वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लहानांपासून थोरापर्यंत सकाळी-सकाळी नाश्त्याची आवश्यकता असते. रात्रभर शरीराने विश्रांती घेतली असली तरीही हा नाश्ता खूप उपयोगी आहे व जेवणाच्या कालावधीपर्यंत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम आहे. मात्र हा नाश्ता प्रत्येक ऋतुमानानुसार घेणं आवश्यक आहे. केवळ चहा पिणे म्हणजे रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
नाश्ता म्हणजे काय ?
सकाळी ९ च्या अगोदर नाश्ता महत्वाचा आहे. भरपेट जेवण म्हणजे नाश्ता नव्हे. नाश्त्यात बेकरीचे ब्रेड, बिस्किटे, तळलेले पदार्थ, वनस्पती तूप यांचा वापर घातक आहे. कृत्रिम पेये, नमकीन पदार्थ यांचाही वापर योग्य नाही. मोड आलेली कडधान्ये, उपीट, पोहे, शिरा, इडली, गूळ-शेंगदाणे, दूध, फळे आदींनी युक्त नाश्ता असावा. शिवाय तो प्रत्येकाच्या व्यवसायावरही ठरलेला असावा.
व्हॉटसऍपवर व्हायरल झालेला डॉ. भूषण सोहनी यांचा हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार
’८′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद !
मांसाहार्यांच्या आहारात मासे, अंडी, चिकन या सोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. सूप, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थांचा समावेश करण्याची ही ’८′ कारणं जरूर जाणून घ्या.
१) मधूमेहींसाठी फायदेशीर -
खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यातील मांसल भागामध्ये कार्बोहायड्रेट कमी असते त्यामुळे मधूमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे. यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरूर आहारात ठेवा.
२) कॅन्सरचा धोका कमी होतो -
खेकड्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे मिनरल शरीरातील ऑक्सिडेटीव्हमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. परिणामी कर्करोगाचा धोकादेखील कमी होतो. त्यातील अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरात कॅन्सरला प्रवृत्त करणार्या घटकांचा प्रादूर्भाव कमी करण्यास मदत करतात.
३) हृद्यविकाराचा धोका कमी होतो -
खेकड्यांमधून ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा मुबलक पुरवठा होतो. यामध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. तसेच यामध्ये आढळणार्या नायसिन व क्रोमियम यामुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी हृद्यविकाराचा आणि स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
४) त्वचाविकारांपासून सुटका होते -
खेकडे खाल्ल्याने अॅक्ने, रॅशेस अशा त्वचाविकारांबरोबरच डॅडरफचादेखील त्रास कमी होण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये मुबलब प्रमाणात झिंक आढळते, यामुळे तेल निर्मितीचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे त्वचाविकारापासून बचाव होण्यास मदत होते.
५) रक्तपेशींच्या निर्मितीचे कार्य सुधारते -
रक्तपेशींच्या निर्मीतीसाठी आवश्यक असणार्या व्हिटामिन बी12 चा खेकड्यांमध्ये मुबलक साठा असतो. तसेच यामुळे अॅनिमिया होण्याचा धोकादेखील कमी होण्यास मदत होते. खेकड्यातील ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीरातील रक्तभिसरण्याची प्रकिया सुधारण्यास मदत करतात.
६) वजन घटवण्यास मदत करते -
चविष्ट असले तरीही खेकड्यांमध्ये कॅलरी अधिक प्रमाणात आढळत नसल्याने तुम्ही खेकड्यांचा आहारात समावेश नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हांला आरोग्यदायी मार्गाने वजन आटोक्यात ठेवू शकता. तसेच यामधून मिळणारे प्रोटीन घटक खेळाडू आणि बॉडीबिल्डर व्यक्तींच्या आहारात असणे फायदेशीर ठरते.
७) रक्तदाब नियंत्रणात राहतो -
खेकड्यामधील पोटॅशियम घटक शरीरात इलेक्ट्रोलेटसचे संतूलन राखण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये आढळणारे हे पोटॅशियम घटक शरीरात रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास प्रमुख भूमिका निभावतात.
८) सांधेदुखी कमी होते -
खेकडे हे सेलेनियम या अॅन्टीऑक्सिडंटचा पुरवठा करणारे उत्तम मांसाहारी स्रोत आहेत. शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. म्हणूनच आहारात खेकड्यांचा समावेश करावा. यामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यास तसेच सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
डाॅ. भूषण सोहनी. ( एम.डी.)
प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. किरण नाबर यांनी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांना लिहिलेले पत्र वाचा आणि पुढेही पाठवा....
प्रति,
संपादक,
दैनिक लोकसत्ता.
महाशय,
आपल्या वर्तमानपत्रात गेले कित्येक दिवस यू बी फेअर व नो स्कार मलमाच्या पान-पान भरून जाहिराती येत आहेत. या मलमांमध्ये स्टीरॉइड हे औषध आहे. ही मलमे चेहऱ्यावर लावल्यामुळे मुरमे येणे , त्वचा पातळ बनणे, त्वचा कायमची लाल बनणे, स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस उगवणे, चेहऱ्याची आग होणे, चेहरा फार हळवा (Sensitive) बनणे,चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या स्पष्ट बनणे असे अनेक दुष्परिणाम आम्हा त्वचारोगतज्ञांना पहावयास मिळतात.
या जाहिरातींना भुलून सर्वसामान्य तरुण मुले व मुली त्वचेवर तकाकी यावी व त्वचा गोरी व्हावी म्हणून अशी मलमे वापरण्याची दाट शक्यता आहे. या मलमांनी त्वचा तात्पुरती उजळ वाटेल देखील पण एक दोन महिन्यात वर उल्लेख केलेले दुष्परिणाम त्यांना होण्याची दाट शक्यता आहे.
आपणाला अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठवून या मलमांचे दुष्परिणाम असल्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती आपल्या वर्तमानपत्रात करण्यास मनाई केली होती.
एवढे झाल्यानंतर तरी एक सामाजिक बांधीलकी म्हणून आपण अशा मलमांच्या जाहिराती आपल्या वर्तमानपत्रात प्रसिध्द न करणे अपेक्षित होते.
Advertisement Standard Council of India ने देखील या मलमांच्या जाहिराती करू नयेत असा निर्णय दिला होता.
फक्त भरपूर पैसा मिळतो म्हणून अशा प्रकारच्या मलमांच्या जाहिराती आपल्या वर्तमानपत्रात छापणे हे आपल्या सारख्या मराठीतील अग्रेसर वर्तमानपत्राला निश्चितच शोभा देणारे नाही.
आम्हा त्वचारोगतज्ञांच्या अखिल भारतीय संघटनेने जनतेशी बांधिलकी म्हणून स्टीरॉइड मलमांच्या गैरवापराविरुध्द देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही वर्तमानपत्रात स्टीरॉइडच्या दुष्परिणामांवर लेख लिहितो, सर्वसामान्यांसाठी सोशल मिडियावर लेख, पोस्टर व व्हिडिओ उपलब्ध करतो, डॉक्टर्स व केमिस्टसाठी लेक्चर्स देतो व स्टीरॉइड मलमांची तीव्रता, त्यांचे दुष्परिणाम याबद्दल त्यांचे प्रबोधन करतो . तसेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटून अशा प्रकारे जनसामान्यांना अपाय होणाऱ्या मलमांवर कारवाई करण्याची मागणी करतो.
पण आपल्या वर्तमानपत्रांसारखी अव्वल वर्तमानपत्रे अशा प्रकारे पैशासाठी समाजाला अपायकारक अशा मलमांच्या पानभर जाहिरातीला आपल्या वर्तमानपत्रात स्थान देऊन आमच्या कामगिरीवर बोळा फिरवितात.
हे आपणाला योग्य वाटते का ? सामान्य नागरिकाला या दुष्परिणामांची कल्पना नसल्याने तो ही मलमे खरेदी करेलही, पण आपल्याला पूर्ण कल्पना असताना देखील आपण अशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध करून सामान्य माणसाच्या चेहऱ्याचे आरोग्य धोक्यात घालीत आहात. आपण लवकरच याबद्दल खुलासा करावा व याप्रकारे जाहिरात देऊन सामान्य नागरिकांच्या चेहऱ्याचे आरोग्य वेठीस धरू नये, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू ,
डॉ. किरण नाबर
त्वचारोगतज्ञ , अलिबाग.
( स्टीरॉइड वापराविरुद्ध अखिल भारतीय त्वचारोगतज्ञ संघटनेच्या मोहिमेचा महाराष्ट्र राज्य समन्वयक )
१६ डिसेंबर २०१५ रोजी पाठविलेल्या पत्राला २० दिवसांनंतरही उत्तर आलेले नाही . सामाजिक बांधिलकीच्या गोष्टी करणाऱ्या अग्रेसर वर्तमानपत्राकडून ही अपेक्षा नव्हती.असो. निदान या जाहिरातीच्या आहारी जाऊन तरुणांनी आपला चेहरा खराब करू नये म्हणून हे पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा .
उवा या कीटकवर्गात मोडतात. डोक्याचे केस, जांघेतले केस व कधीकधी पापण्यांचे केस यांच्या मुळाशी उवा अंडी घालतात. त्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात. उवा त्वचेच्या वरच्या भागात घरे करतात. त्यामुळे खूप खाज सुटते. डोक्यात एखादीही ऊ असली तरी खूप खाज सुटते. उवांची अंडी केसांच्या मुळांना चिकटून राहतात. उवा अस्वच्छतेमुळे व निकृष्ट राहणीमानामुळे एकमेकांत पसरतात. एकमेकांचे कपडे, पांघरूण, इत्यादी वस्तूंमार्फत, तसेच प्रवासात - शाळेत जवळ बसल्याने उवा एकमेकांमध्ये पसरतात.
उपचार
(अ) रॉकेल व खोबरेल तेल निम्मे मिसळून रात्री डोक्यास किंवा खाज असलेल्या भागात चोळून लावावे. किंवा याऐवजी बी.एच.सी. चे (गॅमा) पातळ औषध डोक्याच्या केसांना चोळून चोळून लावावे. दुकानात उवांसाठी बाटल्याही मिळतात.
(ब) औषध लावल्यानंतर सकाळी बारीक दातांच्या फणीने मेलेल्या उवा, लिखा काढून टाकाव्यात. यानंतर डोके साबण आणि पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.
(क) आठवडयाभरात परत औषध लावावे लागते. कारण चुकून राहून गेलेल्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात, त्या माराव्या लागतात.
(ड) कपडयांवरच्या उवा मारण्यासाठी कपडे उन्हात ठेवावे. बी.एच.सी. पावडर कपडयांना लावली तरी उवा मरतात.
घरगुती उपाय
(अ) उवांवर सीताफळाच्या पानांचा किंवा बियांचा रस लावणे हा एक उपाय आहे. यासाठी सीताफळाची कोवळी पाने काढून कुटून त्यांचा रस डोक्यास केसांमध्ये चोळून लावावा.
(ब) याऐवजी आणखी एक उपाय म्हणजे खोबरेल तेलात कापूर मिसळून ते तेल डोक्याला, केसांना चोळून लावणे.
-- आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन साभार
या वर्षी भाऊबीजेला माझ्या बहिणींनी पतंजली च्या विविध साबणांचे एक कीट मला भेट दिले होते. मी ते साबण वापरतोय. मी जगभरातले साबण वापरले आहेत परंतु पतंजली चे साबण मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप आवडले आहेत. मुलतानी मातीचा साबण तर अप्रतिम.
हे साबण भारतीय आहेत. परंतु ते फक्त भारतीय आहेत म्हणून नव्हे तर त्यांचा दर्जा जगातील अतिशय उत्तम आहे. फक्त भारत नव्हे तर जगभर पतंजलीचे उत्पादने लोकप्रिय होतील. आधी वापरताना भीती वाटत होती पण आता इतर विदेशी कंपन्यांचे साबण कपाटात पडून आहेत.
मी काही पतंजली ची जाहिरात करीत नाही पण मला जे योग्य वाटते ते सर्वांना सांगायला काय हरकत आहे. अनुभव घेवून मगच निर्णय घ्या.
साबणाचा अनुभव घेतल्यावर सुनेनी पतंजलीचे बिस्किटे काल आणली आहेत. अजून चव घेतली नाही. त्याबद्दल नंतर सांगेन.
भारतीय जे जे चांगले आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. बाहेरच्या देशात जेव्हा भारतीय उत्पादने दिसतात तेव्हा मनस्वी आनंद होतो.
चिंतामणी कारखानीस --
29 December 2015
आपल्या तान्हुल्याची भूक भागवणाऱ्या त्या मातेला सभोवताली असलेल्या आणि बहुतेक वेळा तिरक्या नजरेने तर कित्येकदा थेट पाहणाऱ्या विकृत व्यक्तींचा. अशा प्रवृत्ती समूळ नष्ट होणे शक्य नाहीच पण किमान त्यांच्यावर ताबा मिळवण्याकरता वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे.
ताणतणावाच्या विरुद्ध क्रिया म्हणजे हास्य!
हास्य ही परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वांग सुंदर देणगी ! सुंदर हास्य हे मानवाशिवाय त्याने कोणालाच दिलेलं नाही.
माकडचाळे केल्यावर माकड हसतं असे म्हणतात पण ते म्हणजे दात विचकण, त्याला सुंदर हास्य म्हणता येणार नाही.
कोणत्याही अपेक्षेशिवाय तुमच्या स्वास्थासाठी मिळालेल्या या देणगीचा मानवाला कैकवेळा विसर पडतो आणि कधी उगाचच ताणतणावाच्या गर्तेत खोल खोल जातो.
साध्या साध्या गोष्टींकडे मार्मिक नजरेने पाहा. हास्य आपोआप फुलून येतं. आयुष्यात पूर्वी कधी घडलेले गमतीदार प्रसंग आठवून पाहा. आठवणीने सुद्धा हसायला येतं.
तेव्हा ताणतणावांच्या विचारांना दूर सारून हास्याला उजाळा द्या !
‘मी आयुर्वेदातले ग्रन्थ वाचले तर मला आयुर्वेद समजणार नाही का?’ असा काहीजणांचा प्रश्न असतो. याचे निःसंदिग्ध उत्तर ‘नाही’ असे आहे.
प्रश्नाचे उत्तर सध्याला सर्रासपणे बाळाचे वय दीड- दोन वर्षे होईपर्यंत असे ऐकू येते. कित्येक बालरोगतज्ज्ञ असे मत अहंअहमिकेने मांडत असल्याचे दिसते. मात्र तसे करणे मुळीच योग्य नाही. आयुर्वेदानुसार विचार करता; बाळाला दात येण्यास सुरुवात होणे हे वय स्तन्यपान थांबवण्यास सुरुवात करण्याचे वय असते. माणसाचेच कशाला; जगातील कुठल्याही सस्तन प्राण्यांतील माता आपल्या पिल्लांना दात येऊ लागले की त्यांना पाजणे थांबवतात.
माणसांचा विचार करता साधारणपणे वयाच्या सहाव्या महिन्यापासून लहान मुलांना दात येण्याची प्रक्रिया सुरु होते. याच कालावधीत त्यांना ‘अन्नप्राशन संस्कार’ करवून स्थूल आहार देण्यास सुरुवात करावी असे आयुर्वेद सांगतो. पुढील दोन- तीन महिन्यांत मातेने स्तन्यपान करवणे थांबवून बकरीचे वा ते न मिळाल्यास देशी गायीचे दूध सुरु करावे असे आयुर्वेदाचे मत आहे.
वरील वयाच्या नंतरही दोन दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत स्तन्यपान करवत राहिल्यास; ते सोडवताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. शिवाय; त्या मातेला कंबरदुखी, गुडघेदुखी, केस गळणे असे त्रास सुरू होतात. त्यापासून पुढे ही वाटचाल हाडांची झीज भरून काढण्यास कॅल्शियमच्या गोळ्या देणे, त्यातील कॅल्शियम किडनीमध्ये साचून राहिल्याने किडनी स्टोन होणे आणि मग ते काढून टाकण्यास अन्य पर्यायांचा विचार न करताच शस्त्रक्रिया करायला लावणे इथपर्यंत होऊ शकते. ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत्।’ हा सिद्धांत इथेदेखील लागू होतो हे कायम लक्षात ठेवावे. बाळगुटी वापरणे, बाळांना तेल लावणे- धुपन करणे, काजळ वापरणे वाईट आणि वयाची दीड दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत स्तन्यपान करवणे मात्र चांगले असे ‘अशास्त्रीय’ सल्ले कोणीही देत असल्यास दुर्लक्ष करावे.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Aug 4, 2016
नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य करणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतात. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चामडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग इ. नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
आपल्याकडे डोक्यामध्ये होणाऱ्या नायटाचे प्रमाण त्यामानाने कमीच आहे. कंबर व जननेन्द्रियाजवळील भागाला सुद्धा नायटा होतो. हे चट्टे गोलाकार असल्यामुळे त्यांना रिंग वर्म म्हणतात. त्यांना कमालीची खाज सुटते. जर हा चट्टा केसात झाला तर केस जावून तेवढया ठिकाणी टक्कल पडते आणि नखांवर झाला ते नखे वर उचलली जाऊन खरखरीत व वाकडी होता.
हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इ. भागात जास्त करून होतात. खूप खाज सुटते व नायटाची वाढ वेगाने होते. पण कातडीवर बधीरता मात्र नसते. नखे कापावीत.
नायटा झालेला भाग साबण व स्वच्छ पाण्याने रोज धुतला तर हा रोग बरा होतो.
हेक्झाक्लेरोफिन असलेल्या साबणाचा जास्त उपयोग होतो. घामाने भिजलेले सगळे कपडे नेहमी बदलावेत व स्वच्छ धुवून कोरडे असतांना वापरावे. नायटा झालेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून ती सुर्यप्रकाशात राहील असा प्रयत्न करावा. १ भाग सल्फर व १० भाग तेल यांचे मिश्रण करून नायटा झालेल्या जागी लावावे. बाजारात मिळणारी नायटा, गजकर्ण विरोधी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
डोक्यात खवडे झाले असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत. डोक्यातील नायटा पाण्याचा शेक देऊन तेथील केस उपटून वरील औषधांचा उपयोग करावा. नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात, ते टाळण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.
नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवावे.
एकच फणी व एकमेकांचे कपडे ( स्वच्छ धुऊन वाळविल्याशिवाय) वापरू नयेत.
नायटा झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
बाह्य उपचारांबरोबरच पोट सुद्धा साफ असणे गरजेचे आहे. त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- - व्हॉटसऍप वरुन
Copyright © 2025 | Marathisrushti