(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आजच घ्या; उद्या सकाळी….?!

    'खाण्यासाठी जन्म आपुला' ते 'माझे जीवनखाणे' असा कित्येकांचा प्रवास सुरु असतो. पोटात अन्न अक्षरश: ठोसल्यावर आधी अपचन आणि नंतर बद्धकोष्ठतेचा खेळ सुरू होतो. मग पोट साफ करण्यासाठी सारी धडपड सुरू होते. कोणाच्या तरी आगंतुक सल्ल्याने त्रिफळा चूर्ण, सुखसारक चूर्ण ते एरंडेल अशी वेगवेगळ्या रेचकांची (पोट साफ करणारी औषधे) रीघ लागण्यास सुरुवात होते. त्यातच आयुर्वेदीय औषधांना साईड इफेक्ट्स नसतात हा आपला लाडका गैरसमज. मग काय? आधी दिवस मग महिने आणि मग वर्षानुवर्षे ही रेचके आपली सोबती होतात.

    रेचकांचा प्रदीर्घ काळ वापर केल्याने आतड्यांना शुष्कता येते आणि त्यांची कार्यक्षमता घटते. रेचकांचा प्रभाव कमी होऊ लागतो; स्वाभाविकपणे आपण त्यांचे अधिक मात्रेत सेवन करू लागतो. सहा सहा ग्रॅम इतक्या अधिक मात्रेत रेचक सेवन करूनही पोट साफ न होण्याची तक्रार असलेली मंडळी मी स्वतः पाहिलेली आहेत. ही वाढीव मात्रा अधिक घातक ठरत जाते. बाजारात मिळणाऱ्या जवळपास ९९% रेचक चूर्णात सोनामुखी ही वनस्पती वापरलेली असते. या सोनामुखीच्या प्रदीर्घ वापराने बरेच दुष्परिणाम होतात. विशेषतः ही वनस्पती पित्ताचे त्रास वाढवते. शिवाय सोनामुखीसारख्या वनस्पती गरोदर स्त्री व बाळंतीण यांना देऊ नयेत.

    पोट साफ न होणे हे व्यक्तीच्या प्रकृतीबरोबरच आहार आणि पचनक्रिया यांवरही अवलंबून असते. या सगळ्याचा विचार करूनच आपले वैद्य आपल्याला पचन उत्तम होण्यासाठी औषधे आणि पथ्य सांगतात. केवळ पोट साफ होऊन मनाचे समाधान होण्यासाठी नव्हे. शिवाय; कुठल्या व्यक्तीला कोणते रेचक, किती मात्रेत आणि किती काळ द्यावे याचे काटेकोर नियम आयुर्वेदीय वैद्य पाळत असतात. त्यामुळे बद्धकोष्ठासारख्या तक्रारीवर स्वतः किंवा अन्य कोणाही व्यक्तींच्या उपटसुंभ सल्ल्याने औषधे न घेता शुद्ध आयुर्वेदीय उपचार देणाऱ्या वैद्यांचा सल्ला घ्या.

    सहज जाता-जाता; आयुर्वेदानुसार अपान वायूवर घेण्याचे औषध हे जेवणांच्या आधी दिले जाते. रात्री झोपण्यापूर्वी दिलेले औषध हे उर्ध्वजत्रु म्हणजे डोक्यावर कार्य करते असे आयुर्वेद सांगतो. आपण वैद्यकीय सल्ल्याविना घेत असलेले रेचक चूर्ण एकीकडे पोट साफ करत असतानाच दुसरीकडे नेमके कुठे कार्य करत असेल याचा विचार (वैद्यांनीही) अवश्य करावा!!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

  • आपले आरोग्य व आयुर्वेद

    तरुण पिढी आपल्या प्रकृतिस्वास्थ्याविषयी पूर्वीच्या पिढीपेक्षाही चांगलीच सजग झालेली दिसते. विविध वर्तमानपत्रं, मासिकं, पुरवण्यांद्वारे अनेक तज्ज्ञ, व्हॉट्सअप, फेसबुक, या सारखी सोशल मिडीया साधने, डॉक्टर, वैद्य, डाएटिशियन्स लोकांना जागरूक करत असतात. आयुर्वेद या उपचारपद्धतीत मानवी शरीर आणि त्याचा मानसिक स्वास्थ्याशी असलेला दृढ संबंध यांचा विचार करतं आणि प्राथमिकतेने रोग होऊच नयेत यावर भर दिला जातो. त्यातूनही जर कुठला रोग बळावला, तर त्या रोगाला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न आयुर्वेद करतं. पूर्वी लोकांचं आरोग्याकडे लक्ष असायचं, निसर्गाच्या सहवासात आणि शुद्ध अन्नामुळे लोकांचं आरोग्य वर्षानुर्वष चांगलं राहायचं. वृद्धत्व आल्याशिवाय सहसा कोणी आजारी पडायचं नाही, पण आता हे चित्रच पालटलं आहे. त्या वेळी वरचं खाणं म्हणून खजूर, कुरमुरे व बिस्किटांशिवाय खाद्यपदार्थ नव्हते. हल्लीच्या ‘जंक फूड’नं अबालवृद्धांनाही मोहिनी घातली आहे. या पदार्थाचं वारंवार किंवा प्रमाणाबाहेर सेवन केल्यामुळे माणसाला विविध रोगांनी घेरलं आहे.

    आयुर्वेदीक औषधांविषयी
    महासुदर्शन काढाय/चूर्ण - कोणत्याही तापावर, सर्दीवर, भूकेसाठी एक उत्तम औषध. माझ्या असं निदर्शनास आलं की, अनेकांना याचं नावही माहीत नाही. पण हट्टी तापही यानं आटोक्यात येतो. प्रत्येक घरात संग्रही असावं, असं हे औषध आहे. लहान मुलांनाही उपयोगी आहे.

    कुमारीआसव कुमारी म्हणजे कोरफड. कोरफडीचा महत्त्वाचा गुणधर्म कफ (दीर्घकाळ टिकलेला कफ) पातळ करणं. यकृताचं आरोग्य उत्तम ठेवून त्याचं संरक्षण करतं. कावीळ होण्यास प्रतिबंधात्मक तसंच मासिक पाळीशी संबंधित हार्मोन्स (संप्रेरके) योग्य प्रमाणात स्र्वण्यातही कुमारीआसव खूपच गुणकारी आहे. याच्या नावात जरी कुमारी हा शब्द असला तरी स्त्रियांनी व मुलांनी वेगवेगळ्या कारणांसाठी हे जरूर सेवन करावं. यामध्ये लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी असे प्रकार आहेत.

    त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण म्हणजे हरडा + बेहडा + आवळा यांचं मिश्रण. हे चूर्ण बाजारात तयार मिळतं. जर बद्धकोष्ठता असेल तर गरम (कोमट) पाण्यातून रात्री झोपतेवेळी एक चमचा घेतल्यास सकाळी पोट साफ होतं. प्रत्येकानं आपल्या तब्येतीनुसार प्रमाण ठरवावं. याचा आणखी एक उपयोग माझ्या अनुभवास आला, तो म्हणजे आपल्या दंतमंजनात हे एक चमचा मिसळलं व ही पावडर दातांना लावली तर हिरडय़ा व दात खरोखरच मजबूत होतात. याचा अनुभव अनेकांना आला आहे. हे नित्य वापरावं.

    कडुनिंब या झाडाचे गुण बहुतेकांना माहीत आहेत. यापासून पंचनिंब चूर्ण हे औषध तयार करतात. अंगावर सुटलेली खाज व पुरळ जाण्यास तसंच रक्तशुद्धीस याचा उपयोग होतो. रोजच्या पिण्याच्या पाण्यात कडुनिंबाची पाच पानं उकळून ते पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते. या औषधांशिवाय सितोपलादी चूर्ण, सुवर्णमालिनी वसंत, सूतशेखर, सारिवाद्यासव ही औषधं रोगपरत्वे वापरण्यासारखी आहेत. मात्र सर्व आयुर्वेदिक औषधं आरोग्यास हानिकारक नसली, तरी उपचारांदरम्यान त्यांचं घ्यायचं प्रमाण हे वैद्यांच्या सल्ल्यानंच घेणं योग्य. सुंठ, मेथी, अनंतमूळ (सारिवा), द्राक्षं इ. अनेक फळं/वनस्पतींचा वापरही आयुर्वेदात प्रामुख्यानं केला जातो. जसं द्राक्षांपासून बनवण्यात येणारं द्राक्षासव तर आवळ्यापासून तयार होणारं च्यवनप्राश हे शक्तिवर्धक कल्प, आवळा पावडर यांसारखी रसायनमुक्त औषधं ही वरदानच ठरणारी आहेत. आपण काळजीपूर्वक अभ्यास केल्यास आयुर्वेदातील वा अन्य शास्त्रांतील आपल्याच अवती-भवती असणा-या अनेक गुणकारी औषधांचा आपणास परिचय होईल. शेवटी ‘सर्वे: सन्तु निरामय:’ याच प्रार्थनेतून सर्वानाच शारीरिक आणि मानसिकही सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ओव्याचे २५ उपयोग

    ओव्यापासून या आजारांमध्ये मिळेल त्वरित आराम..

  • पोट साफ होण्याची प्रक्रिया

    ज्या लोकांची पोट साफ होण्याची प्रक्रिया नियमित होत नाही, त्यांचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीतच मलावरोध किंवा गॅसची समस्या निर्माण होते. घरगुती उपायांद्वारे पोट साफ नियमित कशी करावी.

    सकाळी उठताच सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू आणि शेंदी मीठ मिसळून प्यावे. त्यामुळे बाउल मुव्हमेंट नियमित ठेवण्यास मदत होईल.

    तज्ज्ञांच्या मते, फळांच्या ज्यूसमध्ये दूध मिसळून प्यायला हवे. तसेच ज्या फळांमध्ये गर असतो, त्यांचे थेट सेवन करा.

    भोजनानंतर दालचिनी पावडरचे सेवन करा.
    १०० मि.लि. पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे थोडा वेळ उकळा आणि भोजन करण्याच्या एक तास आधी ते पाणी प्या. तसेच भोजनानंतर ते मेथीचे दाणे चावून खा.
    भोजनानंतर गूळही खा. त्यामुळेही पचन व्यवस्थित होते.

    दररोज सॅलडचे सेवन करायला हवे. त्यात पालक, टोमॅटो, मुळा आणि काकडीचा समावेश असावा. तसेच सर्व प्रकारच्या फळांपासून बनलेल्या सॅलडचेही सेवन करायला हवे.

    दिवसभर भरपूर पाणी आणि ताक प्यायला हवे; जेणेकरून कडक शौचास होणार नाही. तसेच भाज्यांपासून बनलेले सूप व वरण यासारख्या द्रवपदार्थांच्या सेवनाचेही प्रमाण वाढवा.

    तंतूमय फळे व भाज्यांचे सेवन केल्यासदेखील शौचास कडक होत नाही आणि पचन व्यवस्थित होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • संतुलित आहार

    कोणत्याही माणसाची आयुष्यात माफक अपेक्षा असते कि, माझे जीवन सुखी, आनंदी असावे. मग सुखी जीवनासाठी निरोगी शरीर अतिमहत्वाचे !

  • हिमोग्लोबिन कसे वाढवायचे

    हिमोग्लोबिन कसे वाढवायचे हे येथे सांगितले आहे.

    मुख्य आहार हा सर्व ६ चवीनी युक्त हा आनंदीमनाने, अगदी मनापासून प्रार्थना म्हणून जेवणाला सुरवात करा.

    आहळीवाची खिरेचा वापर करणे.खजूरातील बि काढून त्यामध्ये घट्ट तुप भरून तो खाणे.बिट,गाजर खाण्यात ठेवणे.लाल रंगाची फळे जसे की कलिंगण,करंवद वगैरेसारखी फळे खाणे.लाल रंगाचे कपडे वापरल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदतच होते.

    स्त्रियांच्या बाबतीत शतावरी कल्प/शतावरीधृताचा वापर वैद्दयांच्या सल्ल्यांने करणे.पान (विडा)खाणे.राजगिरा खाणे (लाडू,चिक्की.लाहया) रव्याची लापशी गुळ घालून खाणे. आपली गावातील उकडया तांदळाची पेज मस्तपैकी साजूक तूप घालून खाणे.

    हिमोग्लोबिन वाढविणारे बहुतेक पदार्थांमुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून साजुक तूपाचा हात सोडून वापर करणे.

    तुम्ही जर ताजा नुकताच काढलेला पालक वापरू शकत असाल तर पालकाचे मीरी,लिंबू वगैरे घालून मस्तपैकी सुप बनवून पिऊ शकता.पण पालक अगदी फ्रेश हवा.तडक्याचा पण वापर करून वरून फोडणी देणे.

    पाणी पिताना लोखंडी तडका मस्त गरम करून प्यावयाच्या भांडयात बुडविणे व असे पाणी पिणे.चपात्या/भाक-या नॉनस्टिक तव्यावर न भाजता लोखंडी तव्यावर भाजणे.

    आंबट भाज्या सोडून इतर सर्व भाज्या लोखंडी कढईतच करण्याचा अट्टाहास धरणे.

    गाजर+बिट ज्युस,काळया मनुका आदल्यारात्री पाण्यात भिजवुन दुस-या दिवशी खाणे आणि हे सर्व आपल्या पचनसंस्थेचा सारासार विचार करुन आणि कसलेच tension करायचे नाही.कारण आवडीने व मनापासून खाल्लेत तरच तुम्हांला चांगला result मिळणार. नाचणी सत्व /नाचणीची आंबिल खाऊ शकता. डाळिंबपण चांगले असते आणि जेवण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यत (7 च्या आत घरात) करा. झोपण्याच्या वेळा पाळा,कपालभांतिसारखे प्राणायाम,योग करा, आणि नेहमी tension free रहा.व तंदूरूस्त रहा.

  • काम’ म्हणजे नेमकं काय?

    भारतीय संस्कृतीत मानल्या गेलेल्या चार पुरुषार्थांपैकी एक. बहुतेकांसाठी इतर तिघांच्या तुलनेत थोडासा दुर्लक्षित तर काहींसाठी (विनाकारणच) वर्ज्य असलेला असा हा विषय.

  • तुम्ही जास्त व्यायाम करताय का ? मग सावधान !

    मॅरथॉनसाठी सराव करणाऱ्या डॉ. राकेश सिन्हा या विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वांनीच वाचले असेल. डॉ. सिन्हा अतिशय फिट होते. रोजच्या रोज सराव सुरू होता. लवकरच वयाची ६० वर्ष पूर्ण करणार होते. आजवर चार फुल मॅरेथॉनचा अनुभव गाठीशी असलेल्या, तसेच पुढील मॅरेथॉनसाठी नियमित सराव करणाऱ्या आणि अलीकडेच सर्व वैद्यकीय चाचण्यांतून त्यांचे निकाल सामान्य असलेल्या डॉ. सिन्हा यांचा सराव करताना मृत्यू का व्हावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. किंबहुना, यामुळे एकूणच फिटनेस, त्याबद्दल मिळणारा सल्ला या संदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. खंरतर मॅरेथॉन रनिंगबद्दल अनेक कार्डिओलॉजिस्टनी अनेक धोके सांगून ठेवले आहेत. मलाही अनेकांनी याबाबत विचारणा केली. मात्र यातील तांत्रिक कारणांत सखोलपणे न जाता मी त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे.

    जेव्हा तुम्ही कोणताही व्यायाम सुरू करता तेव्हा त्याकरिता लागणारी जी ऊर्जा आहे ती आपल्याला दोन प्रकारे मिळते. ग्लुकोज, फॅटस, किंवा फॅटी अॅसिड. साठवलिलेली ग्लुकोज ही लिव्हर, मसलमध्ये ग्लायकोजन म्हणून पदार्थ असतो त्यातून मिळते पण ती लिमिटेड असते. त्यामुळे ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असतो जो दीर्घकाळासाठी आवश्यक असतो तो फॅटसमधून येतो. ज्याला एक्स्ट्रिम व्यायाम, मॅरथॉन अथवा लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेत सहभागी व्हायचे अाहे, अशा व्यक्तीच्या शरीरात एनर्जीची डिमांड वाढते. या वाढीव एनर्जीची डिमांडही पायासाठी पायाजवळील फॅट मधून अशी लोकल न राहता ती डिमांड शरीरभर पसरते. एखाद्या व्हॉटसअप अथवा फेसबुकवर ज्या प्रमाणे एखादा संदेश व्हायरल होतो तशाच प्रकारे शरीरभर जिथे फॅट ग्रुप आहेत तिथे असा संदेश जातो की आम्हाला आत्ता एनर्जीची गरज आहे तरी फॅटस् रिलिज करा. त्यानंतर अशा फॅट डेपोमधून रक्ताद्वारे फॅट रिलिज केल्या जातात. ज्या माणसांकडे फॅट डेपो लिमिटेड आहेत त्यांच्याकडून निर्माण होणारी फॅट आणि ज्यांच्याकडे फॅटचे साठे चांगले आहे, त्यांच्याकडून निर्माण होणारी फॅट यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे जो माणूस अतिशय फिट आहेत, ज्याकडे फॅटचे डेपो जास्त आहेत त्यांच्याकडे फॅट मोठ्या प्रमाणात लिबरेट होते.

    आता फॅट आणि ग्लुकोजच्या मेटाबॉलिझममधील फरक समजून घ्यायला हवा. ग्लुकोज रिलिज झाली आणि ती मसलमध्ये जायला हवी असेल ती ज्या पेशीकाम करतात तिथवर पोहोचायला हवी असेल तर इन्शुलिन लागते. पण, त्याच्यावर एक मर्यादा असते. किती ग्लुकोज त्या पेशींमध्ये शिरावे. पण निसर्गाने अशी रचना केली आहे की जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा हा फॅटसचा साठा, त्याला पेशींच्या आत शिरायला कोणत्याही हार्मोनची गरज लागत नाही. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रचंड प्रमाणात व्यायाम करता त्यावेळी प्रचंड प्रमाणात फॅट लिबरेट होचे. मात्र ती, जाळली जात नाही. मात्र ती परत त्फॅट डेपोमध्येच जाईल असेही नाही. तर घर्षण झालेल्या रक्तवाहिन्यात किंवा विशेषतः ह्दयाच्या रक्तवाहिन्यात जिथे सर्वाधिक घर्षण होते तेथील रक्तवाहिन्यांमधील पातळ आवरणाखाली ती शिरते. तिथे ती त्रासदायक ठरते. केमिकल रिएक्शन तिथे सुरू होतात. तिथे प्लेटलेटस् थांबायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्तिक्थे सॉफ्ट प्लाक्स तयार होतात. आता माणूस जरी फिट असला तरी जेव्हा तो काम करतो अथवा व्यायाम करतो, त्यावेळी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, रक्तपुरवठा चांगला सुरू होतो. त्यावेळळी हा सॉफ्ट प्लाक त्रास देत नाही. पण ह्रुदयाची गती खूप वाढली आणि वाढलेलीच राहिली तर धर्षणामुळे हा साॅफ्ट प्लाक सुटा होतो आणि पुढे जाण्यास सुरुवात होते. हा सुटा प्लाक छोट्या रक्तवाहिन्यात शिरला तर ती रक्तवाहिनी पूर्ण बंद होते आणि तीव्र हार्टअॅटॅक येतो. मॅरेथॉन किंवा अशा पद्धतीचे टोकाचे व्यायाम प्रकार करणाऱ्या लोकांमध्ये ही शक्यता अधिक असते. हे केव्हा होईल सांगता येत नाही. हे केवळ अॅन्जिओग्राफीकरूनच कळू शकते की हे सॉफ्ट प्लाक्स तयार झालेत अथवा नाही. अनेक इथियोपियन अॅथलिट आपण मॅरेथॉन धावताना पाहतो जे अतिशय बारीक असतात त्यांच्याकडे फॅटसटा साठा बेताचाच असतो. त्यांच्याकडे हा प्रकार होण्याची शक्यता खूप कमी असते. पण जी फिट माणसे आहेत ज्यांची मसल, ब्लड व्हेसल हार्र्ट छान डेव्हलप केलेले आहे परंतु, ज्यांच्या शरीरात फॅटचा साठाही जास्त प्रमाणात आहे. तर त्यांनाही शक्यता अधिक असते. जास्त प्रमाणात सुटणारी फॅट नीटपणे पुन्हा साठविली जात नाही. आणि त्यातून हे सॉफ्ट प्लाक तयार होतात आणि त्यातूनच हे अकाली मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते.

    ... म्हणून कार्डिओलॉजिस्ट सांगतात की, जास्त प्रमाणात किंवा व्यायामाचा अतिरेक टाळावा, आपण त्याकरिता बनलेलो नाही. आणि करायचाच असेल तर करताना हार्ट रेट नियंत्रित राहण्याकडे लक्ष द्यावे. किंवा ज्यांना मॅरेथॉन अथवा तत्सम व्यायाम करायचे आहेत त्यांनी आपल्या शरीरातील फॅटचे प्रमाण हे नेहमी २३ टक्क्यांच्या खाली ठेवल्यास ते उपयुक्त ठरू शकते. पण सध्या मॅरेथॉन धावण्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. लोकांना वाटत की आपण भारताला फिट करत आहोत पण ज्यावेळी आपण धावत नसतो किंवा त्या स्पर्धा नसतात त्यावेळी आपण आपल्या आहाराकडे फारसे लक्ष देत नसतो, यामुळे अतिरिक्त फॅटस् शरीरात साठवतो. तेव्हा या दुर्देवी घटनेतून आपल्याला धडा घ्यायला हवा की, मॅरेथॉन धावायची असेल तर आपल्या शरीरातील फॅटसचे प्रमाण हे नियंत्रित हवे तरच आपल्याला यातील जोखीम कमी करता येईल.

    -- डॉ. नितिन पाटणकर
    मधुमेहतज्ज्ञ, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन विषयाचे मार्गदर्शक.
    अधिक माहितीसाठी संपर्क - 9223145555

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

  • ३० मिनीट चालण्याचे ३० फायदे

    जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !!

    कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा. दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे

    १. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
    २. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
    ३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
    ४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
    ५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
    ६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
    ७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
    ८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
    ९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
    १०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
    ११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
    १२. वजन कमी करण्याचा किंवा वजन सpk
    १३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
    १४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
    १५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
    १६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
    १७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
    १८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
    १९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
    २०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
    २१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
    २२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
    २३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
    २४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
    २५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
    २६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
    २७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
    २८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
    २९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
    ३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.

  • जवस आणि सांधेदुखी…नाण्याची दुसरी बाजू!!

    सांधेदुखीवर औषध म्हणून ‘जवस’ वापरण्यावर एक पोस्ट फिरत आहे. यासंदर्भात लिहा म्हणून काहीजणांनी आग्रह केल्याने लिहितो आहे.
    जवस म्हणजे काय?
    सर्वप्रथम जवस आणि जव या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. जवस म्हणजे मराठीत अळशी; इंग्रजीमध्ये Flax seed. Linum usitatissimum हे जैवविज्ञानीय नाव. आधुनिक शास्त्रानुसार; या धान्याच्या तेलात omega 3 and omega 6 fatty acids असल्याने त्याचे सेवन आरोग्यास उपयुक्त आहे असे मत मांडले जाते. जवसाच्या तेलाच्या कॅप्स्युल जागोजागी विकत मिळतात ते याच दाव्याच्या आधारावर.
    आयुर्वेद काय सांगतो?
    जवस याला संस्कृतमध्ये अतसी असे म्हटले आहे. या अतसीचे गुणधर्म चरकसंहितेपासून ते निघंटू ग्रंथांपर्यंत सर्वत्र आढळतात. जवस हे उष्ण आणि स्निग्ध असल्याने वात कमी करणारे आहे. त्यामुळेच वाताच्या विकारात (सांधेदुखी वगैरे) त्याचा वापर केला जातो. कोलकुलत्थादि चूर्ण, सर्षपादि लेप, गोजिह्वादि क्वाथ अशा विविध औषधांमध्ये जवसाचा वापर होतो. सांगण्याचा मुद्दा इतकाच की आयुर्वेदाला जवसाचा वापर हा काही नवीन नाही. किंबहुना; जवसाचे तेल शरीराला लावणे, नाकात सोडणे, बस्तीसाठी वापरणे ते पोटात घेण्यास वापरणे अशा विविध मार्गांतून वापरावे असेही आयुर्वेद सांगतो.
    तरीही त्याचा वापर कमी का?
    सांधेदुखीवर उत्तम औषध असलेल्या जवसाचा वापर आयुर्वेदीय वैद्यांकडूनदेखील कमी प्रमाणात का होतो? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण जवसाच्या अन्य काही गुणकर्मांत दडलेले आहे. जवस हे अतिशय उष्ण आहे. कफाच्या काढ्यात अळशी घालून घेणाऱ्यांना त्याच्या उष्णतेने कफ कसा सुटून पडतो याचा अनुभव असेलच! या गुणामुळे ते पित्ताशी संबंधित विकार उदा. अम्लपित्त, आतड्यांतील जखमा, चक्कर येणे, रक्तस्राव, मासिक स्राव अधिक होण्याची तक्रार अशा तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये वापरल्यास त्रासदायक ठरते. जवसाचे तेल हे रेचक म्हणजे शौचाला पातळ करणारे आहे. सतत हरभरे खाणाऱ्या घोड्यांना रेचक म्हणून देण्यास याचा वापर होतो; यावरून आपल्याला त्याचा अंदाज यावा. गरोदर स्त्रिया, बाळंतीण, यकृतासंबंधी विकार असणारे आणि दारू पिणारे यांना जवस वापरल्याने दुष्परिणाम होण्याची पूर्ण शक्यता असते. याव्यतिरिक्त सर्वात महत्वाची बाब म्हणजे; जवस सतत वापरल्यास प्रजननक्षमता कमी करते. (याविरुद्ध त्याने प्रजजनशक्ती वाढते असे दावे करणारे लोक हे Flax seed oil चे उत्पादक आहेत हे लक्षात घेता; सुज्ञास अधिक सांगणे न लगे!) वरील सर्व बाबी लक्षात घेता; जवसाचा वापर अतिशय सावधपणे करणे हितावह असते हे आपल्या लक्षात आले असेलच.
    प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. सरसकट एखादी गोष्ट चांगली; म्हणून प्रत्येकाने ती घ्यावी असे करून चालत नाही. यापूर्वीही वारंवार स्पष्ट केल्याप्रमाणे; प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत किमान दहा घटकांचा वापर करूनच आयुर्वेदीय वैद्य त्यांचे उपचार ठरवत असतात. ‘रोग आणि औषध’ हा घाऊक प्रकार आयुर्वेदात नाही हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. एखादा संदेश लिहिताना त्यामागचा हेतू उदात्त आणि समाजकल्याणाचा असेल यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र; तसे करताना सरसकट सगळ्यांनीच आपल्या विकारासाठी वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे ‘वापरून बघण्याचे प्रयोग’ करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे; आपल्या दुखण्या-खुपण्यासाठी आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या. स्वयं-उपचार करत बसू नका!!
    (टीप: वरील लेख हा कोणालाही व्यक्तिगत उद्देशून नाही याची कृपया नोंद घ्यावी. याविषयी लिहा अशी विनंती करणाऱ्या मित्रांचे आभार. शेयर करताना लेखकाच्या नावसहच शेयर करावा)
    © वैद्य परीक्षित स. शेवडे
    (आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
    श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५