंग्रजी डिक्शनरी’ सांगते –
‘वध’ : Kiling, slaughter ; ‘वध करणे’ : To slay, to kill.
* वि. शं. ठाकार यांचा ‘Modern Marathi-Marathi-English Thesaurus’ सांगतो की –
‘वध’ : ठार करणें, हत्या .
* हाच शब्दकोश ‘हत्या’ या शब्दाचे असे अर्थ देतो :
खून, वध, हनन, ठार करणे / ठार मारणे…. ; murder, assassination, manslaughter, homicide, ….
* आतां, याच कोशातील ‘ठार करणें / ठार मारणें’ याचा अर्थही बघू -
वध, खून करणे, मारून टाकणे, जीव घेणें … : Kill, murder, assassinate, shoot,.. .
१.३) हिंदी ही मराठीची सहोदर संस्कृतोद्भव भाषा आहे . तसेंच ती देशातील राष्ट्रभाषा / संपर्कभाषा देखील आहे. त्याचप्रमाणे, हा, वध-खून या शब्दांविषयीचा वाद हिंदीमध्येही होतो.
म्हणून, आपण ज़रा हिंदी शब्दकोशातही डोकावू या.
आचार्य रामचंद्र वर्मा व डॉ. बदरीनाथ कपूर यांचा, ‘लोकभारती बृहत् प्रामाणिक हिन्दी कोश’ काय म्हणतो ते पहा -
‘वध’ : किसी मनुष्य या पशु को जानबूझकर किसी उद्देश्य से मार डालना, हत्या.
२) खून :
हा शब्द फारसीतून मराठीत आलेला आहे, हे सांगायला नकोच. ( मूळ शब्द :ख़ून् ).
२.१) डॉ. माधवराव पटवर्धन (माधव ज्यूलियन) यांचा ‘फार्शी-मराठी कोश’ सांगतो –
खून : हत्या, नरहत्या.
२.२) डॉ. यू. म पठाण यांचा ‘फार्सी-मराठी व्युत्पत्तिकोश’ काय म्हणतो –
खून : मनुष्यहत्या.
२.३) फारसीतून उर्दूमध्ये अनेक शब्द आलेले आहेत. म्हणून, उर्दूची दखल घेणेही योग्य ठरेल.
* श्रीपाद जोशी व निजामुद्दीन एस्. गोरेकर यांचा ‘उर्दू-मराठी शब्दकोश :
ख़ून : रक्त, हत्या.
* मुहम्मद मुस्तफ़ा ख़ाँ ‘मद्दाह’ यांचा उर्दू-हिंदी शब्दकोश :
ख़ून : रक्त, वध, हत्या, क़त्ल .
३) आपण संस्कृत व मराठी शब्दांचे इंग्रजीतील प्रतिशब्द पाहिले. म्हणून, आता, इंग्रजी-मराठी शब्दकोश काय सांगतो ते पाहणेही अगत्याचे ठरेल.
रमेश वा. चिंधडे यांनी सिद्ध केलेली ‘Oxford English-Marathi Dictionary’ काय सांगते –
Murder’ : हत्या करणें, खून करणें.
४) या सर्वाचा सरळ अर्थ असा की, ‘वध’, हत्या’, ‘खून’ , हे बहुतांशी समानार्थी शब्द आहेत.
याउप्परही, कोणी असे म्हणू शकतो की, ‘हे शब्द समानार्थी असतीही, पण त्यांचा वापर रेफरन्स्-टू-कॉन्टेक्स्ट वेगवेगळा असू शकतो’. तें एका अर्थी योग्यही आहे. म्हणून, संस्कृती, पुरातन वाङ्मय, इतिहास वगैरेंच्या आधारने आपण याची चर्चा करू या.
-- सुभाष स. नाईक .
दूरध्वनी : (०२२)-२६१०५३६५. भ्रमणध्वनी : ९८६९००२१२६.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in.
March 14, 2016
सुजान बंधू-भगिनींनो, परिस्थितीचं गांभिर्य ओळखा. विनाशाची वेळ नजीक आली आहे. आता जर आपण सावध झालो नाही तर तर मग पुढे जे होईल त्याला दैव देखील अडवू शकणार नाही…अनंत पीडा आणि असह्य्य वेदनांचा एक भयानक प्रवास ज्यामध्ये मृत्यूचं असं तांडव खेळल्या जाईल की याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही.
April 6, 2020
ब्रेड हा आज अनेकांच्या रोजच्या आहारातील पदार्थ झाला आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘रिअल ब्रेड वीक’ म्हणजेच भेसळमुक्त पाव आठवडा म्हणून साजरा केला जातो. या वर्षी २० फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१ रिअल ब्रेड वीक साजरा केला जात आहे.
जे नैसर्गिक पद्धतीने ब्रेड बनवतात, अशांसाठी हा आठवडा खास साजरा केला जातो.
नैसर्गिक पद्धतीने ब्रेड म्हणजे ज्या ब्रेडसाठी खाण्याचा सोडा, ॲकस्कॉर्बिक ॲसिड, चव वाढवणारी द्रव्ये यांपकी काहीही वापरलं जात नाही तो
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 24, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti