(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मानसिक डाएट

    ही कन्सेप्ट जरा नविन आहे, पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे.

    म्हणजे बघाना....

    आपलं वजन वाढतं, आयुष्याच्या फिगरवर परिणाम होतो, बीपीच्या गोळ्या सुरु होतात, शुगर डिटेक्ट होते, किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन आपण डाएट करायचा प्रयत्न करतो.

    हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक आरोग्या कडे पुर्णपणे दुर्लक्ष करतो.

    मी कुठेतरी वाचलं होतं की "तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो"

    ते वाक्य मनाला प्रचंड भिडलं. त्या वेळी मग खरंच विचार केला की आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का जेवढी शरीराला आहे?

    अफसोस !

    असे बोर्ड्स अजुन दिसले नसतील ना मार्केटमधे...

    "इथे मानसिक डाएट प्लॅन करून मिळतील"

    अवघंड आहे असं होणं....

    मानसिक डाएट म्हणजे काउंसिलींग नव्हे.

    मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल !

    हल्ली सगळ्यांना सगळं कसं टेस्टी लागतं स्वत:च तोंड कडु का असेना, पण लाईफ मधे स्पाईस महत्वाचा आहे बाॅस !

    स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.

    तर मानसिक डाएट म्हणजे काय करायचं

    तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,

    तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,

    अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्‍याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.

    दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु, दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकुन देऊ, आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकं ओळखुन स्वत:ला "रीझनेबल" बनवणं, दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं, दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालु ठेवणं, मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं, एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं आणि बरंच काही.

    या सगळ्यातला समतोल हरवला ना की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारंच आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही म्हणुन मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळु शकते.

    माणुस आहे, मनं पण थकतं हो कधीकधी, त्याला इंस्टंट एनर्जी मिळते ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने, वाह ताज !!!

    सगळ्यात महत्वाचं कि आपल्या डाएटचे साईड इफेक्ट्स खुप मस्त असतातं.

    लोकं प्रेमात पण पडु शकतात तुमच्या. तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो, तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं. वास्तविक, मन ओके असेल तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

    असं ह्या डाएटचं व्रत हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की. साध्या आणि ताज्या विचारांच सॅलड आपली नक्की काळजी घेईल. शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.

    बदल हा नेहमीच चांगला असतो. असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना ?

    कारण गुगलवर "एव्हरेस्ट" बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यातं जास्त मजा आहे आणि त्या एव्हरेस्टवर जायला आपलं मनंच खरी ताकद देणार आहे.

    -- गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ञ
    9820584716

  • सकाळचा नाश्ता

    लहानांपासून थोरापर्यंत सकाळी-सकाळी नाश्त्याची आवश्यकता असते. रात्रभर शरीराने विश्रांती घेतली असली तरीही हा नाश्ता खूप उपयोगी आहे व जेवणाच्या कालावधीपर्यंत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम आहे. मात्र हा नाश्ता प्रत्येक ऋतुमानानुसार घेणं आवश्यक आहे. केवळ चहा पिणे म्हणजे रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.

    नाश्ता म्हणजे काय ?

    सकाळी ९ च्या अगोदर नाश्ता महत्वाचा आहे. भरपेट जेवण म्हणजे नाश्ता नव्हे. नाश्त्यात बेकरीचे ब्रेड, बिस्किटे, तळलेले पदार्थ, वनस्पती तूप यांचा वापर घातक आहे. कृत्रिम पेये, नमकीन पदार्थ यांचाही वापर योग्य नाही. मोड आलेली कडधान्ये, उपीट, पोहे, शिरा, इडली, गूळ-शेंगदाणे, दूध, फळे आदींनी युक्त नाश्ता असावा. शिवाय तो प्रत्येकाच्या व्यवसायावरही ठरलेला असावा.

  • अल्सर म्हणजे काय ?

    अल्सर म्हणजे एक प्रकारची जखमच. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात (डय़ुओडेनम) होतात. आम्लपित्ताशी आपण ज्या अल्सरचा संबंध जोडतो तो हाच. याशिवाय काही रुग्णांमध्ये अन्ननलिका, मोठे आतडे किंवा लहान आतडय़ालाही वेगवेगळ्या कारणांमुळे अल्सर होऊ शकतो. पण हे नेहमी बघायला मिळणारा अल्सर हा जठर किंवा डय़ुओडेनमला होणारा.

    लक्षणे कोणती?

    अल्सरच्या प्रकारानुसार लक्षणे वेगवेगळी असू शकतात. सामान्यत: दिसणारी काही लक्षणे अशी-

    *पोटाच्या वरच्या भागात वारंवार दुखणे
    *आम्लपित्त होणे
    *सतत पित्त वर येऊन छातीच्या मध्यभागी दुखणे
    *पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे
    *यात अल्सरच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये वारंवार पित्त होते, भूक कमी होते, काही जणांचे वजनही कमी होते. बेंबीच्या वरच्या भागात दुखायला लागते.
    *अल्सरच्या गंभीर लक्षणांमध्ये दुखणे वाढते, दुखण्यामुळे रात्रीतून उठून बसावे लागते. अशा दुखण्यात बऱ्याचदा खाल्ल्यावर आराम पडल्यासारखे वाटते. मळमळ आणि आम्लपित्त झाल्यानंतर होतात तशा उलटय़ाही होऊ शकतात. आजार आणखी पुढे गेला असेल तर उलटीतून रक्त पडू शकते. काही रुग्णांमध्ये शौचावाटे रक्त जाऊ शकते किंवा शौच काळ्या रंगाची होऊ शकते.
    *अल्सरचे काही रुग्ण अगदीच गुंतागुंतीच्या गंभीर परिस्थितीत डॉक्टरांकडे येतात. अशा रुग्णांमध्ये अल्सर फुटून आतडय़ाला छिद्र पडलेले असू शकते. या रुग्णांना अचानक पोटात प्रचंड दुखू लागणे, उलटय़ा होणे आणि पोट गच्च होऊन फुगणे ही लक्षणे दिसतात. गंभीर स्थितीत आलेल्या काही रुग्णांना रक्ताची उलटी होते किंवा संडासवाटे जोरात रक्त जाते. याउलट काही रुग्णांमध्ये अल्सर भरून आतडय़ाची ती जागा बारीक होते आणि तिथे अडथळा निर्माण होऊन उलटय़ा होतात.

    अल्सरची कारणे कोणती?

    *‘एच पायलोरी’ नावाच्या जंतूचा संसर्ग हे जठराच्या तसेच लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाच्या अल्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. या जंतूंची लागण दूषित अन्न व पाण्यातून होते.
    *वेदनाशामक गोळ्यांचा अनावश्यक वापर किंवा काही आजारांमुळे दीर्घ काळ पित्तकारक औषधे घ्यावी लागणे यामुळेही अल्सर होऊ शकतो.
    *धूम्रपान व मद्यपान
    *सातत्याने खूप तिखट व मसालेदार खाणे
    *अतिरिक्त ताण व त्यामुळे वाढणारे आम्लपित्त हे देखील अल्सरसाठी कारणीभूत ठरू शकते.
    *अल्सर सर्वसाधारणपणे वयाच्या विशीनंतर आढळणारा आजार आहे. तरुणांमध्ये तसेच वृद्धांमध्येही अल्सरचे रुग्ण सापडतात.

    डॉक्टरांकडे केव्हा जावे?

    *आपल्याकडे आम्लपित्ताच्या रुग्णांची संख्याही कमी नाही. त्यातील कित्येकांना वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असतो. या त्रासात देखील रुग्णांना पित्त उसळणे, मळमळ व उलटी होणे, पोट गच्च होणे अशी लक्षणे दिसू शकतात. यातील प्रत्येक रुग्णाला अल्सर असतो असे नक्कीच नाही. पण असे त्रास सातत्याने व्हायला लागले तर अल्सरची शक्यता पडताळून पाहणे योग्य. अल्सरचे निदान नुसती लक्षणे पाहून करत नाहीत. दुर्बिणीतून तपासणी (एंडोस्कोपी) करून अल्सर आहे की नाही हे सांगता येते.
    *पोटाचा कर्करोग असलेल्या काही रुग्णांनाही वर सांगितलेल्यासारखीच लक्षणे दिसू शकतात. परंतु आम्लपित्त समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. त्यामुळे वेळीच तपासणी करून घेणे चांगले.
    अल्सर होऊ नये म्हणून-
    *जीवनशैलीतील सकारात्मक बदल हे अल्सर टाळण्यासाठीचा उत्तम उपाय.
    *वारंवार अति मसालेदार खाणे, धूम्रपान व मद्यपान टाळावे.
    *रात्रीची जागरणे टाळलेलीच बरी.
    *अनेकांना क्रोसिन, काँबिफ्लॅम किंवा इतर कुठल्याही वेदनाशामक गोळ्या वारंवार घेण्याची सवय असते. गरज नसताना या गोळ्यांचा वापर टाळावा.
    अल्सर आणि शस्त्रक्रिया
    *अल्सरचे स्वरुप साधे असेल तर ‘एच पायलोरी’ जंतूंच्या विरोधातील प्रतिजैविके आणि त्याबरोबर ४ ते ८ आठवडय़ांपर्यंत आम्लपित्त कमी होण्यासाठीची औषधेही दिली जातात. अर्थात औषधे घेण्याबरोबरच मानसिक ताणतणाव कमी करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.
    *अल्सरची स्थिती गंभीर असेल किंवा त्यावर औषधांचा म्हणावा तसा उपयोग होत नसेल तर शस्त्रक्रिया करून घेण्यास सुचवले जाते.
    *अल्सरच्या सर्वच रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे; किंबहुना आता आम्लपित्त कमी करण्यासाठी अधिक गुणकारी औषधे उपलब्ध झाल्यामुळे अल्सरसाठी शस्त्रक्रियेची गरज भासण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
    आम्लपित्तनाशक औषधेही वारंवार नकोच!
    *आम्लपित्तावर स्वत:च्या मनानेच सारखी- सारखी ‘अँटासिड’ म्हणजे आम्लपित्तनाशक औषधे घेण्याची सवयही कित्येकांना असते. अँटासिडची गोळी किंवा पातळ औषध घेऊन बरे वाटत असले तरी ते तेवढय़ापुरते असते. यात उपचार तर अर्धवट होतातच, पण औषधाने तेवढय़ापुरते बरे वाटू लागल्यामुळे आजाराचे निदान केले जात नाही.
    *आम्लपित्तच्या लक्षणांवर अँटासिड औषधे घेताना दुसरीकडे तिखट- मसालेदार खाणे, धूम्रपान किंवा मद्यपानाचे कुपथ्य देखील सुरूच राहण्याची शक्यता अधिक असते. परिणामी आम्लपित्तावर योग्य इलाज होतच नाही. त्यामुळे स्वत:च्या मनाने आम्लपित्तावर वरवरचे उपाय करत राहण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवलेले बरे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. संजय कोलते.

  • उत्क्रांती, आयुर्वेद, संस्कृती आणि आरोग्य

    p-24495

    आपण जागरूक आहोत आहाराबद्दल , आरोग्याबद्दल . मिळेल त्या माध्यमातून भाषेतून आपण आरोग्य विषयी जाणून घेत आहोत . त्यात हि आज आयुर्वेद शास्त्राबद्दल जनजागृती आणि आयुर्वेदातील मूल्यवान आहार आणि औषधी विषयी खूप छान माहिती रोज whats app , Facebook आणि इतर माध्यमातून उत्तम प्रकारे प्रसारित होत आहे . आरोग्याविषयीचे हे अभियान म्हणजे एक क्रांतीच म्हणावी लागेल . याचे दूरगामी फायदे पिढ्यान पिढ्या दिसतील .

    आरोग्य ह्या संकल्पनेकडे बघण्याची वेगळी दृष्टी आज आयुर्वेदातील संकल्पना समजून घेताना आपल्याला गवसत असणार. आम्ही आयुर्वेदा चे शिष्य हि अनुभूती घेत च समृध्द होत आलोय .मनुष्य प्राण्याचे जीवन हे शरीर धारणास्तव केलेले अन्न भक्षण , मलमूत्र विसर्जन ,संभोग आणि कालयोगाने मृत्यू इतके अप्रगल्भ निश्चित नाही.तसेच आरोग्य ह्या शब्दाची व्याप्ती, शरीरातील काही अवयव त्यांचे बिघाड आणि त्यावरील उपाय एवढी संकुचित किंवा mechanical नाही (सुदैवाने ). कारण अजूनतरी आपण गाडी servicing ला टाकतो त्याप्रमाणे आपल्या प्रिय व्यक्तीला डॉक्टरकडे सोडून ,” ए बघ रे जरा काय part बिघडलाय , कुरकुर चाललीये दोन दिवस झाले . उद्या ऑफिसात जाताना घेऊन जातो , तोवर करून ठेव नीट” असे म्हणत नाही .

    पृथ्वीच्या निर्मितीपासून निर्माण झालेल्या अमिबीय जीवापासून मनुष्य अशी अचाट , अकल्पित उत्क्रांती , प्रगती किंवा अजून काही योग्य शब्द असेल तर तोः घ्या . तर हे सगळे निसर्गातील दृश्य , अदृश्य , सिध्द , प्रत्यक्ष प्रमाण असलेले, अनुमान प्रमाण सचोटीवर उतरणारे , कलनीय अनाकलनीय बाजू असणारे हजारो प्रमेय च आहेत कि .

    माणूस हा “प्राणी टप्प्यावर” च असताना केवळ प्राणीसुलभ शारीरिक विकासाचा एक limited era ओलांडून त्याही पलीकडे जाऊन माणूस नावाच्या प्राण्याचा विकास झाला . ह्या प्राण्याच्या उत्क्रांतीचे महत्वाचे टप्पे हे मानसिक विकासावर आधारलेले होते.

    निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्गाचे , ऋतूंचे , निसर्गातील घडामोडींचे , आपत्तींचे ,उपलब्धींचे, सौंदर्याचे , सुहृदाचे, सृजनाचे, प्रसंगी क्रौर्याचे , विनाशाचे , संहाराचे धडे हा भविष्यकाळातील महाशक्ती असणारा परंतु त्याकाळी प्राणी ह्या परिभाषेची कात टाकायला निघालेला मनुष्य प्राणी गिरवत होता . हे धडे तोः असे गिरवत होता कि त्याची ABCD येणाऱ्या हजारो लाखो पिढ्या तो वारसा पुढे नेणार होत्या. प्रत्येक वेळी पुढे नेताना त्या तोः वारसा प्रगत, सोप्या भाषेत सांगायचे तर update करत जाणार होत्या . genetic mutation हो वेगळे काही नाही . हा आता कळले बुवा , इतका वेळ काय बोलताय कळत नव्हते न , असो .

    तर एका विशिष्ट काळानंतर निसर्गाने जन्माला घातलेले हे मनुष्य बाल निसर्गावर राज्य करू लागले . स्वताचा अभ्यास करू लागले .

    गरज , भूक इतपत झेप न राहता निर्मिती हि सगळ्यात महत्वाची झेप माणूस घेत होता.

    या मानसिक विकासाचा मनुष्याच्या शारीरिक अवयवान इतकाच विकास आणि बदल होत होता . निसर्गाचे शरीरावर होणारे परिणाम माणूस जसा जसा जाणून घेऊ लागला तसतसा त्याच्या जीवनशैलीत बदल झाला . हे प्राथमिक सत्य आपण सगळे जाणतोच . परंतु यातून जी एक मोठी गोष्ट घडली , ती म्हणजे संस्कृती निर्माण झाली. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या जागी राहणाऱ्या , वेगवेगळी भौगोलिक परिस्थती , वेगवेगळे उपलब्धी असणाऱ्या मनुष्य गटांचे राहणे ,खाणे आणि एकंदरीत च एक जीवनशैलीचा उदय झाला .

    जीवन शैलीचा असा उदय होणे हि आरोग्य या संकल्पनेची नांदी होती . कृपया मागील वाक्य नीट परत परत वाचा . सजीव सुलभ स्वतःचे शरीर धारण करणे , स्वतःचा बचाव करणे आणि स्वतःची जात ( मनुष्य जात , कृपया जात शब्द tolerantly घ्यावा ) प्रजनन करून वाढवणे ह्या मूळ हेतुंमध्ये उत्तमोत्तम बदल या जीवन शैली मुले घडून आले .

    म्हणून जीवन शैली आणि संस्कृती हे दोन खूप महत्वाचे मुद्दे या लेखात अधोरेखित करावेसे वाटतात .

    कारण हि जीवन शैली आणि संस्कृती त्या ठिकाण आणि काळ ह्या कसोटीवर उतरत असते . तसेच पिढ्यान पिढ्या आहार , विहार आणि जगण्याची एक विशिष्ट पद्धत ज्याला आपण आचार म्हणतो हि संस्कृती जपत असते .

    तर मुद्दा असा आहे आरोग्य हि संकल्पना हे संस्कृतीच्या उगमापासून असावी . अश्या वेगवेगळ्या संस्कृती पृथ्वीतलावर वेगवेगळे अलिखित, अफाट literature निर्माण करत होत्या .

    कुठे न कुठे ह्या सगळ्यांचा संबंध मनुष्या प्राण्याच्या टिकणे , जगणे आणि निरोगी राहणे इथे येउन च संपत . शरीरा बरोबरच मनाचा पसारा आणि महत्व हळू हळू उलगडत होते . माणसाच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या तीन गरंजा चा वेगवेगळ्या शाखां मध्ये विस्तार झाला .

    असा विस्तार होत असताना मूळ उद्देश मात्र अबाधित होता . माणूस त्याचे जगणे , टिकणे आणि प्रजनन . या गरजांच्या आजू बाजू च वेग्व्गेल्या शाखा विस्तारित होत होत्या अभ्यासल्या जात होत्या.

    थोडक्यात या विस्ताराला जीवन शैलीला , ज्या काळात विज्ञान , शास्त्र , सिद्ध असे शब्द अस्तित्वात पण नव्हते , त्या काळात स्व प्रामाण्याचा अनुभव होता .

    आणि म्हणूनच ह्या विशिष्ट काळानंतर मनुष्य प्राण्याची सर्व शास्त्रातली प्रगती आणि तरीही मूळ हेतू अबाधित होता आणि आहे .

    आज golbalisation च्या युगात संस्कृती ह्या concept चे सगळे खांब च गळून पडतात . जगाच्या पाठीवर वेग्व्गेल्या भौगोलिक वातावरणात राहणारे आपण पामर जीव कुठल्याही संस्कृतींची जीवन शैली आपल्या हवी तशी हव्या त्या पद्धतीने अमलात आणतोय . आपण जास्त काळ राहतोय त्या आजूबाजूचे निसर्गाचे आणि आपल्या शरीरातले अणू रेणूंचे करार आपल्याला माहित नसतात पण असतात हे १००% सत्य .करार मोडला कि दंड भरावा लागणारच . करार मोडण्याचे मध्यम काय तर , मी काय खातो , मी कसा राहतो (जीवनशैली) आणि मी कसा वागतो ( मानसिक आणि शारीरिक नियम ). म्हणजे च संस्कृती .

    संस्कृती हि कुठल्याही जाती अथवा धर्माची नसते . संस्कृती आणि धर्म या खूप वेगळ्या गोष्टी आहेत असे सुजाण वाचक जाणतातच.

    जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी शरीर आणि शरीर भाव सारखेच राहणार हो , परंतु त्या भौगोलिक वातावरचा , तापमान , उपलब्ध अन्न , ऋतू प्रकार , समुद्र सपाटी पासूनची उंची , यानुसार शरीराचा आणि निसर्गाचा करार झालेला असतो . त्यानुसार बदल होतात शरीर भावात निसर्गाला अनुसरून .

    त्यानुसार खाण्या पिण्याचे आणि इतर जीवन शैलीचे नियम आपोआप च आत्मसात होतात .

    अरे हो हेय सगळे लिहण्याचा प्रपंच का तर माझ्या एका patient ने मला विचारलेला निरागस प्रश्न . patient भारतीय नाही, email मधली प्रांजळ शंका , ” I wonder whether , we Europeans too have vaata pitaa and kafa dosha like you Indians as said in Ayurveda ? ”

    त्याच्या शंकेचे योग्य उत्तर पोचवले अन लगेच लिहायला घेतले .

    संस्कृती global असेल किंवा नसेल , परतू आयुर्वेद ग्लोबल आहे निश्चित . कारण आयुर्वेदात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांनुसार मनुष्य शरीतातील प्रकृती , दोष , धातू , आहार , विहार , आचार , व्द्याधी त्यावरील उपाय आणि व्याधी च होऊ नयेत म्हणून follow करायची संस्कृती ह्याचे विवेचन आहे .

    अहो कुठल्या medicine science मध्ये उलेख्ह असेल का, कि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आरोग्याशी निगडीत रोज संबंध येणाऱ्या गोष्टी यथोचित कशा कराव्यात .बाराखडी च कच्ची असेल तर ग्रंथ काय लिहणार . असे महत्व दिनचर्ये चे आहे म्हणून प्रत्येक ग्रंथात सुरुवात दिनचार्येपासून च आहे .ऋतूनुसार आपला आहार , आचरण आणि preventive measures कसे असावे हे आयुर्वेद च सांगणार कारण …कारण संस्कृती हो बाकी काही नाही .

    रोज खाण्यात असणार्या भाज्या , फळ , इतर व्यंजने यांचे गुणधर्म आणि व्याधीवर त्यांची उपयुक्तता याचे सविस्तर वर्णन इतर कुठल्या pathy मध्ये सापडेल का …आयुर्वेदातातच का ..कारण संस्कृती हो .

    syllabus उघडला कि रोग आणि औषधे असे शास्त्रच नाही मुळी.

    मला तर आयुर्वेद हा सर्वांग सुंदर अत्त्युत्तम कलेचा नमुना वाटतो कायम . असो विषय लांबतोय …उपलब्ध माहितीचा फायदा घ्या , अर्धी हळद पिउन गोरे व्यायचा प्रयत्न करण्या अगोदर योग्य वैद्या चा सल्ला घ्या . टिप्स च्या आहारी किती जायचे याचे सुज्ञ भान ठेवा . आयुर्वेदा बद्दल उत्तम माहिती पोचवण्याचे काम अखंड सुरु राहो .

    -- वैद्या. रुपाली जोशी पानसे
    आद्यं आयुर्वेद , पुणे
    aadyam .ayurved@gmail .com
    ९६२३४४८७९८

    (लेख आणि लेखातील माहिती आवडली आणि आपल्या सुहृदापर्यंत पोचवावी वाटल्यास कृपया लेखिकेच्या नावासकट share करावे . लेखावरील प्रतिक्रिया शंका आणि अनुभव यांचे स्वागत आहे कारण त्यामुळे लेखाचा उद्देश अजून सफल होतो )

  • कलिंगडाच्या आरोग्यदायक बिया

    आता कडक उन्हाळा सुरू झालाय. जिकडेतिकडे कलिंगडाचे ढीग रचलेले दिसतायत. उन्हामुळे शरीरातील कमी झालेलं पाणी भरुन काढायला कलिंगडाची मदत होते. ऊन्हाळ्यात फ्रूट-प्लेट सगळ्यांच्या आवडीची. त्यात आता कलिंगडाचं प्रमाण जास्तच असणार.

    मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण नेहमीच फेकून देतो. पुढच्यावेळी कलिंगड खाताना बिया फेकून देऊ नका. कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बिया गुणकारी असून आपल्या शरीराला फायद्याच्या असतात.

    कलिंगड बियाइसोबत खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमध्ये सिट्रालाइन हे अमायनो अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. याचा उपयोग रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास होतो.

    हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयुक्त आहेत. बियांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार कलिंगडाच्या बियांमधील फॅटस् घातक कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात.

    किटाणूंच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठीही कलिंगडाच्या बियांचा उपयोग होऊ शकतो.

  • सकाळी फिरायला जाताना ज्यूस घेणे आरोग्यवर्धक असतं?

    सध्या तर फळभाज्यांसह विविध गोष्टींचे रस भल्या पहाटे पिण्याची चढाओढच अनेक स्त्री-पुरुषांमध्ये दिसते. जॉगिंग ट्रॅक्सवर तर भल्यासकाळी त्या रसठेल्यांसमोर रांगा लागतात. कुणी दुधीचा रस रोज पितो, तर कुणी कढीपत्त्याचा, कुणी गव्हाचा तृणरस तर कुणी कारल्याचा, कोरफड, काकडी, गाजराचा किंवा कुणी या सगळ्याचा मिक्स रस रोज नियमित, न चुकता सेवन करतात. एकवेळ व्यायाम राहिला तर चालेल; पण हे रस अनेकजण पितातच.

    खरंच असे रस रोज पिणं हे आरोग्यवर्धक असतं?

    नियमित फिरायला जाणारे आणि नियमित ज्यूस / रस घेणारे असे अनेकजण कधी विचार करतात की, याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? त्यासाठी कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे का? मी कोणता रस घेऊ? किती घेऊ? किती दिवस घेऊ? आणि घेऊ की नको? असं कुणी विचारतं का डॉक्टरांना? छे.छे.! असा सल्ला घेण्याची आपल्याला गरजच वाटत नाही, कारण सेल्फ मेडिकेशन करणा:यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. पण निदान त्याबद्दल वाचन, नेटवरून काही माहिती तरी घेतो का? तर नाही. ते औषधी आहे ना? मग सर्वाना चालते, असाच एक समज. पण ते औषधी आहे म्हणूनच प्रश्न आहे, कारण औषध म्हटलं की त्याला डोस म्हणजे मात्र / प्रमाण आले. कालावधी आला आणि मुख्य म्हणजे तुम्हाला याची गरज आहे का हे तपासणं आलं.

    मधुमेह नसणा:यानं मधुमेहाचं औषध घेतलं तर चालेल का?

    जेव्हा पहाटे आपल्याला रस विकत मिळतात, तेव्हा ते कधी काढले आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे. तसंच त्यांची साठवण करताना, वाटप करताना स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात आहे का हे बघणंसुद्धा आवश्यक आहे. रस काढताना ती वनस्पती स्वच्छ धुवून, निवडून नंतर रस काढला जातो का? ते ही बघा. जर औषधांवर पेस्टिसाइडचे फवारे मारले जात असतील तर ते साध्या पाण्यानं धुवून निघत नाहीत. त्यांचे अंश रसातही येतात. म्हणून ही द्रव्यं कुठून आणली जातात त्याचीही माहिती घ्यावी. अनेक जण स्वत:च्या घरीच ज्यूस काढतात. आणि विचारतात, हे तर चालेल ना प्यालं तर? पण त्यांनीसुद्धा काळजी घेणं, सल्ला घेणं आवश्यकच आहे. आपण जे काही खाणार आहोत त्याची पूर्णत: शास्त्रीय माहिती घेणं आवश्यक आहे. साधे कपडे खरेदीला गेल्यावरही आपण किती चौकसपणो खरेदी करतो? आणि सेवीय पदार्थाबाबत मात्र फारच उदासीन असतो. म्हणूनच आधी सारासार विचार करा, तो महत्त्वाचा!

    कुठल्याही प्रकारचे रस पिताना ऋतू, वय, प्रकृती, आजार, वनस्पतीचे गुणधर्म या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आणि तुमच्या डॉक्टरांनी/वैद्यांनी सुचवलं असेल, सांगितलं असेल तर त्यांच्या सल्ल्यानुसारच हे रस घेणं योग्य. स्वत:च्या मनानं, आपल्याला वाटतं म्हणून किंवा सगळे पितात म्हणून हे रस पिऊ नका.

    आयुव्रेदामध्ये रसचिकित्सा सांगितली आहे. याचे दोन अर्थ होतात.

    1) रस - स्वरस, एखाद्या वनस्पतीचा अंगचा रस.

    2) रस+षड्रस- चव जिभेलाच ‘रसना’ असे म्हणतात.

    कारण यामुळे चवीचं ज्ञान होतं. या चवी सहा प्रकारच्या असतात. गोड, आंबट, खारट, तुरट, कडू आणि तिखट. या प्रत्येक चवीचे शरीरावर परिणाम होत असतात. या चवीसुद्धा ठरावीक प्रमाणात घेणं आवश्यक असतं. हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास आजार होतात.

    उदा. गोड चव ही फक्त मधुमेहींनाच वज्र्य नाही तर ज्यांचं वजन वाढते आहे, ज्यांना सर्दी-खोकल्यासारखे कफाचे आजार सतत होतात त्यांनीसुद्धा गोड जास्त खाऊ नये. याचप्रमाणो कडू चव जरी आवश्यक असली तरी त्याचं प्रमाण अत्यल्प असावं, अधिक प्रमाणात घेतल्यास शरीरात रुक्षता वाढते. सतत तहान लागणं, त्वचा कोरडी होणं, हे त्यातूनच घडतं. रोज कारल्याचा रस घेण्यानं त्या बाईंचं काय झालं, हे आता तुम्हालाही समजलं असेल! औषध ही दुधारी तलवार आहे. स्वत:च्या मनानं औषधं घेऊन स्वत:वर प्रयोग करणं, स्वत:ला ‘गिनिपिग’ बनवणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे औषधींचा / वनस्पतींचा रस वापरून चिकित्सा करणं. यात ज्या वनस्पतींमध्ये भरपूर रस असतो, प्रामुख्यानं त्यांचा रस वापरला जातो. विविध स्वरूपात औषधं वापरली जातात. उदा. चूर्ण, काढा, गोळ्या यापैकी एक म्हणजे रस. ज्या वनस्पतींमध्ये दृवांश कमी असतो त्यात थोडं पाणी टाकून, कुटून हा रस काढला जातो. यास अग्निसंस्कार नसतो यामुळे रस टिकाऊ नसतात. 2-3 तासांपेक्षा अधिक टिकत ते टिकत नाहीत. ते फसफसतात. आंबट होतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी हृदयाला बल्य म्हणून दुधी भोपळा रस उपयोगी आहे. पण तुम्ही रोज घेत असाल तर त्यावर किटकनाशकं फवारणी किती प्रमाणात आहे याची माहिती घ्या. रक्तवाढीसाठी किंवा डोळ्यासाठी अनेक जण गाजर, बीट दुर्वाचा असे रस घेतात. गाजर रस स्वरूपात किंवा त्यासह स्निग्ध पदार्थ तेल, तूप इत्यादि असल्यासच शरीरात शोषला जातो. सलाड म्हणून गाजर कच्चं खाल्यास शरीरास काहीही मिळत नाही. त्याऐवजी तेलाची फोडणी असलेली कोशिंबीर किंवा गाजर हलवा खाणं योग्य. त्याचप्रमाणं गाजर रसही सतत घेत राहिल्यास शरीरातील केरॅटिन वाढते. त्वचा तांबूस होते. बीट रससुद्धा रोज घेऊ नये. मधूनमधून खंड करावा. गाजर-बीट एकत्र घेतल्यास 1/4 भाग बीट व 3/4 भाग गाजर रस असं प्रमाण ठेवावं. कोरफड रस नियमित घेणा:या व्यक्तीही आहेत. त्याचा ब्रँडेंड रसही आता बाजारात मिळतो. कोरफडीचं कार्य मुख्यत: यकृत, गर्भाशय यावर होतं. सतत कोरफड रस घेण्यानं मूळव्याध होण्याची शक्यता असते. तसेच गर्भिणी, पाळीच्या वेळी अति रक्तस्त्रव होणा:या स्त्रिया, यांनी हा कोरफड रस घेऊ नये.

    -- संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    संदर्भ. वैद्य रजनी गोखले

  • अभ्यंग स्नान.. आरोग्याला वरदान

    दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः उरकला जातो. अंगभर तेल लावून घेण्याची ना कुणाला आवड असते ना सवड. त्यामुळे रुढीच्या नावाखाली डोक्यावर तेलाची दोन बोटे टेकवली, अंगाला उटणे चोपडले अन् वरुन फसफस एखादा सुगंधित साबण घासला की झाले दिवाळी चे अभ्यंग स्नान.

    खरे तर प्रत्येकाने स्वास्थ टिकविणे ही आज काळाची गरज आहे. आपले सगळे सण वार त्याला जोडुन असणारे रिवाज, सणांना करण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नितीनियम गाठोड्यात बांधुन वरच्या माळ्यावर टाकले गेले आहेत. नेमके त्यांच्या पाठीमागचे आरोग्यशास्त्र आपल्याला समजत नाही.

    वास्तवीक हे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करुन थांबायचे नसते, तर त्या दिवसापासून पुढे वर्षभर करायचे असते. दिवाळीला शास्त्र शुध्द पध्दतीने बनविलेले तेल कुण्या प्रेमाच्या व्यक्ती कडुन सर्व अंगाला लावुन नंतर शुध्द वनौषधीच्या चुर्णाचे ऊटणे वापरुन मग गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्ग सुख काही अवर्णनीयच असते. तेजोमय दिवाळित भेटलेले हेच विसाव्याचे क्षण , आपुलकीचे क्षण, पुढे वर्षभर धकाधुकीयुक्त जीवनाला स्नेहाचा-प्रेमाचा आधार देतात. प्रत्येक नात्यातला आपलेपणा - आपुलकी पणा टिकवितात.

    दिवाळी म्हणजे मुक्त हस्ताने तेजाची उधळण करणारा सण. दिवाळीत असते दिव्याच्या पंक्तीचे तेज, दारात लटकणारया आकाशदिव्याचे तेज, अंगणात मांडलेल्या रांगोळीचे तेज, श्रीलक्ष्मीच्या आराधनेमुळे आलेल्या मांगल्याचे तेज. एकंदरीत दिवाळी हा सण तेजाची लयलुट करणारा आहे, जीवनास तेजोमय बनविणारा आहे.

    सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच घ्यायला हवा. त्यातही वात प्रकृती असणारयांनी आवर्जुन घ्यायला हवा. आजच्या जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास करणारयांनी, रात्री कामानिमित्त जागरण करणारयांनी, कामाचा अतिरिक्त ताण असणारयांनी, बौध्दिक शारिरिक परिश्रम करणारयांनी, आरोग्य टिकविण्यासाठी नित्य प्रतिदिन अभ्यंग करावे.

    सर्व साधारण ३० ते ४० मिनीटे संपुर्ण मसाज व्हायला हवा. तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे. अभ्यंग विषेशतः सकाळी आंघोळ आणि व्यायाम करण्यापुर्वी करावा. अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ केल्याने शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद कमी होऊन शरीर दृढ बनते, त्वचेचा टोन सुधारतो, त्वचेचा रंग उजळतो, त्वचेवरील लव कमी होते. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो. आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.

    शरीरात ज्या ठिकाणी वात हा दोष कार्यरत असतो त्या ठिकाणी तैलादी द्र्व्ये ही वात नाशनाचे काम करतात. वाताचे रुक्ष व खरता हे दोन गुण स्नेहाच्या मार्दवता व स्निग्धता या उलट असल्याने वातविकाराचे शमन होते, त्वचेच्या ठिकाणी स्पर्शानुभव होत असल्याने वाताची रुक्षता नियमित अभ्यंग करणारया लोकांमध्ये नश्ट होऊन वात रोगाची उत्पत्ती टाळली जाते. आयुर्वेदानुसार आठ वेळा तुप खाण्यापेक्शा एकदा तैलाभ्यंग करुन घेणे सरस ठरते. नियमित व तात्रिक दॄष्ट्या योग्य प्रकारे तैलाभ्यंगाने सर्व अंगप्रत्यंग पुष्ट व बलवान होतात. दृष्टि तेजोमय होते व मन समाधानी होऊन निद्रा सुखकर होते.

    अभ्यंग म्हणजे वास्तवता शरीरातील वेगवेगळ्या स्नायुंना दिला गेलेला विशिष्ट प्रकारचा व्यायाम होय. या क्रियेमुळे स्नायुंना गती, चालना मिळुन ते अबाधित रित्या काम करु लागतात. अभ्यंगामुळे रक्तवाहिन्या व रक्तात घर्शन क्रियेने उष्णतेची निर्मीती होते. परीणामी रक्ताधीन असलेले विजातीय द्रव्ये तसेच त्वचेखालील अतिरिक्त फॅट वेगवेगळे होऊन विविध मार्गाने शरीराबाहेर फेकले जातात. परीणामी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक रक्त शुध्द होऊन शरीराची कांती निखळून येते. शरीरात असणारया वेदना, सुज या तैलाभ्यंगाने नष्ट होऊन अस्थी सांध्यांना पुष्टता व दृढता प्राप्त होते. तसेच मणुष्य देखील शक्ती संपन्न होऊन दिर्घायुष्य प्राप्त करतो. नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते. स्नायूंमधील कडकपणा कमी होतो आणि अंग हलके होते. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.

    अशाप्रकारे शरीराचा लवचिकपणा तसेच कांती थोडक्यात संपुर्ण आरोग्यच जर अभ्यंगा सारख्या सहज सोप्या उपायाने मिळत असेल तर प्रत्येकाने त्याचा अवश्य लाभ घ्यावयासच हवा.

    करावे नित्यदिन सर्वांगास अभ्यंग
    प्रफुल्लीत मन उत्साही सर्वांग
    तारूण्य टिकेल आयुष्य भर
    न दुखणार गुडघा अन् कंबर
    तेजोमय दिवाळी, सुवर्ण मयी काया
    हिच खरी अभ्यंगाची किमया.......

    अभ्यंगासाठी तिळाचे तेल सर्वात चांगले आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये गंगा कंपनीचे वनौषधींबरोबर प्रक्रिया केलेले तिळाचे तेल मिळते किंवा डाबर कंपनीचे भारीचे धान्वंतर तेल मिळते ते तेल आपण अभ्यंगासाठी वापरु शकतो. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकित्सा. अगदी दररोज शक्‍य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी.

    काही शंका असेल तर ०९३२६५११६८१ या व्हॉट्सएप वर मॅसेज करा( कृपया फोन करु नका..इतर मॅसेज पाठवु नका.)

    -- डॉ.कविता पवन लड्डा
    लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
    पद्मा नगर, उदय पेट्रोल पंपामागे, बार्शी रोड, लातूर
    फोन ०२३८२ २२१३६४ , ०९३२६५११६८१

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

  • आयुर्वेदातील विविध संज्ञा

    आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन-

    अग्निदीपक - भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
    अपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
    अवलेह - साखरेचा गुळाचा पातळ पाक.
    कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
    काढा - काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे.
    कुपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
    केश्य - केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध.
    चूर्ण - सुकलेल्या वनस्पती कुटून मग त्या गाळून तयार झालेला बारीक वस्त्रगाळ पदार्थ.
    ज्वरघ्न - तापाचे हनन करणारे पदार्थ किंवा औषध.
    दाहकारक -आतड्यात / पोटात जळजळ उत्पन्न करणारे, मसालेदार, तिखट पदार्थ.
    पथ्य - शरीरास/आरोग्यास हितकारक
    प्राणिज - प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले.
    पित्तशामक - वाढलेले पित्त कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
    पित्तहारक - शरीरात पित्त वाढले असता ते कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
    फांट - घटकद्रव्याच्या वजनाच्या चौपट पाणी घालून चांगले उकळवून तयार केलेले द्रावण.
    भस्म - एखादा औषधी पदार्थावर जाळण्याची/उष्णतेची प्रक्रिया करून उपलब्ध झालेली राख.
    मारण - धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी.
    मूत्रल - शरीरातील दोष लघवीवाटे निघून जावे्त यासाठी मूत्राचे प्रमाण वाढविणारे औषध.
    रेचक - ज्या औषधाने रेच/जुलाब होतात असे औषध.
    वटिका - गोळ्या
    वांतिकारक - सेवन केल्यास उलटी होईल असे पदार्थ किंवा औषध.
    वायुकारक - वायू वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
    शोधन - शुद्ध करणे
    स्नेहन - वंगणासारखे काम करणारे, चोपडेपणा आणणारे पदार्थ किंवा औषध.
    स्वरस - अंगरस. ओल्या वनस्पतीस कुटून व फडक्याने गाळून जो रस निघतो त्या रसाला स्वरस म्हणतात.
    स्वेदन - घाम आणणारे पदार्थ किंवा औषध किंवा उपाययोजना.
    हिम/शीतकषाय - घटकद्रव्याच्या वजनाच्या सहापट पाणी घालून व रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेतल्यावर तयार होणारे औषध.
    हीनवीर्य - ज्यात कस उरला नाही असे पदार्थ किंवा औषध..

    संकलन :- श्रीधर कुलकर्णी
    ज्ञानामृत मंच

    -- WhatsApp वरील आरोग्यदूत या ग्रुपवरुन साभार

  • जेवल्यानंतर तातडीने चहा पित असाल तर सावधान!

    माहिती सेवा गृप पेठवड़गाव

    अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते. एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो, तर ताजंतवानं राहण्यासाठी चहा प्यायला जातो. काही जणांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणां आवडतं. पण ही सवय प्रकृतीला घातक ठरु शकते.

    जेवणानंतर तातडीने चहा पिणं आरोग्यसाठी अजिबात चंगलं नाही. चहा पावडरमध्ये आम्प पदार्थ असतात. हे पदार्थ अन्नातील प्रोटीनमध्ये मिसळतात. यामुळे प्रोटीन टणक बनतात, परिणामी ते पचायलं जड जातं. यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणं टाळावं.
    याशिवाय चहामध्ये कॅफिनही असतं ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्याचसोबत कॅफिनचं अतिप्रमाण शरीरात कोर्टिसोल म्हणजे स्टेरॉईड हार्मोन्स वाढवतं. यामुळे शरीरला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यात हृदयासंबंधित आजार, मधुमेह आणि वजन वाढणं इत्यादींचा समावेश आहे.

    चहामध्ये ‘पॉलिफेनोल्स’ आणि ‘टेनिन’ इत्यादी घटक असतात, जे जेवणातील लोह शोषत नाहीत, परिणामी शरीरालाही त्याचा फायदा होत नाही. विशेषत: महिलांमध्ये लोहाची कमतरता असते, त्यांच्यासाठी जेवल्यानंतर चहा पिणं नुकसानकारक ठरतात. जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्या शिवाय राहू शकत नाही तर जेवणानंतर किमान एक तासाने प्यावी.

  • पालेभाज्यांचा बागुलबुवा!!

    आजकाल जिथे तिथे ‘Green leafy vegetables’ चा बोलबाला ऐकू येतो. कित्येक आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर्सदेखील नियमितपणे पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. इतक्या प्रमाणात पालेभाज्या खाण्याची सवय आपल्याकडे पूर्वीपासून होती का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी नकारार्थीच मिळते. मग आताच हा गवगवा का?
    याचे उत्तर नेहमीप्रमाणेच दडलेले आहे ते परदेशी संशोधनांत! Green leafy vegetables नियमितपणे आहारात घेतल्याने आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, पचन सुधारते असे काही संशोधनांचे निष्कर्ष आहेत. ज्या देशांत सकाळी नाश्त्यापासूनच मांसाहार करण्यास सुरुवात होते तेथे आतड्याचा कर्करोग होण्याचे प्रमाण मुळातच जास्त असणार ही बाब आपण लक्षातच घेत नाही. आपल्याकडे ‘पट्टीचे खाणारे’ लोकही नाश्त्यापासून मांसाहारावर ताव मारायला सुरुवात करत नाहीत हे महत्वाचे. ‘पचन सुधारणे’ म्हणजे केवळ शौचाला साफ होणे इतकाच अर्थ अशा संशोधनांत आढळून येतो. प्रत्यक्षात इतका संकुचित अर्थ वैद्यकीयदृष्ट्या मुळीच योग्य नाही. दिवसभर ब्रेड, चीज आणि मांस यांसारखे पचायला अतिशय जड पदार्थ सातत्याने खाल्ल्यावर स्वाभाविकपणे निर्माण होणारा बद्धकोष्ठाचा त्रास टाळावा म्हणून हे लोक Fibre आणि roughage इतक्याच मर्यादित दृष्टिकोनातून या पालेभाज्यांकडे पाहून त्यांचा उदोउदो करत असतात. आपल्याकडे तसा करण्याची निश्चितपणे आवश्यता नाही.
    परदेशात खाल्ल्या जाणाऱ्या कोर्नड, सॅलरी, रॉकेट लिव्स यांसारख्या Green leafy vegetables या आपल्याकडच्या मेथी, चाकवत, माठ इत्यादी पालेभाज्यांच्या तुलनेत अगदी भिन्न आहेत. त्यामुळे त्यांना लावलेला हा न्याय आपल्याकडे मुळातच लावता येणार नाही. मुंबईसारख्या शहरांत तर रेल्वेलाईनच्या लगत असलेल्या वाफ्यांत उत्पादन घेतल्या जाणाऱ्या आणि आजूबाजूच्या सांडपाण्यावर पोसल्या जाणाऱ्या पालेभाज्यांत निकेलसारखे कर्करोगास कारणीभूत असणारे घटक वाजवीपेक्षा कित्येक पटीने अधिक प्रमाणात आढळले आहेत. (यात पालक ही पालेभाजी आघाडीवर आहे)
    सरटेशेवट; जो आहारीय पदार्थ जसा दिसतो/असतो तसेच परिणाम तो शरीरावर करतो. पालेभाज्या लवकर वाढतात, लगेच कुजतात आणि त्यात सर्वाधिक किडे असण्याची शक्यता असते. आयुर्वेदाने तर पालेभाज्यांपासून दूर राहण्याचा सल्ला ‘अशाकभुक्’ या शब्दात दिलेला आहे. थोड्क्यात सांगायचे झाल्यास; पालेभाज्यांचा आहारात अगदी जेमतेम समावेश असावा. Green leafy vegetables चा आंधळेपणाने केलेला गवगवा तर अजिबातच नको!!
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५