वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शरीरातील एक किंवा अधिक स्नायू कार्य करीत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. चेतासंस्थेला विशेषकरून व मेरुरज्जूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. पक्षाघातामुळे स्नायू लुळे व दुबळे होतात. अशा स्थितीत जर संवेदी चेतांनाही धक्का पोहोचला तर बाधित भागातील संवेदनाही नाहीशा होतात.
पक्षाघात पक्षाघाताच्या इतर कारणांमध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे (स्ट्रोक), डोक्याला किंवा पाठीला मार बसून चेतांना किंवा मेरुरज्जूला इजा पोहोचणे, पोलो, बोटुलिन या जीवविषाचा परिणाम, चेतातंतू आवरणदाह इत्यादींचा समावेश होतो. चेतापेशींना ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा नियमित पुरवठा होणे आवश्यक असते. काही कारणाने उदा., मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीतील गाठ अवरोधामुळे रक्तपुरवठा थांबला तर चेतापेशींचे कार्य थांबते. अशा चेतापेशी ज्या अवयवाचे किंवा स्नायूंचे नियंत्रण करतात, त्या अवयवांच्या हालचालींवर परिणाम होतो आणि पक्षाघात होतो. काही वेळा अचानक रक्तदाब वाढल्यास मेंदूमधील धमनी फुटून मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव होतो. या रक्तस्रावामुळे चेतापेशींवरील दाब वाढून पक्षाघात होतो. मस्तिष्कस्तंभामध्ये (मज्जारज्जू आणि मेंदू यांना जोडणाऱ्या भागामध्ये) रक्तस्राव झाल्यास पक्षाघाताबरोबर मृत्यूही ओढवतो.
पक्षाघात एखाद्या विशिष्ट भागापुरता (स्थानिक) किंवा सार्वदेहिक असू शकतो. शरीराच्या ज्या भागावर परिणाम घडतो त्यानुसार पक्षाघाताचे वर्णन करता येते. उदा., एका बाजूचा हात आणि त्याच बाजूचा पाय लुळा पडणे (अर्धपक्षाघात), कमरेखालील भाग व दोन्ही पाय लुळे पडणे (अधरपक्षाघात), दोन्ही हात व पाय लुळे पडणे (चतुरांगघात).
पक्षाघाताचे सामान्यपणे सौम्य आणि तीव्र असे दोन प्रकार करता येतात. सौम्य पक्षाघात बहुतेक वेळा रेम झोपेच्या कालखंडामध्ये होतो (पहा: झोप). अंथरुणातून उठताना चालणे, बोलणे किंवा डोळे न उघडता येणे, चेहरा निश्चल होणे, डाव्या किंवा उजव्या बाजूच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होणे, ओठ खाली पडणे, हातातून वस्तू खाली पडणे, चप्पल घातल्यानंतर ती नकळत पायातून निसटणे ही सौम्य पक्षाघाताची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. वेळीच उपचार झाल्यास सौम्य पक्षाघात बरा होतो.
अतिधूम्रपानामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. तसेच रक्तदाबाची औषधे नियमित न घेतल्यास किंवा उच्च रक्तदाब नियंत्रणाखाली न ठेवल्यास मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. मेंदूमध्ये रक्तस्रावाचे निदान चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा (एमआरआय) तंत्राने करता येते. निदानानंतर लागलीच शस्त्रक्रिया करून मेंदूमधील रक्ताची गुठळी काढली तरी मेंदूच्या ज्या भागात गुठळी झाली होती तो भाग पूर्ववत कार्यरत होणे कठीण असते. शरीराचा डावा किंवा उजवा भाग पक्षाघाताने लुळा पडल्यास संवेदी चेतापेशींच्या कार्यामध्ये फारसा अडथळा येत नाही. भौतिक चिकित्सा उपचारांनी काही प्रमाणात अशा अवयवांची हालचाल पुन्हा होऊ शकते. घसा आणि ग्रसनी यांचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या भागाला पक्षाघात झाल्यास बोलणे आणि गिळणे या क्रियांवर परिणाम होतो.
मेंदूमध्ये वाढलेली गाठ लगतच्या निरोगी पेशीवरील दाब वाढवते. त्यामुळे निरोगी पेशी निकामी होतात आणि पेशीनियमन करणाऱ्या भागाचा पक्षाघात होतो. पोलिओसारख्या विकारामध्ये चेतांच्या संदेशवहन क्षमतेमध्ये बिघाड होऊन स्नायू दुर्बल होतात. हा सुद्धा पक्षाघाताचा प्रकार आहे. पक्षाघात झाल्यानंतर त्वरित उपचार केल्यास काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता वाढते. ज्या चेतापेशी मृत होतात त्यांच्याजवळील चेतापेशींच्या वृक्षिका मृत चेतापेशींची जागा घेऊन अवयवांचे नियंत्रण करतात. मर्यादित प्रमाणात अवयवांची हालचाल, बोटांची हालचाल किंवा हातापायांचा उपयोग करता आल्यास पक्षाघात झालेल्या रुग्णाचे जीवन परावलंबी होत नाही.
प्राणिमात्रांमधील पक्षाघात काही प्राण्यांच्या जाती भक्ष्य पकडण्यासाठी त्या भक्ष्यामध्ये परिणाम घडून येईल अशा जीवविषाचा वापर करतात. काही प्राणी अशा तंत्राचा वापर शिकारी प्राण्यापासून सुटका करून घेण्यासाठीही करतात. गांधीलमाशीच्या काही जाती प्रजनन चक्र पूर्ण करताना तिची मादी नाकतोडयासारख्या भक्ष्याला दंश करून पक्षाघात घडवून आणते आणि त्याला घरट्यात आणून ठेवते. त्यानंतर ती या नाकतोडयाच्या शरीरात अंडी घालते. अंडयातून बाहेर पडलेले डिंभ त्या नाकतोडयावर जगतात.
जपानमध्ये आढळणारे फुगू हे विषारी मासे आहेत. या माशांमध्ये टेट्रोडोटॉक्सिन हे चेतासंस्थेवर परिणाम करणारे जीवविष असते. हे मासे ज्यांना दंश करतात त्यांच्या चेतापेशींमधील सोडियम आयनांच्या कार्यात बिघाड निर्माण करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश
गुदद्वाराच्या आतील भागास असलेल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे तेथील आंतरवर्णासह सैल सुटते त्या वेळी हाताला कसला तरी कोंब किंवा मोड लागतो. ब-याचदा यामध्ये वेदना व रक्तस्राव प्रकट होतो. या स्थितीलाच मूळव्याध असे म्हणतात. मूळव्याधीचे दोन प्रकार करण्यात आलेले आहेत. 1. आंतर मूळव्याध व 2. बाह्य मूळव्याध. मोड किंवा अंकु र किंवा व्रण गुदद्वाराच्या आतील भागात निर्माण झाले असतील तर त्याला आंतर मूळव्याध असे म्हणतात. हेच अंकुर जेव्हा आणखी खाली सरकून गुदद्वाराच्या बाहेर येतात तेव्हा त्याला बाह्य मूळव्याध, असे म्हणतात. एकाच व्यक्तीला वरील दोन्ही प्रकारचा त्रास असू शकतो.
मूळव्याधीची लक्षणे : मलत्यागाच्या वेळी जळजळणे, वेदना होणे आणि रक्तस्राव होणे हे या आजाराचे प्रारंभिक लक्षण होय. याशिवाय मलाच्या वरील भागावर लालसर रेषा प्रकट होणे, थेंब थेंब रक्त पडणे, मलाशयातून रक्तस्राव होऊन अॅ निमिया निर्माण होणे इत्यादी लक्षणे प्रकट होतात.
योगासने व व्यायाम : योगासने ही मूळव्याधीवर अतिशय उपायकारी व्यायाम पद्धती आहे.
रोज सकाळी २-३ किलोमीटर चालणे. सकाळ-संध्याकाळ सर्वांगासनाच्या स्थितीमध्ये राहून सायकल चालवण्यासारखा व्यायाम करावा. या उपचाराने पूर्णपणे मूळव्याधी बरी झाली असता नैसर्गिक जीवन पद्धतीची कास सोडू नये.
ऑपरेशनच्या नावाखाली मूळव्याधीला जाळण्याचे व कापण्याचे प्रयोग चालतात. यामुळे वरवर फायदा निश्चितच दिसून येतो, परंतु चुकीच्या आहाराविहारात सुधारणा न केल्याने मोठ्या आतड्याचे इतर विकार उद्भवतात. दुसरे विकार होऊ नयेत म्हणून ऑपरेशननंतरही नैसर्गिक उपचार पद्धती अमलात आणली पाहिजे.
आहार चिकित्सा व उपचार रोज १०-१२ ग्लास पाणी प्यावे. हिरव्या पालेभाज्या जास्त आहारात असाव्यात. चिकन, मटन, मसाल्याचे पदार्थ, तेलकट, बाजरीची भाकर, जास्त गरम पदार्थ टाळावेत. ओवा, जंगली ओवा, खुरासणी ओवा यांचे बारीक चूर्ण करून थोड्याशा लोण्यात कालवून सकाळ-संध्याकाळ मूळव्याधीच्या फोडांवर लावावे. वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.
होमिओपॅथिक उपचार होमिओपॅथिक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. यापासून कोणतेही दूष्परिणाम होत नाही. रुग्णाचा सर्वांगीण अर्थात शारीरिक आजाराचा व मानसिकतेचा अभ्यास करून रुग्णाला औषध दिले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोकं हाताऐवजी चमच्याने जेवतात. आणि या प्रकारे जेवताना स्वत:ला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. आयुर्वेदाप्रमाणे आमचे शरीर पंचतत्त्वांनी निर्मित झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्त्वाचे अस्तित्व आहे.
अंगठा- अग्नी
तर्जनी- वायू
मध्यमा- आकाश
अनामिका- पृथ्वी
कनिष्का- पाणी
जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा पाची बोटांना आपसात जोडून तोंडात घास भरतो, याने पंचतत्त्वांचा समतोल होत असून शरीराला मिळणारं अन्न ऊर्जा देणारं असतं. हाताने जेवल्याने आमचा मेंदू आमच्या पोटाला अन्नग्रहण करण्याचा इशारा देतो ज्याने पचन क्रिया सुधारते.
हाताने जेवताना आमचं सर्व लक्ष खाण्यावर केंद्रित असल्याने शरीराला मिळणारी पोषकता वाढते.
याव्यतिरिक्त हाताने जेवण केल्याने तोंड भाजण्याचा धोकाही कमी होतो. कारण अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही याचा अंदाज येतो.
आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुपवरुन
भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.
गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.
१. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
२. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
४. गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
७. सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
९. महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
१०. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
११. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
१२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
१३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
१४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
१५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
१६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.
१७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
१८. 5 पाने तुळशीची, 5 चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
१९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
२०. 30 मिली गोमुत्रात 3 चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
२१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
२२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
२३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
२४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
२५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
२६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
२७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
२८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात.
२९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
३५. 2 ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे. ४०. गोमूत्र, शिरा व धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साठू देत नाही.
४१. किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
४२. प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या.
४३. किडनी व प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमुत्रामुळे सुधारते.
४४. गोमुत्र व तुळस सर्व वास्तुदोष घालवतात.
गोमुत्रासारखे दूसरे कुठलेही औषध नाही, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त, कोणत्याही रोगांशिवायही नियमित घेऊ शकता.
गोमुत्र नेहमी 8 पदरी सुती कापडाने गाळून घ्या. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने ते जास्त दिवस टिकून रहते. एक महिन्याने व्यायला येणाऱ्या आणि व्यायल्यानंतर 1 महिना गोमुत्र घेऊ नये. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नये. ताजे गोमुत्र मिळत नसल्यास, गोधनअर्क घ्यावा व त्यासोबत गोमुत्र वटी जरूर घ्यावी.
-- WhatsApp वरील आरोग्यदूत या ग्रुपवरुन साभार
शरीरावर जन्मतःच जे छोटे-छोटे काळे ठिपके असतात त्यांना तीळ म्हणतात. तिळाला मस असेही म्हणतात. मेलॅनीन हे रंगद्रव्य असलेल्या पेशींपासून तीळ तयार होतात. काहींच्या जन्मापासूनच शरीरावर तीळ असतात आणि त्यामुळे त्यांना ‘जन्मखूण’ मानतात. परंतु बऱ्याचदा हे तीळ लहान वयात, पौगंडावस्थेत किंवा गरोदरपणात शरीरावर वाढू शकतात. बहुधा वाढत्या वयाबरोबर ते दिसेनासे होतात. शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ वाढू शकतात. ते आकारमानाने लहान-मोठे असून चपट (सपाट) किंवा त्वचेच्या वर उंचवट्यासारखे असतात. दुसऱ्या प्रकारच्या तिळाला फुगीर तीळ म्हणतात. त्यांचा रंग फिकट तपकिरी ते निळसर-काळा असतो. बहुतेक तीळ लहान असतात आणि त्यांच्या दृश्यरूपात सहसा बदल होत नाहीत. काही वेळा तिळावर लांब व गडद केस असतात. अशा केसयुक्त तिळामध्ये कर्करोग उद्भवण्याचा संभव अधिक असतो. काही कुटुंबातील सदस्यांच्या शरीरावर तीळ वाढण्याची प्रवृत्ती असू शकते. तीळ सहजासहजी दिसून येत नाहीत. मात्र, चेहऱ्यावरील ठळकपणे दिसणारे तीळ काही लोकांना अनाकर्षक वाटतात. असे तीळ शस्त्रक्रियेने काढून टाकता येतात.
बहुतेक तीळ घातक नसतात. मात्र, क्वचित प्रसंगी त्याचे रूपांतर कर्करोगात होऊ शकते. अशा प्रकारच्या कर्करोगाला कृष्ण कर्करोग (मेलॅनोमा) म्हणतात. या रोगाची सुरुवात तिळापासून होऊन त्याचा रंग बदलतो, खाज सुटते, आकार वाढतो आणि काही वेळा तेथून रक्त वाहते. या रोगामुळे लगतच्या निरोगी ऊतींचा नाश होतो आणि हा कर्करोग शरीराच्या इतर भागांत पसरू शकतो. वेळीच निदान झाल्यास आणि उपचार केल्यास कृष्ण कर्करोग बरा होऊ शकतो. त्यामुळे तिळाच्या स्वरूपात कोणताही बदल झाल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.
या तिळांचा आपल्या स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये शरीराची लक्षणं पाहून व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगण्याच्या विधीला सामुद्रिक विद्या म्हणतात. सामुद्रिक विद्येनुसार मनुष्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत शरीरावरील तिळांचा वेगवेगळा प्रभाव असतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश
‘भारतीय संस्कृती आणि स्त्रिया’ असा विषय चर्चेला आला की स्वाभाविकपणे सतीप्रथा, विधवा पुनर्विवाह बंदी इथपासून ते शिक्षणाचा अभाव आणि 'चूल आणि मूल' इतकेच बंदिस्त आयुष्य अशा गोष्टी हमखास वाचायला, ऐकायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात तसेच आहे का? याचा पूर्वग्रहरहित विचार तथाकथित बुद्धिवादी लोक मुळीच करत नाहीत. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी ते अगदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माँसाहेब, महाराणी सईबाईसाहेब अशा कित्येक कर्तृत्ववान स्त्रियांची नावे आपल्या नजरेसमोर आहेत. भारतीय समाज खरंच स्त्रियांबाबत अनुदार दृष्टिकोन ठेऊन वागत असता तर ही नावे खचितच दिसली नसती हे साधेसोपे निरीक्षण आहे. मात्र मेकॉले आणि मॅक्सम्युल्लर आदिंनी पेरलेल्या विषारी बीजांचे आज वृक्ष झालेले असल्यानेच अशा गोष्टी आमच्या माथी मारल्या जातात. अशाच प्रकारचा कांगावा केला जातो तो स्त्रियांच्या आरोग्याबाबतदेखील भारतीय संस्कृती उदासीन आहे म्हणून!! याबाबतची सत्यपरिस्थिती वाचकांसमोर यावी यासाठी हा लेखप्रपंच.
आयुर्वेद हे प्राचीनतम वैद्यकशास्त्र असून आयुर्वेदाने स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वंकष विचार सर्वप्रथम जगासमोर मांडला. कायचिकित्सा आणि कौमारभृत्यतंत्र या शाखांच्या अंतर्गत आयुर्वेदाने स्त्रियांच्या आरोग्याचा विचार मांडला आहे. मासिक पाळी, सगर्भावस्था, प्रसूती झाल्यावर अशा तीन टप्प्यांत हा विचार करता येईल.
मासिक पाळी:
मासिक पाळी हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण शारीरिक आणि मानसिक घटनाचक्र आहे. स्त्रीला खऱ्या अर्थाने 'स्त्रीत्व' प्रदान करणारी बाब म्हणजे मासिक पाळी होय. केवळ प्रजननक्षमताच नव्हे तर स्त्रियांचे एकंदरीत आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची गोष्ट. मात्र सध्याच्या काळात सुमारे ८० ते ९० टक्के मुलींना अनियमित मासिक पाळीची समस्या असल्याचे दिसून येते. आम्हा वैद्यांकडे येणाऱ्या स्त्रीरूग्णांत पीसीओडी सारखे निदान घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पुढे जाऊन स्त्रियांमध्ये गर्भधारणा न होणे म्हणजेच वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण म्हणजे पीसीओडीसारख्या समस्या आहेत हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे. आयुर्वेदीय उपचारांनी या समस्येत उत्तम लाभ होतो हे सत्य असले तरी त्याचे मूळ कारण हे प्रामुख्याने बदलत्या जीवनशैलीत आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
झोपण्या-उठण्याचा अनियमित वेळा, सतत बाहेरचे अनारोग्यकर पदार्थ खात राहणे, चॉकलेट्सचा अतिरेक (लहान मुलं खात नसतील इतकी चॉकलेट्स पौगंडावस्थेतील मुली फस्त करतात असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.) आणि व्यायामाचा अभाव ही मासिक पाळीच्या समस्या निर्माण करणाऱ्या कारणांपैकी प्रमुख कारणं. ब्राह्ममुहूर्तावर उठणे आणि रात्री उशिरापर्यंत जागून चॅटिंग न करता वेळच्या वेळी झोपणे इथपासून ते प्रकृतीनुसार कोणी कुठला आहार घ्यावा इथपर्यंत आयुर्वेद बारकाईने विचार करतो. पूर्वीच्या काळी मासिक पाळीशी संबंधित समस्या असल्यावर पिंपळ वा वडाला प्रदक्षिणा मारणे हा ‘तोडगा’ सुचवला जाई. यात अन्य काही नसून केवळ शारीरिक व्यायाम अपेक्षित आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आयुर्वेदात केवळ पीसीओडी सारखीच समस्या नव्हे तर मासिक पाळीशी संबंधित किमान २० समस्यांचा विचार केला असून त्यांना 'योनिव्यापद' असे म्हणतात. आज आयुर्वेदात स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र या विषयात पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम असून स्वतंत्रपणे कार्यरत असणारे 'आयुर्वेदीय स्त्रीरोगतज्ज्ञ' आहेत हे अनेकदा आपल्याला ठाऊक नसते म्हणून मुद्दाम नमूद करत आहे.
मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना त्यांची नाजूक स्थिती लक्षात घेता संपूर्ण विश्रांती मिळावी याबाबत आयुर्वेद आग्रही आहे. या काळात स्त्रियांनी पचायला हलका आहार घ्यावा, व्यायामादि शारीरिक श्रम करू नयेत याचे सविस्तर वर्णन चरकसंहितेत वाचायला मिळते. आजही तसे करणेच श्रेयस्कर आहे. दुर्दैवाने 'स्त्री-पुरुष समानता' या शीर्षकाखाली काही विचित्र संकल्पना आपल्या मनात रुजवलेल्या असल्याने त्यांचा गैरफायदा घेत काहीजण सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातींत मासिक पाळीच्या काळात गिर्यारोहण वा अन्य खेळ वगैरे आता सहजशक्य आहेत असे चित्र रंगवत असतात. मात्र या दिवसांत केलेल्या अशा दगदगीचे किती गंभीर दुष्परिणाम त्या स्त्रीच्या आरोग्यावर होतात याकडे मात्र आम्ही उत्पादन खपवण्याच्या नादात सोयीस्कर दुर्लक्ष करतो. 'इष्टं धर्मेण योजयेत।' असे शास्त्र सांगते. अर्थात, योग्य गोष्ट समाजात रुजवण्यासाठी धर्माचा आधार घ्यावा. स्त्रियांना या काळात आराम मिळावा ही भावना घराघरांत पोहचावी या हेतूनेच त्याला धार्मिक विचारांची जोड दिली गेली. काही काळाने त्याचा विपर्यास झाला हेदेखील मान्य. मात्र तसा विपर्यास होणे ही तत्कालीन समाजाची मर्यादा आहे; शास्त्राची नव्हे. अर्थात हाच एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. त्यामुळे तूर्त आपण पुढील मुद्द्याकडे वळूया.
सगर्भावस्था:
सगर्भावस्था म्हणजे बाळंतपण हा स्त्रियांच्या आयुष्यातील अतिशय नाजूक आणि सुखदायी असलेला काळ. माता आणि तिच्या गर्भात वाढणारे बालक यांच्या एकंदर आरोग्याचा सर्वांगीण विचार आयुर्वेदाने केलेला आहे. आजकाल बाळंतपण आणि आयुर्वेद हे शब्द एकत्र ऐकले की स्वाभाविकपणे जो शब्द आपल्या मनात येतो तो म्हणजे ‘गर्भसंस्कार’. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आयुर्वेद बाळंतपणातील एकंदर आहार-विहार आणि औषधी यांबद्दल सविस्तर वर्णन करताना गर्भसंस्कार हा शब्द कुठेही वापरत नाही!! आयुर्वेदात वापरलेली संज्ञा आहे ‘सुप्रजाजनन’. मग ‘गर्भसंस्कार’ हा शब्द इतका प्रसिद्ध कसा? ‘मार्केटिंग’ हे त्याचे एकमेव उत्तर आहे! गरोदरपणात काय खावे, टाळावे याचे मार्गदर्शन कोणत्याही पुस्तक, सीडी यांतून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष वैद्यांना भेटूनच घ्यावे. आजकाल तर गरोदरपणात करायची आसने फारच फोफावत आहेत. मात्र त्याकरतादेखील तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा. स्वतःच्या बुद्धीने केलेल्या प्रयोगांचे गंभीर परिणाम होतात; आणि काहीही दोष नसताना खापर मात्र आयुर्वेदावर फुटते हे प्रत्यक्ष रुग्णानुभवांवरून नमूद करू इच्छितो.
आयुर्वेदानुसार ‘चांद्रमास’ गणना धरून २८ दिवसांचा एक महिना याप्रमाणे १० महिन्यांची सगर्भावस्था मानली जाते. (आधुनिक विज्ञानाने मानलेला ९ महिने ९ दिवस हा काळदेखील तितकाच म्हणजे सरासरी २८० दिवसांचा असतो. हा केवळ मोजणीच्या पद्धतीतील फरक आहे.) या प्रत्येक महिन्यात गर्भाची वाढ कशी होते आणि त्यानुसार मातेने कोणता आहार आणि औषधी घ्यावीत याचे सखोल वर्णन चरक-सुश्रुतादि आयुर्वेदीय ग्रंथांत आलेले आहे. आजही कित्येक माता-भगिनी आधुनिक उपचारांसह बाळंतपणासाठी आयुर्वेदीय वैद्यांचा नियमित सल्ला घेऊन स्वतःचे आणि बालकाचे उत्तम आरोग्य राखून आहेत.
प्रसुतीपश्चात:
नवजात अर्भक आणि त्याची माता या दोघांच्याही आरोग्याची काळजी आयुर्वेदाला आहे. आई आणि बाळ या दोघांनाही तेलाने मालिश करणे, मातेला दुध-तूपयुक्त उत्तम आहार देऊन तिच्या शरीराची या काळात झालेली झीज भरून काढणे याबाबत आयुर्वेद आग्रही आहे. बालकासाठी त्याच्या आईचे दुध हा सर्वोत्तम आहार आहे हे जगाला सर्वप्रथम सांगितले ते आयुर्वेदाने. केवळ इतकेच नव्हे तर स्तन्यपान (स्तनपान नव्हे!) करवण्याची योग्य पद्धत, अंगावरील दूध जास्त/ कमी करण्यासाठीचे उपचार आणि मातेच्या दुधातील दोष व त्यांवर करण्याचे उपचार अशा प्रकारे अद्यापि आधुनिक वैद्यकानेही विचारात न घेतलेले पैलू आयुर्वेदात सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहेत. आयुर्वेदानुसार केवळ आहार म्हणून स्तन्यपान देण्याची सीमारेषा ही सहा महिने आहे. आज आपण पाश्चात्य संशोधने आणि काही खिसेभरू एनजीओ यांच्या नादी लागून २-३ वर्षे वयापर्यंत बालकांना स्तन्यपान देण्याची भलामण करत आहोत. मात्र तसे करणे मातेच्या आरोग्यास घातक आहे याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. इतक्या उशिरापर्यंत स्तन्यपान करवल्यावर मुले ते सोडण्यास तयार न होणे, मातेच्या हाडांची झीज, केस गळती, कंबरदुखी यांसारख्या समस्या आ वासून उभ्या राहतात. आम्हाला जणू या साऱ्याची जाणीवच नाही. दुसरीकडे मात्र बाळाला तेल लावू नका, बाळगुटी देऊ नका असे ‘अशास्त्रीय’ सल्ले देण्यात याच लोकांची चढाओढ लागल्याचे दुर्दैवी दृष्य पाहायला मिळते आहे. अर्थात; सत्य परेशान हो सकता है; पराजित नहीं| या न्यायाने लवकरच आयुर्वेदाचा शाश्वत उपदेश सर्वप्रथम पाश्चात्य देशांतील लोक पाळू लागतील; त्यानंतर कदाचित आपल्याकडच्या लोकांना नेहमीप्रमाणेच जाग येईल!!
बाळंतपणानंतर योग्य काळानंतरही कित्येक स्त्रियांना शरीरसंबंध पूर्ववत् ठेवण्यास अडचणींना सामोरे जावे लागते. यावरही आयुर्वेद आणि कामशास्त्र यांच्या समन्वयातून उत्तम उपचार करता येतात हा प्रत्यक्ष चिकित्सानुभव आहे.
एकंदरीत विचार करता; आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असल्याने आपल्या संस्कृतीने स्त्रियांबद्दल कोणताही संकुचित दृष्टीकोन न ठेवता उलट त्यांच्या आरोग्याबद्दल अतिशय काळजीपूर्वक विचार केला आहे हे स्पष्ट होते. आचार्य चरक तर म्हणतात; जगात उत्तम असे जे जे काही आहे ते सर्व स्त्रिच्याच ठायी आहे. नवरात्रीसारखा उत्सव म्हणजे या स्त्रीत्वाचा मूर्तिमंत सन्मान आहे. मात्र ‘या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता’ असे म्हणत गौरव करण्याची प्रथा ज्या देशात आहे; त्याच देशात ‘बेटी बचाव देश बचाव’ सारखे अभियान हातात घ्यावे लागणे हे निश्चितच सुखावह नाही. ही स्थिती बदलायची असल्यास केवळ सण साजरा करून भागणार नाही. चला तर; नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री-आरोग्याचा जागर करण्यास कटिबद्ध होऊया आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून या दुर्गेची आरोग्यपूजा बांधूया.
© वैद्य परीक्षित स. शेवडे; MD (Ayu.)
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
मित्रांनो सध्या तापाची साथ जोरात सुरु आहे.
लहान बाळापासून वयस्कर माणसांपर्यंत सर्व जण तापाने आजारी आहेत व दवाखान्याच्या खेपा घालत आहेत.
दोन तीन दिवस औषध,injection, saline लावून देखील ताप कमी जास्त होत राहतो.मग तुमचा डॉक्टर रक्त तपासायला सांगतो,ज्यात प्लेटलेट कमी झाल्याचे समजते किंवा डेंगू ची टेस्ट positive येते.
ह्यावर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायचा सल्ला मिळतो.
घाबरलेला पेशन्ट आणि धास्तावलेले कुटुंबीय त्याला ऍडमिट करतात. ट्रीटमेंट सुरु होते,सलाईन चा ,injections चा मारा सुरु होतो,रोज रोज रक्त तपासणी केली जाते .
पण दुर्दैवाने काहींच्या प्लेटलेट्स वाढण्याच्या ऐवजी उलट कमीच होताना दिसतात.
अश्या वेळी कोणीतरी सांगितलेले किंवा वाचलेले उपचार म्हणजे पपईच्या पानांचा रस,ड्रॅगन फ्रुट,किवी इत्यादी पेशन्टला देण्यात येतात मात्र विशेष फायदा होताना दिसत नाही.
सुदैवाने अश्या डेंगू तापासाठी किंवा कोणत्याही viral तापासाठी (म्हणजे चिकूनगुण्या,फ्लू इत्यादी) अगदी रामबाण औषध आहे
Eupatorium 200 (यूपाटोरीयम 200)
पेशन्टला डेंगू झाला असेल, ताप उतरत नसेल,प्लेटलेट खूप कमी झाले असतील,अंगदुखी फार असेल,डोके खूप दुखत असेल
तर अधिक वेळ न दवडता वरील औषध liquid मध्ये मागवा.
अर्धा लिटर पाणी चांगले उकळून घ्यावे मग थंड झाल्यावर एका प्लास्टिक च्या बाटलीत भरून घ्यावे
ह्या बाटलीत वरील औषधाचे फक्त 3 थेंब टाकावे आणि बाटली झाकण लावून जोरजोरात हलवावी आणि
2 - 2 झाकण औषध दिवसातून दर 3- 3 तासाने देत रहावे.
पेशन्टला 24 तासात फरक जाणवेल,आराम होईल आणि 48 तासात तो जवळजवळ बराच होईल.
तर तुमचा कोणी नातेवाईक आजारी असेल तर Eupatorium 200 हे औषध होमिओपथी च्या दुकानातून लगेच मागवा आणि सांगितल्याप्रमाणे सुरु करा.
डॉ प्रसाद हजारे,भिवंडी ठाणे
व्हाट्स अप 9881374994
सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो.
दिवाळीमध्ये भेसळ तेलापासून आपले व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याचे संरक्षण करा
रिफाइंड तेल आरोग्यास तारक कि मारक ?
तेल रिफाइंड करण्याची
प्रक्रिया पाहूया :
तेल रिफाइंड करण्याची
प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे
१) कच्च्या तेलामध्ये प्रथम गॅसोलीन
मिसळून तेलाला पातळ करतात.
"गॅसोलीन" हे "रॉकेलसारखे" एक रसायन आहे.
२) त्यानंतर त्यात हॅग्झेन नावाचे
रसायन घालून पुष्कळ ढवळले जाते.
यामुळे तेलातील शरिराला आवश्यक असणारी "स्निग्ध द्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथीने, आणि खनिजे" नष्ट होतात.
3) नंतर गॅसोलीन आणि हॅग्झेन यांचा दुर्गंध नष्ट करण्यासाठी तेल ३०० अंश फॅरनाइट तापमानावर उकळले जाते.
४) तेलाचा रंग सुधारण्यासाठी याला ब्लीचिंग केले जाते. यामुळे
"बीटा कॅरोटीन आणि क्लोरोफिल" ही शरिरातील "कॉलेस्टेरॉल" घटवणारी "आवश्यक तत्त्वे नष्ट" होतात.
५) त्यानंतर डिगमिंग नावाच्या प्रक्रियेने तेल पातळ केले जाते.
६) पुन्हा तेलाचा दुर्गंध नष्ट करण्यासाठी तेल ४६४ अंश फॅरनाइट तापमानावर गरम केले जाते. असे तेल खराब होऊ नये, म्हणून त्यात प्रिझर्वेटीव्झ् घातली जातात.
एकदा गरम केलेले तेल परत वापरू नये, अशी आपली परंपरा आहे.
रिफाइंड तेल आपल्याकडे येण्यापूर्वी कमीत कमी २ वेळा मोठ्या तापमानावर उकळलेले असते, तसेच त्यामध्ये हानीकारक विषारी द्रव्ये घातलेली असतात. शासनाच्या एका कराराद्वारे खाद्य तेल आस्थापनांना कोणत्याही खाद्य तेलामध्ये विशिष्ट प्रमाणात पाम तेल (Palm oil) मिसळण्याची सूट मिळाली आहे.
असे रिफाइंड तेल खाल्ल्यानेच आज रक्तदाब, कर्करोग, थॉइरॉड, संधीवात यांसारखे आजार/ विकार बळावत आहेत.
२. रिफाइंड तेलाला पर्याय :
रिफाइंड तेल कधीही वापरू नये. त्याऐवजी घाण्यावर काढलेले शेंगदाणा, सुर्यफुल इ. कच्चे खाद्य तेल आरोग्यासाठी सर्वांत चांगले आहे.
म्हणून आपल्या गावात
किंवा शहरात कुठे तेलाचे घाणे आहेत का ? याचा शोध घेऊन तेथे
तेलबिया देऊन स्वतः तेल काढून घ्यावे.
लाकडी घाण्यावरचे शुध्द तेलाचा वापर आहारात करावा.
संकलन
गोवारी गोगटे अशोक
महाड रायगड
संदर्भ..शरीराचा PH
आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन साभार
Copyright © 2025 | Marathisrushti